Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘जीएसटी’नंतरही मार्केट फीचा बोजा

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

येत्या १ जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर प्रणाली (जीएसटी) लागू होणार आहे. देशाच्या एकीकृत बाजारपेठेत परिवर्तन करण्यासाठी होत असलेल्या या कर प्रणालीत एकच कर आकारणी होणार असली, तरी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत घेण्यात येणारी मार्केट फीदेखील आकारण्यात येणार असल्यामुळे ‘जीएसटी’नंतरही व्यापाऱ्यांवर मार्केट फीचा बोजा राहणार आहे. ही फी रद्द करण्यात यावी, अशी मागणी सरकारदरबारी करूनही ती अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

नाशिक बाजार समितीत असलेले अन्नधान्य किराणा घाऊक व्यावसायिक हे बाजार समितीच्या आवारात कोणत्याच मालाचे वजन करीत नाहीत, त्या मालाचा येथे लिलाव होत नाही. मग अशा मालाची मार्केट फी का आकारली जाते, हा व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. हा माल दुसऱ्या बाजारातून खरेदी करताना व्यापाऱ्यांनी एकदा फी भरलेली असताना दुसऱ्यांदा या मार्केटमध्ये फी का भरायची, असाही व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. ही पद्धत चुकीची, व्यापाऱ्यांची पिळवणूक करणारी, तसेच अवाजवी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दि. १५ जून रोजी नाशिक बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत शरदचंद्र मार्केट यार्डमधील अन्नधान्य विभागात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांकडील सेवा शुल्क वसुलीबाबतच्या विषयाचा समावेश करण्यात आला होता. त्यात व्यापाऱ्यांकडून एक टक्का मार्केट फी आकारली जाते, ती तशीच आकारायची की कमी करायाची, या विषयावर एकमत झाले नाही. व्यापाऱ्यांकडून दुहेरी सेस वसूल केला जात नाही, असे संचालकांनी सभेत सांगितले होते. सहकारमंत्र्यांकडे बैठक झाली. त्यात ठरवून दिल्याप्रमाणेच ही वसुली केली जाते, असे मत संचालकांनी मांडले होते.

राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांची राज्यव्यापी संघटनेचे पदाधिकारी राजू राठी, प्रफुल्ल संचेती, परेश बोधाणी, हेमंत पवार यांनी भेट घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती दुहेरी बाजार फी आणि प्रोसेस केलेल्या वस्तूंवर घेत असलेल्या मार्केट फीविषयी चर्चा केली. मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारची घेण्यात येणारी मार्केट फी रद्द करण्यात आली आहे. व्यापाऱ्याचा बाजार समितीत गाळा आहे, एवढी बाब लक्षात घेऊन त्याकडून ही फी आकारणे योग्य नाही, अशी भावना व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट होत आहे. अशा प्रकारची मार्केट फी बंद करण्याचा निर्णय पुणे येथे झालेल्या व्यापारी परिषदेत घेण्यात आला आहे. परिषदेच्या व्यापाऱ्यांनी शासनाला तसे पत्र दिलेले आहे. मार्केट फी दोनदा आकारल्यामुळे त्याचा भुर्दंड ग्राहकाला बसत आहे. या बाबीकडे परिषदेने लक्ष वेधले आहे.

- प्रफुल्ल संचेती, व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट सिटीला ‘स्टार्टर’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक म्युनिसीपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीच्या कामकाजाला आता औपचारिकरित्या सुरुवात होणार आहे. गुरूवारी स्मार्ट सिटी कंपनीच्या झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटी प्रकल्प सल्लागार संस्थेच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. दिल्लीस्थित केपीएमजी अॅडव्हायजरी सर्व्हिसेस या कंपनीवर आता नाशिकच्या विकासाची जबाबदारी राहणार आहे. सोबतच कंपनीच्या कामकाजासाठी पाच मुख्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीलाही बोर्डाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीला स्टार्टर मिळाले आहे.

स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी स्मार्ट सिटी कंपनीची बैठक झाली. त्यात सिडकोच्या एमडी प्राजक्ता लवंगारे, आयुक्त अभिषेक कृष्णा, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शहर अभियंता यू. बी. पवार आणि प्रभारी सीईओ विजय पगार उपस्थित होते. या बैठकीत सर्वप्रथम प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट नियुक्तीचा विषय चर्चेला ठेवण्यात आला होता. या कामासाठी क्रिस‌िल, टीसीएससह पाच कंपन्यांनी कामाची तयारी दर्शवली. परंतु, संचालकांनी दिल्लीस्थित केपीएमजी अॅडव्हायजरी सर्व्हिसेस या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केले. संबंधित कंपनी मल्ट‌िनॅशनल असून, ती टेक्निकल आणि फायनान्शियल कामांसाठी स्मार्ट सिटी कंपनीला मार्गदर्शन करणार आहे. सल्लागार संस्थेच्या निवडीमुळे स्मार्ट सिटीच्या ढकलगाडीला आता वेग येणार असून, प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. शहर आराखड्याचा अभ्यास करून नव्या प्रोजेक्टची आखणी करण्यात येणार असून, डीपीआर तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी आदी कामांना वेग येणार आहे. स्मार्ट सिटीच्या कामातील हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.

पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती

कंपनीच्या गुरुवारच्या बैठकीत स्मार्ट सिटीच्या ‘की मॅनेजर’ पदांनाही मंजुरी देण्यात आली. त्यात कंपनी सचिव या पदावर महेंद्र शिंदे यांची तर आयटी हेडपदी प्रमोद गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली. चीफ फायनान्शियल ऑफ‌िसर पदावर बाबुराव निर्मळ यांना नियुक्त करण्यात आले. अर्बन प्लॅनर आणि मुख्य अभियंता या दोन पदांच्या भरतीलाही हिरवा कंदील देण्यात आला असून, ही पदे शासन सेवेतील प्रतिनियुक्तीवर भरली जाणार आहेत.

