Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कृषी अधिवेशनासाठी सेनेची जोरदार तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या समजून घेऊन त्यावर दीर्घोपयोगी उपाययोजना करण्यासाठी १९ मे रोजी सकाळी नऊ वाजता चोपडा सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे शिवसेना कृषी अधिवेशन २०१७ होणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नेते बुधवारी नाशिकमध्ये येणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांसह अधिवेशनात सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. निसर्गाचा कोप, दुष्काळ, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेना करीत आहे. अधिवेशन दोनच दिवसांवर येऊन ठेपले असून, शिवसेना नाशिक महानगराच्या वतीने त्यासाठीची तयारी सुरू आहे. अधिवेशनाला येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाहनव्यवस्था, निवासव्यवस्था, स्वागत कक्ष, नोंदणी कक्ष, खानपान व्यवस्था, आसनव्यवस्थेचा आढावा या वेळी घेण्यात येणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी बुधवारी सकाळी नाशिकमध्ये येणार आहेत. देसाई यांचे सकाळी दहाच्या सुमारास सरकारी विश्रामगृहावर आगमन होणार आहे. राऊत आणि चौधरी हेदेखील नाशिकमध्ये येणार असून, सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत ते शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्राहकांना वाढीव वीजबिलाचा भुर्दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महावितरणच्या शहरातील कॉन्ट्रॅक्टरांनी वीजबिलाचे रीडिंग व वाटप उशिरा केल्याने शहरातील ग्राहकांना वाढीव बिलाचा नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.

शहरात विभागनिहाय बिलाचे रीडिंग घेण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक केली आहे. या कॉन्ट्रॅक्टरांनी बिलाचे रीडिंग घेण्यासाठी काही व्यक्तींची नेमणूक केली असून, ते रीडिंग घेण्यासाठी वेळेवर येत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. बिलाचे रीडिंग वेळेवर घेतले गेले तर युनिटची संख्या कमी होते. मात्र उशिरा घेतले गेले तर युनिटची संख्या वाढते. युनिटच्या संख्येत वाढ झाल्याने बिलाचे टेरिफही बदलते. या बदललेल्या टेरिफचा भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागतो. शहरात सध्या ७ मे ते २३ एप्रिलदरम्यानच्या बिलांचे वाटप करण्यात आले आहे. ० ते १०० युनिटसाठी ३ रुपये ७६ पैसे आकारले जातात. १०१ ते ३०० युनिटसाठी ७.२१ पैसे आकारले जातात, तर ३०१ ते ५०० युनिटसाठी ९ रुपये ९५ पैसे आकारले जातात. एखाद्या ग्राहकाचे एक महिन्याचे बिल १०० युनिटच्या आत येत असेल तर त्याला ३ रुपये ७६ पैशाने विजेच्या बिलाची आकारणी केली जाते. मात्र वीजबिल ७ मे ते २३ एप्रिल या ४८ दिवसांचे पाठवल्यामुळे युनिटची संख्या शंभर युनिटच्या पुढे गेली आहे. विजेच्या युनिटमध्ये वाढ झाल्याने बिल ७ रुपये २१ पैसे दराने आकारले गेले. त्यामुळे ग्राहकांना एका युनिटमागे ३ रुपये ४५ पैशांचा नाहक भुर्दंड सोसावा लागला आहे. याबाबत महावितरणच्या कार्यालयाकडे तक्रार केली असता, बिलिंगचे काम कॉन्ट्रॅक्टरकडे दिले असल्याने त्याला वेळ लागेल. तत्पूर्वी पैसे भरा, नंतरच्या बिलातून ते वळते केले जातील, असे सांगण्यात आले. ज्या ग्राहकांना जास्तीत जास्त ३०० रुपये बिल येत होते त्या ग्राहकांना सहाशे ते सातशे रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. संपूर्ण शहरात अशीच परिस्थिती असल्याने ग्राहकांनी कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न पडला आहे. विजेच्या बिलाबाबत नेहमीच तक्रारी असताना मात्र ग्राहक संघटनादेखील ग्राहकांच्या या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाही.

आमच्या परिसरातील अनेक ग्राहकांना अशा प्रकारची बिले आली आहेत. या बिलांचे फेर रीडिंग घ्यावे व कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळे झालेला भुर्दंड आम्ही का सोसावा, याचे उत्तर महावितरणने द्यावे

- सीमा सूर्यवंशी, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरचे रस्ते होणार आता ‘हॅप्पी स्ट्रीट्स’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंदीरानगर वासियांची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ रविवार दि. २१ रोजी शिवाजी महाराज चौक, इंदिरानगर येथे रंगणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या अनोख्या उपक्रमात डान्स, म्युझिक, खेळ या सगळ्यांची धमाल करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नभांगण लॉन्सपर्यंत तुम्हाला हे आनंदाचे क्षण अनुभवता येणार आहेत.
‘हॅप्पी स्ट्रीट्स’वर सकाळी साडेसहा ते साडेनऊ हे या वेळेत सर्व वयोगटातील व्यक्तींना या मनोरंजनाच्या मेळ्यात सहभागी होता येणार आहे. आठवडाभराच्या टेन्शनमधून तुम्हाला रिलॅक्स करणारी ही ट्रीट ठरणार आहे. विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची नावनोंदणी करण्याची गरज नाही. रविवारी सकाळी ६.३० ते ९.३० यावेळेत इंद‌िरानगरला उपस्थित राहायचं आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िट‌िजमध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. इंदिरानगरचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.
इंदिरानगर येथे होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीटमध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉ‌पिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. यावेळी उपस्थितांना हे प्रकार करुन घेता येतील. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्य़ा साधनांचा वापर करायचा याची माह‌िती देणार आहे. रवींद्र जोशी व त्यांचे शिष्य बासरीवादन करणार आहे. हर्षल शिंदे हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहे. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटारवादन करणार असून, यावेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. सौरभ मानकर हे टॅटू आर्टिस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. बचपन गली या उफक्रमाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांना विस्मृतीत गेलेले खेळ खेळायला मिळणार आहेत. त्यात गोट्या, भोवरे, ठिक्कर, दोरीवरच्या उड्या इत्यादी खेळांचा समावेश असेल. प्रेमदा दांडेकर यांच्यातर्फे रांगोळीचे प्रशिक्षण दिले जाणार असून, विविध प्रकार कसे साकारायचे याचे प्राथमिक शिक्षण त्या आपल्या कलाकृतीतून देणार आहेत. पोलिस बॅण्डही यात सहभागी होणार आहे. नाशिकरोड येथील दंडे ज्वेल्सच्या वतीने महिलांचे ढोलपथक कला सादर करणार आहे. संकलेच्या ग्रुपच्या वतीने सेल्फी कॉर्नरचे आयोजन करण्यात आले आहे. आयआयटीच्या पाटील यांच्या वतीने कॅनॉपी स्टॉल, आयएनएफडीच्या वतीने लहान मुलांसाठी विविध अॅक्ट‌िव्ह‌िटीज, विजयराज यांचे जादूचे प्रयोग, भक्ती आणि मुक्तीच्या वतीने विविध प्रकारचे क्राफ्ट, आनंद हास्य क्लबच्यावतीने हास्याचे प्रकार शिकवले जाणार आहेत. श्रीशक्ती बचतगटच्यावतीने कापडी पिशव्यांचे मोफत वाटप होणार आहे. वैष्णवी मोरे या विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. हॅण्ड फाउंडेशनचा रॉक बॅण्‍ड हेही आकर्षण असेल. यावेळी लल‌ित महाजन आणि ग्रुप हे वेस्टर्न क्लासिकल गाणी सादर करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याच्या हल्ल्यात सिन्नरला तिघे जखमी

