Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

वेळेत ताबा न दिल्याने बिल्डरला दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सदनिकेचा ताबा व खरेदी खत वेळेत न दिल्यामुळे जिल्हा ग्राहक न्यायमंचाने बिल्डरला दोन महिन्यात सदनिकेचा ताबा देण्याचे तसेच हस्तांतरण दस्त तयार करुन देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे जून २०१३ पासून १६ लाख ६ हजार ५०० रुपये या सदनिकेच्या किमतीवर १८ टक्के व्याज देण्याचेही आदेश दिलेत. शिवाय शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाच्या खर्चाचे पाच हजार रुपये असा पंधरा हजारांचा दंडही ठोठावला.
बिल्डर मे. साधना शेल्टर क्राफ्ट विरुध्द ज्योती गुलशन वर्मा यांनी ग्राहक न्यायमंचात तक्रार केल्यानंतर हा निकाल देण्यात आला. या तक्रारीत वर्मा यांनी गंगापूर गावातील संगम अपार्टमेंट येथे जून २०१३ मध्ये १६ लाख ६ हजार ५०० रुपयांना सदनिका विकत घेतल्याचे म्हटले आहे. त्यासाठी करारनामा करण्यात आला. त्यात १५ मे २०१४ ला सदनिकेचा कब्जा व १५ नोव्हेंबर २०१४ रोजी खरेदीखताचा अंत‌मि दस्त देण्याचे ठरले. तसे न केल्यास १ जून २०१३ पासून व्याज देण्याचेही त्यात म्हटले होते. पण वरील करारनाम्यानुसार ताबा व खरेदीखत देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी न्यायमंचात तक्रार दाखल केली. या तक्रारीवर बिल्डरतर्फे बाजू मांडण्यात आली की, करारनामा केल्यावर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्याचे काम नाशिक महानगरपालिकेने कायदेशीर बाबीमुळे थांबवले. त्यामुळे खरेदीखत देता आले नाही. त्यात आमचा काही दोष नाही. त्याबरोबरच बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती व सतत चार वर्षे असलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे बांधकाम व्यवसाय ठप्प झाला. सेवा देण्याची कोणतीही कमतरता केली नाही, असे नमूद करण्यात आले.
या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने निकाल देताना सांगितले की, महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट अॅक्ट, १९६३ च्या कलम ४ नुसार करण्यात आलेल्या कराराच्या अटींप्रमाणे ताबा न दिल्यास तक्रारदार ग्राहक कलम ८ नुसार भरलेल्या रकमेचा परतावा मागू शकतो, अशी तरतूद आहे. या तरतुदीचा भंग केल्यामुळे बिल्डरने सेवा देण्यास कमतरता केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी दोन महिन्यात सदनिकेचा ताबा देऊन खरेदी खत करावे, १८ टक्क्यांप्रमाणे व्याज द्यावे. त्याचप्रमाणे शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार व अर्जाच्या खर्चाचे ५ हजार असे १५ हजार रुपये ग्राहकास अदा करावेत. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे - कुलकर्णी यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एफडीए लॅबचे भिजत घोंगडे

$
0
0

प्रस्ताव सात वर्षांपासून धूळ खात; फक्त वॉलकंपाउंडचे बांधकाम पूर्ण

नाशिक: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मुंगसरे येथील दोन एकर जागेत अत्याधुनिक लॅब उभारण्याचा प्रस्ताव तब्बल सात वर्षांपासून सरकार दरबारी धूळखात पडला आहे. नाशिकमधील अन्न पदार्थांची नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) आठ ते दहा वर्षांपासून बंद आहे. यामुळे येथील अन्नपदार्थ पुणे, मुंबई अथवा भोपाळला पाठवण्यात येतात. जागा उपलब्ध असताना इमारतीच्या बांधकामांच्या प्रस्तावावर हालचाल का होत नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो.

अन्न व औषध प्रशासनाचे काम थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंध‌ति आहे. दुर्दैवाने नाशिकमधील अन्नपदार्थ तपासणीची प्रयोगशाळा सुमारे १० वर्षांपासून बंद आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या आरोग्य प्रयोगशाळेत अन्नपदार्थांऐवजी केवळ पाण्याच्याच नमुन्यांची तपासणी केली जाते. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांची अन्न सुरक्षा नाशिकमधील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर अवलंबून आहे. एफडीएच्यावतीने पाचही जिल्ह्यांतील अन्न आणि औषधांचे नमुने वेळोवेळी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येतात. नाशिकमधील लॅब बंद पडल्याने अन्नपदार्थांचे नमुने मुंबई, पुणे तसेच भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. या नमुन्यांची १४ दिवसांत तपासणी होऊन त्याचा अहवाल अपेक्षित असताना प्रत्यक्षात या प्रयोगशाळांवर असलेल्या भारामुळे साधारण दीड महिना किंवा त्यापेक्षा अधिक काळानंतर नमुन्यांचा अहवाल प्राप्त होतो. यामुळे एफडीएकडून कारवाईलाही विलंब होतो. तत्कालीन जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी ही अडचण लक्षात घेऊन मुंगसरे येथील गट क्रमांक १६६मधील दोन एकर जागा २३ नोव्हेंबर २०११ रोजी एफडीएला दिली. या जागेत अत्याधुनिक लॅब तसेच स्टोअरेज व्यवस्था उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शासन दरबारी पाठवला. मात्र, त्याचा तितकासा उपयोग होताना दिसत नाही. सध्या या जागेवर वॉलकंपाउडंचे काम पूर्ण करण्यात आले असून, प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर इमारतीचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे.

आरोग्याशी संबंधित कामाला प्राधान्य कधी?

२०११ मध्ये मुंगसरे येथे एफडीएला जागा मिळाली. गत सात वर्षांत कसेतरी वॉल कंपाउंडचे काम पूर्ण झाले. दुसरीकडे इतर विभागातील कोट्यवधी रुपयांचे अनेक प्रस्ताव मार्गी लागले. टोलेजंग इमारती उभ्या राहिल्यात. मग, नागरिकांच्या आरोग्याशी संबंध‌ति कामाला प्राधान्य का मिळत नाही, राज्य सरकारने जाणीवपूर्वक हा प्रश्न रेंगाळत ठेवला आहे की एफडीए अधिकाऱ्यांना ही जबाबदारीच नको आहे, असे अनेक प्रश्न या दिरंगाईमुळे समोर येत आहेत.