तीन कामांसाठी सात कोटी मंजूर

स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत शहरातील तीन नव्या कामांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. गुरुवारच्या बैठकीत महात्मा फुले कलादालनासाठी साडेतीन कोटी, नेहरू उद्यानासाठी सव्वा कोटी तर विद्युत शवदाह‌िनीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे सात कोटीच्या नव्या कामांना मंजूरी देण्यात आली असून पुढील आठवड्यात या कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत. दरम्यान, या बैठकीत महाकवी काल‌िदास कला मंद‌िराच्या कामासाठी साडेनऊ कोटींच्या खर्चालाही मंजुरी देण्यात आली. या कामाला १५ जुलैपासून प्रारंभ होणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत सुरू करण्यात येणाऱ्या कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात महाकवी काल‌िदास कला मंद‌िराच्या नूतनीकरण कामासह वर्कऑर्डरलाही मंजुरी देण्यात आली. या नूतनीकरण कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या २७ जून रोजी ई-भूम‌िपूजन केले जाणार आहे. शिवाय, महात्मा फुले कलादालनाच्या नूतनीकरणासाठी साडेतीन कोटी, नेहरू उद्यानासाठी सव्वा कोटी तर विद्युत शवदाह‌िनीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात या कामांच्या निविदा काढल्या जाणार आहेत.

दिनकर पाटील संचालक

दरम्यान स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाने या नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे. विविध पक्षांच्या इतर सदस्यांचाही एक प्रतिनिधी या कंपनीवर संचालक म्हणून घेतला जाणार आहे. त्यांची निवड महासभेवर करण्यात येणार आहे.

पंडित कॉलनीत कार्यालय
नाशिक म्युनिस‌िपल स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीच्या जागेचा वनवास अखेर संपला आहे. पंड‌ित कॉलनीतील पश्चिम विभागाच्या इमारतीत कंपनीचे कार्यालय करण्यास कंपनीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. येत्या चार मह‌िन्यांत कंपनीचे कार्यालय तयार होणार असून, नव्या कार्यालयातून स्मार्ट सिटीचे कामकाज सुरू होणार आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकचा समावेश स्मार्ट सिटी योजनेत झाला होता. नाशिकच्या निवडीनंतर स्मार्ट सिटीचा कारभार हाकण्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीचे स्वतंत्र कार्यालय, तसेच कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी असणार आहेत. स्मार्ट सिटीचे स्वतंत्र कार्यालयही असणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू होता. गुरुवारी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपनीच्या जागेवर चर्चा झाली. अध्यक्षांनी मुख्यालयात कार्यालय सुरू करण्यास नकार दिला होता. त्यामुळे प्रशासनाकडून तीन जागांचा पर्याय सुचवण्यात आला होता. यात गोल्फ क्लबच्या शेजारील पालिकेची जागा, दुसरी तारांगणाची तर पंड‌ित कॉलनीतल्या नाशिक पश्चिम कार्यालयाच्या इमारतीमधील जागा अशा तीन ठिकाणांचा विचार केला होता. कंपनीच्या बैठकीत पश्चिम विभागाच्या कार्यालयातील जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी स्मार्ट सिटीचे सुसज्ज कार्यालय तयार केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनस्थानतर्फे कलेचं ‘समर्पण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कथ्थक, तबलावादन, शास्त्रीय गायन या कला आपल्या अनोख्या शैलीच्या सादरीकरणातून दिवंगत तबलावादक प्रमोद भडकमकर यांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून समर्पित करण्यात आल्या. निमित्त होते, जनस्थान या व्हॉट्स अॅप ग्रुपच्या तिसऱ्या वर्धापनदिनाचे. या वर्धापनदिनानिमित्त तीन दिवसीय जनस्थान फेस्ट‌िव्हलचे आयोजन प. सा. नाट्यगृहात करण्यात आले आहे. याचे उद््घाटन गुरुवारी झाले. तबलावादक प्रमोद भडकमकर यांना वर्धापन दिनाचा पहिला दिवस समर्पित करण्यात आला.

जनस्थान या व्हॉट्स अॅप ग्रुपमधील सदस्य तबलावादक प्रमोद भडकमकर यांचे नुकतेच निधन झाले. तबला या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अनोखे असून त्याला मानवंदना म्हणून या ग्रुपच्या वर्धापनदिनाच्या पहिल्या दिवसातील संपूर्ण कार्यक्रम ‘समर्पण’ या नावाने त्यांना अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात याठिकाणी आयोजित केलेल्या संभव या प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते व डॉ. मो. स. गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. भडकमकर यांची कन्या वैष्णवी भडकमकर हिने तबलावादन सादर केले. तिला ईश्वरी दसककर हिने साथसंगत केली. यावेळी यतीन पंडित व संदिप लोंढे यांनी भडकमकरांचे चित्र व शिल्प सादर करत त्यांना मानवंदना दिली. प्रमोद भडकमकर यांचा मरणोत्तर ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार पत्नी अर्चना भडकमकर यांच्याकडे डॉ. मो. स. गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कलेतून श्रद्धांजली

प्रमोद भडकमकर यांच्या मित्रपरिवाराने कलेतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यामध्ये सुभाष दसककर, अनिल दैठणकर, मोहन उपासणी, शास्त्रीय गायक प्रा. अविराज तायडे, अभंग गायक प्रा. मकरंद हिंगणे, कथ्थक नृत्यांगणा विद्या देशपांडे, कथ्थक नृत्यांगणा किर्ती भवाळकर यांचा समावेश होता. त्यांना सतीश पेंडसे, सुजीत काळे, नितीन वारे, सुभाष दसककर, अनिल दैठणकर, दिगंबर सोनवणे यांनी साथसंगत केली.


संभवमधून विविध कलांचे दर्शन

सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच संभव या चित्रशिल्प प्रदर्शनाचे आयोजन पसामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये नाशिकमधील प्रफुल्ल सावंत, राजेश सावंत, नंदू गवांदे, अनिल माळी, सी. एल. कुलकर्णी, प्रसाद पवार, संदीप लोंढे, श्याम लोंढे, स्नेहल एकबोटे, श्रेयस गर्गे, यतीन पंडित, शीतल सोनवणे यांची चित्रे, शिल्प आदींचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.


आज ‘सन्मान’

आज (२३ जून) ‘सन्मान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यात ‘जनस्थान आयकॉन’ पुरस्कार प्रदान केले जातील. नाशिकचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेवून ज्यांनी संगीत आणि अभिनय या कलाक्षेत्रात आपला ठसा उमटवला त्या पं. सुभाष दसककर, विद्या देशपांडे आणि विद्या करंजीकर यांना यंदाचा जनस्थान आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी धास्तावला!

$
0
0

टीम मटा

गेल्या आठ दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. जिल्ह्यातील सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला तालुक्यात पहिल्या पावसाने पेरणी झाली. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्यामुळे काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. सर्वात जास्त पर्जन्य असणारे त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात मात्र अद्यापही दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी आस लावून बसले आहेत.

