Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

जिओ कंपनीस २४ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिलायन्स जिओ मिनी शॉपमध्ये नेमलेल्या व्यवस्थापकाने कंपनीस सुमारे २४ लाख रूपयांना गंडा घातला. संशयिताने पदाचा दुरूपयोग करीत विक्रीसाठी ठेवलेले मोबाईल हॅण्डसेट व वायफाय राऊटरची परस्पर विक्री करून २३ लाख ७४ हजार ८८९ रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी अंबड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनीत सुधाकर शेट्टी (रा. सह्याद्री चौक) असे संशय‌ित व्यवस्थापकाचे नाव आहे. मुख्य व्यवस्थापक अंकुर सुबोध अग्रवाल (रा.स्वामी नारायण मंदिर पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शेट्टीकडे सिडकोतील सावतानगर येथील रिलायन्स जिओ स्टोअर्स इन डिज‌िटल एक्स्प्रेस इन मिनी शॉप व्यवस्थापनाची जबाबदारी होती. १ जानेवारी २०१५ ते ७ जुलै २०१७ दरम्यान त्याने पदाचा दुरूपयोग करून २३ लाख ७४ हजार ८८९ रुपयांचा अपहार केला. अधिक तपास सहायक निरीक्षक निमसे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांडपाण्याचा रस्त्याला वेढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

वाढत्या लोकवस्तीने शहरात अनेक ठिकाणी कॉलनी भाग उभे राहिले आहेत. परंतु, या वाढत्या लोकवस्तीत सातपूरच्या कामगार वसाहतीमध्ये ड्रेनेज चोकअपची समस्या सर्वांनाच डोकेदुखी ठरत आहे. नेहमीच ड्रेनेज वेगवेगळ्या भागात चोकअप होत असल्याने रस्त्यांवरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची स्वतंत्र व्यवस्था केली असली, तरी नेहमीच्या चोकअपवर कायमस्वरूपी तोडगा काढवा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

स्मार्ट सिटीत नाशिक महापालिकेचा समावेश केला आहे. साहाजिकच यामुळे नाशिक महापालिकेच्या नागरी सुविधा देण्याकरीता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. परंतु, वाढत्या नाशिक शहरात रोजच होणाऱ्या ड्रेनेज चोकअपची डोकेदुखी थांबणार कधी, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सातपूर भागात सातपूर कॉलनी, अशोकनगर, शिवाजीनगर, धृव नगर, जाधव संकुल, पवार संकुल, राधाकृष्ण नगर, विश्वास नगर, आनंदवली, गंगापूररोड, सिरीन मेडोस, गणेश नगर, कामगार नगर यांसह कॅनलरोडवर टुमदार घरकुले उभारली आहेत.

या घरकुलांमध्ये महापालिकेकडून नागरी सुविधादेखील दिल्या गेल्या आहेत. परंतु, दाट लोकवस्तीच्या रहिवाशी भागात नेहमीच होत असलेल्या ड्रेनेज चोकअपमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच महापालिकेकडे ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असतानादेखील चोकअपची संख्या अधिक असल्याने रोजच सर्व समस्या सुटत नाहीत. तरी यासाठी महापालिकेने वाहनांची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.

कपडे, बारदान चेंबरमध्ये?

महापालिकेने नागरी वस्तीत सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाइनींची व्यवस्था केली आहे. परंतु, नेहमीच ड्रेनेज चोकअप होत असल्याने त्याचा नाहक त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो. ड्रेनेज चोकअप नेमके कशामुळे होतात. याबाबत ड्रेनेज कर्मचाऱ्यांना विचारले असता, त्यांनी सांडपाण्याच्या लाइनीत कपडे, बारदाने, नारळाचे करवंटे

टाकले जात असल्यानेच चोकअप होत असल्याचे सांगितले. नागरिकांनी सांडपाण्याव्यतिरिक्त काहीच न टाकल्यास ड्रेनेज चोकअप होणार नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

सातपूरच्या कामगार वस्तीत वाढत्या लोकवस्तीत घरकुलांची संख्याही वाढली आहे. वाढलेल्या घरकुलांचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी महापालिकेने ड्रेनेजची व्यवस्था केली आहे. परंतु, नेहमीच ड्रेनेज चोकअप होत असल्याने त्याचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो.

- हेमांगी देवरे, रहिवाशी, अशोकनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कंपनी-मनपाने झटकले हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

पवननगर येथे विजेचा धक्का लागून गाय मृत्युमुखी पडल्याच्या घटनेसाठी रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना जेसीबीमुळे खराब झालेली केबल कारणीभूत झाल्याचा आरोप महावितरणने केला आहे. मात्र, या प्रकारात महापालिकेने वीज वितरण कंपनीकडेच बोट दाखवून हात झटकले आहेत.

पवननगर येथील पोलिस चौकीमागे विजेचा धक्का बसून एका गायीचा मृत्यू झाला होता. संबंधित ठिकाणी महापालिकेकडून पाच ते साडेपाच वर्षांपूर्वी भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. एक वर्षापूर्वी या ठिकाणी रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करीत असताना जेसीबीमुळे येथील केबल खराब झाली. केबल खराब झाल्याबाबत महावितरणला कोणतीही माहिती न देता महापालिकेने केबल बुजविली असल्याचा आरोप वीज वितरण कंपनीने केला अाहे.

महापालिकेकडून संबंधित ठिकाणी रस्त्याच्या बाजूला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. अपघातस्थळी लोखंडी पाइपच्या टोकाजवळच खराब केबल आढळून आली. पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने लोखंडी पाइपच्या टोकाजवळ असलेल्या खराब केबलमुळे हे पाणी विद्युतभारित होऊन पाण्यात उभ्या असलेल्या गायीला विजेचा धक्का बसला. घटनेची माहिती भ्रमणध्वनीवर मिळताच तातडीने वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. संबंधित भूमिगत केबलचे काम महापालिकेकडून करण्यात आले, तसेच त्यांच्याकडूनच काम सुरू असताना केबल खराब झाल्याने हा अपघात झाला असून, यात संपूर्ण दोष महापालिकेचा असल्याचा आरोप वीज वितरण कंपनीने केला आहे. दरम्यान, महापालिकेने हे काम झाल्यानंतर वीज वितरण कंपनीला कळविण्यात आले होते, असे सांगून या दुर्घटनेस वीज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

पुरेशा दक्षतेची अपेक्षा

दरम्यान, एकीकडे नागरिकांचा जीव धोक्यात असताना एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याच्या वीज वितरण कंपनी व महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सखोल तपास करून येथील व अन्य भागातील भूमिगत वीजतारांसंदर्भातही पुरेशी दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे पहिले अल्बम साँग लाँच

$
0
0


नाशिकचा गोल्डन लाइट व धुंद हवा...नाशिकचे बहारदार वातावरण...नाशिकचे शूटिंग लोकेशन्स असा माहोल जमून आला आहे ‘तुझ्यासाठी’ या गाण्यात अन् त्यातूनच नाशिकच्या पहिल्या अल्बम साँगची निर्मिती झाली असून, ‘तुझ्यासाठी’ हे गाणे सध्या चॅनलवर धूम करीत आहे.

