Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘आर्ट फेस्ट’निमित्त भरणार कलाकारांचा कुंभमेळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरात नुकताच कुंभमेळा होऊन गेला असला तरी महाराष्ट्र टाइम्स नाशिक आवृत्तीच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रथमच कलावंतांचा कुंभमेळा भरणार आहे. मुंबई पुणे या महानगरांच्या धर्तीवर आर्ट फेस्टचे प्रथमच नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. १० व ११ जून रोजी सकाळी ९ वाजेपासून मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आर्किटेक्ट कॉलेजमध्ये ‘आर्ट फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापन दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिकमधील परफॉर्मिंग आर्ट सादर करणाऱ्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेचा प्रचार व प्रसार व्हावा व नाशिककरांना नवनवीन सांस्कृतिक प्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी या करता ‘आर्ट फेस्ट’चे आयोजन केले आहे. या फेस्टमध्ये संगीत, वादन, नृत्य, चित्र, शिल्प, कॅल‌िग्राफी, वारली या कलांचा संगम नाशिककर रसिकांना पहायला मिळणार आहे. या फेस्टमध्ये नाशिकचे नामवंत कलाकार सहभागी होणार असून त्यांनी सादर केलेले विविध कलाप्रकार पहाण्याची अनुभवण्याची संधी नाशिककरांना पहायला मिळणार आहे. पहिल्या दिवशीच्या उद्घाटन समारंभानंतर नाशिक शहरातील ख्यातनाम शिल्पकार आपली बोटांची जादू शिल्पकलेतून दाखवणार आहेत. यानंतर चित्रकारांचा एक समूह पोर्ट्रेट हा प्रकार सादर करणार असून दुपारी दोन पर्यंत विविध प्रकारची पोर्ट्रेट आकाराला येणार आहेत. लॅण्‍डस्केप व कार्टून आर्टही काही चित्रकार सादर करणार आहेत. सध्या कॅल‌िग्राफी या विषयात अनेक युवकांनी रस घेतल्याचे जाणवते. या कलेत तिरपा ब्रश धरुन काढलेली कलाकृती म्हणजे कॅल‌िग्राफी नव्हे तर त्यातून व्यक्त होणारे भाव सांगण्याचा प्रयत्न सुलेखनकार करणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले कलाकार या फेस्टमध्ये सहभागी होणार आहेत. त्याच प्रमाणे संस्कार भारतीची रांगोळी त्यातील प्रत्येक चिन्हांचे महत्व यातील कलाकार लोकांना समजावून सांगणार आहेत. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात तबलावादकांचे वादन होणार असून तबल्यातील कायदे, पलटे, चक्रदार, परण, तिहाई असे विविध प्रकारांचा आस्वाद घेता येणार आहे. यात सोलो व सहवादन या दोन्ही प्रकारांचा समावेश असणार आहे. नाशिकला गुरू हैदर शेखांपासून कथक नृत्याची परंपरा असून नाशकातील नृत्यांगणा गत, तोडे, तराना इत्यादी प्रकार सादर करणार आहेत. भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच पाश्चात्य संगीताचेही सादरीकरण करण्यात येणार असून, त्यात विविध वाद्यांचा गजर अनुभवायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे वा. गो. कुलकर्णी, शिवाजी तुपे अशा समृध्द चित्रकारांची परंपरा लाभलेल्या नाशिक शहरात अनेक चित्रकार उदयाला आले आहेत. त्यांच्यातील कलाविष्कार पहाण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. नाशिककरांनी या ‘आर्ट फेस्ट’ला नक्की हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हौशी कलाकारांनी येथे संपर्क साधावा

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांधकामांसाठी ३५ टक्के प्रीमियम आकारणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवीन बांधकामांसाठी सरकारने अद्याप प्रीमियमचा दर निश्चित केला नसल्याने बांधकामांची निर्माण झालेली कोंडी आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी फोडली आहे. सरकारचा प्रीमियमसंदर्भात आदेश येईपर्यंत शहरातील नवीन बांधकामांसाठी ३५ टक्के प्रीमियमचा दर निश्चित केला आहे. त्यामुळे बिल्डरांना आता हमीपत्र देऊन नवीन बांधकामांच्या परवानग्या मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आयुक्तांनी नगररचना विभागाला आदेश काढले आहेत.

सरकारकडून दरवर्षी बांधकामांसाठी प्रीमियमचा दर निश्चित केला जातो. चालू वर्षी हा दर अद्याप निश्चित न झाल्याने बांधकामांच्या परवानगीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे क्रेडाईसोबत झालेल्या बैठकीत दर आकारणी निश्चित होईपर्यंत ३५ टक्के दर आकारणीचा निर्णय झाला होता. रेरा कायद्यांतर्गत शहरातील बांधकामे अडकण्याची भीती बिल्डरांना होती. त्यामुळे हा प्रीमियम आदेश काढून बांधकाम परवानग्या मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे आयुक्तांनी सोमवारी नगररचना विभागासाठी आदेश काढत, नवीन दर निश्चित होईपर्यंत ३५ टक्के प्रीमियम चार्जेस लावून परवानग्या देण्याचे आदेश जारी केले आहेत, तसेच सरकारने जाहीर केलेल्या दरात तफावत असल्यास तो भरून देण्याचे हमीपत्र घेऊन परवानग्या देण्याचे निर्देश दिले आहेत.

वॉटर हॉर्वेस्टिंगची मर्यादा शिथिल

नव्या नियमावली अंतर्गत शहरात तीनशे चौरस मीटरवरील बांधकाम असलेल्या इमारतींना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा करण्यात आला होता. मात्र, त्या नियमात आता सुधारणा करण्यात आली असून, पाच हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवरील इमारतींनाच आता रेन वॉटर हॉर्वेस्टिंग प्रकल्प सक्तीचा करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या प्रमाणपत्राशिवाय भोगवटा प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्यामुळे रेन वॉटर हॉर्वेस्टिंगच्या जाचातून छोट्या प्लॉटधारकांची सुटका झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात बंदला हिंसक वळण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध मागण्यांसाठी सुरू झालेला शेतकऱ्यांचा संप आटोक्यात येण्याऐवजी दिवसेंदिवस चिघळत असून, सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण प्राप्त झाले. संतप्त जमावाने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसना लक्ष्य केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी आणि अंबोली फाटा येथे दोन बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये एकजण जखमी झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. आंदोलकांनी महामार्गांऐवजी आता ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते लक्ष्य केल्याचे पाहावयास मिळते आहे.

निफाड तालुक्यातील देवगाव फाटा येथे सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. नांदूरमध्यमेश्वर, येवल्यातील मुख्य फाटा, नांदगाव तालुक्यातील साकोरा, वाखारी, जोंधळेवाडी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दिंडोरी तालुक्यात पिंपळगाव- वणी रस्ता, तसेच रासेगाव येथे काही वेळ रास्ता रोको करण्यात आला. मालेगाव तालुक्यातही संपाचे पडसाद उमटले. निमगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. चांदवड येथे चौफुलीवर रास्ता रोको करण्यात आल्याने मालेगाव, धुळे, नाशिक, मनमाडकडे जाणाऱ्या वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. मातोरी येथे रस्त्यावर टायर जाळून, तसेच भाजीपाला फेकून शेतकऱ्यांनी न‌िषेध नोंदविला. याशिवाय जिल्ह्यात ठिकठिकाणी संपाचे पडसाद उमटले.

अंजनेरी, अंबोली फाट्यावर बस फोडली

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथे त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बसवर (एमएच १४/बीटी १४९४) चार ते पाच जणांनी दगडफेक केली. सुदैवाने प्रवासी जखमी झाले नाहीत. सर्व प्रवाशांना अन्य वाहनाने त्र्यंबकेश्वरला सोडण्यात आले. अंबोली पार्किंग येथेही बसवर (एमएच १४/बीटी २४७३) दगडफेक करण्यात आली. यामध्ये अनिल पंढरीनाथ गांगुर्डे (वय ३०, रा. पिंपळद) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नाशिक शहरात हलविण्यात आले. कळवण बसस्थानकाजवळ सकाळपासून जोरदार आंदोलन सुरू होते. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी बसेसद्वारे होणारी प्रवासी वाहतूक दोन तासांहून अधिक काळ बंद ठेवण्यात आली होती.