दमदार पावसाची आस मालेगावात कायम

मालेगाव ः शहर व तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून पेरणी सुरू केली. आतापर्यंत तालुक्यात २५ टक्के पेरणी झाली असली तरी पावसाने मात्र दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पावसाची सुरुवात चांगली झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात २० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मका पीक सर्वाधिक १० हजार हेक्टरवर, तर कापसाची आठ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार आगमनाने शेतकरी बांधवानी पेरणी केली असली तरी नंतर मात्र पाऊस गायब झाल्याने दुबार पेरणी करण्याची वेळ येते की काय अशी चिंता व्यक्त होते आहे.

तालुक्यातील करंजगव्हाण, कळवाडी, सौंदणे आदी परिसरात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सरासरीच्या २८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात ४ हजार ८६९ दलघफु (२६ टक्के) इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हा साठा शून्य टक्के होता. शहरात सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून रमजान महिना सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे.

येवला तालुक्याला रोजच हुलकावणी

येवला ः यंदा मृग नक्षत्राने दमदार श्रीगणेशा करताना तालुक्यात खरिपाचे चक्र पुढे सरकले गेले असले, तरी गेल्या सहा दिवसांत तालुक्यात अगदी सर्वदूर वरुणराजाने पुन्हा दडी मारल्याने बळीराजाचा जीव टांगणीला लागला आहे. खरिपाची पेरण्या केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

एकीकडे मोठे अर्थसंकट उभे असतानाही शेतकऱ्यांनी कसाबसा पैसाआडका उभा करत पेरणी केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून दडी मारलेला पाऊस गुरुवारी (दि.२२) दुपारी दोनच्या सुमारास येवला तालुक्यात आर्द्राचे ढग काहीसे दाटून येताना आता बरसणार असे चित्र निर्माण झाले. मात्र वरुणराजाने क्षणार्धात पुन्हा पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.
त्र्यंबक, इगतपुरीकडे फिरवली पाठ

त्र्यंबकेश्वर ः दरवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार पाऊस होणारा त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप कोरडाच आहे. शहरासह तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. वळवाच्या किरकोळ पावसानंतर अद्यापही या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अधूनमधून एखादी सरी कोसळण्यापलीकडे तालुक्यात पावसाने कुठेही दमदार हजेरी लावलेली नाही. इगतपुरी तालुक्याकडेही यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. गेल्या आठ दहा दिवसांपासून तुरळक सरींपलीकडे दमदार पाऊस झालेला नाही.
चांदवड, नांदगावात समाधानकारक पाऊस

मनमाड ः चांदवड, नांदगाव तालुक्यात १५ जून अखेर सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होऊन धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे येथील शेतकरीही चिंतेत आहे.

नांदगाव तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात १२० मी.मी. पाऊस झाला आहे. चांदवड तालुक्यात आठ दिवस आधी झालेल्या दमदार पावसाने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र त्यानंतर शेतीसाठी पोषक अशा दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षाच आहे. काही भागात पेरणी झाली आहे.


निफाडमध्ये समाधानकारक पाऊस

निफाड ः तालुक्यात पावसाने ७ जूनलाच हजेरी लावल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाऊस गायब असला तरीही सुरुवातीला झालेला मान्सूनपूर्व पावसामुळे निफाड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली असून, पुढील तयारीला लागले आहेत. गुरुवारी तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पसंती दिल्याचे दिसत आहे. खते, बी-बियाणे दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार लोकांची सोयाबीन च्या पेरणीकडे ओढ आहे. त्या खालोखाल मक्यालाही काही गावांमध्ये पसंती आहे. तालुक्यात पाण्याचा मुबलक पुरवठा व सिंचनाच्या सोई उपलब्ध असल्याने द्राक्ष, कांदा, ऊस अशी पिके घेतली जातात. गेल्या आठवड्यात तालुक्यात लासलगाव, विंचुर, नैताळे, सोनेवाडी, खडकमाळेगाव, दावचवाडी, सायखेडा, चांदोरी या चारही भागातील गावांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. या भागात पाऊसाचा जोर इतका अधिक असल्यामुळे द्राक्षबागांसह शेतामध्ये तीन ते चार दिवस पाणी साचून होते.

तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नांदूरमाध्यमेश्वर धरणातही पाण्याचा साठा असल्याने लासलगाव, विंचुरसह १६ व १२ गाव पाणीपुरवठा योजनेला काही भीती नाही. तसेच पिंपरी, रौळस, कुंदेवाडी या गावांना कादवा नदीला एप्रिलमध्ये आरक्षणाचे सोडलेले पाणी अजूनही नदीपात्रात आहे. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून दडी मारलेला पाऊस जर अजून लांबला तर चिंतेची बाब ठरू शकते. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते.
बागलाणमध्ये पिके सापडली संकटात

सटाणा ः मृग नक्षत्रापासून सलग तीन झालेल्या पावसाने खरिपाच्या आशा पल्लवित केलेल्या असतांनाच गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांची आशा धूसर झाली आहे.

दरम्यान पाऊस लांबल्याने तालुक्यातील पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न आ वासून उभा आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे तालुक्यातील केळझर धरण कोरडेठाक झाले आहे. परिणामी केळझर ते सटाणा नदीपात्रालगतच्या गावांना शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट उभे आहे. मृगाच्या पावसाने धरणक्षेत्रात अद्यापही अवकृपा केल्याने सटाणावासीयांची झोप उडाली आहे. शहराला कळवण तालुक्यातील चणकापूर धरणातून आवर्तन मिळते. मात्र या धरणातील पाण्याचा जलसाठा जेमतेम असल्याने तेथील अपेक्षा फोल ठरली आहे. जूनच्या प्रांरभीच झालेल्या पावसाने तालुकावासीयांना दिलासा दिला होता. मात्र ७ जूननंतर पावसाने दांडी मारली आहे. ती अद्याप कायम आहे. जून महिन्याच्या प्रारंभी तालुक्यात अवघ्या २३ मीमी. इतका पाऊस झाला असला तरीही पेरण्या बाकी आहेत.

