Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘एटीएस’च्या रडारवर मोबाइलविक्रेते

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलवून देणाऱ्यांवर कारवाई करीत दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाच जणांना अटक केली. देशविघातक कृत्यांत या मोबाइलचा वापर करण्यासाठी असा प्रकार केला जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चोरीच्या मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बेकायदेशीररित्या बदलून दिले जात असल्याचा प्रकार धुळे शहरात सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस दलातील दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तपास करीत कारवाईचा बडगा उभारला. शहरातील गरुड कॉम्प्लेक्समधील एस. कुमार मोबाइल या दुकानातून रवी सुरेश मोटवाणी, सहारा मोबाइल शॉपचे जितेंद्र गुलाबराव पाटील, शारदा स्पिकर दुकानातील पुनीत मनवरलाल मेघाणी, सेल्युलर मोबाइल शॉपमधील मोईन अक्तर महेमुद मुजंमिल अन्सारी आणि मोहम्मद सादिक अख्तर हुसेन (सर्व रा. धुळे) यांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फायद्यासाठी मोबाइलचे आयएमईआय क्रमांक बदलण्याचा उद्योग ते करीत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्याकडून सुमारे चार लाख ९२ हजार २०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे नारायण माळी, प्रेमसिंग सिसोदे, अब्दुल्ला शेख, शाम चंद्रात्रे, किरण बागूल, सायबर सेलचे उपपोलिस निरीक्षक नीलेश शेंबडे, संजय पाटील, राजेश सैंदाणे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुक्त’च्या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सेवक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. एकूण ११ जागांसाठी ही निवडणूक होती. महिला राखीव दोन पदे सोडता उर्वरित ९ जागांसाठी संचालकांची निवड बिनविरोध करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी अनुरथ वाघमारे, उपाध्यक्ष किशोर शिंदे, मानद सचिव विलास बधान तर सहसचिवपदी रवींद्र सोनवणे यांची निवड झाली आहे.

बिनविरोध म्हणून निवडून आलेले अन्य संचालक पुढीलप्रमाणे, अमोल पाटील, दीपक जाधव, दिलीप साळुंके, दत्तु वरंदळ, लक्ष्मण शेंडे. मुक्त विद्यापीठ सेवक सहकारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष म्हणून अनुरथ वाघमारे, उपाध्यक्ष किशोर शिंदे, मानद सचिव विलास बधान तर सहसचिव म्हणून रवींद्र सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित अध्यक्ष वाघमारे व सचिव बधान यांनी पतसंस्थेने आजवर केलेल्या कामगिरीबद्दल तसेच मागील संचालक मंडळाने केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून आभार मानले. तसेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावण्यासाठी तसेच सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अत्याधुनिक प्रणालींचा वापर करून नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन आणि कुलसचिव डॉ. प्रकाश भोंडे यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल. एम. गमे यांच्या वतीने कृष्णा पाटेकर यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत वेतनासाठी गटसचिवांचे धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण भागातील विकासाच्या योजना ज्या यंत्रणेमार्फत राबवल्या जातात त्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या गटसचिवांनी थकीत वेतनाच्या मुद्द्यावर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. गटसचिवांच्या मागण्यांवर सहकारमंत्र्यांच्या दालनात चर्चा निष्फळ ठरल्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नाशिक जिल्हा सहकारी संस्था सेक्रेटरी व कर्मचारी संघटनेने दिला आहे.

राज्यातील बहुतांश गटसचिवांना अनेक मह‌िन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना संघटनेने मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनात म्हटल्यानुसार राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थेवर काम करणाऱ्या गटसचिवांचा गेल्या अनेक वर्षांपासून सेवा आणि वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी संघटनेने अनेकदा आंदोलने केली आहेत. मार्च २०१२ मध्ये मुंबईत झालेल्या आंदोलनानंतर विविध कार्यकारी संस्थेने संबंधित आर्थिक वर्षात वाटप केलेल्या पीक कर्जाच्या एक टक्का अनुदान एका महिन्यात देण्याचे आश्वासन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले होते. परंतु, अजूनही सहकार विभागाने या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवलेला नाही. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील ७० टक्के गटसचिवांना दिवाळीतही वेतन मिळाले नाही. गटसचिवांनी उपाशीपोटी संस्थेचे कर्जमाफीचे कामकाज कसे करायचे असा सवाल संघटनेने उपस्थ‌ित केला आहे. सद्यःस्थ‌िती‌त अनेक गटसचिवांकडे दोनहूनही अधिक संस्थांचा कार्यभार आहे. तरीही गटसचिव अत्यल्प वेतनात काम करतात. त्यांचे वेतन वेळेवर होत नाही. गेल्या महिन्याचे वेतनही त्यांना अद्याप मिळालेले नाही. संस्था तोट्यात जाण्यास जिल्हा सहकारी बँका कारणीभूत असतानाही जिल्ह्यातील २५८ संस्थांवर कारवाई करण्याचा इशारा सहकार खात्याने दिला आहे.

