Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पार्किंगच्या वादातून हाणामारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुचाकी पार्किंगच्या वादातून दोन कुटुंबामध्ये हाणामारी झाली. ही घटना मोठा मातंगवाडा भागात घडली असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित सुभाष लव्हेरा (२३ रा. मोठा मातंगवाडा भद्रकाली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. ८) दुपारी मातंगवाडा व्यायामशाळेजवळ मोपेड दुचाकी पार्क करीत असतांना जोगेंद्र डांगळे, योगेश थावरी, संगिता डांगळे आणि पूजा थावरी (सर्व रा. मातंगवाडा) आदींनी दुचाकी पार्क केल्यावरून शिवीगाळ केली. यावेळी संशयित आरोपींना रोहित समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना योगेशने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे रोहितच्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, संगिता आणि पूजा थावरी या महिला सकाळी भावाच्या पार्क केलेल्या चारचाकी वाहनात पर्स शोधत असतांना रोहितने विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी महिलेचा पती घटनास्थळी पोहचला असता संशयित आरोपी रोहितने त्यांना लाकडी दांडा व फायटरने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार भगरे करीत आहेत.

घरात घुसून महिलेचा विनयभंग

शरणपूररोड परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरात घुसून संशयित आरोपीने तिचा विनयभंग केला. पीडित महिलेने विरोध केला असता संशयिताने तिला बेदम मारहाण करून पोबारा केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू वाघमारे (रा. जुने पोलिस आयुक्तालयासमोर, शरणपूर रोड) असे संशयित आरोपीचे नाव आहे. वैराज हॉलमागे राहणारी ३० वर्षीय महिला आपल्या घरात एकटी असताना हा प्रकार घडला. महिल एकटीची असल्याची संधी साधत संशयिताने घरात प्रवेश केला. यावेळी त्याने महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केला. दरम्यान महिलेने विरोध केला असता संशयिताने तिला बेदम मारहाण करीत पोबारा केला. घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.

युवतीस बेदम मारहाण

भेटण्यास बोलावून घेत जळगाव जिल्ह्यातील युवतीला बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना सिडकोतील दत्तमंदिर परिसरात घडली. लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने पीडित युवती जखमी झाली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मेघराज धनराज मोरे (२३, रा. भोरटेक ता. भडगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तरुण आणि युवती एकमेकाच्या परिचयाचे आहे. १७ वर्षीय पीडित युवती सिडकोतील हेडगेवारनगर भागात राहते. संशयित आरोपीने युवतीला रविवारी (दि. ९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास परिसरातील दत्त मंदिराशेजारी भेटण्यासाठी बोलावले. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयिताने युवतीस शिवीगीळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवतीस बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भेटण्यास बोलावून घेत जळगाव जिल्ह्यातील युवतीला बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना सिडकोतील दत्तमंदिर परिसरात घडली.
लोखंडी रॉडने मारहाण झाल्याने पीडित युवती जखमी झाली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मेघराज धनराज मोरे (२३, रा. भोरटेक ता. भडगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तरुण आणि युवती एकमेकाच्या परिचयाचे आहे. १७ वर्षीय पीडित युवती सिडकोतील हेडगेवारनगर भागात राहते. संशयित आरोपीने युवतीला रविवारी (दि. ९) सकाळी आठ वाजेच्या सुमारास परिसरातील दत्त मंदिराशेजारी भेटण्यासाठी बोलावले. यावेळी दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. शाब्दिक चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयिताने युवतीस शिवीगीळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशासाठी स्वत:वरील विश्वास महत्त्वाचा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षांना सामोरे जातांना स्वत:वरील विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करतांना त्याचा अभ्यासक्रम तोंडपाठ हवा, असे प्रतिपादन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राम खैरनार यांनी केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात यूनिव्हर्सल फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षांना सामोरे कसे जावे याबाबत मार्गदर्शन शिबिर नुकतेच झाले. यावेळी फाउंडेशनचे संचालक प्रा. खैरनार बोलत होते. यावेळी गिरीश कराड, दीपक वडजे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा यात मुख्यत: यूपीएससी आणि एमपीएससीची तयारी कशी तयारी करावी याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धा परीक्षा कठीण वाटत असल्या तरी त्याबाबत बाऊ बाळगणे चुकीचे आहे. परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या पुस्तकांवरही पूर्ण विश्वास टाकायला हवा. संदर्भग्रंथांचा वापर केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश लवकर मिळू शकते, असेही प्रा. खैरनार यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मनामधील न्यूनगंडाची भावना, यश-अपयशाची कारणे, अभ्यासक्रम याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा देतांना विद्यार्थ्यांनी स्वत: प्रशासकासारखे वागायला हवे, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. प्रशासकीय सेवेतील प्रवेश, कामाचा ठसा कसा उमटायचा? प्रशासकाची भूमिका नेमकी काय असते? याबाबत राहुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले. दीपक वडजे यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशामध्ये गरज नव्या कृषिक्रांतीची

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष व आक्रोश आहे. देशात नव्या कृषीक्रांतीची गरज असून, त्यासाठी देशी गावरान बियाणे, सेंद्रिय खते, अल्प प्रमाणात यंत्र व मानवी पशू श्रमावर आधारित अहिंसक शेती हेच अंतिम उत्तर असल्याचे अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेतीसोबतच पशूपालन, जोडधंदे व बारा बलुतेदारांचे पुनर्जीवन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या किसान मुक्ती यात्रेनिमित्त देसरडा नाशिकला आले होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीत पोहोचल्यानंतर १८ जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकरी एकत्र आल्यानंतर नव्या कृषीक्रांतीची सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर केवळ बँकेचेच नव्हे, तर त्यांच्यावर खासगी सावकार व खते, कीटकनाशके व इतर दुकानदारांचे कर्ज असते. त्यातून त्यांची पिळवणूक होत, असेही त्यांनी सांगितले.

सरकार बदलले तरी धोरणे सारखीच!

भाजप व काँग्रेस सरकारची धोरणे सारखीच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. देशात आता कधी भाजपप्रणित तर काँग्रेस प्रणित सरकार असणार असल्याने या धोरणांत बदल होणार नाही. भांडवली शेतीपेक्षा सहकारातून शेतीचा मार्ग सर्वांसाठी उपयोगी होता पण तसे होत नाही, असेही देसरडा यांनी सांगितले.

