Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

आंदोलनाची नव्याने मोट

0
0

२६ जुलैपासून तीव्र आंदोलनाचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तत्वत: कर्जमाफी देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केली. तरीही ऐतिहासिक कर्जमाफी दिल्याचा आव फडणवीस सरकार आणत असून, ही शेतकऱ्यांची ऐतिहासिक फसवणूक आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासाचा फडणवीस सरकारने गळा घोटला असून, या गद्दारीला २६ जुलैपासून आंदोलनातून व्यापकस्तरावर उत्तर देण्याचा निर्धार शेतकरी सुकाणू समितीने सोमवारी नाशिकमध्ये केला.

सरकारच्या फसव्या कर्जमाफी घोषणेच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी सरकारच्या फसव्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. एकीकडे उद्योगपतींच्या मालाला परदेशात बाजारपेठा खुल्या होत असताना शेतकऱ्यांच्या अन्नधान्याला निर्यातबंदी आहे. उद्योगपती सरकारचे बाप लागतात का? असा सवाल रघुनाथ पाटील यांनी उपस्थ‌ित केला. कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमीभाव मिळविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार योगेन्द्र यादव, व्ही. एम. सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.

सत्तेबाबतचा निर्णय २५ जुलैला

शेतकरी संपाला धार चढल्यानंतर खासदार राजू शेट्टी हे सत्तेमध्ये राहणार, की बाहेर पडणार याबाबतचा प्रश्न वारंवार उपस्थित होऊ लागला होता. एल्गार सभेच्या निमित्ताने शेट्टी नाशिकमध्ये आले असताना त्यांनी सत्तेमधून बाहेर पडणार, की नाही याचे उत्तर २५ जुलै रोजी मिळेल, असे पत्रकारांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वीकृत’ची निवड लांबणीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत संख्याबळानुसार पाच स्वीकृत सदस्यांच्या नियुक्ती प्रक्रियेसंदर्भात सोमवारी आयुक्तांसह झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एक सदस्यावर दावा ठोकला आहे. संख्याबळानुसार भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोनच सदस्य नियुक्त होणार असतानाही आघाडीने एका जागेवर दावा ठोकल्याने नियुक्ती प्रक्रियेत ट्विस्ट निर्माण झाले आहे. आघाडीच्या दाव्यामुळे प्रशासनाने कायदेशीर पडताळणीसाठी वेळ मागवून घेतली आहे. त्यामुळे ही नियुक्ती लांबणीवर पडली आहे. दरम्यान आघाडीच्या मागणीमुळे आता भाजप आणि शिवसेनाला प्रस्ताव दाखल करण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवड सप्टेंबर नंतरच होणार असल्याने इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.

महापालिकेची निवडणूक होऊन चार महीने उलटले तरी अद्यापही पालिकेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आलेली नाही. पालिकेतील संख्याबळानुसार भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन सदस्य नियुक्त होणार आहेत. परंतु या सदस्यांसाठीही आता अटी व शर्ती असल्याने निवड प्रक्रिया किचकट झाली आहे. वैद्यकीय, विधी, शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची निवड करणे बंधनकारक असून, त्यासाठी पाच वर्षाचा अनुभव सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे या विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, संभाजी मोरुस्कर, शाहू खरै, गजानन शेलार, दीक्षा लोंढे उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी तौलनिक संख्याबळानुसार पाच सदस्यांचा कोटा सांग‌ितला. त्यात भाजप तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळत असल्याचे स्पष्टीकरण दिले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र यावेळी आघाडीला एक सदस्याचा कोटा द्यावा, अशी मागणी केली. आम्ही एकत्र‌ित गटनोंदणी करू पण एक जागा सोडा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी आघाडीला लेखी म्हणणे सादर करण्याची मुदत दिली. यानंतर कायदेशीर बाबी पडताळून पाहू, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. या सर्व प्रक्रियेसाठी आघाडीने वेळ मागून घेतला. त्यामुळे नियुक्तीची प्रक्रिया काही काळासाठी लांबणीवर पडली आहे. या प्रक्रियेला उशीर होणार असल्याने आयुक्तांनी शिवसेना आणि भाजपला आपल्या सदस्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी २१ ऑगस्टची मुदत दिली आहे. त्यानंतर प्रस्तावांची छाननी केली जाणार आहे.

नियुक्तीसाठी वेळकाढू धोरण

निवडणूक होताच पहिल्या महासभेनंतर तातडीने स्वीकृत सदस्यांची निवड करणे बंधनकारक आहे. परंतु भाजप आणि शिवसेनेतही इच्छुकांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळे या पक्षांना निवडीचे आव्हान असल्याने निवड प्रक्रिया लांबवण्यासाठी वेळकाढू धोरण आखले जात आहे. त्यासाठी आता आघाडीचा चेंढू वापरण्यात आल्याचा संशय आहे. नियुक्ती प्रक्रिया लांबणीवर पडल्यास इच्छुकांचा त्रास कमी होईल. त्यानंतर अचानक नियुक्ती जाहीर करून वाद टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रमाचा पैसा देतोय, मुलांकडून चीज व्हावे’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘गौरी, मला मुलगी नाही; पण मला तुझा अभिमान आहे. तुझी पूर्ण जबाबदारी घेऊ शकत नाही मी, ते माझ्या आवाक्याबाहेर आहे. खूप पैसा देऊ शकत नाही; पण जो देतोय श्रमाचा आहे. त्याचे चीज व्हावे ही अपेक्षा. तुझ्यासोबतच्या नऊ जणांचेही तोंडभरून कौतुकच! छोटीशी भेट देतोय...आशीर्वादासह.’ हे भावपूर्ण पत्र आहे सुरेश सूर्यवंशी यांचे.

रोजच शेकडोने पालक भेटतात, त्यांच्या व्यथा सांगतात. कित्येक पालक तर असे आहेत, की त्यांनी खूपच हालअपेष्टा सहन करीत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची अशी इच्छा आहे, की या मुलांना आपल्यासारखे दिवस काढावे लागू नये. ज्यांच्या स्वतःच्या मुलांच्या शिक्षणाचेही हालच आहेत, त्यांनीदेखील या मदतीमध्ये पुढाकार घेतला आहे. एक आजोबा लिहितात, की ‘मी मध्यमवर्गातला आहे, माझ्या नातवाचे शिक्षणही बरीच आबाळ करून झालेय. कर्ज काढावे लागले. या तिन्ही मुलांनी नाउमेद न होता शिकावे प्रवाहाविरुद्ध पोहून दाखवावे, माझे आशीर्वाद आहेतच. हेल्पलाइन वाचून एक वयस्कर व्यक्ती मोठ्या तळमळीने आली व या मुलांना देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत हो! पण माझ्या संपूर्ण आयुष्यात आलेले अनुभव मी यांना मार्गदर्शनासाठी देऊ इच्छितो. अल्ट्रेशनचा व्यवसाय करणारा एक जण चेक देण्यासाठी आला व अक्षरशः डोळ्यांत पाणी आणून त्याची व्यथा सांगून गेला, की ‘या मुलांना शिकू देत. आम्ही शिकलो नाही म्हणून आज या अवस्थेत आहोत.’