कळवण, सिन्नर येथे आंदोलक ताब्यात

कळवण तालुक्यातही शेतकरी अधिक आक्रमक असल्याचे पाहावयास मिळाले. सोमवारी मध्यरात्री एक वाजता टोमॅटोचा ट्रक अडविणाऱ्या चौघांना पोलिसांनी‌ अटक केली. त्यानंतर २५ वाहने पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आली. सिन्नर- घोटी रस्त्यावर बेलू फाटा येथे शेतकऱ्यांनी मुंबईकडे जाणारी काही वाहने अडविल्याने तणावाची स्थ‌िती निर्माण झाली. येथे रात्रभर आंदोलन सुरू असल्याने पोलिसांनी चार आंदोलकांना ताब्यात घेतले. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईकडे जाणारी वाहने नाशिकमार्गे वळविण्यात आली.

बाजारपेठांवर परिणाम

शेतकरी संपाचा जिल्ह्यातील विविध बाजारपेठांवर विपरीत परिणाम झाला असून, तेथील व्यवहार अजूनही पूर्वपदावर येऊ शकलेले नाहीत. संपामुळे कळवण, घोटी, सटाणा, येवला, चांदवड, सुरगाणा तालुक्यातील हतगड येथील बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे येथील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमध्ये एसटीवर दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे बळीराजाच्या समर्थनार्थ शंभर टक्के बंद पाळण्यात आला. सकाळी जव्हारकडे जाणाऱ्या जव्हार डेपोच्या बसवर अंबोलीजवळ दगडफेक झाली. बसमधील प्रवासी अनिल गांगुर्डे गंभीर जखमी झाले.

नाशिक येथून त्र्यंबककडे येणाऱ्या पंचवटी डेपोच्या बसवरही अंजनेरी शिवारात दगडफेक झाली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. अंबोली येथे दगडफेक झालेल्या बसमध्ये ४३ प्रवाशी होते. चालक व वाहकाने त्र्यंबक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे त्र्यंबक स्थानकात सर्व बस थांबल्या होत्या. वाहतूक पूर्ण बंद झाल्याने बस स्थानकावर गर्दी झाली होती. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी याचा फायदा घेत नाशिक-त्र्यंबक प्रवासासाठी शंभर रुपये भाडे आकारत वाहने भरली. अखेर पोलिस बंदोबस्तात नाशिकला बसेस सोडण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मूलगामी, लोकगामी पद्धतीचे असावे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हे मूलगामी असले पाहिजे. आपल्या आसपासच्या परिसरात जे घडते ते शिक्षणातून शिकविले गेले पाहिजे. स्थानिक राजकारण, भूगोल, इतिहास शिक्षणातून यावा, ते शिक्षण विद्यार्थ्यांच्या उपयोगाचे असते. गोदावरी नदीत किती पाणी आहे, किती दूषित आहे हे माहिती नाही आणि मिसिसिपी नदीचा इतिहास पाठ आहे, त्याचा काय उपयोग? असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक राजू परुळेकर यांनी केले.

मानवधन सामाजिक, शैक्षणिक विकास संस्थेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून परुळेकर बोलत होते. यावेळी त्यांनी ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या पुस्तकाचे, त्याच्या ई आवृत्तीचे आणि ‘इन्फो कॅल’ या अॅप्सचे लोकार्पण केले.

परुळेकर म्हणाले, की शिक्षणव्यवस्थेत बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना लोकगामी शिक्षण दिले पाहिजे. त्यातून त्यांना जगरहाटी कळू शकेल. उगाचच कुणाचा इतिहास शिकवून त्यांना दिशाहीन करता कामा नये. शिक्षणव्यवस्थेत शेती शिकविली गेली पाहिजे. माती, पिके, शेतीतील हत्यारे, रब्बी, खरीप हंगाम याबाबत शिकविले गेले पाहिजे, तरच मुलांना आपल्या आसपासची परिस्थिती ज्ञात होईल व त्यातून पुढे त्यांचा विकास घडेल. शेतकरी संपाबाबतही परुळेकर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की शेती ही संख्याशास्त्रावर आधारित प्रक्रिया आहे. शेतकरी व सामान्य माणूस यांच्यात पंचवार्षिक योजनांमधून वाढत गेलेली दरी आज इतकी वाढली आहे, क‌ी त्यांना संप करण्याची वेळ आली आहे.

यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई वायुनंदन,

मानवधन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश कोल्हे, सुकदेव कोल्हे, ज्योती कोल्हे, विचक्षण प्रकाशनाचे डॉ. राहुल जैन यांची उपस्थिती होती. प्रकाश कोल्हे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वैभव फेंडर व रोहित पगार यांचा सत्कार करण्यात आला. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

--

मोदी आल्याने असे काय विशेष घडले?

पंतप्रधानांच्या निर्णयप्रक्रियेवर परुळेकर यांनी चांगलीच तोफ डागली. मोदींनंतर कोण असा प्रश्न विचारला जातो, हाच प्रश्न नेहरूंच्या काळातही विचारला जायचा. एकशे पंचवीस कोटींच्या देशात दुसरा हुशार माणूसच मिळणार नाही का? मोदींनी असे काय केले तीन वर्षांत? त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जे निर्णय घेतले त्यांचे फलित काय आहे, हे आज आपण पाहतोच आहे. आले का तुमच्या अकाऊंटला १५ लाख, आला का दाऊद पोलिसांच्या ताब्यात. देवेगौडाही पंतप्रधान होते तेव्हा चालूच होते, आता मोदी आहे तरी चालू आहे, कशाने काही बिघडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल, मेसचालकांचा बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. शहरातील मुख्य ठिकाणांवरील हॉटेल्स, मेस सुरूच होत्या. नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी हॉटेल्स सुरू ठेवल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. काही ठिकाणी पाववडा, वडापावचे ठेले, नाश्त्यासाठी असलेल्या छोट्या गाड्याही सुरूच होत्या.

शहराकडे जाणारे दूध आणि भाजीपालाही शेतकऱ्यांकडून रोखला जात असल्याने हॉटेल व मेसवाल्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे. शंभर रुपये किलोने का होईना परंतु, भाजीपाला द्यावा अशी अटकळ मेसवाल्यांकडून केली जात असून, सध्या चवळी, राजमा, मूगडाळ, तूरडाळ, हरबराडाळ, उडीदडाळ याच्या वरणांवर भर देण्यात येत आहे. हॉटेल व्यावसायिक सोमवारी एक दिवस बंदमध्ये सहभागी होतात की नाही याविषयी उत्सुकता होती. मात्र किरकोळ वगळता कुणीही संपात सहभागी न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी संपामुळे दूध व भाजीपाल्याचे भाव प्रचंड कडाडले असून, हॉटेल्स व मेसमध्ये या गोष्टी औषधालाही मिळत नाही. त्यामुळे जेवणात डाळींचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी पुकारलेल्या बंदच्या हाकेमुळे तसेच गेल्या पाच दिवसांपासून पुकारलेल्या संपामुळे परिसरामध्ये इतर पालेभाज्यांसह वांग्याचा भाव साठ रुपये किलोवर पोहचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदसाठी शिवसेना मैदानात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकरी संपावर गेला असून, शेतकऱ्यांनी सोमवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये शिवसेनेनेही भाग घेतला. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर नाशिक महानगर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बंदमध्ये उतरत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ दिले.

