Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

किरकोळ वादाचे दंगलीत रूपांतर

$
0
0

नंदुरबारला बिर्याणी देण्यावरून हाणामारी; वादात जखमीच्या निधनानंतर शहरात दगडफेक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

गेल्या आठवड्यात रविवारी (दि. ४) नंदुरबार शहरात बिर्याणी विक्रीच्या हातगाडीवर दोन गटांत वाद झाला होता. यात तीनजण जखमी होऊन एका जखमीचा शनिवारी (दि. १०) सकाळी मृत्यू झाल्याने दोन दंगलखोरांनी काही दुकानांची तोडफोड करून नुकसान केले. हाच प्रकार जमावाकडून शहरभर सुरू झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी शहरात बंदोबस्त तैनात केला मात्र पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली. त्यामुळे तात्काळ जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश जारी केला. पोलिसांची कुमक कमी पडत असल्याने बाहेरील जिल्ह्यातून पोलिस बंदोबस्त मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

यामुळे नंदुरबार शहरात शनिवारी (दि. १०) सकाळी अचानक दोन गटात दंगल उसळली. याप्रसंगी मंगळ बाजारात तरुणांनी एकत्र येत व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यावेळी सर्वत्र धावपळ सुरू झाली आणि दुसरीकडे दुकानांचे नुकसान करण्यास सुरुवात होऊन अवघ्या काही मिनिटांतच दोन गटात दगडफेक सुरू झाली. शहरात तणाव निर्माण होऊन दोन गटात सुरू असलेला हा वाद वाऱ्यासारखा शहरभर पसरला.

पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या नळकांड्या

शहरात ठिकठिकाणी पोलिस दाखल होताच पोलिसांवरदेखील दगडफेक करण्यात आली. अखेर लाठीचार्ज, अश्रूधुरांचा मारा करीत पोलिसांनी शहरात शांतता निर्माण केली. यामुळे शहरात भीतीचे वातावरण झाले. पोलिस व जिल्हा प्रशासनाला दुपारी उशिरापर्यंत दंगलीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, शनिवारी दुपारपासून शहरात संचारबंदी लावून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेची माहिती घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे हे शहरात दाखल झाले असून, धुळे, जळगाव, नाशिक येथून अतिरिक्त पोलिसांची कुमक नंदुरबार शहरात मागविण्यात आली आहे. सर्वत्र शांतता असून, या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

काय आहे प्रकरण?

सचिन मराठे नामक तरुणाने शब्बीर पिंजारी (रा. नंदुरबार) यांना बिर्याणी फुकट मागितली असता, त्यांनी दिली नाही. या कारणावरून दोघांमध्ये रविवारी रोजी वाद झाला होता. यावेळी सचिनने शब्बीर यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यात शब्बीर पिंजारी गंभीर भाजले होते. त्यांना उपचारासाठी

रुग्णालयात दाखल करून उपचार

करण्यात आले. याप्रकरणी पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन मराठे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शनिवारी (दि. १०) सकाळी शब्बीर पिंजारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून ही माहिती समजताच सकाळी शेकडोच्या जमावाने एकत्र येऊन मंगळ बाजारातील दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत दगडफेकीला सुरुवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलासंगम पाहा ऑनलाइन अलाइव्ह अॅपच्या सहाय्याने

$
0
0

कलासंगम पाहा ऑनलाइन अलाइव्ह अॅपच्या सहाय्याने

---

‘मटा’चा आर्ट फेस्ट (कलासंगम) पाहा ‘अलाइव्ह’ त्यासाठी तुमच्या मोबाइलवर अलाइव्ह अॅप डाउनलोड करून या फोटोवर टॅप करा. त्यानंतर कलासंगममधील शिल्पकलेचा व्हिडीओ तुमच्या मोबाइलवर प्रत्यक्ष दिसेल. अधिक माहिती खालील चौकटीत दिली आहे.

अलाइव्ह अॅप सुरू कसं कराल?

१. अलाइव्ह अॅप तुमच्या मोबाइलवर इन्स्टॉल करण्यासाठी १८००१०२३३२४ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या किंवा तुमच्या मोबाइलवरून www.alivear.com या साइटवर जा.

२. अॅप इन्स्टॉल झाल्यानंतर ते तुमच्या फोनवर सुरू करा आणि तुमच्या फोनचा कॅमेरा या फोटोवर धरून फोटो स्कॅन करा. अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज फोनधारकांनी फोन फोटोवर धरल्यानंतर फोटो कॅप्चर करण्यासाठी स्क्रीनवर टॅप करावे आणि कॅप्चर होईपर्यंत धरून ठेवावा. ब्लॅकबेरी आणि सिंबियनधारकांनी ऑप्शनला जाऊन कॅप्चर करावे.

३. आता लाइव्ह व्हिडीओ शेअर होईल. पाहा आणि इतरांशी शेअर करा.

---

सूचना : निवडक अँड्रॉइड (२.२ आणि पुढील व्हर्जन), आयओएस (४.३ आणि पुढील व्हर्जन) ब्लॅकबेरी (५.० व्हर्जन आणि पुढील) सिंबियन (एस ६० व्हर्जन आणि पुढील) आणि विंडोज (७.५ व्हर्जन आणि पुढील) यावरच ही सुविधा उपलब्ध आहे.--

मटा कलासंगम आर्ट फेस्टमध्ये शनिवारी शिल्प साकारताना ज्येष्ठ शिल्पकार नीलेश ढेरे. मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्ट कॉलेज येथे आयोजित या फेस्टमध्ये आज, रविवारीदेखील विविध कलावंतांकडून कलाप्रकार सादर होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांची दुकानदारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुटीनंतर शहरातील काही शाळा सुरू झाल्या आहेत, तर काही शाळा येत्या आठवड्यात सुरू होणार आहेत. या नव्या शैक्षणिक वर्षात गेल्या काही वर्षांमध्ये पालकांना सामोरे जावे लागत असलेल्या समस्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शालेय साहित्य शाळेकडूनच विकत घेण्याची सक्ती पुन्हा काही शाळा पालकांवर करीत आहेत. अशा स्वरूपाची विक्री केली जाऊ नये, अशा सूचना असतानाही शहरातील शाळांनी आपली दुकानदारी सुरूच ठेवली असल्याचे पुन्हा समोर आले आहे. सेंट फ्रान्सिस स्कूलने या स्वरूपाच्या शालेय साहित्याची विक्री शनिवारीही केल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.