मुंगसरे येथील दोन एकर जागेत वॉल कंपाउंडचे पूर्ण झाले आहे. या जागेत फूड लॅब तसेच गुदामाच्या इमारतीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला असून, लवकरच त्यास मंजुरी मिळू शकते. मंजुरी मिळाली की बांधकाम सुरू होईल.

- उदय वंजारी, सहआयुक्त, एफडीए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे श्रीनिवासन यांच्याकडून सोलो रॅम पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळाली कॅम्प येथे पोस्टिंगवर असलेल्या आर्मीच्या श्रीनिवासन गोकुळनाथ यांनी अमेरिकेतील मानाची रॅम ही स्पर्धा सोलो प्रकारात पूर्ण केली असून, असा बहुमान मिळवणारे ते भारतातील पहिले खेळाडू ठरले आहेत. बारा दिवसांत पूर्ण करावयाची ही स्पर्धा त्यांनी ११ दिवस १८ तासांत पूर्ण करून विक्रम केला आहे. त्यांच्या पाठोपाठ नागपूरचे अमित समर्थ होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नकारात्मकतेपासून राहा दूर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राग, द्वेष, क्रोध, भीती आदी नकारात्मक गोष्टींमुळे शरीरात विषारी रसायने तयार होतात, विविध आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे आपल्यातील नकारात्मकतेला नाही म्हणायला शिका. राजयोगाच्या माध्यमातून ‘स्व’ला जाणा. जीवनाच्या प्रत्येक घटनेचा आनंद लुटा, असे प्रतिपादन माउंट अबू येथील प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाचे मेडिकल विंगचे सहसचिव आणि राजयोग शिक्षक डॉ. प्रेम मसंद यांनी केले. यावेळी त्यांनी राजयोगाची प्रात्यक्षिकेही उपस्थितांकडून करवून घेतली.

प्रजापिता ब्रह्मकुमारीतर्फे गंगापूररोडच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रेम मसंद यांचे आरोग्यदायी जीवनशैलीवर व्याख्यान झाले. ब्रह्मकुमारी संस्थेच्या नाशिकच्या संचालिका ब्रह्मकुमारी वासंतीदीदी, गंगापूररोडच्या मनीषादीदी, ब्रह्माकुमारी आरतीदीदी, प्राचार्य डॉ. के. एस. होळकर प्रमुख पाहुणे होते. डॉ. मसंद म्हणाले, की स्वास्थ्य म्हणेज स्व आणि अस्था. स्व म्हणजेच आत्मजागृती होय. आज वैद्यकीय क्षेत्रालाही स्वचे महत्त्व समजले आहे. सकाळी उठल्याबरोबर स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आय एम दी बेस्ट, मी आज सकारात्मक व उत्साही राहणार, असे मनावर बिंबवा. वर्तमानात जगा. मोठी व सकारात्मक स्वप्ने बघा. स्वप्ने बघितल्याने मनात तसे प्रोग्रामिंग होते आणि मन योग्य दिशेने कार्यान्वित होते, असेही ते म्हणाले. प्रा. सतीश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद कापसे यांनी आभार मानले.

--

पाय हे दुसरे हृदयच

व्ही. एन. नाईक कॉलेजमध्येही डॉ. मसंद यांचा कार्यक्रम झाला. त्यावेळी उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, प्राचार्य डॉ. डी. बी. भंगाल व प्राचार्य बी. जी. वाघ आदी उपस्थित होते. डॉ. मसंद म्हणाले, की पाय हे एक प्रकारे दुसरे हृदयच आहे. हृदयाप्रमाणे पाय नेहमीच चालत राहिले पाहिजेत. पाय चालले, तर हृदय चालेल. पाय गरम, पोट नरम, डोके शांत हे सुखी व स्वस्थ जीवनाचे सूत्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलाठ्यास मारहाण; माजी सभापतीस अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

वाळू चोरीस मज्जाव करणाऱ्या तलाठ्यास बेदम मारहाण करून त्याच्या खिशातील सात हजार रुपायांची लूट केल्याप्रकरणी बागलाण पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत भामरे यांच्याविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तसेच भामरे यांच्या दोघा मुलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही मुले फरार असून न्यायालयाने भामरे यांना तीन दिवसांची पोल‌िस कोठडी सुनावली आहे.

बागलाणचे तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी वाळू तस्करी विरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री या मोहिमेवर लखमापूर येथील तलाठी भाऊसाहेब देवकाते यांना वनोली परिसरात गस्तीवर असतांना ताहाराबाद वनोली फाट्याजवळ एक टॅक्ट्रर विनापरवाना वाळू वाहतूक करतांना आढळले. देवकाते यांनी त्यास पकडून वाळू वाहतुकीस मज्जाव केला असता बागलाण पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपसभापती वसंत भामरे, हेमंत वसंत भामरे, वैभव कडू धोंडगे यांनी देवकाते यांच्यावर हल्ला चढवून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील सहा हजार रुपयांची रोकड व घड्याळ लंपास केले. ‘वाळू वाहतूक करण्यास अडवा आल्यास तुला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकीही मारेकऱ्यांनी दिली. या घटनेची जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी. व पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी गंभीर दखल घेतली. तहसीलदार सुनील सौंदाणे, पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी संबंध‌ितांवर गुन्हा दाखल करून भामरे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवासांची पोल‌िस कोठडी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुका म्हणे धावा, आहे पंढरी विसावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्टच्या पंढरपूर सायकल वारीदरम्यान सायकल रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावाने रंगला. पहिल्यांदाच झालेला हा सोहळा पंढरपूरजवळील खेडलेकर महाराज पटांगणातील ५० फुटी विठ्ठल मूर्तीच्या समोरील जागेत करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन घेऊन ही वारी नाशिककडे परतली.
सायकल वारी शनिवारी टेंभूर्णी गावात पोहचली. येथे रात्रीचा मुक्काम झाल्यानंतर सकाळी सात वाजता वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रयाण केले. विठुरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या सायकलिस्टच्या वारकऱ्यांनी रिंगण सोहळा पूर्ण केला. रिंगण सोहळ्यात सायकलिस्ट वारकऱ्यांनी विठ्ठल रखुमाईचे कौतुक भजने म्हणत, भगवा झेंडा नाचवत, फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. प्रथम विठ्ठलाची आरती करत सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर रिंगणाच्या मध्यभागी झेंडा रोवण्यात आला. प्रथम लहान मुले-मुली नंतर महिला आणि त्यानंतर ज्यांनी सायकलवर संपूर्ण वारी पूर्ण केली अशा वारकऱ्यांना रिंगणात सायकल चालविण्याची संधी देण्यात आली. सायकलवर रिंगण हा प्रकार वारकऱ्यांसाठी नवीन असल्याने त्यांनीदेखील याचा आनंद घेतला. ‘माऊली-माऊली’चा जयघोष करीत रस्त्याने चालणारे वारकरी सायकलिस्टला उत्तेजन देत होते.
या सोहळ्यामुळे सायकलिस्टचा सायकलिंगमुळे आलेला थकवा लगेचच गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सायकल रिंगण सोहळा यशस्वी करण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष जसपाल सिंग बिर्दी, शैलेश राजहंस, योगेश शिंदे, मिलिंद धोपावकर, तुकाराम नवले, श्रीकांत जोशी, आदींनी परिश्रम घेतले. तीन दिवसांच्या या पंढरपूर सायकल वारीदरम्यान मिळालेल्या उत्तम जेवणाचे कौतुक प्रत्येकाने केले. सायकलिंग करणाऱ्या खेळाडूला मिळणारा परिपूर्ण आहार यावेळी सर्वांना देण्यात आला. प्रत्येकी ३० किलोमीटरवर जेवण, नाश्ता, पाणी, फळे यांचा बंदोबस्त करण्यात आला होता. रायडिंग केल्यानंतर शरीरातील साखर, कोलेस्टेरॉल, टार्फ यांची कमी भरून निघावी यासाठी गोड पदार्थ, कडधान्ये, पौष्ट‌कि आहार यांवर भर देण्यात आला होता. जेवणाची उत्तम व्यवस्था राखण्याचे काम नाशिक सायकलिस्टचे तुकाराम नवले यांनी पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकलचा ‘कट ऑफ’ वाढणार!