‘सहकार सहाय्यक’ म्हणून सेवेत घ्या

सरकारने कृषी सहाय्यकाच्या धर्तीवर, सहकार क्षेत्रातील गटसचिवांना ‘सहकार सहाय्यक‘ म्हणून सरकारी सेवेत घ्यावे अशी मागणी संघटनेने केली आहे. गटसचिवांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, तसेच सहकार खात्यात भरती करताना शामराव कदम कम‌िटीच्या शिफारशींनुसार गटसचिवांचा विचार व्हावा. गडाख समितीच्या शिफारशींप्रमाणे ग्रामसेवकासमान वेतन श्रेणी व हक्क सेवा लागू कराव्यात आदी मागण्याही संघटनेने निवेदनाद्वारे केल्या आहेत. आंदोलनात राजेंद्र काळे, हेमंत भरवीरकर, अर्जुन पाटील, के. डी. गव्हाणे, विश्वनाथ निकम, माधव जाधव, बाळासाहेब पवार, दीपक पवार, सुनील गोसावी, विश्वनाथ निकम आदींसह शेकडो गट सचिवांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभापतींची नावे जाहीर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नव्याने तयार करण्यात आलेल्या तीन समित्यांच्या सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारांची घोषणा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केली. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सतीश कुलकर्णी यांना वैद्यकीय व विधी समितीच्या सभापतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. तर शहर सुधार समितीची धुरा भगवान दोंदे यांच्यावर सोपव‌िण्यात येणार आहे. विधी समिती सभापती पदाची उमेदवारी ही शीतल माळोदे यांना देण्यात आली आहे. शिवसेनेकडून उमेदवार दिला जाणार नसल्याने ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी भाजपने शहर सुधार, विधी व वैद्यकीय आणि आरोग्य या तीन समित्यांची नव्याने निर्मिती केली आहे. या समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाची निवड २४ जुलैला होणार आहे. त्यासाठी अर्जवाटप सुरू झाले आहे. तीनही समित्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती व उपसभापती त्यांचेच होणार आहेत. याबाबत मंगळवारी बैठक झाली. त्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. ‘शहर सुधार’च्या उपसभापती पदासाठी स्वाती भामरे, ‘वैद्यकीय व आरोग्य’च्या उपसभापतीसाठी शांता हिरे, तर विधी समितीच्या उपसभापती पदासाठी राकेश दोंदे यांच्या नावाची घोषणा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा दणका

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वेने फुकट प्रवास करणाऱ्या फुकट्यांनो सावधान, आता तुमची काही खैर नाही जणू असा इशारा देत रेल्वे विभागाने ७ ते १५ जुलै दरम्यान धडक मोहीम राबव‌िली. या आठ दिवसात ८९३ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली असून, तीन लाखांपेक्षा जास्त दंडवसुली केली आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडलामध्ये येणाऱ्या मनमाड रेल्वे जंक्शन विभागात गेल्या अनेक दिवसांपासून विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मनमाड-इगतपुरी शटल तसेच गोदावरी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेसमधून येणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. मनमाड जंक्शनमधून दररोज सुमारे १३० पेक्षा जास्त रेल्वे प्रवाशी गाड्यांची वाहतूक होत. दररोज २० हजारांपेक्षा जास्त प्रवाशी ये-जा करतात.

मोदी सरकारने ज्या रेल्वे प्रवाशी गाड्यांचे उत्पन्न ५० टक्क्यापेक्षा कमी असेल अशा गाड्या बंद करण्यात याव्यात, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वेच्या ब्लॅक लिस्टमध्ये या गाड्यांचा समावेश होऊ नये म्हणून भुसावळ मंडळाने कारवाई सुरू केली आहे. गोदावरी, पंचवटी एक्स्प्रेस, इगतपुरी शटल यांच्यासह भुसावळ-मुंबई पॅसेंजर, हुतात्मा एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, आझादहिंद एक्स्प्रेस यांच्यासह अनेक रेल्वे प्रवाशी गाड्यांमध्ये भुसावळ रेल्वे

मंडळाचे विभागीय वाणीज्य महाव्यवस्थापक सुनीलकुमार तसेच सहायक वाणीज्य व्यवस्थापक (टिकीट निरीक्षक विभाग) अजयकुमार यांच्या आदेशानुसार मनमाड विभागाचे मुख्य विभागीय वाणीज्य निरीक्षक अनिल बागले यांनी कारवाईचे सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये मुली वाचल्या हो...!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात मुला-मुलींच्या जन्मदरात समानता आणण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे आणि स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सोनोग्राफी केंद्रांची तपासणी, गर्भपात रोखण्यासाठी वैद्यकीय विभागाने सुरू केलेल्या डेली मॉनिटरिंगमुळे शहराच्या हद्दीत मुलींच्या दरहजारी जन्मदरात चांगलीच सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये दरहजारी मुलींचा जन्मदर ८८० एवढा कमी होता. मात्र, जनजागृती आणि वैद्यकीय विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे तो मे महिन्यात अकराशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे प्रथमच मुलींचा जन्मदर हजाराच्या पार गेला आहे.

शहरातील स्त्री-भ्रूणहत्येला जबाबदार असणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांसह स्त्रीरोग तज्ज्ञांना वैद्यकीय विभागाने वर्षभरापासून रडारवर घेतले आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात आहे, तसेच संशयास्पद ठिकाणी धाडी टाकून कारवाई केली जात आहे. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी येथील जनतेमध्ये जनजागृती, स्त्रीजन्माचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध पथनाट्ये, चित्रफीत, मेळावे यांसारख्या माध्यमांतून वैद्यकीय विभागामार्फत जनजागृती केली जात आहे. त्यामुळे मुलगाच पाहिजे ही मानसिकता आता हळूहळू लोप पावत चालली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून जानेवारीपासून मुलींच्या जन्मदरात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. वैद्यकीय विभागाने मुलींचा जन्मदर हा हजारी ९५० ते एक हजार अपेक्षित केला होता. मात्र, हा जन्मदर सरासरी अकराशेपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पालकांच्या मानसिकतेतही बदल घडत असल्याचे सकारात्मक चित्र शहरात आहे.