सांगा आमचा काय दोष?

शरद शेजवळ यांनी सभास्थळी शेतकऱ्यांची विव‌िध गिते सादर केली. कवी संदीप जगताप यांच्या कवितेने एल्गार सभेला सुरुवात झाली. समृध्दी हटाव, ही समृध्दी नव्हे बरबादी, सरकारला किती शेतकऱ्यांचे बळी हवे अशा घोषणा असणाऱ्या टोप्या शेतकऱ्यांनी परिधान केल्या होत्या. देशभर प्रवास करणारी किसान यात्रा सभास्थळी पोहचली. एका हातात अस्थिकलश आणि दुसऱ्या हातात राष्ट्रध्वज घेतलेला शेतकरी सर्वांचेच लक्ष वेधत होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांनी या एल्गार सभेला उपस्थ‌िती लावली. आमच्या बापाने आत्महत्या केली आमचा काय दोष, शेतकऱ्यांनो मुलाबाळांना आमच्यासारखे उघड्यावर टाकू नका, असे संदेश मनाला चटका लावित होते.

देसरडांचे बोल..
- शेतकरी आंदोलनाला दिशा हवी.
- आंदोलनातून काहीतरी निष्पन्न होणे गरजेचे आहे.
- आंदोलनाला दिशा नसेल तर त्याची दशा होईल.
- देशाने अण्णा हजारेंचे आंदोलन बघितले. पण त्यानंतर त्याचे काय झाले?
- स्वामीनाथन आयोग लागू करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरनाम्यात घोषणा केली.
- लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातही हा आयोग लागू करण्याचे सूतोवाच केले.
- सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र देताना सरकारने मात्र उलट भूमिका घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी सरसावले पोस्टाचे कर्मचारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रोजची दहा तासांची सायकलवरची कठीण ड्युटी सांभाळून नाशिकरोड परिसरातील १८ पोस्टमन, तसेच पोस्टाचे अन्य ५२ अधिकारी, कर्मचारी स्वतःचा एक तास देत स्वच्छता पंधरवड्यात सहभागी झाले असून, श्रमदानाद्वारे ते परिसराची स्वच्छता करीत आहेत.

राज्यात १ ते १५ जुलैदरम्यान स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यात नाशिकरोडचे पोस्टमास्तर सुधाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १८ पोस्टमनसह ७० कमर्चारी एक तास लवकर येऊन परिसरात स्वच्छता करीत आहेत. त्यात ४० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महापालिकेचीही मदत त्यांना होत आहे. उपपोस्टमास्तर के. एम. सरडे, सुपरवायझर एस. जी. सामंत, एस. एस. मुळे, एस. व्ही. चव्हाण, एम. पी. आंबेकर, जे. एस. मोरे, जी. एन. कोतेकर, अरुण नाठे, एस. जी. सपकाळे, एन. एम. कदम, उज्ज्वला सुडके, ए. एस. वानखेडे, ए. टी. चव्हाण, शिवाजी शिंदे, एन. एस. शिरोळे आदी कर्मचारी, तसेच पोस्टमन पी. बी. क्षीरसागर, पी. पी. मोरे, आर. एन. परदेशी, वाजे, बी. के. शिंदे, आर. एम. चौधरी, बी. एस. घनकर, ई. डी. राऊतमाळे, वाय. डी. गांगुर्डे आदींनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे.

मनुष्यबळ अजूनही तोकडे

पोस्ट खात्यात ३० वर्षांपूर्वी जे मनुष्यबळ होते तेवढचे आताही आहे. देशभरात हेच चित्र आहे. लोकसंख्या मात्र अनेक पटींनी वाढली आहे. पूर्वी टपाल शिल्लक ठेवले जात नव्हते. अधिकारी रोज टपालाची तपासणी करायचे. आता कमी मनुष्यबळामुळे ढीग साचलेला पाहूनही जाब विचारता येत नाही. नाशिकरोडला २० पोस्टमन आहेत. त्यातील बदली व निवृत्तीमुळे आठ कमी झाले असून, १२ राहिले आहेत. सहा जण रोजंदारीवर घेण्यात आले आहेत. त्यांना दिवसाला २८९ रुपये रोज मिळतो. टपालाचे प्रमाण जास्त असल्याने हे लोक दोन-तीन दिवसही टिकत नाहीत. महत्त्वाचे टपाल शक्यतो पोस्टमनकडेच दिले जाते.


ताण सांभाळून स्वच्छता

पोस्टमनना सरासरी दररोज वीस किलो टपाल वाटपास दिले जाते. एकावेळी ते नेणे शक्य होत नाही म्हणून दोन ट्रीप कराव्या लागतात. सध्या पाक्षिके, वृत्तपत्रे, अहवाल यांची संख्या वाढली आहे. एका अंकाला साधारण २५ पैसे चार्जेस पोस्ट आकारते. एका कंपनीचा अहवाल सातशे ग्रॅमचा आहे. आनलाइन पर्चेसिंगमुळे अवजड पार्सल वाढले आहेत. वृत्तपत्रे, पाक्षिके, पुस्तके, हे सेकंड मेल, तर पत्रे, पोस्टकार्ड हे फर्स्ट क्लास मेल आहेत. फर्स्ट क्लास मेलची संख्या कमी झाली आहे. पोस्टमनना रोज दहा तास काम करावे लागते. सकाळी नऊला आल्यानंतर सायंकाळी सातला सुटका होते. मात्र, कामाच्या ताणातूनही त्यांनी स्वच्छतेसाठी वेळ दिल्याने परिसरात तो कौतुकाचा विषय ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीसाठी शिवसेनेचा जिल्हा बँकेसमोर ढोलनाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती फसवी असल्याचा आरोप करीत शिवसेनेतर्फे सोमवारी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जमुक्त शेतकऱ्यांचा तसेच कर्जमुक्तीपासून वंचित राहणारे शेतकरी यांची आकडेवारी बँकेकडे मागितली. परंतु, कार्यकारी संचालकांनी सध्या ही आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगून वेळ मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्या.सरसकट कर्जमाफीवर शिवसेना ठाम असून, या कर्जमाफीसाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. सरकारने कर्जमाफीसंदर्भात जाहीर केलेली आकडेवारी फसवी आहे. त्यामुळे शिवसेनेने सर्व जिल्हा बँकांसमोर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी ढोल वाजवून आंदोलन केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेसमोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता हे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदे, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, राजू आण्णा लवटे, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदी यावेळी सहभागी झाले होते.