शहरात महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालीमार व सीबीएस येथे आंदोलन करीत दुकाने बंद केली. शिवसेनेचे पदाधिकारी बंदमध्ये उतरल्यानंतर शालीमार, सीबीएस आणि जुन्या नाशिकमध्ये दुकाने पटापट बंद होण्यास सुरुवात झाली. भद्रकाली पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, शिवसैनिकांनी दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी बोरस्ते यांच्यासह शिवसैनिकांना अटक केली.

२० जण ताब्यात

मेन रोड येथे दुकाने बंद करण्यासाठी दबाव टाकून आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी मुंबई पोलिस अॅक्ट १९६९-७० नुसार ताब्यात घेतले. यामध्ये महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह अन्य शिवसैनिकांचा समावेश होता. या सर्व जणांना नंतर सोडून देण्यात आल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असा सुटू शकेल बोगद्याचा तिढा

$
0
0

रवींद्रनाथ कुलकर्णी, मटा सिटिझन रिपोर्टर

इंदिरानगर बोगद्याच्या वाहतुकीत काही दिवसांपासून बदल केलेले आहेत. पण, आजही तेथे चार ते पाच पोलिस तैनात असतात. येथील समस्येमुळे परिसरातील रहिवाशांसह शहरवासीयांनाही गैरसोय सहन करावी लागत आहे. त्यामुळे येथे ठोस उपाययोजनांची गरज आहे. येथील समस्येवर खालील उपाययोजना करून मात करता येऊ शकेल.

सुरळीत वाहतुकीसाठी...

-मुंबईकडून येणारी वाहने बोगद्याजवळ न उतरवता पाथर्डी फाट्यानंतर अश्विननगरजवळ अथवा स्टेट बँक चौकातच उतरून सर्व्हिसरोडमार्गे नाशिक शहरात येतील.

-राणेनगरजवळ पुलाखालील सर्व्हिसरोड वापरात आणणे खूपच गरजेचे आहे.

-इंदिरानगरकडून लेखानगरपर्यंतचा रस्ता एकेरी करावा.

-बोगद्याजवळ मुंबई नाक्याकडून येणाऱ्या व गोविंदनगरकडे (उजवीकडे) जाणाऱ्या वाहनांना मज्जाव करावा किंवा शनी मंदिराला वळसा घालून ती गोविंदनगरकडे जातील.

-मुंबई नाका परिसरात फ्लायओव्हरवर चढण्यास नवीन पूल करावा.

-बोगद्याजवळ भुयारी मार्ग काढला, तरी बऱ्याच प्रमाणात वाहतुकीवर नियंत्रण ठेवता येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात कडकडीत बंद

$
0
0

दूध, भाजीपाला, कांदे फेकले रस्त्यावर; रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

टीम मटा

महाराष्ट्र बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील सर्व बाजार स‌मित्याही बंद होत्या. अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. तसेच, शेतकरी आंदोलकांनी काही ठिकाणी दूध, कांदा व भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला. अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पोलिसांनी काही आंदोलकांनाही ताब्यात घेतले. मागण्या मागे होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

निफाडमध्ये रास्ता रोको

निफाड : शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला निफाड तालुक्यातील प्रमुख शहरांसह अनेक गावांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. तालुक्यात काही ठिकाणी हिंसक आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निफाड येथील शांतीनगर चौफुली येथे नाशिक-औरंगाबाद महामार्ग सकाळी ११ वाजेदरम्यान रोखून धरण्यात आला. म्हाळसाकोरे येथे शेतकरी आंदोलकांनी सत्ताधारी भाजप-सेना युतीची प्रेतयात्रा काढून अमरधाममध्ये मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. वनसगाव येथे रास्ता रोको करीत रस्त्यावर भजन करण्यात आले. भेंडाळी, चांदोरी चौफुली या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दिंडोरी तास व नांदूरमध्यमेश्वर या गावातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. नांदूरमध्यमेश्वर येथे मालट्रकमध्ये आडवी लावून रस्ता बंद केला. खाणगाव येथे हिंसक आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या सहा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपळगाव बसवंत शहरातील व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. पालखेड व कोकणगाव येथे भाजीपाला रस्त्यावर टाकून शासनाचा निषेध करण्यात आला. शिरवाडे वणी येथे निषेध सभा घेत असताना पोलिसांनी सदरची सभा उधळून लावल्याने शेतकरी संतप्त झाले. शिरवाडे फाट्यावर वडनेर भैरव येथून शेकडो शेतकऱ्यांनी महामार्गावर टायर जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लाठीमार करून आंदोलकांना पांगवले.

लासलगावात व्यवहार ठप्प

लासलगाव आणि पिंपळगाव बाजार समिती बंद असल्याने जवळपास चाळीस कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. गुरुवारपासून शेतकऱ्यांनी संप केल्याने कांद्याचे लिलाव बंद आहेत. तसेच, धान्य बाजारही बंद आहे.

देवळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

देवळा : महाराष्ट्र बंदला देवळा तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद अत्यंत शांततेत पार पडला. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याने मेडिकल, खासगी वैद्यकीय दवाखाने, पतसंस्था, बँका वगळता सर्वांनी कडकडीत बंद पाळला. लोहोणेर, उमराणे, दहीवड, मेशी, वाजगाव, गुंजाळनगर, महाल पाटणे, पिंपळगाव, खर्डे, वाखारी आदींसह सर्वच गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. वाजगाव येथील ग्रामस्थांनी देवळा येथे येऊन राज्य शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी हसक्षेप करून सर्व साहित्य जमा करून घेतले. उमराणे येथील शेतकऱ्यांनी गाव बंद करून छत्रपती संभाजीराजे चौकात कांदे, दूध, भाजीपाला रस्त्यावर टाकून महाराष्ट्र सरकारचा निषेध केला. सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने किसान सभा घेण्यात आली.

इगतपुरी, घोटीत शुकशुकाट

घोटी : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला इगतपुरी तालुका व घोटी परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक दुकानदार व राजकीय पक्षांनी या संपला पाठिंबा दिला. घोटीसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत सकाळपासूनच व्यवहार ठप्प राहिल्याने आर्थिक फटका बसला, तर बाजार समिती आवारात शुकशुकाट जाणवला. महाराष्ट्र बंदमुळे घोटीत आवक नसल्याने भाजीपाला मुंबईला जाऊ शकला नाही. इगतपुरी, घोटी परिसरात शेतकऱ्यांबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने संपात उडी घेतली. घोटी बाजार समिती गेटवर संपात सहभागी राजकीय पक्ष व शेतकऱ्यांनी घोषणा देत तहसीलदार अनिल पुरे यांना निवेदन दिले. इगतपुरी तालुक्यातील दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खुद्द जिल्हाधिकारी व जिल्हापोलिस प्रमुख यांनी घोटी परिसरात दिवसभर देखरेख ठेवली.

कळवणमध्ये निषेध सभा

कळवण : महाराष्ट्र बंदला कळवण येथील व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून शंभर टक्के बंद पाळण्यात आला. मेनरोड येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाकोडे, साकोरे गावाच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेकडो जणांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले.

मालेगावात सरकारचा निषेध

मालेगाव : महाराष्ट्र बंदला मालेगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर ग्रामीण भागात मात्र कडकडीत बंद पाळण्यात आला. सोयगाव, सटाणा नाका, कॅम्प, संगमेश्वर भागात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शवला. ग्रामीण भागात गावागावात शेतकरी, व्यापारी, दुकानदार यांनी कडकडीत बंद पाळला. तालुक्यातील पिंपळगाव (दा.) झोडगे, करंजगव्हाण, अजंग, वडेल, कळवाडी, रावळगाव, दाभाडी, सौंदाणे, टेहरे, निमगाव आदी प्रमुख गावांसह सर्वच ठिकाणी व्यवहार बंद होते. पिंपळगाव (दा.) येथे सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून निषेध करण्यात आला. येसगाव, रावळगाव, वडेल, निमगाव येथील आठवडे बाजारदेखील बंद होते.