शिंदे, लहाडे घटनांमुळे चाप

पालिकेच्या वैद्यकीय विभागाने टाकलेल्या धाडींमध्ये द्वारका येथील डॉ. बी. एन. शिंदे हॉस्पिटल, तसेच डॉ. लहाडे गर्भपात प्रकरण उघडकीस आले होते. या दोन घटनांमुळे सोनोग्राफी केंद्रांसह डॉक्टरांमध्येही जरब बसली असून, स्री भ्रूण तपासणी जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे या दोन घटनांमुळे अवैध गर्भपाताला आळा बसल्याचेही सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

मुलींचा जन्मदर

डिसेंबर २०१६ ः ८८०, जानेवारी २०१७ ः ९४०, फेब्रुवारी ः ८९४, मार्च ः १११०, एप्रिल ः १२००, मे ः ११००.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरेन, अजिंक्य उपांत्य फेरीत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत विरेन पटेल व अजिंक्य शिंत्रे यांनी प्रवेश केला.

या स्पर्धेस नासिक जिमखाना येथे उत्साहात सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी नाईक म्हणाले की, नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी जे करणे आवश्यक आहे, त्यासाठी मी आणि माझे खाते सर्वातोपरी तत्पर राहू. खेळाडू हा केंद्रबिंदू मानून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास कायम प्राथमिकता देण्यात येईल. नाशिकमध्ये विविध खेळांसाठी व विषेशतः टेबल टेनिससाठी चांगले व पोषक वातावरण असल्याचे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रीय व राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तनिशा कोटेचा, सायली वाणी, पीयूष जाधव, कुशल चोपडा, पुनीत देसाई व अजिंक्य शिंत्रे या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर शिवछत्रपती पुरस्कार विजेते असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, संघटनेचे सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर आदि उपस्थित होते.

पुरुष एकेरी, यूथ मुले-मुली, ज्युनिअर मुले-मुली, सबज्युनिअर मुले-मुली, कॅडेट मुले-मुली, प्रौढ (वेटरन) पुरुष अशा विविध दहा गटांत ही स्पर्धा होत आहे. यावेळी संघटनेचे मिलिंद कचोळे, संजय वसंत, सतीश पटेल, अलीअसगर आदमजी, ए. बी. कोपीकर, एम. एस. जवळगेकर आदी उपस्थित होते.


सामन्याचा निकाल

पुरुष एकेरी- उपांत्यपूर्व फेरी - विरेन पटेल विजयी विरुद्ध ओेमकार जोंग (३-१), अजिंक्य शिंत्रे वि. वि. पंकज रहाणे (३-१)

कॅडेट मुले प्राथमिक फेरी - कुशल चोपडा वि. वि. रोहन पाटील (३-०), आर्यन पोळ वि. वि. अर्णव चावला (३-१)

सब ज्युनिअर मुली- प्राथमिक फेरी - अनन्या फडके वि. वि. सई शिरूरकर (३-०), संस्कृता ठाकूर वि.वि. ऐश्‍वर्या अफजलपूरकर (३-०)

प्रौढ एकेरी उपांत्य फेरी - सतीश पटेल वि. वि. उमेश कुंभोजकर (३-१), मयुरेश कुलकर्णी वि. वि. राजेश भरवीरकर (३-१)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चॉकलेट मेकिंग’ची पर्वणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत निर्माण उपवन, काळाराम मंदिराजवळ, पंचवटी येथे हे वर्कशॉप होणार आहे. विशेष म्हणजे या वर्कशॉपमध्ये हेल्थ चेक अप व्हाउचर्स आणि बंपर प्राइझ जिंकण्याचीही संधी सहभागी झालेल्यांना मिळणार आहे.

चॉकलेट हा जसा लहान मुलांचा आवडीचा विषय आहे तसा तो मोठ्यांचाही वीक पॉइंट आहे. तुम्हाला आवडणारी चॉकलेट्स तुम्हाला घरी बनवता आली तर? तुमची हीच आवड ओळखून मटा कल्चर क्लबतर्फे चॉकलेट मेकिंग वर्कशॉपचे आयोजन आहे. दि. २३ जुलै रोजी होणाऱ्या या वर्कशॉपमध्ये सीमा गवारे पाटील या चॉकलेट कसे बनवायचे, चॉकलेटचे फिलिंग कसे करायचे तसेच, चॉकलेट रॅपिंग, टेम्परिंग, चॉकलेटचे विविध प्रकार, चॉकलेट ब्राउनिज आदी बनवून दाखविणार आहेत. हे वर्कशॉप सर्वांसाठी मोफत असून, या वर्कशॉपसाठी नावनाेंदणी आवश्यक असून, त्यासाठी ७०४०७६२२५४ किंवा ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--
पॅरेंट्स डेनिमित्त सेल्फी विथ पॅरेंट
नाशिक : पॅरेंट्स डेनिमित्त मटा कल्चर क्लबतर्फे सेल्फी विथ पॅरेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ जुलै ते २२ जुलै यादरम्यान वाचकांनी पालकांसोबतचा सेल्फी events.mata@gmail.com या ई-मेल वर पाठवायचा आहे.

भाग्यवान ५० विजेत्यांना हेल्थ चेक-अप व्हाऊचर्स चॉकलेट मेकिंग वर्कशॉपमध्ये दिले जातील. या वर्कशॉपमध्ये रेफ्रिजरेटर, म्युझिक सिस्टिम यांसारखे बंपर प्राइझ जिकंण्याचीही संधी मिळणार आहे.