$
0
0

विद्यार्थ्यांना बुधवारपासून करता येणार नोंदणी

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेच्या लागलेल्या चांगल्या निकालामुळे या परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या आकडेवारीतही भर पडण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. ‘नीट’ अभ्यासार्थींच्या वर्तुळातील अंदाजानुसार यंदा एमबीबीएससाठी खुल्या प्रवर्गातील कट ऑफ ४५० तर बीडीएससाठीचा कट ऑफ ४०० च्या दरम्यान जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नीट परीक्षा यंदा तिसऱ्यांदा पार पडली आहे. सन २०१३ , २०१६ आणि २०१७ मध्ये परीक्षा झाली. गतवेळेपर्यंत ७२० पैकी ३५० गुणांपर्यंत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा मात्र दुपटीपेक्षाही अधिक झाली आहे. यंदा ३५० ते ३६० गुणांचा आकडा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का राज्यात वाढल्याने यंदा एमबीबीएस अन बीडीएसचा कट ऑफ वाढण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. यंदा १० लाख ९० हजार ८५ परीक्षार्थींपैकी ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी देशातील शासकीय आणि खासगी कॉलेजांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच आदी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. राज्यातून सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी ‘स्टेट मेरिट लिस्ट’मध्ये एमबीबीएस प्रवेशासासाठी दोन हजार ९३, तर बीडीएस प्रवेशासाठी दोन हजार ५०० अंतिम क्रमांक होता.

यंदा सुमारे ४२५ पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यातील सरकारी कॉलेजांमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. तर, बीडीएस प्रवेशासाठी ४००च्या आसपास गुण लागण्याची शक्यता आहे. राज्यात बीडीएस प्रवेशासाठी सुमारे पाच हजार, तर एमबीबीएससाठी सहा हजार ८८० जागा आहेत.

बुधवारपासून नोंदणी

राज्यातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया यंदा ‘नीट’च्या गुणांवर होणार आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) प्रवेश प्रक्रियेचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रिया २८ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येईल. कॉलेजांचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया २४ जुलैनंतर सुरू होईल. विद्यार्थ्यांना www.dmer.org या वेबसाइटवरून प्रवेश अर्जासाठी २८ जून ते ७ जुलै या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीनुसार विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी १२ जुलैला वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनस्थानतर्फे कथकचा ‘सृजन’ नृत्याविष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनस्थान व्हॉट्सअॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या जनस्थान फेस्टिव्हलचा शनिवारी (दि. २४) समारोप झाला. ‘सृजन’ हा नृत्याचा कार्यक्रम यावेळी विद्या देशपांडे, सुमुखी अथणी आणि कीर्ती भवाळकर यांनी सादर केला.

कार्यक्रमाची सुरुवात सुमुखी अथनी यांनी 'एकदंत गजानन' ही गणेशवंदना सादर केली. कीर्ती भवाळकर यांनी 'वंदे शुभम् सुंदरम्' ही शिववंदना तर विद्या देशपांडे यांनी 'गुरुजी मे तो एक निरंतर धाऊजी' ही गुरुवंदना सादर केली. त्यानंतर कार्यक्रमात सुमुखी अथनी, विद्या देशपांडे व कीर्ती भवाळकर यांनी त्यांच्या विद्यार्थिनींसमवेत नृत्य सादर केले. विद्या देशपांडे यांनी केलेल्या यक्षयज्ञातून सती याचे दर्शन घडवले. तर सुमुखी अथनी यांनी भजन, ठुमरी, आरोह एक अनुभूतीचे सादरीकरण केले. 'अवघा रंग एकचि झाला' याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मोहन उपासनी (बासरी), नितीन पवार (तबला), सुभाष दसककर (संवादिनी), समीर देशपांडे (गायन) याकलावंतांनी साथसंगत केली. अपर्णा क्षेमकल्याणी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वंचित शेतकऱ्यांसाठी लढणार

$
0
0

टीम मटा, नाशिक

कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा विदर्भ, मराठवाड्याला होणार आहे. सरकारने काही नियम टाकल्याने नाशिक आणि नगर भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती आहे. मात्र, सर्वांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी तुम्हाला आश्वस्त करतो, कर्जमाफीचा लाभ मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. ज्यांना कर्जमाफी मिळणार नाही, त्या वंचित शेतकऱ्यांसाठी शिवसेना पुन्हा लढणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी नाशिक जिल्ह्यात मेळावे घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिंपळगाव बसवंत, निफाड, येवला येथे मेळावे घेऊन ठाकरे यांनी सरकारवर टीका करतानाच शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही या वेळी दिली.