$
0
0

सिन्नर : भोकणी शिवारात डावखर वस्तीजवळ मंगळवारी बिबट्याने खडी फोडणाऱ्या दोन मजुरांसह सहा वर्षांच्या बालिकेवर हल्ला करून तिघांना जखमी केले. जखमींवर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिबट्या चाऱ्याखाली लपला असल्याचा संशय वन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

खंबाळेतील भोकणीत मऱ्हळ रस्त्यावर भगवान सानप यांची वस्ती आहे. येथे रस्त्यालगत खडी फोडण्याचे काम करीत असताना तिघांवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. यामध्ये दयाराम नवले (वय ४०) भाऊसाहेब डावखर (वय ४७) व कोमल डावखर (वय ६) हे तिघे जखमी झाले आहेत. घटनेची गांभीर्यता लक्षात घेत वन कर्मचाऱ्यांनी सानप वस्तीजवळ पिंजरा लावला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण मंडळ नको, शिक्षण समितीच हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेतील काही नगरसेवक शिक्षण समिती बरखास्त करून शिक्षण मंडळ पुनर्स्थापित करण्याचे षडयंत्र रचत आहे. शिक्षण मंडळ अस्तित्वात न ठेवता शिक्षण समिती नियुक्त करावी, असा राज्य सरकारचा आदेश असताना त्याची पायमल्ली केली जात आहे. त्यामुळे हे प्रकार थांबवावे, असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी महापौरांना देण्यात आले.

पत्रकात नमूद केले आहे, की नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेच्या १३४ शाळा आहेत. त्यात १५ व २० शाळा सेमी इंग्रजी आहेत. मनपाच्या तरतुदीतून ५० टक्के व राज्य सरकारकडून ५० टक्के यासाठी खर्च केला जातो. शिक्षण समिती स्थापन झाल्यापासून महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आढळून आली आहे. या शिक्षण समित्यांच्या बैठकींमध्ये समिती, सभापती, सदस्यांनी विद्यार्थी व कर्मचारीहिताचे निर्णय आतापर्यंत घेतले आहेत. आयटी कायद्यांतर्गत समितीतील अधिकार हे प्रामुख्याने प्रशासन अधिकारी व मनपा आयुक्तांना असल्याने सद्यःस्थितीत तरी भ्रष्टाचाराची प्रकरणे आढळून आली नाहीत. त्यामुळे महापालिकेचा शैक्षणिक आलेख वाढण्यास मदतच झाली आहे. सद्यःस्थितीत सत्ताधारी भाजप महासभेच्या माध्यमातून शिक्षण समिती रद्द करून पुन्हा शिक्षण मंडळ आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मंडळाच्या कारकिर्दीत घोटाळेच घोटाळे!

मागील शिक्षण मंडळाच्या कारकिर्दीत गणवेश भ्रष्टाचार, बिस्कीट घोटाळा, कर्मचारी बदली घोटाळा, पोषक आहार खरेदी घोटाळा, शैक्षणिक व क्रीडा साहित्य खरेदी घोटाळा, पुस्तक खरेदी घोटाळा असे अनेक घोटाळे व भ्रष्टाचार शिक्षण मंडळाच्या कालावधीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायालयात या संदर्भात उच्च न्यायालयाने नाशिक महापालिकेला जबाबदार धरले आहे. म्हणून शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळ करण्याच्या महासभेच्या ठरावाला आमचा तीव्र विरोध असून, हा ठराव सरकारचे नियम व कायद्याचा भंग करणारा आहे. हा ठराव महासभेवर ठेवण्यात येऊ नये; अन्यथा उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात येईल. त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही मनसेने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मशानभूमीत जादूटोण्याचा डाव

$
0
0

दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंटरनेट, मोबाइलसह आधुनिक तंत्रज्ञान घराघरात पोहोचले. शिक्षणाचा पसार झपाट्याने होत असताना मनात दडलेल्या करणी, जादूटोणा, भुताटकीचा पगडा मात्र समाजावर कायम आहे. कायदा करूनही त्यास लगाम बसत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार भद्रकालीत समोर आला असून, या प्रकरणी पोलिसांनी दोघा महिलांना अटक केली आहे.