तेव्हा पालकांसोबतचा सेल्फी आम्हाला मेल करा आणि चॉकलेट कसे बनवायचे हे शिकण्यासाठी आजच चॉकलेट मेकिंग वर्कशॉपसाठी नावनेंदणी करा. सोबत व्हाऊचर्स आणि बंपर प्राइझेसही जिंकता येतील. अधिक माहितीसाठी ०२५३-२६६३७९८७ किंवा ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फार्मसीसाठी सीईटी की जेईई?

0
0

अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे केंद्राच्या भूमिकेकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंजिनीअरिंग आणि फार्मसी या अभ्यासक्रमांसाठी ‘नीट’ परीक्षेच्या धर्तीवर एकच प्रवेश परीक्षा राबविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली होती. आता २०१८-१९ या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांचा सीईटी आणि जेईई परीक्षेसाठी अभ्यास सुरू झाला आहे. त्यामुळे या संदर्भातील घोषणा केंद्राने लवकर केल्यास वर्षभराचे नियोजन करणे विद्यार्थ्यांना सोपे जाईल. अन्यथा, वर्ष अखेरीपर्यंत संभ्रम कायम राहिल्यास पुढील वर्षी मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

इंजिनीअरिंग आणि फार्मसी कॉलेजांमध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ‘सीईटी’ की ‘जेईई’ परीक्षा याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने अद्याप भूमिका मांडलेली नाही. परिणामी इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या विषयाच्या अनुषंगाने संभ्रम आहे. सरकारने या विषया संदर्भात त्वरित भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.

आता सर्वच कॉलेजांमध्ये बारावीच्या वर्गांना सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षासाठी विविध प्रवेश परीक्षांची तयारीदेखील सुरू केली आहे. पण सरकारची परीक्षांबाबतची भूमिका स्पष्ट नसल्याने विद्यार्थ्यांना जेईई व सीईटी परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात करतानाचा संभ्रम कायम आहे. या अभ्यासक्रमांसाठी देशस्तरावर नीटच्या धर्तीवर एकच परीक्षा राहील की देश व राज्यस्तरावर दोन वेगळ्या परीक्षा राहतील, परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग राहणार का, खासगी कॉलेजांमधील १५ टक्क्यांचे प्रवेश कोणत्या परीक्षेनुसार होतील, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना उपस्थित होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्मेटसाठी चिमुरड्यांची साद

0
0

इस्पॅलियरमध्ये हेल्मेट, सीटबेल्टसंदर्भात प्रबोधन

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

घरामध्ये आईबाबांच्या हेल्मेटवर रस्ता सुरक्षेसंदर्भातील स्टिकर चिकटविण्यापासून तर रस्त्यावर उतरून नाटिका, अभिनय आणि संगीत सादरीकरणासारख्या विविध उपक्रमांमधून मंगळवारी (दि. १८) पूर्व प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी नागरिकांना हेल्मेट घालणे आणि सीट बेल्ट लावण्यासंदर्भात प्रबोधन केले. निमित्त होते इस्पॅलियर स्कूलच्या वतीने आयोजित हेल्मेट जागृती विषयक सामाजिक उपक्रमाचे.

त्रिमूर्ती चौक परिसरात या विद्यार्थ्यांनी नागरिकांना रस्ता सुरक्षेचा संदेश दहा प्रयोगांच्या माध्यमातून दिला. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. या प्रयोगांमध्ये विद्यार्थ्यांनी मुलांनी हेल्मेट घातलेल्या कुटुंबाचे वर्कशीट रंगविले. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नियमांचे वर्कशीट अभ्यासातून सोडविले. यासाठी खास शिक्षकांनी वर्कशीट बनवून घेतले होते. इयत्ता तिसरी आणि पाचवीच्या मुलांनी आई वडिलांना रस्ता सुरक्षा या विषयावर पत्र लिहिले. हे पत्र आता टपाल पेटीत टाकण्यात आले असून लवकरच त्यांच्या पालकांना ते मिळणार आहे. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी ‘आय लव्ह यू फॉर वेअरिंग हेल्मेट’असा संदेश असणारे स्टिकर्स विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या हेल्मेटला चिकटवले.

सहावीच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट जनजागृती या विषयावर नृत्य सादर केले. पाचवीच्या मुलांनी अपघात होऊ नये यासाठी ट्रॅफिक नियमांच्या आधारावर नाटिका सादर केली. इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट वापर आणि नो हॉर्न यासाठी प्लास्टिकच्या डस्टबीनपासून रॉकबॅन्डचे सादरीकरण केले. डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून साकार झालेली एव्हरी डे, नो-हॉर्न डे या उपक्रमावरही गीत सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालिकेतील निर्णय एकमतानेच’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील वादावर शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी पडदा टाकला आहे. पालिकेतील सर्व निर्णय हे एकमतानेच होत असल्याचा दावा सानप यांनी केला आहे. पालिकेत नवीन नगरसेवक मोठ्या प्रमाणावर निवडून आले आहेत. त्यामुळे कामांसाठी त्यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना साकडे घालण्यास सुरूवात केली आहे. परंतु पदाधिकाऱ्यांमध्ये कोणताही असमन्वय नाही. गैरसमजूतीतून काही प्रकार झाला असला, तरी सर्व निर्णय हे पदाधिकारी एकमतानेच घेत असल्याची पुष्टी त्यांनी दिली आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने वाद निर्माण झाला होता. विविध पदाधिकारी स्वतंत्र दरबार भरवत असल्याने महापौर रंजना भानसी नाराज झाल्या होत्या. त्यावरुन भाजपमध्ये नवा वाद सुरू झाला होता. पालिकेत सत्ता येवून चार महिने झाले तरी विकासकामांना गती मिळत नसल्यामळे नगरसेवक सैरभैर झाले होते. त्यामुळे त्यांनी अनुभवी पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरूवात केली होती. त्यावरूनही वाद निर्माण झाला होता. हा वाद पक्षाच्या नेत्यांपर्यंत पोहचला होता. जिल्हा संघटनमंत्री किशोर काळकर, माजी प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी यांनी मंगळवारी पालिकेत येवून नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी पालिकेतील पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या देण्यात आल्यात. महापालिकेत भाजपची सत्ता आल्याने नागरिकांच्या विश्वासाला तडा जावू देवू नका, असा सल्ला भूसारी आणि काळकर यांनी दिला.