येवला ः कर्जमाफीच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करताना ठाकरे म्हणाले, की सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबतच्या निर्णयाचा या भागातील शेतकऱ्यांना काहीच लाभ झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या मनात असंतोष आहे. कर्जमाफीच्या निर्णयाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला असला, तरी आंदोलनात ज्यांनी ठिणगी टाकली तोच शेतकरी वंचित राहिला आहे. जे वंचित राहिले आहेत त्यांचे काय करणार, असा प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत. ३४ हजार कोटी शेतकऱ्यांपैकी ४० लाख शेतकरी कर्जमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री सांगतात. ज्यांना कर्जमाफी झाली नाही त्यांच्याही पदरात अभ्यास करून तुम्हाला कर्जमाफी टाकावीच लागेल. न्याय द्यावाच लागेल, असे स्पष्ट करत वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सरकारकडे रेटा लावणार आहे. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या नाटेगाव (ता. कोपरगाव) येथील शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला स्थानिक शिवसेनेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी येथील माजी सरपंच विजय भोरकडे यांनी गावाच्या प्रथेप्रमाणे गावाकडून भेट म्हणून नारळाचे रोपटे ठाकरे यांना दिले.

शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास भाग पाडणार

येवला ः शेतकरी आंदोलनाची ठिणगी पुणतांब्याला पडली, मात्र तिला वणवा करण्याचे काम या भागातील शेतकऱ्यांनी केले. आंदोलनामध्ये शेतकऱ्यांवर दाखल झालेले गंभीर गुन्हे मागे घेण्यास सरकारला भाग पाडू. जर एखाद्या शेतकऱ्यावरील गुन्हा मागे घेतला गेला नाही तर मी आणि सरकार बघून घेईन. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर गुन्हे नोंदवले असतील त्यांची यादी मला द्या. ते रद्द करायची जबाबदारी माझी- शिवसेनेची आहे. तुम्ही धीर सोडू नका. शिवसेना तुमच्यासोबत आहे, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी रविवारी येवल्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

द्राक्ष उत्पादकांच्या कर्जमाफीसाठी लढणार

निफाड ः सरकारने कालपरवा जाहीर केलेली कर्जमाफी ही शिवसेनेच्या रेट्यामुळे झाली आहे. शेतकऱ्यांनी आणि शिवसेनेने सरकारला ही कर्जमाफीला द्यायला भाग पाडले. परंतु कर्जमाफीमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या पदरात फार काही पडले नाही, याची शिवसेनेला जाणीव आहे. यासाठी शिवसेना पुन्हा लढणार आहे. सरळ मार्गाने मागण्या मान्य न झाल्यास काय करायचे, हे मला माहीत असल्याचा इशारा पिंपळगाव बसवंत येथील संवाद यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘शेतकरी एकजुटीचाच विजय’

येवला ः ‍कर्जमाफीच्या निर्णयानंतरही अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहतात. अशा शेतकऱ्यांसाठीही शिवसेना नक्कीच सरकारकडे पाठपुरावा करेल. दरम्यान, सरकारला करावी लागलेली कर्जमाफीची घोषणा हा शेतकऱ्यांच्या एकजूटीचाच विजय आहे , असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांवर निर्णय लादू नये

$
0
0

गुणवंतांच्या गौरवाप्रसंगी शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरेंचे प्रतिपादन

म.टा.वृत्तसेवा,आडगाव

पालकांनी स्वतःचे निर्णय विद्यार्थ्यांवर लादू नये तर त्यांच्याकडे असलेल्या सुप्त गुणांचा उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीदेखील ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटीने काम करणे गरजेचे असून, आपल्याला मिळालेल्या यशात शिक्षक व पालक यांचा बहुमोल वाटा असतोच पण सामाजिक संस्थांचाही हातभार महत्त्वाचा असल्याचेही ते म्हणाले. संस्थांकडून झालेल्या गौरवामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास बळकट होतो, असे मतही अहिरे यांनी व्यक्त केले. जनहित मराठा बहुउद्देशीय समिती संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थी गौरव व आडगाव भूषण पुरस्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते.

जनहित मराठा बहुउद्देशीय समिती यांच्यावतीने आडगावमधील मारुती मंदिर सभागृह येथे रविवारी (दि. २५) गुणवंत विद्यार्थी गौरव व आडगाव भूषण पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक सुनील पुजारी, नगरसेविका शितल माळोदे, प्राचार्य प्रकाश कडवे, डॉ. हरीश आडके, निवृत्त पोलिस उपायुक्त आनंदराव जाधव, विलास शिंदे, डॉ. सुनील लभडे, जे. टी शिंदे, मल्हारी मते, नरेंद्र पाटील, समितीचे अध्यक्ष पोपटराव लभडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश कडवे यांनी बोलताना दहावी आणि बारावी हे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष असल्याचे सांगितले. त्यामुळे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यात करिअर करावे. डॉ. अडके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश शिंदे यांनी केले तर आभार अभय माळोदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रवींद्र लभडे, राजेश शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, गहिनु शिंदे, सतीश माळोदे, सचिन मते, संदीप लभडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी ,पालक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


'आडगाव भूषण' पुरस्कारांचे वितरण

या कार्यक्रमात आडगाव भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक आदी क्षेत्रातील उल्लेखनीय काम केल्याबद्दल दिवंगत सिताराम लभडे, दिवंगत निवृत्ती मते यांना मरणोत्तर आडगाव भूषण पुरस्काराने तर अनंत जाधव व भाईपुंजा माळोदे यांनादेखील आडगाव भूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिणे घाट बहरला…