आरेफा शहा अन्सारी, तरन्नुम हमीद अन्सारी (रा. दोघे नानावली) व फारूख मौलाना (रा. बागवानपुरा, जुने नाशिक) अशी जादूटोणा करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. नानावली मशिद शेजारी राहणाऱ्या शेख आरिफ शहा मोहम्मद यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. आरिफ शेख व अन्सारी कुटुंबीयात पूर्वीपासून वाद आहेत. यातूनच संशयितांनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. २५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जादूटोण्याचा प्रकार घडला होता. संशयित दोन्ही महिला फारूख मौलानाकडे गेल्या होत्या. त्याच्या सल्ल्यानुसार दोन्ही महिलांनी नानावलीतील अमरधाम परिसरातील लहान मुलांच्या स्मशानभूमीत जादूटोण्याचा प्रयोग केला. संशयित आरोपींनी काळ्या जादूचा वापर करण्यासाठी काळी बाहुली तयार केली. तिच्यावर मंत्राचा जप करीत टाचण्या टोचून बाहुलीला कागद टोचण्यात आले. तसेच, ती बाहुली कागदासह एका काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून जमिनीत पुरण्यात आली. बाहुली पुरताना समोरील व्यक्तीच्या मरणाची इच्छा व्यक्त केल्यास तसे परिणाम दिसून येतात, अशी खुळचट भावना या महिलांच्या मनात भरण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी जादूटोण्याच्या घटनेची माहिती शेख आरिफ शहा मोहम्मंद यांना समजली. त्यांनी लागलीच भद्रकाली पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काही पुरावे समोर आल्याने तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही महिलांना अटक करण्यात आली आहे.

सल्ले देणाऱ्यांविरोधात कारवाईची आवश्यकता

दोन कुटुंबातील वादावर तोडगा काढण्याऐवजी त्यांच्यात कटुता निर्माण करून पोट भरणाऱ्या संबंधित व्यक्तिविरोधात कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. काळ्या बाहुल्या पुरल्यानंतर समोरील व्यक्तीचा मृत्यू होतो, असे सांगणारा फारूक मौलाना अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. त्यानेच सदर महिलांना असे कृत्य करण्यास चिथावणी दिली होती.

या प्रकरणी संशयितांपैकी काहींना अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहाणे आवश्यक आहे. आपापसातील मतभेद दूर करण्यासाठी जादूटोणा उपयोगी पडत नाही. त्यातून नुकसानच अधिक होते.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट यार्डात आता ‘ई-बोली’

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

शेतकऱ्यांना आता शेतमालाचे भाव काय हे मार्केटमध्ये न येता समजले तर? व्यापाऱ्यांनाही शेतमालासाठी अडत्यांकडे होणारी धावपळ टळली तर? अडत्यांनाही कमीत कमी वेळेत लिलाव करता आले तर? कदाचित असं झालं तर ते खऱ्या अर्थाने अच्छे दिन म्हणावे लागतील. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत आता एक जूनपासून हे अच्छे दिन पाहायला मिळतील. संचालक जगदीश अपसुंदे यांच्या प्रयत्नातून ‘ई-बोली’ अॅप विकसित करण्यात आले असून, त्यातून शेतकरी, व्यापारी, अडते या सर्वांना नेहमी भेडसावणारे प्रश्न कायमचे सुटणार आहेत.

नाशिक बाजार समिती व अडवायसिंक कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने १ जूनपासून पारदर्शक व अद्ययावत व्यवहारांसाठी हे अॅप सुरू करण्यात येणार आहे. या अॅपची माहिती देणारे फलक बाजार समितीच्या आवारात लावण्यात आले असून, त्यावर अॅप डाऊनलोड करण्याबरोबरच कोड स्कॅन करण्याबाबतची माहितीही देण्यात आली आहे.

या अॅपमुळे शेतकऱ्यांना मोबाइलवर आपल्या शेतमालाचा योग्य भाव करता येणार आहे. मोबाइलवर आपल्या उत्पादनाचे कमाल दर व किमान दर पाहता येतील. या ई-बोली प्रणालीतील बाजारभाव मागणी व पुरवठ्याच्या अनुषंगाने ठरणार आहेत. यात पारदर्शकपणे दर ठरणार असून, बोलीप्रक्रियेनंतर सौदे आपोआप होऊन खरेदीदाराला व विक्रेत्याला त्याची यादी दिसणार आहे. शेतकऱ्यांसाठी राखीव दर टाकण्याची सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे उत्पादन त्या दराच्या खाली विकले जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. आतापर्यंत शेतकऱ्याला बाजार समितीत आल्यावरच दर कळत असे. काही वेळेस त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात वाहतुकीचा खर्चही निघत नाही, तर कधी शेतमालाला ग्राहक नसल्यामुळे रस्त्यावर शेतमाल फेकण्याची वेळ येते. आता या प्रणालीमुळे शेतकऱ्यांवर ही नामुष्की ओढवणार नाही.

या प्रणालीमुळे व्यापाऱ्यांनाही मोबाइलवर शेतमालाची खरेदी योग्य भावात करता येईल. व्यापाऱ्याला मालासाठी या अडत्याकडून त्या अडत्याकडे धावपळ करण्याची गरज पडणार नाही. त्याला मोबाइलवरच सर्व मागणी व पुरवठ्याचा तपशील पाहता येईल. पारदर्शक प्रणालीमुळे बाजारभावात समतोल राखला जाईल. त्यामुळे एका अडत्याकडे कमी भाव व दुसऱ्याकडे जास्त भाव असे होणार नाही. अडत्यांनाही कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लिलाव करता येतील. त्यामुळे वेळ व पैसा वाचेल. अडत्याला त्याची उलाढाल वाढविण्यास मदत मिळेल.

शेतकऱ्यांचा फायदा

कधी कधी एखाद्या मालाची आवक प्रचंड प्रमाणात होते. याचा अंदाज शेतकऱ्यांना नसतो, तसेच व्यापाऱ्यांनाही नसतो. मागणीपेक्षा जास्त खरेदी करणे व्यापाऱ्याला शक्य नसल्यामुळे कित्येकदा माल फेकून देण्याची वेळ येते. या अॅपच्या माध्यमातून शेतकरी आणि व्यापारी यांना बाजारभावाचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे. त्यानुसार कमी खर्चात शेतकऱ्याला शेतमाल व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवता येईल.

- जगदीश अपसुंदे, ई-बोली प्रणालीचे प्रणेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठराविक भागात कचराकोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेच्या घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली बंधनकारक करण्यात आल्यापासून शहरातील काही भागातील कचरा संकलनासाठी उशीर होत असल्याची स्थिती आहे. परिणामी कचऱ्याचे ढीग साचत असल्याचे चित्र शहरातील ठराविक भागात दिसून येत आहे.

काही महिन्यांपासून घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली बंधनकारक करण्यात आली आहे. परिणामी नियोजित वेळेत नियोजित मार्गांवरील कचरा संकलित करण्याचे बंधन संबंधित घंटागाडी कर्मचाऱ्यांवर आलेले आहे. या प्रणालीमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना अशा एखाद्या मार्गावरील कचरा अर्धवट संकलित करणेही अशक्य झाले आहे. जीपीएस प्रणालीमुळे प्रत्येक मार्गावरील कचऱ्याचे संकलन दिलेल्या वेळेतच करण्याची जबाबदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांवर आली आहे.

