Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

मनमाडमध्ये राबवा रेनवॉटर हार्वेस्टिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाणीटंचाईची समस्या मनमाडकरांना वर्षानुवर्षे भेडसावत आहे. त्यामुळे या समस्येपासून मुक्ती मिळविण्यासाठी शहरवासीयांनी एकत्र येऊन रेनवॉटर हार्वेस्टिंग उपक्रम राबवावा. असे केल्याने शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर होईल, असे प्रतिपादन क्लायमेट रिअॅलिटी प्रोजेक्ट इंडियाचे प्रणेते कर्नल शशिकांत दळवी यांनी केले.

मनमाड नगरपरिषद तसेच संस्कार खेळवाडी संस्कार प्रज्ञा जयोस्तुते प्रतिष्ठान संकल्प संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भगीरथ प्रयास २०१७’ या चर्चासत्रात उपक्रमात ते बोलत होते. नगराध्यक्ष पद्मावती धात्रक चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. या चर्चासत्रात

कर्नल दळवी यांच्यासह, स्वामी कंठानंद, निखील झंवर आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मनमाड पालिका, तेल कंपन्या, औद्योगिक प्रतिष्ठान, शासकीय कार्यालय आदींनी रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन प्रमुख वक्त्यांनी या चर्चासत्रात केले. सराफ असो.चे सुरेश लोढा, अरुण सोनवणे, मनमाड अर्बन बँकेचे संजय वडनेरे, हॉटेल व्यावसायिक राजू रॉय, संकल्प संस्थेचे तुषार गोयल आदींनी मार्गदर्शन केले. किशोर कुडाळ, अमोल देव, मनोज नलावडे यांनी संकल्पना, उद्देश समजावून सांगत या उपक्रमाची गरज स्पष्ट केली. मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, नगरसेवक गणेश धात्रक, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, महेंद्र शिरसाठ, विलास कटारे आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.

संस्कार खेळवाडी, संस्कारप्रज्ञा संस्था, श्री संकल्प बहुऊद्देशीय सेवाभावी संस्था यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता डाळिंबाचीही अमेरिकावारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

कोकणचा राजा हापूस आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया व इतर देशात निर्यात केल्यानंतर लासलगावच्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधून डाळिंबाचीही यशस्वी निर्यात सुरू झाली आहे. येथून अमेरिकेला प्रथमच चार मेट्रिक टन डाळिंब निर्यात करण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात द्राक्षांसोबतच डाळिंब बागांची संख्या गेल्या काही दिवासांत वाढली आहे. नाशिकसोबतच सोलापूर, अहमदनगर, सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. बुलढाणा, जालना, बीड, औरंगाबाद, जळगाव या जिल्ह्यांतही डाळिंबाची लागवड वाढत आहे. लासलगाव येथील भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटरमध्ये प्रथमच डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करून चार हजार किलो डाळिंब अमेरिकेला निर्यात करण्यात आले आहेत.

आंब्यांची ऑस्ट्रेलियाला निर्यात

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणाऱ्या आंब्यांची युरोप, अमेरिका नंतर आता ऑस्ट्रेलियालासुद्धा निर्यात सुरू झाली आहे. देशातील पहिली आंब्यांची कन्‍सायमेंट लासलगाव येथून प्रक्रिया होऊन ऑस्ट्रेलियासाठी रवाना करण्यात आली आहे. यामधून १२२४ किलो केशर आंबे भाभा अणू संशोधन केंद्राच्या लासलगाव येथील रिसर्च सेंटरमधून प्रक्रिया होऊन मुंबईमार्गे ऑस्ट्रेलियासाठी रवाना करण्यात आला. ४०८ बॉक्सेसमध्ये हे केशर आंबे असून, एका बॉक्समध्ये तीन किलो आंबे आहेत. जूनअखेरपर्यंत १०० टन आंबा हा निर्यात होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी लासलगाव येथे आंब्यांवर विकिरण होत होते. मात्र यावर्षी डाळिंबावरही विकिरण प्रक्रिया करून पहिल्याच वेळी चार मेट्रिक टन डाळिंब अमेरिकेला पाठविण्यात आले आहेत.

