Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘ते’ महा ई सेवा केंद्र लवकरच करणार रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वारंवार हेलपाटे मारूनही सेतू कार्यालयांमधून दाखले मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून बनावट दाखले वितरीत करण्याचे प्रकार सर्रास सुरूच आहेत. पंचवटीत पुन्हा एकदा असा प्रकार उघडकीस आला असून, जिल्हा प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. हे केंद्र रद्द करणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी दिली.

पंचवटीत तीन महिन्यांपूर्वी महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेला बनावट दाखले वितरणाचा उद्योग उघडकीस आला होता. पंचवटीतील गोदावरी चेंबर या इमारतीमधील अग्रवाल असोसिएट्सच्या कार्यालयात बनावट रेशन कार्ड तसेच, बोगस दाखले बनवून दिले जात असल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती. जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विविध शाळांचे दाखले तसेच अधिकाऱ्यांच्या पदांचे शिक्के करणारे रॅकेट शहरात कार्यरत असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले. या केंद्रचालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविला होता. हा प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा पंचवटी परिसरात महा ई सेवा केंद्रातून वय, जात, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसह रेशनकार्ड बनावट दिले जात असल्याच्या तक्रारी सेतू केंद्रचालकास प्राप्त झाल्या. जिल्हा समन्वयक भोसले व महसूलच्या अधिकाऱ्यांनी या केंद्राची तपासणी केली. त्यावेळी काही दाखल्यांची पुनर्पडताळणी केली असता त्यामध्ये तथ्य आढळून आले. येथेही अधिकाऱ्यांचे बनावट स्वाक्षरीचे शिक्के तसेच काही दाखले आढळून आले. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, दुकाने सुरू करण्याचे परवान्यांसंबंधीची कागदपत्रेही आढळली. ही बाब जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, संबंधित ई सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. हे केंद्र रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून, लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती प्रशासनाने दिली. हे महा ई सेवा केंद्र ज्या केंद्रचालकाला दिले होते त्या व्यक्तीने ते अन्य व्यक्तीला चालव‌ण्यिास दिल्याचा खुलासाही प्रशासनाकडे संबंधितांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॅकरचा गुजरातलाही दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील महिलांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करणारा राजस्थानमधील दीप्तेश प्रकाशचंद्र सालेचा याने राजस्थानसह गुजरात आणि राज्यातील पुणे येथील महिलांचे अकाउंट हॅक करून अश्लील मेसेज पाठवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. हॅकरमुळे नक्की किती व्यक्तींचे व्हॉट्सअॅप हॅक झाले, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टी. वाय. बी.कॉम.च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दीप्तेशला १ जुलै रोजी सायबर पोलिसांनी राजस्थानमधील बाडमेल जिल्ह्यातील पचपदारा तालुक्यातील जसोलगाव येथून अटक केली. त्याला रविवारी रात्री उशिरा शहरात आणण्यात आले. दीप्तेशने यू ट्यूबवर पाहिलेल्या काही हॅकिंगच्या ट्रिक प्रत्यक्षात वापरल्या. राजस्थानच्या एका छोट्या शहरात पोलिस पकडण्यासाठी येणारच नाही, याची भ्र्रामक कल्पना बाळगणाऱ्या दीप्तेशने मुंबई, पुणे आणि नाशिकमधील महिलांचे व्हॉट्सअॅप लक्ष्य केले. त्यातून तो अश्लील चॅटिंग करणे किंवा अश्लील मेसेज पाठवण्याचा उद्योग करीत होता. दरम्यान, हा प्रकार वाढल्यानंतर नाशिकमध्ये तक्रारदार पुढे आले. मास हॅकिंग होत असल्याचा गंभीर प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी सर्व पुरावे तपासून दीप्तेशला जेरबंद केले. चौकशीदरम्यान त्याने राजस्थानसह गुजरातमधील अनेक महिलांचे व्हॉट्सअॅप हॅक केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. दीप्तेशच्या या कृत्याचा नक्की किती महिलांना फटका बसला, याचा शोध पोलिस घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरकरांची कोंडी जैसे थे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नाशिक-पुणे महामार्गावरील माळेगाव ते गुरेवाडी असा बायपास नुकताच सुरू झाल्याने पुण्याकडे जाणारी वाहने शहरातून न जाता आता बायपासने जाऊ लागली आहेत. त्यामुळे पुण्याकडे आणि नाशिकडे जाणाऱ्यांचा वेळ वाचत आहे. मात्र शिर्डीला जाणारी वाहने अद्याप सिन्नर शहरातूनच जात असल्याने शहरावरील वाहतूक कोंडीचा ताण काही अंशी कायम आहे. गुरेवाडी ते मुसळगाव एमआयडीसी असा बायपास होणे गरजेचे आहे.

शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला पर्याय म्हणून बायपास केल्यामुळे कोंडी काही अंशी सुटली आहे. शिर्डीकडे जाणारा बायपास अद्यापही न झाल्याने या दिशेने जाणारी मुंबई-गुजरातकडील वाहने मात्र शहरातून जात आहेत. हा बायापास जेव्हा सुरू होईल तेव्हाच सिन्नर शहर वाहतूक कोंडीच्या समस्येतून बाहेर पडू शकेल. तुर्तास सिन्नर शहरवासीय, पोल‌िसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

स्थानिकांना त्रास

नाशिक-पुणे बायपास सुरू झाल्यानंतर रमजान ईदच्या दिवशी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही. अन्यथा सुट्यांच्या काळात या रस्त्यावर वाहने अक्षरश: रांगत पुढे सरकत होते. शहरात अर्धा किलोमीटर अंतर कापायला अर्धा तासही अपुरा पडायचा. साहज‌िकच त्याचा त्रास शहरवासीयांना सोसावा लागत होता.


सिन्नर-नाशिकचे काम संथगतीने
सिन्नर-नाशिकरस्ता चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०१७ अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास राष्ट्रीय महामार्ग विभागाने व्यक्त केला होता. मात्र जुलै उजाडला तरी हे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. हे कामही पूर्ण झाले तर प्रवाशांचा अजून अर्धा तास वाचणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोशल मीडियावर आषाढीचा फीवर!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आषाढी एकादशीचा महासोहळा पंढरपूरला गेलेल्या वारकऱ्यांप्रमाणेच सोशल मीडिया यूजर्सनीदेखील मंगळवारी अनुभवला. सोशल मीडियावर दोन दिवस आधीच आषाढी एकादशीचे पडघम वाजू लागले होते. पंढरपूरला गेलेले वारकरी तेथील वातावरणाच्या विविध पोस्ट टाकत होते. त्यामुळे पंढरपुरात दाखल होणाऱ्या दिंड्या, रिंगण याचा सोहळा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना याचि देही याचि डोळा अनुभवायला मिळाला.देवस्थानाच्या फेसबुक पेजवरूनदेखील वारीची दृश्ये लाइव्ह दाखविण्यात येत होती संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह अनेक साधू-संतांच्या पालख्यांचे पंढरीत आगमन होत असतानाची दृश्ये दाखविली जात होती. त्यामुळे अवघी पंढरीनगरी विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून जात असतानाच सोशल मीडियादेखील विठ्ठलमय झाला होता. ज्याप्रमाणे टीव्ही चॅनल्स प्रसारण करतात त्याप्रमाणे नेटकरी वारीचे दर्शन घडवित होते. पंढरपूरकडे येणारे रस्ते वारकरीमय झाले आहेत, हेदेखील सोशल मीडियावरून पाहता येत होते. विविध गावांतील प्रसिद्ध विठ्ठल-रखूमाई मंदिराच्या पोस्टदेखील टाकल्या जात होत्या.