संत्रा एंटरटेन्मेंट आणि एमडीआर अॅण्ड सन्स यांची प्रस्तुती असलेले तुझ्यासाठी हे गाणे रोमँटिक थीमवर साकारण्यात आले आहे. रामशेज किल्ला, घोटी गावातील निसर्गरम्य परिसर, गंगापूर धरण आणि आजूबाजूच्या परिसरात हे गाणे शूट करण्यात आले आहे. गाणे शूट करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागला असून, ३.४२ मिनिटांचे हे गाणे प्रेक्षकांसाठी सज्ज झाले आहे. पार्थसारथी आणि काजल या कलाकारांवर हे गाणे चित्रीत झालेले असून, विशेष म्हणजे या संपूर्ण गाण्याची टीम नाशिकची आहे.

दिग्दर्शक विशाल दवंगे यांनी याआधी व्हॅलेंटाइन डे ला ‘स्वप्नात तू’ हे गाणे दिग्दर्शित केलेले असून, ते यूट्यूबवरही अपलोड करण्यात आले होते. त्याला १३ हजारांहून अधिक लाइक्स असून, रोमँटिक गाणे बनवायचे असे मनात आल्याने ‘तुझ्यासाठी’ हे गाणे बनविण्यात आले, असे तो सांगतो.

गाण्याचे दिग्दर्शन विशाल दवंगे यांचे असून, संगीत गौरव-आशिष यांचे आहे. हे गाणे गौरव यांनी शब्दबद्ध केलेले असून, गौरव शिंदे व अमृता खोडके यांनी गायलेले आहे. क्रिएटिव्ह हेड सचिन जाधव, तर मेकअप नेहल गांधी यांचा आहे. कॅमेरा चिराग गंगानी यांनी सांभाळला आहे. ‘तुझ्यासाठी’ हे गाणे सध्या संगीत मराठी चॅनलवरही गाजत असून, लवकरच दुसऱ्या संगीत चॅनल्सवरही ते जाणार असल्याचे या टीमने सांगितले.

--

आम्हाला अभिमान आहे, की आम्ही नाशिकचे पहिले अल्बम साँग तयार केले असून, यात संपूर्ण टीम नाशिकची आहे. सध्या संगीत मराठीवर हे गाणे धूम करीत असून, लवकरच झी म्युझिकवरही हे गाणे दाखविण्यात येणार आहे.

-विशाल दवंगे, दिग्दर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३३ वीजग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वीजग्राहकांच्या वीजसेवेसंदर्भातील तक्रारी सोडविण्यासाठी महावितरण कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण शिबिरात प्राप्त झालेल्या २३३ वीजग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला. नाशिकरोड व देवळालीगावात झालेल्या या शिबिरांमुळे वीजग्राहकांचे वीजसेवेबाबतचे समज-गैरसमज दूर होण्यासही मदत झाली.

नाशिकरोड येथे जवाहर मार्केट येथील महावितरणच्या कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनोद विपर यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता विनोद कोपरे, प्रदीप नाईक, विलास पवार व योगेश आहेर यांच्या पथकाने १५६ वीजग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारींचे तातडीने निरसन केले.

--

देवळालीत आढळली वीजचोरी

देवळालीगावातील महावितरणच्या कार्यालयातील तक्रार निवारण शिबिरात ७७ वीजग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांनी दिली. या शिबिरात सहाय्यक अभियंता पी. एस. उफाडे, एस. टी. चव्हाण, पी. आर. कांडेकर, डी. एन. पाटील, ए. एस. शिंपी, पी. आर. आवारे, आर. एम. भालेराव आदींच्या पथकाने वीजग्राहकांच्या तक्रारींचे निरसण केले. वीज मीटरचे रीडिंग जास्त असल्याची तक्रार करणाऱ्या २९ वीजग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी वीजग्राहकांसमक्ष करण्यात आली. त्यापैकी एका मीटरमध्ये वीजग्राहकाने फेरफार केल्याचे आढळून आल्याने या वीज मीटरमधून विजेची चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय दोन मीटर फास्ट व एक वीज मीटर स्लो आढळून आल्याने या वीज मीटरची तातडीने दुरुस्ती करण्यात आली.

--

नाशिकरोडची कार्यवाही

--

-१५६ वीजग्राहकांच्या तक्रारींचे निरसन

-२३ वीजग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती

-२६ वीजग्राहकांच्या वीज मीटरची तपासणी

-७ मीटरद्वारे चुकीचे रीडिंग

-६ इतर कारणांशी संबंधित तक्रारी

-५ वीज मीटर आढळले सदोष

-५ मीटरमध्ये युनिट दरबदल

-५ मीटर आढळले फास्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावातील ३६ ठिकाणे हागणदारीमुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महानगरपालिकेने शहर हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून युद्धपातळीवर काम केले. अवघ्या दीड महिन्यात दीड हजाराहून अधिक वैयक्तिक व ३४ सार्वजनिक शौचालय पूर्ण झाली आहेत. तसेच ६५ पैकी ३६ ठिकाणे हागणदारीमुक्त झाली आहेत. पालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी जून महिन्यात पदभार स्वीकारल्यापासून या अभियानास खऱ्या अर्थाने गती मिळाली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्याचा शासन आदेश निघाला होता. मालेगाव शहर हागणदारीमुक्त करणे हे पालिका प्रशासनापुढील अशक्यप्राय वाटणारे आव्हान आता प्रत्यक्षात साकारण्याचा दिशेने आहे. अभियानासाठी पालिकेकडून जनजागृती, कार्यशाळा, फेरी, गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक असे अनेक प्रयत्न करण्यात आले. उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे प्रबोधन करूनही त्यास दाद न देण्याऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा धडाका पालिकेने लावला होता.

शहरातील पूर्व भागासाठी मुदतवाढ
या अभियानाला गेल्या महिन्याभरात गती मिळाल्याने आत्तापर्यंत ६४ पैकी ३६ ठिकाणे पालिकेने हागणदारीमुक्त घोषित केली आहेत. मात्र अजूनही शहरातील मुस्लीमबहुल पूर्व भाग व पश्चिमेकडील काही वस्त्या बाकी आहेत. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे.