- प्रणव पारेख, प्लांट इंचार्ज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हताश शेतकऱ्यांनी गुरांपुढे टाकला कांदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनटंचाईच्या झळा सहा महिने उलटूनही बसत आहेत. बागलाण तालुक्यातील ताहाराबादसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे कांद्याने भरलेल्या खळ्यात शेळ्या-मेंढ्या सोडल्या. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांदा जनावरांपुढे टाकताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर डाळिंब बागांवर कुऱ्हाड चालविण्यायह कांदा, टोमॅटो रस्त्यावर टाकण्याची वेळ ओढावली आहे. गेल्या दोन तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाला तोंड देत कसाबसा पिकविलेला कांदा तरी खिशात दोन पैशांचे दान टाकेल, अशी अपेक्षाही आता फोल ठरत आहे. दरवर्षी कुठल्यातरी संकटात अडकून कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होत आहे.

गेल्या वर्षी शासनाच्या नियमानुसार घेईल त्याची आडत पद्धतीवरून निर्माण झालेल्या वादात कांदा फसला. शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी करायला नकार दिला. त्यामुळे दीड ते दोन महिने कांदा बाजार ठप्प झाला आणि चाळीत ठेवलेला कांदा खराब व्हायला सुरुवात झाली. त्यातच लाल कांदाही बाजारात दाखल झाल्याने कांद्याचे दर आणखीन घसरले. त्यात गोणी पद्धतीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या क्विंटलमागे वाढ व्हायला सुरूवात झाली.

कांदा बदलत्या हवामानानुसार खराब व्हायला सुरूवात झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा जनावरांपुढे म्हणून टाकायला सुरुवात केली आहे. ताहाराबाद परिसरात अनेक खळ्यांमध्ये गुरांपुढे हा कांदा टाकला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐतिहासिक हतगड