जिल्हाभरात नाद!
मालेगावमध्ये शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या मार्केट यार्ड शाखेसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. येवल्यात मनमाड रोडवरील बँकेच्या मार्केट यार्ड विभागीय कार्यालयासमोर अर्धा तास जोरदार ढोल वाजवत सर्वांचेच लक्ष वेधले. कळवणमध्येही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर ढोल वाजवून सरकारचा निषेध करण्यात आला. शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपलेच दात अन् आपलेच ओठ!

जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे आणि उपाध्यक्ष सुहास कांदे हे शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे शिवसेनेला आपल्याच पक्षाची सत्ता असलेल्या बँकेसमोर आंदोलन करावे लागले. कांदे आंदोलनात सहभागी झाले असले तरी दराडेंनी मात्र आंदोलनापासून अंतर राखले. जिल्हा बँकेला आर्थिक डबघाईत जाण्यात अध्यक्ष जबाबदार असल्याचे बोलले जाते. नोकरभरती, तिजोरी व इतर सामुग्रीची खरेदी यामुळे त्यांच्यासह संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच शिवसेनेची अडचण झाली असतानाही शिवसेने वरिष्ठांचा आदेश पाळला. स्वपक्षाचे अध्यक्ष असलेल्या बँकेसमोर ढोल वाजवून शेतकऱ्यांचे कर्तव्य पार पाडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा काढून संपाची नोटीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनवाढीचा निर्णय व्हावा या व इतर मागण्यांसाठी येत्या ११ सप्टेंबर रोजी राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी संपावर जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी तीन महिन्यांपासून थकीत मानधनाची मागणी करण्यात आली. हे मानधन तीन दिवसांत देण्याचे आश्वासन बालकल्याण विभागातर्फे देण्यात आले.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेत राज्यात सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी काम करीत आहेत. राज्यात अंगणवाडी सेविकांना महिन्याला पाच हजार, मदतनिसाला २५०० रुपये मानधन दिले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी काय मानधनवाढ देता येईल, याचा विचार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रधान सचिव, महिला व बालविकास विभाग यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच संबंध‌ित विभागाचे अधिकारी व कामगार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली मानधनवाढ समिती स्थापन केली होती. सेवाज्येष्ठता व शिक्षणाधारित मानधनवाढीसंबंधी शिफारस समितीचा अहवाल शासनास सादर करण्यात आला. हा अहवाल त्वरीत मंजूर करावा या मागणीसाठी हा संप करण्यात येणार आहे. त्याची नोटीस सोमवारी हुतात्मा स्मारक ते जिल्हा परिषदेपर्यंत मोर्चा काढून त्यानंतर देण्यात आली. यावेळी केंद्राच्या ३ ते ६ वयोगटातील लाभार्थ्यांच्या आहाराच्या रकमेत वाढ करावी व एप्रिल ते जून असे सलग तीन महिन्यांचे मानधन त्वरित द्यावे अशी मागणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पा यंदा इको फ्रेंडली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील आगामी गणेशोत्सव पर्यावरणपूरक तथा इको फ्रेंडली साजरा करण्याचा निर्धार केला आहे. शहरात गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा होण्यासाठी विविध मंडळांना आवाहन करण्यात आले असून, सर्व मंडळांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले. विविध मंडळांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रत्येक विभागात पाच ते सहा अमोनियम बायोकार्बोनेटची कुंडे तयार करणार आहे. सोबतच गणेश मंडळांना लवकर परवानग्या मिळाव्यात यासाठी प्रत्येक विभागात एक खिडकी सुरू केली जाणार आहे.

महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव २०१७ पर्यावरणपूरक साजरा होण्याकामी नाशिक शहरातील गणेश मंडळे, सामाजिक संस्था, कंपनी, कॉलेजेस आदींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महापौर रंजना भानसी, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर, प्रभाग समिती सभापती डॉ. हेमलता पाटील, माधुरी बोलकर, प्रियांका माने, वैद्यकीय अधिकारी, डॉ. सुनील बुकाणे यांच्यासह मोठ्या संख्येने गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बुकाणे यांनी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत, विर्सजनप्रसंगी अमोनियम बायोकार्बोनेट पावडरचा वापर करण्याबाबत व एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्याबाबतची माहिती विशद केली. यावेळी अनेक मंडळांकडूनही महापालिकेला सूचना करण्यात आल्या. त्यात गणेश मंडळ परवानगीबाबत एक खिडकी विभाग सुरू करून प्रत्येक मंडळालाना दोन डस्ट बीन पुरविणे व कृत्रिम तलाव तयार करणे याबाबत सूचना करण्यात आल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकामी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन विविध मंडळांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले.

--

महापालिकेच्या प्रमुख सूचना

-शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा करावा वापर.

-ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी वापरावीत पारंपरिक वाद्ये.

-डेकोरेशन साहित्य असावे पर्यावरणपूरक.

-जास्त मंडळांनी मिळून एक गणपती करावा स्थापन.

-मंडळांनी टाळावा प्लास्टिकचा वापर.

-मूर्ती व निर्माल्य करावे दान.

-मंडळाचा परिसर ठेवावा स्वच्छ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रॉ पद्धतीने प्रवेशास पालकांचा विरोध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित निवासी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिलीतील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या आदिवासी विभागाने सोमवारी अचानक ड्रॉ पद्धतीने प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पालकांनी निवडीवर बहिष्कार घालत प्रचंड गोंधळ घातला. आदिवासी आयुक्तांना जाब विचारण्यासाठी पालकांनी थेट आदिवासी आयुक्तालयातच ठिय्या आंदोलन करीत सर्वांना प्रवेश देण्याची मागणी केली. प्रशासनाने यासंदर्भात विचार करू, असे आश्वासन देत वेळ मारून नेली.