कचऱ्याचे उशिराने संकलन

शहरातील काही भागातील कचरा संकलनाची घंटागाड्यांसाठीची वेळ दुपारनंतरची असल्याने तोपर्यंत अशा मार्गांवर कचऱ्याचे ढीग पडून राहत आहेत. अशा ठिकाणचा कचरा इतस्ततः विखुरला जात आहे. कचरा संकलनाच्या दुपारनंतरच्या वेळेमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

व्यावसायिकांची बेशिस्त

शहरातील बहुतांश व्यावसायिक आपल्या दुकानातील कचरा घंटागाडी कर्मचाऱ्यांकडे जमा करण्याऐवजी थेट चौकात उघड्यावर टाकतात. परिणामी अशा ठिकाणी घंटागाडी येईपर्यंत कचऱ्याचा मोठा ढीग साचत आहे. व्यावसायिकांकडूनच कचरा जमा करण्याविषयीचे नियम पाळले जात नसल्याने शहरातील कचरा समस्या जटिल बनली आहे.


कारवाई कमी; मेहेरबानी जास्त

शहरात सार्वजनिक ठिकाणी, चौकांतील मोकळ्या जागांवर कचरा उघड्यावर टाकणाऱ्या व्यावसायिकांवर महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र, कचरा घंटागाडीत जमा करण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्या व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाईप्रश्नी महापालिकेचा स्वच्छता व आरोग्य विभाग नरमाईची भूमिका घेत आहे. स्थानिक नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे अशा व्यावसायिकांवर मेहेरबानीच जास्त केली जात आहे.

--

प्रबोधनाची मोहीम कुणासाठी?

महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक स्वच्छता व कचरा संकलनाबाबत दररोज प्रबोधन मोहीम राबविली जात आहे. घंटागाड्यांमार्फतही ओला व सुका कचरा वेगळा करणे व कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन ध्वनिक्षेपकाद्वारे केले जात आहे. या प्रबोधनाच्या मोहिमांच्या उद्घाटनास स्थानिक नगरसेवकही उपस्थित राहत आहेत. मात्र, असे असूनही शहरातील सार्वजनिक ठिकाणी व चौकांत कचरा टाकण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

--

शहरातील वेगवेगळ्या प्रभागांतील मार्गांवरील घंटागाड्यांची वेळ वेगवेगळी आहे. ज्या मार्गांवरील घंटागाडीची वेळ दुपारनंतरची आहे, अशा मार्गांवरील कचरा दुपारनंतरच उचलला जातो. व्यावसायिकांनी कचरा उघड्यावर न टाकता घंटागाडीतच टाकून सहकार्य केले पाहिजे.

-संजय दराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक, नाशिकरोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकला गरज १०० कोटींची!

$
0
0

आणखी आठवडाभर एटीएममध्ये खडखडाट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिझर्व्ह बँकेकडून चलनाची रसदच पुरविली जात नसल्याने आणखी आठवडाभर एटीएममधील खडखडाट नाशिककरांना सहन करावा लागणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक शहराकरिता तातडीने किमान १०० कोटींचे चलन आवश्यक असून, तशी मागणी रिझर्व्ह बँकेकडे करण्यात आली आहे. मात्र हे चलन नेमके केव्हा मिळणार याबाबत बँक अधिकाऱ्यांनाच निश्चित माहिती नसल्याने प्रतीक्षा अटळ मानली जात आहे.

नोटाबंदीच्या निर्णयापासून सातत्याने चलनटंचाईची समस्या डोके वर काढत आहे. यामुळे राष्ट्रीयीकृत आणि खासगी क्षेत्रातील बँकांची डोकेदुखी वाढली आहे. बँक खात्यात पैसे असूनही ते मिळविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. फेब्रुवारीनंतर प्रत्येक एटीएमसाठी दर दोन ते तीन दिवसांनी १८ ते २० लाखांचा भरणा केला जात होता. परंतु, आता हे प्रमाण खूपच कमी झाले असून, पैसे काढण्याची मर्यादा वाढविल्यामुळेही तास दोन तासांतच एटीएममध्ये पुन्हा खडखडाट निर्माण होत आहे. एटीएम बाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. बँकांच्या तिजोरीतच खडखडाट असल्याने पैसे देण्याबाबत बँकाच हतबलता व्यक्त करीत आहेत.

व्हायरसचाही परिणाम

रॅनसमवेअर व्हायरसकडून होणाऱ्या हल्ल्याच्या भीतीमुळे शहरातील एटीएम बंद ठेवल्याचे बोलले जात असले तरी जिल्ह्यात फारसे चलनच उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे. एटीएममध्ये भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने ते बंद ठेवण्यात आल्याचे बँकिंगमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गरजेच्या १० टक्केच रक्कम