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबक शहरापासून जवळच असलेल्या घोटी-देवगाव रस्त्यावरील पहिणे घाटातील निसर्गसौंदर्य पहिल्याच पावसाने खुलले आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे या घाटातील लहान धबधबे, झरे जीवंत झाले आहेत. त्यामुळे रविवारची सुटी घालविण्यासाठी पर्यटकांची मोठी जत्रा या परिसरात भरली होती.
शनिवारी पहाटेपासूनच कोसळणाऱ्या पावसाने सर्वसामान्यांप्रमाणे रविवारी सुटी घेतली. त्यामुळे पहिण घाट परिसरातील डोंगरावर धुक्याची झालर आणि काही प्रमाणात प्रवाही झाले होते. अधूनमधून अंगावर उडणारे तुषार आणि समोर पहूडलेला ब्रह्मगिरीमुळे विलोभनीय दृष्य पर्यटकांना आनंदी करीत होते. शनिवार, रविवार आणि सोमवार सलग सुटी आल्याने रिलॅक्स मुडमध्ये निसर्गसहलीचा आनंद घेण्यासाठी पहिणे पसिरास चांगली पसंती मिळाली आहे. शनिवारच्या पावसामुळे घाटातील ओहळ आणि नाले वाहायला लागले आहेत. गत आठवड्यात झालेल्या वळवाच्या पावसाने डोंगरकपारीला हिरवी माया चढली आहे. धुक्यांनी व्यापलेली पर्वतराईच्या सानिध्यात हिरवळीवर बसून सोबत आणलेला फराळ करण्याची मजा आणि सोबत असलेल्या सेलफोन मध्ये निसर्ग टिपण्याचा आनंद घेतांना पर्यटक भान विसरले होते.

गत काही वर्षांपासून या भागात मासांहारी जेवण देणाऱ्या हॉटेल व्यवसायीकांची संख्या वाढली आहे. त्र्यंबकपासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेला हा परिसर वाडीवऱ्हे पोल‌िस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पूर्वी काही प्रमाणात इकडे दुर्लक्ष झाले. गत वर्षांपासून पोल‌िसांनी या भागावर नजर ठेवण्यास सुरूवात केल्याने टवाळखोर मद्यपींना जरब बसली आहे. रविवारी पोल‌िस उपनिरीक्षक सार्थक नेहते, हवालदार बी. डी. सोनवणे, भाऊसाहेब भगत, राजू पगारे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष उत्पादकांच्या पाठीशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड, पिंपळगाव बसवंत

सरकारने कालपरवा जाहीर केलेली कर्जमाफी ही शिवसेनेच्या रेट्यामुळे झाली आहे. शेतकऱ्यांनी आणि शिवसेनेने सरकारला ही कर्जमाफीला द्यायला भाग पाडले. परंतु कर्जमाफीमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या पदरात फार काही पडले नाही, याची शिवसेनेला जाणीव आहे. यासाठी शिवसेना पुन्हा लढणार आहे. सरळ मार्गाने मागण्या मान्य न झाल्यास काय करायचे, हे मला माहीत असल्याचा इशारा पिंपळगाव बसवंत येथील संवाद यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शेतकरी संवादला रविवारी निफाड तालुक्यातून सुरुवात झाली. ठाकरे यांनी कर्जमाफीचे निकष, संपकाळात शेतकऱ्यांवरील गुन्हे, नोटबंदी यावर ठाकरे शैलीत टीका केली. ठाकरे यांच्या सोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख सुहास सावंत, निफाडचे आमदार अनिल कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे सहभागी झाले होते.

पिंपळगाव बसवंत येथे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा विदर्भ, मराठवाडा या भागाला होणार आहे. त्यामुळे ठरवले असते तर अगोदर तिकडे जाऊन हारतुरे स्वीकारले असते. परंतु मी मुद्दाम या भागातून संवादयात्रेला सुरुवात करतोय. कारण सरकारने काही नियम टाकल्याने नाशिक आणि नगर भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही याची अशी माहिती आहे. परंतु मी तुम्हाला आश्वस्त करतो, कर्जमाफीचा लाभ मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.


निफाड येथे नियोजनात बदल करून बाजार समिती गेटवरच उद्धव ठाकरें बोलतील असे ठरले. पद्धतीने गेटवर जमा झालेले शेतकरी व शिवसैनिक यांच्याशी उद्धव ठाकरे बोलत असताना अनेकानी त्यांना सभागृहातच चला, असा आग्रह धरल्याने अखेर उद्धव ठाकरे बाजार समितीच्या सभागृहात आल्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्यांनी धीर धरा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन केले.

शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

नैताळे गावाच्या वेशीजवळ ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी रतन बोरगुडे या शेतकऱ्याने आंदोलन काळात पोलिसांनी घरात घुसून केलेली अमानुष मारहाण, शेतकऱ्यांवर दाखल केलेले दरोड्याचे गुन्हे याबाबत कैफियत मांडली. आमदार अनिल कदम यांनी कर्जमाफीची तारीख ३० जून २०१६ ऐवजी २०१७ करावी, अशी मागणी केली. यावेळी भास्करराव बनकर, पंडितराव आहेर, शिवा सुराशे, सोमनाथ पानगव्हाणे उपस्थित होते

मुख्यमंत्र्यांना कळेल का?

निफाड येथे शेतकऱ्यांच्या मागण्या असलेल्या निवेदनाची फाइल जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. तेव्हा या मागण्या मला समजतील. पण मुख्यमंत्र्यांना समजतील का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी मारला आणि सभागृहात एकच हशा उसळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ज्ञान अन् कौशल्य हीच खरी शिदोरी’

$
0
0

व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विद्याशाखेत केवळ अकॅडमिक्स उपयुक्त नाही. त्या सोबतीलाच विद्यमान जागतिक प्रवाहांचा अभ्यासही अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. हा समतोल साधला गेल्यास व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी आहेत, असा विश्वास महात्मा गांधी विद्यामंदिरच्या एमबीए इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. अशोक अग्रवाल यांनी ‘मटा’ शी बोलताना व्यक्त केला.

आपल्या इन्स्टिट्यूटचे वेगळेपण काय सांगाल?

विद्यापीठ अनुदान आयोगा (युजीसी) च्या वतीने संशोधन केंद्र म्हणूनही या संस्थेला मान्यता दिली आहे. सन १९९४ पासून ही इन्स्टिट्यूट कार्यरत असल्याने या क्षेत्रातील मोठा अनुभव येथील स्टाफच्या गाठीशी आहे. फायनान्स, मार्केटिंग या विषयांच्या सोबतीलाच इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटसारखे बाजारपेठेच्या दिशेने चालणारे अभ्यासक्रमही येथे राबविले जातात.

गेल्या काही कालावधीतील संस्थेची मोठी अचिव्हमेंट?

सातत्याने लागणारा उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्लेसमेंट ही मोठी अचिव्हहमेंट आम्ही समजतो. पण त्या ही पलिकडे जाऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षापर्यंत या संस्थेच्या १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केले आहे.