ऑडिओ, व्हिडीओने रंगत

सोशल मीडियावरून एकादशी साजरी करताना अनेकांनी पं. भीमसेन जोशींची ऑडिओ, व्हिडीओ स्वरूपातील अभंगवाणी पोस्ट केली. पाउले चालती पंढरीची वाट, विठु माझा लेकुरवाळा अशा गाण्यांच्या रेकॉर्डिंग्ज डाऊनलोड करून फेसबुकवर टाकल्या जात होत्या. राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या साइटवरूनदेखील लाइव्ह वृत्तांत दिला गेला. व्हॉट्सअॅप, ट्विटरच्या माध्यामातूनही विठोबाचे दर्शन घडत होते. अनेकांनी आपले डीपी, मोबाइलच्या रिंगटोन, डायलरटोनदेखील अभंगांच्या ठेवल्या होत्या. अनेकांनी विठ्ठल-रखूमाईचे फोटो, अभंग असलेल्या पोस्ट एकमेकांना पाठविल्या, तर काहींनी ‘विठ्ठल’ हे नाव कॅलिग्राफीच्या माध्यमातून तयार करीत आपल्या डीपीवर टाकले होते. एकंदरीतच फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप ही सोशल मीडियाची साधने विठ्ठलमय झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावचे पीआय निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आत्महत्या आणि आकस्मात मृत्यू प्रकरणात खून झाल्याचे स्पष्ट होऊन त्याची वेळीच नोंद न करता तपासात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी नांदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरूण दामोदर निकम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. एक नव्हे तर तब्बल तीन खूनांच्या घटनांकडे कानाडोळा करण्याच्या या प्रकारामुळे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.

नांदगाव पोलिस स्टेशन हद्दीत ७ ऑक्टोबर २०१६ रोजी बंधाऱ्याच्या पाण्यात एक अनोळखी प्रेत आढळून आले होते. त्याची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. पोलिस निरीक्षकांनी तब्बल आठ महिने या प्रकरणाचे भीजत घोंगडे ठेऊन गुन्हा दाखल केला. गुन्हाच दाखल नसल्याने तपासाचा प्रश्नही उद्भवला नाही. दरम्यान, तांदुळवाडी येथील विवाहिता पुनम काळे हिने ५ मे रोजी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची बाब उघड झाली होती. पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला. मात्र, पुनमचा मृत्यू विषबाधेने झाल्याचे स्पष्ट केले. तिसऱ्या प्रकरणात डोक्यास गंभीर जखम झाल्याने मृत्यू झाल्याचा अहवाल असताना १४ दिवसांनंतरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनिप्रदूषण झाले, कुणीच कसे नाही ऐकले?

$
0
0

नाशिक : दिवसाआड ठिकठिकाणच्या परिसरातून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळव‌िता यावे अन् त्रस्त नागरिकांनाही सुटकेचा नि:श्वास टाकता यावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्षभरापूर्वी कार्यरत करण्यात आलेली हेल्पलाइन सपशेल अपयशी ठरली आहे. ३६५ दिवसांत या हेल्पलाइनकडे एकाही नागरिकाला तक्रार दाखल करावीशी वाटले नाही, हे विशेष!

ध्वनिप्रदूषण रोखणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. शहरात त्याबाबत लोक काहीसे जागरूकता दाखवितात. शहरातील रस्त्यांवर पोलिसांचा वावर तुलनेने अधिक असतो. त्यामुळे जाणीवपूर्वक ध्वनिप्रदूषण टाळता येते. ग्र‍ामीण भागात मात्र दूरदूरपर्यंत पोलिस पोहोचू शकत नाहीत. याचाच फायदा घेत स्थानिकांकडून ध्वनिप्रदूषणाचे नियम खुंटीला टांगून ठेवले जातात. मात्र, त्याचा विपरित परिणाम त्या परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांच्या आरोग्यावर होतो. ग्रामीण भागात ध्वनिप्रदूषण रोखता यावे यासाठी सरकारी पातळीवर विविध उपाययोजना केल्या जातात. अलीकडेच नाशिक शहर पोलिसांनी प्रत्येक सोमवारी नो हॉर्न डे हा उपक्रम राबविला. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही लाभला. ग्रामीण भागातील ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचाव्यात आणि असे प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवर वर्षभरापूर्वी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, त्याचबरोबर नाशिक आणि मालेगाव तहसील कार्यालयाचे हेल्पलाइन क्रमांक या वेबसाइटवर ठळकपणे नमूद करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अशा तक्रारी स्वीकारण्यासाठी नाशिक आणि मालेगाव तहसील कार्यालयांत प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, तक्रार देण्यासाठी तत्काळ संपर्क साधता यावा, यासाठी त्यांचा मोबाइल क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षभरात या हेल्पलाइन क्रमांकांवर एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षातही ध्वनिप्रदूषणाबाबतच्या तक्रारींचे फोन अभावानाचे येतात. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात ध्वनिप्रदूषणाबाबतचे बोटांवर मोजण्याइतपत फोन कॉल्स आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

या क्रमांकांवर साधा संपर्क

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठीचे हेल्पलाइन क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटपर्यंतच मर्यादित राहिले आहेत. ध्वनिप्रदूषणाशी संबंधित कारवाया पोलिसांकडून होत असतात. थेट पोलिसांपर्यंत न जाऊ शकणाऱ्या ग्रामीण भागातील रहिवाशांना महसूलच्या या हेल्पलाइनमुळे आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रार असल्यास लोक आपत्तीव्यवस्थापन कक्षाच्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ०२५३–२३१७१५१ किंवा ७७९८९०६८८० या क्रमांकावरही नागरिक संपर्क साधू शकतात. नाशिक तालुक्यांशी संबंधित तक्रारींसाठी ०२५३–२५७५६६३ या क्रमांकावर फोन करून किंवा ९४०३५९०१०९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करता येणार आहे. मालेगाव तालुका संवेदनशील मानला जातो. त्यामुळे येथील तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. ०२५५४–२५४७३२ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा ९८५०१७९९२९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुपौर्णिमा उत्सवाचा श्रीगणेशा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विठुरायाच्या जयघोषात सारा महाराष्ट्र रंगून गेलेला असतानाच त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ गुरुकुलपीठात आषाढी एकादशीच्या मंगलदिनी सेवामार्गाच्या गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ झाला. यानिमित्त विठुरायाप्रमाणेच श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊली यांच्या चरणी हजारो सेवेकरी लीन झाले.