लाभार्थ्यांनी परत केले पैसे

शौचालय न बांधता अनुदान हडप करण्याऱ्यांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिल्यानंतर अवघ्या तीन चार दिवसात ४४ लाभार्थ्यांनी दोन लाख दोन हजार तर आत्तापर्यंत २७४ लाभार्थींनी अनुदानाचे १८ लाख रुपये पालिकेकडे जमा केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डीबीटी आदेशानंतरही खरेदीच्या निविदा

$
0
0

नाशिक : आदिवासी विकास विभागातील अधिकारी हे ठेकेदारांवर किती मेहरबान असतात, याचा प्रत्यय धुळे आणि नंदूरबार प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावरून समोर आले आहे. विभागाने चालू वर्षात आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना रेनकोट देण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्यात म्हणजे डीबीटी (डायरेक्ट बँक ट्रान्सफर) रक्कम जमा करण्याचा प्रयत्न केला. परंतु या दोन्ही प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांनी डीबीटीचा आदेश बाजूला सारत ठेकेदाराला काम देण्याची तयारी सुरू केली होती. परंतु आदिवासी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी यांनी त्यांचा हा प्रयत्न आता हाणून पाडला असून, या निविदा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ‘आंधळं दळतय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशी अवस्था विभागाची झाली आहे.

आदिवासी विकास विभागातील रेनकोट खरेदीतील अनियमितता चव्हाट्यावर आली आहे. रेनकोटच्या दरांमध्ये मोठी तफावत आणि गुणवत्ता तपासणी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. रेनकोट खरेदीच्या रोचक कहाण्या आता विभागात चर्चिल्या जात आहेत. गेल्या वेळेस नंदूरबार आणि धुळे या दोन प्रकल्प कार्यालयांमध्ये रेनकोटची खरेदी वादामुळे वेळेत होवू शकली नाही. त्यामुळे संबंध‌ित ठेकेदारांनी चालू वर्षात या खरेदीला पुन्हा चालना दिली. न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे सांगत, पुन्हा खरेदीची प्रक्रिया सुरू करून निविदाही काढण्यात आली. परंतु चालू वर्षी २ मे रोजी आदिवासी विभागाने रेनकोट खरेदीची प्रक्रिया ही डीबीटीद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील निर्णय होवून त्यांची त्याचे आदेश आयुक्तालयासह प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले.

या प्रकल्पामंध्ये आदिवासी विभागाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून निविदा प्रक्रियेने खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु दोन्ही प्रकल्पातील खरेदी ही २५ लाखाच्या पुढे असल्याने निविदा प्रक्रियेनंतर मंजुरीसाठी ही फाईल आदिवासी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आली आहे. परंतु रेनकोट खरेदी प्रकरणातील अनियमीतता चव्हाट्यावर आल्यानंतर आदिवासी आयुक्त रामंचद्र कुलकर्णी यांनी संबंधित खरेदी प्रक्रियेला नकारघंटा दर्शवली आहे. दोन्ही प्रकल्पांना रेनकोटची खरेदी करण्याऐवजी रेनकोटचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठेकेदाराचा मनसुब्यावर पानी फेरले

गेले आहे.

बदलीची तयारी

दरम्यान, रेनकोट घोटाळ्यातील प्रकरणात अडकू नये म्हणून या प्रकरणात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्यांने आपल्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्तालयातील शिक्षण विभागात कार्यरत असलेल्या या अधिकाऱ्यांने आपल्या बदलीसाठी थेट मंत्रालयातून लॉबिंग सुरू केले आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट दबाव टाकला जात असल्याची चर्चा आहे. संबंधित प्रकरण हे विधीमंडळाच्या अधिवेशनातही गाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याआधीच पोबारा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हायकोर्टात जनहित याचिका

रेनकोट खरेदी प्रकरणात मोठ्या प्रमाणावर अनियमीतता झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून, या प्रकरणात आदिवासी संघटनांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे. आदिवासी बचाओ आंदोलनाच्या वतीने यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असून, यात मंत्र्यासह आयुक्त, प्रकल्प आणि ठेकेदारांना पार्टी करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अधिकारी व ठेकेदारांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमा कंपनीला दंड

$
0
0



म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निष्काळजीपणामुळे बसमधून लॅपटॉप चोरीस गेल्याचे कारण देत दावा नाकारणाऱ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने विमा दाव्याची रक्कम ४२ हजार २३ रुपये व्याजासह देण्याचे आदेश दिले. तसेच तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रासापोटी पाच हजार व अर्जाचा खर्च तीन हजार असा ८ हजाराचा दंडही ठोठावला आहे.

गंगापूर रोडवरील अमेय कासार यांनी यासंदर्भात न्यायमंचाने तक्रार दिलेल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. कासार यांनी कॅनडा कॉर्नर येथील डाटा केअर कॉर्पोरेशन रिटेल्सकडून ५८ हजार रुपयांचा डेल कंपनीचा लॅपटॉप विकत घेतला. त्या लॅपटॉपला वर्षभरासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी मुंबई व पुणे कार्यालयाकडे पॅकेज पॉलिसी अंतर्गत विमा उपलब्ध करून देण्यात आला होता. विमा असलेल्या कालावधीत पुण्याहून नाशिकला हिरकणी बसमधून जात असताना कासार यांचा लॅपटॉप चोरीस गेला. त्याबाबत त्यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तसेच या घटनेची ई-मेलद्वारे इन्शुरन्स कंपनीला माहिती कळवून आवश्यक त्या कागदपत्रासह दावा दाखल केला. मात्र, विमा कंपनीने निष्काळजीपणामुळे लॅपटॉप चोरीस गेल्याचे कारण दिले. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नसल्याचे स्पष्ट करीत कासार यांचा दावा फेटाळून लावला. लॅपटॉप हातात ठेवून सांभाळण्यासारखा असताना कासार यांनी निष्काळजीपणे तो रॅकवर अनअटेंडेडपणे ठेवला. लॅपटॉपच्या गहाळ होण्यास कासार यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने अटी व शर्तीनुसार नुकसानीची रक्कम देण्याची जबाबदारी नाही, असे इन्शुरन्स कंपनीने सांगितले.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने तक्रारदाराचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे की नाही यावर खल केला. तक्रारदार पुणे येथून एसटी डेपो येथून बसमध्ये बसल्यानंतर त्यांच्या सिटवरील रॅकमध्ये लॅपटॉपची बॅग ठेवली होती. बस नाशिक फाटा येथे थांबली त्यावेळी लॅपटॉपची बॅग रॅकवर होती. मात्र, बस सुरू झाल्यानंतर बॅग दिसली नाही. त्यावेळी शोध घेऊनही बॅग सापडली नाही. ही घटना ड्रायव्हरला सांगितल्यानंतर बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र, लॅपटॉपची बॅग मिळाली नाही. दरम्यान, हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिला. तक्रारदारातर्फे अॅड. एस. ए. पंडित यांनी युक्तिवाद केला.