कळवण, देवळ्याकडेही फिरवली पाठ

कळवण ः गेल्या आठवड्याभरापासून देवळा, कळवण तालुक्यात पावसाने दांडी मारली आहे. पहिल्या पावसात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, ते संकटात सापडले आहेत. अजूनही काही भागात पेरणी झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवीदास पिंगळेंवर अविश्वास प्रस्ताव?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सहा महिन्यांपासून अटकेत असलेले नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठरावाच्या हालचाली सुरू झाल्या आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही सदस्यांनी गुरुवारी अविश्वास प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तांत्रिक माहिती घेतली आहे. या ठरावासाठी दोन तृतीयांश संचालक लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दरम्यान, अविश्वास येण्याआधी पिंगळे हे राजीनामा देणार असल्याचीही चर्चा आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालक असून त्यातील बरेच संचालक हे भाजपच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे अविश्वासबाबतच्या हालचाली गेल्या काही दिवासांपासून सुरू आहेत. सहा महिन्यांपूर्वी बाजार समितीतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेच्या अपहाराप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांना अटक केली होती. या कारवाईत बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांसह देवीदास पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोल‌िस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पिंगळे यांच्या राजीनाम्याचीच चर्चा

देवीदास पिंगळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीचा राजीनामा दिला असल्याची चर्चा दिवसभर होती. पण जिल्हाधिकारी मुंबईला असल्यामुळे हा राजीनामा दिला नसल्याचेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष लागवडीसाठी ‘रोपे आपल्या दारी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शतकोटी वृक्षलागडवीचे उद्द‌िष्ट साध्य करण्यासाठी सामाजिक वन‌ीकरण विभागाने आता ‘रोपे आपल्या दारी’ ही अनोखी योजना सुरू केली आहे. याअंतर्गत विभाग थेट घरपोच रोपे देणार असून, वृक्षमित्रांना मानधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सहभागी वृक्षमित्रांचा प्रमाणपत्राद्वारेही गौरव केला जाणार आहे.

वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नियंत्रणाबाबत विचारमंथन सुरू आहे. त्याची तिव्रता व परिणामकारकता कमी करण्यासाठी सन २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवडीसाठी शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने ग्रामीण भागात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे शक्य असून, शहरी भागात पाल‌िका, नगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायती अशा ठिकाणी निवासी नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने केले आहे. वन विभागाकडून २५ जून ते ५ जुलै या कालावधीत रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रम कालावधीचा पहिला टप्पा २५ ते ३० जून, दुसरा टप्पा एक ते पाच जुलै असा राहील. योजनेत निवडलेल्या शहराचे

व्याप्तीनुसार ३ ते ५

ठिकाणी वनविभागाकडून रोपे पुरविण्याकरीता वनमहोत्सव केंद्र उघडण्यात येणार आहे.

वृक्षमित्रांना मिळेल मानधन

मोठ्या प्रमाणात मागणी असल्यास वनविभागाचे वाहनाद्वारे रोपांचा पुरवठा करण्यात येईल. सदर पुरवठा करणाऱ्या वृक्षमित्राची ओळख निमार्ण होण्यासाठी कॅप व झेंडा पुरविण्यात येईल, प्रत्येक वृक्षमित्रास प्रतीदिन रुपये एक हजार प्रमाणे मानधन देण्यात येईल (इंधन खर्च व इ.सर्व खर्च/दुचाकी/रिक्षा उपलब्ध करुन घेण्यासह अंतर्भूत राहील). ज्या वन विभागामार्फत वृक्षमित्र काम करतील त्यांचेकडून वृक्षमित्रांना प्रमाणपत्र देण्यात येईल, वृक्षमित्राची निवड वनविभागामार्फत त्यांचे स्तरावरुन निकष ठरवून करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'त्याने' पोर्नसाइट्ससह ‘फोटो ट्रेडिंग’ केले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तरुणींचे अश्लिल फोटोग्राफ्स पोर्नसाइट्सवर टाकणाऱ्या अक्षय राव या संशयित आरोपीने फोटो ट्रेडिंग केल्याची धक्कादायक बाब पोलिसांनी शोधून काढली आहे. नाशिक नव्हे तर भारतात नवीन असलेला हा प्रकार मूळ धरू पाहत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणींचे अश्लिल फोटोग्राफ्स काढून ते पोर्नसाइटसवर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये अक्षयविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात दोन तक्रारदार तरुणी समोर आल्या असून, पोलिसांनी अक्षयला अटक केली होती. पोलिस चौकशी झाल्यानंतर कोर्टाने अक्षयची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, अक्षयने जामीनासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, कोर्टाने फेटाळल्याने अक्षय सध्या नाशिक सेंट्रल जेलमध्ये आहे.

फोटो ट्रेडिंगबाबत सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले की, हा फोटो ट्रेडिंग हा इंटरनेटवरील आणि परदेशात वापरला जाणार प्रकार आहे. यात, इंटरनेटवरील ओळख झालेले परदेशातील व्यक्तीसमवेत एकमेकांचे फोटो शेअर केले जातात. अर्थात, हे फोटोग्राफ्स नको त्या अवस्थेतील असतात.

फोटो ट्रेडिंगमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार केला जात नाही. संशयित आरोपी अक्षयने जर्मनीतील काही व्यक्तींशी फोटो ट्रेडिंग केल्याचे स्पष्ट झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. अनेकदा याच पध्दतीने व्हिडिओदेखील शेअर केले जातात. फोटो ट्रेडिंगबाबत पीडित तरुणींना माहिती नव्हती. संशयित आरोपीस फोटो ट्रेडिंगची काही काळापूर्वी माहिती मिळाल्यानंतर त्याने हा उद्योग केला असे पवार यांनी स्पष्ट केले.
अक्षयच्या लॅपटॉपध्ये पीडित दोन तरुणींसह आणखी काही तरुणींचे फोटो सापडले होते. मात्र, हे फोटो इंटरनेटवरून डाउनलोड केल्याचे त्याने सांगितले होते. पोलिसांनी या फोटोआधारे तपास केला. तसेच, अक्षयच्या संपर्कात कोणी आलेले असल्यास पोलिसांना भेटण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, आजवर कोणी पुढे येऊन तक्रार केली नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अक्षयचे पालक परदेशातून परत आले आहेत. आपल्या मुलाशी विवाह करण्यासाठी संबंधित तक्रारदार तरुणींनी असे आरोप केल्याचे अक्षयच्या पालकांनी पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लायन्स अध्यक्षपदी जयक्रिश्रियांची वर्णी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

लायन्स वर्ष २०१७-१८ या कालावधीसाठी प्रवीण जयक्रिश्रिया यांनी लायन्स क्लब पंचवटीची अध्यक्षपदाची सूत्रे मावळते अध्यक्ष नीलिमा जाधव यांच्याकडून स्वीकारली.