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ प्रधान केंद्र, दिंडोरी व समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरच्या अंतर्गत देशभर हजारो समर्थ केंद्रे कार्यरत असून, लाखोंच्या संख्येने महिला व पुरुष सेवेकरी सक्रिय आहेत. सेवेकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता गुरुपौर्णिमा उत्सवाचे नियोजन नीटनेटके व शिस्तबद्ध व्हावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून या उत्सवास आषाढी एकादशीपासूनच प्रारंभ होतो.

पहिल्याच दिवशी नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातून आलेल्या हजारो सेवेकऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी चंद्रकांत मोरे यांनी सपत्नीक श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती केली. सेवेकऱ्यांनी शिस्तीत रांगेत उभे राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करून चरणतीर्थ घेऊन आपले गुरुपद महाराजांकडे सोपविले. आज, बुधवारी (दि. ५) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकणातील सेवेकरी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतील. त्यानंतर दोन दिवस परराज्य व परदेशांतील सेवेकरी व भाविकांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. शनिवारी (दि. ८) गुरुपौर्णिमेचा मुख्य सोहळा दिंडोरी, त्र्यंबकेश्वरसह सर्व समर्थ केंद्रांवर होणार आहे. यावर्षी दिनदर्शिकांत शनिवार व रविवार असे दोन दिवस व्यास पौर्णिमा दाखविण्यात आली आहे. काही धार्मिक संस्था रविवारी (दि. ९) गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आस ही विठुरायाच्या दर्शनाची

$
0
0

टीम मटा

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. विविध ठिकाणी चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा करून ‌दिंडी सोहळा साजरा केला.

कोटमगावी फुलला भक्तांचा मळा

येवला ः कपाळी बुक्का...हाती टाळमृदंग अन् भगवे ध्वज घेत विठूनामाचा जयघोष करत निघालेल्या गावोगाववरून थडकणाऱ्या दिंड्या...अन् मनी ओढ पांडुरंगाच्या दर्शनाची... असे चित्र मंगळवारी (दि. ४) तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठलाच्या कोटमगावी दिसले. प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र कोटमगावात आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विठ्ठलभक्तीचा मळा फुलला होता. जवळपास एल लाखापेक्षा अधिक भाविका येथे नतमस्तक झाले.

येवला तालुक्यातील गावोगावचे असंख्य भाविक दरवर्षी कुठल्या ना कुठल्या दिंडीत नेमाने सहभागी होताना आषाढी एकादशीला पंढरपूरात पांडुरंगाचे दर्शन घेतात. ज्यांना हे शक्य होत नाही त्यांच्यासाठी तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक अर्थातच ‘विठ्ठलाचं कोटमगाव’ म्हणजे एकप्रकारे प्रतिपंढरपूरच. नाशिक-औरंगाबाद राज्य महामार्गावर येवला शहरापासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या श्रीक्षेत्री कार्तिकी एकादशी तसेच आषाढी एकादशीला भक्तांची मोठी गर्दी उसळत असते. यंदाही आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर भक्तीचा मळा फुलला होता. तालुक्यातील गावोगावसह नजीकच्या कोपरगाव, वैजापूर आदी ठिकाणचे भाविक भल्या पहाटेपासून विठूनामाचा गजर करत, पांडुरंगाचे गोडवे गात पायी पायी थडकत होते. भक्तांची गर्दीने दिवसभर कोटमगाव फुलले होते.

येवल्यातील धडपड मंचच्या वतीने शहरातील खांबेकर खुंट येथे विठ्ठलाची प्रतिमा ठेवून भाविकांना शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. यशवंत खांगटे, नंदलाल भांबारे, नारायण शिंदे, प्रभाकर आहिरे, मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळके आदी उपस्थित होते.

चिमुकलेही रमले दिंडीत

आषाढी एकादशीनिमित्त सकाळी येवला शहरातून निघालेल्या विविध शाळांच्या दिंड्या सर्वांचेच लक्ष वेधून गेल्या. निघालेल्या पालखी दिंडीत वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झालेली शाळकरी बच्चेकंपनी मोठे आकर्षण ठरले. डोक्यावर महाराष्ट्रीयन संस्कुतीचा अमुल्य ठेवा असलेली तुळस, नऊवारी साड्या परिधान केलेल्या चिमुकल्या शाळकरी मुली, वारकऱ्यांच्या वेशातील मुले, कुणी पोतराज तर कुणी स्वयंसेवकाच्या खाकी वेशात असं चित्र सगळ्यांचीच दाद मिळवून गेले. हाती भगवे झेंडे, पालखी असे महाराष्ट्रीयन वारकरी संप्रदायाचं दर्शन घडविणारे हे चित्र लक्षवेधी ठरले.

ग्रामदैवताची कळवणला विधिवत पूजा

कळवण ः येथील ग्रामदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविक नतमस्तक झाले. ग्रामदेवतेच्या पूजेचा मान रुपेश चंद्रकांत कोठावदे यांना सपत्नीक मिळाला. कळवण शहरात प्रतिपंढरपूर म्हणून नावारूपाला आलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवस्थान ट्रस्टतर्फे आषाढी एकादशीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली. कोठावदे परिवारातर्फे भाविकांना प्रसाद वाटण्यात आला.

जाणकाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करीत मिरवणूक काढली. तालुक्यातील वारकऱ्यांनी कळवणच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी होती.

विठ्ठल मंदिरात निफाडमध्ये गर्दी

निफाड ः ज्ञानोबा माउली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय अशा नामघोषत निफाड येथील शंभर वर्षापूर्वीच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी साजरी झाली. निफाड येथील या विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली. वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर, वैनतेय विद्यालय, वैनतेय इंग्लिश मेडिअम, जिल्हा परिषद शाळा न २ यांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या साथीने 'ज्ञानबा-तुकाराम' व विठुनामाचा गजर करीत निफाड परिसर दणाणून सोडला. कलशधारी मुली, विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर, निवृत्त‌िनाथ, सोपानदेव, मुक्ताबाईसह विविध संत यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील लोकांचे लक्ष वेधले. शनी चौकातून विठ्ठल मंदिरांत विठ्ठल दर्शनानंतर दिंडी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोट्यातील प्रवेशांबाबत आज नोंदवा हरकती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेत इनहाऊस कोट्याची दुसरी यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. याबाबतचा तपशील प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर कळविण्यात आला आहे. दुसऱ्या यादीत नावे असणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ जुलैपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये अकरावीचा प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. याबाबतच्या सूचना संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
या प्रवेशांसाठी मुख्य गुणवत्ता यादी १० जुलै रोजी प्रसिध्द होणार आहे. त्या अगोदरचे टप्पे पूर्ण होत आहेत. ९ ऑगस्टपर्यंत ही प्रवेशप्रक्रिया पूर्ण होणार आहे. यादरम्यान एकूण चार मेरीट लिस्ट प्रसिध्द करण्यात येतील. यापैकी पहिली लिस्ट १० जुलै, दुसरी मेरीट लिस्ट २० जुलै, तिसरी २९ जुलै रोजी तर ६ ऑगस्ट रोजी चौथी मेरीट लिस्ट प्रकाशित होणार आहे. आज (५ जुलै) विद्यार्थ्यांच्या जाहीर करण्यात आलेल्या माहितीवरील त्रुटी स्वीकारून हरकती नोंदविण्यात येणार आहेत. ६ जुलैपर्यंत कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन रिक्त जागांचे समर्पण करण्यात येईल. यानंतर १० जुलै रोजी केंद्रीय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. १ ते १३ जुलैदरम्यान पहिल्या गुणवत्ता यादीतील प्रवेश निश्चित केले जातील. १४ जुलै रोजी रिक्त जागा व पहिल्या फेरीतील कट ऑफ जाहीर होणार आहे. १५ ते १८ जुलै या कालावधीत ऑप्शन फॉर्म भरणे व भाग १ आणि २ भरण्यासाठी मुदत दिली जाईल. २० जुलै रोजी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाईल. २९ जुलै रोजी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची तिसरी गुणवत्ता यादी तर ६ ऑगस्ट रोजी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडजवळ अपघातात दोन तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड-शिर्डी मार्गावर मालेगावकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कंटेनरने मोटारसायकलला धडक दिल्याने मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. या दोघांपैकी एकाचे नाव विक्रम चिंतामण पवार (वय २५, मालेगावनजीक पिंपळगाव दाभाडी) असून, दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