विमा कंपनीचा दावा अतार्किक

पुणे-नाशिक प्रवास हा सहा-सात तासाचा आहे. कोणत्याही व्यक्तीस साहित्य मांडीवर घेऊन प्रवास करणे जिकरीचे आहे. प्रत्येक प्रवाशांना सिटवरील भागात साहित्य ठेवण्यासाठी रॅकची व्यवस्था असते. त्यानुसार, तक्रारदारांनी त्याच्या सिटच्या वरील भागात लॅपटॉप ठेवला ही बाब निष्काळजीपणाची म्हणता येणार नाही, असे सांगत न्यायमंचाने विमा कंपनीचा मुद्दा नाकारला आणि विमा दाव्याची रक्कम करण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निसाका अपहाराबाबत फेरयाचिका दाखल करू

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निफाड सहकारी साखर कारखान्यातील ३५ धरणांच्या अडीच कोटींच्या अपहाराबाबत चौकशी व्हावी, असे आदेश फोर्स व शेतकरी संघटनेने दिले आहेत. पोलिसांनी चौकशीत दिरंगाई केल्यास हायकोर्टात फेरयाचिका दाखल केली जाईल, असा इशारा फोर्स व शेतकरी संघटनेने दिला आहे.

निफाड साखर कारखान्यात २००४-०५ या वर्षात झालेल्या साखर विक्रीच्या रकमेचा अपहाराबाबत पोलिसांनी अपुरी चौकशी केल्याचा ठपका फार्सने ठेवला आहे. साखर व्यापाऱ्याने दिलेले परंतु न वटलेले किंवा वटण्यासाठी बँकेत न भरलेल्या ३५ धनादेशांच्या सुमारे अडीच कोटींच्या रकमेबाबत मुंबई हायकोर्टाने २०१३ मध्ये चौकशीचे निर्देश दिले आहेत. मात्र, निफाड पोलिसांनी पोलिसांनी अद्याप पूर्ण चौकशी केली नसल्याचा दावा केला जातो आहे. याबाबत त्वरित चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई न केल्यास फेरयाचिका दाखल करून ही बाब हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल, असा इशारा फोर्स व शेतकरी संघटनेने दिला आहे.

काय आहे घोटाळा?

२००५ मध्ये झालेल्या १० कोटीपेक्षा अधिक रुपयांच्या घोटाळ्यात साखर व्यापाऱ्याने वेळोवेळी १२९ धनादेश देऊन या कालावधीत एक लाख ८५ हजार ६९४ क्विंटल साखर उचलली. मात्र व्यापाऱ्याने दिलेले धनादेश न वटता परत येत होते. काही धनादेश वटविण्यासाठी कारखान्याने आपल्या खात्यात टाकलेही नाहीत. व्यापारी मात्र कारखान्यातून साखरेची पोती घेऊन जात होता. त्यावेळी सुमारे १०० ट्रक भरून साखर कारखान्याच्या गोदामातून बाहेर गेली.

पोलिसांना इशारा

शेतकरी सभासद, कामगार, उसतोड मजूर यांचे हित लक्षात घेऊन शेतकरी संघटना आणि फोर्सने मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी ४ जुलै २००७ रोजी अपहाराबाबत गुन्हा दाखल केला. परंतु, अपेक्षित कारवाई अद्याप होऊ शकलेली नाही. कारखान्याची मालमत्ता विक्री होण्यापूर्वी निफाड पोलिसांनी चौकशी न केल्यास पुन्हा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावण्यात येतील असा इशारा अॅड. नानासाहेब जाधव यांच्यासह अर्जुन बोराडे, शंकर पूरकर, विष्णू ताकाटे, भाऊसाहेब गडाख, के.डी. मोरे आदींनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नासाका’ला दुष्टचक्राचा फेरा!

$
0
0



नवनाथ वाघचौरे, सिन्नर फाटा

बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (नासाका) बॉयलर येत्या गळीत हंगामात सुरू होण्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, कारखान्याच्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावर नियोजनासाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने आणि दुसरीकडे स्थानिक शिवसेना आमदारांनी या प्रश्नावर मौन धारण केल्याने ‘आई खाऊ घालिना अन् बाप जेऊ देईना’ अशी काहिशी अवस्था प्राधिकृत संचालक मंडळाची झाली आहे.

चार वर्षांपासून बंद असलेला नासाका सुरू व्हावा, यासाठी भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी पाठपुरावा सुरू केले आहेत. राज्यसरकारच्या माध्यमातून या कारखान्यावर प्राधिकृत संचालक मंडळाची नेमणूक गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच करण्यात आमदार बाळासाहेब सानप यांना यश मिळाले. त्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या समवेत आजवर काही बैठकाही झाल्या असल्या तरी थेट मदतीवर ठोस निर्णय अद्यापही झालेला नाही. गेल्या आठवड्यात सहकार मंत्री व राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने कर्जाच्या परतफेडीच्या हमीवर राज्य सहकारी बँकेने नासाकास आर्थिक मदत करण्यास तयारी दर्शविली होती.

शिवसेनाही चार हात दूर

शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व आमदार योगेश घोलप यांच्या मतदारसंघातील नासाका कारखाना आहे. मात्र, या कारखान्याला जीवदान मिळावे, यासाठी आमदार गोडसे व आमदार घोलप अद्याप एका बैठकीचा अपवाद वगळता दूरच राहिलेले आहेत. शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीच्या या भूमिकेमुळे व भाजपच्या लोकप्रतिनिधींनाही हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नसल्याने नासाका सुरू होणे आता केवळ मृगजळ ठरू नये, अशी शेतकऱ्यांची भावना आहे.

पालकमंत्री खूपच बिझी

नासाकाच्या आर्थिक मदतीप्रश्नी संचालक मंडळाच्या हमीबाबत निश्चित नियोजन होणे बाकी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश महाजन याच्या मार्गदर्शनाखाली याविषयावरचे नियोजनाला अंतिम स्वरुप प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमदार सानप पालकमंत्र्यांना याविषयावर बैठक घेण्यास इच्छुक आहेत. यासाठी पालकमंत्री मुंबईत शनिवारी बैठक घेण्याची शक्यता होती. मात्र, राष्ट्रपती निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यात बिझी असलेल्या पालकमंत्र्यांची आमदार सानप यांना वेळ उपलब्ध होऊ शकला नाही.