नाशिक शहरात सध्या गरजेच्या १० टक्केच चलन बँकांकडे उपलब्ध आहे. आरबीआयकडे चलनाची मागणी केली तरी अपुरा अर्थपुरवठा होत असून, त्यामुळे ही रक्कम बँकांना पुरवून वापरावी लागते आहे. एटीएममध्ये रोख रकमेचा भरणा करण्याऐवजी ग्राहकांना बँकेतूनच रक्कम देण्याचे धोरण बहुतांश बँकांना स्‍वीकारले आहे. बँकेत भरणा होण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे निरीक्षण बँक अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. स्वत:ला रोकडची चणचण भासू नये म्हणून व्यापारीवर्गाने मोठ्या प्रमाणावर चलन दाबून ठेवल्याची शक्यताही बँकिंग क्षेत्रातील सूत्रांकडून व्यक्त होते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी अधिवेशनासाठी सेनेची जोरदार तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा, समस्या समजून घेऊन त्यावर दीर्घोपयोगी उपाययोजना करण्यासाठी १९ मे रोजी सकाळी नऊ वाजता चोपडा सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे शिवसेना कृषी अधिवेशन २०१७ होणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेचे नेते बुधवारी नाशिकमध्ये येणार आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखांसह अनेक पदाधिकारी शेतकऱ्यांसह अधिवेशनात सहभागी होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. निसर्गाचा कोप, दुष्काळ, कर्जाचा डोंगर यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. शेतकऱ्यांच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेना करीत आहे. अधिवेशन दोनच दिवसांवर येऊन ठेपले असून, शिवसेना नाशिक महानगराच्या वतीने त्यासाठीची तयारी सुरू आहे. अधिवेशनाला येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वाहनव्यवस्था, निवासव्यवस्था, स्वागत कक्ष, नोंदणी कक्ष, खानपान व्यवस्था, आसनव्यवस्थेचा आढावा या वेळी घेण्यात येणार आहे. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या या अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उद्योग व खनिकर्ममंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अजय चौधरी बुधवारी सकाळी नाशिकमध्ये येणार आहेत. देसाई यांचे सकाळी दहाच्या सुमारास सरकारी विश्रामगृहावर आगमन होणार आहे. राऊत आणि चौधरी हेदेखील नाशिकमध्ये येणार असून, सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत ते शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रंथालय चळवळीला खीळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गेल्या पाच वर्षांपासून सरकारने नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यावर बंदी घातलेली असल्याने वाचनसंस्कृतीच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या ग्रंथालय चळवळीला ब्रेक लागला असल्याचे चित्र नाशिक विभागात दिसून येत आहे. विविध संस्था बंदी उठण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम, १९६७ अंतर्गत तरतुदींनुसार करण्यात आलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये (सहाय्यक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री यासाठी मान्यता) नियम, १९७० मधील तरतुदींनुसार स्वतंत्र नोंदणीकृत सार्वजनिक ग्रंथालयांना शासनमान्यता व सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येते. डिसेंबर २०११ मध्ये शासनाने सार्वजनिक ग्रंथालयांना अनुज्ञेय असलेल्या परिरक्षण अनुदानात एप्रिल २०१२ पासून ५० टक्के वाढ करण्याचाही निर्णय घेतला होता. त्यापूर्वी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची पडताळणी करुन त्याचा अहवाल शासनाने मागितला होता. त्यानुसार २१ ते २५ मे २०१२ या कालावधीत महसूल यंत्रणेमार्फत राज्यातील १२८६१ ग्रंथालयांपैकी १२८४६ ग्रंथालयांचा पडताळणी अहवाल शासनदरबारी सादर झाला होता. या अहवालानुसार राज्यातील ५७८४ ग्रंथालये सर्व निकष पूर्ण करीत असल्याचे आढळून आले होते. ५७८८ ग्रंथालये सुधारणा होण्याजोगे तर ३६० ग्रंथालये दर्जावनत करण्यायोग्य आढळून आले होते. याशिवाय धक्कादायक बाब म्हणजे ९१४ ग्रंथालये मान्यता रद्द करण्यायोग्य आढळून आल्याचे वास्तव या अहवालातून बाहेर आले होते. त्यामुळे २१ फेब्रुवारी २०१२ पासून शासनाने नवीन ग्रंथालयांच्या मान्यतेवर बंदी आणली होती.

८३ ग्रंथालये बंद
या पडताळणीनंतर नाशिक विभागातील ८३ ग्रंथालये बंद झाली. त्यात नाशिक जिल्ह्यातील २५, नगरमधील १९, जळगावमधील २४, धुळ्यातील ९ व नंदुरबारमधील ६ ग्रंथालयांचा समावेश आहे. विभागातील १५ ग्रंथालयांचा दर्जा अवनत झाला होता. त्यात नगरमधील ५, नाशिकमधील ३, जळगावमधील ६, नंदुरबारमधील एका ग्रंथालयाचा समावेश आहे. परिणामी ग्रंथालय चळवळीला खीळ बसली आहे.

बंदी उठविण्यापूर्वी शासनस्तरावर समिती नेमली जाणार आहे. या समितीच्या अहवालातील शिफारशींनुसारच पुढील धोरण अपेक्षित आहे. ग्रंथालयांसंदर्भात नवीन निकष लागू होण्याची शक्यता आहे.
-अ. अ. ढोक (सहाय्यक ग्रंथालय संचालक, नाशिक विभाग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंग-रेषांची स्वप्नवत अनुभूती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रंग-रेषा स्थिर... रूढ अर्थाने त्या हलत नाहीत... ताकदीने मांडल्या, की माणसाला हलवून सोडतात... ती किमया चित्रकारांची... अवलिया चित्रकारांची! आपल्या रंग-रेषांनी काही चित्रे आपल्याला अशीच खिळवून ठेवतात.

कुसुमाग्रज स्मारकात गुरुवारपासून सुरू झालेले ‘ड्रीम्स’ हे रेन्बो फाउंडेशनने आयोजित केलेले विद्यार्थ्यांचे चित्रप्रदर्शन अशीच स्वप्निल सफर घडवून आणणारे ठरत आहे. यात चित्र काढणारे चित्रकलेचे फक्त प्राथमिक शिक्षण घेतलेले बहुतांश विद्यार्थिदशेतले चित्रकार आहेत. पाच वर्षांची स्वागता तळेकर व मराठा हायस्कूलमध्ये शिकणारी पंधरा वर्षांची गार्गी परदेशी हे दोघे तर शाळकरी चित्रकार आहेत.

नाशिक कलानिकेतनचे प्रा. सुदर्शन तळेकर यांनी रेन्बो फाउंडेशनकडे विद्यार्थ्यांचे चित्रप्रदर्शन भरविण्याची कल्पना मांडली. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चित्रे काढता यावीत व ती लोकांसमोर मांडावीत, त्यांनाही व्यावसायिक जगताची तोंडओळख व्हावी, हा उद्देश घेऊन विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शकांचे एकत्रित चित्रप्रदर्शन भरविण्याची ही संकल्पना आहे.

कठीण स्थितीत जगणाऱ्या गरजवंतांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी कार्य करणाऱ्या रेन्बो सामाजिक संस्थेच्या उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट हे कला व कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे आहे. यापूर्वी संस्थेने क्लिक कुंभ ही रोख बक्षीस रकमेची छायाचित्र स्पर्धा आयोजित केली होती. त्यामुळे तळेकरांनी मांडलेला विद्यार्थी व मार्गदर्शकांच्या चित्रप्रदर्शनाला रेन्बोच्या कार्यकारी मंडळाने मान्यता दिली व कलारसिकांकरिता ड्रीम्सची पर्वणी अनुभवण्याची संधी प्राप्त झाली. क्लिक कुंभनंतर रेन्बोचे ‘ड्रीम्स’ हे कलेच्या क्षेत्रातले दुसरे प्रदर्शन आहे.