‘मटा हेल्पलाइन’मध्ये आवाहन केल्यावर दहाही मुलांसाठी मदत सुरू आहे. या दहा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी प्रचंड पैसा उभा करावा लागणार आहे. पालक येतात, फोन येतात. कुणी या मुलांचे पालकत्व घेऊ पाहते, तर कुणी त्यांच्या शिक्षणाचा सर्व खर्च करू इच्छित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा म्हणून वाचकांच्या सत्प्रवृत्तीला साद घालत हा ‘मटा हेल्पलाइन’चा उपक्रम हाती घेतला.

शे-दोनशेपासून हजारापर्यंतचे चेक जमा होऊ लागले. त्यांच्या दातृत्वाला दाद द्यायलाच हवी; पण ‘मटा हेल्पलाइन’ हा जगन्नाथाचा रथ आहे. तो वाचकांच्या हातूनच ओढला जावा, अशी अपेक्षा आहे. मदत मिळत आहेच, परंतु हा ओघ आणखी वाढल्यास ही मुले मोठेपणी नक्कीच नाव काढतील व त्याचे सर्वस्वी श्रेय या दानशूरांनाच राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडीसी तो लिफ्ट करा दे...

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

प्रवाशांनी सातत्याने मागणी केल्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्टेशनमध्ये दोन लिफ्टचे काम पूर्ण झाले आहे. त्यांचे टेस्टिंगही यशस्वी झाले आहे. परंतु, मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप परवानगी न दिल्यामुळे महिनाभरापासून येथील लिफ्ट उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत.

नाशिकरोड स्थानकातून दररोज किमान शंभर ट्रेन्स धावतात. पंधरा ते वीस हजार प्रवासी प्रवास करतात. त्यांना अवघड जिने चढून दुसऱ्या व तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी धापा टाकत जावे लागते. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास करणारे दररोजचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग यांच्यासाठी जिने चढणे दिव्य असते. हे विचारात घेऊन मुंबईसह महत्त्वाच्या स्थानकांमध्ये लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. नाशिकरोडला तीन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. वर्षभरापूर्वी लिफ्ट उभारणीची प्रक्रिया सुरू होती. आता लिफ्ट तयार झाली, तर मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी नसल्याने लिफ्ट वापरता येत नसल्याची स्थिती असून, त्या सुरू होण्यास एक महिना लागेल, असे समजते.

--

महिनाभरापूर्वीच पूर्ण झालेय काम

नाशिकरोडला चार फ्लॅटफॉर्म आहेत. त्यातील एक नंबरचा प्लॅटफॉर्म जास्त वापरात नाही. दोन व तीनवरच जास्त गाड्या थांबतात. चौथा नवा फ्लॅटफॉर्म क्वचितच वापरला जातो. दोन व तीन प्लॅटफॉर्मवर धावपळीत अवघड जिने चढून अनेकांना गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला आहे. या फ्लॅटफॉर्मना जोडण्यासाठी लिफ्टची सुविधा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळचे वरिष्ठ व्यावसायिक व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी सांगितले, की दोन्ही लिफ्टचे काम महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लिफ्ट विभागाकडून पाहणी करणे आणि परवानगी येणे बाकी आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दोन्ही लिफ्ट आहेत. त्यातून ओव्हरब्रीजवर जाता येते. तेथून फ्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीनवर उतरता येते. रेल्वे स्टेशनवर लिफ्ट, तसेच सरकते जिने बसविण्यासाठी ‘मटा’ने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

--

ज्येष्ठांसह दिव्यांगांची गैरसोय

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची लिफ्ट बसविण्याची जुनी मागणी होती. नाशिकरोडच्या प्लॅटफॉर्म एक व चारवर फार कमी गाड्या थांबतात. मुंबईहून येणाऱ्या २१ डब्यांच्या बहुतांश प्रवासी गाड्या या फ्लॅटफॉर्म दोनवर, तर मुंबईला जाणाऱ्या गाड्या फ्लॅटफॉर्म तीनवर थांबतात. गाडी चुकू नये म्हणून उत्साही युवक रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात. मात्र, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांगांचे हाल होतात. या गाड्या धावत-पळत जाऊन पकडण्यासाठी जिन्यावरून जाणे म्हणजे अनारोग्याला निमंत्रण देण्यासारखे असते.

--

सरकते जिने कधी?

भुसावळ विभागातील नाशिकरोड हे क्लास वन रेल्वे स्टेशन आहे. प्रवासीसंख्या, महसूलही हे स्थानक जास्त देते. परंतु, सुविधांबाबत भुसावळ आणि मनमाडला प्राधान्य मिळते. या दोन ठिकाणी जंक्शन आहे. पण, नाशिकरोडला नाही. भुसावळ विभागात नाशिकरोडखेरीज मनमाड, जळगाव रेल्वे स्टेशनवरही लिफ्ट उभारण्याचे काम सुरू आहे. खंडवा आणि अकोला येथे लिफ्टचे काम अद्याप सुरू होणे बाकी आहे. नाशिकरोडला सामान्य प्रवाशांसाठी सरकते जिने बसविण्याचे जाहीर झाले आहे. परंतु, त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. ती झाल्यास लिफ्टवरील ताण कमी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी कामगारांचे ‘चड्डी-बनियन’ आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली आहे. महागाई भत्ता त्वरित मिळाला नाही, मागील तीन वर्षांपासून गणवेशाची शिलाई मिळालेली नाही, तसेच कामगारांना यावर्षी कापड मिळाले नाही तर चड्डी-बनियन आंदोलन करू, असा इशारा या संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी दिली आहे. मागण्या मान्य न झाल्यास २० जुलैला विभागीय कार्यालये व मध्यवर्ती कार्यशाळेसमोर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

उपनगरच्या इच्छामणी मंगल कार्यालयात मंगळवारी नाशिक, धुळे, जळगाव, नगर येथील संघटना सदस्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ताटे बोलत होते. व्यासपीठावर प्रदेश सचिव स्वप्निल गडकरी, विभागीय अध्यक्ष विजय पवार, महिला प्रतिनिधी शीला नाईकवाडे, राज्य अध्यक्ष संदीप शिंदे, नगर विभाग सचिव डी. जी. अकोलकर, धुळे सचिव राजेश वधिले, कैलास तुपे, माजीद शेख यांच्यासह कामगार बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियम न पाळणाऱ्यांचे लायसेन्स होणार रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

शहरातील अपघातांची संख्या शून्यावर नेऊन ठेवण्याचा पोलिसांचा मानस आहे. सर्वाधिक अपघात व अपघातात मृत्यू हे १८ ते ३५ वयोगटातीलच होत आहेत. यापुढे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या व हेल्मेट न वापरणाऱ्यांचा परवानाच रद्द करण्याचे आदेश काढण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्‍त डॉ. रवींद्र सिंगल यांनी मंगळवारी सांगितले.

लर्निंग लायसेन्सनंतर पक्‍के लायसेन्स काढण्यासाठी आता खास प्रशिक्षण घेणे गरजेचे असून, प्रशिक्षणानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्रामुळेच पक्‍के लायसेन्स यापुढे उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षणाचा प्रारंभ मंगळवारी पोलिस आयुक्‍त व आरटीओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिक फर्स्टच्या चिल्‍ड्रेन पार्कमध्ये करण्यात आला. त्या वेळी डॉ. सिंगल बोलत होते.

ते म्हणाले, की कोणत्याही राज्यात अशा पद्धतीचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात नाही. नाशिक शहरात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात येत आहे. बेंगलुरू येथे वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याने त्याच धर्तीवर नाशिकमधील वाहतूकव्यवस्था करण्याच्या हेतूने या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाहतुकीचे नियम किंवा हेल्मेट न घालणे या गोष्टी पोलिस कर्मचाऱ्यांकडून झाल्या तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे.

