Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नोकरीचे आमिष दाखवून फसविणाऱ्या महिलेस अटक

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरी रोडवरील म्हसरुळ गजपंथ स्टॉपजवळ राहणारी रुपाली सिध्देश्वर शिरुरे हिने नोकरीचे आमिष दाखवून १६ जणांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून तिने १४ लाख २० हजार रुपये उकळले होते. तिच्या विरोधात म्हसरुळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. म्हसरुळ पोलिसांनी पुणे येथे जाऊन तिला ताब्यात घेतले.

रुपाली शिरुरे हिने सोपान विठ्ठल ठाकरे (रा. दिंडोरी रोड) यांच्याशी ओळख वाढवून माझी मिलिटरीत ओळख आहे. गोवा येथील खाणीत खूप इंजिनीअर्सची गरज आहे, असे सांगून ठाकरे यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. उरलेली रक्कम काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ठाकरे यांनी त्याचे मित्र प्रकाश सुधाकर जगताप (रा. लासलगाव) यांनाही नोकरी विषयी सांगितल्याने त्यांनी ५० हजार रुपये या महिलेला दिले. अशाच प्रकारे रुपाली शिरुरे हिने यशवंत खेलमकर, संध्या म्हस्के, भाग्यश्री म्हस्के, विनोद वायकर, तुषार पवार, जगदीश डहाळे, छाया डहाळे, बाळासाहेब पवार, अक्षय सोनवणे, संतोष लोहार, किरण हिरे, सुरेश सावंत, अमित भोईर, विजय खेलमकर यांना नोकरी मिळवून देते असे सांगून त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी ठाकरे यांच्या तक्रारीनंतर म्हसरुळ पोलिस ठाण्यात तक्रार रुपालीविरोधात १७ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ती फरार होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एमपीएसस‌ी परीक्षेला १,१६७ उमेदवारांची दांडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी सकाळी लिपिक टंकलेखक गट-क संवर्गासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. नाशिकमध्ये सहा हजार ६५० उमेदवार या परीक्षेला सामोरे गेले. तर एक हजार १६७ उमेदवार गैरहजर राहिल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

आयोगाने जाहीर केल्यानुसार जिल्हा प्रशासनाने परीक्षा प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी करून ठेवली होती. लिपिक टंकलेखक मराठी/इंग्रजी या गट-क या पदांसाठी शहरातील १९ केंद्रावर ही परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आली. या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी एकूण सात हजार ८८७ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी सहा हजार ६५० उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे गेले तर एक हजार १६७ उमेदवार गैरहैजर राहिले. परीक्षा प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी ६०० कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

उमेदवारांची स्पर्धा वेळेशी

सकाळी साडेदहा वाजेपासून उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला. सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाली. भाषा, सामान्य ज्ञान आणि गणित या विषयांना अनुसरून प्रश्न विचारण्यात आले होते. ६० मिनिटांत १०० प्रश्न सोडविण्याचे आव्हान उमेदवारांपुढे होते. वेळ अपुरा ठरल्याची खंत अनेक उमेदवारांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..हा तर आंदोलनाचा पराभव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेले काही दिवस शेतकऱ्यांनी न्याय्य हक्कांसाठी जीवाचे रान करूनही त्यांच्या पदरात सरकारने फार काही टाकले असे नाही. जे टाकले आहे तेही सरकारच्या आणि जिल्हा बँकांच्या आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मिळू शकेल, असे वाटत नाही. त्यामुळे गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर पराभवच झाला अशी खंत सुकाणू समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ शेतकरी नेते गिरीधर पाटील यांनी रविवारी व्यक्त केली.

सुकाणू समितीचे पदाधिकारी आणि मंत्री गटातील सदस्य यांच्यात रविवारी दुपारी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. परंतु, ज्या तत्वत: या शब्दाला ३ जून रोजीच्या बैठकीत सुकाणू समितीच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतला होता त्याच शब्दावर ठाम राहत सरकारमधील काही मंत्री हे आंदोलन गुंडाळण्यात यशस्वी झाल्याची टीका गिरीधर पाटील यांनी केली. ते म्हणाले, की ३ जून रोजी झालेल्या बैठकीत सरकार ज्या मागण्या मान्य करीत होते त्याच मागण्यांवर सरकारने आजही सकारात्मकता दर्शविली. त्यामुळे त्यात नवीन असे काहीच नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पुढील आठवड्यात महाराष्ट्रात येत आहेत. त्यांच्यासमोर शेतकरी आंदोलकांचा तमाशा नको, याचा सरकारवर दडपण होते. म्हणूनच राज्य सरकारचा मंत्रिगट आंदोलन शमविण्यासाठी अधिक सक्रीय झाला होता. नवीन काही न देता मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. तत्वत: शब्द आला की त्यानुसार काही निकष आणि अटी लागू असतात. म्हणूनच तत्वत: शब्दाला समितीमधील सदस्यांचा आक्षेप होता.

मग आजच्या बैठकीत या शब्दाला आक्षेप का घेण्यात आला नाही? असा सवाल पाटील यांनी उपस्थ‌ति केला आहे. सरसकट कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पुरेसा पैसा नाही. सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. नोटाबंदीच्या न‌णियानंतर जिल्हा बँकाही जायबंदी झाल्या असून अल्पभूधारकांनाही कर्जमाफी मिळेल की नाही? याबाबत पाटील यांनी साशंकता व्यक्त केली आहे.

‘जल्लोष फार काळ टिकणार नाही’
कर्जमाफीच्या निर्णयामुळे जल्लोष होत असला तरी तो फार काळ टिकणारा नाही. हक्कांसाठी एकवटलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला असून त्यामुळे यापुढील आंदोलनांमध्ये तो उतरेल की नाही, याबाबत पाटील यांनी साशंकता व्यक्त केली. आजच्या बैठकीनंतर सरकारची सरशी झाली आणि आंदोलनाचा पराभव झाल्याचेही गिरीधर पाटील म्हणाले.

शेतकरी संघटनांकडून आनंदोत्सव
कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय झाल्यानंतर गोल्फ क्लब मैदानाजवळील अतिथीगृहासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपावर गेलेल्या शेतकऱ्यांचे हे मोठे यश असल्याची भावना यावेळी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी हंसराज वडघुले, माधुरी भदाणे, करण गायकर, चेतन शेलार, गणेश कदम आदी उपस्थ‌ति होते.

शेतकरी संघटना अंशत:च समाधानी

सरकारच्या निर्णयाबद्दल शेतकरी संघटना अंशत:च समाधानी आहे. अल्पभूधारकांची कर्जमाफी आधीच्या चर्चेतच झाली होती, ती नव्याने जाहीर केली एवढेच. यामुळे निदान काही आत्महत्या टळतील अशी आम्ही प्रार्थना करतो. शेतमालाची अनावश्यक चढ्या भावाने केली जाणारी आयात, शेतमाल-साठवणुकीवरील बंधने, निर्यातबंदी, आयात-शुल्क माफ करणे, निर्यात शुल्क वाढवणे अशा प्रकारच्या अनेक मुक्त-बाजारविरोधीनीती, संदर्भात चर्चा होणे आवश्यक होते, ती चर्चा सदर संघटना व सरकारने टाळली. अन्य मागण्याही दुर्लक्षिल्या गेल्या. दरवर्षी कटोरा घेऊन सरकारच्या दारात उभे राहण्यापेक्षा शेतकऱ्यांना ताठ मानेने शेती-व्यवसाय करता आला पाहिजे, अशी शेतकरी संघटनेची भूमिका कायम आहे. त्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.
- अनिल घनवट, अध्यक्ष, शेतकरी संघटना

शेतकऱ्यांवर टांगती तलवार

अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे शेतकऱ्यांमधून स्वागत होत असले तरी अन्य शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही याबाबतची टांगती तलवार कायम राहिल्याबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी देखील व्यक्त होऊ लागली आहे. हमीभावासह अनेक मागण्यांच्या बाबतती ठोस निर्णय न देता आस्थे कदम चालण्याची भूमिका राज्य सरकारने स्वीकारल्याबद्दल असमाधानाचे भावही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहेत. सुकाणू समितीने आंदोलन मागे घेण्याबाबत घाई केली की काय? असा सूरही आता शेतकऱ्यांमधून उमटू लागला आहे.