आदिवासी विभागाच्या निवासी इंग्रजी शाळांमध्ये पहिलीसाठी प्रवेश देण्यासाठी आदिवासी विभागाने अर्ज मागवले होते. या प्रवेशासाठी जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर, पेठ, हरसूल, दिंडोरी, नाशिक आणि इगतपुरी तालुक्‍यातील अर्ज केलेल्या सर्व पालकांना पेठ रोडवरील शासकीय आदिवासी वसतिगृहाच्या परिसरातील शाळेत प्रवेशासाठी बोलविण्यात आले होते. मात्र, जागा दोनशे आणि अर्ज पाचशे आल्याने विभागाने ऐनवेळी पालकांची ‘ड्रॉ’ पद्धतीने निवड केली जाणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे संतप्त पालकांनी निवडीवर बहिष्कार घालत गोंधळ घातला. सर्वांना प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र, प्रकल्प अधिकारी ड्रॉ पद्धतीने प्रवेश देण्यावर ठाम असल्याने पालक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. प्रकल्प अधिकारी अनिल एडके यांनी थेट पोलिस कारवाईची मागणी केल्याने संतप्त पालकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना न जुमानता आदिवासी आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आदिवासी आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. त्यामुळे आयुक्तालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पालक सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर ठाम असून प्रशासनाने विचार कऱण्याचे आश्वासन दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावी प्रवेशाचा कट ऑफ अधांतरीच!

$
0
0

. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशाबाबत दरवर्षी उडणारा गोंधळ मिटविण्यासाठी यंदापासून नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेली ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तांत्रिक अडसरामुळे चांगलीच गोंधळात सापडली. रात्री उशिरापर्यंत ही यादी जाहीर करण्यात शिक्षण विभाग सपशेल अपयशी ठरला.

सोमवारी सायंकाळी पाच वाजता अकरावी प्रवेशासाठी नाशिक हद्दीतील कॉलेजांची पहिली मेरिट लिस्ट जाहीर होणार होती. मात्र, अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटकडे डोळे लावून बसलेल्या नाशिककरांची निराशा झाली. रात्री उशिरापर्यंत ही यादी प्रसिध्दच न झाल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली. अकरावी प्रवेश प्रक्रिया आता मध्यावर आली आहे. यापूर्वीच्या टप्प्यांमध्ये इन हाऊस कोट्यातील प्रवेशाच्या मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आल्या होत्या.

नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारी सायंकाळी पाच वाजता अकरावी प्रवेशाची मेरीट लिस्ट जाहीर होणे अपेक्षित होते. यानुसार विद्यार्थ्यांनी पाच वाजेपासून nashik.11thadmission.net या वेबसाईटवर सातत्याने लॉग इन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या पदरी रात्री नऊ वाजेपर्यंत निराशाच पडली. याबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे ‘मटा’ने विचारणा केली असता तांत्रिक अडसरांमुळे यादी अपलोड झालेली नसून, रात्री ९ वाजेनंतर यादी प्रसिध्द होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली.

एसएमएसव्दारे मा‌हिती

यादी प्रसिध्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर मेरिट लिस्टचा आवश्यक तो तपशील पाठविण्यात येणार असून, कॉलेजेसमध्ये नोटीस बोर्डवर यादी प्रसिध्द होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगाव सिव्हिलचे ‘ऑपरेशन’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविध पुरविल्या जात नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. रुग्णालय प्रशासनाने याबाबत वेळीच उपाययोजना कराव्यात अन्यथा सामान्य जनतेचा उद्रेकाला येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागेल अशा शब्दात ग्रामविकास राज्य मंत्री दादा भुसे यांनी येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना खडेबोल सुनावले.

रुग्णकल्याण समिती अंतर्गत नियामक समिती व कार्यकारी समितीची बैठक भुसे यांच्या उपस्थितीत सामान्य रुग्णालयात पार पडली. त्यावेळी रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा समाचार घेत भुसे यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रांताधिकारी अजय मोरे, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे, पोलिस उपधीक्षक गजानन राजमाने उपस्थित होते.

बैठकीस भुसे यांनी अनेकांना सुनावले. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे दोन महिलांना आपले प्राण गावामावे लागले आहेत. त्यामुळे नियुक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रुग्णसेवा प्रामाणिकपणे करावी, अशा सूचना केल्या. रुग्णालयात ३०० मंजूर पदांपैकी केवळ १५६ पदे भरली असून, तब्बल १४४ पदे आजही रिक्त आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी त्वरित पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना तात्पुरत्या स्वरूपात बोलावून घ्यावे, असे डॉक्टर न आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातत्त्व विभाग होणार समाजाभिमुख

$
0
0

राज्य पुरातत्त्व विभागाला आतापर्यंत पुरातत्त्व शाखेतील संचालक न मिळाल्याने पुरातत्त्व विभागाची अवस्था बिकट झाली होती. पुरातत्त्व विभाग सक्षम व समाजाभिमुख झाला तरच अधिकाधिक वारसास्थळांना पुनरुज्जीवन व गावागावात संवर्धनाबाबत जनजागृती करता येईल, असा विश्वास राज्य पुरातत्त्व विभागाचे नवनिर्वाचित संचालक तेजस गर्गे यांनी ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

- पुरातत्त्व विभागाची नेमकी भूमिका काय?

-राज्य पुरातत्‍व विभागाचे प्रमुख कार्य म्हणजे पुरातत्‍वीय स्‍थळांचे आणि अवशेषांचे संवर्धन करणे हे आहे. मात्र अनेकदा हा विभाग अनेक बाबतीत दुर्लक्षित राहिला. या विभागाला आपल्या क्षमतेने काम करता आले नाही. अपुरे कर्मचारीबळ, अपुरा निधी तसेच या विभागाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक नसल्याने एकीकडे अपेक्षांचे ओझे तर दुसरीकडे समस्यांचा डोंगर अशी विभागाची अवस्था आतापर्यंत झालेली दिसते. सध्या विभागाकडे राज्यातील ४०० वारसास्थळे आहेत. यातील १०२ वारसास्थळेच संरक्षित आहेत. इतर २९८ वारसास्थळांच्या फायनल नोटिफिकेशन्सच आतापर्यंत काढलेल्या नाहीत. त्या तातडीने काढून २९८ वारसास्थळे संरक्षित करण्याच्यादृष्टीने वेग दिला जाणार आहे.

-निधीबाबत हा विभाग दुर्लक्षित का?