या वेळी आरटीओचे भरत काळसकर, राजेंद्र कदम, वाहतूक शाखेचे लक्ष्मीकांत पाटील व नाशिक फर्स्टचे चेअरमन अभय कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना चेअरमन अभय कुलकर्णी यांनी सांगितले, की शहरातील वाहतूकव्यवस्था सुरळीत होण्यासाठी नाशिक फर्स्टचे कार्य सुरू आहे. वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच शहराची वाहतूक सुरळीत करणे हा यामागील उद्देश असून, आरटीओ आणि पोलिसांच्या प्रयत्नामुळे हे आगळेवेगळे प्रशिक्षण शहरात सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

आता लायसेन्सपूर्वी प्रशिक्षण बंधनकारक

आरटीओचे काळसकर यांनी सांगितले, की विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सूचना करण्यात येत असते. अनेक अपघात हे केवळ वाहतुकीचे नियम पाळले न गेल्याने होतात. त्यामुळेच आता लर्निंग लायसेन्सनंतर पक्‍के लायसन्स काढण्यापूर्वी नाशिक फर्स्ट येथे एक प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्रानंतरच लायसेन्स मिळेल.

शहरात २२ टक्क्यांनी अपघात कमी

कदम यांनी सांगितले, की अपघातांचे प्रमाण दरवर्षी किमान दहा टक्क्यांनी कमी झाले पाहिजे असे न्यायालयाचे निर्देश आहेत. नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत २२ टक्‍के अपघात कमी होऊन जीवित हानी झालेली नाही. चालकांना वाहतुकीचे सर्वच नियम काटेकोर पद्धतीने माहीत असणे आवश्यक असून या नियमांची अंमलबजावणी केली तर अपघात होणार नाहीत. पोलिस उपायुक्‍त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की चालक होण्याआधी त्यांना नियमांबाबत प्रशिक्षित करणे हा प्रशिक्षणामागचा हेतू आहे. या वेळी प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचमधील दहा जणांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. संजय देशपांडे यांनी आभार मानले. नाशिक फर्स्टचे पदाधिकारी व पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेने निषेध केला असून, भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी शिवसेना कार्यालयासमोर पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारून, तसेच त्याचे दहन करून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाही देण्यात आल्या. पंतप्रधानांनी कडक भूमिका घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

सोमवारी रात्री अमरनाथ येथे यात्रेकरूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याचा शिवसेनेकडून मंगळवारी निषेध करण्यात आला. शालिमार येथे शिवसेनेकडून पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारण्यात आले. त्यानंतर त्या झेंड्याचे दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानविरोधी घोषणाही करण्यात आल्या. योगेश बेलदार, राजेंद्र क्षीरसागर, संदीप गायकर, अमोल सूर्यवंशी, देवाजी जाधव, अजय निकम यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

--

नाशिककर सुखरूप

दरम्यान, अमरनाथ यात्रेसाठी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून ७०० भाविक गेलेले आहेत. सोमवारी झालेल्या हल्ल्यानंतर हे सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात नाशिकमधील ३०० भाविकांचा समावेश आहे. या यात्रेसाठी नाशिकसह जळगाव, धुळे, शहादा येथून सुमारे ७०० भाविक गेले आहेत. त्यापैकी ५०० भाविक टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून या यात्रेसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. २०० भाविक रेल्वे, तसेच खासगी वाहनांद्वारे या यात्रेसाठी गेले आहेत. ७०० पैकी सुमारे ३०० भाविक नाशिकमधून गेल्याची माहिती टूर ऑपरेटर्सने दिली. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या भाविकांना लगेच‍च स्थानिक पोलिस आणि सैन्य दलाने सुरक्षित स्थळी हलविले. त्यामुळे सर्व भाविक सुखरूप असून, त्यापैकी काही जण आज, बुधवारी (दि. १२) अमरनाथचे दर्शन घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरिट लिस्टने धाकधूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोमवारी रात्री उशिरा वेबसाइटचा तांत्रिक अडसर शिक्षण विभागाने दूर करून अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान पहिल्या मेरिट लिस्टसाठी सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना एसएमएस केल्याचा दावा केला आहे. मात्र, मंगळवारीदेखील बहुतांश विद्यार्थ्यांना एसएमएस न मिळाल्याच्या तक्रारी होत्या. अखेरीस स्वत: वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झालेल्या कॉलेजचे नाव वाचून हायसे वाटले. शहरात सायन्स विद्याशाखेसाठी ९४.४ टक्क्यांचे मेरिट, तर कॉमर्ससाठी ९० टक्क्यांचे मेरिट लागले.

पहिल्या मेरिट लिस्टची प्र्रसिद्धी सोमवारी सायंकाळी ५ वाजता होणे अपेक्षित होते. मात्र, रात्री दहा वाजून गेल्यानंतरही याबाबत वेबसाइटवर यादी अपलोड झालेली नव्हती. या प्रकाराने गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत शिक्षण विभागाकडेही तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाच्या एसएमएसची पुन्हा वाट पाहून अखेरीला स्वत:चा पाठपुरावा करीत वेबसाइटवर लॉग इन केले. त्यानंतर त्यांना अलॉट झालेले कॉलेज पाहावयास मिळाले.

पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत शहरात १४ हजार ९२१ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यापैकी सुमारे ७ हजार ५०० विद्यार्थ्यांचे प्रवेश पहिल्या दिवशी निश्चित झाल्याची माहिती शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. २४ हजार ५०० जागांसाठी सुमारे २६ हजारांवर अर्ज आलेले आहेत. प्रवेशप्रक्रियेतील उर्वरित नऊ हजार विद्यार्थ्यांना पुढील तीन मेरिट याद्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

--

सायन्सबरोबरच कॉमर्सही नव्वदीपार!

गेल्या वर्षीच्या मेरिटचा उच्चांक तोडत यंदा शहरात आरवायके कॉलेजमध्ये सायन्स शाखेचे मेरिट खुल्या वर्गासाठी ९४.४ टक्क्यांवर गेले. गतवर्षी हेच मेरिट ९३.८० टक्क्यांवर होते. कॉमर्स शाखेसाठी बीवायके कॉलेजमध्ये खुल्या वर्गासाठी ते ९०.८ टक्क्यांवर गेले. गतवर्षी बीवायकेमध्ये हेच मेरिट पहिल्या यादीत ८७ टक्क्यांवर होते. यंदा सायन्स व कॉमर्स या दोन्ही विद्याशाखांच्या मेरिटमध्ये वाढ झाली आहे.

--

कोट्यातील प्रवेशावरून नाराजी

यंदा ऑनलाइन प्रवेशांमुळे होणाऱ्या बदलांचे तर्क लावत अनेक पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश स्पोर्टस आणि कल्चर कोट्यातून करण्यास प्राधान्य दिले. मात्र, प्रत्यक्षात अलॉटमेंटमध्ये या विद्यार्थ्यांच्या वाट्याला काही कॉलेजने नॉन ग्रँट जागांवर प्रवेश दिला. तेथे या पालकांना ग्रँटेड जागांवर प्रवेश अपेक्षित असल्याने शिक्षण विभागाच्या या धोरणाबाबत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

--

दुसरी लिस्ट २० जुलैला

पहिल्या मेरिट लिस्टचे प्रवेश १३ जुलैपर्यंत होतील. १४ जुलै रोजी रिक्त जागा व पहिल्या फेरीतील कट ऑफ प्रसिद्ध होईल. १५ ते १८ जुलैदरम्यान पसंतीक्रम भरला जाऊन २० जुलै रोजी दुसरी मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे. त्या यादीतील प्रवेश २४ जुलैपर्यंत होतील.