मनमाड बसस्थानकासमोर हा अपघात घडला. मनमाड शहर पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. मालेगावकडून शिर्डीकडे जाणाऱ्या कंटेनरची (एचआर ५५/डब्लू ७३४६) मोटारसायकलला (एमएच ४१/एच४५६४) समोरून जोरदार धडक बसली. मनमाड बसस्थानकाजवळ कोर्ट परिसरातून मालेगावकडे जाण्यासाठी ही मोटारसायकल वळत होती. अपघातात मोटारसायकल कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली जाऊन आदळल्याने मोटारसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. या प्रकरणी कंटेनरचालक धर्मेंद्र उमेश रॉय (रा. वैशाली, बिहार) याला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजमंदिर समाजालाच बंद!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मध्यमवर्गीय, गरिबांसाठी उपयुक्त ठरणारे देवळालीगावातील महापालिकेचे छत्रपती शिवाजी समाजमंदिर महापालिका आयुक्तांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी देणे बंद केले आहे. फक्त खेळांसाठीच समाजमंदिर राखीव ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

या समाजमंदिराच्या पाचशे मीटरवर महापालिकेचा ईगल क्लब, तसेच जवळच जॉगिंग ट्रॅक व मैदान उपलब्ध आहे. त्यामुळे समाजमंदिराचा वापर खेळांसाठी करण्यात येऊ नये, अशी नागरिकांची मागणी आहे.

देवळालीगावातील लिंगायत कॉलनीत हे २६ वर्षे जुने समाजमंदिर असून, केवळ तीन हजार शुल्कात विवाह, साखरपुडा, वाढदिवस, वधू-वर मेळावे, सेवानिवृत्ती, दशक्रिया विधी, जयंती आदींसाठी ते उपलब्ध केले जाते. वर्षाला किमान दीडशे कार्यक्रम येथे होतात. देवळालीगावात अन्य समाजमंदिर नाही. रोकडोबावाडी, सुंदरनगर, राजवाडा, वाल्मीकनगर, सिन्नर फाटा, जियाउद्दीन डेपो, बागुलवाडी, सुभाषरोड, जेलरोड, उपनगर, देवळाली कॅम्प आदी भागातील असंख्य कष्टकरी येथील सेवेचा लाभ घेत आहेत. मात्र, तरीही हे समाजमंदिर धार्मिक कार्यक्रमांसाठी बंद करण्यात आल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

--

१ जूनपासून कार्यवाही

१५ ऑगस्ट १९९० रोजी तत्कालीन खासदार डॉ. दौलतराव आहेर, माजी खासदार बाळासाहेब देशमुख, बबनराव घोलप, बी. के. पाटील, अजय मेहता आदींच्या उपस्थितीत या समाजमंदिराचे लोकार्पण झाले होते. नाशिकरोड देवळाली सोशल अॅण्ड कल्चरल असोसिएशनकडे समाजमंदिराचे पालकत्व तेव्हापासूनच देण्यात आले आहे. डॉ. राजेंद्र जाधव हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. समाजमंदिरात गैरप्रकार चालतात अशा तक्रारी गेल्याने १ जूनपासून हे समाजमंदिर फक्त क्रीडा प्रकारांसाठीच देण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतल्याचे त्यांनी सांगितले.

--

अन्य उपक्रमांना ना नाही

डॉ. राजेंद्र यांनी सांगितले, की हे समाजमंदिर सामाजिक कार्यांसाठी देणेदेखील सुरू राहावे, अशी आमचीही प्रामाणिक इच्छा आहे. त्याचबरोबरच क्रीडा, हास्य क्लब, प्रक्षिशण शिबिरे, महापालिका शाळांतील गरजू विद्यार्थ्यांसाठीही येथे उपक्रम सुरू करण्यात यावेत, असा आमचा प्रयत्न आहे. महापालिका आयुक्तांना आम्ही भूमिका पटवून दिली आहे. ते लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन सुवर्णमध्य साधतील, अशी आशा आहे.

--

राजकीय पक्षांचाही विरोध

या निर्णयाला राजकीय पक्षांचाही विरोध असून, खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीयांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन हे समाजमंदिर बंद ठेवण्यास विरोध केला आहे. प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रईस शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर चव्हाण, भाईजान बाटलीवाला, सय्यद मंजूर, कामिल इनामदार, अतुल हांडोरे आदींनी महापालिकेला निवेदन दिले आहे. मनसेचे विभागीय अध्यक्ष बंटी कोरडे, जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले, संतोष क्षीरसागर, अस्लम मणियार, संदीप पाटील आदींनीही समाजमंदिर पुन्हा खुले न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

----

देवळालीगावातील समाजमंदिर हे सर्वच जाती-धर्माच्या नागरिकांना उपयुक्त आहे. कमी शुल्कामध्ये ते मिळते. त्यामुळे हे समाजमंदिर केवळ खेळांसाठी देण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिक तीव्र आंदोलन करतील.

-ज्ञानेश्वर चव्हाण, नागरिक

---

देवळालीगावातील समाजमंदिर गरजूंना आधार ठरणारे आहे. कमी शुल्कामुळे कष्टकऱ्यांना त्याचा लाभ मिळायचा. त्यामुळे सामाजिक कार्यासाठी समाजमंदिर पुन्हा खुले न केल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल.

-बंटी कोरडे, विभागीय अध्यक्ष, मनसे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकडेवारी फसवी!

$
0
0

राष्ट्रवादीसह सुकाणू समिती सदस्यांचा दावा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यात सुमारे ४.५ लाख शेतकरी हे कर्जबाजारी असताना सरकारच्या निकषांमुळे फक्त २८ टक्के म्हणजेच १ लाख ३६ हजार ५६९ इतक्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचे सरकारी यंत्रणेने जाहीर केले आहे. त्यामुळे इतर सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्यासाठी सरकारने सर्व निकष बाजूला ठेऊन तातडीने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केली आहे. तर कर्जमाफीची आकडेवारी फसवी असल्याचा आरोप सुकाणू समितीच्या राजू देसले यांनी केला आहे.

सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी ३० जून २०१६ पर्यंतचे थकीत असलेले दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. आर्थिक वर्षांच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाने कर्जमाफी मिळत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी यातील तारखेची अट बदलून ती ३०जून २०१७ करण्यात यावी, अशी मागणीदेखील अॅड. पगार यांनी पत्रकात केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न देता तत्त्वत:, निकष असे शब्दांचे खेळ तसेच तारखेबाबतची अट घातल्याने शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला नाही. कर्जमाफी योजनेतील शेतकरी कुटुंब हा निकष तातडीने रद्द करण्यात यावा. तसेच कर्जमाफीत फक्त राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना दिलेले शेतीकर्ज माफ करण्याचा निकष सरकारने निश्चित केला आहे. परंतु, शेतकऱ्यांनी स्थानिक नागरी बँका, पतसंस्था व तत्सम वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाचा देखील कर्जमाफीत समावेश करावा, अशी मागणीही अॅड. पगार यांनी केली आहे. या मागण्यांसाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. ६ जुलै) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे.

आकडेवारी फसवी : देसले

राज्यभरात सराकरने जिल्हानिहाय आकडेवारी कर्जमुक्ती संदर्भात जाहीर केली आहे. विकास सोसायटीच्या गटसचिवांनी कर्जमुक्तीच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला असताना ही माहिती आली कुठून असा सवाल सुकाणू समितीच्या राजू देसले यांनी केला आहे. जिल्ह्या बँकेत २०१६ अखेर दीड लाखांच्या आत फक्त ५० हजार शेतकरी आहेत व ते निकषात बसतात की नाही तेही विकास सोसायटी अहवाल आल्याशिवाय सांगू शकत नाही. म्हणून एक लाख १२ हजार शेतकऱ्यांना लाभाची यादी फसवी आहे, असा आरोप राजू देसले यांनी केला आहे. ७० हजार शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा अधिक आहे. वरील रक्कम व निकषात किती बसतील सांगता येत नाही. शासन लाखाचे आकडे सांगून आंदोलन उभे राहू नये म्हणून दिशाभूल करीत आहे, असे देसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतीक्षाला व्हायचंय लष्करात अधिकारी!

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

ती गरीब शेतमजुराची पोर. जिद्द मात्र आकाशाला गवसणी घालण्याची. हलाखीच्या परिस्थितीला तोंड देतच ती मोठी झाली. तिला आईवडिलांना मोठ्या घरात न्यायचंय, खूप चांगले दिवस दाखवायचे आहेत. तिला स्वतःला नव्हे, तर देशाला लष्करी महासत्ता करायचे आहे. म्हणूनच इतर मैत्रिणींप्रमाणे डॉक्टर, इंजिनीअर न होता लष्करात अधिकारी होण्याचा संकल्प तिने सोडला आहे. प्रतीक्षा शरद गायकवाड हिचे हे ध्येय साध्य करण्यासाठी साथ हवीय समाजाच्या दातृत्वाची.

जेलरोडचा गोरेवाडी या रहिवासी भागाचे नाव जरी घेतले तरी तेथील लोकॅलिटी, प्रतिकूल परिस्थिती, अठराविशे दारिद्र्य समोर येतं. अशा गोरेवाडीच्या गायकवाड मळ्यातील पत्र्याच्या घरात प्रतीक्षा गायकवाड राहते. दहावीत ९५.४० टक्के गुण मिळवून ती कोठारी कन्याशाळेत पहिली आली आहे. आवडीच्या गणितात ९९, विज्ञानात ९८, तर संस्कृतमध्ये तिला ९७ गुण आहेत. असे बेस्ट रेकॉर्ड असतानाही तिला डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हायचे नाही. संरक्षण दलाचे प्रशिक्षण देणाऱ्या पुण्याच्या एनडीए (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी)मध्ये जाऊन तिला लष्करात अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी बारावी सायन्स ही अट असल्याने त्या दिशेने तिने तयारी सुरू केली आहे.

प्रतीक्षा शाळेत पहिलीपासूनच हुशार होती. मूळचे देवळाली गावातील असलेले तिचे वडील शरद गायकवाड यांचा चेहेडीजवळ जमिनीचा छोटा तुकडा आहे. मात्र, त्यात भागत नसल्याने ते इतरांच्या शेतात मजुरी करतात. आई संगीता दहावी शिकल्या असून, त्याही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. या कुटुंबाच्या घरी लक्ष्मी पाणी भरत नसली तरी सरस्वतीचा वरदहस्त मात्र पहिल्यापासूनच आहे. स्वतःला मोठं करण्याऐवजी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प प्रतीक्षाने सोडला आहे.

प्रतीक्षाने शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नाही. तिने अनेक क्षेत्रांत बक्षिसे मिळवली. प्रतीक्षाची बहीण वैष्णवी हीदेखील कोठारी शाळेत यंदा दहावीत आहे. तिला नववीत ९२ टक्के मिळाले आहेत. ती चांगली चित्रकार आहे. भाऊ संदेशदेखील हुशार असून, त्याला डॉक्टर व्हायचे आहे. मात्र, आर्थिक अडचण ही या कुटुंबापुढील सर्वांत मोठी समस्या आहे. म्हणूनच सर्व कुटुंबाची मदार आहे ती फक्त प्रतीक्षावर.

घरच्या गरिबीची लहानपणापासून जाण असल्याने प्रतीक्षाने जिद्दीने वाटचाल केली. बालहट्टाला तिलांजली दिली. पहिली ते आठवीपर्यंत तिने अभ्यासात ए ग्रेड सोडली नाही. नववीत तिला ८६ टक्के मिळाले. त्यामुळे नाराज न होता यापासून प्रेरणा घेत तिने झोकून देऊन दहावीचा अभ्यास केला. पावसाळ्यात कधी पायी चिखल तुडवत, तर थंडी-उन्हात सायकलवर शाळा, क्लासला जाऊन तिने दहावीत बेस्ट परफॉर्मन्स दिला. गोरेवाडीचे वातावरण हे अभ्यासाला पोषक नसले तरी माणसं मात्र जिवाला साथ देणारी आहेत. सर्वांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने गोरेवाडीची ही लेक आता संरक्षण दलात ऑफिसर होऊ पाहते आहे, याचा सर्वांना अभिमान वाटत आहे. तिच्या मजूर आईवडिलांची मान तर अभिमानाने ताठ झाली आहे; पण पाय मात्र जमिनीवरच आहेत. प्रतीक्षा पहाटे चारला उठून दहावीचा दोन तास अभ्यास करायची. नंतर फ्रेश होऊन पुन्हा दोन तास अभ्यास करून मगच शाळेत जायची. शाळेतून सायंकाळी आल्यावर घरची कामे आटोपून साडेनऊ ते अकरापर्यंत अभ्यास करायची. रात्री झोप यायची तेव्हा नोट्स काढायची. तिच्या गुणांचे व जिद्दीचे शाळेलाही कौतुक आहे. आता तर तिने स्वतःला मोठं करण्याऐवजी देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प सोडल्याने शाळेतील शिक्षक, मैत्रिणी यांनाही तिचे खूप कौतुक वाटत आहे. देशाच्या रक्षणाचा ध्यास घेणाऱ्या प्रतीक्षाला पुढील वाटचालीसाठी साथ हवीय समाजाच्या दातृत्वाची.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात माऊलीचा जागर