संचालक मंडळ तोंडघशी?
नासाका सुरू होणार अशा जाहीर प्रचार प्राधिकृत संचालक मंडळाने यापूर्वीच गावोगावी ऊस उत्पादकांच्या बैठकांमधून सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनीही ऊस लागवड केली आहे. तर कित्येक शेतकऱ्यांनी आपल्याकडील ऊस इतर कारखान्यांना न देण्याचे ठरविले आहे. मात्र, या प्रश्नावर निर्णय घेण्यास सत्ताधारी भाजपच्या मंत्र्यांना वेळ नसल्याने व शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना ‘नासाका’चे काहीही सोयरसूतक नसल्याने संचालक मंडळ तोंडघशी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘नासाका’ची व्याप्ती
गेल्या चार वर्षांपासून नासाका बंद
चार वर्षांपूर्वी ८४ कोटींचे कर्ज
कर्जाचा बोजा सुमारे ११० कोटी झाल्याची शक्यता
इगतपुरी, त्र्यंबक, सिन्नर व नाशिक ही चार तालुके कार्यक्षेत्र
सुमारे २ लाख टन ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध
१२५० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता
१७ हजार सभासद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैठणी ‘जीएसटी’च्या गुंत्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

भरजरी, जरतारीने काठपदरात इंच इंच विणकामात अप्रतिम कलाकुसरीने खऱ्या अर्थाने सजलेल्या पैठणीला ‘जीएसटी’चे ग्रहण लागले असून या व्यवसायात दिवसरात्र अपार कष्ट उपसणारे विणकर संकटात सापडले आहेत. पैठणी व्यवसाय टिकून रहावा यासाठी पैठणीला ‘जीएसटी’मधून सूट मिळावी, या मागणीसाठी येवल्यातील पैठणी विणकरांसह विक्रेते यांच्या पथकाने सरकार दरबारी धाव घेतली आहे.

राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील जीएसटी आयुक्त राजीव जलोटा यांची भेट घेणाऱ्या येथील शिष्टमंडळाने हातमागावरील पैठणी व्यवसाय वाचवण्यासाठी ‘जीएसटी’ कराची विशेष बाब म्हणून सूट देण्याचे साकडे घातले आहे. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, भाजप वस्रोद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज दिवटे हे शिष्टमंडळासोबत उपस्थित होते. सुमारे दोन हजार वर्षांची वस्त्र परंपरा असलेल्या महावस्त्र ‘पैठणी’ची जागतिक दर्जाच्या वस्त्र प्रावरणांमध्ये गणली केली जाते. संपूर्ण हस्तकला अन् रेशीम, जरी धाग्यांनी निमिर्ती होणाऱ्या या महावस्त्राला यादव साम्राज्य, पेशवे काळासह राज्यातील तत्कालीन शासनकर्त्यांचा आश्रय होता.त्यामुळेच हे महावस्त्र आजही टिकाव धरून आहे.अलीकडील काळात १९८० मध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी आपल्या कार्यकाळात विणकर बांधवांच्या विनंतीवरून येवला व पैठण येथील हातमाग विणकरांना पैठणीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाला सर्व प्रकारच्या कर आकारणीतून सूट दिली होती, याकडे येवल्यातील शिष्टमंडळाने भेट घेतलेल्या मंत्र्यांचे लक्ष वेधले. याच धर्तीवर विशेष बाब म्हणून पैठणीला ‘जीएसटी’ करातून सूट मिळावी असे साकडे यावेळी मंत्र्यांना घालण्यात आले. आतापर्यंत राजाश्रय मिळल्याने पैठणी महावस्त्र युनेस्कोला देखील भुरळ पाडण्याचे काम करू शकले. युनेस्कोने या महावस्त्र पैठणीला ‘वर्ल्ड हेरिटेज आयकॉन’ दिला आहे. कच्च्या मालावरील संभाव्य ‘जीएसटी’मुळे हातमागावरील पैठणी निर्मिती क्षेत्र असलेल्या येवला शहर व परिसरातील पैठणी उत्पादक विणकर धास्तावले आहेत. या क्षेत्रात अगोदरच नवीन पिढी येण्यास उत्सुक नाही. पैठणी निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यात ‘जीएसटी’ लागू झाल्यास त्याचा विपरित परिणाम या पैठणी व्यवसायावर होताना हे क्षेत्रच लुप्त होईल की काय अशी चिंता शिष्टमंडळाने मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे. सुनील लक्कडकोट, बाळासाहेब कापसे, सचिन वडे, श्रीनिवास सोनी, प्रवीण पहिलवान, शिरीष पेटकर, राजेश भांडगे, पांडुरंग भांडगे, आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.

पाच ऑगस्टला बैठक

‘जीएसटी’चा विषय हा केंद्राच्या अखत्यारीत असला तरी पैठणी विणकरांच्या भावना केंद्र सरकारकडे पोहचविण्यासाठी सकारात्मक भूमिका असेल, असे आश्वासन सर्वच मंत्र्यांनी या भेटीत येवल्यातील शिष्टमंडळाला दिले. येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आपल्या भावना मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याची माहिती मनोज दिवटे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नृत्यांजली पदन्यासातून गुरुवंदना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नृत्यांगण कथक नृत्यसंस्था, नाशिक यांच्यावतीने आयोजित गुरूपौर्णिमा उत्सव या कथकनृत्य महोत्सवात नृत्यांजली या नृत्यप्रस्तुतीमधून कथकनृत्य शैलीची विविध अंग अतिशय देखण्या आणि लयबध्द पदन्यासातून रसिकांसमोर प्रस्तुत करण्यात आली. सुप्रसिध्द कथक नृत्यांगना कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या शिष्यांनी आपल्या लयबध्द पदन्यासातून आणि अदाकारीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी गुरू कीर्ती भवाळकर आणि त्यांच्या ज्येष्ठ शिष्यांनी गुरू परमात्मा परेशू या एकनाथ महाराजांच्या रचनेवर गुरूवंदना प्रस्तुत करून गुरूचरणी आपली नृत्यसेवा अर्पण केली. यानंतर छोट्या शिष्यांनी त्रितालात तोडे, चक्रदार तोडे, परण, तिहाई, ततकार अशा कथकनृत्यातील विविध अंगांना अतिशय समर्थपणे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. कथक नृत्याचे वैशिष्ट्य असणारे गतनिकास, कवित्त, पढंत याचे दमदार प्रदर्शन या शिष्यांनी घडवले. पंडित बिरजू महाराज यांची नृत्यरचना असलेला यमन रागातील तराणा कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी अत्यंत सुंदर प्रस्तुत केला. त्यानंतर ज्येष्ठ शिष्यांनी सात मांत्रांचा रुपक ताल आणि १२ मात्रांचा चौताल प्रस्तुत केला. यात उठान, थाट, आमद, तोडे, परण, तिहाया अशा विविध रचना अतिशय तयारीने सादर केल्या. यानंतर गुरू कीर्ती भवाळकर यांनी तीनतालमध्ये काही पारंपरिक बंदिशी प्रस्तुत केल्या. परणजुडी, आमद, थाट, त्रिपल्ली, गिनती, बनारस घराण्याच्या काही पारंपरिक रचना अतिशय आकर्षकपणे सादर करीत त्यांनी कथकनृत्याचे रुप रसिकांसमोर उलगडत नेले.