सरकारने कर्जमाफी दिली त्याचे स्वागत आहे; परंतु यापुढे उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव आणि ५० टक्के नफा अधिक दिल्यास शेतकऱ्याला कर्जमाफी व अनुदानासारख्या बाबींची गरज राहणार नाही.
- संपतराव व्यवहारे, निफाड

आंदोलनातील मागण्या मान्य करण्याकरता, तसेच आपल्या हक्कासाठी व अस्तित्वासाठी लढलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे व संघटनेचे अभिनंदन केले पाहिजे. सरकारने भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, हमीभाव व स्वामीनाथन आयोग लवकरात लवकर अंमलात आणावा, शेतकरी मुलांसाठी शिक्षण व नोकरीत सवलत मिळावी. सरकारने जाहीर केलेल्या तसेच मान्य तातडीने लागू कराव्यात.
- सचिन आहेर, भालूर, नांदगाव

मागील वर्षात दुष्काळ त्यानंतर शेती मालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत होता. त्यामुळे कर्जमाफीची गरज होती. राज्य सरकारने कर्जमाफी दिल्याने आनंद झाला आहे. आता अंमलबजावणीची गरज आहे. हे ऐक्याचे हे फळ आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
- गोविंद तळेकर, भालूर नांदगाव

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केला हा सर्वात आनंदाचा दिवस आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखावह करणारा हा निर्णय आहे. सर्व शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. अल्पभूधारकांना कर्जमाफी व दुधाविषयीचे धोरण हे निर्णय स्वागतार्ह आहेत.
- गणेश निंबाळकर, दहिवद, चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी कर्मचाऱ्याची महिलांकडून धुलाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सातपूर कॉलनीच्या कामगार वस्तीत एमआयडीसी भवनातील जाधव नावाच्या कर्मचाऱ्याने घरकाम करणाऱ्या महिलेची छेड काढल्याचा आरोप करत महिलांनी त्याची चपलांनी धुलाई केली. या कर्मचाऱ्यावर पोलिसांनी कारवाई, करावी अशी मागणी एमआयडीसी भवनातील महिला कर्मचाऱ्यांसह इतरांनीही केली आहे.
हा कर्मचारी घरगुती काम करणाऱ्या एका महिलेला गेल्या महिन्याभरापासून त्रास देत होता. संतापलेल्या महिलेने अखेर सातपूर कॉलनीतील रहिवाशांना याबाबत सांगितले. या महिलेचा पिच्छा करताना तरुणांनी जाधव याला म्हसोबा मंदिराजवळ पकडले. यानंतर पीड‌ति महिलेने पायातील चप्पल काढत त्याला यथेच्छ चोप दिला. यावेळी इतरही महिलांनी जाधवला मार दिला. यावेळी जाधवसोबत असलेला एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला. याबाबत सातपूर पोलिसांकडे माहिती देऊनही उद्योग भवनातील या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस आयुक्तांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी घरकाम करणाऱ्या महिलांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहेगावकरांची पाण्यासाठी वणवण

$
0
0

नळ कनेक्शन नसल्याने ऐन पावसाळ्यात हाल; पाणी योजनेसाठी ठोस निर्णयाची मागणी

म. टा. वृत्तसेवा, निफाड

वाहेगाव (ता. निफाड) या गावाशी संलग्न असणाऱ्या ग्रुपग्रामपंचायतमधील दहेगावला पावसाच्या दमदार आगमनानंतरही पाणीटंचाई भेडसावत आहे. दहेगाव या भरवस फाट्याजवळील गावात भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना तासनतास सार्वजनिक नळावर थांबावे लागत आहे. तरी येत्या काळात या गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील भरवस फाट्याजवळील या गावाचा कारभार वाहेगाव ग्रुपग्रामपंचायतीकडे आहे. त्यामुळे प्रत्येक उपाययोजनांसाठी या ग्रमास्थांना वाहेगावावरच अवलंबून राहावे लागते. दहेगाव या गावात साधी नळ पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वित नसून, गावात राहणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सार्वजनिक नळ कनेक्शनवरून पाणी भरावे लागते. तसेच गावातील विहिरीतून या नळाला पाणी सोडले जाते. मात्र नळाला पाणी सोडण्याच्यावेळी लाइट गेल्याने सतत पाणीपुरवठा बंद होतो. अशा एक ना अनेक अडचणींचा सामना दहेगाव ग्रामस्थांना करावा लागत आहे.

या समस्येबाबत महिलांना विचारले असता त्यांनी गावात नळ पाणीपुरवठा नसल्याची माहिती दिली. तसेच गावात नळ पाणीपुरवठा योजना लागू करण्यासाठी वाहेगाव ग्रामपंचायतीने आमच्याकडून घरपट्ट्या वसूल केल्या. मात्र अजूनही नळ कनेक्शन दिले नसल्याचे कल्पना पेंढारी, मंजू गुप्ता, मीरा पवार, शारदा पवार, मंगल सोनवणे, अश्विनी घोटेकर या महिलांनी सांगितले. गावात असलेल्या कूपनलिकांना खारट पाणी आहे, असेही त्या म्हणाल्या. बऱ्याचदा दोन नळांवर संपूर्ण गावाच्या महिला पाणी भरायला आल्याने भांडण होते. अशा परिस्थितीत अनेकदा मागणी करूनही नळ कनेक्शन मिळत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बच्चे मंडळी रंगणार आज रंग-रेषांच्या द‌ुनियेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शहरात सध्या विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. या सोहळ्यात बच्चेकंपनीलाही खास स्थान देण्याचे उद्देशाने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आज (सोमवार ) सकाळी ९ ते ११ या वेळेत मते लॉन्स, सावरकरनगर येथे होणार आहे.

नाशिक शहराला वा. गो. कुलकर्णींपासून ते शिवाजीराव तुपे आदींपर्यंत प्रसिद्ध व दिग्गज चित्रकारांची परंपरा आहे. या परंपरेला सलाम करून ‘मटा’ने वर्धापन दिनानिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शहरात चित्रकलेचा प्रचार व प्रसार व्हावा आणि लहान कलाकारांच्या प्रतिभेला वाव मिळावा यासाठी ही स्पर्धा होणार आहे.

तीन गटांत रंगणार स्पर्धा

पाचवी व सहावी (एक गट), सातवी व आठवी (दुसरा गट), नववी व दहावी (तिसरा गट) अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी ‘स्मार्ट सिटी’ हा विषय देण्यात आला आहे.

बक्षिसांची लयलूट

विद्यार्थ्यांना कागद ‘मटा’तर्फे पुरविण्यात येणार असून, इतर साहित्य (पेन्सिल, खोडरबर, रंग) विद्यार्थ्यांनी घरून आणावयाचे आहे. या ठिकाणी चित्र काढण्यासाठी भारतीय बैठकीची व्यवस्था असल्याने बसण्यासाठी छोटी सतरंजी व कागद धरण्यासाठी प्रत्येकाने पॅड आणायचे आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

हौशी कलाकारांनी येथे साधावा संपर्क

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे यांच्याशी महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइल क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. ऐनवेळी नोंदणी केली तरी चालेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलात्मक जुगलबंदीची ‘अनुभूती’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कथकचा पदरव, बासरीचा सूर, तबल्याचा नाद अन् त्यातच पावसाची साथ अशी अनोखी कलात्मक जुगलबंदी मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्चर कॉलेजचा परिसरात रविवारी ‘मटा’च्या कलासंगम आर्ट फेस्टद्वारे नाशिककरांना अनुभवायला मिळाली. कलासंगमचा उद्घाटन सोहळा शनिवारी पार पडल्यानंतर विविध कलाप्रकार सादर करण्यात आले. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शास्त्रीय गायनाने झाली. दिवसभर नृत्य, नाट्य, शिल्प, संगीत अशा कलांच्या सादरीकरणानंतर संगीतमय कार्यक्रमाच्या मुख्य सोहळ्याला सायंकाळी तबलावादनाने सुरुवात झाली.