गंगापूर रोड येथील पाम शेल्स येथे झालेल्या कार्यक्रमास सचिवपदी अरुण अमृतकर, खजिनदारपदी अभय नेरकर, उपाध्यक्षपदी रमेशभाई शाह यांनी पदग्रहण केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना वैद्य विक्रांत जाधव म्हणाले, की गाडे या शेतकरी कुटुंबातील लहान कन्येला शिक्षणासाठी दत्तक घेऊन नवा पायंडा पाडण्यात आला. महेश सोमाणी हे या मुलीच्या शिक्षणाचा खर्च करीत आहेत. दरम्यान, पर्यावरण रक्षणाच्या हेतूने तुळशीच्या बियांचे वाटप करण्यात येणार असून त्याचे उद्‍घाटन रमेश शाह यांच्या हस्ते झाले. यंदा दोन महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाई मशिनची वाटप करण्यात आले. मेरी येथील बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सुषमा कोठावदे, रोहिणी रक्ते, स्मिता देशपांडे, नीलिमा जाधव यांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निकष बदलाने वाढणार कृषी सिंचन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

चालू वर्षी खरीप हंगामापूर्वी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य सरकारने कृषी विभागाला दिले आहेत. खरीपापूर्वी या योजनेचे निर्देश प्राप्त झाल्याने दोन महिन्यांत विभागातील तब्बल ५ हजार ४७९ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.

वारंवार निर्माण होणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचनाचा शेतकऱ्यांनी वापर करावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबविण्यात येते. मात्र, या योजनेचे निर्देश कृषी विभागाला मिळेपर्यंत सप्टेंबर महिना उजाडत असे. परिणामी हजारो शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याची बाब गेल्या वर्षी ‘मटा’ने उजेडात आणली होती. या बातमीची प्रशासकीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.

सूक्ष्म सिंचन अर्थात ठिबक सिंचन योजना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश दरवर्षी खरीप हंगाम उलटून गेल्यावर कृषी विभागाला प्राप्त होतात. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी निवडीचे सोपस्कार पार पाडेपर्यंत रब्बी हंगामही हातातून जात असे. परिणामी या योजनेच्या संपूर्ण निधीचा वापर होत नसे.

यंदा मेमध्येच निर्देश

यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठिबक सिंचन योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश राज्य सरकारकडून कृषी विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत ५ हजार ४७९ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. यंदा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ६२०.६७ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण वर्षभर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. विभागात गेल्या वर्षीही १४ हजार ६ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.

ठळक वैशिष्ट्ये

पर ड्रॉप मोअर क्रॉप योजनेचा राज्यातील ३४ जिल्ह्यांना लाभ
अल्प व अत्यल्प भूधारक शेतक-यांना ५५ टक्के अनुदान
इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान
शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी व आधारकार्ड बंधनकारक
अनुदानाची रक्कम इएफटीद्वारे जमा होणार थेट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीती आयोगाचे पुनर्गठण करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नीती आयोगावरून दीड शहाण्या तज्ज्ञांना हाकला आणि नीती आयोगाचे पुर्नगठन करावे आदी मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी जोरदार निदर्शने केली.

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. केंद्रात नवीन सरकार सत्तारुढ झाल्यावर सरकारी धोरणे व कारभाराची नव्याने मांडणी करताना मोदी सरकारने जुना योजना आयोग गुंडाळून त्या जागी नीती आयोग निर्माण केला. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिग इंडिया (नीती) असे आकर्षक नाव या संस्थेला देण्यात आले. पूर्वीचा आयोग ‘टॉप टू बॉटम’ या पध्दतीने काम करीत होता. पण ती संस्था मोडीत काढून त्याऐवजी खालून वर म्हणजेच ‘बॉटम टू टॉप’ असा विचार करणारी संस्था निर्माण करण्यात आली. नीती आयोगाची फेररचना करावी, विवाद्य धोरण ठरविणाऱ्या आयोगातील शहाण्यांना हाकलून द्यावे आणि देशाच्या वस्तुस्थितीशी परिचित असणारे व आस्था असणारे लोक तेथे नेमावे, अशी मागणी करण्यात आली आहे. कामगार कायद्यात सुधारणा करताना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) पुरस्कृत केलेले निकष व शिफारशींचे अवलंबन करावे, कामगार क्षेत्राविषयीचे धोरण ठरव‌तिाना त्रिपक्षीय चर्चेची पध्दती अंमलात आणावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर अध्यक्ष गोविंद चिंचोरे, विजय मोगल, सुरेश चारभे, लक्ष्मण शिंदे, दुर्गा घेवारे, वि. गो. पेंढारकर, ज्योती वाघ, राजेश पगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

भाजपला घरचा आहेर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघाने नीती आयोगाच्या कारभारावर टीका करून भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केली आहे. संघाच्या आंदोलनाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यावरील अविश्वासाचा ठराव शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला. यावेळी १३ संचालक उपस्थ‌ति होते, असा दावा संचालक मंडळातील सूत्रांनी केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व दिवाळी बोनस फरकाच्या रकमेचा अपहार केल्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पिंगळे यांना अटक केली होती. या कारवाईवेळी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या एका कारमधून ५८ लाख रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आली होती. काही कर्मचाऱ्यांसह पिंगळे यांच्यावर म्हसरूळ पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. पिंगळे यांच्या कामकाजाबद्दल अनेक आक्षेप असल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर करण्याच्या हालचाली काही दिवसांपासून गतिमान झाल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ संचालक आहेत. त्यापैकी १३ संचालकांनी अविश्वास ठरावाला पाठबळ दिल्याचा दावा करण्यात आला आहे. शाम गावित, शिवाजी चुंबळे, संपतराव सकाळे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, संजय तुंगार, युवराज कोठुळे, चंद्रकांत निकम, जगदीश आपसुंदे, रवी भोये, संदीप पाटील, विमल जुंद्रे, भाऊसोब खांडबहाले आदी संचालक मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे

पिंगळे यांच्यावरील अविश्वासाबाबतचा ठराव सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी हा ठराव दाखल करून घेतल्याची माहिती संचालक मंडळातील सूत्रांनी दिली. ५८ लाखांचा अपहार तसेच संचालक मंडळाला विश्वासात न घेताच कामे करणे यांसारखे काही आक्षेप या अविश्वास ठरावात नोंदविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीत भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून भरदिवसा सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. पंचवटी परिसरात गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी सव्वा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला.