$
0
0

धुळे : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये मंगळवारी भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रात्री दहा वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या. तर मंदिर परिसरात आरती, महाप्रसाद, भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मालेगाव रोडवर असलेल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी यंदाही कायम होती. आषाढी एकादशी निमित्त शहर परिसरातील मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. अनेक व्यावसायिकांनी लहान मुलांच्या खेळणी, पाळणे, मिठाईची दुकाने लावली होती. तसेच फुलं-फळ, हार, नारळ तसेच इतरी वस्तू विक्रेत्यांचा यावेळी समावेश होता. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मालेगाव रोडवरील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला होता. त्यानुसार पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली. मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस दलानेही पोलिस बंदोबस्त तैनात केले होता. शहरातील कमलाबाई कन्या शाळेतील बाल मंदिराच्या वर्गातील चिमुकल्या विद्यार्थिनींनी आषाढी एकादशीनिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय स्तरावर मिळावे क्रीडा प्रकारांना महत्त्व

$
0
0

वैभव देशमुख, मटा सिटिझन रिपोर्टर

शाळा सुरू होऊन आता महिनाभराचा कालावधी पूर्ण होत आला आहे. शालेय दिनक्रमात लहान मुले वर्षभर पुस्तके, ट्यूशन याच चक्रात दर वर्षीप्रमाणे गुंतून जातात. पण, या मुलांना वेगवेगळे खेळ खेळण्याची पुरेशी संधीच मिळत नसल्याचे दिसते. भरघोस फी भरूनदेखील कोणीही याबद्दल साधी चौकशी करताना दिसत नाही. यंदाही तसेच दिसून येत आहे.

खेळात नैपुण्य मिळावे, अशी इच्छा प्रकट करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसंदर्भात पालक अन् शाळा प्रशासनही उदासीन दिसते. खरोखर जर जिल्हा परिषदेच्या शाळा, तसेच सर्व खासगी शैक्षणिक संस्थांनी एकत्रितपणे प्रामाणिक पावले उचलली, तर शहरी भागासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतून अनेक गुणवान खेळाडू निर्माण होऊ शकतील. आजही साहित्य, सुविधा, योग्य मार्गदर्शन आदी प्राथमिक बाबींचा अभाव असूनही मैदानी, तसेच सांघिक खेळांत अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य, तसेच देशाचे प्रतिनिधीत्व करताना दिसतात. किमान अशा प्राथमिक सुविधा जरी स्थानिक ग्रामपंचायत सदस्यापासून अन्य लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करण्यासंदर्भात तत्परता दाखविली, तर निश्चितच आणखी गुणवान खेळाडू पुढे येऊ शकतील. संबंधितांनी असे खेळाडू घडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा एक नागरिक म्हणून ‘मटा’मार्फत मी व्यक्त करीत आहे. असे झाल्यास कविता राऊत, मोनिका आथरे यांच्यासारखे अाणखी दर्जेदार खेळाडू नाशिक जिल्ह्याच्या मातीतून निर्माण होतील, यात शंकाच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय विभागाचीच सर्जरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बिटकोसह पालिकेच्या मालकीच्या व नियम‌ित वादात राह‌िलेल्या रुग्णालयांचेच ऑपरेशन आता आयुक्तांच्या आदेशाने वैद्यकीय विभागाने सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून एकाच हॉस्प‌िटलमध्ये ठाण मांडून बसलेल्या ४४ डॉक्टरांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर चारही हॉस्प‌िटल्सच्या विभाग प्रमुखांसह संपूर्ण विभागातील नर्स, लॅब टेक्निशियन, मेट्रन, फार्मासिस्ट यांच्याही बदल्या प्रस्ताव‌ित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागातल्या या मोठ्या ऑपरेशनमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, चारही हॉस्प‌िटल्सच्या त्रुटी या बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा विभागाच्या मदतीने दूर करण्याची प्रक्रियाही सुरू झाली असून, सर्व विभागांना त्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

महापालिकेची हॉस्प‌िटल्स आणि वाद हे ठरलेले समीकरण आहे. विशेषतः बिटको आणि डॉ. जाकीर हुसेन हॉस्प‌िटलच्या कामकाजावरून नियम‌ित वाद होत असतात. महापालिकेच्या हॉस्प‌िटल्समध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स आणि खासगी प्रॅक्टीस करत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जातो. बिटको रुग्णालयात उपचार व सुविधांवरून नेहमीच वाद होतात. सोमवारी नाशिकरोड सभापती व नगरसेवकांनी केलेल्या पाहणीत अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. बिटकोसह डॉ. जाकीर हुसेन, मोरवाडी, इंद‌िरा गांधी हॉस्प‌िटलमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे सर्वसामान्यांना वैद्यकीय सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी या आल्या होत्या. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेत, वैद्यकीय विभागाचेच ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

वैद्यकीय विभाग प्रमुख डॉ. विजय डेकाटे यांनी त्याची अंमलबजावणी करत वैद्यकीय विभागातील सर्व ४४ डॉक्टरांच्या बदल्या केल्या आहेत. पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी हे डॉक्टर्स ठाण मांडून बसले होते. त्यामुळे त्यांच्या कामकाजात शिथ‌िलता आली होती. या सर्व डॉक्टरांच्या बदल्या करून त्यांना दुसऱ्या हॉस्प‌िटलमध्ये पाठवले जाणार आहे. त्यामुळे हॉस्प‌िटलमधील कर्मचाऱ्यांशी तयार झालेले सुमधूर संबंध तुटून कामकाज सुधारणार आहे. सोबतच बिटकोचे प्रमुख डॉ. जयंत पुलस्कर, कथडाचे डॉ. राजेंद्र भंडारी, इंद‌िरा गांधी रुग्णालयाचे डॉ. गणेश गरुड, मोरवाडीचे डॉ. प्रशांत थेटे यांच्याही बदल्यांचा प्रस्ताव आहे. या हॉस्प‌िटलमध्ये कार्यरत असलेले फार्मासिस्ट, नर्स, लॅब टेक्निशियन अशा सर्व ५१४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. वैद्यकीय विभागात मोठी साफसफाई मोहीम राबविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बदली झालेल्या डॉक्टरांना सात तारखेपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चार हॉस्प‌िटल्सच्या तपासण्या

बिटकोसह पालिकेच्या सर्व चार हॉस्प‌िटल आणि ३० शहरी आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करण्यासाठी बांधकाम, विद्युत, भुयारी गटार, पाणीपुरवठा विभागांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी या चारही विभागांना पत्र देऊन त्यांच्याकडून त्रुटी शोधून दूर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती डॉ. विजय डेकाटे यांनी दिली. सहा विभागांच्या सहा अभियंत्यांमार्फत या हॉस्प‌िटल्सची तपासणी मोहीम सुरू करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझे चित्त तुझे पाया। मिठी पडली पंढरीराया।।

$
0
0

टीम मटा

शहर परिसरातील विविध विठ्ठल मंदिरे अन् घराघरांत मंगळवारी भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शहर परिसरातील शाळांमध्येदेखील बालवारकऱ्यांच्या दिंड्या अन् विविध उपक्रमांद्वारे विठुनामाचा गजर करण्यात आला. शहरातील नामदेव विठ्ठल मंदिर, काझीपुऱ्यातील नामदेव विठ्ठल मंदिर, हुंडीवाला लेनमधील ज्ञानदेव विठ्ठल मंदिर, आकाशवाणीशेजारील विठ्ठल मंदिर, तसेच अतिप्राचीन असलेले गोदाघाटावरील विश्वनाथ विठ्ठल मंदिर, विहितगाव येथील प्रतिपंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर, देवळाली कॅम्प, विहितगाव, सातपूर येथील विठ्ठ्ल मंदिर आदी ठिकाणी विठ्ठ्ल-रखूमाईचे विधिवत पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमही झाले.