--

हे गजानन वक्रतुंड महाकाय...

‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित ‘कलासंगम’ अार्ट फेस्टमध्ये रविवारी उत्तरार्धाची सुरुवात गणेशवंदनेने करण्यात आली. ही गणेशवंदना गुरू सुमुखी अथनी यांच्या शिष्यांनी सादर केली. क. का. वाघ परफॉर्मिंग आर्टमधील नृत्य विभागाच्या वतीने ही गणेशवंदना सादर करण्यात आली. यात अक्षय शहाणे, संतोष, पंकज ठाकरे आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे गजानन वक्रतुंड महाकाय असे गणेशवंदनेचे बोल होते. गणेशवंदनेनंतर गुरू सुमुखी अथनी यांचा सन्मान करण्यात आला.

--

तबलावादनाने रंगत

नाशिकमधील तबलानवाज नितीन पवार व नितीन वारे यांच्या पवार तबला अकादमी व अदिताल अकादमीच्या विद्यार्थ्य़ांनी तबला सहवादन केले. एका वेळी २५ विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वादनाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी आर्किटेक्ट कॉलेजचे सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. लहान वादकांच्या हातातून निनादणारे तबल्याचे बोल, त्यांच्या वादनातील तयारी पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्रितालात वादन झाले. यात कायदे, पलटे यांचा समावेश होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी तिस्त्र जाती कायदा सादर केला. रेला, तुकडे, फर्माईशी चक्रदार सादर करण्यात आले. ताल सादर करताना तिहाईतील पहिला ‘धा’ समेवर, दुसऱ्या आवर्तनातला दुसरा ‘धा’ समेवर तिसऱ्या आवर्तनातला तिसरा ‘धा’ समेवर सादर करून आपल्या तयारीचे दर्शन घडविले. त्यानंतर ‘नग नग’ शब्दांचा वापर करून चक्रदार सादर करण्यात आले. यावेळी अजराडा व फरुखाबाद या घराण्यांच्या गती सादर करण्यात आल्या. त्यानंतर ‘धीर’ ‘धीर’ शब्दयुक्त रेला सादर करण्यात येऊन दोन बंदिशी सादर करण्यात आल्य़ा याचे वैशिष्टय म्हणजे या तीन तालांमध्ये वाजविण्यात आल्या. त्यात अडाचौताल, दादरा, झपताल त्रिताल आदींचा समावेश होता. ‘तिरकीट’ आणि ‘तीट’ या दोन शब्दांचे कायदे सादर करण्यात आले.

--

बासरीचे गुंजले सूर

बासरीवादक मोहन उपासनी यांच्या विद्यार्थ्यांनी बासरीवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात भूप रागाने झाली. यात सरगम, आलाप, तानांसह सादरीकरण करण्यात आले. शास्त्रीय वादनानंतर वेस्टर्न प्रकारात भूप सादर करण्यात आला. त्यानंतर यमन व तिलककमोद राग सादर करण्यात आला. जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बासरी वादनातदेखील २० मुले व ६ मुलींनी सहभाग घेतला. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमासही रसिकांची दाद लाभली.

--

विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय सहभाग

आर्ट फेस्टमध्ये मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्ट कॉलेजच्या तिसऱ्या आणि दुसऱ्या वर्षाच्या मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सेट डिझाइन स्ट्रीमच्या विविध कलाकृती सादर केल्या. त्याचप्रमाणे विजेता भामरे, पूर्वा घिया, कृतिका जाधव, सिमरन कर्णिक, मुक्ता कावळे, सायली पवार, हेतांसा राजकोटिया, ऋषभ शिवाल, अक्षय तिवारी, श्रिया तोरणे, प्राची भोसले, पलाश कडलग, प्रियंका पिंपळे, पुष्कराज ठाकूर, महेश अहिरे, पुष्कराज अहिरे आदींनी विविध कलाप्रकार सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमात हॅण्ड फाउंडेशनच्या सदस्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा सत्कार करण्यात आला.

--

सतारवादनात रसिक तल्लीन

येथील विख्यात शाहीद परवेज गुरुकुलच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सतारवादनाच्या बहरदार कार्यक्रमात श्रोते तल्लीन झाले. गुरुकुलचे अध्यक्ष उद्धव अष्टुरकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या सतारवादनास श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यावेळी त्यांनी यमन रागातील चित्तवेधी रचना सादर केल्या. याशिवाय विविध रागांमध्ये त्यांनी सादर केलेल्या रचनांनी श्रोत्यांना मुग्ध केले. गौरव तांबे यांनी यावेळी तबल्यावर उत्तम साथ दिली. मोहिनी कुलकर्णी, अंजली नांदूरकर, राधिका गोडबोले, सोनल शहाणे, वासंती खाडिलकर, सुनीता जळगावकर या कलावंतांनी या सादरीकरणात सहभाग घेत रंगत आणली.

---

कथकची रसिकांवर मोहिनी

शहरातील विख्यात नृत्यांगना व कलानंदच्या संचालक सुमुखी अथनी, कीर्ती कलामंदिरच्या संचालक रेखा नाडगौडा आणि नृत्यांगणच्या संचालक कीर्ती भवाळकर यांच्या शिष्यांनी मुरली मनोहर रे... या कृष्ण भजनावर सादर केलेल्या कथक नृत्यातील तालबद्ध पदन्यास अन् भावोत्कट मुद्राभिनयाने रसिकांवर मोहिनी घातली. बहरदार सतार वादनानंतर कथक नृत्याने रसिकांना खिळवून ठेवले. या तीनही नृत्यसंस्थांच्या शिष्यांनी ‘एक से बढकर एक’ कलाविष्कार सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले. ऐश्वर्या कुलकर्णीच्या सुंदर नृत्याने सगळ्यांचीच मने जिंकली. सजन श्याम गर्जत आले... या गाण्यावर सादर करण्यात आलेले हे नृत्य कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. मेरी सखी कासे कहूँ कान्हा कि चतुराई... या गाण्यावर सुंदर नृत्य अदाकारी सादर झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिकांचाही लवकरच शहर विकास आराखडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक विभागातील नगरपालिका, नगरपंचायतींसह काही गावांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी प्रादेशिक विकास योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, तीन वर्षांच्या कालावधीत नव्याने अस्तित्वात आलेल्या सर्व नगरपालिका व नगरपरिषदांचे शहर विकास आराखडे तयार केले जाणार आहेत.

नाशिक विभागात पाच महानगरपालिका, ४० नगरपरिषदा व १४ नगरपंचायती आहेत. अशा सर्व शहरांना स्वतःचा शहर विकास आराखडा असतो. नाशिक विभागातील नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपालिका व नगरपरिषदांच्या विकास आराखड्याचे कामही येत्या तीन वर्षांत सुरू होणार आहे. विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नगर व मालेगाव या पाचही महापालिकांचे शहर विकास आराखडे यापूर्वीच प्रादेशिक विकास योजनेत तयार झालेले आहेत.