-पुरातत्त्व विभाग अडथळ्यांची शर्यत पार करीत आपले काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. विभागाला सरकारकडून निधीचे पाठबळ मिळाले तर विभागाकडून अपेक्षित काम वेगाने होऊ शकेल. सध्या विभागाला वर्षाला फक्त २५ कोटींचा निधी मिळतो. ४०० वारसास्थळांसाठी हा निधी अपुरा आहे. त्यामुळे निधी विभागला जातो अन् विभागाकडून सुरू असलेले प्रयत्न पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे दिसते. अधिकाधिक निधी मिळावा व वारसास्थळांबाबत समाजात जनजागृती करून त्यांचा वारसास्थळांच्या संवर्धनात हातभार कसा लागेल यावर उपाययोजना व नियोजन सुरू आहे. लवकरच यावर ठोस निर्णय घेऊन अंमलबजावणी होताना दिसेल.

-अनेक वारसास्थळांची कामे अर्धवट का?

-निधीची कमतरता व कर्मचारी पुरेशे नसणे यामुळे अनेक वारसास्थळांची कामे अर्धवट असल्याचे बोलले जाते. मात्र, एखाद्या वारसास्थळाच्या संवर्धनाचे काम सुरू झाल्यावर ते अनेक वर्षे सुरू असते. त्यात निधी विखुरला जात असल्याने निधी मिळेल त्याप्रमाणे काम केले जाते. ४०० वारसास्थळांबरोबर राज्य पुरातत्त्व विभागाने पहिल्या टप्प्यात १४ किल्ले घेतले. आता किल्ल्यांची संख्या ४० झाली आहे. त्यामुळे आता याच वारशांवर लक्ष केंद्रित करून काही वर्षात येथील काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. राजगडावर लक्ष केंद्रीत करण्यासाठीही प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याला निधीचे बळ मिळाले तर यावरही लवकरच ठोस काम होताना दिसेल. वस्तूसंग्रहालये व वारसास्थळांचा नियमित मेंटनन्‍स कायम होत रहावा, याबाबतही चर्चा व नियोजन सुरू आहे. यासाठी पाच कोटींच्या निधीची गरज आहे. तसेच इतर सर्व विभागांशी समन्वय कसा वाढेल, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. इतर विभागांनीही वारसास्थळांवर काम करताना पुरातत्त्व विभागाला घेऊनही काम हाती घ्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

-सर्वच वारसास्थळांना आधार मिळेल का?

-हा गंभीर प्रश्न आहे. पण सध्या पुरातत्त्व विभागाला सक्षम करणे, येथे काम करणाऱ्यांना उमेद देऊन त्यांच्याकडून हा प्रश्न कसा सोडवायचा यावर भर दिला जात आहे. सध्या हातात असलेली वारसास्थळांचे संवर्धन करून त्यांच्या नियमित मेंटनन्‍ससाठी व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. मात्र, असे करताना इतरही अनेक वारसास्थळे गावोगावात पहायला मिळतात. यांनाही पुरातत्त्व विभागाच्या कक्षेत आणण्यासाठी पुरातत्त्व विभागाने समाजभिमुख होण्यासाठी काही ठोस उपाययोजन करण्याचे ठरविले आहे. याबाबतही वरिष्ठांची चर्चा सुरू आहे. महापालिकेंतर्गत हेरिटेज कमिटी जसे शहरातील वारसास्थळांना हेरिटेजचा दर्जा देऊन त्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेते तसेच ग्रामपंचायत पातळीवरही हेरिटेज कमिटीच्या माध्यमातून वारसास्थळे संरक्षित करता येतील का, यावर विचार सुरू आहे. तसेच झाल्यास विभागाच्या अडचणींचा अडथळा वारसास्थळांना सोसावा लागणार नाही आणि ही वारसास्थळे संरक्षितही करता येतील.

-पुरातत्त्व विभाग कधीपासून कार्यरत दिसेल?

-अशी अपेक्षा लगेच करणे बरोबर नाही. मात्र, पुरातत्त्व विभागाने त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. राज्यातील वारसास्थळांचा डेटा, संग्रहालयांचा डेटा संकल‌ित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. संचालनालयाची वेगळी वेबसाइट नाही. तिचे काम लवकरच सुरू होईल. तसेच ई-गर्व्हनन्सच्या दिशेने वाटचाल सुरू करायची आहे. पुरातत्त्व विभाग राज्याच्या विकासासाठी किती महत्त्वाचे आहे हे दाखवून देण्याचे काम सर्वात आधी हाती घेतले असून, झाले तर निधी विभागासाठी आणता येईल. विभाग अनेकदा समाजापासून लांब असलेला दिसतो. विभाग नेमक काय करतो याचा वृत्तांत दरवर्षी नागरिकांच्या हाती जावा यासाठी ‘पुरावृत्त’ हा वार्षिक अंक प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. हे पुढील वर्षांपासून सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यातून विभागाचे काम दाखविणे शक्य होईल.

-राज्य पुरातत्त्वचा वेगळा ठसा कसा उमटेल?

-खरे तर हाती असलेले वारसास्थळांची कामे पूर्ण करून नवीन वारसास्थळांच्या दिशेने विभागाने काम सुरू करणे हाच विभागाच्या कामाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मात्र याचबरोबर पुरातत्त्व विभागाने उत्खननाच्या माध्यमातून इतिहासाच्या खोलीत जाणे अपेक्षित आहे. यासाठी वेगळ काही करण्याचा विचारही आहे. विदर्भात नगरधनच्या उत्खननाचा रिपोर्ट प्रसिद्ध करणार आहोत. औरंगाबादमधील शिवडा नदीकाठी चालुक्य साईट सापडल्याने दोन हजार वर्षांपूर्वी या परिसरात एक संस्कृती होती हे निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील पाटण येथे प्रागैतिहासिक साईट समोर आली आहे. यासाठी उत्खनन करण्याचे नियोजन असून, पुरातत्त्व शाखेशी संबंधित विद्यापीठांना यात सहभागी करून घेतले जाणार आहे. याचा फायदा या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. हा अनुभव राज्य पुरातत्त्व विभागासाठी वेगळेपण ठरेल.

(शब्दांकन : रमेश पडवळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फेरफार’ला मंजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेची विशेष अंदाजपत्रकीय महासभा सोमवारी महापालिका सभागृहात पार पडली. अवघ्या अर्धा तासात कुठल्याही चर्चेविना महासभेत सन २०१७-१८च्या ३७८.९९ कोटीच्या अंदाजपत्रकात महापौरांना अंदाजपत्रकातील वाढ व घट करण्याचे अधिकार देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सदस्यांचीदेखील विशेष महासभेत निवड करण्यात आली.