इंग्रजी शाळांची नियमबाह्य फीवाढ, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारणांनी वेठीस धरण्याचे प्रकार शहरात घडत असतानाच शाळा शालेय साहित्याच्या खरेदीची सक्ती करीत असल्याच्या तक्रारी पालक पुढे आणत आहेत. रंगपेटी, कंपास बॉक्स, पुस्तक-वह्यांचे कव्हर, हस्तकलेचे साहित्य, डिक्शनरी, नकाशे, युनिफॉर्मचा कापडी बेल्ट अशा स्वरूपाचे साहित्य शाळेतूनच घ्यावे, असा दबाव पालकांवर आणला जात आहे. शाळेने कोणत्याही स्वरूपाचे साहित्य विकणे हे नियमबाह्य आहे, हे शहरातील शाळांना प्रशासनाने नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, तरीदेखील सेंट फ्रान्सिस शाळेत शालेय साहित्याची विक्री केली गेल्याने शाळा प्रशासनालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

शाळांची नफेखोरी

शाळांकडून विकली जात असलेली पुस्तके खासगी प्रकाशकांची असून, शाळेने त्यावर आपल्या सोयीने वाढीव किमतीचे स्टीकर्स चिकटविले आहेत. यातील बरेचशी पुस्तके अनावश्यक असून, ती खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केली जात आहे. साहित्य विकण्याची परवानगी नसतानाही शहरातील शाळांनी आपली दुकानदारी सुरूच ठेवली आहे. वारंवार याविषयी तक्रारी करूनदेखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याने शाळांचे चांगलेच फावत असल्याच्या प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही स्वरूपाच्या शालेय साहित्याची विक्री करू नये, अशी तंबी आम्ही शाळेला दिली आहे. मात्र, तरीदेखील शाळा नियमांचे उल्लंघन करीत असेल, तर याबाबत पडताळणी करून कडक कारवाई केली जाईल. ज्या पालकांवर अशा साहित्य खरेदीची सक्ती झाली आहे त्यांनी पुढे यावे.

-नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण समिती

--

एप्रिल महिन्यात आम्ही हे साहित्य पालकांना दिले होते. परंतु, प्रशासनाने दिलेल्या सूचनेनंतर आम्ही कोणत्याही स्वरूपाचे साहित्य विकलेले नाही.

-कुसुमा शेट्टी, मुख्याध्यापिका, सेंट फ्रान्सिस स्कूल, तिडके कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू अधिवेशनासाठी २१ संघटना एकत्र

$
0
0

१४ जूनपासून गोव्यामध्ये आयोजन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

येत्या १४ जूनपासून गोव्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांना एकाच छताखाली आणून अखिल भारतीय हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेच्या दृष्टीने विचारमंथनासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आल्याचे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

हे संमेलन १७ जूनपर्यंत चालणार आहे. यासाठी भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथील १५० हून अधिक हिंदू संघटनांचे ४०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहातील. या सर्व संघटनांचे पदाधिकारी सामायिक कृती आराखड्यांतर्गत वर्षभरातील उपक्रम आणि आंदोलनांची दिशा निश्‍चित करणार आहेत, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असला, तरी हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्या बंदी, राममंदिराचे पुनर्निर्माण आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे हिंदू संघटनांनी आता पुढाकार घेऊन हिंदू राष्ट्राचा उद्घोष जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून निर्धार करण्यात येणार आहे. मागील पाच राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार अरुणाचल प्रदेशात गेले १० वर्षांत धर्मांतरामुळे हिंदूंची लोकसंख्या घटली आहे.

केंद्र सरकारने धर्मांतराच्या विरोधात कारवाई करावी, दूरदर्शनवरील चर्चासत्रात भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचा अवमान करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या मौलाना देहलवीच्या विरोधात कठोर कारवाई, मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात आंदोलने करण्यात आली. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या सहाव्या अधिवेशनाद्वारे होईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलासंगम’द्वारे नाशिककरांना व्यासपीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या संस्कारांमुळेच एक पिढी घडली. आज कलाकार म्हणून वावरताना जो मला मान मिळत आहे, त्यात ‘मटा’च्या संस्कारांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी केले. ‘मटा’ने आयोजित केलेल्या कलासंगम या आर्ट फेस्टच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. ‘मटा’ने ‘कलासंगम’ भरवून नाशिकमधील अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले, याबद्दल त्यांनी ‘मटा’चे आभार मानले.

मविप्र शिक्षण संस्थेच्या आर्किटेक्ट कॉलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय आर्ट फेस्टच्या प्रारंभावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, की आमची पिढी महाराष्ट्र टाइम्समुळे घडली. त्यातील विविध लेख विविध सदरे, गोविंद तळवलकरांचे संपादकीय यांच्या वाचनातून विचारांची घडी तयार झाली. त्याचा उपयोग आम्हाला कार्टून काढताना झाला. यावेळी त्यांच्या हस्ते गणेशाचे चित्र काढून फेस्टला सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे कॅरिकेचरही त्यांनी रेखाटले.

यावेळी पंचवटी कॉलेजच्या ललित कला महाविद्यालयाच्या प्राचार्य संपदा हिरे, आर्किटेक्ट कॉलेजच्या प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते, डिझाइन हेड सुवर्णा पाटील, आनंद ढाकीफळे, भि. रा. सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्वानंद बेदकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक शैलेन्द्र तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. नाशिकच्या रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

--

सकारात्मकतेकडे नेणारा उपक्रम

मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार म्हणाल्या, की नकारात्मक विचारातून सकारात्मक विचारांकडे घेऊन जाणारा हा उपक्रम आहे. ‘मटा’ने हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमांतूनदेखील नाशिककरांना वेगवेगळी ठिकाणे दाखवली आहेत. आम्ही कायम ‘मटा’च्या बरोबर आहोत, यापुढे दर वर्षी हा उपक्रम ‘मटा’ने आमच्याच संस्थेत घ्यावा. जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करण्यास तयार आहोत.