--

गर्दीने फुलले कॅम्पस

---

पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर गुण आणि संवर्गनिहाय आडाखे बांधून संबंधित कॉलेजमध्ये जाणे अन् यादी तपासून शक्य झाल्यास प्रवेश घेणे असा पायंडा यंदा ऑनलाइन पद्धतीने तोडला गेला. विद्यार्थ्यांना लॉग इन केल्यानंतर त्यांना अलॉटमेंट झालेले कॉलेज बघायला मिळाल्याने त्या पावतीच्या आधारावर थेट प्रवेश देण्यात आले. परिणामी कॉलेज कॅम्पस गर्दीने फुलून गेले होते. मंगळवारी दुपारी उशिराने शिक्षण विभागाने पहिल्या प्रवेश यादीतील गुणनिहाय तक्ते जाहीर केले.

--

निवडक कॉलेजेसच्या मेरिट लिस्ट

_ _ _

आरवायके सायन्स कॉलेज

संवर्ग ........................गुण.....................टक्केवारी

जनरल ...................४७२......................९४.४

ओबीसी....................४५८....................९१.६

एसबीसी....................४४८....................८९.६

एनटी बी ....................४५३....................९०.६

एनटी ए ....................३७९....................७५.८

एनटी सी ....................४२६....................८५.२

एनटी डी ....................४५५....................९१.००

एससी ....................४२०....................८४.००

एसटी ....................४१० ....................८२.००

_ _ _ _ _ _

बीवायके कॉमर्स कॉलेज

संवर्ग ........................गुण.....................टक्केवारी

जनरल ...................४५० ...................... ९०

ओबीसी....................४०७ .................... ८१.४

एसबीसी....................३०० .................... ६०

एनटी बी ....................३८४ .................... ७६.८

एनटी ए ....................२६६ .................... ५३.२

एनटी सी ....................२७४ ....................५४.८

एनटी डी ....................३६१ .................... ७२.२

एससी ....................३०१ .................... ६०.२

एसटी ....................२५८ ....................५१.६

_ _ _ _ _ _

केटीएचएम सायन्स कॉलेज

संवर्ग ........................गुण.....................टक्केवारी

जनरल ....................४५६ .....................९१.२

ओबीसी....................४३८ .................... ८७.६

एसबीसी....................३२१ .................... ६४.२

एनटी बी ....................४१३ ....................८२.६

एनटी ए ....................३५६ .................... ७१.२

एनटी सी ....................३८६ ....................७७.२

एनटी डी ....................४३६ .................... ८७.२

एससी ....................३८४ .................... ७६.८

एसटी ...................४११ ....................८२.२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर स्वच्छतेचा बिगुल!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधानांचे स्वच्छ भारतचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिक शहराला स्वच्छतेत देशात पहिल्या दहामध्ये आणण्याची घोषणा केल्यानंतर महापालिकेने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. स्वच्छतेतल्या इंदूर पॅटर्नचा अभ्यास केल्यानंतर शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र स्वच्छ भारत सिटी युनिट स्थापन करण्याचा निर्णय आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला आहे. या युनिटमार्फत स्वच्छतेचे सर्वेक्षण, नियोजन, सूचना आणि निरीक्षणाचे काम केले जाणार आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर नियुक्त केलेल्या पॅनलसोबत करार केला जाणार असून, त्यांचे सल्लागार महापालिकेत नियुक्त केले जाणार आहेत.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाला सर्वोतोपरी प्राथमिकता दिली असून, त्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. देशातील स्वच्छ शहरांसाठी त्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या सर्वेक्षणात महापालिकेची कामगिरी घसरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत नाशिकला स्वच्छतेत देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये आणण्याची सूचना प्रशासनाला केली होती. त्यानुसार आयुक्तांनी आरोग्याधिकाऱ्यांचे पथक देशात पहिल्या आलेल्या इंदूरला पाठविले होते. आरोग्याधिकाऱ्यांनी आपला अहवाल सादर केला असून, त्यात विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यानुसारच आता स्वच्छतेच्या देखरेख आणि निगराणीसाठी महापालिकेत स्वतंत्र सिटी युनिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या युनिटकडून शहरातील स्वच्छतेेचे सर्वेक्षण, स्वच्छतेसाठीचे नियोजन, आवश्यक सूचना, सफाई कर्मचाऱ्यांचे नियोजन, तसेच स्वच्छतेच्या कामाचे निरीक्षणही केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेवर प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी सूक्ष्म आराखडा तयार केला जाणार असून, त्या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

--

केंद्राच्या पॅनलचा सल्ला

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियासाठी देशपातळीवर एका पॅनलची नियुक्त केली अाहे. त्यातील सल्लागार हे स्वच्छतेसंदर्भातील उपाययोजनांचे प्लॅनिंग करून देतात. केंद्राच्या या पॅनलवरील सल्लागारांशीही करार करून त्यांचा सल्ला घेतला जाणार आहे. या पॅनलवरील सल्लागार हे महापालिकेच्या या युनिटला स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि सल्ला देणार आहेत. घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेसंदर्भातील सर्व जबाबदारी ही या युनिटवर राहणार आहे. त्यात महापालिकेतील कर्मचारी कार्यरत राहणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्वच्छतेेचे काम सोपे होणार असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी पट्ट्यातही एसटीचा ‘स्मार्ट टच’

0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

राज्यातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेली एसटी आता अधिक स्मार्ट होण्याचा प्रयत्न करीत आहे. वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आणि एसटीचा प्रवास कंटाळवाणा असतो, त्रासदायक असतो ही ओळख पुसून काढण्यासाठी एसटीने काही बसेसमध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रवाशांचे मनोरंजन होत आहे. दिंडोरी तालुक्यातील काही बसेसमध्ये ही सुविधा मिळत असल्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

राज्य परिवहन मंडळाच्या एसटीने कुठे जायचं म्हंटले की कंटाळवाणा आणि त्रासदायक प्रवास डोळ्यासमोर उभा राहतो. त्यात आणखीन भर पडते ती एसटीत लावलेल्या जाहिरातींमुळे. हे कमी की काय बसस्थानकांत फेरीवाल्यांचा आरडाओरडमुळे प्रवास खूपच मनस्ताप देतो. मात्र आता या कटकटीच्या प्रवासाला करमणुकीची जोड मिळाली आहे. एसटीतील प्रवाशांचे मनोरंजन व्हावे यासाठी वायफायद्वारे इंटरनेट सेवा मोफत दिली जात आहे. स्मार्टफोनधारकांसाठी लाईव्ह टीव्ही, बातम्या, चित्रपट पाहणे अगदी सहज उपलब्ध झाले आहे. एसटीच्या या उपक्रमाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे. सुरगाणा तालुक्यात जाणाऱ्या नाशिक-उंबरठाण या बसमध्ये ही सुरू झाल्यामुळे स्मार्ट प्रवाशांचा प्रवास अधिकच स्मार्ट होत आहे. रेल्वे प्रशासनाने विविध रेल्वे स्टेशन वायफाय करण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबई-गोवा तेजस एक्स्प्रेमध्ये इंटरनेट सेवा पुरवली जात आहे. मात्र त्या गाडीचे प्रवास भाडे वाढविण्यात आले आहे. परंतु राज्य परिवहन महामंडळाने बसमध्ये मोफत वाय फाय सुविधा देत सगळ्याच प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरित ब्रह्मगिरी’अंतर्गत वृक्षलागवड उपक्रम