महापौर रशीद शेख, उपमहापौर सखाराम घोडके, आयुक्त संगीता धायगुडे, नगरसचिव राजेश धसे यांच्या उपस्थ‌ितीत ही अंदाजपत्रकीय महासभा पार पडली. महापालिकेचे सन २०१७-१८ वर्षासाठीची अंदाजपत्रकी महासभा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे आचारसंहिता लागल्याने लांबले होते. दरम्यान मागील स्थायी समितीने अंदाजपत्रकीय बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. सोमवारी हे ३७८.९९ कोटीचे अंदाजपत्रक नवनिर्वाचित महासभेपुढे ठेवण्यात आले. प्रारंभी उपायुक्त (कर) कमरुद्दीन शेख यांनी याबाबत सभागृहापुढे निवेदन केले. तसेच उपमहापौर सखाराम घोडके यांनी पालिकेचे निव्वळ महसुली उत्पन्न किती व शासनानाची विविध योजनांची अनुदाने किती याबाबत विचारणा केली. यावर शेख यांनी पालिकेचे निव्वळ महसुली उत्पन्न १६४.६६ कोटी इतके असल्याचे सांगितले. तसेच एप्रिल महिन्यापासून वर्क ऑर्डर निघालेल्या कामांबाबत गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान काँग्रेस नगरसेवक अस्लम असारी यांनी चर्चेदरम्यान अंदाजपत्रकात वाढ किंवा घट करण्याचे अधिकार महापौरांना देण्यात यावे, अशी सूचना मांडली. त्याला शेख युनुस इसा यांनी अनुमोदन दिले. सभागृहात हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.

हरकतींवर चर्चा नाहीच

सभा संपल्याचे सांगताच महागठबंधन आघाडीचे घटनेते बुलंद एकबाल यांनी हरकतीचे मुद्दे उपस्थित केले. मात्र महापौर रशीद शेख यांनी लगेचच राष्ट्रगीताची घोषणा केल्याने अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.

स्थायी सदस्यांची निवड

सोमवारी अंदाजपत्रकीय महासभेच्या आधी स्थायी व महिला बालकल्याण समिती सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष महासभा बोलावण्यात आली होती. यावेळी सभागृहातील पक्षाच्या गटनेत्यांनी आपल्या संख्याबळानुसार आपापल्या सदस्यांची नावे बंद पाकिटात महापौरांकडे दिली. १६ सदस्यीय स्थायी समितीत काँग्रेस व महागंठबंधन यांना समसमान ५ सदस्य तर सेना ३, भाजप २ व एमआयएमच्या एका सदस्याची निवड करण्यात आली आहे .तसेच महिला बालकल्याण समितीच्या ९ सदस्यांत काँग्रेस व महागठबंधन आघाडीला समसमान ३, सेना, भाजप, एमआयएमला अनुक्रमे एक सदस्यपद मिळाले आहे.

स्थायी समिती सदस्य

काँग्रेस
सलीम अनवर
फारुख खान फैजुल्ला खान
मंगलाबाई धर्मा भामरे
हमीदा बी साहेबा अली
कमरुंनिसा मोह. रिजवान

भाजप
काळे संजय रमण
शेलार सुवर्णा राजेंद्र

महा गठबंधन आघाडी
अन्सारी मन्सूर अह. शब्बीर अहमद
अन्सारी असफा मोह. राशीद
अन्सारी तन्वीर मोह. झुल्फेकार
नाबी अहमद अहमदुल्ला
शाने ए हिंद निहाल अहमद

शिवसेना
राजाराम बाबुराव जाधव
पुष्पा राजेश गंगावणे
प्रतिभा सचिव पवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या मूर्तींना लागली भक्तांची ओढ!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ‌शहरात विविध ठिकाणी बाप्पा आकार घेऊ लागले असून, रंगकामास सुरुवात होत आहे.

नाशिकमधील गणेशमूर्ती परराज्यासह सातासमुद्रापार पोहोचल्या आहेत. मूर्ती तयार करण्यातील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती यामुळे नाशिकचे नाव या क्षेत्रात मोठे होताना दिसत आहे. यामागे कारखानदार, कलाकार, कारागिरांचे अविरत कष्ट, त्यांची चिकाटी, प्रामाणिकपणा, नवे देण्याचा प्रयत्न, कुशलता या साऱ्या बाबी कारणीभूत आहेत.

गणेशाच्या आगमनाची तयारी मोठ्या कारखान्यांमध्ये वर्षभर सुरूच असते. शाडूच्या मूर्तीसाठी पेण प्रसिद्ध असले तरी नाशिकलाही या मूर्ती आता तयार होऊ लागल्या आहेत. आकर्षक गणेशमूर्ती तयार करणे आणि त्या रंगविणे यात नाशिकचे कलाकार अव्वल ठरत आहेत. मूर्ती साच्यातून काढणे, घासणे, आकर्षक रंगसंगतीत ती रंगविणे, प्लास्टिकच्या वेष्टनात गुंडाळून खोक्यात गवत भरून मूर्तीचे पॅकिंग करणे अशी कामे रात्रंदिवस सुरू असतात. हजारो हात या कामात राबत असतात. ऑक्टोबर महिन्यापासूनच गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू होते. सध्या शाडू मातीच्या मूर्तींना अधिक मागणी असल्याने नाशिकच्या कलाकारांनी या मूर्ती बनविण्यावर भर दिला आहे.

२५ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होत असून त्यासाठी मूर्तीकार सज्ज झाले आहेत. मोठ्या मूर्तीवर बारीक काम करण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेर मूर्ती तयार होऊन बुकिंग सुरू होईल.