नव नगरसेवकांचा अभ्यास वर्ग

येत्या २० जुलैला महासभा आहे. भाजपमध्ये अनेक नगरसेवक नवखे आहेत. अभ्यासू नगरसेवकांची कमतरता असल्याने भाजपला अडचणींचा सामना करावा लागत आहे. विरोधक हे अभ्यासपूर्ण असल्याने महासभेत पक्षाची भूमिका योग्य रितीने मांडली जात नाही. म्हणून मंगळवारी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा अभ्यास वर्ग घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानाविरोधात महिलांचा पुन्हा ठिय्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आरटीओ कॉर्नरवरील अमित वाइन्स हे दारूचे दुकान पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी (दि. १७) बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास या दुकानाचे शटर उघडल्याचे येथील महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्या संतप्त झाल्या व त्यांनी दुकानासमोर पुन्हा ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. दुकानाकडे जाणारा ग्राहकांचा मार्गच या महिलांनी ठिय्या देऊन बंद पाडला.

शनिवार (दि. १५) सायंकाळपासून या दारू दुकानासमोर महिलांनी आंदोलनास सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशीही स्थानिक महिलांनी दारू दुकान उघडण्यास विरोध केला होता. दुकानासमोर खुर्चीवर गणेशाची मूर्ती ठेवून भजन-गायन, थाळीनाद, घोषणाबाजी करण्यात आली. सोमवारी सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनी या आंदोलक महिलांशी चर्चा केली. पुढील पाच दिवस हे दुकान बंद ठेवण्यात यावे, या पाच दिवसांच्या कालावधीत येथील रहिवाशांनी जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तोडगा काढावा, पाच दिवसांत तोडगा निघाला नाही, तर सहाव्या दिवशी दुकान सुरू करण्यास काही हरकत नसावी, असे ठरविण्यात आले. मात्र, तरीही मंगळवारी दिवशी हे दारू दुकान उघडण्यात आल्याने महिलांनी या दुकानासमोर ठिय्या देत ग्राहकांचा मार्गच अडविला. यावेळी महिला पोलिसांनी त्यांना म्हसरूळ पोलिस ठाण्यात या, तेथे या विषयावर चर्चा करू, असे सांगितले. मात्र, या महिलांनी आंदोलनाची जागा सोडली नाही. त्यामुळे ग्राहकांचीही दुकानाकडे येण्याची हिंमत झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब’चे घरबसल्या व्हा सदस्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सतर्फे वाचकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात. कल्चर क्लब त्यातीलच एक असून, या माध्यमातून विविध उपक्रम, कार्यक्रमांची संधी वाचकांना ‘मटा’ने उपलब्ध करून दिली आहे. अशा बहुढंगी ‘कल्चर क्लब’चे सदस्य होण्याची संधी ‘मटा’ने वाचकांना घरबसल्या उपलब्ध करून दिली आहे. मटा कल्चर क्लबचे फॉर्म वाचकांना घरबसल्या मिळणार आहेत.

मटा कल्चर क्लबतर्फे सातत्याने विविध सांस्कृतिक व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. लहानांपसून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा ‘हॅप्पी स्ट्रीट’ असो वा तरुणींसाठी ‘श्रावण क्वीन’ असो, त्याला वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मराठी संस्कृतीशी जोडलेली नाटके असोत किंवा वेस्टर्न झुम्बा डान्स, खाऊचा डबा, अशा विविध कार्यशाळा ‘मटा’ने आजवर आयोजित केल्या आहेत. कल्चर क्लब सदस्यांचे गेट टुगेदर, लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, किटी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निव्हल, सहल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा लाभ सदस्यांना वर्षभर घेता येतो. वाचकांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात येते. नाटकांसाठी विशेष सवलतही देण्यात येते. त्यासाठी आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा. हे सदस्यत्व घरबसल्या घेता येईल. आपल्या वृत्तपत्र विक्रेत्याशी संपर्क साधून सदस्य व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.


सदस्य होण्यासाठी हे करा...