राजेश प्रभाकर देशपांडे (४६, रा. केवडीबन, पंचवटी) यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ते कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्याने बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. सोने-चांदीचे दागिने आणि तीन हजार रुपयांची रोकड असा दोन लाख ३६ हजारांचा ऐवज चोरून नेला.

विषारी औषध सेवनाने मृत्यू
विषारी औषध सेवन केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली. दीपक जगन सापरे (२२, रा. महात्मा फुलेनगर, पंचवटी) असे या तरुणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्प‌टिलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचवटी पोलिसांनी आकस्म‌कि मृत्यूची नोंद केली आहे.

दुकानातून रोकड चोरीस
पाणी पिण्याच्या बहाण्याने आलेल्या चार महिलांनी टायर दुकानातील ८१ हजारांची रोकड लांबविली. सिन्नर फाटा परिसरात हा प्रकार घडला. मधुकर भिकाजी शिंदे (३७, रा. जेलरोड) यांनी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सिन्नर फाटा परिसरात त्यांचे यश टायर्स नावाचे दुकान आहे. ते बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी चार महिला दुकानात आल्या. दुकानातील गल्ल्यातून ८१ हजारांची रोकड चोरून त्यांनी पोबारा केल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

एलसीडी टीव्ही चोरास अटक
चोरीचा एलसीडी टीव्ही विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डिसुझा कॉलनीतून हा एलसीडी टीव्ही चोरीस गेला होता. महेश बळीराम शिरसाठ (२२, बाबासाहेब पुतळ्याजवळ, गंगापूर गाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून ३२ इंची एलसीडी टीव्ही, रिमोट आणि चादर असा २० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महेशचा साथीदार दीपक खैरनार (रा. प्रबुध्दनगर,सातपूर) हा फरार झाला आहे. हे दोघेही संशयित सराईत गुन्हेगार आहेत. जयदीप दौलतराव निकम (रा. धनलक्ष्मी सोसायटी, डिसुझा कॉलनी, गंगापूर रोड) यांच्या घराचा ३० मे रोजी कडी कोयंडा तोडून ही चोरी करण्यात आली होती.

गॉगल विक्रेता खून; एकास अटक
वेद मंदिर परिसरातील गॉगल विक्रेत्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी सज्जन गंगाराम कळासरे उर्फ सचिन काळे याला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल, दोन जिवंत काडतुसे तसेच चॉपर हस्तगत करण्यात आले आहे.
गॉगल विक्रेता खून प्रकरणात काळे याच्यासह गणेश भिमनाथ, विकी किरण काळे, तुषार सूर्यवंशी, लेफटर त्रिभुवन यांचा पोलिस शोध घेत आहेत. तपोवन परिसरात संशयितांचा शोध घेत असताना काळे औरंगाबाद महामार्गावरील नीलगिरी बागेजवळ मिळून आला. मुंबई नाका पोलिसांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया ‘एफडीए’ अधिकारी गजाआड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मंत्रालयातून आलेली तक्रार मिटविण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया फुड अॅण्ड ड्रग्ज अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सूरज सुरेश काळे (३५, रा. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे.

याप्रकरणी रतन पुनाजी चौधरी (३५, रा. लवाटेनगर, नाशिक) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ते त्यांच्या सागर स्वीटस या दुकानात असताना त्यांना बुधवारी दुपारी सव्वाच्या सुमारास फोन आला. मी ‘एफडीए’च्या वांद्रे येथील कार्यालयातून सुरेश पाटील बोलत असल्याचे सूरजने सांगितले. तुमच्या दुकानातील मिठाई खाऊन एक जण आजारी पडला असून त्याने मंत्रालयात तक्रार केल्याची बतावणी सूरजने चौधरी यांच्याकडे केली. कारवाई न करण्यासाठी सूरजने ५० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, चौधरी यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी संशयित काळे याला सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षद सपकाळवर बलात्काराचाही गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असे आमिष दाखवून अनेकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या हर्षद आनंद सपकाळ याच्यावर आता इंद‌रिानगर पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या समवेत राहणाऱ्या एका तरुणीनेच बलात्काराची फिर्याद दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

चित्रपट सृष्टीतील अनेक मातब्बरांशी आपला परिचय असून चित्रपटात काम मिळवून देतो, असे आमिष हर्षद उर्फ हॅरी सपकाळ तरुणी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना दाखवित होता. त्यासाठी बक्कळ पैसे घेऊन त्याने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे घेऊनही चित्रपटात काम मिळवून न दिल्याने त्याचे बिंग फुटले. शरद संपतराव पाटील (५४, रा. दीपालीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आणखी काही तक्रारदारांनी पोलिसांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता बळावली आहे. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या हर्षदविरोधात एका तरुणीने बलात्कारासह फसवणुकीची फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत पाथर्डी फाटा, सापूतारा येथे वारंवार आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे या तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे.

हर्षदने आपल्याला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन प‍्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वेळोवेळी आपल्यावर बलात्कार केला. मराठी चित्रपटात काम मिळवून देतो, असे सांगून पैसे घेऊन फसवणूक केली. इतकेच नव्हे तर लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी आपला तसेच माझ्या बँक खात्याचा वापर केला. फेसबुकवर माझ्या नावाचे फेक अकाऊंट तयार करून त्यावर अश्लील मेसेजेस टाकून बदनामी केल्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’मुळे कट ऑफ वाढण्याची शक्यता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मेडिकलच्या प्रवेशांसाठी केंद्र पातळीवर घेण्यात आलेल्या ‘नीट’ म्हणजेच नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट या परीक्षेचा निकाल सीबीएसईकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आला. सीबीएसईच्या वेबसाइटवर हा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी या वेबसाइटकडे आपले लक्ष शुक्रवारी दुपारनंतर केंद्रित केले होते. यंदा या परीक्षेचा निकाल चांगला लागला असून त्यामुळे कटऑफ वाढण्याची शक्यता यानिमित्त या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आल्या.