मूर्ती बनविणे, फिनिशिंग व रंगकाम अशा तिन्ही आघाड्यांवर काम सुरू आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मूर्ती विकण्यासाठी तयार होतील. जानेवारीपासूनच बुकिंग सुरू होते.
-मयूर मोरे, मूर्तीकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौभाग्यनगर उद्यान येणार पूर्वपदावर...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सौभाग्यनगरमधील नाना-नानी पार्कमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्याच्या उद्देशाने येथे त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन महापालिकेचे अधिकारी व नगरसेवकांनी सोमवारी (दि. १०) नागरिकांना दिले. येथे साचलेल्या पाण्याबाबत ‘उद्यानाचे झाले तळे’ या शीर्षकाखाली सोमवारी ‘मटा’मध्ये चित्रवृत्त प्रसिद्ध होताच त्याची तातडीने दखल घेत नगरसेवक केशव पोरजे यांच्यासह महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांनी या पार्कमधील स्थितीची पाहणी करून वरील आश्वासन दिले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

लामरोडमधील शांतताप्रिय परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौभाग्यनगर भागातील एकमेव नाना-नानी पार्कमध्ये बालगोपाळांसह ज्येष्ठ नागरिकांचा सतत राबता असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाचे पाणी उद्यानातील खेळण्यांच्या खाली साचून तळे निर्माण झाले आहे. याशिवाय गाजरगवतही फोफावले आहे. उद्यानाच्या जॉगिंग ट्रॅकशिवाय सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्याने बालगोपाळांचा हिरमोड होत होता. अशा परिस्थितीमुळे कोणीही नागरिक या उद्यानात फिरकेनासे झाल्याची समस्या ‘मटा’ने मांडली होती. त्यानंतर तत्काळ नगरसेवक केशव पोरजे, उद्यान निरीक्षक बी. डी. कटारे, शाखा अभियंता एजाज शेख, लिपिक विजय गायकवाड, हेडमाळी रमेश गिरी आदींनी येथे पाहणी करीत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन स्थानिक नागरिकांना दिले.

यावेळी अभिजित मोरे, नीलेश कर्डिले, संतोष पवार, दत्ता सोनवणे, दिनकर हगवणे, बाळासाहेब देशमुख, पुष्पा शेटे, रजनी धायकर, कविता कोडवानी आदींसह स्थानिक नागरिकांनी यावेळी उद्यानाबाबतच्या समस्या मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​ रस्त्याचा खर्च पाण्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था होणे ही बाब मोठ्या प्रमाणावर घडताना दिसते. त्यास नैसर्गिकएेवजी मानवनिर्मित घटकच प्रामुख्याने कारणीभूत ठरताना दिसतात. पळसे ते नानेगावदरम्यानच्या रस्त्याबाबतही अशीच स्थिती असून, सुमारे १ कोटी ८६ लाख रुपये खर्चाच्या या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत सोडून ठेकेदार गायब झाल्याने मोठा खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी साचत असल्याने नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

सुमारे १८ हजार लोकसंख्या असलेल्या पळसे गावातून नानेगावकडे जाण्यासाठी असलेल्या सुमारे ७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी देवळालीचे आमदार योगेश घोलप यांच्या निधीमधून सुमारे १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या रस्त्याचे पाच किलोमीटरपर्यंतचे कामदेखील झालेले आहे. मात्र, संबंधित ठेकेदार ज्ञानेश्वर महाजन याने उर्वरित दोन किलोमीटरचा रस्ता डांबरीकरण न करता सोडून दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय बनविलेला नवीन रस्तादेखील पावसाने महिनाभरात उखडून गेला आहे. जागोजागी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविताना वाहनधारक आदळत आहेत.

गेल्या चार महिन्यांपासून अर्धवट स्थितीत असलेल्या या रस्त्याची आता पावसाळ्यात आणखी दुरवस्था झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. याबाबत छत्रपती युवासेनेने रस्त्यावर उतरत निषेध नोंदविला असून, या अर्धवट स्थितीतील रस्त्याला स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याचा असल्याचा आरोप केला आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन येणार आहे.

अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेकेदार व या रस्त्याला जबाबदार असणाऱ्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी, तसेच संबंधित ठेकेदाराचे बिल अदा न करण्याचे साकडे पंचक्रोशीतील नागरिक व छत्रपती युवासेनेतर्फे घालण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

पळसे ते नानेगाव रस्ता ग्रामीण भागातील ३० गावांना जोडणारा असून, याच रस्त्यावर नाशिक कारखानादेखील आहे. त्यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे असताना संबंधित ठेकेदार अर्धवट स्थितीत काम ठेवून गायब झाला आहे.

-विलास गायधनी, तालुकाध्यक्ष, छत्रपती युवासेना

--

या रस्त्याचा वापर सर्वच स्तरांतील नागरिक करीत असून, आमच्यासारख्या दिव्यांग नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ये-जा करणे कठीण झाले आहे. संबंधित ठेकेदाराला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा गुन्हा दाखल करावा.

-बाळू गायधनी, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नूतन विद्यालयाचे विभाजन कधी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर तालुक्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेचे नूतन त्र्यंबक विद्यालय हे एकमेव केंद्र असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्राचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात नूतन त्र्यंबक ज्युनिअर कॉलेज, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय ञ्यंबकेश्वर, ब्रम्हाव्हॅली पब्लिक स्कूल अंजनेरी, कर्मवीर भाऊसाहेब हिरे महाविद्यालय हरसूल, कला विज्ञान महाविद्यालय हरसूल, शासकिय आश्रमशाळा बोरीपाडा, गजानन महाराज उच्च माध्यमिक विद्यालय आव्हाटे, गाडगे महाराज माध्य व उच्च माध्य., आश्रमशाळा मुलवड, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रमशाळा खरशेत, आर्किड इंटरनॅशनल स्कूल अशी दहा कनिष्ठ महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयांमध्ये दीड हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी फेब्रुवारी ते मार्च २०१७ दरम्यान झालेल्या बारावीच्या परीक्षेस बसले होते. यावर्षी पटसंख्येत झालेल्या वाढीनुसार ही विद्यार्थी संख्या १ हजार ८०० च्या दरम्यान असेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

त्र्यंबकेश्वर येथील नूतन त्र्यंबक विद्यालय हे बारावीसाठी केंद्र क्रमांक ०११६ हे केंद्र मार्च १९९७ पासून देण्यात आला आहे. या विस वर्षांत कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या आणि पर्यायाने विद्यार्थ्यांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर पंपिंगची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावर कुणीही बिनदिक्कतपणे फिरताना आढळत असून, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर पंपिंग स्टेशनवरदेखील ‘आओ, जाओ घर तुम्हारा’ अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने गंगापूर पंपिंग स्टेशनवर फेरफटका मारला असता तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. त्यातच गंगापूर पंपिंग स्टेशनच्या जबाबदार अधिकाऱ्यांनीदेखील येथे सुरक्षारक्षकच दिले गेले नसल्याचे ‘मटा’ला सांगितले. त्यामुळे या पंपिंग स्टेशनची सुरक्षा रामभरोसे असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. भविष्यात एकाद्या माथेफिरूने येथे काही घातपाताचा प्रयत्न केल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे महापालिकेने येथे तत्काळ सुरक्षारक्षक नेमावेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

अतिमहत्त्वाचे ठिकाण असलेल्या गंगापूर पंपिंग स्टेशनला सुरक्षारक्षकच नसल्याचे समोर आल्याने याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांना विचारले असता, सुरक्षारक्षकच दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, पंपिंग स्टेशनवर नेमणूक असलेले अधिकारी व कर्मचारी रविवारी कुठे गायब झाले होते, असाही सवाल उपस्थित होतो. केवळ एकच हजर असलेला कर्मचारीदेखील गाढ झोपल्याचे आढळून आले.