$
0
0

ऐतिहासिक हतगड
- रमेश पडवळ



नाशिकच्या अंगणात असंख्य किल्ले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त म्हणजे ६२ हून अधिक गडकिल्ले नाशिकला लाभले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी पुरेशे प्रयत्न व्हायला हवेत. मात्र यासाठी आपल्या किल्ल्यांबाबत तसेच त्याच्या इतिहासाबाबत बालमित्रांना माहिती करून घेणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटीदरम्यान जिंकलेला हतगड या किल्ल्यांमध्ये असाच सुंदर अन् ऐतिहासिक किल्ला आहे. नाशिकहून सापुताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताला आडवा पहुडलेला एक पाषाण आपल्याला आकर्षित करतो. हा पाषाण म्हणजेच हतगड. हतगडाचे मूळ नाव हतगरू म्हणजे हद्दीवरचा गड आणि हस्तगिरी असेही म्हटले जाते. हा गड महाराष्ट्र-गुजरात सीमेवर आहे. हतगडावरून सापुताऱ्याचा रम्य परिसर पाहण्यासारखा आहे. बागूल राजांचा कवी रूद राष्ट्रौढवंशम् महाकाव्यम या ग्रंथात बागूल राजे हस्तगिरी किल्ला ताब्यात घेतल्याचा उल्लेख मिळतो. बागलाणात बागूल राजांची कारर्किद १३०० ते १७०० अशी आहे. तर रूद्र कवीने १५९६ मध्ये राष्ट्रौढवंशम् हे महाकाव्य लिहिले. हतगडावरील शके १४६९ (सन १५४७) मध्ये कोरलेला शिलालेख बागूल राजाच्या ताब्यात हा किल्ला असल्याची साक्ष देतो. या शिलालेखात भैरवशहा या राजाच्या कामगिरीचा उल्लेख आहे. त्यापूर्वी हतगड निजामशाहीत होता. बागूल राजाकडून तो पुन्हा निजामशाहीत गेला. दिल्ली बादशहाच्या कागदपत्रात किल्ल्याचा उल्लेख होलगड असाही केल्याचे दिसतो. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरे-देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढवय्यांपैकी एक. दख्खनच्या मोहिमेसाठी शके १५८५ (सन १६६३) मध्ये सुरगणा परिसरात पाठविले होते. यावेळी हतगड किल्ला आदिलशाहाचा सुभेदार शुराबखान हा किल्लेदार होता. गोगाजीराव मोरे यांनी मोठ्या पराक्रमाने हा किल्ला शके १५८६ (सन १६६३) मध्ये ताब्यात घेतला. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या लुटीपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला होता. गंगाजी ऊर्फ गोगाजी मोरेंचा पराक्रम लक्षात घेऊन छत्रपतींनी त्यांना हतगड परिसरातील बारा गावांची देशमुखी दिली होती. दिल्लीच्या अकबर बादशहाच्या सांगण्यावरून सय्यद अब्दुल्ल यांचा मुलगा हसन अली याने किल्ला ताब्यात घेण्यासाठी स्वारी केली. त्यावेळी किल्लेदार गंगाजी मोरे या किल्लेदाराने निकराचा लढा दिला. मात्र मोरेंचा पराजय झाला. तेव्हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला. हसन अलीने किल्ला जिंकला हे सांगण्यासाठी दिल्ली बादशहाला ९ ऑगस्ट १६८८ रोजी हतगडची सोन्याची प्रतिकृत चिन्ह सादर केली होती. यावेळी बादशहाने हसनअलीला ‘खान’ ही पदवी बहाल केली. हतगडच्या पायथ्याशी गंगाजी मोरे या किल्लेदाराची समाधीही आहे. हतगडचे चढन अगदी सोपे असून, वरपर्यंत गाडी जाते. हतगडचे प्रवेशद्वार, शिलालेख व गडावरील इमारतींचे अवशेष तसेच धान्य कोठारे व पाण्याचे टाके पाहण्यासारखे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्रीडाभीष्म’ हरपला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, कविता राऊत आदी खेळाडूंच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे ज्येष्ठ क्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम (वय ७९) यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्राणोत्क्रमण झाले. महात्मानगर येथे व्याख्यान देत असतानाच ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, मुले नरेंद्र व अजित असा परिवार आहे. पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदांवर काम केल्यानंतर त्यांनी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी, १३ मे रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

क्रीडा क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे. क्रीडा मानसोपचार या विषयात त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. मानसिक तणावाखाली आलेल्या खेळाडूंना उभारी घेण्याचे बळ बाम यांच्या मार्गदर्शनातून मिळते, असा त्यांचा लौकिक होता. इंडियन ऑलिम्पिक टीमचे ते मार्गदर्शकही होते. त्र्यंबकेश्वर येथील योगविद्या गुरुकुलमधील साधकांना ते वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, नेमबाज अभिनव बिंद्रा, सुमा शिरूर, अंजली भागवत, गगन नारंग, गीत सेठी, कविता राऊत यांच्यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण दिले होते. क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानामुळे राज्य सरकारने त्यांना २०११-१२ मध्ये ते शिवछत्रपती पुरस्कार, तर २०१४ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने गौरविले होते. पोलिस महासंचालकपदी असताना त्यांना राष्ट्रपतिपदकानेही गौरविण्यात आले होते.

उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी प्रथम श्रेणीतून बीएची पदवी मिळवली होती. अॅप्लाइड मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक हा त्यांचा विषय होता. १९६३ मध्ये डेप्युटी सुपरिटेंन्डेंट ऑफ पोलिस या पदावर ते राज्याच्या पोलिस दलात दाखल झाले. १८ वर्षे त्यांनी प्रत्यक्ष पोलिस दलात काम केले. त्यानंतर गृहमंत्रालयात त्यांची डेप्युटेशनवर बदली झाली.