देशभरात ७ मे रोजी नीट परीक्षा पार पडली होती. देशभरातून ११ लाख ३८ हजार ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. इंग्रजी भाषेबरोबरच हिंदी, तेलगू, आसामी, गुजराती, मराठी, तामिळ, बंगाली, कन्नडा, ओरिया या प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा घेण्यात आली. प्रादेशिक भाषांची काठिण्यपातळी इंग्रजी भाषेच्या तुलनेत कमी असल्याचा दावा करत एका विद्यार्थ्यानी मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळे या परीक्षेचा निकाल स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.

यांनी मिळविले यश

नाशिक शहरासह जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. नीट परिक्षेत यश मिळविलेल्यांमध्ये हर्ष चोरडिया, नेहा झाजेरिया, सुचित वालिया या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हर्षला ६०५ गुण, नेहाला ६०० तर सुचितला ५७१ गुण मिळाल्याचे सांगितले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील एक पंप ‌सील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोलपंपाच्या मशिनमधील पल्सरमध्ये टेम्परिंग व शोल्डरिंग करून त्यातील आयसी पार्टच्या सहाय्याने प्रत्येकी पाच लिटरमागे २०० मिलीची चोरी करण्याचा प्रकारातून शुक्रवारी नाशिकमधील एका पेट्रोलपंपाचे एक युनिट सील करण्यात आले आहे. तसेच द्वारका येथील पंपावर लिटरमागे १० मिली पेट्रोल कमी आल्याचे आढळले आहे.

ठाणे गुन्हे अन्वेशन शाखेने दोन दिवसात शहरातील चार पेट्रोलंपाची तपासणी करण्यात आली. त्यात दोन पेट्रोलपंपावर गडबड असल्याचे आढळले तर दोन पेट्रोलंपावर काहीच आढळले नाही. राज्यभर मापात पाप करणाऱ्या पेट्रोलपंपावर धडक कारवाई केली जात आहे. नाशिकमध्ये ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाचे पथक दाखल झाले असून ते धाड टाकतांना गोपनियता पाळत असल्यामुळे नाशिक येथील स्थानिक अधिकाऱ्यांनाही त्याचा थांगपत्ता नसतो. धाड टाकल्यानंतर वैद्यमापन शास्त्र, पुरवठा विभाग व ऑइल कंपन्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेत ही कारवाई केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल या कंपन्याचे ३६० हून अधिक पेट्रोलपंप आहे. त्यातून काही पेट्रोलपंपात चोरी होत असल्याचा संशय असून त्यामुळे या कारवाईने वेग घेतला आहे. एकिकडे ठाणे गुन्हे शाखेने कारवाईचे सत्र सुरू केल्यानंतर वैद्यमापन विभागही या पेट्रोलपंपावर होणाऱ्या चोरीचे प्रकरणाचा शोध घेत आहे. त्यामुळे पंपचालकांचे धाबे दणाणले आहे.

यापूर्वी जिल्ह्यात सोमवारी नाशिक-चांदवड महामार्गावरील दोन पेट्रोलपंपावर कारवाई करून हे पेट्रोलपंप सील केले होते. त्यानंतर या कारवाईने वेग घेतला आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलपंपावर चिप आणि रिमोटच्या सहाय्याने होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील सर्व पेट्रोलियम वितरकांची तपासणी करण्यात आली होती. नाशिक विभागामध्ये ३२२ वितरकांची चौकशी करून २००० पंप तपासण्यात आले. त्यातही दोन पंप दोषी आढळल्याने बंद करण्यात आले. तर दोघा वितरकांविरोधात खटला दाखल झाला आहे. या कारवाईनंतर आता पुन्हा कारवाईने वेग घेतला आहे.

चोरीमुळे ग्राहक संतप्त

पंपांवर इंधन भरतांना मीटरवर झिरो बघून पेट्रोल घ्यावे यासाठी ग्राहक नेहमीच दक्ष असतात. पण ते बघूनही पंपचालकांकडून चोरी होण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे ग्राहकांमध्ये संताप आहे. अनेक जणांना पेट्रोल भरल्यानंतर गाडीतल्या पेट्रोलचा काटा पूर्ण क्षमतेने फिरलेला दिसत नाही. त्यामुळे त्यांचा संशय बळावला आहे. या घटनेमुळे राजकीय पक्षांनी सुध्दा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या चोरीचा प्रकार ग्राहाकांमध्ये संताप निर्माण करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कारला धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उड्डाणपुलावर चारचाकी वाहनांमधील अपघातातील जखमींना घेऊन जाणाऱ्या अंबड पोलिसांच्या पीटर कारला भरधाव वेगात व लाईट बंद असलेल्या ट्रकने धडक दिली. यात दोन पोलिसांसह पाच जण जखमी झाले. या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या दरम्यान रवींद्रकुमार रमेशचंद्र पंचाळ (३२, रा. हरी व्हिला रोड, अहमदाबाद, गुजरात) हे त्यांच्या पत्नी नीमिषा पंचाळ यांच्यासमवेत राणेनगर उड्डाणपुलावरून वाहनाने (जी. जे. ०१ आर एल ७८८१) जात होते. त्यांच्या कारला सिल्व्हर रंगाच्या स्विफ्ट (एम एच १२ एफ के ९९४६) कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारचालकही जखमी झाला. पांचाळ दाम्पत्यासह तिघे जण जखमी अवस्थेत अंबड पोलिस स्टेशनमध्ये आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके यांच्यासह चालक व कर्मचाऱ्यांनी पांचाळ कुटुंबीयांना हॉस्पिटलमध्ये उपचारास नेण्यासाठी पोलिस पीटर मोबाइल कारमध्ये (एमएच १५ एए २३२) बसविले. परंतु, याच वेळी पाथर्डी फाट्याकडून मुंबई नाक्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने (एम एच ०५ एएम ७७२७) भरधाव वेगात जात असताना पोलिस पीटर कारला जोरदार धडक दिली. ट्रकचे हेडलाइट बंद होते. पोलिस पीटर गाडीतील तिघा जखमींना अधिकच मार लागला. तसेच गाडीतील सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके व पोलिस शिपाई फुलमाळी हेदेखील जखमी झाले. पोलिसांसह सर्व जखमींवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी ट्रकचालक रमेश यशवंत गोरडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटीच्या दिवशीही पॉलिटेक्निकचे प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तंत्रशिक्षण संचालनालय (डीटीई) महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील प्रथम वर्ष पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. प्राथमिक माहिती ऑनलाइन पद्धतीने www.poly2017.dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवर भरून नोंदणी सुविधा केंद्रातर्फे करता येणार आहे. याशिवाय येत्या रविवारी २५ जून रोजी तसेच सोमवारी रमजान ईदची सुटी असली तरीही प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती के. के. वाघ पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रकाश कडवे यांनी दिली आहे.