या संपूर्ण नृत्यप्रस्तुतीला पुष्कराज भागवत गायन व संवादिनी, गौरव तांबे व वैष्णवी भडकमकर यांनी तबल्यावर अतिशय समर्पक साथसंगत केली. कीर्ती भवाळकर, निहारिका देशपांडे, प्रचिती भावे, विशाखा अस्वले यांनी पढंत केली. पराग जोशी यांनी ध्वनीसंयोजन केले. अरविंद भवाळकर यांनी प्रकाशयोजना केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ रंगकर्मी सुरेश गायधनी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन झाले. किशोरी किणीकर यांनी निवेदन केले. कार्यक्रमाला नाशिकच्या कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसावर हल्ला करणारा जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भद्रकाली पोलिस स्टेशनचे हवालदार बाळू खरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितास शहर पोलिसांनी अखेर जेरबंद केले. मध्यवर्ती बस बसस्थानकात गस्त घालणाऱ्या दोघा बीट मार्शलने ही कारवाई केली. पोलिस तक्रारीची दखल घेतली नसल्याच्या रागातून हल्ला केल्याची कबुली संशयिताने दिली आहे. रमेश जनार्दन जाधव (२९, रा. रायगड) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे.

भद्रकाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जुने नाशिकमधील दूध बाजारातून पायी गस्त घालत असताना सोमवारी हल्ल्याची घटना घडली होती. खरे यांच्यावरील हल्ला येथील एका हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासून संशयित हल्लेखोराचे वर्णनाचा बिनतारी संदेश सर्वत्र दिला होता. या संदेशातील वर्णन लक्षात ठेवत भद्रकाली पोलिस स्टेशनचे बीट मार्शल पोलिस नाईक रमेश कोळी, हवालदार सुधीर चव्हाण गस्त घालत होते. नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तीस दोघांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता गुन्ह्याचा उलगडा झाला. हल्ल्यामधील वर्णनानुसार पोलिसांना या व्यक्तीवर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हल्ल्याची कबुली दिली.

कारवाईचे कौतुक

घटनेच्या पाच दिवसानंतरदेखील केवळ वर्णन लक्षात ठेवून संशयित हल्लेखोराला अटक केल्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॉट खरेदीतून ३२ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लॉट खरेदीत तब्बल ३२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरेश भागुजी टर्ले (६०, रा. ड्रीम क्लासिक अपार्ट. आनंदनगर, नाशिकरोड) असे फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी मीरा सुकदेव कदम (६१, मौलाना आझादनगर, मारुती मंदिरामागे, देवळलीगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार डिसेंबर २००९ ते १० जुलै २०१७ या दरम्यान फसवणुकीचा प्रकार घडला. कदम यांची मौजे देवळालीगाव शिवारात सर्व्हे नंबर ६ सी/७ पैकी एकूण क्षेत्र ८ आर इतकी जमीन आहे. संशयित आरोपीने या जमीन खरेदीसाठी कदम यांच्याशी व्यवहार केला. कदम यांना विश्वासात घेऊन खरेदीखत केले. त्यावर कदम यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. खरेदी खतातील अटी शर्थीनुसार देणे असलेले ३२ लाख रुपये फिर्यादीला दिल्याची खोटी नोंद केली. तसेच नोटरीप्रमाणे देणे असलेला ९०० चौरस फूट प्लॉट न देता फसवणूक केली. पैसे मागण्यासाठी गेलल्या कदम यांना धमकावल्याचे फिर्यादीत नूमद केले आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसहांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पीएसआय जाधव करीत आहे.

पर्सची चोरी

परदेशी चलन तसेच विविध कार्डस असलेली महिलेची पर्स चोरट्यांनी हातोहात लंपास केली. ही घटना ताबंट लेनमधील लालवाणी होजिअरीच्या दुकानासमोर शनिवारी (दि. १५) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी आशना रवींद्र मनवाणी (३७, सुखसिंधू सोसायटी, कॉन्टेमेंट बोर्ड, देवळाली) यांच्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनवाणी या कामानिमित्त ताबंट लेन येथे गेल्या होत्या. चोरट्यांनी नकळत त्यांच्याकडील पर्स चोरी केली. पर्समध्ये पाच हजार रुपयांची रोकड, दुबईतील दिराम या चलनातील तीन नोटा, दुबईतील सरकारी आयकार्ड, आयसीआयसीआय बँकेचे डेबिट कार्ड, एचएसबीसी बँकेचे क्रेडिट कार्ड, दुबईतीलच नजम बँकेचे क्रेडिट कार्ड असा एकूण १० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक काळोगे करीत आहे.

वाहनाची परस्पर विक्री

वाहन घेताना घेतलेले कर्ज न फेडता वाहनाची परस्पर दुसऱ्यास विक्री करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुकेशकुमार उद्यप्रसाद सिंह (३६, दत्तनगर, अंबड सातपूर लिंकरोड) यांनी फिर्याद दिली. सिंह यांची संशयित आरोपी परशुराम दराडे याच्याशी ओळख आहे. दराडे याने अन्य एका संशयित आरोपीसह सिंह यांचा विश्वास संपादन करीत महिंद्रा एक्सयूव्ही (एमएम १५ डीएम ७९९०९) ही कार विकत घेण्यासाठी प्रोत्साहित केले. मात्र, दराडेने ही कार घेताना महिंद्रा फायनान्स कंपनीचे कर्ज घेतले होते. याबाबत संशयितांनी माहिती दडवून ठेवली. एकाही हप्ताची फेड केलेली नसताना संशयितांनी हे वाहन सिंह यांना विक्री केले. कर्जाचा तगादा सुरू झाल्यानंतर फसवणूक झाल्याची कल्पना येताच सिंह यांनी पोलिसांकडे धाव घेतली. घटनेचा अधिक तपास पीएसआय पवार करीत आहे.

जेलरोड परिसरात युवतीची आत्महत्या

जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथील दशरथ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. १५) साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. प्राजक्ता दशरथ गांगुर्डे असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे. प्राजक्ताने घरात गळफास लावून घेतला. ही घटना उघडकीस येताच तिला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहे.

चौघांची तरुणास मारहाण
मागील भांडणाची कुरापत काढून चौघांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी पूजा दत्ता मोंढे (रा. अब्दुल किरणा दुकानाजवळ, पंचशीलनगर, भद्रकाली) यांच्या फिर्यादीनुसार, १४ जुलै रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या घराजवळ हा प्रकार घडला. संशयित आरोपी नवाज शेख, कामरान खान, कामरान खान याचा लहाना भाऊ, तसेच अरबाज उर्फ छोट्या (सर्व रा. पंचशीलनगर) यांनी फिर्यादीचा मुलगा यश मोंढे यांच्याशी जुन्या भांडणाची कुरापत काढून लाठीकाठीसह लाथाबुक्यांनी मारहाण केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर फिर्यादीने भद्रकाली पोलिस स्टेशन गाठून संबंधितांविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार सोनार करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संतप्त तरुणांकडून कॉम्प्युटर लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

पैसे भरूनही नोकरी दिली जात नसल्याने गंडवल्या गेल्याची भावन निर्माण झालेल्या तरुणांनी लासलगाव येथे श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटीत हल्लाबोल केला. यावेळी काही तरुणांनी बँकेतील कॉम्प्युटरच उचलून नेले.