--

समाजात ऊर्जानिर्मितीस चालना

पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल म्हणाले, की समाजात आज नकारात्मक गोष्टींचा सर्वाधिक भरणा आहे. ‘मटा’ने हा उपक्रम सुरू करून समाजात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे काम केले आहे. मागील महिन्यात हॅप्पी स्ट्रीट्स उपक्रमाला हजेरी लावण्याची संधी मला मिळाली. त्यावेळीदेखील नागरिकांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. कला आयुष्य समृद्ध करणारी आहे. दिवसातील २४ तासांचा वेळ जास्तीत जास्त सत्कारणी लावण्याचे काम मी करीत असतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहराच्या समृद्धीसाठी माऊलींना साकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहराची भरभराट आणि उज्ज्वलता यासाठी उपमहापौर प्रथमेश गिते व सभागृह नेते दिनकर पाटील यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांना साकडे घातले. नाशिक महानगर पालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत सावरकर तरण तलाव येथे उपमहापौर व सभागृह नेत्यांनी

केले. यावेळी त्यांनी संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज पालखी दिंडीप्रमुख व वारकरी यांच्या आश्वासनांची पूर्ती केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

सभागृह नेते पाटील पुढे म्हणाले, की पालखीच्या स्वागताचा दिवस हा वैभवशाली दिवस असून, माऊलीला समृद्धीसाठी वारकऱ्यांकडून साकडे घालतात म्हणून शहराच्या भरभराटीसाठी परमेश्वराला साकडे घालू. पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या दृष्टीने असणारी मागणी दरवर्षी प्रमाणे मनपातर्फे पूर्ण केली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी दिली.

पालखी स्वागत सोहळ्याप्रसंगी निवृत्तिनाथ महाराज संस्थांचे अध्यक्ष त्रंबकराव गायकवाड, बेलापुरकर महाराज, लहवितकर महाराज, पुंडलिकराव थेटे यांचा मनपातर्फे पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. पालखीत सहभागी झालेल्या ३५ दिंडी प्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते चार्जर बॅटरी व भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. वारकऱ्यांना नाश्ता व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी स्वागत समिती अध्यक्ष पद्माकर पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली

पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, उपमहापौर प्रथमेश गिते, गटनेते गजानन शेलार, दीक्षा लोंढे, प्रभाग सभापती हेमलता पाटील, नगरसेवक गुरमित बग्गा, नगरसेविका प्रियंका घाटे, माजी नगरसेवक तानाजी जायभावे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, संजय महाराज धोंडगे, पंडित महाराज कोल्हे, मोहन महाराज बेलापुरकर, रामकृष्णक महाराज लहवीतकर, डॉ. धनश्री हरदास, अण्णा साहेब महाराज आहेर, आरपीआय. नेता किशोर घाटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोधच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे, समृद्धी महामार्ग रद्द झाला पाहिजे यावर शिवसेनेची भूमिका ठाम आहे. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध कायम असून, जुलैमध्ये महाराष्ट्राला कलाटणी देणारे शिवसेनेचे जन आंदोलन असेल, असा इशारा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

शेतकरी संपाला पाठींबा देणारे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शनिवारी घोटी येथे शेतकऱ्यांसमवेत बैठक घेतली. जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाची सुरुवात घोटी येथून झाली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी शेतकरी, धरणग्रस्त व कष्टकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या भूमिका जाणून घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

शेतकऱ्यांची व कामगारांची हालअपेष्टा करून देशाचा व राज्याचा काय विकास साधणार. विकासाला विरोध नाही पण शेतकऱ्यांना उद‌्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा? असा सवालही राउत यांनी उपस्थित केला. सरकारमध्ये आहोत किवा नाहीत याचा विचार न करता, शेतकऱ्यांचे हित हीच शिवसेनेची भूमिका असल्याने समृद्धी महामार्ग तर हाणून पाडूच, शिवाय शेतकऱ्यांची इंचभरही जमीन संपादित होऊ देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेच्या रणनितीबाबत बोलताना खासदार यांनी सांगितले की, शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली. यावेळी उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार शिवराम झोले, काशिनाथ मेंगाळ, रमेश धांडे, विठ्ठल लंगडे, कुंडलिक जमधडे व्यासपीठावर होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोडरोमिओची तरुणींकडून यथेच्छ धुलाई

$
0
0

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल

म. टा. वृत्तसेवा, निफाड

सहा महिन्यांपासून त्रास देणाऱ्या एका रोडरोमिओला कॉलेज तरुणींनी भररस्त्यात चोप दिला. रानवड साखर कारखाना परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करीत यापुढे त्रास द्याल, तर याद राखा असा संदेशच या कॉलेज तरुणींनी रोडरोमिओंना दिला आहे.

खडक ओझर (ता. चांदवड) येथील विवाहित असलेला योगेश पगार हा तरूण रानवड येथे कॉलेजात शिकायला जाणाऱ्या नांदुर्डी परिसरातील विद्यार्थिनींना गेल्या सहा महिन्यांपासून त्रास देत होता. येता-जाता अश्लिल शेरेबाजी करीत तो या तरुणींचा मोटरसायकलवर पाठलागही करीत होता. या प्रकाराने हैराण झालेल्या विद्यार्थिनींना त्रास देण्यासाठी तो शुक्रवारीही परिसरात आला होता. मुलींची छेड काढून पसार होण्याच्या प्रयत्नात असतांना त्याची मोटरसायकल बंद पडली आणि तो या मुलींच्या तावडीत सापडला.