0
0

वृक्षदिंडी काढून केला जागर

कॉलेज क्लब रिपोर्टर

पावसाळा सुरू झाल्याने शहर परिसरात वृक्ष लागवडीसाठी बीज संकलनाच्या आवाहनास लाभलेल्या उदंड प्रतिसादानंतर हरित विश्व ग्रुपने प्रत्यक्ष वृक्ष लागवडीस प्रारंभ केला आहे. शहरातील आयुर्वेदिक डॉक्टर्सची टीम वृक्ष लागवडीचे कार्य करत आहे. 'हरित विश्व हरित ब्रह्मगिरी' आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे वृक्षदिंडीचे आणि वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले होते.

वृक्ष संवर्धनासाठी सध्या सर्वच स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहेत. विद्यार्थी, नागरिक, डॉक्टर्स वृक्ष संवर्धनासाठी पुढे येत आहेत. नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर्स 'हरित विश्व' या छताखाली नाशिक व जवळपासच्या परिसरात वृक्षारोपणाचे कार्य करत असून, गेल्या दोन महिन्यांपासून ब्रम्हगिरी येथे एक हजारपेक्षा जास्त औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.हरित विश्व तर्फे ९ जुलै ला त्र्यंबकेश्वर येथे वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या वृक्षदिंडीदरम्यान गावकऱ्यांना औषधी वृक्षांचे महत्त्व सांगण्यात आले. सकाळी ६ वाजता वृक्षदिंडी आंबेडकर चौक ते निवृत्तीनाथ मंदिर या मार्गावर वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीमध्ये वृक्षारोपणाचे महत्त्वही गावकऱ्यांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे हरित विश्व ग्रुपच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या बीजांचे रोपण करण्यात करण्यात आले. सीड बॉल्सद्वारे वृक्षारोपण करण्यात आले. हरित विश्व हरित ब्रह्मगिरी' आणि वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमानेे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडीमध्ये ग्रामस्थ, विद्यार्थी, डॉक्टर्स, पोलिस, वनाधिकारी यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपंग कामगार नुकसान भरपाईपासून वंचित

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक जिल्ह्यातील विविध कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष काम करताना अपघातग्रस्त झालेल्या कामगारांना शासनाचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. कारखान्यात काम करताना अपंग झालेल्या कामगारांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. कंपनी व्यवस्थापनाकडून कुठलीही मदत दिली जात नसल्याचा आरोप कामगार विकास मंचचे कैलास मोरे यांनी केला आहे. सरकारच्या सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून न्याय मिळावा, यासाठी कामगारांनी नुकतेच ठिय्या आंदोलन केले. या वेळी सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डी. बी. गोरे यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून अपघातात अपंग झालेल्या कामगारांना न्याय देणार असल्याचे सांगितले.

कामगार कायदे नेमके कुणासाठी, असा प्रश्न काही वर्षांपासून कामगारांसमोर उभा राहिला आहे. एकीकडे किमान वेतन देण्यात यावे असे सरकारकडून आदेश दिले जातात. मात्र, प्रत्यक्षात कामगारांना किमान वेतनाचा लाभ मिळताना दिसत नाही. विशेष म्हणजे दिवसेंदिवस कायमस्वरूपी कामगारांची संख्या कमी होत असून, ठेकेदारी पद्धतीने व्यवस्थापन कामगारांकडून काम करून घेतात. मात्र, कारखान्यात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी झालेल्या अनेक अपघातांमध्ये जीव गमावल्याच्याही घटना घडल्या आहेत. यामध्ये काम करताना यंत्रामुळे अपघातात अपंग झालेले अनेक कामगारांनाही मदत मिळालेली नाही. अपघातग्रस्त कामगारांनी उद्योग भवनातील सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करत नुकसानभरपाईची मागणी केली. कामगार विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष मोरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत अपंग कामगारांना न्याय देण्याची मागणी केली. दरम्यान, अनेक कामगारांना कंपनीच्या यंत्रणांवर काम करताना अधू होण्याची वेळ आली आहे. ज्या कारखान्यात काम करताना कामगारांना अपंगत्व आले आहे, त्याच कारखाना व्यवस्थापनाकडून कामगारांना दोषी असल्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप कामगारांनी केला. भरपाईही दिली जात नाही व कामावरही घेतले जात नसल्याची तक्रार या वेळी कामगारांनी केली. सरकारच्या सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाने दोषी कारखाना व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी कामगार विकास मंचचे मोरे यांनी केली. न्याय मिळत नसल्याने अपंग कामगारांनी थेट सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमटेक प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

इंजिनीअरिंग चा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची एमई व एमटेक या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया डीटीई म्हणजे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत होणार आहे. मंगळवार (दि. ११) एमई व एमटेकसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ११ जुलै ते २९ जुलै या काळात होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुख्य म्हणजे यावर्षापासून एमई व एमटेक साठीच्या प्रवेश प्रक्रियेची फी ऑनलाइन स्वरुपात म्हणजे क्रेडिट कार्ड अथवा नेट बँकिंगच्या सहाय्यानेच भरावी लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थांनी रजिस्ट्रेशन करते वेळी क्रेडिट कार्ड जवळ ठेवणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेसंबंधी अधिक माहिती http://me2017.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

दहावी, बारावी / डिप्लोमा आणि डिग्रीचे मार्कशीट, लिव्हिंग सर्टीफिकीट, जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड / पॅन कार्ड, डोमिसाईल.

महत्त्वाच्या गोष्टी

प्रवेश अर्जाची फी नॉन रिफंडेबल असल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाची फी ऑनलाइन भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. फी भरण्याचा योग्य पर्याय निवडून आवश्यक डेबिट कार्ड व क्रेडिट कार्डचा कार्ड नंबर ही सर्व अचूक भरावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक कोंडी कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वर्दळीच्या जुना आडगाव नाक्याजवळ होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. नाशिक शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांमुळे दुचाकी वाहनांची कोंडी नेहमीचीच बनली आहे.

रिक्षा स्टॉपवर रिक्षा उभ्या राहत नसून त्या रस्त्यातच उभ्या असल्याने वाहनांना त्यांचा त्रास होतो. या समस्येकडे वाहतूक पोलिसांकडून तेवढ्यापुरता बंदोबस्त करण्यात येतो. पुढे मात्र जैसे थे परिस्थिती राहते. त्यामुळे वाहतूक प्रशासनाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.