तुम्हाला तुमच्या घरी मिळालेल्या फॉर्ममध्ये तुमची माहिती व्यवस्थित लिहा. हा फॉर्म आणि २९९ रुपयांचा BCCL या नावाचा चेक तुमच्या वृत्तपत्र विक्रेत्याकडे जमा करा. चेकच्या मागे तुमचे नाव आणि फोन नंबर लिहायला विसरू नका. हा चेक क्लीअर झाल्यानंतर तुम्हाला कल्चर क्लब सदस्यत्वाचे कार्ड थेट तुमच्या घरी मिळेल. त्यामुळे आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि विविध कार्यक्रमांचा आस्वाद घ्या!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑलिम्पिकसाठी खेळाडूंनी माहिती द्यावी

0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी सहभागी होऊन प्राविण्य मिळविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राज्याचा ऑलिम्पिक व्हिजन कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय प्राविण्यप्राप्त सर्व गटांतील खेळाडूंनी आपली वैयक्तिक व खेळाबाबतची माहिती शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्रीडा विभागामार्फत सन २०२०, २०२४, २०२८ व २०३२ या वर्षांत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी राज्याचा ऑलिम्पिक व्हिजन आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी खेळाडूंनी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील https://goo.gl/GNcsBN या लिंकवर जाऊन माहिती भरावी, असे आवाहन क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे यांनी केले आहे. राज्यातील सर्व गटांतील प्राविण्यप्राप्त खेळाडू, पालक, शाळा, महाविद्यालय, संस्था, मंडळे, त्यांचे प्रशिक्षक यांनी वरील संकेतस्थळावरील लिंकवर जाऊन माहिती भरून सदर माहितीची एक प्रत संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे आपल्या छायाचित्रासह जमा करावी.

सन २०१६-१७ मधील सर्व गटांच्या खेळनिहाय, शालेय राष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा, अख‌िल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांतील प्रथम, व्दित‌ीय व तृतीय क्रमांकाचे खेळाडू, शालेय आंतरराष्ट्रीय स्पर्धा, असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्पर्धा व वर्ल्ड विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यांतील प्रथम, व्दितीय, तृतीय व सहभागी खेळाडू तसेच दिव्यांग खेळाडूंनी (पॅरा गेम्स- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय) आपल्या कामग‌िरीची माहिती संकेतस्थळावरील विहित अर्जात देण्यात आलेल्या खेळ प्रकारानुसार भरण्याचे आवाहन करण्‍यात आले आहे. याबाबत काही शंका असल्यास संबंधित जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही डॉ. दुबळे यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक दरावरून पानेवाडीत संप

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पानेवाडी येथील भारत पेट्रोलिअम कंपनीने वाहतूक दराची निविदा काढताना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच नवीन दर मान्य नसल्यामुळे माल वाहतुकदारांनी सोमवारी रात्रीपासून संप पुकारला आहे. या संपात तब्बल ४०० टँकरधारक सहभागी झाले आहेत. संपामुळे राज्यातील विविध राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

पानेवाडी येथील भारत पेट्रोलिअम कंपनी व पेट्रोल डिझेल वाहतूक करणारे माल वाहतूकदार यांच्यात वाहतूक दरावरून संघर्ष सुरू आहे. गेल्या आठवड्यातही वाहतूकदार संपावर गेले होते. मात्र दराबद्दल आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला होता. सोमवारी कंपनी प्रशासनाने नवे दर निश्चित केले. हे दर कमी असून कंपनी प्रशासनाने विश्वासात न घेता दर निश्चित केल्याचा आरोप माल वाहतूकदार संघटनेचे नाना पाटील, संजय पांडे, सचिन गवळी यांनी केला आहे. त्यानंतर सोमवारी रात्रीपासून संप सुरू पुकारण्यात आला. या संपात ४०० टँकरधारक सहभागी झाले आहेत. मंगळवारी पानेवाडीतून एकही टँकर बाहेर गेला नाही.

बैठक निष्फळ

दरम्यान, मुंबई येथून पानेवाडी येथे दाखल झालेले कंपनीचे अधिकारी विनोदकुमार व नरसिंहन यांनी मंगळवारी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र वाहतूक दरावर एकमत न झाल्याने बोलणी फिसकटली. कंपनी वाहतूक दर कमी देणार असल्यामुळे संप पुकारल्याचे नाना पाटील, सचिन गवळी, संजय पांडे यांनी सांगितले.

दराचा वाद कायम

सध्या कंपनी वाहतूक दर प्रती किलोमीटर २ रुपये ३० पैसे देत आहे. त्यात वाढ करायचे सोडून कंपनी नव्या निविदेप्रमाणे प्रती किलोमीटर २ रुपये १६ दर पैसे देणार असल्याचे, माल वाहतूकदारांचे म्हणणे आहे. हे दर मान्य नसल्याने दर वाढवून मिळेपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भपातावर अॅपद्वारे नजर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्री भ्रुण हत्या रोखण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गर्भपातासाठी उपयोगी असलेल्या औषधी गोळ्यांचे आता पूर्ण ट्रॅकिंग केले जाणार आहे. त्यासाठी पालिका अॅप तयार करीत असून, त्याद्वारे कंपनी ते वितरकापर्यंतचा औषधी गोळ्यांचा हिशेब ठेवला जाणार आहे. त्यामुळे गर्भपाताच्या गोळ्यांचा गैरवापर टळणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय डेकाटे यांनी दिली.

स्रीरोग तलज्ज्ञांच्या शिफारशीशिवाय गर्भपातचे औषधी आता दिल्या जाणार नसून, त्याचीही माहिती पालिकेला देणे बंधनकारक केले जाणार आहे.

अवैध गर्भपातासाठी व स्री भ्रुण हत्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी शिवायच गर्भापाताच्य औषधांचा वापर केला जातो. स्रीरोग तज्ज्ञ आणि औषधी वितरक हे या गोळ्या परस्पर देत असल्याने गर्भापाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने गर्भापाताच्या औषधींचा अनधिकृत वापर रडारवर घेतला आहे. त्यासाठी अॅप विकस‌ित केले जात असून, या अॅपद्वारे उत्पादक कंपनी ते वितरकांपर्यंतचा दररोजचा हिशेब ठेवला जाणार आहे. गर्भपाताच्या औषधांचे डेली मॉन‌िटरिंग केले जाणार असल्याची माहिती डॉ. डेकाटे यांनी दिली आहे.