---

विहितगावला भाविकांची मांदियाळी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा।

झाला अरुणोदय सारली निद्रेची वेळा ।।

म्हणत विहितगावच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भल्या पहाटे काकडा आरतीचे स्वर गुंजत होते. पहाटेपासूनच पंढरपूरला न जाऊ शकलेल्या वारकऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविकांनी मंदिरात,

तुज पाहता सामोरी। दृष्टी न फिरे माघारी।।

माझे चित्त तुझे पाया। मिठी पडली पंढरीराया।।

असा उत्कट भाव मनात ठेवून आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठुरायाचरणी माथा टेकविला. पहाटे ४ ते ७ वाजेदरम्यान खासदार हेमंत गोडसे, त्यांच्या पत्नी अनिता गोडसे, नगरसेविका सुनीता कोठुळे व उत्तम कोठुळे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीस महाअभिषेक करून महापूजा करण्यात आली. आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, नगरसेवक केशव पोरजे, अरुण जाधव आदींच्या हस्ते तुळशीचा हार अर्पण करण्यात आला. दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान महिलांचे भजन, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, रात्री ९ वाजता हभप अनिल महाराज तुपे यांचे हरिकीर्तन झाले. दिवसभर पंचक्रोशीतील भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी भाविकांना खिचडी व केळी प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. दिवसभर विविध गावच्या भजनी मंडळांकडून सुश्राव्य अभंगांवर आधारित भजनाचे कार्यक्रम झाले. नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनी यंदा स्वखर्चातून मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी हांडोरे,दिनेश हांडोरे,सोमनाथ कोठुळे,उद्धव हांडोरे,आत्माराम हगवणे,विजय हांडोरे,बाळासाहेब कोठुळे,विष्णू हांडोरे,रोहित मते,संपत हांडोरे,प्रकाश हगवणे,सोपान हांडोरे,संजय हांडोरे आदींसह गावकरी प्रयत्नशील होते.


देवळालीत दिंडी सोहळा

देवळालीगावातील १२० वर्ष जुन्या विठ्ठल मंदिरात पहाटे वाघुळकर कुटुंबीय व पांडुरंग झोंबाड, कैलास गोडसे, सतीश वाघुळकर, सुरेश वाघुळकर, नगरसेविका प्रभावती धिवरे, प्रभाकर लोणे, रामकिसन गोडसे यांच्यातर्फे अभिषेक करण्यात आला. यावेळी देवळालीकरांच्या उपस्थितीत महाआरती झाली. सकाळी ९ वाजल्यापासून प्रसादाचे वाटप झाले. दुपारी ४ ते ६ वाजेदरम्यान महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम झाले. सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान भव्य पालखी सोहळा झाला. लामरोडवरील भैरवनाथ मंदिरात श्री भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळातर्फे सामूहिक भजनसंध्या झाली. आज, बुधवारी (दि. ५) सिंधी पंचायत हॉल येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. चेहेडी पंपिंग स्टेशन, चेहेडी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही विधिवत पूजनासह भजनादी कार्यक्रम झाले.

पृथ्वी मित्रमंडळ

देवळालीगावातील पृथ्वी मित्रमंडळातर्फे विठ्ठल मूर्ती सजविण्यात आली होती. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, दत्ता गायकवाड, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, अॅड. शांताराम कदम, नयना घोलप आदींनी पूजा केली. योगेश शिंदे, दिनेश शिंदे, नीलेश भोईर, विजय आर्या, पुरुषोत्तम केला, नंदू खैरे, पवन विसपुते, किरण डहाळे, चंदू महानुभव, विकास गिते आदींनी संयोजन केले.

---

सातपूरला विठुनामाचा गजर

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

आषाढी एकादशीनिमित्त सातपूर परिसर मंगळवारी विठुनामाच्या गजराने दुमदुमला होता. विठ्ठल मंदिरासह महापालिका व खासगी शाळांमध्येही विविध कार्यक्रम झाले. समृद्धनगर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात नगरसेवक शशिकांत जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दिवसभर कीर्तनाचेही आयोजन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पेहरावात परिसरातून दिंडी काढली.

विश्वासनगर येथील महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिसरात दिंडी काढली. विद्यार्थी वारकऱ्यांच्या भूमिकेत होते, तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेत दिंडीत सोहळ्यात सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीला सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, वारकऱ्यांची वेशभूषा केलेल्या माँसाहेब मीनाताई ठाकरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हनुमान मंदिराच्या प्रांगणात रिंगण तयार केले होते. मध्यभागी पालखी ठेवत विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीदेखील रिंगण सोहळ्याचा आनंद लुटला.

---

दिंडी सोहळ्याने फुलले शालेय आवार

--

सावित्रीबाई फुले विद्यामंदिर

पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिरात आषाढी एकादशी दिंडी काढून भक्तिमय वातावरणात साजरी झाली. प्रारंभी विठ्ठलाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. विठ्ठलाच्या आरतीबरोबरच अभंगही सादर झाले. ज्योती महाले यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व विशद केले. वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी व डोक्यावर तुळस घेतलेल्या नऊवारी साडीतील विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाल्या होत्या. प्रसाद जॉन, जेनी प्रसाद, शाळेचे मुख्याध्यापक सुनील शेवाळे उपस्थित होते. सुनील शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. मोहन माळी यांनी सूत्रसंचालन केले. संगीता महाजन,विद्या महाजन, जयश्री पवार, वैशाली राजभोज, प्रकाश खैरनार, प्रशांत गवळी, नीलिमा फडोळ, लक्ष्मण काशिद आदींसह पालक उपस्थित होते.

--

के. के. वाघ प्रायमरी स्कूल

आडगाव ः सरस्वतीनगर येथील शाळेत दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या वेशभूषेतील चिमुकले त्यात सहभागी झाले होते. हर्ष पानसरे व सौरभ मोहिते यांनी विठ्ठलाची, तर ईश्वरी आहेर व समृद्धी पोकळे यांनी रुक्मिणीची वेशभूषा साकारली होती. प्राचार्य अश्विनी पवार यांनी पालखीचे पूजन केले. अनुराधा ढवण, माधुरी निफाडे, सरिता जाधव, चैताली पिंगळे, अनुराधा पैठणकर आदी उपस्थित होते.