संयमाचा बांध सुटलेल्या या विद्यार्थिनींना स्थानिक नागरिकांनीही मदत केली. या तरुणाला पकडल्यानंतर तोंडाला स्कार्प बांधून चार मुलींनी योगेश पगारची यथेच्छ धुलाई केली. त्‍याची सँडलने चांगलीच धुलाई केली. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विकृत असलेला योगेश गोविंद पगार हा विवाहित असून, तो केवळ छेड काढणे, त्रास देणे यासाठी रानवड कॉलेजच्या मार्गावर या मुलींच्या मागावर असायचा. अखेर त्याला या मुलींनी चौदावे रत्न दाखवले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून ग्रामीण भागातील शाळा, कॉलेजात शिकायला जाणाऱ्या मुलींना त्रास द्याल तर याद राखा असा संदेशच दिला. योगेशवर पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आता पोलिसांनी या रोडरोमिओला धडा शिकवावा, अशी अपेक्षा या मुलींनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एम.एड. सीईटी आज होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नाशिकमधील केंद्रावर नियोजित एम.एड.ची रद्द झालेली सीईटी आज (११ जून) नव्याने आयोजित करण्यात आली आहे. शॉर्ट सर्किट, सर्व्हरमधील तांत्रिक अडसर आणि अत्यंत ढिसाळ नियोजनाअभावी भरडले गेलेले १२५ विद्यार्थी आज पुन्हा ही परीक्षा देणार आहेत. गत प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी परीक्षेचे केंद्रच बदलण्यात आले आहे. आज होणारी परीक्षा अमृतधाम परिसरातील के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सीईटी सेलतर्फे २८ मे रोजी घेण्यात आलेल्या या सीईटी परीक्षेच्या नियोजनाचा सर्व्हरच्या अडथळ्यांमुळे बट्ट्याबोळ झाला होता. सर्व्हर प्रॉब्लेम व शॉर्ट सर्किंटमुळे विद्यार्थ्यांना अर्धवट पेपर सोडून १२ ते १५ किलोमीटर अंतरावरील केंद्रावर हलविण्यात आले होते. तेथेही सर्व्हर अॅक्टिव्ह होण्याची दिवसभर प्रतीक्षा करूनसुध्दा रात्री आठ वाजेपर्यंतही यश न आल्याने अखेरीस ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.

इंदिरानगरच्या डे केअर सेंटरवर २८ मे रोजी ही परीक्षा नियोजित होती. येथे ऑनलाइन पध्दतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले होते. या केंद्रावर सुमारे दीडशे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. परीक्षेचा कालावधी सुरू झाल्यानंतरही काही विद्यार्थ्यांचे लॉग इन झाले नव्हते. त्यामुळे काहींची परीक्षा सुरू झाली तर तांत्रिक कारणास्तव बसून होते.

पेपर सुरू होऊन अवघा तासाभराचा कालावधी उलटत नाही तोच परीक्षा केंद्रावर शॉर्ट सर्किट झाल्याने गोंधळ उडाला होता. चालू ऑनलाइन पेपरमधून कॉम्प्युटर्स बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास या विद्यार्थ्यांची व्यवस्था इतरत्र करण्याचा निर्णय होऊन त्यांना पेठरोडवरील आकाश पेट्रोल पंपानजीक प्रो सोल्युशन कन्सल्टन्सी या दुसऱ्या केंद्रावर परीक्षेचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले. तेथेही सर्व्हरमधील तांत्रिक अडसर व ढिसाळ नियोजनामुळे दूरच्या जिल्ह्यांमधून दरमजल करत आलेले विद्यार्थी हात हलवत माघारी गेले होते.

विद्यार्थ्यांना आवाहन

दुपारी २ ते ३.३० या वेळेत होणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर १२.४५ वाजता उपस्थित रहायचे असून, १.३० वाजता परीक्षा केंद्र्राचे प्रवेशव्दार बंद होणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना हॉलतिकीटवरील सर्व सूचनांचे पालन करावे व जुन्यासोबत नवेही हॉलतिकीट सोबत आणावे. हॉलतिकीटवर फोटो चिकटवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चालकावर पिस्तूल रोखत वाहनाची चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

वाहनचालकाचे हातपाय बांधून त्याचे वाहनासह अपहरण करून नंतर मध्यरात्री रस्त्यावर सोडून तिघांनी वाहनास‌ह पोबारा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एखाद्या रहस्यमय चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असा हा प्रकार चांदवड येथील राहुड घाटात घडला. चोरट्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या चालकाने याबाबत त्र्यंबकेश्वर आणि देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चालक सुभाष उपाध्याय (वय ३९, रा.वाराणसी बधोनी, उत्तरप्रदेश) याने दिलेल्या माहितीनुसार, तो मंगळवारी (दि. ६) मुंबई चिंचोरी येथून कॅन्व्हायमधून नवीन पिकअप व्हॅन घेऊन भुवनेश्वर ओरिसा येथे जाण्यासाठी निघाला. सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घोटी येथून त्यांच्या वाहनात तीन अज्ञात प्रवाशी बसले. चांदवडच्या पुढे राहूड घाटात लघुशंकेचे कारण सांगून तिघेह संशयित खाली उतरले. त्यानंतर त्यांनी सुभाषवर पिस्तुल रोखले. त्याचे हातपाय बांधले आणि डोळ्यांवर रुमाल बांधून सिटाखाली ढकलले. त्यानंतर मध्यरात्रीनंतर त्र्यंबकेश्वरपासून जवळच वाहन थांबवून त्याचे हातापाय व डोळे सोडले. तेव्हा त्याला त्याच्या वाहनामागे एक मोटारसायकल दिसली. त्या मोटारसायकलवर तीन व्यक्ती होत्या. त्यानंतर सुभाषला त्या मोटारसायकलवर दोघांच्या मध्ये बसवले आणि उर्वरित चौघांनी पिकअप घेऊन पोबारा केला. त्यानंतर मोटरसायकलवरून सुभाषला त्र्यंबक-जव्हार रस्त्यावरील घाटात उतरविले. चोरट्यांनी सुभाषजवळील मोबाइल आणि आठ हजार रुपये काढून घेतले. घाटात सोडले तेव्हा त्याच्यावर पिस्तुलही रोखले. मात्र सुभाषने दगड मारून जवळच्या जंगलात पळ काढला.

माहितीत विसंगती

पोलिसांनी पिंपळगाव आणि चांदवड टोल नाक्यावर स‌सि‌टिीव्ही तपासले. मात्र त्यात पिकअपमध्ये चालक आणि केवळ एक व्यक्ती दिसते. त्यामुळे माहितीत विसंगती असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माहेरघर’ कोरडेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली असून, चालू हंगामात आतापर्यत सरासरीच्या ५.७७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नांदगाववर यंदा पाऊस मेहेरबान असल्याचे पहावयास मिळत असून, येथे सर्वाधिक २८.०५ टक्के पाऊस झाला आहे. तर पावसाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये अवघा दोन टक्के पाऊस पडला आहे.