सटाण्यात सुरळीत व्यवहार

सटाणा : महाराष्ट्र बंदचा सटाणा शहरात कोणताही परिणाम जाणवून आला नाही. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील दैनंदिन भाजीमंडई मात्र ग्राहकांनी गजबजली होती. दरम्यान, सटाणा शहर वगळता महाराष्ट्र बंदमध्ये ताहाराबाद, लखमापूर, ब्राह्मणगाव आदी गावे सहभागी झाली होती. नामपूर येथे शहर बंद ठेवून निषेध करण्यात आला.

चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे रिंगण

मनमाड : महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदगाव व चांदवड तालुक्यात सोमवारी ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा या मागण्यांसाठी चांदवड येथे शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करीत मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला. चांदवडनजीक दुगाव, वडाळी भोई, राहुड यासह नांदगाव शहर या ठिकाणी सोमवारी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. न्यायडोंगरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

मनमाड, नांदगाव शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळून आला. नांदगाव व चांदवडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व रिपाइंने शेतकरी संघटनांना पाठिंबा दिल्याने आंदोलनाची धार अधिकच वाढल्याचे चित्र होते. चांदवड येथे किसान सभेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको केले. यामुळे वाहतूक बराच काळ ठप्प झाली. याशिवाय याच मार्गावर वडाळी भोई येथेही रास्ता रोको करण्यात आला. चांदवडनजीक राहुड व दुगाव येथेही संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून संतापाला वाट करून दिली. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

दुगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकून व दूध ओतून सरकारविरोधी संताप व्यक्त केला. मनमाड, नांदगाव, चांदवड येथे बाजार समित्यांच्या परिसरात शुकशुकाट होता. चांदवड येथील रास्ता रोकोमध्ये शेतकऱ्यांचे वेगळेपण पाहायला मिळाले. रस्त्यावर गोल रिंगण करून व टाळ मृदूंगासह भजने म्हणत शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

येवल्यात चक्का जाम अन् रॅली

येवला : येवला शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील जवळपास सर्वच ठिकाणी कडकडीत बंद पाळत अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. सायगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकत कवडीमोल बाजारभावाने विकल्या जाणाऱ्या उन्हाळ कांद्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. धामणगाव येथे शेतकऱ्यांनी आपल्याकडील दूध, कांदे, वांगे रस्त्यावर फेकल्याने तालुक्यातील शेतकरी आंदोलनाची धार तीव्र असल्याचे दिसून आले. नगरसूल, पाटोदा, मुखेड, अंदरसूल या मोठ्या गावांसह जवळपास सर्वच गावात कडकडीत बंद पाळला गेला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह जमलेल्या शेतकऱ्यांनी येवला शहरातून काढलेली ‘रॅली’ लक्ष वेधून गेली.

धामणगाव येथील येवला-भारम रस्त्यावर शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओततानाच कांदे, वांगे फेकत निदर्शने केली. नगरसूल येथे मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला. सावरगाव, विसापूर पाटी, कासारखेडे पाटी या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले होते. चक्काजाम आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठाण मांडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आज येवल्यात पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

शेतकरी महिलाही रस्त्यावर

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल, उंदीरवाडी, आडगाव चोथवा येथील शेकडो शेतकरी महिलांनी सोमवारी येवला तहसीलकडे मोर्चा वळवत तहसीलदारांना निवेदन दिले. त्यांनी आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊन निर्दोष मुक्तता करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संवर्धनाचा निर्धार

$
0
0

टीम मटा

शहर परिसरात जागतिक पर्यावरण दिन सोमवारी विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. संवर्धन केलेल्या वृक्षांचा वाढदिवस, सीडबॉलची निर्मिती, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती पदयात्रा आदी उपक्रमांद्वारे नाशिककरांकडून पर्यावरण संवर्धनाचा निर्धार करण्यात आला. ज्येष्ठांसह तरुणाईचा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

वृक्षांचा वाढदिवस सोहळा

नाशिक / गंगापूररोड ः आपलं पर्यावरण संस्था आणि वन विभागातर्फे पर्यावरण दिनानिमित्त झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. २०१५ मध्ये सातपूर येथील डोंगरावर बारा हजार झाडे लावण्यात आली होती. या वृक्षांना या पर्यावरण दिनी दोन वर्षे पूर्ण झाल्याने हा वाढदिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजनाने झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने औक्षण करण्यात आले. यावेळी झाडांना भेट म्हणून पाच लिटर पाणी आणण्याचा संस्थेच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन वर्षांत झाडांची झालेली वाढ नागरिकांना बघता यावी म्हणून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक दिनकर पाटील, लता पाटील, वन विभागाचे प्रशांत खैरनार व पर्यावरण संस्थेचे शेखर गायकवाड यांची उपस्थिती होती. या ठिकाणी वृक्ष दत्तक योजनादेखील राबविण्यात आली. या अनोख्या उपक्रमास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

वृक्षांच्या वाढदिवसाची अशी अनोखी संकल्पना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी प्रत्यक्षात उतरवली. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या या मित्राप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पर्यावरण जत्रेत पर्यावरणपूरक वस्तू, भाजीपाला, बियाणे, रोपे आदी गोष्टींचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुजाता काळे, सुरेश नखाते, गौरी गायकवाड, गिरीश कंगणे, विनोद गुजराथी, सौरभ भोगले, राहुल आयरीकर, प्रसाद गायधनी, तुषार गांगुर्डे यांनी मेहनत घेतली.

विविध शाळा, संस्थांचा सहभाग

सेंट फ्रान्सिस, रायन इंटरनॅशनल, संस्कारवाणी युवक मंडळ, तपोवन हास्य क्लब, केरळ महिला मंडळ, यू के मेटल कंपनी, हिरकणी महिला मंडळ आदी संस्थांचा सहभाग होता.

--

हरित नाशिकचे गतवैभव परत मिळविण्यासाठी आपलं पर्यावरण काम करीत आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून दर वर्षी वनमहोत्सव राबविला जाणार आहे.

-शेखर गायकवाड, संस्थापक, आपलं पर्यावरण संस्था

---
पंचवटीत पदयात्रेद्वारे पर्यावरणरक्षणाचा जागर

पंचवटी ः जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हरितकुंभ समन्वय समिती व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयातर्फे पर्यावरण जनजागृती पदयात्रा काढण्यात आली. त्याद्वारे पर्यावरणरक्षणाचा जागर करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रामकुंड येथून पदयात्रेस सुरुवात झाली. ही पदयात्रा कपालेश्वर महादेव मंदिर, गाडगे महाराज पूल, य़शवंतराव महाराज पटांगण या मार्गाने गेल्यानंतर रामकुंड येथे तिचा समारोप करण्यात आला.

राजेंद्र पाटील यांनी नदी व उपनद्यांमध्ये होणारे प्रदूषण थांबले पाहिजे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून त्याचे खतात रुपांतर करून ते खत शेतीसाठी वापरले पाहिजे, असे सांगितले.

हरितकुंभ समन्वय समितीचे निशिकांत पगारे यांनी विकासाच्या नावावर मोठ्या प्रमाणात निसर्गाची हानी केली जात असून, ती थांबविणे आवश्यक आहे. वृक्षतोड, नदी व नाल्यांवर होणारे काँक्रिटीकरण थांबवावे, प्लास्टिकचा वापर बंद करावा, असे आवाहन केले. पदयात्रेत प्रकाश बर्वे, अॅड. अमोल घुगे, योगेश बर्वे, अतुल गुप्ता आदी सहभागी झाले होते.

--

आडगावच्या तरुणाईने बनविले हजार सीडबॉल!

आडगाव ः पर्यावरण दिन साजरा करताना येथील तरुणाईने बियाणे, खत, काळी माती, शेणखत यांचा संतुलित वापर करून, जांभूळ, सीताफळ, रामफळ, आंबा यांचे एक हजार सीडबॉल बनविले. हे सीडबॉल आडगाव परिसारासोबतच रामशेज किल्ला, सप्तशृंगीगड, त्र्यंबकेश्वर यांसारख्या ठिकाणी टाकून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यात येणार आहे.