गोदावरीत अस्वच्छता

नाशिक : गोदावरी नदीच्या स्वच्छतेवर पालिकेकडून दुर्लक्षच होत आहे. या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे, तसेच या ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारानेही गोदावरी काठी बाजार झाल्यानंतर उरलेला भाजीपाल्याचा कचरा त्याच ठिकाणी टाकण्यात येतो. यामुळे गोदावरीकाठी अस्वच्छता पसरली आहे. कलशांमध्येही नागरिक घाण टाकत नसल्याने अस्वच्छता आणखी वाढली असून, गोदावरीच्या पाण्यामध्ये पुन्हा निर्माल्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या अस्वच्छतेने नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. याचा पर्यटकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळे याची प्रशासनाने दखल घेणे गरजेचे झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका कार्यालयाचीच हेळसांड

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीत महापालिकेचे नाशिकरोड विभागीय कार्यालय आघाडीवर आहे. त्यात जेलरोड उपकार्यालयाचा महत्त्वाचा वाटा आहे. तरीही या उपकार्यालयाची हेळसांड सुरू आहे. बारा कर्मचारी आणि एक संगणक, जुने फर्निचर, शेड नाही, कपाट नाही अशी जेलरोड कार्यालयाची विदारक स्थिती आहे. महापालिकेने या कार्यालयाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

दुर्गा गार्डनशेजारी नाशिकरोडला महापालिकेचे विभागीय कार्यालय, तर जेलरोड येथे उपकार्यालय आहे. महसूल वसुलीत शहरातील सहा विभागांत नाशिकरोड दुसऱ्या स्थानी आहे. त्यात जेलरोडचे योगदान मोलाचे आहे. या कार्यालयाला सुविधा दिल्यास महसुलात आणखी वाढ होऊ शकते, असे नागरिकांचे मत आहे.

या आहेत समस्या

शिवाजीनगर येथे असलेले जेलरोडचे कार्यालय पूर्वीपासून समस्यांनी घेरलेले आहे. जेलरोडची लोकसंख्या वाढली आहे. या कार्यालयात तीस हजार मिळकतींची नोंद आहे. तीस हजार घरपट्टी आणि सुमारे पंधरा हजार पाणीपट्टी वसुली केली जाते. येथे १२ कर्मचारी आहेत. त्यांना तीन संगणक होते. आता कार्यालयामागे ई-सेवा केंद्र ठेकेदारी पद्धतीने सुरू करण्यात आले. त्यांना यातील दोन संगणक देण्यात आले आहेत. फक्त वसुलीचे काम मनपा कर्मचारी करतात. बिल स्वीकारणे, पावत्या देणे हे काम ई-सेवा केंद्र करते.

प्रिंटर नादुरुस्त

जेलरोड कार्यालयात जुने फर्निचर आहे. कपाटे नसल्याने महापालिकेचे दफ्तर सुरक्षित ठेवता येत नाही. काही महिन्यांपूर्वी रात्री कार्यालयातून आयपॅड चोरीस गेला होता. सध्या येथे एक संगणक आहे. त्याला रेंजअभावी नेटची समस्या होती. आता डोंगल घेतल्याने ती दूर झाली आहे. मात्र, प्रिंटर नादुरस्त असल्याने विभागीय कार्यालयाला डेटा पाठवता येत नाही. बॅटरी बॅकअपही बंद आहे.

शेड कधी होणार?

जेलरोडचे मनपा कार्यालय महापालिका गार्डनच्या एका कोपऱ्यात आहे. भरपूर जागा असतानाही महापालिका कार्यालय छोटे बांधण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी सोडाच, उभे राहण्यासाठीही जागा नाही. त्यामुळे बाहेर शेड बांधण्यात आले होते. मात्र, अतिक्रमित असल्याने महापालिकेनेच ते तीन वर्षांपूर्वी मोहिमेत पाडले. आता ऊन व पावसात नागरिकांना बाहेर उभे राहावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फॅशन म्हणून व्यायाम नको!

0
0

व्यायाम करताना तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला हवा. दुसऱ्याच्या व्यायामाशी आपल्या व्यायामाची बरोबरी न करता आपल्याला झेपेल इतकाच व्यायाम करणे गरजेचे आहे. परंतु, सध्या तसे होताना दिसत नाही. व्यायाम ही केवळ फॅशन झाली आहे. शेजारच्या माणसाने महागडी सायकल घेतली म्हणून मीदेखील सायकलिंग सुरू करतो, ओळखीची चार माणसे धावायला लागली म्हणून मीदेखील धावायला सुरुवात करतो, ही भावना समाजात जास्त रुजत चालली आहे. परिणामी अनेकांकडून आपल्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम होत असल्याने दुर्घटना घडत आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने यासंदर्भात आयोजित केलेल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये केवळ फॅशन म्हणून व्यायाम न करता, योग्य प्रशिक्षक असल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा खेळ अथवा व्यायामाचा अतिरेक करू नये, असा सूर क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

(शब्दांकन ः फणिंद्र मंडलिक, सौरभ बेंडाळे)

--

प्रशिक्षकाविना व्यायाम घातकच

कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहेच; परंतु आपली शारीरिक क्षमता ओळखणेदेखील गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीवर ऑफिस, सोसायटी, इकॉनॉमिक, मेंटल अशा अनेक क्षेत्रांचा ताण असतो. त्याचबरोबर शारीरिक ताणदेखील असतो. हा सर्व ताण विचारात घेऊन व्यायामाची आखणी करणे गरजेचे आहे. व्यायाम करताना प्रोग्रेसिव्ह व्यायाम करणे गरजेचे आहे. कोणताही व्यायाम करताना सुरुवातीला वॉर्मअप, त्यानंतर व्यायाम व त्यानंतर कूलडाउन अशा पद्धतीने केलेला व्यायाम महत्त्वाचा ठरतो. एका मॅरेथॉनमध्ये भाग घेतल्यानंतर शारीरिक कमजोरी भरून काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तो आपल्याकडे कुणी विचारात घेत नाही. आपला मित्र धावतो म्हणून आपणही धावतो, असे करून चालत नाही. व्यायाम झाल्यानंतर कुणीही पल्स रेट घेत नाही, ही बाब सगळ्यात धोकादायक आहे. व्यायाम करताना बेसिक चेकअप करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन घेण्याची पद्धतदेखील चुकीची आहे. सध्या जिममध्ये एसी लावले जातात, त्यामुळे स्वच्छ ऑक्सिजनयुक्त हवा शरीराला मिळत नाही, हेदेखील शरीरासाठी घातक आहे. त्याचप्रमाणे तुमचा आहारदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. रनिंग करून आल्यानंतर पचनाला हलक्या असलेल्या कार्बोहायड्रेडयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. एकंदरीतच प्रशिक्षकाविना व्यायाम म्हणजे जणू आत्महत्या करण्यासारखेच आहे.

-विजेंद्र सिंग, प्रशिक्षक, ‘साई’

---

फिटनेस गोल ठरविणे गरजेचे

भारतातील बहुतांश व्यक्ती वयाच्या ३५ वर्षांनंतर आपल्या प्रकृतीची काळजी घ्यायला सुरुवात करतात. तरुणपणी मजा करीत असताना शरीराची आठवण होत नाही. ३४ वर्षे तुम्हाला व्यायामाची सवय नसते आणि ३५ व्या वर्षी एकदम व्यायाम सुरू केल्यानंतर शरीराला ते झेपवत नाही. कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्याअगोदर पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा असतो. परंतु, अनेक लोक डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत आणि व्यायाम सुरू करतात. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्यायामाची गरज आहे, हे डॉक्टरच चांगल्या प्रकारे सुचवू शकतात. ज्या व्यायामाची तुमच्या शरीराला आवश्यकता आहे, अशा प्रकारचा व्यायाम केल्याने तुमचे शरीर बळकट होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर प्रशिक्षित प्रशिक्षकाला मेडिकल रिपोर्ट दाखवून व्यायामाबाबत सल्ला घेणे गरजेचे असते. तुमची फिटनेस लेव्हल पाहूनच प्रशिक्षक तुमचा व्यायाम ठरवत असतो. व्यायाम करतानादेखील तो हळूहळू वाढवला पाहिजे. वजन उचलण्याच्या शास्त्रीय पद्धती असतात, त्यानुसार व्यायाम करणे गरजेचे असते. व्यायाम करताना शेजारच्या व्यक्तीने २० किलो वजन उचलले म्हणून मीही २० किलो वजन उचणार, एखादी व्यक्ती १० किलोमीटर धावाली म्हणजे मीसुद्धा १० किलोमीटर धावलेच पाहिजे, असे म्हणून चालणार नाही. कोणत्याही प्रकारच्या व्यायामाला सुरुवात करताना प्रत्येकाने फिटनेस गोल ठरवला पाहिजे, त्याशिवाय व्यायाम करू नये.