यंदा नाशिकककरांनी असह्य उन्हाच्या झळा सहन केल्या. उकाड्यामूळे घामाच्या धारांमध्ये नाशिककर अनेकदा न्हाऊन निघाले. कधी एकदा पाऊस पडले, असे सर्वांनाच वाटत होते. बळीराजा तर आभाळाकडे डोळे लाऊन बसला होता. मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात सलामी दिली असून, त्यामुळे नाशिककर सुखावले आहेत. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३.३९ मिलीमीटर एवढे आहे. दरवर्षी जिल्ह्यात साधारणत: १५ हजार २०० मिलीमीटर पाऊस पडतो. त्यापैकी २ हजार ३२४ मिलीमीटर पाऊस जून महिन्यात पडतो. १ ते १० जून या कालावधीत जिल्ह्यात ८७७.२ मिलीमीटर पाऊस पडला असून, जूनमधील पर्जन्यमानाची ही टक्केवारी ३७.७४ टक्के आहे. नांदगाव तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक १३१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मालेगावात १०९ मि. मी पाऊस पडला आहे. चांदवडमध्ये ९८.२, पेठमध्ये ७४, इगतपुरीत ६९, सुरगाण्यात ६१.५, निफाडमध्ये ६०, नाशिक तालुक्यात ५३.१ मि.मी पाऊस पडला आहे. सर्वात कमी १८ मिलीमीटर पाऊस सिन्नर तालुक्यामध्ये पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या आठ विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट (एसपीआय) औरंगाबाद या देशभरात नावाजलेल्या संस्थेच्या २०१७ च्या अंतिम गुणवत्ता यादीत नाशिकच्या आठ विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे. राज्यभरातून तब्बल सात हजारावर विद्यार्थी येथील प्र्रवेशासाठी इच्छुक होते. यातून राज्यातील अवघ्या ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

निवड झालेले हे आठही विद्यार्थी नाशिकच्या सुदर्शन अकादमीचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये ध्रुव वाल्मिक ढाकणे, आदिनाथ जयंत रोहमारे, राजशेखर सुरेश जाधव, वैभव चंद्रशेखर पाटील, अनिश पराग शिंत्रे, अथर्व धनंजय अभ्यंकर, प्रज्योत भिमाशंकर प्याती आणि आनंद हुंबाड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सैन्यातील अधिकारी पदावर अधिकाधिक विद्यार्थ्यांची निवड व्हावी, यासाठी १९७७ साली महाराष्ट्र शासनाने ही संस्था स्थापन केली होती. येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अकरावी व बारावीच्या अभ्यासासोबतच नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) साठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डामार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीची तयारी करवून घेतली जाते. येथील विद्यार्थी दोन वर्षे सैन्यदलातील निवृत्त अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली धडे गिरवतात. आजपर्यंत या संस्थेने देशाला ५०० पेक्षा अधिक सैन्यदल अधिकारी दिले आहेत. त्यामुळे येथील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी चढाओढ असते.

डिफेन्स क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शहरात मोठी संख्या आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या स्पर्धेत नाशिकचे विद्यार्थी कुठेही कमी नाहीत हेच या यंदा एसपीआय, औरंगाबाद या संस्थेतील निवडीने दाखवून दिले आहे.

- हर्षल अहिरराव, डिफेन्स करिअर मार्गदर्शक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या कलावंतांनी वाढविली रंगत

$
0
0

नाशिक : 'मटा' आर्ट फेस्टमध्ये बाळ नगरकर यांच्यासह संजय दुर्गावाड, कैलास परदेशी आदींनी काही व्यक्तींना समोर बसवित त्यांचे हुबेहूब चित्र साकारले. त्यात अनेक जण दंग झाले होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांची लाइव्ह व्यंगचित्रे आणि क्रिएटिव्ह पेंटिंगमध्ये राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांच्या कुंचल्यातून साकारलेले चित्र पाहून नाशिककर हरखून गेले. नंदू गवांदे यांच्या कॅलिग्राफीच्या शैलीने सगळ्यांचीच मने जिंकली. त्यांनी कॅलिग्राफीचे वेगवेगळे प्रकार उपस्थितांना समजावून सांगितले. प्रसाद पवार, समीर बोंदार्डे आणि संजय अमृतकर यांचे फोटोग्राफी या विषयावर लेक्चर हॉलमध्ये माहितीपर मार्गदर्शन झाले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

श्रद्धा कराळे यांच्या वारली पेंटिगने सगळ्यांनाच भुरळ घातली. समीर बोंदार्डे यांच्या फोटोंचे प्रदर्शन रसिकांना चांगलेच भावल. समीर यांनी कुंभमेळ्यात टिपलेल्या फोटोंचा यात समावेश होता. शिल्पकार द्वीप आहेर यांच्या छत्तीसगडमधील बस्तर येथील डोकरा कास्टिंग या शिल्पप्रकाराने रसिकांची मने जिंकली. चित्रकार वैभव खर्जुल यांनी कोल्हापुरी चपलेचा नमुना सादर केला. त्यासाठी कॅनव्हासवर मिक्स मीडिया प्रकाराचा वापर करण्यात आला. ललित महाजन व नेहा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हेरंब भावसार, हर्षदा मंडोरा, ध्रुव राठोड, आदित्य देशमुख, स्वप्निल अहिरे, मोहिनी येवलेकर यांच्या हँड ग्रुप फाउंडेशनने व्हॉट इज आर्ट हा प्रश्न रसिकांना विचारला होता. यावर आर्ट फेस्टला भेट देणारे या प्रश्नाचे उत्तर स्टिकरवर लिहून देत होते. या आर्ट फेस्टमध्ये मविप्र आर्किटेक्ट कॉलेजच्या थर्ड इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी सेट डिझाइन स्ट्रीमच्या विविध कलाकृती सादर केल्या.


लाइव्ह शिल्पकलेची अनोखी अनुभूती

शिल्पकला ऐकून माहिती असली, तरी तिचे लाइव्ह प्रात्यक्षिक बघण्याची संधी क्वचितच मिळते. कलासंगम आर्ट फेस्टमध्ये ही संधी नाशिककरांना शनिवारी मिळाली. मातीतून साकारणारे शिल्प, व्यक्तींचे चेहरे, त्यावरील अचूक हावभाव यानिमित्ताने नाशिककरांना टिपता आले. अनेकांनी अशा स्वरूपाचे प्रात्यक्षिक प्रथमच पाहिल्याने शिल्पकलेविषयी मोठे आकर्षण दिसून आले. नीलेश ढेरे, श्रेयस गर्गे, यतिन पंडित व भूषण कोंबडे यांनी यावेळी शिल्पकला साकारली.