बारा जिल्ह्यांना प्रथमच मिळाली प्रादेशिक योजना

राज्यातील तब्बल १२ जिल्ह्यांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही स्वतःची प्रादेशिक योजना नव्हती. त्यामुळे या जिल्ह्यांच्या विकासाचा आलेख मंदावला होता. परंतु, या बाराही जिल्ह्यांसाठीची प्रादेशिक विकास योजना नुकतीच तयार करण्यात आली. यात ठाणे, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी, वर्धा, गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ व भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या शहरात होणार नवीन डीपी प्लॅन

नाशिक जिल्ह्यातील चांदवड, देवळा, दिंडोरी, कळवण, निफाड, पेठ, जळगाव जिल्ह्यातील बोदवड, नगर जिल्ह्यातील जामखेड, अकोले, पारनेर, धुळे जिल्ह्यातील साक्री व नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या नगरपालिका व नगरपरिषदांचा शहर विकास आराखडा येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असून, प्रस्तावित दृतगती विकास योजनेचा या कामासाठी मोठा लाभ होणार आहे.

डीपी पूर्ण असलेली शहरे

नाशिक जिल्ह्यातील नाशिकसह, मालेगाव, सटाणा, येवला, सिन्नर, इगतपुरी, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, अंमळनेर, पाचोरा, एरंडोल, धरणगाव, यावल, फैजपूर, सावदा, रावेर, भडगाव व जामनेर, नगर जिल्ह्यातील नगर, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, राहुरी, देवळाली, राहता व श्रीगोंदा, धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, दोंडाईचा व नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शाहादा, नवापूर व तळोदा या शहरांचा शहर विकास आराखडा यापूर्वीच मंजूर झालेला आहे.

डीपी प्लॅनचे नूतनीकरण

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, भगूर, त्र्यंबक व मनमाड, जळगाव जिल्ह्यातील पारोळा व रावेर, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, नगर जिल्ह्यातील पाथर्डी, शिर्डी व नेवासा या शहरांच्या शहर विकास आराखडा तयार असून, त्यात दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. या शहरांचे शहर विकास आराखडे शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. लवकरच या शहरांच्या शहर विकास आराखड्याला शासनाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नॉन म्युनिसिपल डीपी प्लॅन

शहर विकास आराखडा हा नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदा व महानगरपालिकांना असतो. या शहरांची वेगाने वाढ होत असल्याने या शहरांची रचना सुनियोजित पध्दतीने व्हावी यासाठी शहर विकास आराखड्याची गरज असते. अशा शहर विकास आराखड्यांनुसार त्या त्या शहराचा विकास होत असतो. मात्र नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड व नगर जिल्ह्यातील बेलापूर व शेवगाव या तीन नॉन म्युनिसिपल गावांसाठीही स्वतंत्र विकास आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. या विकास आराखड्यांना यापूर्वीच मंजुरीही मिळालेली आहे. त्यामुळे या तिन्ही गावांची रचना सुनियोजित झालेली आहे.

एनएमआरडीएला चालना कधी

नाशिकच्या विकासासाठी एनएमआरडीएची शासन निर्णयानुसार स्थपना झालेली आहे. मात्र पुरेसे मनुष्यबळ व कार्यालयाअभावी एनएमआरडीएचे कामकाजाला गती मिळालेली नाही. एनएमआरडीएमुळे नाशिक शहरालगतच्या दहा किलोमीटरच्या परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

शहर विकास आराखड्यांअभावी शहरांची असंतुलित व अनियंत्रित वाढ होते. झोन बदलासाठी मोठा कर लागतो. नियोजनबद्ध विकासासाठी दूरदृष्टीने तयार केलेल्या शहर विकास आराखड्याची आवश्यकता असते.

- प्रदीप काळे, आर्किटेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिपाइंत धुसफूस

$
0
0

प्रकाश लोंढेच जिल्हाध्यक्षपदी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रकाश लोंढे यांच्या विरोधकांनी एकत्र येत रिपाइंचे जिल्हाध्यक्ष म्हणून पवन पवार यांची नियुक्ती करण्याचा ठराव करीत शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर पदाधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्यानंतर रिपाइंमधील अंतर्गत धुसफूस चर्चेचा विषय ठरली आहे. रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी रविवारी दुपारी जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्षपदी प्रकाश लोंढेच असल्याचे स्पष्ट केले.

प्रकाश लोंढे यांना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात आली असली तरी या वादामुळे लोंढेंवरील नाराजी समोर आली आहे. लोंढे यांनी पवन पवार सदस्यच नसल्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्ष कसे करता येईल, असे सांगितले असले तरी स्टॅम्पवर सह्या करणारे रिपाइंचे पदाधिकारी असल्यामुळे पक्षांतर्गत विरोधही समोर आला आहे. खंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की रिपाइंमधील स्थानिक पातळीवरच निवडीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशी कोणतीही नेमणूक झालेली नाही. जिल्हाध्यक्षपदाबाबत राज्य पातळीवर चर्चा होते. त्यानंतर सर्वांचा विचारविनिमय करून निर्णय घेतला जातो. प्रकाश लोंढे हे जिल्हाध्यक्ष आहेत व त्यांनी कोणाला प्रवेश द्यायचा हा निर्णय स्थानिक पातळीवरच घ्यायचे सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले. माझा दौरा नियोजित होता असे सांगून या वादामुळे मी आलो नसल्याचाही खुलासा त्यांनी केला. यावेळी रिपाइंचे पदाधिकारी अर्जुन पगारे, पवन क्षीरसागर, फकिरा जाधव, सुनील कांबळे, नंदकुमार जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

ऐक्याची प्रक्रिया जोरात

रिपाइं ऐक्य व्हावे यासाठी प्रक्रिया वेगात सुरू आहे. आमचे नेते रामदास आठवले यांनी ऐक्यासाठी त्याग करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे ही पक्षाची भूमिका आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या ऐक्यासाठी आमंत्रित केले आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

काळेंची हकालपट्टी, पठारे ‌निलंबित

जिल्हाध्यक्ष लोंढे यांनी पवन पवार रिपाइंचा सदस्य नसल्याचे सांगून त्यांना समर्थन देणाऱ्या विश्वनाथ काळे यांची पक्षातून हकालपट्टी, तर रामाभाऊ पठारे यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केल्याचे जाहीर केले.

सदस्यसंख्या वाढविण्यावर भर

आगामी त्र्यंबकेश्वर व इगतपुरी नगरपालिकेत सदस्य संख्या कशी वाढवता येईल, यासाठी माझा दौरा आहे. त्यात नाशिकचा निरीक्षक म्हणून माझ्यावर नुकतीच जबाबदारी सोपवली असल्याचेही त्यांनी सांगितले. आमचे संघटन चांगले असून, पक्षही सक्रिय आहे पण, सदस्य निवडून येत नाहीत. त्यामुळे त्यावर विचारमंथन करून आम्ही सदस्यसंख्या कशी वाढवता येईल यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाहुबली’मुळे छप्पर फाडके महसूल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने जगभर दीड हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली. नाशिकमध्येही बाहुबलीने तिकिट खिडकीवर धुमाकूळ घातला. या चित्रपटामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळाला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्याचे करमणूक शुल्कापोटी अडीच कोटी रुपये वसूल झाले आहेत. तर विभागात साडेपाच कोटींपेक्षा जास्त विक्रमी करमणूक करप्राप्त झाला आहे.

सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नाशिक विभागासाठी ५५ कोटी ५० लाख रुपये इतके करमणुक शुल्काचे उद्द‌िष्ट होते. त्यापैकी ५१ कोटी ४६ लाख रुपये अर्थात ९२.७२ टक्के इतकी करमणुक शुल्कापोटी वसुली झाली होती. परंतु, गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाने सरकारला करमणूक शुल्कापोटी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून दिला आहे.