श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी काढणाऱ्या सतीश काळे यांचे व सोसायटीचे मुख्य कार्यालय लासलगाव (ता. निफाड) येथे आहे. काळे हे हरी ओम ग्रुपचे संस्थापक आहेत. त्यांनी राज्यात या संस्थेच्या सुमारे १७५ शाखा उघडल्या आहे. या शाखांमध्ये नोकरी लावुन देण्यासाठी हजारो तरुणांकडून करारनामा करून घेत कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी केल्याची माहिती येथे जमलेल्या संतप्त तरुणांनी व पालकांनी दिली.

श्री ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या अनेक शाखा बंद पडल्याने नोकरीसाठी पैसे भरलेल्या शेकडो तरुण आता लासलगाव येथे दररोज चकरा मारत आहेत. संस्थेकडून कोरे धनादेश देऊन खोटे आश्वासन दिले जात असल्याची तक्रार येथे आलेल्या तरुणांनी केली. यामध्ये अनेक तरुण आणि महिलांचाही सहभाग आहे. अनेकांनी एक लाखात नोकरी मिळत असल्याने ते भरून नोकरीची अपेक्षा ठेवलेली होती; मात्र नोकरीही मिळाली नाही आणि पैसेही परत मिळत नसल्याची भावना इथे आलेल्या संतप्त तरुण व महिलांकडून व्यक्त केली जात होती.

औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, जालना, बीड, नागपूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यातून अनेक तरुण पैसे मिळण्यासाठी लासलगाव येथील मुख्य कार्यालयात खेटे घालीत आहेत. ढोकेश्वेरच्या कार्यालयात शिरून संतप्त झालेल्या काही तरुणांनी तोडफोड केली. तर यावेळी काही तरुणांनी कॉम्पुटर आपल्या गाडीत टाकून नेल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून समजते.

फसवणुकीच‌ी तक्रार नाही

लासलगावमध्ये घडलेल्या प्रकाराविषयी पोलिसांशी संपर्क साधला असता निरीक्षक जनार्दन सोनवणे यांनी आमच्याकडे अद्यापपर्यंत या फसवणुकीबाबत कोणीही तक्रार दाखल केलेली नसल्याचे सांगितले. तसेच ‍काही फसवणूक झाली असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी संबंधितांना केले आहे.

नोकरी मिळेल या आशेने एक-एक रुपया गोळा करून पैसे भरले होते. प्रवासासाठी आमचे हजारो रुपये खर्च झाले आहेत. आता कोरा धनादेश दिला जात आहे. पैसे मिळतात की नाही याची कोणतीही शाश्वती नाही. पैसे मिळाले नाही तर आत्महत्या करावी लागेल.
- विठ्ठल राजपूत, (पिंपरखेड, ता. कन्नड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कसाऱ्यात दरड कोसळली

$
0
0

अडीच तासांनंतर वाहतूक सुरळीत; जीवितहानी टळली

म. टा. वृत्तसेवा, घोटी

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका व घाटमाथ्यावर गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे रविवारी (दि. १६) मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास दगडमाती ढासळल्याची घटना घडली. ही घटना येथील जव्हार फाट्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावरच्या महामार्गावर घडली. या घटनेमुळे या महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन ते अडीच तास ठप्प झाली होती. एक्स्प्रेस वेचे कर्मचारी आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांनी रस्ता मोकळा केला.

राज्यासह नाशिक जिल्ह्यातही पावसाने जोर कायम ठेवला आहे. इगतपुरी तालुक्यातही पाऊस सुरू असल्याने येथील मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील डोंगराच्या कडा ढासळत आहे. परिणामी, रविवारी घडलेल्या या घटनेमुळे मुंबई व राज्यातील पर्यटकांचे तसेच महामार्गावर प्रवास करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी वा दुर्घटना झाली नाही. मात्र वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

पर्यटकांचे हाल

या घटनेनंतर मात्र याठिकाणी पावसाने खुललेल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांना याचा फटका बसला. दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा झाल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. प्रसंगी एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आल्याने वाहतुकीचा वेग काहीसा मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच महामार्गावर पिकइंफ्रा एक्स्प्रेस वेचे पेट्रोलिंग करणारे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी महामार्गावरील दगड, माती, झाडे बाजूला सारून रस्ता मोकळा केला. या वेळी महामार्ग सुरक्षा पोलिस व एक्सप्रेस वेचे सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने ठप्प झालेल्या वाहतुकीला नियंत्रणात आणण्यात

यश आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंपावरील दरोड्यात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नागपूर-सुरत महामार्गावरील अजंगगाव शिवारात असलेल्या कोयल पेट्रोलपंपावर रविवारी (दि. १६) पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करीत दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात पेट्रोलपंपावर झोपलेल्या जेसीबी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन कर्मचारी जखमी झाले. या दरोड्यात एकूण चौदा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही चड्डी बनियान दरोडेखोरांची टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

धुळे तालुक्यातील फागणे ते अजंग गावादरम्यान असलेल्या रस्त्यावर कोयल पेट्रोलपंप आहे. हा पंप २४ तास सुरू असतो, रविवारी, पहाटे तीन वाजेच्या सुमारास पंपावर कामाला असलेले मॅनेजर प्रकाश बुधा पाटील (वय ३३, रा. फागणे), जगदीश सूर्यवंशी (वय २०, रा. फागणे) आणि दीपक पाटील (वय ३५, रा. देवभाने) हे तिघे टी. व्ही. पाहत बसले होते. त्यांना तीनजण चड्डी बनियानावर तोंडाला फडके बांधून पेट्रोलपंपामध्ये येताना दिसले. त्यामुळे ते सावध झाले. मात्र तिघा कर्मचाऱ्यांच्या कॅबिनकडे येत असताना शेजारच्या खोलीच्या बाहेर झोपलेले जेसीबीचालक इस्माईल बाबूभाई उर्फ सैय्यद (वय ७४, रा. शिवाजी चौक, निफाड जि. नाशिक) यांनाही जाग आल्याने ते नेमके काय झाले हे पाहण्यासाठी उठून येत असताना दरोडेखोरांना ते विरोध करण्यासाठी येत असल्याचे वाटल्याने त्यांनी प्रथम त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला जोरदार असल्याने इस्माईल बाबूभाई हे मृत्यूमुखी पडले. हे पाहून इतर तिघे घाबरले. दरोडेखोरांनी प्रवेश करीत कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत 'पैसे किधर है' अशी विचारणा केली. यावेळी घाबरलेले प्रकाश पाटील यांनी पैसे काढून दिल्यानंतर दरोडेखोरांनी त्यांच्या हातातील चांदीचे एक हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट आणि त्यांचा तीन हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून घेतला. दरोडेखोर जाताच जगदीश सूर्यवंशी या कर्मचाऱ्याने मोटारसायकलने पेट्रोलपंपाचे मालक विखील रमेश शामसुखा यांना याची माहिती दिली. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून पेट्रोलपंप गाठला.