पेंटिंग्जने वेधले लक्ष

आर्ट फेस्टमधील कॅनव्हास, अॅबस्ट्रॅक, कॉटन अशा अनेक लक्षवेधक स्टाइल्सच्या पेंटिंग्जने कलाप्रेमींना मोहिनी घातली होती. यात थ्रीडी पेंटिंग्ज अनेकांच्या पसंतीस उरतल्या. प्रामुख्याने वारली, निसर्ग, व्यक्ती, ट्रॅफिक प्रबोधन या पेंटिंग्ज आकर्षण ठरल्या.


फोटोग्राफीची भुरळ

पक्षी, कीटक, प्राणी, फॉरेस्ट, नेचर, सनसेट यांसारख्या अनेक विषयांवरील फोटोंची प्रेक्षकांना भुरळ पडली होती. यासोबतच प्रासंगिक, तसेच ऑफबिट फोटोंनाही प्रेक्षक दाद देत होते. योगेश तांबट यांनी विविध अँगल्सने काढलेले फोटो प्रेक्षक बारकाईने न्याहाळत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांनी घेतली शेतकरी संपाची धास्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुकाणू समितीच्या रचनेनंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपच्या मंत्र्यांनीही शेतकरी संपाची धास्ती घेतली आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात याचा प्रत्यय आला. या सोहळ्याच्या नियोजित निमंत्रण पत्रिकेतील तीनही मंत्री हेतूपूर्वक कार्यक्रमास अनुपस्थितीत राहिल्याची चर्चा शनिवारी येथे रंगली होती.

आरोग्य विद्यापीठाचा १९ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास नियोजित निमंत्रण पत्रिकेनुसार पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार होते. यात विद्यापीठाचे प्रतिकुलपती या नात्याने महाजन यांची उपस्थिती विद्यापीठ वर्तुळास अपेक्षितच होती. मात्र, ऐनवेळी या तीन मंत्र्यांपैकी एकही जण या कार्यक्रमाकडे फिरकले नाही. परिणामी सोहळ्याचे अध्यक्षस्थान ऐनवेळी महाजन यांच्याऐवजी कुलगुरू डॉ. म्हैसेकर यांना सांभाळावे लागले. या मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत विद्यापीठ प्रशासनाने मौन बाळगले असले तरीही शेतकरी संपाची धास्तीच मंत्र्यांच्या अनुपस्थितीला कारणीभूत असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.

गेल्या आठवड्यापासून राज्यभरात धुमसणाऱ्या शेतकरी आंदोलनाचे केंद्र नाशिक बनले आहे. नगर जिल्ह्यातील पुणतांब्यापाठोपाठ नाशिकमध्ये संघटीत झालेल्या शेतकरी वर्गाने शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या संवेदनशील बनत चाललेल्या वातावरणात आंदोलकांचा विरोध, माध्यमांसमोरील प्रश्नोत्तरे आणि या विषयावरील शेरेबाजी टाळण्यासाठीच मंत्र्यांना पक्षाने छुपी आचारसंहिताच लागू केल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटमधूनच वेतनाची केली तरतूद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारकडून येत्या एक जुलैपासून जीएसटी ही नवी एक देश-एक करप्रणाली लागू होणार आहे. त्यामुळे या नव्या जीएसटीची सर्वांनीच धास्ती घेतली आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या अनुदानाचा अंदाज नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाची अडचण होणार आहे. त्यामुळे महापालिकेला शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानात विलंब होण्याची श‍क्यता गृहीत धरून महापालिकेच्या लेखा विभागाने तीन महिन्यांचे वेतन व अन्य खर्चाची तजवीज अगोदरच केली आहे. त्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये कर्मचारी वेतनासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद गृहीत धरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या महापालिकेचा गाडा हा दर महिन्याला एलबीटीतून मिळणाऱ्या ७५ कोटी रुपये अनुदानातून सुरू आहे. त्यात ५० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कंपन्यांकडून मासिक सुमारे ३५ कोटी रुपये प्राप्त होतात. याशिवाय, मुद्रांक शुल्कातून सुमारे पाच कोटी रुपये मिळतात. उर्वरित तूट भरून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या ३४ कोटीच्या अनुदानातून भरली जाते. परंतु जीएसटीमुळे या अनुदानाच्या पद्धतीत बदल होणार आहेत. येत्या एक जुलैपासून संपूर्ण देशात जीएसटी करप्रणाली लागू होणार असल्याने एलबीटी बंद होणार आहे. जीएसटीत केंद्र सरकारने एलबीटीचे अनुदान देणार असले तरी, ते केव्हा मिळेल याची शाश्वती नाही. त्यातच केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देईल. राज्य सरकार त्यानंतर पालिकेला वर्ग करेल. त्यामुळे या प्रक्रियेला बराच विलंब होणार आहे. त्यामुळे अनुदान मिळाले नाही तर पालिकेचे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने शक्कल लढवत महापालिकेने अधिकारी व कर्मचारी वेतनासाठी तीन महिन्यांकरिता ७० कोटी रुपयांची तजवीज बजेटमध्येच करून घेतली आहे.

अधिकारी व कर्मचारी वेतनासाठी मासिक २० कोटी रुपये खर्च होतात. देखभाल दुरुस्तीसाठी सात कोटी, शिक्षण मंडळ कर्मचारी व शिक्षकांच्या वेतनासाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेबर या तीन महिन्यांमध्ये जीएसटी अनुदानाला उशीर झाल्यात थेट बजेटच्या तरतुदीतून ही रक्कम वापरण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाची तरतूद अनोख्या पद्धतीने करून घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कलाकारांच्या अदाकारीची भुरळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रंगीबेरंगी पताकांनी फुललेले आभाळ, विविधरंगी कागदी झिरमिळ्यांनी सजवलेली दुतर्फा रांग, कार्यक्रमस्थळापर्यंत हिरवळीतून जाणारा अतिशय सुखद असा रस्ता आणि मुख्य प्रवेशद्वारावर तयार केलेल्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून आत नेऊन सोडण्याची केलेली व्यवस्था हा माहोल होता ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने आयोजित कलासंगम कार्यक्रमाचा.