-अनिरुद्ध अथनी, सर्टिफाइड मॅरेथॉन ट्रेनर

--

शरीराच्या संवादानुसार आखावी दिनचर्या

नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष जसपालसिंग यांच्या निधनाचा व्यायामाशी संबंध जोडणे योग्य होणार नाही. दहा हजारांतील सहा लोक हे झोपेतच अॅटॅक येऊन जातात, तर दहा हजारांतील एखादी व्यक्ती व्यायाम करताना जाते. त्यामुळे व्यायामाला दोष देणे उचित होणार नाही. अनेक लोक व्यायामाच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती घेत नाहीत. सकाळी व्यायाम करण्याच्या अगोदर सहा तास झोप होणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता त्याच वेळी तुमच्या शरीराची स्थिती तुम्हाला समजलेली असते. तुमचे शरीर तुमच्याशी संवाद साधत असते, त्या संवादाला धरूनच तुम्ही तुमची दिनचर्या आखली पाहिजे. ज्या पद्धतीने शालेय स्तरावर लहान मुलांकड़ून व्यायामाचे तास घेतले जातात, ती पद्धत अत्यंत चुकीची आहे. लहानपणापासून व्यायामाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. व्यायाम हा तुमच्यासाठी आहे, तुम्ही व्यायामासाठी नाही, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. काही लोक फक्त देखाव्यासाठी व्यायाम करतात. त्यामुळे अपघात होतात. काही लोक थोडासा व्यायाम करतात, त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. बघा आम्ही किती व्यायाम करतो, असे जगाला दाखवतात. मात्र, असे व्हायला नको. व्यायामाला सुरुवात केली म्हणजे मला काहीच होणार नाही, असा अनेकांमध्ये संभ्रम असतो, तोदेखील दूर होणे गरजेचे आहे. व्यायाम सुरू असला, तरीही डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेतली गेली पाहिजेत. व्यायामाप्रमाणेच तुमच्या डाएटवरदेखील तुमचे लक्ष असणे गरजेचे आहे. तुमच्या शरीराला आवश्यक असेल तेवढेच अन्न सेवन करणे गरजेचे आहे. सध्या मोठ्या प्रमाणात जिम ट्रेनरचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे आपल्याला प्रशिक्षण देणारी व्यक्ती प्रशिक्षित आहे की नाही, याचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे.

-महेंद्र छोरिया, सेक्रेटरी, नाशिक रनर्स

---

शारीरिक क्षमतेनुसारच करावा व्यायाम

प्रत्येक व्यक्तीने आपली शारीरिक क्षमता ओळखावी आणि त्यानुसार डॉक्टर, तसेच ट्रेनरच्या साहाय्याने व्यायाम करावा. ट्रेनरदेखील व्यायामातील बारकावे जाणणारा असायला हवा. सध्या कोणीही ट्रेनर म्हणून येतो आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणाऱ्यांना मग समस्यांना सामोरे जावे लागते. कोलेस्टेरॉल, हृदय याची योग्य सांगड व्यायाम करतेवेळी असणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीला वॉर्मअप आणि शेवटी कूलडाउन करणे अशाप्रकारे व्यायाम गरजेचे आहे. जेवढा आपला स्टॅमिना आहे तितकाच व्यायाम करायला हवा. जास्त व्यायाम केल्यास शरीरातील अंतर्गत अवयवांवरही परिणाम होतो. आपले शरीर फिट राहण्यासाठी व्यायाम हा गरजेचा आहे. व्यायामाचे दुष्परिणाम नाहीत. पण, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नकोच. सायकलिंगचे फॅड सध्या नाशिकमध्ये वाढत आहे. पण, सायकलिंगसाठीदेखील योग्य प्रशिक्षण असणे खूप महत्त्वाचे आहे. सायकल खरेदी केली आणि कित्येक किलोमीटर चालवली, तरी त्याला अर्थ राहात नाही. योग्य प्रशिक्षण आणि हेल्थ चेकअपशिवाय असे केल्यास त्याचे दुष्परिणाम जाणवतात. पण, निरोगी जीवनासाठी शारीरिक क्षमतेनुसार व्यायाम हा करायलाच हवा.

-विशाल उगले, प्रेसिडेंट, नाशिक सायकलिस्ट

--

अतिरेक टाळायलाच हवा

प्रत्येक जण स्वतःची शारीरिक क्षमता जाणून असतो. त्यामुळे आपली क्षमता जाणून घेऊनच व्यायाम पद्धती ठरवावी. सायकलिंग हा खेळ आहे, त्याच्याकडे खेळ म्हणूनच पाहावे. सायकलिंग म्हणजे फॅशन नाही, तर त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते. त्यासाठी सायकलिंग आणि रनिंग हे आपल्याला जितके शक्य आहे किंबहुना जितके झेपणार आहे तितकेच करायला हवे. आजकाल समोरचा करतो तसे करून आपण खूप ग्रेट आहोत असे दाखवायचा प्रयत्न केला जातो. ही भावना खूप गैर आहे. व्यायाम हा आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी असावा. व्यायामाने शरीर निरोगी राहते. पण, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा अतिरेक टाळायलाच हवा.

-योगेश शिंदे, नाशिक सायकलिस्ट

---

योग्य मार्गदर्शन अन् डाएट महत्त्वाचे

आपले शरीर तंदुरुस्त राखण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. मात्र, त्याचा अतिरेक करणे टाळायला हवे. सायकलिंग व मॅरेथॉन सध्या फॅशन झाली आहे. पण, केवळ फॅशन म्हणून व्यायाम करण्यापेक्षा गरज म्हणून आणि योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम होणे गरजेचे आहे. बायोकेमिस्ट्री आणि अॅनाटॉमीच्या आधारे आपले आरोग्य फिट ठेवण्यासाठी हेल्थ चेकअप करूनच व्यायामास सुरुवात करायला हवी. व्यायामासोबतच डाएट आणि डिटेक्शन महत्वाचे आहे. स्वतःची फिटनेस लेव्हल ओळखूनच व्यायाम करायला हवा. एखाद्याची बॉडी पाहून त्यासारखे बनण्याचा विचार करणे म्हणजे फिटनेसवर गदा आणणे आहे. व्यायाम हा अपेक्षित आहेच, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि डाएट फॉलो करावाच लागतो. व्यायाम हा फिट राहण्यासाठी असावा, फॅशनसाठी नव्हे. अनेकदा जिममध्ये येणारे तरुण त्यांच्या कपॅसिटीपेक्षा अधिक वजन उचलतात, हे थांबले पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे कोणालाच अपाय होत नाही. पण, त्याचा अतिरेक झाल्यास मात्र तापदायक ठरू शकते.