बाम यांची ग्रंथसंपदा

पोलिस दलातर्फे प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्षे संपादक होते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरच्या वृत्तपत्रांत ते सातत्याने लिखाण करीत होते. त्यांनी क्रीडा मानसोपचार या विषयावर अनेक पुस्तके लिहिली. ‘मना सज्जना’ आणि ‘मार्ग यशाचा’, ‘विजयाचे मानसशास्त्र’ ही त्यांची सर्वांत जास्त लोकप्रिय ठरलेली पुस्तके होय. त्यांचे ‘विनिंग हॅबिट’ हे पुस्तक हिंदी मराठी, तामिळ, पंजाबी भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. सध्या ते नॅशनल रायफल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हॅप्पी स्ट्रीट्स’चा उद्या नाशिकरोडला धमाका!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांच्या चर्चेत असलेला ‘हॅप्पी स्ट्रीट्स’ उपक्रम यंदा पुन्हा नाशिकरोडकरांना अनुभवायला मिळणार आहे. रॉक बॅण्ड, गिटार, पोलिस बॅण्‍डसह विविध खेळ, पेंटिंग अशा धम्माल मौजमस्तीची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.

बिटको चौक ते कोठारी कन्या शाळा या मार्गावर १४ मे रोजी सकाळी ७ ते ९.३० या वेळेत ‘हॅप्पी स्ट्रीट सीझन ३’ ला सुरुवात होईल. सुरुवातीला झुंबा आणि विविध प्रकार सादर होतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. केवळ धमाल करायची आहे. ही धमाल करण्यासाठी कुठलीही वयोमर्यादा नाही. आजी-आजोबांनी आपल्या सुना-मुलं आणि नातवांसह हजेरी लावली तरी चालणार आहे. आपल्या प्रतिभेला चालना देण्यासाठी हा उपक्रम निश्चित महत्वाचा ठरणार आहे.

जेलरोडला होणाऱ्या हॅप्पी स्ट्रीट्समध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे, नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटिंग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहेत. यावेळी उपस्थितांना हे प्रकार करून घेता येतील. यावेळी नाशिकरोडकरांसाठी खास रॉक बॅण्‍ड शोचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल गीतांचे प्रकार सादर केले जाणार आहेत. कॅलिग्राफी सादर करण्यासाठी प्रख्यात सुलेखनकार चिंतामण पगार व नीलेश गायधनी हे नागरिकांना यातील बारकावे समजावून सांगणार आहेत. त्याचप्रमाणे ते कसे करायचे व त्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करायचा, याची माह‌िती देणार आहेत. मोहन उपासनी व रवींद्र जोशी हे बासरी वादन करणार आहेत. प्रतीक हिंगम‌िरे आणि अर्चना पेखळे हे झुम्बाचे प्रात्यक्षिक दाखवून नागरिकांकडून करुन घेणार आहेत. मंदार यांचे फोटो एक्झिब‌िशन होणार असून, अनिकेत जाधव रॉक बॅण्‍ड शो सादर करणार आहे. हर्षल शिंदे हे ग्राफोलॉजिस्ट हा प्रकार नाशिककरांना दाखवणार आहे. नरेंद्र पुली आणि त्यांचा शिष्यगण यावेळीही गिटार वादन करणार असून यावेळी जुन्या आणि नव्या गाण्यांच्या संगीताचा नजराणा पेश करणार आहेत. सौरभ हे टॅटू आर्टिस्ट उपस्थितांना टेम्पररी टॅटू काढून देणार आहेत. त्याचप्रमाणे विविध शाळांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी स्ट्रीट पेंटिंग करणार आहेत. तसेच विविध ग्रुपद्वारे ग्रुप डान्स सादर करण्यात येणार असून, यावेळी वेस्टर्न व बॉलीवूड डान्समधील नवीन प्रकार हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत. प्रेमदा दांडेकर या उपस्थितांना रांगोळीचे विविध प्रकार दाखवणार आहेत. विजयराज हे जादूचे प्रयोग, हरीश- कॅरीकेचर, उमेश मार्शल आर्टस, दंडे ज्वेल्सचे संचालक मिं‌लिंद दंडे यांच्यातर्फे महिलांचे ढोल पथक आपली कला पेश करणार आहे. ‘मटा’च्या उपक्रमाला नाशिककर वाचकांनी नेहमीच भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावेळीदेखील असाच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मटातर्फे करण्यात आले आहे.