अकॅडमिक्स आणि प्रत्यक्षात बाजारपेठेची मागणी यात समतोल कसा साधतात?

वर्गात शिक्षण देताना विद्यापीठ किंवा युजीसीच्या तत्त्वांनुसारच जावे लागते. मात्र बाजारपेठेची दिशा अभ्यासता विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडू नयेत, यासाठी काही अल्पावधीचेही अभ्यासक्रम तयार केले आहेत. बाजारपेठेची मागणी असेल त्या प्रमाणे हे अभ्यासक्रम ‌डिझाइन केले जातात. त्या अभ्यासक्रमांची जोड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरची आणखी दालने खुली होतात.

आगामी शैक्षणिक वर्षात कोणते नवीन उपक्रम नियोजित आहेत?

बाजारपेठेमध्ये मनुष्यबळाच्या गरजा जागतिक प्रवाहानुसार बदलतात. यादृष्टीने आगामी काही वर्षांचा अंदाज घेऊन भविष्यात मागणी असणारे प्रशिक्षणाचे उपक्रम स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यासाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांगल्या विद्यापीठांशी उपक्रमांबाबत करार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात काय सांगाल?

पदव्युत्तर शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व संसाधने आणि नियंत्रण करणाऱ्या संस्थांना अपेक्षित गुणवत्ता असणारा स्टाफ उपलब्ध आहेत. यात इ‌‌न्स्टिट्यूटमध्ये १५ हजारांवर पुस्तके, २०० कॉम्प्युटर्स, होस्टेल फॅसिलीटी, सहा मजली इमारत, संलग्न असणारे २५ रिसर्च गाईड आदी गरजेच्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने काय?

व्यवस्थापनाचा विषय व्यापक आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना आपल्या निवासी शहरात कामामध्ये स्थिर झाल्यानंतर जगाच्या अद्ययावत प्रवाहांचे ज्ञान राहत नाही. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना हे परवडणारे नाही. जागतिक प्रवाह सातत्याने बदलताहेत. या बदलत्या प्रवाहांमध्ये आपण ज्ञान आणि कौशल्यांच्या दृष्टीने अद्ययावत राहण्याचे मोठे आव्हान आहे.

विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?

बाजारपेठतील नवनवे प्रवाह अभ्यासत ते आत्मसात करण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे. ज्ञान आणि कौशल्यांना सातत्याने अद्ययावत करायला आपण शिकलो पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज पूर्ण होणार ‘रॅम’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जगातील सर्वात अवघड सायकल रेसपैकी एक ‘रेस अॅक्रॉस ऑफ अमेरिका’ (रॅम) या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत डॉ. राजेंद्र नेहेते व डॉ. रमाकांत पाटील हे नाशिककर पुन्हा एकदा आज इतिहास रचणार असून, मानाची समजली जाणारी रेस पूर्ण करणार आहेत.
ही स्पर्धा १७ ते २६ जूनदरम्यान आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार ३ हजार १४५ मैलांपैकी ३५० मैल अंतर पार करणे बाकी होते. डॉ. महेंद्र महाजन व हितेंद्र महाजन या बंधूंनंतर डॉ. राजेंद्र नेहते व डॉ. रमाकांत पाटील हे दुसरे भारतीय ठरणार आहेत. त्यांनी तयार केलेल्या सह्याद्री टीममध्ये इंग्लंड येथील डॉ. संदीप शेवाळे व मुंबईचे पंकज मारलेशा हेही आहेत. या चौघा सायकलपटूंना ४८०० किमी एवढे अंतर सुमारे २१६ तासांत पूर्ण करावे लागणार होते. या प्रवासात सायकलपटूंना १२ राज्यांचा प्रवास करताना १ लाख ७० हजार फूट चढाई करावी लागली.
रिले पद्धतीने होणारी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सायकलपटूंना दररोज ५५० किमी अंतर कापावे लागले. वातावरणातील विषमतेसोबतच रहदारीच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करावे लागले.
एकदा नियम तोडला तर १५ ते ६० मिनिटांचा वेळ कापला जातो आणि सहापेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका असतो.
या स्पर्धेत स्पर्धकांइतकीच सपोर्ट टीमची भूमिकाही महत्वाची असते. २०१५ मध्ये पेनल्टीचा एकही गुण जाऊ न देण्याचा विक्रम करणाऱ्या सपोर्ट टीमचे प्रमुख डॉ. सुनील वर्तक यंदाच्या टीम बरोबरही सहभागी झाले होते.
बदलते वातावरण हा या स्पर्धेतील अत्यंत आव्हानात्मक घटक असून, त्याकरिता खाण्यापिण्याच्या गरजांसह आहारात आवश्यक ते बदल केले होते. गत वर्षीचे रॅम विजेते डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन हे या टीमचे घटक असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदाही त्यांना मिळाला.
स्पर्धेत सहभागी झालेला सह्याद्री संघ
चालक - डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील (नाशिक), डॉ. संदीप शेवाळे (इंग्लंड), पंकज मारलेशा (मुंबई)

टीममधील सदस्य
डॉ. सुनील वर्तक, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. बापू घोडके, डॉ. आशुतोष ठोळे, मोहिंदर सिंग (सर्व नाशिक), डॉ. परिक्षित गोगटे (पुणे), राहुल गुप्ते, अमोल पटवर्धन, पुष्कराज फाटक (तिघे अमेरिका), मधु जोशी, सचिन जपे (इंग्लंड), दीप उदेशी, नीलेश सातभाई (मुंबई), गजानन सहस्रबुद्धे (कॅनडा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिर्याणी’चा अस्वस्थ प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित ललित कला केंद्राच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘काफिला’ मार्फत नाशिकच्या नाट्यरसिकांसाठी रविवारी (दि.२५) परशुराम साइखेडकर नाट्यगृहात बिर्याणी व टायपिस्ट हे दोन दीर्घांक सादर करण्यात आले.