सांस्कृतिक नाशिकला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने शनिवार व रविवार हे दोन दिवस कलासंगम (आर्ट फेस्ट) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसाद मंगल कार्यालयासमोरील मविप्र आर्किटेक्ट कॉलेज येथे ‘मटा’च्या नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त हा महोत्सव सुरू आहे. या ठिकाणी कलावंतांचे एक वेगळेच जग उभारण्यात आलेले असून, कॉलेजच्या सुरुवातीलाच ‘महाराष्ट्र टाइम्स’ची भव्य कमान स्वागताला उभी आहे.

आतमध्ये प्रवेश केल्यावर लगेचच रंगबेरंगी पताकांनी सजविलेला मांडव आणि विविधरंगी झिरमिळ्यांनी सजवलेली दुतर्फा रांग लक्षवेधक ठरत आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाताना दुतर्फा झाडी असून, दोन्ही बाजूंनी वेगवेगळी शिल्प ठेवण्यात आलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेर कुंभमेळ्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, प्रवेशद्वाराला कॅमेऱ्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. कॅमेऱ्याच्या लेन्समधून आत जाताना पितळेचा मोर आपल्या स्वागताला उभा असून, एका बाजूला वारकऱ्याचे शिल्प आहे, तसेच या ठिकाणी वारली पेंटिंग्जही लावण्यात आलेली आहेत.

आत जाताना पेन्सिलच्या आकाराची ओरिगामी केलेली असून, दुतर्फा विविध पेंटिंग्ज लावण्यात आलेली आहेत. नाशिककरांनी उद्घाटनप्रसंगी या कलासंगम महोत्सवाला लावलेली हजेरी कार्यक्रमाला चार चाँद लावून गेली. मोजक्या भाषणांनी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

कलाप्रकारांनी रंगत

आर्ट फेस्ट जेथे सुरू आहे तेथे राजेश सावंत व प्रफुल्ल सावंत यांची काही चित्रे प्रदर्शित करण्यात आली असून, त्यातील ड्रीम या थीमवर काढलेल्या चित्राला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळत आहे. गौतम बुद्धांचे चित्रही अप्रतिम असून, मिठाई विकत घेणारे बाबा सर्वांनाच भावले. विविध आर्टमध्ये पेन्सिल वर्क, बांबूचे शिल्प, फ्लाय अॅशच्या विटांपासून तयार केलेला मुखवटा, तसेच शर्टांपासून बनविलेले चित्र, चित्रात चिकटविण्यात आलेल्या चपला यादेखील

आकर्षणाचा भाग बनल्या. नांगर घेतलेला शेतकरी, नर्तकी, लाकडी ओंडक्यावर दाणे टिपणारा पक्षी, कागदी पक्षी, लाकडी बासरी अशा एक ना अनेक वस्तू येथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत.

--


व्यंगचित्रांना दिलखुलास दाद

प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांनी अतिशय आकर्षक पद्धतीने व्यंगचित्रे काढून दाखवत कार्यक्रम एका उंचीवर नेऊन ठेवला. त्यांनी सुरुवातीला गणेशाला नमन करण्यासाठी त्याचे चित्र रेखाटले आणि नंतर व्यंगाकडे वळत अंघोळीला जाणारी नटी लीलया साकारली. स्त्री-पुरुष संवादाचे एक चित्र आणि पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांचे कॅरिकेचर काढून एका वेगळ्याच उद्घाटनाचा आनंद उपस्थिताना दिला. संपदा हिरे यांनी मारलेल्या रेषेतून सरकार व शेतकरी यांचे चित्र काढत दोघांनाही अधिक काही न बोलता एकत्र यावे, असा संदेश त्यांनी या चित्राद्वारे दिला. नाशिककरांची त्यांना दिलखुलास दाद लाभली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज पडून पिता-पुत्रासह चार ठार

$
0
0

टीम मटा, नाशिक

जिल्ह्यात वीज पडून पिता-पुत्रासह चार जण ठार झाल्याची घटना शनिवारी घडली. यात एका महिलेचा समावेश असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांत चोंढी (ता. सिन्नर) येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ कोंडाजी मवाळ (वय ४०) व त्यांचा मुलगा कृष्णा रघुनाथ मवाळ (वय १८), कसाबखेडे (ता. नांदगाव) येथील रामदास पोपट राठोड (वय ३०), उर्धूळ (ता. चांदवड) येथील कविता बापू ठाकरे (वय ३२) यांचा समावेश आहे.

सिन्नर तालुक्यातील चोंढी येथील प्रगतिशील शेतकरी रघुनाथ मवाळ व त्यांचा मुलगा कृष्णा मवाळ शनिवारी वीज कोसळून अंगावर वीज कोसळून जागीच ठार झाले, तर प्रशांत गंगाधर मवाळ (वय २६) गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव तालुक्यात कसाबखेडे शिवारात पाऊस सुरू असताना रामदास राठोड शेतात मका लावत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात ते जागीच ठार झाले. नांदगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार भोईर तपास करीत आहेत. उर्धूळ (ता. चांदवड) येथे गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसात सायंकाळी साडेसातच्या सुमारास वीज पडून कविता ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा मार्गावरील अपघातात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहरापासुन तीन किलोमीटरवर असलेल्या देवळा रस्त्यावरील तुर्कीहुडीजवळ कंटेनरने रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे.

मोरेनगर येथील प्रवाशी वाहतूक करणारी अ‍ॅपे रिक्षा (एमएच २ वायए ६७२१) देवळा येथून सटाणा शहराकडे दुपारी ३ वाजेच्या सुमारास येत होती. तुर्कीहुडीजवळ सटाण्याकडून देवळ्याकडे जाणाऱ्या कंटेनरने (आरजे १९ जीसी ३१८९) रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालक समाधान उर्फ आबा खंडू पवार (३२, रा. मोरेनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षामधील प्रवाशी राजा मानसिंग सडमाके (२१, रा. तुर्कीहुडी) हा गंभीर जखमी झाला. त्यास मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेे.