यांचा आहे सहभाग...

या उपक्रमात सौरभ धारणकर, सौमित्र खंदारे, रोहिणी पाटील, गायत्री सोनवणे, प्रियदर्शनी पाटील, श्रुती शहा, स्वागता तळेकर व गार्गी परदेशी या विद्यार्थ्यांसह स्वत: सुदर्शन तळेकर व त्यांचे पूर्वाश्रमीचे विद्यार्थी मनोज खैरनार अशा दहा जणांची स्वप्ने चित्रांच्या माध्यमातून कॅनव्हास व कागदावर उतरली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार्वतीमाता मूर्तीची त्र्यंबकमध्ये शोभायात्रा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भगवान त्र्यंबकराजाच्या मंदिर गर्भगृहातील पार्वतीमाता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मंगळवारी प्रारंभ झाला. तीर्थराज कुशावर्तावर सकाळी विश्वस्तांची गंगाभेट, देहशुद्धी, प्रायश्चित्त आदी धार्मिक विधी झाले. मंदिरापासून कुशावर्तापर्यंत पार्वतीमातेच्या मूर्तीची सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. श्रीसंत निवृत्तिनाथांच्या चांदीच्या रथात मूर्ती ठेवण्यात आली होती. या रथास माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची बैलजोडी जुंपण्यात आली होती व सारथ्य स्वतः अडसरे करीत होते. ढोलपथकांसह सनईच्या मंगल वाद्यांचे सुरांत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत चेअरमन न्या. चिटणीस, विश्वस्त कैलास घुले, अॅड. श्रीकांत गायधनी, सचिन पाचोरकर, डॉ. सत्यप्रिय शुक्ल, ललिता शिंदे, यादवराव तुंगार, जयंत शिखरे, संत निवृत्तिनाथ मंदिराचे विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकनाना थेटे, रामभाऊ मुळाणे, वसंतराव घुले, भगवानबाबा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन हजारांहून अधिक दाखले रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाऑनलाइन’च्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून, दोन आठवड्यांपासून जिल्ह्यातील सेतू केंद्रे, तसेच महा-ई-सेवा केंद्रांच्या कामकाजावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. शहरात सुमारे दोन हजारांहून अधिक दाखल्यांची कामे रखडली असून, केंद्र चालकांकडून हतबलता व्यक्त केली जात आहे.

दाखले देण्याच्या प्रक्रियेत गतिमानता यावी, यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अंगीकार करण्यात आला आहे. सेतू, तसेच महा-ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज दाखल करणे, दाखला तयार होणे व कागदपत्रांची तपासणी होऊन अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दाखले वितरित करण्याची प्रक्रिया राबविली जाते. अशा दाखल्यांसाठी आकारले जाणारे शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने म्हणजेच पीओएस मशीनच्या साह्याने भरून घेण्याची सक्ती महा-ई-सेवा केंद्रचालकांना करण्यात आली आहे. हे सर्व ‌निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न होत असताना काही दिवसांपासून महाऑनलाइनचे सर्व्हर डाऊन झाले आहे. कोणत्याही दाखल्यासाठी ऑनलाइन काम करताना ‘ट्राय अगेन’ इतकाच संदेश दिला जात असून, दाखला काढण्यासाठी तासन् तास प्रयत्न करावे लागत आहेत. महाऑनलाइनचे कामकाज पाहणारे स्थानिक समन्वयकही हात वर करीत असल्याने केंद्रचालकांची कोंडी होत आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचे निकाल जाहीर होण्यापूर्वी हे तांत्रिक दोष दूर न झाल्यास सेतूचालकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. महा-ई-सेवाच्या माध्यमातून ऑनलाइन सातबारा दिला जात असून, त्यासाठीही ऑनलाइन शुल्क आकारले जात आहे. शुल्क आकारूनही दाखलेच प्राप्त होत नसल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. मात्र, उपजिल्हाधिकाऱ्यांवर मालेगाव महापालिकेच्या कामकाजाची जबाबदारी असल्याने या तक्रारीची दखल घेण्यासाठी सक्षम अधिकारीच उपलब्ध नसल्याने गैरसोयीत भरच पडते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्ट नीट वाचा, मगच करा लाइक...

$
0
0


सौरभ बेंडाळे / हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

दोन दिवसांपूर्वी मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यपूर्वी त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या सुसाइड नोटला कित्येक लाइक्स मिळाले आहेत. नेटिझन्सच्या दृष्टिकोनातून लाइक करणे ही सोपी बाब असली, तरी प्रत्येक पोस्टचे गांभीर्य लक्षात घेतले जावे, अशी टीका आता होत आहे. तापकीर यांच्या पोस्टला लाइक करण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधण्याचा किंवा त्यांना भेटण्याचा प्रयत्न त्यांच्या व्हर्च्युअल मित्रांनी केला असता तर ते वाचले असते, असा मेसेज आता व्हायरल होत आहे.

अतुल तापकीर यांनी मध्यरात्री १२.१५ वाजता ‘मी जीवनाला कंटाळलो असून, माझ्या पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासाला वैतागून आत्महत्या करीत आहे,’ अशी पोस्ट फेसबुकला अपलोड केली. क्षणार्धात त्यांच्या अनेक व्हर्च्युअल मित्रांनी या पोस्टला लाइक्स करायला सुरुवात केली. अनेकांनी पोस्टला नॉर्मली घेत रिअॅक्शनमध्ये स्माइली करत पोस्टची खिल्ली उडविली. हे तापकीर यांच्या लक्षात आल्यानंतर १२.२० वाजता ‘माझे मित्र पोस्ट न वाचता लाइक्स करीत आहेत. पोस्ट वाचा मग लाइक करा,’ अशीही पोस्ट टाकली. या सर्वांमध्ये सुमारे ५ ते ८ मिनिटांचा अवधी होता. या वेळेत पोस्ट लाइक्स करणाऱ्यांनी तापकीर यांच्याशी संपर्क साधत किंवा भेटायचा प्रयत्न करीत सांभाळायचा प्रयत्न केला असता, तर ते आज जिवंत असते, असे मत आता व्यक्त होत आहे. नेटिझन्सच्या या फुटकळपणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, न वाचता पोस्ट शेअर आणि लाइक्स करणे जिवावर कसे बेतते हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

--

घटनेचे गांभीर्य ओळखावे

सोशल मीडियावर येणारी कोणतीही पोस्ट क्षुल्लक आहे किंवा टाइमपास आहे असे वाटून घेण्यापेक्षा व्हर्च्युअल जगतातले गांभीर्य जाणवायला शिका, अशी टीका नेटिझन्सवर केली जात आहे. कोणतीही पोस्ट फक्त लाइक करणे आपले वास्तव आहे असे नव्हे, तर पोस्ट कोणत्या स्वरूपाची आहे आणि त्यावर नेमकी काय भूमिका घ्यायची, याचा योग्य विचार नेटिझन्सने करणे गरजेचे आहे.