-नितीन शिरसाठ, जिम ट्रेनर

---

केवळ स्वतःशीच असावी स्पर्धा

आपल्याला मिळालेले आयुष्य चांगल्या रीतीने जगण्यासाठी व्यायाम गरजेचा आहे. प्रत्येकाने रोज धावणेही आवश्यक आहे. मात्र, प्रत्येकाने स्वतःची शारीरिक क्षमता ओळखूनच व्यायाम करायला हवा. व्यायाम करताना केवळ स्वतःशीच स्पर्धा असली पाहिजे. फिटनेस राखण्यासाठी अभ्यास गरजेचा आहे. शास्त्रशुद्ध अभ्यास केला, तरच त्याची चांगली फलनिष्पत्ती होऊ शकते. व्यायाम करताना श्वासोच्छवासाची गतीही महत्त्वाची असते. पण, अनेक जण चुकीच्या पद्धतीने श्वासोच्छवास करतात. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन श्वासाची गती ठरवावी व त्या पद्धतीने सराव करावा. श्वासोच्छवास व्यवस्थित झाला, तर शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होईल व होणारे अपघात टळू शकतील. मात्र, अनेक जण चुकीच्या पद्धतीने व्यायाम करताना दिसतात, ते टाळायला हवे.

-मनीष चिंधडे, मॅरेथॉन रनर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक वर्कशॉपला तरुणांची पसंती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी, याविषयी ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे शनिवारी १५ जुलै रोजी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबक रोडवरील मोहरीर यामाहा शो-रूममध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वर्कशॉप होणार आहे. हा कार्यक्रम कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे. वर्कशॉपमध्ये नोंदणी करण्यासाठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, या वर्कशॉपसाठी तरुणांनी गर्दी केली आहे. थोड्याच जागा शिल्लक असल्याने बाइकप्रेमींनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे करण्यात आले आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वांत जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. कधी गाडी स्लीप होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते. त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. हीच अडचण ओळखून ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप कल्चर क्लबच्या सदस्यांसाठी मोफत आहे, तर इतरांसाठी २०० रुपये आकारण्यात येणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

यामाहा बाइकसाठी ऑफर

तुमची यामाहा कंपनीची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लबचे सदस्य असाल, तर तुम्हाला नियमित बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीच्या पहिल्या यादीस लागला मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑनलाइन केंद्रीय प्रवेशप्रक्रियेने यंदा नाशिकचा गोंधळ नाहीसा होण्याचा दावा करणाऱ्या प्रक्रियेचाच सोमवारी फज्जा उडाला होता. सोमवारी रात्री ही यादी तब्बल चार ते पाच तास उशिराने प्रसिद्ध झाली; पण बहुतांश विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंटचे अपेक्षित एसएमएस मिळाले नाहीत.

नियोजित वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांनी सोमवारी सायंकाळी पाच वाजेपासून वेबसाइटला भेट दिली. यावर चार ते पाच तासांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पहिल्या गुणवत्ता यादीस मुहूर्त लागला. विद्यार्थ्यांनी एसएमएसची वाट बघून स्वत: लॉगइन करून बघितल्यानंतर कॉलेज अलॉटमेंटचा तपशील त्यांना पाहण्यास मिळाला. लॉगइन केल्यानंतर विद्यार्थ्याला त्याची वैयक्तिक माहिती तपशीलवार मिळत असल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉलेज कॅम्पसमध्ये कुठेही गर्दीचा बोजवारा उडाला नाही. प्रक्रियेत बहुतांश पारदर्शकता दिसत असली तरीही स्पोर्टस आणि कल्चर कोट्यातून अर्ज करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना विनाअनुदानित जागांवर का प्रवेश देण्यात येत आहे, असा सवाल उपस्थित करून पालक वर्गाने नाराजी व्यक्त केली.

शहरात यंदाही सायन्स आणि कॉमर्स या विद्याशाखांची मेरिट लिस्ट नव्वदीपारच राहिली. यानुसार आरवायके कॉलेजने मेरिटचा सायन्समधील उच्चांक गाठला. येथे खुल्या गटासाठी गुणवत्ता यादी ९४.४ टक्क्यांवर, तर बीवायके कॉलेजमध्ये कॉमर्ससाठी ही यादी खुल्या वर्गाकरिता ९०.८ टक्क्यांवर बंद झाली.

या प्रक्रियेत प्रवेशासाठी सुमारे २६ हजार अर्ज दाखल आहेत. पैकी २४ हजार ५०० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या यादीत १४ हजार ९२१ जणांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित ९ हजार विद्यार्थ्यांना येत्या तीन प्रवेशयाद्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिकेड्सची मलमपट्टी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील नवीन बस स्थानक ते दरेगाव हा सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे, बेशिस्त वाहनचालक, फेरीवाल्यांमुळे नेहमीच या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या उभी राहते. वाहतूक पोलिसांच्याकडून यावर तात्पुरता उपाय करीत दुभाजक म्हणून बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळाला आहे.

बसस्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. या परिसरात दोन शाळा आणि कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचीही संख्या अध‌िक असते. येथे अतिक्रमणही वाढले आहे. पालिकेकडून दरवर्षी हे अतिक्रमण हटवण्यात येते.दरम्यान दुभाजक नसल्याने प्रश्न जैसे थे होता. पालिकेने जरी दुभाजक टाकले नसले तरी स्थानिक वाहतूक पोलिसांनी यावर तात्पुरता उपाय शोधला आहे. या परिसरात रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावले आहेत. त्रंबकेश्वर येथून मागव‌िण्यात आलेले हे बॅरिकेड्सचा यासाठी वापर करण्यात आला आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसात हजार प्रवेश पूर्ण

0
0

अकरावीसाठीच्या पहिल्या गुणवत्ता यादीनंतरची स्थिती

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक महापालिका व देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी राबविण्यात येत असलेल्या इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेंतर्गत विविध कोट्यांतर्गत ७ हजार ५९० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून, मंगळवार (दि. ११)पासून केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश गुरुवार (दि. १३)पर्यंत पूर्ण केले जाणार आहेत. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २६ हजार १२७ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीचे सचिव तथा विभागीय सहाय्यक शिक्षण उपसंचालक दिलीप गोविंद यांनी दिली.

महापालिका व देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील ५७ ज्युनिअर कॉलेजेसमध्ये २४ हजार ६०० जागांसाठी मुंबई-पुण्याच्या धर्तीवर यंदा प्रथमच इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होत आहेत.

या प्रवेशप्रक्रियेत प्रत्यक्षात २६ हजार १२७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे प्रवेशक्षमतेपेक्षा १ हजार ५२७ अर्ज जास्त प्राप्त झाले आहेत. कोट्यातील प्रवेशांशिवाय २४ हजार ८६५ प्रवेश अर्ज उर्वरित जागांसाठी शिल्लक असून, ही संख्या एकूण उपलब्ध प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त आहे.

पसंतीक्रमानुसार १० हजार अर्ज

प्राप्त अर्जांनुसार विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार माध्यम व शाखानिहाय केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्तायादी सोमवारी जाहीर झाली असून, या यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश गुरुवारपर्यंत पूर्ण होणार आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीत दिलेल्या पसंतीक्रमानुसार ९९०० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images