दहावी परीक्षांचे मार्कशीट मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मूळ मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला शाळांमधून मिळाल्यानंतर इतर कागदपत्रांची तयारी करून घेणे आवश्यक असणार आहे. ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व सुविधा केंद्रांवर अर्ज निश्चिती करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १ जुलै रोजी विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल मेरीट यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध असणार आहे. तर २ ते ४ जुलै दरम्यान अर्जांमध्ये काही त्रुटी असल्यास योग्य ते बदल सुविधा केंद्रावर जाऊन करायचे आहेत. फायनल मेरीट लिस्ट ५ जुलै रोजी विद्यार्थी लॉगइनमध्ये उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाघ कॉलेजमध्ये सुविधा केंद्र उपलब्ध

के. के. वाघ. पॉलिटेक्निक कॉलेज या सुविधा केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरणे, अॅप्लिकेशन किट विक्री, ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरणे, कागदपत्रांची पडताळणी या सुविधा करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. एसएससीबरोबरच सीबीएसई, आयजीसीएसई, आयसीएसई आदी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही या अर्ज सुविधा केंद्रावर कागदपत्रांची पडताळणी करून घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकवीस कोटींची कामे रडारवर

$
0
0

जिल्हा परिषदेने घाईघाईत मंजूर केलेल्या कामांची होणार तपासणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागाचा सुमारे २१ कोटी निधी जिल्हा परिषदेने घाईघाईने खर्ची केलेल्या निधी व कामांच्या मंजुरीची तपासणी केली जात असल्याचा निर्वाळा आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिला आहे. ही कामे स्थगित केली नसून, त्याचा वापर योग्य पद्धतीने केला जातो की नाही याची तपासणी केली जात असल्याचे सावरा यांनी सांगितले. त्यामुळे या कामांमधील गडबडी समोर येण्याची शक्यता असून, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची मिली-जुली उघड होणार आहे. दरम्यान, परिसर सेवा संस्थेने आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी दिलेल्या सूचनांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आदिवासी विकास विभागाच्या विविध कामांचा व योजनांचा आढावा विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकील आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, आदिवासी विकास महामंडळाचे एमडी जगदाळे आदी अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना सावरा यांनी परिसर सेवा संस्थांकडून आदिवासी आश्रमशाळांमध्ये त्रुटी शोधण्यासह काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी विभागाकडून केली जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकून त्यांना अधिकाधिक सेवा दिल्या जाणार असल्याचे सावरा यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या २१ कोटींच्या रस्ते व पुलांच्या वादग्रस्त कामांना स्थगिती दिली नसल्याचे स्पष्टीकरण सावरा यांनी दिले आहे. निधी परत जाणार असल्याने नियोजन विभागाने या कामांना घाईघाईत मान्यता दिली आहे. त्यामुळे ही कामे नियमानुसार मंजुरी झाली, की नाही याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार चव्हाणांसोबत दिलजमाई

आदिवासी मंत्री सावरा आणि भाजपचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यात फारसे सख्य नव्हते. आदिवासी विभागातील नोकरभरतीत तीनशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. त्यावरून दोघांमध्ये बरेच मतभेद तयार झाले होते. परंतु, शुक्रवारच्या बैठकीत चव्हाण हे सावरा यांच्यासोबत होते. त्यामुळे सावरा यांनी चव्हाण आणि आपल्यात दिलजमाई झाल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला कडाडला!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

वळवाच्या पावसाचा तडाखा, त्यानंतर पावसाने मारलेली दडी, ढगाळ वातावरणामुळे रोग-कीडींचा वाढलेला प्रादुर्भाव आणि जोराचा सुटलेला वारा याचा एकत्रित परिणाम फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे सध्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. मागणी चांगली असल्यामुळे भाजीपाल्याला चांगले दर मिळू लागले आहेत. भाजीपाला महागल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. गावठी कोथिंबिरीची एक जुडी ५० ते १०० रुपयांपर्यंत विकली जात असून, इतरही भाज्या तीस रुपयांच्या पुढे गेल्या आहेत.

यंदाच्या उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात भाजीपाल्याची लागवड झाली होती. साधारणतः उन्हाची तीव्रता वाढलेल्या वेळेत भाजीपाल्याचे पीक घेणे अवघड असल्यामुळे पॉलीहॉऊस आणि शेडनेटचा वापर करून ही पिके घेण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात भाजीपाल्याची आवक कमी असल्यामुळे भावात वाढ होते. मात्र, तरी या काळात वादळ, वारा, जोराचा पाऊस यांच्यामुळे पिके धोक्यात येत असतात. नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात यंदा वळवाचा पाऊस जोरदार बरसला. त्या पावसाने ही पिके झोडपली. त्यानंतर पावसाने एकदमच उघडीप दिली. ढगाळ वातावरण कायमच राहिल्याने पिकांवर रोग-कीडींचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला. त्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात आणखी भर पडली ती सुटलेल्या जोराच्या वाऱ्याची. या वाऱ्यामुळे पिकांची फुले आणि कळ्या पडू लागल्यामुळे उत्पादनात आणखी घट आली.

मॉन्सूनची प्रतीक्षा

खरीपाच्या मोसमात लागवड होण्यासाठी मान्सूनची प्रतीक्षा आहे. ही लागवड होऊन तो भाजीपाला बाजारात येण्यास बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना भाजीपाला विकत घेताना खिशाला झळ पोहचणार आहे.


फळभाज्यांचे दर प्रति क्रेट रुपये

वांगी- ६०० ते ७००

दोडका - ४०० ते ८००

ढोबळी मिरची - ३०० ते ४००

कारली - ३०० ते ४०० रुपये

टोमॅटो २५०ते ३०० रुपये


कोथिंबिर- ५० ते १०० रुपये प्रतिजुडी

मेथी- ४० ते ६० रुपये प्रतिजुडी

कांदापात- ३० ते ४० रुपये प्रतिजुडी

फ्लॉवर- २० ते ४० रुपये प्रतिकिलो

कोबी- ४० ते ६० रुपये प्रतिकिलो

हिरवी मिरची - ४० ते ६० प्रतिकिलो

वालपापडी - ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images