कलाकारांनी येथे संपर्क साधावा

या उपक्रमात ज्यांना आपली कला सादर करायची इच्छा आहे, अशा कलावंतांनी कमलेश घरटे, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर, डीसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे ०२५३- ६६३७९८७ या क्रमांकावर किंवा ७०४०७६२२५४ या मोबाइलवर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधावा. योग्य कलाकृती असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध समित्यांवर फुलणार ‘कमळ’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या शहर सुधार, विधी व आरोग्य या तीन समित्यांवरील सदस्यांची निवड गुरुवारी (दि. १८) होणाऱ्या महासभेच्या बैठकीत केली जाणार आहे. भाजपला अतिरिक्त तीन सभापती व तीन उपसभापती अशा सहा जणांना या समित्यांवर संधी देता येणार आहे. त्यामुळे भाजपचे महापालिकेवरील वर्चस्व अधिक वाढणार आहे. प्रत्येक समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने २७ सदस्यांना या समित्यांवर जाण्याची संधी मिळणार आहे.

शहरात प्रभाग समित्या अस्तित्वात असतानाही सत्ताधारी भाजपने अधिकाधिक सत्तेची पदे निर्माण करण्यासाठी अट्टाहास सुरू ठेवला आहे. गेल्या महासभेत शहरात नव्याने शहर सुधार, विधी व आरोग्य अशा तीन समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालकल्याण, शिक्षण समितीच्या धर्तीवर या तीन समित्या राहणार आहेत. शहर सुधार समितीमुळे शहर विकासाला चालना मिळणार आहे, तर विधी समितीमुळे महापालिकेचा फायदा होणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. या समित्यांची सदस्यसंख्या नऊ राहणार आहे. भाजपचे महापालिकेत बहुमत असल्याने या समित्यांवरही भाजपचाच वरचष्मा राहणार आहे. या समितीवर सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या महासभेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक समितीवर नऊ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहेत. त्यात संख्याबळानुसार भाजपचे ५, शिवसेनेचे ३ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा एक सदस्य जाणार आहे. भाजपला तीन सभापती व तीन उपसभापतिपदे मिळणार आहेत. त्यामुळे भाजपमधील १८ सदस्यांना या समितीवर जाण्याची संधी मिळणार आहे.

--

भाजपचे प्राबल्य वाढणार

महापालिकेत असलेल्या प्रभागसह विविध समित्यावंर भाजपचे प्राबल्य निर्माण होणार आहे. शहरातील सहापैकी तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे सभापती होणार आहेत. त्या पाठोपाठ महिला व बालकल्याण समितीवरही भाजपचेच सभापती व उपसभापती असणार आहेत. शिक्षण समितीतही भाजपचेच वर्चस्व राहणार आहे. त्या पाठोपाठ आता नव्याने निर्माण होणाऱ्या तीन समित्यांवरही भाजपचेच सभापती राहणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिकेतील समित्यांवर भाजपचा झेंडा राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसाठा २१ टक्क्यांवर

$
0
0

जिल्ह्यातील २४ पैकी १२ धरणांनी गाठला तळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा आता २१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. नाशिक शहरासह आसपासच्या बहुतांश परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही आजमितीस ४१ टक्के पाणी शिल्लक असून, निम्म्या धरणांनी तळ गाठला आहे.