विभागात नाशिक प्रथम

‘बाहुबली २’ प्रदर्शित झाल्यानंतर नाशिक विभागात एकूण उद्द‌िष्टाच्या १०.१९ टक्के इतके करमणूक शुल्क मेअखेर शासनास प्राप्त झाला आहे. विभागात २ कोटी ४९ लाख १८ हजार रुपये वसुली करुन नाशिक जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याखालोखाल १ कोटी ५२ लाख ३८ हजार रुपये वसूल झालेल्या नगर जिल्ह्याने करमणूक शुल्क वसुलीत दुसरा नंबर पटकावला आहे. मात्र, विभागातील धुळे, जळगाव व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांना कोटीचा टप्पा पार करता आला नाही. दर्जेदार चित्रपटांना नाशिककर दोन्ही हातांनी भरभरुन देतात, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

मे अखेर करमणूक शुल्क वसुली

जिल्हा शुल्क वसुली (रु. लाखांत)

नाशिक २४९.१८

धुळे ४७.५२

नंदुरबार २४.९१

जळगाव ९१.५३

नगर १२५.३८

एकूण - ५६५.५२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार बनला आनंदवार…

$
0
0

कलासंगम मटा आर्ट फेस्टमध्ये सहभागी झालेल्या नाशिककरांनी आमचा रविवार आनंदवार बनल्याची भावना व्यक्त केली. तरुणाईला तर अनेक गोष्टी प्रथमच प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याने त्यांनीही हा अनोखा फेस्ट एन्जॉय केला.

--

कलासंगम या ‘मटा’च्या आर्ट फेस्टमुळे आमचा रविवार अगदी आनंदवार होऊन गेला. विविध हौशी कलावंतांनी कार्यक्रमांत रंगत आणली. या उपक्रमाद्वारे खूप काही शिकता आले. ‘मटा’ने पुढील वर्षीही हा कलासंगम महोत्सव आयोजित करावा.

-समीर परदेशी

--

‘मटा’ने आयोजित केलेल्या कलासंगम आर्ट फेस्टमध्ये खरोखरच विविध कलांचा संगम पाहायला मिळाला. मनाला भुरळ घालणारे विविध विषयांवरील पेंटिंग्ज, तसेच विविध प्रकारची शिल्प यामुळे कलासंगमची रंगत आणखीच वाढली होती.

-संदीप बोराडे

--

‘मटा’ने कलासंगम या आर्ट फेस्टच्या रुपाने नाशिककरांना कलागुणांच्या सादरीकरणासाठी अतिशय उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या अनोख्या आर्ट फेस्टद्वारे भरपूर नवनव्या गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळाल्या.

-प्राची पाटील

--

कलासंगम आर्ट फेस्टमधील चित्रे, शिल्प, छायाचित्रे फारच अप्रतिम होती. हौशी कलावंतांचे सादरीकरणही मस्त होते. कलेला अतिशय जवळून अनुभवण्याची संधी मला केवळ ‘मटा’मुळेच मिळाली, त्याबद्दल ‘टीम मटा’ला धन्यवाद!

-चेतन पाटील

मी प्रथमच माझे लाइव्ह पोर्ट्रेट काढले. ‘मटा’ने जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मुलाने सादर केलेली लावणी अन् डोक्याने पियानो वाजवणे या वेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. कॉलेजियन्सचा मिळालेला सपोर्ट हे या फेस्टचे यश ठरले.

-साक्षी काबरा

---

मटा आर्ट फेस्टमध्ये माझ्यासारख्या तरुणाईला अनेक गोष्टी पाहायला, शिकायला मिळाल्या. अनेक आर्टिस्टचे चित्रप्रदर्शन बघून कलेच्या बाबतीत नाशिक कुठेच मागे नसल्याचे जाणवले. मटाने असे फेस्ट ग्रामीण भागासह सर्वच कॉलेजमध्ये घ्यावेत.

-जनार्दन गायकवाड

--

सर्व छोट्या-मोठ्या कलाकारांना या फेस्टमुळे संधी मिळाली. त्यामुळे भविष्यात नक्कीच मोठ्या व्यासपीठावर अनेकांना संधी मिळेल यात शंका नाही. हा आर्ट फेस्ट नाशिकसाठी जणू पर्वणीच ठरला. लाइव्ह गाणी एेकताना मजा आली.

-धीरज बच्छाव

--

नाशिकमध्ये पहिल्यांदा असा आर्ट फेस्ट झाला. ‘मटा’चे प्रत्येक इव्हेंट्स खूप खास असतात, त्यांना आम्ही सहकुटुंब हजेरी लावतो. चित्रप्रदर्शन, लाइव्ह कॉन्सर्ट रॉक बँड्सने धमाल आणली. वेगळाच माहोल तयार करणाऱ्या ‘मटा’चे आभार.

-रुही आरोटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाला दर आवाक्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, ना‌शिक

शेतकरी संपामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली होती. मात्र रविवारी नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची दुप्पट आवक झाली. यामुळे दरात घसरण झाली. मुंबईसह, गुजरातमध्ये भाजीपाला नेहमीप्रमाणे विक्रीसाठी जाऊ लागला आहे. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर शेतकरी संप मागे घेतल्याने येत्या आठवड्यात भाजीपाल्याची आवक वाढण्याची शक्यता असून, दर आवाक्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

विविध मागण्यांसाठी शेतकरी १ जूनपासून संपावर गेले होते. यामुळे भाजीपाल्याची आवक मंदावली होती. शहरात भाजीपाला दुप्पट दराने विक्री होत होता. यामुळे जेवणातून भाजीपाला कमी होऊन अंडे, डाळी, कडधान्य यांचे प्रमाण वाढले होते. यामुळे अंड्यासह कडधान्याचेही दर वाढले होते. संपाची धार कमी झाल्यानंतरही फारशी आवक होत नव्हती. यामुळे दर चढेच होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून बाजार समितीत आवक वाढू लागली आहे. रविवारी भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली. याचा दरावर परिणाम झाला. गेल्या आठवड्यात दामदुप्पट झालेल्या भाजीपाल्याचे दर प्रचंड आवकेमुळे पूर्वपदावर आले आहेत. रविवारी सर्व पालेभाज्या व फळभाज्यांचे दर तीस ते चाळीस रुपये किलोदरम्यान स्थिरावले. संपाबाबत संभ्रमावस्था असल्याने भाजीपाला आवकेवर परिणाम झाला. आता मात्र संप मागे घेतल्याचे जाहीर केल्याने आवक नियमित सुरू होणार आहे.

पालेभाज्या तेजीत

रविवारी बाजार समितीत पालेभाज्यांनी चांगलाच भाव खाल्ला. मेथीच्या जुडीला २५ ते ५५ रुपये दर मिळाला. कांदापात, शेपू, पालक, कोथिंबीर यांचे दर दहा रुपयांच्या पुढे होते. दोन ते तीन दिवसात आवक कमी झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भाजीपाला बाहेर रवाना

संपामुळे मुंबईसह गुजरातमध्ये भाजीपाला पाठविणे बंद झाले होते. मात्र दोन दिवसांपासून नियमित भाजीपाला रवाना होऊ लागला आहे. यामुळे भाजीपाल्याला चांगले दर मिळत शकतील.