--

एखादी व्यक्ती मरणाच्या दारात उभी राहून मी मरत आहे, असे म्हणताना त्या पोस्टला लाइक करणे शरमेची बाब आहे. यापेक्षा त्यांच्याशी संपर्क साधायला हवा होता. अथवा ती पोस्ट शेअर करत कृपया मदत करा, असे अावाहनही करता आले असते.

-आशिष चंद्रचूड

--

‘ती’ पोस्ट लाइक केल्याने अनेकांपर्यंत पोहोचत होती. असे असतानाही कोणीही त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला नाही. फेसबुक फ्रेंड्सनी समयसूचकता दाखवली असती, तर तापकीर आज जिवंत असते. न वाचता लाइक्स करूच नयेत.

-अमेय कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लसीकरणासाठी ‘त्यांचा’ खडतर प्रवास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबक तालुक्यातील वाळीपाडा हा विविध सुखसोयींपासून वंच‌ित असलेला पाडा. या पाड्यावर कोणतेही वाहन जाऊ शकत नाही. पायी जाणे हाच एकमेव मार्ग. दमणगंगा नदीला पाणी नसले तर दगड गोट्यांतून कशीबशी वाट काढून एखादे वाहन पोहोचते. अशा या पाड्यावरील नवजात शिशूंना आणि गर्भवती महिलांना वेळेवर लस‌ीकरण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ठाणापाडा आरोग्य केंद्रातील एक पथक दरमहा लस‌ीकरणासाठी पोहोचत आहे.

गुजरातच्या सिमारेषेवर आणि दमणगंगा नदीच्या कुशीत वसलेल्या वाळीपाडा येथे दर महिन्याला इंद्रधनुष्य योजनेतंर्गत बाळ लस‌ीकरण मोहीम राबविण्यात येते. वाळीपाडा येथील चिमुकल्यांना पोलिओ, बुस्टर आदी लस‌ देण्यासाठी ठाणापाडा येथील आरोग्य पथक प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला येथे पोहोचते. तापमान वाढण्याआधी हे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असल्यामुळे ठाणापाडाहून हे पथक पहाटे पाच वाजताच निघते.

वाळीपाडा येथे कोणतेही वाहन जाण्यास मार्ग नाही. येथे जाण्यासाठी दोन डोंगर उतरावे व चढावे लागतात, किंवा गुजरातमध्ये जावून कासदामार्गे दमण गंगेतून नदीपात्रातून दुसरा मार्ग आहे. मात्र नदीला पाणी असले तर हा रस्ता देखील बंद होतो. हे पथक कधी येणार यासाठी तेथील अंगणवाडी सेविका आधीच पाड्यावर आणि आजूबाजूच्या वस्तीला माहिती देतात. त्यानंतर ठरलेल्या दिवशी पथकाचे वाहन दिसताच या पथकाभोवती गर्भवती मातांसह चिमुकल्यांची गर्दी होते.

ठाणापाडा येथील आरोग्य पथकात मेडिकल ऑफिसर प्रशांत जोशी, बिलकीस शेख, सिस्टर निकुंभ, आरोग्यसेवक गणेश आडसूळ, दीपक भोईर, अबीनाथ पवार यांचा समावेश आहे. सरकारी यंत्रणा आणि तेथे मिळणारे उपचार याबाबत नेहमीच नाराजी व्यक्त होत असली, तरी वाळीपाडा सारख्या अतिदुर्गम भागात पोहोचून प्रसंगी पायी जावून हे पथक नित्याने सेवा देत आहे. दुर्गम भागातील पाड्यावरील मुलांना सुदृढ आरोग्य लाभावे यासाठी या पथकाने एक आदर्शच डोळ्यासमोर ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचा जुलैमध्ये सरकारविरोधात मोर्चा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

राज्यात सत्तेत राहून सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने आता सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. इशारे आणि आव्हाने देऊनही राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देत नसल्याचं लक्षात आल्यानंतर शिवसेनेने फडणवीस सरकारविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशना दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं आज शिवसेनेने जाहीर केलं.

नाशिकमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. सरकारने कर्जमुक्ती द्यावी म्हणून जुलै महिन्यात विधीमंडळावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे राऊत म्हणाले. शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत आहेत, असा आरोप करतानाच शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवा. त्यावर राजकारण करू नका, असा इशाराही राऊत यांनी दिला. तसेच शिवसेना सध्या देण्याच्या भूमिकेत नाही. केवळ सरकार स्थिर रहावं म्हणूनच सरकारला पाठींबा देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.


१९ तारखेला शिवसेनेचे अधिवेशन

१९ तारखेला नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाला शेतकऱ्यांचे नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित राहणार असल्याची महितीही त्यांनी दिली. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर व्यापक चर्चा होणार असल्याचं ते म्हणाले. शिवसेनेच्या आजच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आमदार अजय चौधरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नारायणबापू चौकात हॉटेलवर दगडफेक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड-सायखेडा रोडवरील नारायणबापूनगर चौकात जाळपोळ व तोडफोडीचे सत्रच सुरू आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास एका हॉटेलची तोडफोड करुन संशयितांनी दगडफेकही केली. विशेष म्हणजे या चौकातच पोलिस चौकी आहे. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

नारायणबापू सोसायटीच्या स्टोअर रुमची गेल्याच आठवड्यात तडीपार गुंडाने जाळपोळ केली होती. त्यानंतर त्याने दोन दिवसात सोसायटीच्या कार्यालयाची जाळपोळ केली होती. त्याला अटक केल्यानंतर आता या चौकातच हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे. या चौकात राजेंद्र कानवडे यांचे श्री स्वामी समर्थ नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी रोज गर्दी असते. हॉटेलचे माल ठेवण्याचे शोकेस बाहेर होते. काल रात्री साडेबाराच्या सुमारास कोणी नसताना हल्लेखोरांनी या शोकेसच्या काचा फोडून दुकानावरही दगडफेक केली. नंतर ते पळून गेले. सकाळी कानवडे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बोडके तपास करीत आहेत.