शिल्पा कांबळे लिखीत बिर्याणी ही कथा गोहत्या बंदी या विषयाला स्पर्शून जाते. राजकीय नाटक असले तरीही राजकीय संभाषण न करता सकिना व कुरमुरी या दोन गरीब बायकांची गोष्ट नाटकातून सांगितली आहे. सकिनाच्या नातवाचा सहा डिसेंबरला वाढदिवस असतो. त्यावेळी ती बिर्याणी करते. त्याच दिवशी तिच्या घरी रहात असलेली कुरमुरी आणि तिची गाय गायब होतात. पोलिस त्याचवेळी गोहत्येच्या आरोपावरून सकिनाला जेलमध्ये टाकतात. परंतु, सत्य मात्र वेगळे असते. कुरमुरीच सकिनाला जेलमधून परत आणते. या सगळ्यात दोघींचा फायदा घेण्यासाठी वजीरचा हात असतो.

टायपिस्ट नाटक हे मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे एखाद्याला इच्छा असूनही केवळ कुठलीही मोठी उडी घेण्याचे धाडस न झाल्याने होणारी परवड आणि त्या अनुषंगाने येणारी अस्वस्थता याविषयी भाष्य करते. या नाटकात एकीकडे बदलत्या काळाने समोर मांडून ठेवलेल्या सुखाच्या अगणित शक्यता आणि दुसरीकडे पायाखालची स्थिर जमीन सुटू न देण्याचे मध्यमवर्गीय संस्कार व नैतिक दबाव यात होरपळून निघत सतत एका अस्वस्थ अनुभवात जगणाऱ्या सामान्य माणसाचा प्रवास उलगडत जातो.

बिर्याणी या दीर्घांकाची निर्मिती शिल्पा कांबळे यांच्या मूळ कथेवर करण्यात आलेली असून, सर्वेश गिरे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. यात पूजा गोरे, अश्विनी पांडे, वैभव राजेंद्र, सर्वेश गिरे, वैभव देव, अपूर्वा कदम, रोहित कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत संयोजन प्रतीक जाधव याचे आहे. टापपिस्ट या मूळ नाटकाचे लेखक मुरे शिसगल असून, मराठी नाट्यरुपांतर सतीश आळेकर यांनी केलेले आहे. दिग्दर्शनाची धुरा अमोल पाटील यांनी सांभाळली असून प्रथमेश पुराणिक, सोनम म्हसवेकर हे या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही नाट्यप्रयोगांसाठी प्रकाश योजना संकेत सीमा विश्वासराव यांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अल्पवयीन मुलीचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका युवकावर विनयभंग तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना विनयनगर परिसरात घडली असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

रोशन बिरेंद्र बिके (वय १९, रा. अमेय कुंज सोसायटी, विनयनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पित्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार १६ मे रोजी त्यांची मुलगी ही विनयनगरच्या भाजी मार्केटमध्ये गेली होती. त्यावेळी संशयित बिके याने तिच्याशी बोलण्याचा बहाणा करून हात पकडला आणि अश्‍लिल हावभाव केले. लॉजवर येण्याची बळजबरी करीत त्याने पीडित मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्याने लागलीच तिच्या पालकांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरोधात विनयभंग तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा केला असून, त्यास अटक केली आहे.

मित्राच्याच घरात डल्ला

चौघा मित्रांनी मिळून एका मित्राच्याच घरात ३४ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पांडवलेणी परिसरात उघडकीस आली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रसिका अमोलिक, नीलेश पवार, रंजना रणधीर गायकवाड, रणधीर गायकवाड (सर्व रा. एकता व्हिल, पांडवलेणीजवळ, पाथर्डी शिवार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पराग अज्जुर अमोलिक (रा. जनशांती बंगला, कॅनडा कॉर्नर) यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सर्व संशियतांनी २७ मे ते २३ जून या दरम्यान पराग अमोलिक घरात नसताना त्यांच्या घरातील चांदीचे ताट-दोन ग्लास व रोख रक्कम असा ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयनगरला घरफोडी

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ५० हजारांचे दागिने चोरी केले. ही घटना विजयनगरमधील बजरंग चौकात घडल्याचे शनिवारी (दि.२४) उघडकीस आले. या प्रकरणी रमेश नानाभाऊ सूर्यवंशी (रा. विजयनगर, नवीन नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ते २४ जून दरम्यान सूर्यवंशी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच, लॉकरमधील ३२ ग्रॅमची सोन्याची चैन, २० ग्रॅमची सोन्याची पोत असा ५० हजार ५०० रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहे.

घरात घुसून २९ हजारांची लूट

अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये घुसून महिलेला शिवीगाळ करत तिघांनी कपाटातील २९ हजारांची रक्कम बळजबरीने लुटून नेली. ही घटना शुक्रवारी (ता.२३) दुपारी गंगापूर रोड परिसरात घडली. करूण विठ्ठल ठक्कर (रा. श्रीरंग मंगल अपार्टमेंट, गंगापूर रोड) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ठक्कर यांच्या फ्लॅटमध्ये त्यांची आई एकटी होती. त्यावेळी संशयित सोनाली हिरवे यांच्यासह तिचा भाऊ व एक साथीदार असे तिघे घरात घुसले. त्यांनी ठक्कर यांच्या आईला शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच घरातील कपाटात ठेवलेली २९ हजार ३०० रुपयांची रक्कम घेऊन गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी सरसावला पर्यावरणप्रेमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील एका पर्यावरणप्रेमी नागरिकाने घराच्या आवारातच रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. परिणामी पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य झाले असून, पाण्याची बचत करणेदेखील साध्य झाले आहे.

जेलरोड परिसरातील चंपानगरी येथे गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना जपून पाणी वापरण्याची सवय लागली आहे. येथील रो-हाउसमध्ये राहणारे सुरेश भालेराव यांनी आपल्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी यंदा वाया न जाऊ देण्याचा निर्धार करून घरीच रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नेटवरून, तसेच तज्ज्ञांकडून याबाबत माहिती मिळविली. त्यांची पाण्याची टाकी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला आहे. त्यातील नळाला महापालिकेचे पाणी येते. भालेराव यांनी गच्चीपासून टाकीपर्यंत पीव्हीसी पाइप टाकला. त्याला आणखी छोटा पाइप जोडून तो पाण्याच्या टाकीत सोडलेला आहे.