--


‘एमआयडीसी’साठी सुरक्षारक्षक!

गेल्या काही वर्षांपासून गंगापूर धरणाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. गंगापूर धरणासह बॅक वॉटरलादेखील अनेकांचा मुक्तसंचार दिसून येतो. त्यातच हौशी पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरत असल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, गंगापूर धरणातून महापालिका व एमआयडीसीला लागणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी दोन स्वतंत्र पंपिंग स्टेशन्स आहेत. एमआयडीसीच्या पंपिंग स्टेशनवर सुरक्षारक्षकांसह मुख्य प्रवेशद्वार कुलूप लावून ठेवण्यात येते. परंतु, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर पंपिंग स्टेशनवर मात्र रविवारी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी स्थिती पाहायला मिळाली.

--

गंगापूर धरण परिसरात जाण्यासाठी जलसिंचन विभागाची परवानगी घ्यावी लागते. परंतु, कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता पर्यटक बिनदिक्कतपणे धरण परिसरात जातात. पंपिंग स्टेशन सुरक्षारक्षकांविनाच असल्याची स्थिती आहे. येथे तत्काळ सुरक्षारक्षक नेमावेत.

-ज्ञानेश्वर गांगुर्डे, पर्यटक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंब नियोजनात अद्यापही पुरुष मागेच!

$
0
0

उत्तर महाराष्ट्रात केवळ ३० टक्केच पुरुषांनी केली शस्त्रक्रिया

नाशिक : कुटुंब नियोजन करणे ही दोघांची सारखीच जबाबदारी असताना प्रत्यक्षात पुरुषांकडून शस्त्रक्रिया करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. उत्तर महाराष्ट्रात केवळ ३०.८६ टक्केच पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. त्यातही नंदुरबारसारखा आदिवासी जिल्हा आघाडीवर असून, येथे ११९ टक्के पुरुषांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत. पुढारलेल्या नगर जिल्ह्यात मात्र, पुरुषांचे प्रमाण नगण्य असल्याचेही पुढे आले आहे.

कुटुंब नियोजनाची शस्त्र‌क्रिया करायची झाल्यास पुरुषांवरची शस्त्रक्रिया कमी वेळेची व कमी जोखमीचे असते. परंतु, आजही नसबंदीबाबत पुरुषांची मानसिकता तयार झालेली नाही. लोकसंख्येचा दर जास्त वाढत होता, त्यावेळी महिलांनीच कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्यावी या आशयाची जाहिरात केली जात असे. मात्र पुरुषांनी कुटुंब नियोजन करून घ्यावे याची वाच्यता फारशी झाली नाही. कुटुंब नियोजनाची साधने पूर्वी प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे पुरुषांची शस्त्रक्रिया करताना अनेकदा इनफेक्शनमुळे मृत्यू देखील झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. म्हणून घरचा धनी वाचला पाहिजे या विचारातून महिला देखील पुरुषांच्या कुटुंब नियोजनाला विरोध करीत असायच्या.

काँग्रेस सरकारच्या काळात या चळवळीने मोठ्या प्रमाणात जोर धरला होता. आरोग्य केंद्रांना टार्गेट दिल्यामुळे अनेकांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करून घ्याव्या लागल्या. त्यानंतर काही वर्षांनी यात आमूलाग्र बदल झाले. शस्त्रक्रियेत सुलभता आली. परंतु, पुरुष मंडळी या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाहीत.

नगर पिछाडीवर

सहकार क्षेत्रात आघाडरीवर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत सर्वात कमी पुरुषांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. २०१६ मध्ये ९९८ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी केवळ ६४ शस्त्रक्रिया पार पडल्या. २०१७ मध्ये २२१० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५६ शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. यामुळे येेेथे जनजागृती करण्याची गरज आहे.

नंदुरबार आघाडीवर

पुरुषांच्या कुटुंब नियोजनाची सर्वात चांगली कामगिरी नंदुरबार जिल्ह्यात झाली. २०१६ मध्ये ३३७ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. यापैकी १०५१ शस्त्रक्रिया पार पडल्या. २०१७ मध्ये ९३० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी १११५ शस्त्रक्रिया पार पडल्या. मागील वर्षी एकूण उद्दिष्टांपैकी ३११.८७ टक्के शस्त्रक्रिया झाल्या, तर २०१७ मध्ये ११९.८९ टक्के शस्त्रक्रिया झाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाइक वर्कशॉपला भरघोस प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात बाइकची काळजी कशी घ्यावी, याविषयी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे शनिवारी १५ जुलै रोजी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकरोडवरील मोहरीर यामाहा शोरूममध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वर्कशॉप होणार आहे. हा कार्यक्रम कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे. वर्कशॉपमध्ये नोंदणी करण्यासाठी वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. थोड्याच जागा शिल्लक असल्याने जास्तीत जास्त बाइकप्रेमींनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र टाइम्सतर्फे करण्यात आले आहे.

पावसाळा आला की तरुणांना सर्वात जास्त चिंता सतावते ती आपल्या बाइकची. कधी गाडी स्लिप होते तर कधी इंजिनमध्ये पाणी जाते, त्यामुळे गाडी बंद पडते. अशी एक ना अनेक कारणे गाडी बंद पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप कल्चर क्लब सदस्यांसाठी मोफत आहे तर इतरांसाठी दोनशे रुपये आकारण्यात येणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करणे सक्तीचे आहे. रजिस्ट्रेशनसाठी ७०४०७६२२५४, ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

यामाहा बाइकसाठी ऑफर

तुमची जर यामाहा कंपनीची बाइक असेल आणि तुम्ही कल्चर क्लब सदस्य असाल, तर तुम्हाला नियमित बाइक सर्व्हिसिंगवर २० टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. ही सूट ३० जुलैपर्यंत राहील. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images