--

अभिनव बालविकास मंदिर

नाशिकरोड ः जेलरोडच्या गणेश धात्रक शिक्षण संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर व डीएफडी माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशी उत्साहात झाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीसह संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत निवृत्तिनाथ आदींची वेशभूषा केली होती. संस्थापक संचालक दत्तात्रय धात्रक, रंजना धात्रक, एंजल स्कूलच्या प्राचार्या मनीषा दराडे, आनंद महाराज कॉलेजच्या सुलभा डांगे, डॅफोडिल्सच्या मुख्याध्यापिका पायल पंजाबी, प्राथमिक विभागप्रमुख जयश्री सरोदे, वैशाली पाटील उपस्थित होते. माधुरी निमसे यांनी अभंग सादर केले. शीतल भामरे यांनी सूत्रसंचालन केले.

--

(फोटो ः सतीश काळे, पंकज चांडोले, प्रशांत धिवंदे, नामदेव पवार, डॉ. बाळकृष्ण शेलार, अभिजित राऊत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटीमुळे नाट्यव्यवस्थापक सापडले कात्रीत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जीएसटीमधून वगळावे अशी सर्वच क्षेत्रातून मागणी जोर धरू लागलेली असतानाच मनोरंजनाच्या क्षेत्रावर मात्र खूपच अन्याय झाल्याची भावना नाशिकच्या नाट्य व्यवस्थापंकामध्ये आहे. भलेही जीएसटी भरू; परंतु, त्यात थोडी शिथिलता यावी असे येथील नाट्यव्यवस्थापकांचे म्हणणे असून, याबाबत उच्चस्तरावर भेटीगाठी तसेच निवेदने देणे सुरू आहे.
नाटकाचे तिकीट आधीच जास्त असल्याची प्रेक्षकांची तक्रार असताना आता त्यात वाढ करून चालणार नसल्याने जीएसटीबाबत काय भूमिका घ्यावी अशा संभ्रमात सध्या नाट्यव्यवस्थापक आहेत. नाटकाचे तिकीट सरासरी २५० रुपये आहे. २५० रुपयांच्या पुढे १८ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे त्यापुढे तिकीट वाढवले तर त्याचा प्रेक्षकांवर परिणाम होणार आहे. नाटकाचे तिकीट ३०० रुपये केले तरी त्यातून १८ टक्के म्हणजेच ५४ रुपये सरकारला द्यावे लागणार आहेत. मग तिकीट २५० रुपये ठेवले तर फरक काय पडतो, असाही विचार नाट्य व्यवस्थापक करीत आहेत. नाटकाचे तिकीट ५०० रुपये केले तर नाटक पहायला प्रेक्षक येणार का, असाही सवाल करण्यात येत आहे. सध्या नाटक पाहण्यासाठी चाळीशीची जोडपी येऊन बसतात. हा प्रेक्षकवर्ग तरुण असावा यासाठी नाटकाच्या निर्मितीतूनही प्रयत्न सुरू असताना आता जीएसटीचे भूत मानगुटीवर बसलेले आहे. त्यातही जीएसटीच्या निर्णयानंतर कालिदास कलामंदिराचे भाडे मात्र वाढविण्यात आले आहे. त्यामुळे २५० रुपये तिकीट कसे परवडणार हा मोठा प्रश्नच असल्याचे नाट्य व्यवस्थापकांचे म्हणणे आहे.
याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा सुरू असून जीएसटी कमी करण्याबाबत त्यांना निवेदन देण्यात आले आहे. जीएसटी बंद नाही तर कमी करावा अशी ती मागणी आहे, त्यामुळे त्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता असल्याचे नाट्यव्यवस्थापकांनी सांगितले. तसे झाल्यास एकूणच परर्फार्मिंग आर्टला त्याचा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणावासीयांची भागेना तहान!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरासह परिसरात नगरपालिकेकडून होणारा नळपाणीपुरवठा तब्बल दहा दिवसांआड होऊन देखील नळांना पुरेसे व मुबलक पाणी येत नाही. शहरातील पिण्याच्या पाण्याची आणीबाणी लक्षात घेऊनदेखील पालिका प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहेत.

सटाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केळझर धरणातील जलसाठा संपुष्टात आला आहे. यामुळे आरम नदीपात्र कोरडेठाक झाले आहे. तसेच, शहरातील आरम नदीपात्रालगतच्या पाणीपुरवठा करण्याऱ्या विहिरीचे उद्भव बंद झालेले आहेत. परिणामी जून महिना उलटूनदेखील शहराला ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहेत. ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रदेखील कोरडेठाक झाले आहे. चणकापूरमधील पाण्याचे आवर्तन सुटल्यावर गिरणा नदी दुथडी भरून वाहते. त्यावेळी सटाणा शहराला दिलासा मिळतो. मात्र यावेळी १५ जूनचे आर्वतन मालेगावकरांनी उशिरा घेण्याचा निर्णय घेतल्याने शहरात जून महिन्यापासून पाण्याची आस लागून आहे. मालेगाववासीय ज्या वेळेस चणकापूरचे आवर्तन घेतील, त्यावेळी शहरवासीयांना पाण्याचा लाभ मिळणाार असला तरीही सद्यस्थितीत शहरात तीव्र परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहरात बहुतांश भागात विंधन विहिरी असल्याने मध्यवर्ती गावात दुष्काळसदृश स्थिती जाणवत नाही. मात्र शहरातील नववसाहत परिसरात नळकनेक्शन अद्याप पोहचलेले नाहीत. मात्र, काही ठिकाणी नळकनेक्शन असूनही जलकुंभ भरत नसल्याने पाणीपुरवठा करणे अशक्य झालेले आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांवर खासगी टँकर विकत घेणे अथवा पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पालिका प्रशासनाने शहरातील जलकुंभनिहाय विभाग करून दहा दिवसांआड तब्बल नऊ लक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला असला तरीही तो तोकडा पडत आहे.

नामपूरला भूजल पातळीत घट

नामपूर शहर परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने भूजल पातळीत घट होऊन विहिरींना तळ गाठला आहे. मोसम नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने शहराला तब्बल दहा ते अकरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नामपूरकरांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाण्यासाठी दाही दिशा वणवण भटकण्याची वेळ महिलांवर येऊन ठेपली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासगी टँकरद्वारा नागरिक आपली तहान भागवत आहेत. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईची धग वाढली आहे.

शहरातील जनतेला विभागनिहाय पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचा प्रयत्न सुरू असला तरीही चणकापूरचे आवर्तन लांबल्याने टंचाई जाणवत आहे. आवर्तन सुटल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

- सुनील मोरे, नगराध्यक्ष स.न.पा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत असताना चांदवड तालुक्यातील दह्याणे येथील अशोक दिनकर भवर (वय ३९) या शेतकऱ्याने मंगळवारी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्यामागे वडील, भाऊ, आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एकत्र कुटुंबातील भवर कुटुंबप्रमुख होते. त्यांच्या नावावर तीन लाख ३० हजार, भाऊ भरत त्यांच्या नावे चार लाख २० हजार, तर आई ताराबाई यांच्या नावे ३ लाख ५७ हजार असे एकूण १२ लाख ४२ हजार रुपये सोसायटीचे कर्ज आहे. कर्जमाफीचा फायदा न झाल्याने भवर यांनी आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images