--

प्रयोगाचा झाला फायदा

गेल्या आठवड्यात नाशिकरोडला जोरदार पाऊस झाला. त्याचवेळी महापालिकेने चेहेडी येथील पाइपच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे दोन दिवस नाशिकरोडला पाणीपुरवठा झाला नाही. मात्र, भालेराव यांच्या प्रयोगामुळे गच्चीवरील पावसाचे पाणी त्यांच्या टाकीत साचले होते. त्याचा वापर त्यांना घरगुती कामांसाठी करता आला. पहिल्याच प्रयत्नात प्रयोगाला यश आल्याने त्यांनी इतरांनाही त्यासंदर्भात माहिती दिली. भालेराव हे ‘मटा’चे नियमित वाचक असून, काही दिवसांपूर्वी ‘मटा’मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगविषयी वाचले होते. त्यापासून प्रेरणा घेत हा प्रयोग राबविल्याचे त्यांनी सांगितले.

--

शासकीय कार्यालयांचे दुर्लक्ष

नाशिकरोड व जेलरोड परिसरात काही बिल्डर्सने नवीन इमारती बांधताना रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग केला आहे. जेलरोडला खासगी मिळकतधारकांनीही असे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, शहरातील अनेक शासकीय कार्यालयांनी सरकारचे निर्देश असतानाही रेनवॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. महापालिका नवीन बांधकामांना परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करते. परंतु, कोणीच गांभीर्याने अंमलबजावणी करीत नाही. शहरात अनेक खासगी मिळकतधारक व गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांनी गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी इमारतीशेजारी सुरक्षित खड्डा करून जिरविल्यास भूजलपातळीत नक्कीच वाढ होईल. तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातही हा प्रयोग यशस्वी होऊ शकेल, असे मत भालेराव यांनी व्यक्त केले.

--

सुरेश भालेराव यांचा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग अनुकरणीय आहे. पावसाचे वेळापत्रक अनिमयित आहे, हे लक्षात घेऊन पावसाचे पाणी वाया जाऊ न देता रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग राबवावेत.

-तुळशीदास इंगळे, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहविक्री व्यवसायावर छापा

$
0
0

बिटको चौकात कारवाई; आठ जण ताब्यात

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडच्या बिटको चौकातील एका गेस्ट हाऊसमध्ये देहविक्री व्यवसाय चालत असल्याचे पोलिस कारवाईतून उघड झाले आहे. देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या पाच महिला व तीन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय या गेस्ट हाऊसमध्ये काही मोबाइल फोनही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

बिटको चौकातील प्रकाश जंगम यांच्या मालकीच्या सदगुरू गेस्ट हाऊसमध्ये देहाविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदगुरु गेस्ट हाऊसवर रविवारी संध्याकाळी छापा टाकला असता देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेसह इतर चार महिला व तीन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या छाप्यात ताब्यात घेतलेल्या तीन पुरुषांत या गेस्ट हाऊसच्या मॅनेजरसह सैन्यदलातील एका जवानाचाही समावेश आहे. या करवाई प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर, पोलिस उपनिरीक्षक संध्या तेली यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लष्करी जवानांची पोलिस ठाण्यात धाव

सदगुरु गेस्ट हाऊसवरील पोलिस कारवाई दरम्यान तेथे आढळून आलेल्या लष्करी जवानांपैकी तीन लष्करी जवान फरार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांनी दिली. एक लष्करी जवान पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कारवाईची माहिती समजताच नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री काही लष्करी जवानांनी धाव घेत पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात वीजपुरवठा खंड‌ित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील कॅम्प रस्त्यालगत असलेल्या पार्वती प्लाझाजवळील जीर्ण झाड शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक कोसळले. विजेच्या तारांवरच हे झाड कोसळल्याने तीन खांबही पडले. त्यामुळे शहरातील कॅम्प रॉड, संगमेश्वर, सटाणा नाका परिसरात सोळा तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान विद्युत तारा व खांब दुरुस्तीकार्य शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू असल्याने रात्री वीजपुरवठा सुरळीत झाला.

शुक्रवारी रात्री वनविभागाच्या कार्यालयासमोरील असलेले हे जीर्ण झाड विजेच्या तारांवर कोसळल्याने नवदुर्गा अ‍ॅग्रो एजन्सीजवळील तीन विजेचे खांब वाकले. रात्रीचा वेळ असल्याचे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. झाड कोसळल्याने मात्र या परिसरात रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते .

याबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन केले. मात्र कुणीही फोन उचलला नाही. अखेर सकाळी खांब उभे करण्याबरोबर त्यावर वीजतारा ओढण्याच्या कामाला महावितरणकडून सुरुवात झाली. पावसाळा सुरू होण्याआधीच ही कामे करणे गरजेचे नव्हते का, असा प्रश्न आता परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमगिरी डोंगरावर बहरणार वृक्षवल्ली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सर्वत्र जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन वृक्ष लागवड असे अनेक उपक्रम शासन स्तरावर सुरू आहेत. मात्र स्वयंप्रेरणेने पर्यावरणासाठी लोकसहभाग देखील वाढला आहे. कळवणमधील युवकांनीही यात पुढाकार घेतला आहे. येथील चाळीस ते पन्नास तरुणांनी एकत्र येत ‘टीम ग्रीन रिव्हॅल्यूशन’ या ग्रुपच्या माध्यमातून रविवारी तालुक्यातील पाटविहीर या आदिवासी गावाजवळील लांबा (प्रेमगिरी) डोंगरावर एक हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड केली.

पाटविहिर या आदिवासी गावाजवळ असलेल्या वनविभागाच्या लांबा डोंगरवर कळवण शहरातील व्यावसायीक, वैद्यकीय क्षेत्रातील काही तरुणांनी एकत्र येत वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प केला होता. जवळपास ४० ते ५० तरुणांचा ग्रुप असलेली टीम ग्रीन रिव्हॅल्यूशनने गेल्या तीन महिन्यांपासून दर शनिवारी व रविवारी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत स्वयंस्फूतीने श्रमदान करून वृक्षारोपणसाठी लांबा डोंगरावर अंदाजे दीड ते दोन एकरवर एक हजार खड्डे खोदले. या डोंगरावर जाण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्ता देखील केला. तसेच ५००० लीटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवली. त्यामुळे वर्षभर झाडांना पाणी देता येईल. यासाठी डॉ. एस. बी. सोनवणे, विलास शिरोरे, प्रकाश कालावडिया, डॉ. भावसार, जिभाऊ निकम, राजू गोरखा, संजय महाले, डॉ. रवींद्र भामरे, गणेश ततार, प्रशांत नेरकर, अविनाश पगार, निंबा पगार आदींसह ग्रीन रिव्हॅल्यूशन टीमचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images