याप्रकरणी प्रकाश बुधा पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलिस स्टेशनला भादंवी कलम ३०२, ३९४, ३९७, ३४ नुसार खून, दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, उपविभागीय पोलिस अधिकारी हिंमत जाधव यांनी

भेट दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानाविरोधात महिलांचे आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरीरोडवरील आरटीओ कॉर्नर येथील अमित वाइन्स हे दुकान तातडीने बंद करावे, या मागणीसाठी येथील महिलांनी शनिवारी सायंकाळपासून आंदोलनास सुरुवात केली असून, रविवारीही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. महिलांनी सकाळी दुकानाचे शटर उघडण्यास दुकानदाराला विरोध केला. म्हसरूळ पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तेथे जाऊन महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. म्हसरूळ पोलिस ठाण्यात जाऊन निवेदनही देण्यात आले.

महामार्गावरील दारू दुकाने बंदीनंतर दिंडोरीरोड हा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्यानंतर या मार्गावरील दारू दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. येथील अमित वाइन शॉप हे दुकान आठ वर्षांपासून सुरू आहे. मात्र, या दुकानावर येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगची गर्दी, मद्यपींची शिवीगाळ, भांडणे याचा येथील सोसायट्यांतील रहिवाशांना त्रास होत असल्याने हे वाइनचे दुकान बंद करण्यात यावे, यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. १५ दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलिस ठाण्यात या दुकानाविरोधात निवेदनही देण्यात आले होते.

--

आज होणार बैठक

या दारू दुकानाच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आज, सोमवारी (दि. १७) रोजी सकाळी ११ वाजता म्हसरूळ पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याकडे परिसरातील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गाची चाळण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक-पुणे महामार्गाची सिन्नर फाटा परिसरात अक्षरशः चाळण झाली आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना वाहनचालक प्रचंड त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे या परिसरात काही काळापूर्वीच रस्तादुरुस्ती करण्यात आली होती.

सिन्नर फाटा येथील हनुमान मंदिरालगत नाशिक-पुणे महामार्गाची मोठी वाताहत झाली आहे. महामार्गावरील डांबराचा थर उखडल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने खड्डे निर्माण झाले आहेत. या ठिकाणच्या खड्ड्यांची काही दिवसांपूर्वी तात्पुरती डागडुजीही करण्यात आली होती. मात्र, खड्डे दुरुस्तीचे काम अत्यंत सुमार दर्जाचे झाल्याने त्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात या ठिकाणचे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. या खड्ड्यांतील बारीक खडी महामार्गावर विखुरली गेल्याने या ठिकाणाहून वाहने चालविणे धोकादायक झाले आहे.


येथे वाढलाय धोका

महामार्गावरील सिन्नर फाट्याशिवाय चेहेडी शिव, निसर्ग लॉन्स व एकलहरे टी पॉइंट येथेही महामार्ग उखडला आहे. या ठिकाणी महामार्गावर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. साइडपट्ट्याही उखडल्या आहेत. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातून येणारे रस्ते महामार्गाला जोडलेले असल्याने स्थानिक नागरिकांची येथून मोठ्या संख्येने ये-जा सुरू असते. मात्र, येथेच मोठ्या प्रमाणात रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.


दुरुस्तीचे साहित्य वाऱ्यावर

सिन्नर फाटा येथे महामार्ग दुरुस्तीचे साहित्य गेल्या काही दिवसांपासून पडून आहे. परंतु, या साहित्याचा अद्यापही वापर झालेला नाही. महामार्ग रुंदीकरणाचे काम करणाऱ्या चेतक कंपनीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महामार्गाच्या या दुरवस्थेप्रश्नी तत्काळ लक्ष घालावे व महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांसह वाहचालकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षा, तू शिकून खूप मोठी हो!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘शिक्षण क्षेत्रातील कार्य खूप जवळून बघितले असल्याने विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात हे मला माहीत आहे. त्यातही प्रतीक्षासारख्या एखादीने डॉक्टर व्हायचेय, इंजिनीअर व्हायचेय अशा पारंपरिक वाटेने न जाता देशाची सेवा करण्याची वाट निवडलीय. या वाटेवर तिला कोणतीही अडचण येऊ नये अशी माझी इच्छा असल्याने मी तिला सखोल मार्गदर्शन करायला तयार आहे.’ हे शब्द आहेत इंदिरानगर येथील देविदास परांजपे यांचे.

‘मटा’ हेल्पलाइनच्या मुलांना रोजच आशीर्वाद देणारे हात वाढत आहेत. पैकी काही जण या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शन करण्याची इच्छा दाखवतात. देविदास परांजपे त्यापैकीच एक. अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिस्थितीशी झगडत दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या या विद्यार्थ्यांचा प्रवास आर्थिकदृष्ट्या सुकर व्हावा, यासाठी त्यांनी मदत केली आहेच, परंतु देशसेवेसारखी हटके वाट चोखाळताना प्रतीक्षा गायकवाड या मुलीला व तिच्यासोबतच इतरांना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्याची तयारी परांजपे यांनी दाखवली आहे. वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत ‘मटा’ने हाती घेतलेल्या हेल्पलाइनच्या उपक्रमात प्रत्येक वर्षी सहभागी होत असलेले परांजपे यापूर्वी मुंबई ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हेल्पलाइनमध्ये सहभागी होत असायचे. तेथे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली आहे. मात्र, नाशिकला स्थायिक झाल्यानंतर चौकशी करून या उपक्रमात सहभाग घेतला.

परांजपे यांच्यासारखे सुजाण पालक ‘मटा’च्या कार्यालयात येतात व या मुलांना मदत करतात. ‘मटा हेल्पलाइन’चा हा उपक्रम म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे. तो ओढण्यासाठी आणखी दानशूर हातांची गरज आहे. हेल्पलाइनसाठी निवडलेल्या गौरी जाधव, आदित्य नाईक, सोनिका चिंचोले, पूजा सांगळे, सचिन गांगुर्डे, धनश्री राजोळे, प्रतीक्षा गायकवाड, दीपाली वरघडे, सोनाली कुंवर, आदित्य जाधव या दहा जणांविषयी ‘मटा’त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी अनेक जण तयार असले तरीही हेल्पलाइनच्याच माध्यमातूनच त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images