चिमुरडीवर अतिप्रसंग

पंचवटीः पंचवटी परिसरात राहणाऱ्या एका पाच वर्षीय मुलीवर अज्ञात नराधमाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. संशयित आरोपीच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरण, मारहाण आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पॉस्को) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पेठरोड परिसरातील कर्णनगर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबीयांच्या पाच वर्षीय चिमुरडीचे शुक्रवार (दि. ९) रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या अज्ञात व्यक्तीने घराजवळ खेळत असताना अपहरण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर चोरांचे राज्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

‘‘चौकीत पोलिस गैरहजर, सीसीटीव्हीही बंद, वेळेवर कुणाचीही मदत नाही आणि बाहेर मात्र चोरट्यांचा सुळसुळाट! मदतीला कोणीच नाही तर पोलिस काय कामाचे?’’ असा उद्विग्न सवाल आहे भुसावळच्या सुरेखा आनंद सोनवणे याचा. मोबाइल आणि पैसे असलेली पर्स गमावल्यानंतर पोलिसांच्या असहकार्य आणि कामचुकारपणाचा अनुभव घेत त्यांनी रेल्वेने परतीचा मार्ग धरला.

सुरेखा सोनवणे या नाशिकमधील सिडको येथे आपल्या आजारी नातेवाइकांना भेटण्यासाठी रविवारी रेल्वेने नाशिकरोड येथे आल्या. नाशिकरोड बसस्थानकात विजयनगर बसमध्ये चढत असतांना चोरट्याने त्यांची मोबाइल आणि पैसे असलेली पर्स पळवली. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ बसस्थानकावरील पोलिस चौकी गाठली. परंतु नेहमीप्रमाणे या चौकीतील पोलिस कर्मचारी गायब होते. त्यामुळे सुरेखा सोनवणे यांनी नाशिकरोड बसस्थानक प्रमुखांना आपली आपबीती सांगितली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. मात्र, सीसीटीव्ही बंद असल्याचे सांगून बसस्थानकातील सोनवणे यांना परत पाठविले.

सुरेखा सोनावणे यांनी जवळ पैसेच नसल्याने पायपीट करीत नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. तेथे उपस्थित दोन पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसह ठाणे अंमलदाराला झालेली घटना सांगण्याचा प्रयत्न केला. पण मोबाइलमध्ये ‘व्यस्त’ असलेल्या या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे साधे लक्षही दिले नाही. सुमारे तासभर पोलिसांचा हा तमाशा पाहिल्यावर सुरेखा सोनवणे यांच्या सहनशिलतेचा अंत झाला. त्या आल्या पावली बसस्थानकावर पुन्हा परतल्या. इतर प्रवाशांच्या मदतीने आपल्या मुंबईमधील भावाशी संपर्क साधला. भावाने नाशिकमध्ये राहणाऱ्या मित्राशी संपर्क करीत त्याला नाशिकरोड बसस्थानकावर पाठविले. भावाच्या मित्राने सुरेखा सोनवणे यांना गोदान एक्स्प्रेसचे भुसावळपर्यंतचे तिकीट काढून दिले. पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहत, नाशिकचा कटू अनुभव पदरात घेऊन त्या भुसावळला मार्गस्थ झाल्या.

नाशिकरोड बसस्थानकात गेल्याच आठवड्यात वडनेर दुमाला येथील एका महिलेलाही अशाच अनुभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे नाशिकरोड बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस चौकी असून अडचण, नसून खोळंबा ठरू लागली आहे. अशाच प्रसंगाची रविवारी पुनरावृत्ती झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती मंदिरात चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मानगर येथील गणपती मंदिरातील दोन दानपेट्या फोडून चोरट्यांनी सुमारे चार हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली. गंगापूर पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप बाबुराव सोनार (४८, रा. महात्मानगर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. १०) मध्यरात्री दोनच्या सुमारास दोघा चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून मंदिरातील दोन दानपेट्या फोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भद्रकालीत चोरी

दारू पिण्यास नकार दिला म्हणून तिघा संशयितांनी त्यांच्या एका मित्राचा मोबाइल आणि रोकड जबरदस्तीने हिसकावून नेली. भद्रकाली परिसरात हा प्रकार घडला. समाधान पांडुरंग भारस्कर (२४, रा. घोटी, ता. इगतपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. जयेश उर्फ जयड्या नाळे, लखन शिरसाठ आणि समाधान उर्फ सम्या गांगुर्डे (सर्व रा. फुलेनगर) यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. १०) दुपारी दोनच्या सुमारास तलवाडी परिसरात संशयितांनी समाधानकडे दारू पिण्याची मागणी केली. मात्र, समाधानने दारू पिण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने तिघांनी समाधानजवळील मोबाइल आणि १,४३० रुपयांची रोकड असा चार हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

‘तो’ युवक ताब्यात

घरफोडीच्या गुन्ह्यात पकडलेला १७ वर्षीय विधीसंघर्षित युवक उंटवाडी रोडवरील रिमांड होममधून पळून गेला होता. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला गंगाघाटावरून ताब्यात घेतले. सरकारवाडा पोल‌सि स्टेशनमध्ये दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात या युवकाला ताब्यात घेतले होते. कोर्टाच्या आदेशानुसार त्याला उंटवाडीतील रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. परंतु, ७ जून रोजी त्याने रिमांड होममधील कर्मचाऱ्यांची नजर चुकवून तेथून पळ काढला. याप्रकरणी मुंबई नाका पोल‌सि स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.

चोरीचे मोबाइल जप्त

मोबाइल चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात आडगाव पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून सहा मोबाइल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आडगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार सॅमसंग, लिनोव्हासह आणखी एका कंपनीचा मोबाइल असा ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१५ गायींची सुटका

कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणाऱ्या १५ गायी आणि सहा गोऱ्ह्यांची आडगाव पोलिसांनी सुटका केली. जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आडगाव पोलिस रविवारी (दि. ११) सकाळच्या सुमारास गस्त घालत असताना एका आयशर ट्रकची (एमएच १७ बीडी ४७१६) तपासणी करण्यात आली. या ट्रकमधून १५ गायी आणि सहा गोऱ्ह्यांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. त्यांना कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी टेम्पोचालकासह व्यापाऱ्याला ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images