पोलिस चौकी बंदच

हॉटेलसमोर पोलिस चौकी आहे. परिसरातील नागरिकांना उपनगर पोलिस ठाणे लांब पडते म्हणून ही चौकी तयार करण्यात आली. ती बहुतांश वेळा बंद असते असे नागरिकांचे म्हणणे आहे. हल्ला झाला तेव्हा पोलिस चौकीत नव्हते. नारायणबापू चौक संवेदनशील बनला आहे. त्यामुळे येथे पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिस्तप्रिय शिक्षिकेची फेसबुकवरून बदनामी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाळेत वर्गशिक्षिका रागावत असल्याच्या रागातून एका विद्यार्थ्याने संबंधित शिक्षिकेचे फेक फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे शिक्षिकेची बदनामी केली. या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षिकेसह पोलिस चक्रावले आहेत. संबंधित विद्यार्थ्यावर माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पाल्यांकडून मोबाइल आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर तर होत नाही ना याकडे लक्ष ठेवा, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.

या प्रकरणी एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षिकेने सायबर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ही शिक्षिका २०१४-१५ मध्ये इयत्ता आठवी ‘ब’ची वर्गशिक्षिका म्हणून काम बघत होत्या. त्यावेळी त्यांच्या वर्गात एकूण ५३ मुले होती. शिस्तप्रिय शिक्षिका असा त्यांचा दबदबा होता. उनाडक्या करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या रागावत असत. २५ मार्च २०१७ रोजी या शिक्षिकेने फेसबुक अकाउंट ओपन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच नावाने आणि त्यांचा फोटो असलेले एक फेसबुक अकाउंट दिसले. हे अकाऊंट त्यांनी तपासले असता त्याच्याशी ७६ जण जोडले गेल्याचे आणि त्यांच्याशी वेळोवेळी चॅटींग केल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादी यांनी स्वत: उघडलेल्या फेसबुक अकाउंटवर ९९६ मित्र आहेत. त्यातील ७६ मित्र हे दोन्ही अकाऊंटला सारखेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांची बदनामी केल्याचेही पहावयास मिळाले. याबाबत त्यांनी सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपक देसले यांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे.

लहान मुलांना मोबाइल देताना तो कसा वापरावा, याचे शिक्षण पालकांनी पाल्यांना देणे आवश्यक आहे. फेसबुक व इतर सोशल मीडियाविषयी काही तक्रारी असतील तर नागरिकांनी सायबर पोलिस स्टेशनच्या (०२५३) २३०५२२६, २५९३३०१ या क्रमांकावर किंवा ९७६२१००१०० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा.

- डॉ. रवींद्र सिंगल, पोलिस आयुक्त

विद्यार्थ्याविरूद्ध गुन्हा दाखल

फेसबुक कंपनीशी पत्रव्यवहार करून फिर्यादी यांच्या नावाने बनावट प्रोफाईल कोणी तयार केले याबाबतची माहिती मागण्यात आली. फेसबुककडून बनावट प्रोफाईल बनविणाऱ्या ठिकाणाचे आयपी अॅड्रेस मिळाले. हे आयपी अॅड्रेस रिलायन्स जिओ कंपनीचे असल्याने पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषण विभागाने त्यांच्याकडून या आयपी अॅड्रेसचे सर्व तपशील मागविले. त्यावेळी एका मोबाइल क्रमांकाची माहिती पुढे आली. हा मोबाइल क्रमांक याच शिक्षिकेचा विद्यार्थी वापरत असल्याचे स्पष्ट झाले. स्वत:च्या शिक्षिकेची समाजात बदनामी केली म्हणून या विद्यार्थ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मटा भूमिका

सोशल मीडियाचा प्रभाव विद्यमान पिढीला कुठे घेऊन चाललाय याचे भयावह व तेवढेच चिंताजनक उदाहरण म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेच्या बदनामीसाठी फेसबुकचा केलेला वापर या घटनेकडे पहावे लागेल. शाळकरी मुलांच्या हातात मोबाइल आले तेव्हाच समाजधुरीणांनी चिंता व्यक्त करीत धोक्याचा इशारा दिला होता. त्यांचे द्रष्टेपण वेळोवेळी स्पष्ट होत असतानाच आठवीच्या विद्यार्थ्याचा हा प्रताप गंभीर तर आहेच; शिवाय पालकांच्या बेफिकिराचाही द्योतक आहे. आपल्या पाल्यांच्या हातात मोबाइल सोपवून स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहणाऱ्या पालकांच्या पिढीचीच खरे तर झाडाझडती घेण्याची आता वेळ आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅशन विकमध्ये ‘डीआयडीटी’चे यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

गोव्यातील पणजी येथे सिझन टू समर कलेक्शन या इंटरनॅशनल फॅशनमध्ये नाशिकच्या धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अॅड टेक्नोलॉजीच्या (डीआयडीटी) फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल बागुल यांनी दिली.

पणजी येथे फॅशन विकचे आयोजन करण्यात आले होते. यात विल्यम झेविअर, गौरव हंस, फॅशन डिझायनर शशी तिवारी, करिष्मा मेहता, प्रियांका खन्ना- गोयल आदींनी सहभाग नोंदविला. यात ‘डीआयडीटी’च्या फॅशन डिझायनिंगच्या रुचिता शर्मा, अदिती थोरात, शुभांगी शेळके, चांदनी जैस्वाल, केशव कणसे, रोहन महाजन या विद्यार्थ्यांनी फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. यात अदिती थोरात हिची ‘मिस फॅशन रश राउंड’ मध्ये प्रथम क्रमांकाने निवड झाली. संस्थेच्या प्रा. मृण्मय दत्ता, प्रा. उषा जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थापिका सरोज धुमणे, कार्यकारी संचालिका मनीषा बागुल, ‘डीआयडीटी’चे प्राचार्य अनिल बागुल यांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images