किलोचे दर

टोमॅटो - १० ते १५, वांगे - २०, कारले - ३० ते ३५, गिलके - ३० ते ३५, दोडके - ३० ते ३५, भेंडी - २० ते २५, मिरची - ४० ते ५०, गवार - ३०, कोबी - १०, फ्लॉवर - १०, काकडी - १५ ते २०, मेथी - २५ ते ५५ जुडी, कोथिंबीर - ५ ते २५, शेपू - १५ ते २०, पालक - ५ ते १०, कांदापात - १५ ते ३०, भोपळा - ५ ते १० नग

आंबा दरात घसरण

नाशिक : फळांच्या राजा आंब्यांची आवक चांगली असल्याने दरात घसरण झाली आहे. ४० रुपयांपासून १२० रुपये किलोने आंब्यांची विक्री होत आहे. पावसाला सुरुवात झाल्याने आंबा दरावर त्याचाही परिणाम झाला आहे. लोणचे भरण्यासाठी कच्चा कैऱ्यांची मात्र मागणी वाढली आहे. गेल्या महिन्यात आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र दरात घसरण झाल्याने दर आवाक्यात आले आहेत. सफरचंदाचे दर जैसे थे आहेत. चिकू ६० ते ८० रुपये किलोने विक्री होत आहेत. पपईची बाजारात आवक कमी असूनही दर मात्र ३० रुपये किलोवर ‌स्थिरावले आहेत. टरबुजांचीही आवक घटली आहे. टरबूज २० रुपये किलोने विक्री होत आहेत. अननस ५० ते ८० रुपये नगाने विक्री होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्ट फेस्टमध्ये हरखले कलारसिक

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच करता आणि करविता, देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, माझा सखा पांडुरंग... आदी सुमधूर भक्तिगीतांच्या सुरावटींत नाशिककर कलारसिक हरखून गेले होते. निमित्त होते, ‘महाराष्ट्र टाइम्स’ आयोजित कलासंगम आर्ट फेस्टचे. बहारदार गाणी, सुगम संगीत, मंत्रमुग्ध करणारे ताल अन् स्वर यासोबतच विविध कलांचा आविष्कार याची अफलातून मेजवानी नाशिककर रसिकांनी रविवारी कमालीची एन्जॉय केली.

‘मटा’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन सोहळ्यानिमित्त नाशिकमधील हौशी कलाकार, तसेच कलाप्रेमींना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता कलासंगम हा दोनदिवसीय आर्ट फेस्ट आयोजित करण्यात आला होता. शनिवारप्रमाणेच रविवारीही मविप्रच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये सकाळी १० वाजल्यापासूनच आर्ट फेस्टची रंगत वाढत गेली.

पुष्कराज भागवत आणि त्यांच्या सहकलावंतांनी कलाकारांनी मिळून भक्तिगीते, भावगीते, शास्त्रीय संगीत सादर करीत कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली. वंदे मातरम या देशभक्तीपर गीतावर गायत्री देशपांडे हिने सादर केलेल्या भरतनाट्यमला प्रेक्षकांनी कमालीची दाद दिली. ज्योती चव्हाण यांनी अॅबस्ट्रॅक स्टाइलने अमूर्त चित्रशैलीचे रेखाटन केले. सोबतच अतुल भालेराव यांनी लॅण्डस्केपची चित्रशैली, तर बाळासाहेब पारसकर यांनी व्यक्ती स्केच रेखाटत आपली कला सादर केली. नारायण चुंबळे यांनी आर्ट फेस्टच्या प्रवेशद्वारावर एका काल्पनिक मॉडेलची रांगोळी रेखाटून प्रेक्षकांना आकर्षित केले. यासोबतच ऋषिकेश पगारे याने तबल्यावर तीनताल आणि बंदिश सादर करीत दर्दी दाद मिळविली. प्रिहास पवार याने की-बोर्डवर गाण्यांची धून वाजवत रसिकांची मने जिंकली. यासोबतच विविध कलाविष्कार आर्ट फेस्टमध्ये सादर करण्यात आले. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनेक हौशी कलाकारांनी आपली कला सादर करीत रसिकांची दाद मिळवली. नाशिकमधील टॅलेंट बघण्यात नाशिककरदेखील हरखून गेल्याचे दिसून आले.

--

भक्तिगीतांची बरसात

कानडा राजा पंढरीचा… यासारखी पंढरपूरच्या वारीला अनुसरून अनेक भक्तिगीते पुष्कराज भागवत आणि टीमने सादर केली. यासोबत घेई छंद मकरंद, फिटे अंधाराचे जाळे या गाण्यांची मेजवानीही नाशिककरांनी अनुभवली. या मैफलीत गिटारवादन साक्षी काबरा, तबलावादन गौरव तांबे आणि कुणाल काळे, साइड ह्रिदम अमित भालेराव, तर संगीत साथ भूषण खालोखे यांनी केली.

..

हे ठरले आकर्षण...

राघव बाग याने बचना एे हसिनों लो मैं आ गया, ना सिखा कैसे जिना... यांसारख्या वेस्टर्न गाण्यांवर रॉकबॅण्डची पेशकश केली. राजलक्ष्मी कुलकर्णी हिने शास्त्रीय गायनातील मालकंस हा राग सादर केला. सूरज चेके याने मला जाऊ द्या ना घरी या लावणीवर मराठमोळी अदा सादर केली. प्रेक्षकांनी शिट्ट्या-टाळ्यांच्या गजरात त्याला दाद दिली. नंदकुमार आढाव याने डोक्याने पियानो वाजवत रसिकांची मने जिंकली. ह्रिदम म्युझिक या ग्रुपने मला वेड लागले प्रेमाचे, ये मौसम ये राते ये नदी का किनारा यांसारखी अनेक लोकप्रिय मराठी-हिंदी गीते सादर केली. एबीसीएल या डान्स ग्रुपच्या कलाकारांनी सोलो आणि ग्रुप डान्स सादर करीत प्रेक्षकांना खिळवून ठेवले.



चिमुकल्या साराची अदाकारी

सारा अरोरा या साडेचार वर्षांच्या बालिकेने आपली नृत्यकला आर्ट फेस्टमध्ये सादर केली. बद्री की दुल्हनिया... या गाण्यावर साराने ठुमकेदार अदा सादर करत प्रेक्षकांचा उत्साह वाढविला. यावेळी प्रेक्षकांनीही ठेका धरत साराला साथ दिली. साराच्या नृत्याने आर्ट फेस्टची रंगत कमालीची वाढली.



थिंक आउट ऑफ बॉक्स

शिल्पकार यतिन पंडित यांनी स्क्रॅब स्टाइलमध्ये गाड्यांचे वेस्ट मटेरियल वापरत आपला कलाविष्कार आर्ट फेस्टमध्ये दाखविला. थिंक आउट ऑफ बॉक्स ही थीम घेऊन यतिन पंडित आणि टीमने तीन फिगर असलेली मोठी कलाकृती तयार केली. विचारांच्या दुनियेत गुंतून बसण्यापेक्षा क्रिएटिव्ह काही तरी करा. कलाकाराला आउट ऑफ बॉक्स विचार करूनच नेमकं काय ते साध्य करायचं असतं, असे याद्वारे अधोरेकित झाले. ‘मटा’च्या आउट ऑफ बॉक्स इव्हेंटमुळे कलासक्त तरुणाईला अपग्रेड होण्याची संधी मिळाल्याचे दिसून आले.

--

संकलन ः सौरभ बेंडाळे, पवन बोरस्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पावसाची जोरदार हजेरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बरसणाऱ्या पावसाने रविवारी शहरातही जोरदार हजेरी लावली. रविवारच्या सुटीचा फायदा घेत काही हौशी नाशिककरांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला. मात्र, ऐन सायंकाळी आलेल्या पावसाने विक्रेत्यांची धांदल उडवत नागरिकांच्या खरेदीच्या नियोजनावरही पाणी फिरविले. त्यामुळे नागरिकांत दिवसभर असलेला खरेदीचा उत्साह सायंकाळी मावळला.