येथील कम्प्युटर व टाइपरायटिंग इन्स्टिट्यूटतर्फे उमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेतील तरुण-तरुणींनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली. पर्यावरण संवर्धन करण्याच्या कर्तव्यभावनेने सर्वांनी एक हजार सीडबॉल बनविले. पूजा शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागल्याने पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिंदे यांनी केले.

--

कॅन्टोन्मेंट रुग्णालयात कडुनिंबांचे रोपण

देवळाली कॅम्प : येथील कॅन्टोन्मेंट रुग्णालयाच्या आवारात कडुनिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली. वनश्री पुरस्कारप्राप्त तानाजी भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार, मेडिकल सुप्रीटेंडंट जयश्री नटेश, हभप गणेश महाराज करंजकर, विशाल साळुंखे, सतीश भातखळे आदींच्या हस्ते वृक्षारोपण झाले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कडुनिंबाचे झाड महत्त्वाची भूमिका बजावून हवेत गारवा निर्माण करीत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारप्राप्त तानाजी भोर यांनी केले.

ओम साई राम सेवाभावी संस्था व भोर नर्सरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. संस्थेचे दिनेश गोविल, संजय काळे, प्रशांत वऱ्हाडे, उल्हास गुरुळे, गोपाळ काकडे, नामदेव सूर्यवंशी, संदीप पाळदे आदी सदस्य उपस्थित होते.

(संकलन ः नामदेव पवार, रामनाथ माळोदे, प्रशांत धिवंदे, अभिजित राऊत)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळापूर्व कामांवर सभापतींचा संताप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात पडलेल्या वळवाच्या पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पोलखोल केली. त्यामुळे सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सभापतींनीच पावसाळापूर्व कामे ही केवळ फार्स असल्याचे सांगत प्रशासनाच्या कामाचे वाभाडे काढले. शहरातील ड्रेनेजची कुठेही साफसफाई झाली नसून, नालेसफाईचीही बोंब असल्याचे सांगत ड्रेनेज विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करून तातडीने कामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सोबतच गेल्या दोन वर्षांपासून भिजत पडलेला कपाटांचा प्रश्नही तातडीने निकाली काढण्याचे आदेश त्यांनी दिले.

सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत सदस्यांनी पावसाळापूर्व झालेल्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पहिल्या पावसात नागरिकांची तारांबळ उडून शहरातील गटारी तुंबून रस्त्यांवरूनच पाणी वाहत होते, असा आरोप वत्सला खैरे यांनी केला. त्याला अन्य सदस्यांनीही साथ दिली. ड्रेनेजचे चोकअप काढले नसल्याने अनेक ठिकाणी गटारीच फुटल्या, तर नाल्यांचीही सफाई झाली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. प्रशासनाने केलेल्या कामांचा पहिल्याच पावसात फज्जा उडाल्याने सभापती गांगुर्डेही संतप्त झाले. त्यांनीही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ड्रेनेज विभागाला धारेवर धरत खडे बोल सुनावले. पावसाळापूर्व कामांची कुठेही अमंलबजावणी झाली नसून, शहरात काम केल्याचे कुठेही दिसत नसल्याचा ठपका त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर ठेवला. अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष कामावर नसल्याचे सांगत, विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने पत्र काढून काम करण्याच्या सूचना देण्याचे आदेश त्यांनी अधीक्षक अभियंता यू. बी. पवार यांना दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करून व मनुष्यबळ वाढवून तातडीने कामे करण्याचे आदेश त्यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ड्रेनेज विभागाच्या कागदावरील कामांबाबत सभापतींनी चांगलीच कानउघाडणी केली. सदस्य मुशीर सैय्यद यांनी जुन्या नाशिकमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत केला जात असून, दूष‌ित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त असल्याचा आरोप केला. त्यावर सभापतींनी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.


नेहरू गार्डनचे अतिक्रमण काढा

सीबीएसवरील नेहरू उद्यानात झालेल्या अतिक्रमणावरून सभापतींनी अतिक्रमण विभागाला कारवाईचे निर्देश दिले. या ठिकाणी संरक्षक भिंतीला लागूनच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढून नेहरू गार्डन अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले. कारवाईदरम्यान कोणाचा दबाव आला तर आम्हाला सांगा, पण अतिक्रमण काढा, असे निर्देश त्यांनी दिले. सोबतच वडाळा येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या गोडाऊनवरही तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

कपाटप्रश्न शासनदरबारी

सभापतींनी यावेळी नगरररचना विभागाला कपाट प्रश्नाचे काय झाले, असा सवाल केला. त्यावर आकाश बागूल यांनी कपाट प्रश्नांच्या स्थितीची माहिती दिली. सध्या शहरात ९ मीटरच्या वर रस्त्यांवरील बांधकामांना परवानगी दिली जात असल्याचा दावा बागूल यांनी केला. नकाशे सादर केल्यानंतर तातडीने मंजुरी दिली जात असून, ९ मीटरखालील रस्त्यांबाबतचा प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यासाठी आपण पुढील आठवड्यात मुंबईला जाणार असल्याचे बागूल यांनी सांग‌ितले. महापालिका नियमावली अंतर्गतच या प्रकरणांबाबत तडजोड करून प्रश्न मिटवा, असे निर्देश सभापतींनी यावेळी दिलेत. यामुळे पालिकेच्या तिजोरीत जवळपास दोनशे ते तीनशे कोटी रुपये येतील, असा दावा सभापतींनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुकणेचे काम प्रगतिपथावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वपूर्ण असलेल्या मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असून, जुलै २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा दावा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. धरणात जॅकवेलचे काम सुरू असून, १६ किलोमीटरपैकी ६ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने स्थायी समितीला दिली आहे. सोबतच ३७ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे कामही सुरू असून, प्रकल्प वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत मुकणे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नाशिक शहराला २०२१ ची लोकसंख्या गृहित धरून चारशे एमएलडी पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी २६८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले असून, मुकणे धरणातून थेट १६ किलोमीटर पाइपलाइनने शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे. हे काम एल अॅण्ड टी या कंपनीला देण्यात आले असून, जुलै २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कंपनीला देण्यात आले आहे. त्या संदर्भातील माहिती पाणीपुरवठा विभागाच्या वतीने स्थायीला देण्यात आली आहे. त्यात सध्या मुकणे धरणात पाणी नसल्याने जॅकवेल टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. धरणात पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील काम बंद पडणार असून, ते पुन्हा पुढच्या वर्षी सुरू राहणार आहे.

सहा किलोमीटर पाइपलाइन पूर्ण

१६ किलोमीटरच्या पाइपलाइनपैकी ६ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, तर १४ किलोमीटरचे पाइप येऊन पडले आहेत. जलशुद्धीकरणसाठी ३७ एमएलडी क्षमतेच्या प्रकल्पाचे कामही सुरू असून, तेसुद्धा वेळेत पूर्ण होणार असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे. त्यामुळे नाशिकला अतिरिक्त चारशे एमएलडीचा पाणीपुरवठा वेळेत होऊन शहरात असलेल्या सध्याच्या तक्रारी संपणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉन्व्हेंट शाळांचा मुजोर वारू बेलगामच

$
0
0

उत्तर महाराष्ट्रातील शैक्षणिक हब बनू पाहणाऱ्या नाशिकमध्ये कायद्याला पद्धतशीर बगल देणाऱ्या अन् मनमानी करणाऱ्या काही कॉन्व्हेंट शाळांचा वारू क्षेत्रीय कार्यालयाअभावी बेलगामच बनला आहे. या शाळांच्या भोवताली वर्षानुवर्षे धरणे आंदोलन करून अन् त्यांच्या विरोधात कोर्टवाऱ्या करून कंटाळलेल्या नाशिककरांची भिस्त आता केंद्रीय मनुष्यबळ नियंत्रण मंत्रालयावर अडली आहे.