रेकॉर्ड ठेवणार

शहरातील सर्व मेडिकल स्टोअर्स आणि स्री रोग तज्ज्ञांची नोंदणी या अॅपवर केली जाणार आहे. त्यांच्यांकडून वापरल्या जाणाऱ्या डे टू डे गर्भपाताच्या औषधांची नोंदणी होवून त्याचे रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यास त्याचा तपशील पालिकेकडे मिळणार आहे. त्यामुळे मेडिकल स्टोअर्ससह डॉक्टरांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

असे चालणार अॅप

स्री रोग तज्ज्ञाने गोळ्या दिल्यानंतर त्यांची अॅपवर नोंद करावी लागणार.

वितरकालाही स्टॉकचा डेली रिपोर्ट वैद्यकीय विभागाला सादर करावा लागणार.

आपल्या रुग्णांसाठी डॉक्टरांना प्रथम अॅपवर नोंदणी करावी लागणार

औषधी कुठून घेतली, त्याचा वापर कशासाठी हवा, औषधांची गरज का हा सर्व तपशील या अॅपवर द्यावा लागणार


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकांनी शिकविला ‘धडा’

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एकिकडे आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची घोषणा आणि दुसरीकडे नामांकित इंग्रजी शाळांची संख्या कमी करणाऱ्या आदिवासी विभागाच्या दुटप्पी भूमिकेवर संतप्त पालकांनी अनोखे आंदोलन केले. आदिवासी आयुक्ताच्या मुख्य प्रवेशद्वारावरे या पालकांनी

ट्विंकल ट्विंकल लिटीर स्टार, जॉनी जॉनी एस पापा, अशा इंग्रजी कविता सादर करून या विभागाच्या कारभारावर टीका केली. नाशिक प्रकल्पात ५८६ अर्ज आले असताना फक्त २०६ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे उर्वरीत ३८२ विद्यार्थ्यांच्या पालकांनी मंगळवारी आदिवासी आयुक्तालयावर आंदोलन केले. पाल्यांच्या इंग्रजी शिक्षणासाठी पालकांनी मंगळवारी आयुक्तालयाच्या मुख्य द्वारावरच इंग्रजी वर्ग भरवून प्रवेशाची मागणी लावून धरली.

गेल्या चार वर्षांपासून या विभागाकडून आदिवासी मुलांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश उपलब्ध करून दिला जातो. शासनाने नामांकित शाळेत प्रवेश योजनेसाठी आदिवासी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. नाशिक प्रकल्पातून ५८६ अर्ज आलेले असून, प्रत्यक्षा केवळ २०६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील ,असे आदिवासी विकास विभागाकडून कळविण्यात आले. त्यामुळे उर्वरीत ३८२ विद्यार्थ्यांच्या प्रवेश होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. हा प्रश्न कायम असतानाच शासनाने पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बदलण्याचा तसेच बंद करण्याचा जो घाट घातला आहे, त्यामुळे पालक संतप्त झाले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पालकांकडून मंगळवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जाहीरपणे इंग्रजी कवितांचे वाचन केल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची कोंडी झाली होती.

दोन तास दिल्या घोषणा

शिष्टमंडळाने आदिवासी आयुक्तांची भेट घेतली. परंतु बोलणी फिस्कटल्याने शिष्टमंडळांसह १०० ते २०० आदिवासी बांधवांनी आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय काही आदिवासी बांधवांनी प्रवेशद्वारावरच इंग्रजीचा वर्ग भरविला. सुमारे दोन तास हे पालक प्रवेशद्वारासमोर बसून होते. या

आंदोलनाची दखल

घेवून विभागाने पालकांशी चर्चा केली. परंतु ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुलेपणाने करा वीजबिलांच्या तक्रारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

सरासरी वीजबिलापेक्षा जास्तीच्या वीजबिलांचे प्रमाण शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. अशा वीजबिलांबाबत महावितरण कंपनीकडे तक्रार करणाऱ्या वीजग्राहकांना आधी वीजबिल भरण्याची सक्ती महावितरणकडून केली गेल्यास संबंधित वीजग्राहकांनी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा ग्राहक पंचायतीचे सचिव विलास देवळे यांनी केले आहे.

शहरात वीजग्राहकांना वाढीव वीजबिले येणे, वीज मीटर वेगाने चालणे आदी समस्यांनी ग्रासले आहे. सरासरी वीजबिलापेक्षा वाढीव वीजबिल आलेल्या ग्राहकांकडून महावितरण कंपनीकडे तक्रार केल्यास आधी वीजबिल भरण्यास सक्तीही केली जात असल्याचा अनुभव काही वीजग्राहकांना आला आहे. वाढीव वीजबिलांच्या तक्रारींसंदर्भात महावितरण कंपनीकडून असहकार्य केले जात असल्याचे प्रकार शहरात घडत आहेत. अशा वीजग्राहकांनी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दररोज सरासरी दहा तक्रारी

वाढीव वीजबिले, सदोष वीज मीटर अशा स्वरूपाच्या दिवसाला सरासरी दहा तक्रारी जिल्हा ग्राहक पंचायतीकडे येत आहेत. या सर्व तक्रारींवर जिल्हा ग्राहक पंचायतीकडून वीजग्राहकांना मार्गदर्शन केले जात आहे. ग्रामीण भागातील वीजग्राहकांच्या ३० हजार तक्रारींचा जिल्हा ग्राहक पंचायतीने नुकताच निपटारा केला आहे. या सर्व तक्रारींतील वीजग्राहकांची वाढीव वीजबिले रद्द करण्यात आली आहेत.