गेल्या तीन-चार दिवसांपासून ग्रामीण भागात पाऊस जोरदार हजेरी लावतो आहे. मात्र, शहरवासीयांना मात्र दाटून येणाऱ्या ढगांवरच समाधान मानावे लागत होते. पाऊस वाटेत कोठेही गाठू शकतो याचा पूर्ण अंदाज शहरवासीयांना आला असला तरी पावसाच्या सरी बरसण्याचे नाव घेत नव्हता. त्यामुळे नागरिकांची निराशा होत होती. रविवारी सकाळपासूनच शहरावर ढगाळ वातावरणाने मांडव धरला होता. दुपारी काही वेळ उन्हाचा चटका जाणवला, परंतु पुन्हा तीननंतर ढग जमून आले. दुपारी सव्वाचार ते साडेचारच्या सुमारास शहराच्या बहुतांश भागात पावसाला सुरुवात झाली. पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शहरवासीय सुखावले. पावसाचा आनंद घेण्यासाठी बच्चे मंडळींसह तरुणाईदेखील घराबाहेर पडली. त्यामुळे यंदाचा रविवार खऱ्या अर्थाने पावसाचा आनंद लुटण्याचा वार ठरला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा साडेसहानंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळ पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच या नऊ तासांत शहरात २६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागात चांदवड, मनमाड, नांदगावसह आणखी काही भागात पावसाने हजेरी लावली. ढगाळ हवामान असले तरी रविवारी कमाल तापमान ३३.२ आण‌ि किमान तापमान २३.५ अंश सेल्स‌िअस एवढे नोंदवले गेले.

खरेदीच्या नियोजनावर पाणी

एकीकडे काही लोक पावसाचा आनंद लुटत असताना व्यापारी वर्गाच्या व्यवसायावर मात्र या पावसाने विपरीत परिणाम केला. कामगार आणि नोकरदार वर्गाचे पगार झाले असून, लवकरच शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे अनेकांनी रविवारची ही सुटी बच्चे मंडळींच्या गणवेश, वह्या- पुस्तके व तत्सम खरेदीसाठी राखून ठेवली होती. मात्र, सायंकाळी पावसाने हजेरी लावत नागरिकांच्या नियोजनावर पाणी फिरविले. त्यामुळे सायंकाळी शहरातील मेनरोडसह सर्वच मुख्य बाजारपेठांमध्ये गर्दीचा ओघ कमी असल्याचे पाहावयास मिळाले. अर्थात, काही नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन दुपारीच खरेदी आटोपली.

जिल्ह्यात ६९.२ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शनिवारचा पूर्ण दिवस आणि रविवारी सकाळी साडेआठपर्यंत ६९.२ मिलिमीटर पाऊस झाला. पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तेथे ३७.० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बागलाणमध्ये २४, तर येवल्यात पाच मिलिमीटर पाऊस झाला. देवळ्यात २.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी ४.६ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून, १ ते ११ जून या कालावधीत ९४६ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ६३.९ मिलिमीटर पाऊ‌स झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडावरील पाणीटंचाई होणार दूर

$
0
0

भवानी तलावासाठी अडीच कोटींच्या निधीस मान्यता

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंगी गडास पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी सरकारने २ कोटी ४९ लाख ७१ हजारांचा निधी मंजूर करीत त्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे आता गडावर उन्हाळ्यात दरवर्षी भेडसावणारी तीव्र पाणीटंचाईची समस्या मिटणार असल्याने सप्तशृंगी गड ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.

सप्तशृंगी गाव व सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांना लागणाऱ्या पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी भवानी पाझर तलावातील पाणी वापरले जाते. मात्र या तलावाला गळती लागल्याने ३० ते ३५ टक्के पाणी वाया जाते. तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठलेला असल्याने तलावातील साठवण क्षमताही कमी झाली आहे. गडावर दिवसेंदिवस भाविकांची गर्दीबरोबरच गडावरील लोकसंख्या वाढत असल्याने पाण्याची गरजेपेक्षा पाणीसाठा कमी राहात असल्याने उन्हाळा सुरू होताच रहिवाशी व न्यासास पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.

परिणामी टंचाई काळात ग्रामस्थ, हॉटेल व्यवसायीकांबरोबरच ग्रामपंचायत व ट्रस्टला पाणी वाहून आणण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच गिरीश गवळी व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी भवानी तलावाची गळती थांबविणे व तलावाची क्षमता वाढविण्याच्या कामासाठी पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे व अधिकाऱ्यांकडे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निवेदने दिली.

पाठपुराव्यास मिळाले यश

त्याबाबत राज्यमंत्री दादा भुसे यांनी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी व संबधित विभागांतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गडावरील भवानी तलावाच्या कामाबाबत सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी हेही गडावर आले असता राजेश गवळींनी तलावाच्या गळती व क्षमता वाढविण्याची मागणी केली होती. तर दोन महिन्यापूर्वी गडावरील प्लास्टिक बंदी मोहिमेच्या शुभांरभासाठी आलेल्या जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनीही भवानी तलावाचे काम मार्गी लावण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, उपअभियंता धुम, मेरीचे कार्यकारी अभियंता तांबोळी, शाखा अभियंता गुंजाळ यांनी तलावाची पाहाणी करून कामाचा प्रशासकीय अहवाल शासनास सादरही केला होता. त्यानुसार भवानी पाझर तलावाचे साठवण तलावात रुपांतर करण्याचा प्रशासकीय मान्यता आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता लघुसिंचन, नाशिक यांना दिला आहे.

या कामाने आता तलावाची गळती थांबवून गाळ उपसा होणार असल्याने तलावातील पाणीसाठ्याची क्षमता वाढणार आहे. तसेच सप्तश्रृंगी गडवासींयाची पाण्यासाठी वणवण थांबणार आहे. सप्तशृंगी गडावरील सुमारे पंधरा वर्षांपासूनची पाणीटंचाई साठवण तलावाच्या माध्यमातून दूर होणार आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून भवानी तलावाच्या कामासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाल्याचा निश्चितच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राजेश गवळी यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

सरपंच सुमनबाई सूर्यवंशी, उपसरपंच ललिता व्हरगळ, सदस्य जगन बर्डे, हसंराज बर्डे, मेघा बर्डे, जयश्री गायकवाड, ग्रामसेवक आर. बी. जाधव, विजय वाघ यांच्यासह सप्तशृंगी न्यासाचे विश्वस्त, अधिकारी व ग्रामस्थांचेही तलावाच्या कामाच्या मागणीसाठी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबकेश्वर मंदिर परिसर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरातील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या देखभालीकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. मंदिर प्रांगणातील फरसबंदीच्या सिमेंट निघाल्याने असून, ठिकठिकाणी खळगे पडले आहेत. यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक ठेचकाळतात. आता पावसाळ्यात त्यात पाणी साठल्याने अधिक झीज होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पर्यटकांसाठी पावसाळ्यात पसंतीचे डेस्टिनेशन असणाऱ्या त्र्यंबकेश्वरला दरवर्षी लाखो भाविक येतात. मात्र त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा या कितपत चांगल्या आहेत, याबाबत मात्र व्यवस्थापन लक्ष देताना दिसत आहे. यात प्रामुख्याने मंदिर परिसरातील समस्यांबाबत पुरातत्त्व खात्याचे अधिकार आहेत, असे सांगितले जाते. मात्र व्यवस्थापनाने संबंधित खात्याचा पाठपुरावा करून डागडुजीचं हे काम तातडीने करणे गरजेचे आहे. देशविदेशातून येणाऱ्या भाविकांना अशाप्रकारे दुरवस्था दिसल्यास ते नापसंती व्यक्त करत असल्याचे चित्र सध्याला पाहण्यास मिळत आहे. तरी याबाबत कोण पुढाकार घेणार हाच प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्किटेक्ट देवरे यांचा ‘अर्कासिया’ने सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येथील नामवंत आर्किटेक्ट रोहन देवरे यांनी डिझाइन केलेल्या नाशिकच्या बोटक्लब पॅव्हेलियन व सी प्लेन टर्मिनलसाठी आशियास्तरावरील ‘अर्कासिया’ पुरस्कार मिळाला आहे. नुकत्याच जयपूर येथे झालेल्या एक कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही डिझाइन भविष्यातील वाहतुकीसाठी एक उत्तम संकल्पना समजली जाते.