आजच्या (६ जून) दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये उपस्थित राहणारे केंद्रीय मनुष्यबळ नियंत्रणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’ शाळांच्या संदर्भातील तक्रार निवारणासाठी क्षेत्रीय कार्यालय स्थापन करावे अथवा या तक्रार निवारणासंदर्भात नवा कायदा अमलात आणावा, अशी मागणी त्रस्त पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.

शाळांची मुजोरी; धुमसते पालक

दरवर्षी जून किंवा जुलै महिना उजाडल्यानंतर शाळांची फीवाढ या प्राधान्याच्या मुद्द्यावरून काही कॉन्व्हेंट शाळांच्या विरोधात आंदोलने पेटताहेत. या आंदोलनांमध्ये सहभागी पालकांची पार्श्वभूमी आणि त्यांची एकंदरीत प्रतिमा पाहता हे आंदोलक प्राधान्याने निरुपद्रवी आणि सामान्य नोकरदार गटांमधील असल्याने ही आंदोलने पूर्वनियोजित असल्याचा काही शाळांचा दावाही यापूर्वीच फोल ठरला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या आंदोलनांची संख्याही वाढीला लागली असून, बहुतांश प्रकरणे थेट पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदविण्यापर्यंत पोहोचली आहेत.

दाद कुणाकडे मागणार?

शहरात सीबीएसई माध्यमाच्या सुमारे १०, तर आयसीएसई माध्यमाच्या सुमारे ८ ते १० शाळा आहेत. या शाळांची एकूण संख्या सुमारे २० च्या घरात, तर तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २० हजारांवर आहे. बेकायदा फीवाढीपासून तर शाळेतून विक्री होणाऱ्या गणवेश, पुस्तके यांसारख्या मुद्द्यांपासून वाहनव्यवस्था आदी मुद्द्यांपर्यंत संबंधित अनेक प्रश्न दरवर्षी पालकांना भेडसावतात. या बोर्डांवर कायदेशीर नियंत्रण ठेवणारे क्षेत्रीय कार्यालय उत्तर महाराष्ट्राचा परिघ सोडाच, पण मुंबईतदेखील नाही. परिणामी, याप्रश्नी दाद कुणाकडे मागणार, असा प्रश्न शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचचे डॉ. मिलिंद वाघ यांनी उपस्थित केला आहे.

शिक्षण विभागाचे लोटांगण

या शाळांशी संबंधित प्रश्नांवर महापालिका शिक्षण मंडळ, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि शिक्षण उपसंचालकांकडे कुठल्याही तक्रारीवर दाद मागितली जाते. यावर उपरोल्लिखित विभागातील अधिकाऱ्यांना या शाळांवर कारवाईचे थेट अधिकारच नाहीत. खुलासा करण्याच्या नोटिशीपलीकडे नाशिकच्या परिघात अद्याप एकाही शाळेवर ठोस कारवाई नाही. तक्रारी शेकडो अन् आंदोलनेही मुबलक आहेत. नोटिशी बजावून हतबल झालेल्या या शाळांच्या कार्यपद्धतीपुढे शिक्षण विभागानेही लोटांगण घातल्याची वस्तुस्थिती आहे.

‘मंत्रिमहोदय, कायदा करा अथवा कार्यालय द्या!’

सीबीएसई किंवा आयसीएससी बोर्डाच्या शाळा सुरू करताना राज्य सरकारचे ना हरकत प्रमाणपत्र या शाळांना सक्तीचे आहे; पण तक्रार आल्यास या शाळा ना शिक्षण विभागास दाद देतात, ना पालकांचे समाधान करतात. प्रसंगी कोर्टात लढण्याची त्यांची मानसिकता अनेक प्रकरणांतून सिद्ध झाली आहे. हे मुद्दे लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी या शाळांच्या पालकांसाठी तक्रार निवारणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्थापावे अथवा नवा कायदा अमलात आणावा, अशी मागणी नाशिकमधील शेकडो पालकांच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे जिल्ह्यात महामार्गावर आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी अधिक आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. यासाठी धुळे जिल्हा शिवसेनेतर्फे शहरासह जिल्ह्यात बंदचे आवाहन करून व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना दुकाने बंद करायला सांगण्यात आले. तालुक्यातील कापडणे, उडाणे, नेर येथे शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन केले. तसेच राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कुसूंबा येथे भाजीपाला, दूध, फळे रस्त्यावर टाकून आंदोलने केले. साक्री तालुक्यातही सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, वकील संघ, शिवसेना राष्ट्रवादी व्यापारी संघटनांनी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. तर शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शेतकरी व पक्षांची आंदोलने महामार्गावर झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

नवापूरला हात भाजले

धुळे : नवापूर शहरातील मच्छी मार्केट परिसरात सोमवारी, सकाळी नाश्ता विक्रेता शंकर गावित यांची हात गाडी सुरू होती. यावेळी संपाचे आवाहन करणाऱ्यांनी त्यांना गाडी बंद करण्यास उशीर झाल्याने अज्ञात युवकांनी त्यांच्या गरम तेलाच्या कढाईत पाणी फेकले. यावेळी दिनेश वळवी आणि शंकर गावित यांच्या अंगावर उकळते तेल फेकले गेल्याने त्यांचे हात भाजले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काल‌िदाससाठी सव्वानऊ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून, सोमवारी स्थायी समितीने ९ कोटी २५ लाखांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. संबंधित नूतनीकरणाचे काम हे मे. नीव इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. स्मार्ट सिटीतून या कलामंद‌िराच्या नूतनीकरणासाठी साडेसहा कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच काल‌िदास कला मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात अभिनेता प्रशांत दामले यांनी टाकलेल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे काल‌िदासची दुरावस्था चव्हाट्यावर आली होती. प्रशासनाने त्याची दखल घेत, नूतनीकरणाचे काम मार्गी लावले आहे. त्यामुळे काल‌िदास नूतनीकरणासाठी पावसाळ्यात बंद राहण्याची शक्यता आहे.

नाशिकचे सांस्कृतिक चळवळीचे केंद्र आणि शहराचे वैभव असलेल्या या कलामंदिराची पूर्णता दुरवस्था झालेली आहे. येथील स्वच्छतागृहांची कमालीची तुटफूट झालेली असून, बेसिनही तुटलेल्या अवस्थेत आहेत. कलाकारांच्या मेकअप रूममधील स्वच्छतागृहे घाणेरड्या अवस्थेत आहेत. कालिदास कलामंदिर हे सांस्कृतिक घडामोडींचे मुख्य केंद्र असले, तरीही त्याकडे महापालिकेचे त्याप्रमाणात लक्ष नव्हते. ‘कालिदास’मध्ये बरेच साहित्य अडगळीत पडलेले असून, तेथे तांत्रिक त्रुटी मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबई, पुण्याहून येणाऱ्या कलाकारांना येथे नाटक सादर करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. कालिदास कलामंदिराचे अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, येथील खुर्च्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. अनेक खुर्च्या मोडकळलेल्या अवस्थेत आहेत, तर लावणीच्या कार्यक्रमाला येणाऱ्या मद्यपींकडून येथे अक्षरशः उच्छाद मांडला जातो. कारण, तेथे मद्यपींचा नेहमीच वावर असतो. अभिनेता प्रशांत दामले यांच्या फेसबुकवरील पोस्टमुळे ‘महाकवी कालिदास कलामंदिरा’चा वनवास राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतर प्रशासनाने काल‌िदासच्या नूतनीकरणासाठी साडेआठ कोटींचा आराखडा तयार केला होता. याबाबत घाईघडबडीत नूतनीकरणाच्या कामाची निविदा काढली होती. सोबतच स्मार्ट सिटी योजनेतून काल‌िदासच्या नूतनीकरणासाठी साडेसहा कोटींचा निधीही मंजूर झाला होती.