महावितरणचे वीज मीटर घेणे वीजग्राहकांना बंधनकारक नसते. कंपनीचे सध्याचे २० टक्के वीज मीटर सदोष असल्याने ग्राहकांना वाढीव वीजबिले येत आहेत. आजवर कंपनीने कोणत्याही ग्राहकाला टेस्ट रिपोर्ट दिलेला नाही. वाढीव वीजबिलासदर्भात अंतर्गत तक्रार निवारण समितीकडेही वीजग्राहक तक्रार करू शकतात. मात्र, याची माहिती महावितरण वीजग्राहकांना देतच नाही. वीजपुरवठ्याविषयीच्या तक्रारी वीजग्राहक जिल्हा ग्राहक पंचायतीकडेही करू शकतात.

-विलास देवळे, सचिव, जिल्हा ग्राहक पंचायत

--

ज्या ग्राहकांना वाढीव वीजबिले आलेली आहेत त्यांच्यासाठी शहरात तक्रार निवारण शिबिरे घेण्यात आली आहेत. यापुढे तालुका स्तरावरही अशी शिबिरे घेतली जाणार आहेत. अजूनही वीजबिल, वीज मीटर यासंदर्भात काही तक्रार असल्यास अशा वीजग्राहकांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. तक्रारदार वीजग्राहकांना वीजबिल भरण्याची सक्ती महावितरणकडून केली जात नाही.

-सुनील पावडे, अधीक्षक अभियंता, नाशिक शहर मंडल, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावण दारात; त्र्यंबक अंधारात

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक नगरपरिषदेच्या सार्वजन‌िक दिवाबत्ती व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, शहरातील बहुतांश परिसरात पथदीप बंदावस्थेत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. श्रावण महिन्याच्या तोंडावर शहरात अशी समस्या उद्भवल्यामुळे भाविकांसह, रहिवाशांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

नगरपालिका महिन्याला लाखो रुपयांचे वीजबिल भरते. मात्र, नागरिकांना व भाविकांना अंधारात धडपडावे लागते. सिंहस्थ नियोजनात पथदीपांच्या तारा भूमिगत करण्यासाठी ४० लाख रुपये खर्च करण्यात आले. वीजेचा दाब अधिक झाल्याने या केबल भ्रष्ट झाल्याचे सांगण्यात येते. मुळातच योग्य मानांकाच्या केबल वापरल्या नसल्याने त्या जळाल्या आहेत. शहरात वापरण्यात आलेले एलईडीही कमी प्रतीचे असून, ते पुरेसा प्रकाशही देत नाहीत. अवघ्या वर्षभराच्या आत हे एलईडी बंद पडण्यास सुरुवात झाली आहे.

सध्या भूमिगत केबल जळाल्याने पुन्हा ओव्हरहेड वायरच्या सहायाने पथदीपांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यातही वारा, पाऊस सुरू होताच हे पथदिप बंद होतात. वीजवितरण कंपनीने साडेचार कोटी रुपये खर्च करून ओव्हरहेड वायर भूमिगत केली. त्यात आता नगरपालिकेने पथदीपांसाठी पुन्हा वायारीचे जंजाळ निर्माण करण्यास सुरवात केली आहे. अगदी अलिकडे देखभाल दुरुस्तीचा ठेका देण्यात आला आहे. परंतु ठेकेदार याकडे लक्ष देत नसल्याची चर्चा आहे.

नगरपालिकेकडे वीज अभियंता नाही...

त्र्यंबक शहराची लोकसंख्या १३ हजारांच्या आसपास आहे. शहराची हद्द वाढलेली असताना नगरपालिकेस वीजव्यवस्था सांभळण्यास इंज‌िन‌िअर नाही. यापूर्वीचे कर्मचारी निवृत्त झाले आहेत. बहुतांश भार आता ठेकेदारीवर असून, कार्यालयीन कामकाजासाठी पालिकेच्या एखाद दुसऱ्या कर्मचाऱ्यावर जबाबदारी टाकण्यात येते. पाणीपुरवठा अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक ही पदेही रिक्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुभम पार्क परिसरात पाणी बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

सिडकोतील सर्वात मोठी खासगी घरांची वसाहत असलेल्या शुभम पार्कमधील काही इमारतींना पाणीपुरवठाच बंद झाला आहे. विशेष म्हणजे, या इमारतींमध्ये आमदार सीमा हिरे यांचे व नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांचे संपर्क कार्यालये आहेत. नगरसेवक व आमदारांचे संपर्क कार्यालय असलेल्या इमारतींमध्ये पाण्याची अशी अवस्था असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिडकोतील उत्तम नगर जवळ असलेल्या शुभम पार्क याठिकाणी सुमारे बारा इमारती असून, साडेपाचशेहून अधिक फ्लॅट आहेत. या इमारतीतील काही इमारतींसह इमारत क्रमांक २ मध्ये पाणीपुरवठाच बंद झाल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच या परिसरातील इमारतींमध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा हा कमी दाबाने होत असून, पूर्वी बऱ्याचदा दोनवेळेस पाणी येत असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून कधी पाणी येते तर कधी येतच नाही. या प्रकाराबाबत स्थानिक नगरसेवक, महापालिका कार्यालयात कळविण्यात आले असून, त्यांच्याकडून अद्यापही कोणतीही कार्यवाही याबाबत केलेली नाही.

----------------------

या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत असून, इमारतीतील पाइपलाइन कमी व्यासाच्या आहेत. त्या बदलण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.

- संजीव बच्छाव, उपअभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images