‘अर्कासिया’ म्हणजे आर्किटेक्टस रिजिनल कौन्सिल ऑफ एशिया ज्यामध्ये आशिया खंडातील २१ देशांचा समावेश आहे. यावर्षी या कौन्सिलच्या बैठकीचे यजमानपद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसने भूषवले. आर्किटेक्ट रोहन देवरे यांच्या समवेत या पुरस्कारासाठी सुमारे २१ देशांमधून दहा विविध श्रेणीत सुमारे ७२८ प्रवेशिका आल्या होत्या. जयपूरमध्ये झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, राजस्‍थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आदी मान्यवर उपस्थित होते. याच डिझाइनसाठी आर्किटेक्ट रोहन देवरे यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टतर्फेहि प्रथम क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामस्थांच्या सतर्कतेने एक शिकारी जेरबंद

$
0
0

गोळी लागून एक नर काळवीट ठार

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील वनविभागाच्या हद्दीत हरणांची शिकार करण्यासाठी आलेल्या एका शिकारी टोळीने एका नर काळवीटाची गोळी झाडून शिकार केली. मात्र, परिसरातील सतर्क ग्रामस्थांनी सिनेस्टाइल पाठलाग करीत शिकारी टोळीतील एक शिकारीच ग्रामस्थ अन् वनविभागाच्या जाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे. शिकारी टोळीतील इतर चार शिकारी मात्र आलेल्या वाहनातून पसार होण्यात यशस्वी झाले. येवला तालुक्यातील राजापूर वनहद्दीतील कोळम येथे शनिवारी (दि. १०) सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली.

तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील वनविभागाच्या हजारो हेक्टर वनक्षेत्रात हजारो हरणे, काळवीट आदी वन्यजीवांचा संचार असतो. याच वनक्षेत्रातील जंगलामध्ये बंदूक, सर्चलाईट आदी सामानानिशी हरणांची शिकार करण्यासाठी आलेल्या एका शिकारी टोळीचा पाठलाग करून टोळीतील एकास पकडण्यास शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांना यश आले. तालुक्यातील वनविभागाच्या हद्दीतील कोळम शिवारात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाच जणांच्या टोळीने इंडिगो सीएस गाडीमध्ये येऊन हरणांचा पाठलाग करून गोळी झाडली. यावेळी एक चार वर्षांचे नर काळवीट बंदुकीचा निशाण्‍ाा साधला जाताना पोटात गोळी लागल्याने जागीच गतप्राण झाले. हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी या शिकाऱ्यांचा पाठलाग करीत एकाला पकडले, तर उर्वरित ४ शिकारी आलेल्या वाहनातून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, वनपरिमंडल अधिकारी अशोक काळे, वनरक्षक दौंड व वन विभागाची टीम घटनास्थळी तत्काळ हजर झाली. यावेळी पकडण्यात आलेल्या संशयीत शिकाऱ्याला ग्रामस्थांनी वनविभागाच्या ताब्यात दिले. संशयित शिकाऱ्याचे नाव दस्तगीर मोहंमद हारून (वय २४, रा. मालेगाव) आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर या मृत काळविटाचे पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचे दफन करण्यात आले. वनविभागाच्या तावडीत आलेल्या दस्तगीर मोहंमद हारून याच्यासह पसार झालेल्या त्याच्या इतर साथीदारांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला असून, त्याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत फॉरेस्ट कोठडी सुनावली आहे. वनविभागाचे अधिकारी दस्तगीर याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिकारी अशोक काळे, वनरक्षक दौंड, पाटील, शिरसाठ, वाघ, टेकनर, सोनवणे, वनसेवक वाघ, लोंढे, गंडे, आहेर, मोहन गायकवाड आदी तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेट्रोलपंप संपाची घोषणा १३ जूननंतर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरातील सर्व पेट्रोलपंपांवर १६ ते २४ जून दरम्यान पेट्रोल आणि डिझेलची खरेदी-विक्री बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप डिलर्स असोसिएशनने घेतलेला नाही. याबाबत १३ जूनला डिलर्स असोसिएशनची देशव्यापी संघटना सीआयपीडीशी बैठक होईल. त्यानंतर त्यावर निर्णय होईल, अशी माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष भूषण भोसले, सचिव आनंद काकड, उपाध्यक्ष साहेबराव महाले यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात दररोज चढ-उतार होत असल्याने दरदिवशी पेट्रोल-डिझेलचे दर बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाला फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम डिलर्सने विरोध दर्शवला आहे. देशातील सर्व ऑइल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेप्रमाणे डिझेल-पेट्रोलचे दर रोज बदलण्याचे ठरवले आहे. नवीन तंत्रज्ञान येणे, बदल होणे या गोष्टीचे फामपेडा स्वागतच करते. मात्र याद्वारे डीलरला सरळ सरळ होणारे आर्थिक नुकसान व इतर बाबी फार मोठ्या आहेत. डिलरला विश्वासात न घेता तसेच ऑइल कंपन्यांनी स्वतःची तांत्रिक बाजू सक्षम नसताना घेतलेला हा निर्णय आहे. याद्वारे पेट्रोल डिलरची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

फामपेडाशी संलग्न असणाऱ्या सीआयपीडी या देशव्यापी संघटनेने याबाबत विचारणा केल्यानंतर ऑइल कंपन्यांनी सीआयपीडीला १३ जून २०१७ रोजी बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीनंतरच भूमिका ठरणार आहे.

रोज बदलणार किमती

भारतातील सर्व तेल कंपन्या १६ जूनपासून देशभरात रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ज्या किमतीत पेट्रोल भरले असेल त्याच किमतीत सकाळी पेट्रोल मिळेल असे आता होणार नाही. कधी पेट्रोल स्वस्त तर कधी महाग मिळणार असल्यामुळे ग्राहकांचाही गोंधळ उडणार आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्त्वाच्या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलपंपचालकांनी त्यास विरोध करणे सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विठ्ठल नाम गाऊ मुखी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

टाळ दिंडी घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ मुखी, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे...! असे म्हणत भागवत धर्माची उदात्त शिकवण व वारकरी संप्रदायाची पिढ्यांपिढ्यांची असलेली परंपरा जपत खांद्यावर पताका, हाती टाळांचा गजर करणारे वारकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करीत असताना तिसऱ्या दिवशीच्या दुपारच्या विसाव्यासाठी नाशिकरोडला आगमन झाले. त्यावेळी हजारो भाविकांना पालखीचे दर्शन घेतले.

नाशिक-पुणे महामार्गावरून मुक्तिधामच्या दिशेने येणाऱ्या पालखीचे बिटको चौकात आगमन झाले. नाशिकरोडकरांच्या वतीने खासदार हेमंत गोडसे, रमेश गायकर, गोरख खर्जुल आदींनी मुक्तिधामच्या प्रवेशद्वारावर स्वागत करीत केळाच्या प्रसादाचे वाटप केले. पालखीचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रस्त्यावर जागोजागी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. खासदार गोडसे यांच्या हस्ते पंचोपचार विधी, आरती करण्यात आली.

पुढील मुक्कामाकडे प्रस्थान

पालखीसह वारकऱ्यांनी आपल्या पुढील मुक्कामाकडे प्रस्थान करताना वारकरी संप्रदाय केवळ ‘पंढरीसी जावे ऐसें माझे मनी, विठाई जननी भेट केंव्हा’ हा एकाच ध्यास उराशी बाळगत निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई व पुंडलिक वर दा हरी विठ्ठलचा गजर करीत पंढरीच्या दिशेने कूच केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images