आता या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत काल‌िदासच्या नूतनीकरणासाठी सर्वात कमी देकार आलेल्या मे. नीव इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला देण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी येणाऱ्या ९ कोटी २५ लाख ६ हजार ४९३ रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच काल‌िदास कलामंद‌िराच्या नूतनीकरणाला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रसिद्ध आर्किटेक्टकडून आराखडाही तयार करण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काल‌िदासचा वनवास अखेर संपणार आहे.


जुलैपासून कामाला सुरुवात

कार्यारंभ आदेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलैपासून कालिदासच्या नूतनीकरणास प्रत्यक्ष प्रारंभ होण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात कामास प्रारंभ झाल्यानंतर पुढील आठ महिन्यांत काम पूर्ण करून मार्च २०१८ पर्यंत कालिदासला नवीन रूप येऊन ते सुरू होणार आहे. यादरम्यानच्या काळात नाटककारांची व कलाकारांची गैरसोय होऊ नये म्हणून दादासाहेब गायकवाड सभागृहाची दुरावस्था दूर करून येथे प्रयोग तसेच कार्यक्रम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भूसंपादन प्रस्ताव मंजूर

स्थायी समितीने सोमवारी भूसंपादनाच्या १० कोटी २४ लाखांच्या प्रस्तावा मंजूरी दिली आहे. महापालिकेडे निधी नसल्याने १२७ च्या नोट‌िसा आलेल्या प्रस्तावांना तातडीने पैसे देऊ नका, असे फर्मानही सभापतींनी भूसंपादन विभागाला दिले. आवश्यक असतील तेवढेच प्रस्ताव स्थायीवर ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणदिनीच घातले झाडांवर घाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकमध्ये वृक्षतोडीवरुन वादळ उठले असतानाच जागतिक पर्यावरणदिनीच जेलरोड येथील दिलाशा अपार्टमेंटसमोरील दोन डेरेदार वृक्षांवर बेकायदेशीररित्या करवत चालविल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगितले.

दरवर्षी ५जूनला जागतिक पर्यावरणदिन साजरा केला जातो. अनेक संस्था व नागरिकांनी या दिवशी नाशिक, नाशिकरोडला झाडे लावली. एकेकाळी दाट झाडे असलेल्या जेलरोडला आता झाडे नावापुरतीच शिल्लक राहिलेली आहेत. असे असताना जेलरोडच्या शिवाजी पुतळा येथून राजराजेश्वरी मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिलाशा अपार्टमेंटसमोर दोन मोठी झाडे इलेक्ट्रिक करवतीने कापण्यात आली. नागरिकांनी विरोध केला असतानाही ही झाडे तोडण्यात आली.

बेकायदेशीर तोड

शहरातील रस्त्यांच्या मधोमध असलेली झाडे तोडण्यास कोर्टाने परवानगी दिली होती. तथाप‌ि, महापालिकेने रस्त्याच्या कडेला असलेली झाडेही तोडल्याने कोर्टाने वृक्षतोडीस स्थगिती दिल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. झाडे तोडण्याआधी एकाच्या बदल्यात तीन झाडे लावण्याचा नियम आहे. जेलरोडला या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करुन झाडे तोडण्यात आली. ही झाडे रस्त्यावर किंवा सोसायटीच्या हद्दीत अजिबात नव्हती. तरी त्यांच्यावर करवत चालविण्यात आली.

मनपाची दिशाभूल

दिलाशा सोसायटी येथील रहिवाशांना विचारले असता एकाने सांगितले की वटवाघळे बसत असल्याने एक झाड तोडले तर दुसरे कीड लागल्याने तोडण्यात आले. दुसऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, वादळाने मोठ्या झाडाची फांदी पडल्याने ही झाडे वाकली होती, म्हणून महापालिकेने तोडली. महापालिकेचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी झाडे तोडण्यास परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. उद्यान विभागाशी संपर्क साधला असता सूत्रांनी सांगितले की, वादळामुळे मोठ्या झाडाची फांदी पडली होती. तेवढीची फांदी तोडण्याची परवानगी देण्यात आली होती. महापालिकेला अंधारात ठेऊन आणखी दोन झाडे मुळासकट तोडल्याचे आम्हाला समजले. आम्ही कायदेशीर नोटीस पाठवून गुन्हा नोंदविण्याची कारवाई करत आहोत.

हायकोर्टाचा स्टे असताना आणि रस्त्यात अडथळा नसताना जेलरोडला दोन झाडे बेकायदेशीररित्या तोडल्याबददल नागरिकांनी महापालिकेला फोन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. महापालिकेच्या नावाचा गैरवापर करुन ही झाडे तोडल्याने त्यांनाही धक्का बसला.


तोडलेली झाडे रस्त्याला अडथळा ठरत नव्हती. महापालिकेच्या नावाने अशी वृक्षतोड करणे चुकीचे आहे. जेलरोडला झाडांची संख्या कमी झाली असताना ही झाडे तोडण्यात आली. जागतिक पर्यावरणदिनीच ही घटना घडल्याने खेद वाटतो.

- शिवा ताकाटे, शिवसेना नेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टुरिस्ट पोलिसिंग ‘जोमात’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीच्या धार्मिक महत्त्वामुळे दररोज हजारो भाविक येथे दाखल होतात. भाविकांच्या गर्दीत भुरटे चोर, भिकारी आणि गर्दुल्लेही असतात. अर्थात, याचा थेट परिणाम पर्यटकांवर होतो. भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेत शहर पोलिसांनी ४ एप्रिल रोजी टुरिस्ट पोलिस ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. मात्र, दोन महिने झाले, तरी पर्यटकांची तक्रारच टुरिस्ट पोलिसांकडे आलेली नाही. मात्र, काम टुरिस्ट पोलिसांचे काम जोमात सुरू आहे.

शिर्डी-नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि वणी अशा धार्मिक स्थळांमुळे भाविकांचा राबता दिवसेंदिवस वाढत आहे. रामकुंड परिसर तर १२ महिने भाविकांच्या गर्दीने ओसांडून वाहतो. देश-परदेशांतून या ठिकाणी भाविक दाखल होतात. या गर्दीचा फायदा घेत भाविकांना लुटण्याच्या, त्यांना त्रास देण्याच्या घटनादेखील सर्रास घडतात. रामकुंड परिसरात दोन-अडीचशे भिकाऱ्यांचा नेहमी वेढा पडलेला असतो. भुरटे चोर भाविक, पर्यटकांचा ऐवज चोरून नेतात. परिणामी, मोठ्या भक्तिभावाने नाशिकमध्ये येणारे हजारो नागरिक शहराची वेगळीच कीर्ती घेऊन जातात. साहजिकच, नाशिकच्या प्रतिमेवरही त्याचा परिणाम होतो आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी ‘टुरिस्ट पोलिस’ ही संकल्पना राबविली. गेल्या ४ एप्रिल रोजी या मोहिमेची औपचारिक सुरुवात झाली. त्यासाठी दोन अधिकारी व चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले. हे पथक शहराच्या महत्त्वाच्या पर्यटनस्थळाला सातत्याने भेट देते. याबाबत बोलताना सहायक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव यांनी सांगितले, की रामकुंड, काळाराम मंदिर, तपोवन, भक्तिधाम, मुक्तिधाम, सोमेश्वर, पांडवलेणी यांसह इतर प्रमुख ठिकाणांवर सतत भेट दिली जाते. पर्यटकांच्या तक्रारी येत नाहीत. मात्र, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत आहोत. पर्यटकांना टुरिस्ट गाइड, पुजारी, रिक्षाचालक त्रास देऊ शकतात. पर्यटकांचा संबंध येणाऱ्या व्यक्तींकडून फसवणूक होऊ नये, यासाठी हे पथक कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर टुरिस्ट पोलिस संबंधितांपर्यंत पोहोचतात. बैठका घेऊन संबंधितांना पर्यटनाचे महत्त्व पटवून देत शहराची ओळख महत्त्वाची असल्याबाबत मार्गदर्शन केल्याचे आहिरराव यांनी सांगितले.

पर्यटनस्थळी जाहिरातीची गरज

टुरिस्ट पोलिस सातत्याने काम करीत आहेत. मात्र, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचा थेट टुरिस्ट पोलिसांशी संपर्क होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रामकुंड व इतर पर्यटनस्थळांसह बसस्थानकांवर टुरिस्ट पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमाकांबाबत माहिती देणे आवश्यक आहे. पर्यटकांना सहजतेने टुरिस्ट पोलिसांचा संपर्क क्रमांक उपलब्ध झाल्यास त्याचा आणखी चांगला फायदा होऊ शकतो.

--

टुरिस्ट पोलिस ही संकल्पना पर्यटकांना दिलासा देणारी आहे. अनेक पर्यटकांनी याबाबत अभिप्राय नोंदवले आहेत. जनजागृतीसह कारवाई करण्यात येते. हळूहळू जाहिरातीच्या माध्यमातून ही संकल्पना पर्यटकांपर्यंत पोहोचत आहे.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीईच्या दुरुपयोगातून शिक्षकांवर अन्याय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हक्क कायद्याचा (आरटीई) सर्रासपणे गैरवापर केला जात असून, त्याद्वारे शिक्षकांवर अन्यायच केला जात आहे. हे थांबण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच संगीत शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संगीत शिक्षकांना दिले.

केबीटी इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय संगीत शिक्षक संमेलनाचा समारोप डॉ. तांबे यांच्या उपस्थितीत सोमवारी झाला. या संमेलनस्थळास पं. विष्णू दिगंबर पलुस्कर असे नाव देण्यात आले होते.

डॉ. तांबे म्हणाले, की संगीत शिक्षकांच्या समस्या बिकट आहेत. संगीतासारख्या सृजनशील विषयांचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना अनेक शाळांमध्ये आजही इतर विषयांचे अध्यापन करण्यासाठी उभे केले जाते. संगीत माणसाचे जीवन समृद्ध करते. विद्यार्थिदशेपासूनच या विषयाचा समावेश शिक्षणात व्हायला हवा. या विषयाप्रति सरकारने धोरणेही अनुकूल ठेवावीत. दरम्यान, अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी सकाळच्या सत्रात स्वरदा राजेपाध्ये, पं. शंकरराव वैरागकर आणि डॉ. अविराज तायडे यांच्या गायनाने बहार आणली. यानंतरच्या सत्रात ‘संगीत शिक्षकांचे नियोजन व समस्या’ विषयावर चर्चासत्र पार पडले. या तीन दिवसांच्या कालावधीत तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. सुधीर तांबे, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

संमेलन यशस्वीततेसाठी महाराष्ट्र संगीत अध्यापक महामंडळाच्या नाशिक शाखेचे भाऊसाहेब लोखंडे, प्रशांत महाबळ, दिनकर दांडेकर, दिलीप पागेरे, रामेश्वर धोंगडे, तुकाराम तांबे, अश्विन पाटील, गणेश डोकबाणे आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॅस्टिकमुक्त भारताचा नाशिकमधून शुभारंभ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक हे विकसित शहर असले तरी स्वच्छतेबाबत इंदूर भारतात प्रथम आले आहे. नाशिकला नंबर वन करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्लॅस्टिकमुक्त भारत हे समाज बदलण्याचे आंदोलन आहे. त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. ही नव्या नाशिकची सुरुवात आहे. पंतप्रधान मोंदीचे स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करा,' असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केले.

जावडेकर यांनी सकाळी जेलरोडच्या शिवाजी पुतळ्याला पुष्पहार घालून प्रभाग १८ मधील स्वच्छता आणि प्लॅस्टिकमुक्त मोहिमेला प्रारंभ केला. त्यानंतर ते बोलत होते. जावडेकर म्हणाले की, मोदी सरकारची तीन वर्षे ही परिवतर्नकारी आहेत. या काळात देशात साडेतीन कोटी शौचालये बांधण्यात आली तर १ लाख ७० हजार खेडी हगणदारीमुक्त करण्यात आली. उघड्यावर शौच करणे थांबले ही नवीन संस्कृती आहे. शहरात प्लॅस्टिकची समस्या गंभीर झाली आहे. शहरांमध्ये रोज १५ हजार टन प्लॅस्टिक जमा होते. पैकी फक्त नऊ हजार टन गोळा केले जाते. वर्षाला वीस लाख टन प्लॅस्टिक तसेच राहते. जनावरे तसे समुद्रातील माशांच्या पोटात ते जाते. पर्यावरणाचीही मोठी हानी होते. त्यामुळे देश प्लॅस्टिक मुक्त करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. त्याचा शुभारंभ नाशिकमधून झाला आहे. हे केवळ प्रशासनाचे काम नाही तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे.

महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आमदार बाळासाहेब सानप, भाजपचे पदाधिकारी लक्ष्मण सावजी, वसंत गिते, विजय साने, सभागृह नेते दिनकर पाटील, स्थायीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, बाजीराव भागवत, सुनील बागूल, कामगार नेते पी. एन. आडके, नगरसेवक प्रा. शरद मोरे, मीरा हाडंगे, दिनकर आढाव, उद्धव निमसे, मीना माळोदे, पंडीत आवारे, रंजना बोराडे, कोमल मेहरोलिया, कन्हैय्या साळवे, विशाल संगमनेर, मंदा फड, मुकुंद आढाव, प्रकाश घुगे, सतीश मंडलेचा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

नाशिकचा आढावा

प्लॅस्टिक मुक्त अभियानासाठी पुढील सहा महिने नगरसेवक व नागरिकांनी मोहिम राबवावी. त्याचा आढावा घेण्यासाठी मी सहा महिन्यांनी नाशिकला येणार आहे असे सांगून जावडेकर म्हणाले की, नाशिककर सिंगापूर किती स्वच्छ आहे हे पाहण्यास जातात. मात्र, अशी स्वच्छता ठेवा की परदेशी लोक नाशिक पाहण्यासाठी आले पाहिजे. पुण्यात शाळा, महाविद्यालयात प्लस्टिकमुक्तीचा प्रयोग आम्ही यशस्वी केला. नाशिकमध्येही हे व्हावे.

सरप्राईज व्हिजीट

जावडेकर यांनी नाशिकरोड बसस्थानकाला सरप्राईज व्हिजीट दिली. त्यामुळे अधिका-यांची तारांबळ उडाली. तेथे जावडेकरांनी दुकानदारांना डस्टबीन ठेवण्याचे तसेच प्रवाशांना स्वच्छतेचे आवाहन केले. विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, संजय दराडे, ज्ञानेश्वर भोसले, विकास शेळके, बाळासाहेब आढाव, नारायण दाभाडे, गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाळी ४० कर्मचा-यांनी प्रभाग १८ मध्ये स्वच्छता मोहिम राबवली. शिवाजी पुतळा, पवारवाडी, मोरे मळा, बालाजी नगर, एकता कालनी, वसंत विहार, रेल्वेस्टेशन आदी भागात स्वच्छता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुण शेतकऱ्याची पिंप्रीत आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला तालुक्यातील पिंप्री येथील नवनाथ चांगदेव भालेराव (वय ३०) या तरुण शेतकऱ्याने पिंप्री शिवारातील आपल्या राहत्या घरी सोमवारी रात्री विषप्राशन करत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचे निधन झाले.

एका बाजूला सोसायटी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतीसाठी काढलेल्या पीक कर्जाचा कुटुंबीयांच्या डोक्यावरील मोठा बोजा अन् दुसऱ्या बाजूला द्राक्ष, तसेच शेतमालाला मिळणारा कवडीमोल बाजारभाव यातून कर्ज कसे फेडणार या चिंतेतूनच निराश झालेल्या नवनाथने आपली जीवनयात्रा संपवल्याचे सांगितले जात आहे. भालेराव कुटुंबावर चार लाखांच्या आसपास कर्ज थकीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images