अंगाची काहिली करणाऱ्या मे महिन्यातील उन्हाने नागरिकांना नको नको करून सोडले आहे. तप्त उन्हाच्या झळांमुळे पाण्याची गरजही वाढू लागली आहे. शहरवासीयांसह जिल्हावासीयांची पाण्याची गरज भागविण्याचे काम २४ धरणे करतात. परंतु, या धरणांमधील सात महिन्यांपूर्वी ९० टक्क्यांच्यावर असलेला पाणीसाठा आता अवघ्या २१ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच तो सुमारे ७० टक्क्यांनी खाली गेला आहे. जिल्ह्यात गंगापूर, पालखेड आणि गिरणा धरण समूहांपैकी पालखेड धरण समूहातील पाणीसाठा १५ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. या समूहात सर्वाधिक १३ धरणे असून, उपयुक्त पाणीसाठा दोन हजार ७७४ दशलक्ष घनफूट आहे. गंगापूर धरण समूहात चार धरणे असून, त्यापैकी गौतमी गोदावरी आणि आळंदी या दोन धरणांनी तळ गाठला आहे. गंगापूर आणि कश्यपीत मुबलक पाणी असून, तीन हजार ५७१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण २३ धरणांमध्ये १३ हजार ६५५ दलघफू म्हणजेच २१ टक्के पाणी शिल्लक आहे.

गतवर्षीपेक्षा तिप्पट पाणी

गतवर्षी मे महिन्याच्या पंधरवड्यात जिल्ह्यातील धरणांमध्ये अवघा सात टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. २४ धरणांमध्ये एकूण चार हजार ७६१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. गंगापूर धरणात २५ तर धरण समूहात अवघा १७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गौतमी गोदावरी, मुकणे, नांदूरमध्यमेश्वर, भोजापूर, नागासाक्या आणि गिरणा ही धरणे कोरडीठाक पडली होती. यंदा मात्र तुलनेने समाधानकारक स्थिती असून, पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीटंचाई भासणार नाही, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जाऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अटींमुळे झाली अडचण

$
0
0

प्रभागात होणार दोन अशासकीय सदस्यांची निवड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्यांवर प्रत्येकी दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या असून, त्यामुळे १२ जणांना संधी मिळणार आहे. या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करतांना संबंधित व्यक्ती राजकारणाशी संबंधित नसावा तसेच तो शासकीय सेवेत नसावा, अशा दोन महत्त्वपूर्ण अटी आहेत. त्यामुळे प्रभाग समितीवर वर्णी लावण्यासाठी फिल्डिंग लावणाऱ्या राजकारण्यांच्या महत्त्वाकांक्षेला आता ब्रेक लागला आहे. या नियमातून सुटका करून घेण्यासाठी प्रसंगी पक्षाचे राजीनामे देण्याची तयारी काही इच्छुकांनी सुरू केली आहे.

महापालिकेत भाजपने सत्तेवर येताच शहर विकासाला चालना देण्याऐवजी पक्षाच्या नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना अधिकाधिक सत्तेची पदे देण्यावर भर दिला आहे. तीन विषय समित्यांपाठोपाठ आता प्रभाग समित्यांवर नगरसेवकांव्यतिरिक्त बाहेरील दोन सदस्यांना नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू केला आहेत. अद्यापपर्यंत महापालिकेत असे प्रयोग झाले नाही. परंतु, भाजपने आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी अशासकीय सदस्यांचा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. मुंबई सार्वजनिक अभिन्यास १९५० अन्वये ज्या व्यक्तीची सदस्य म्हणून नियुक्ती करायची आहे, त्या व्यक्तीची संस्था नोंदणीकृत असावी, त्या संस्थेचे तीन वर्षे लेखापरीक्षण झालेले असावे, लेखा परीक्षण विवरण पत्र कामांचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला असावा, नगरपालिकांशी संबंधित एक प्रकल्प त्या इच्छुक सदस्याने तीन वर्षांत पूर्ण केलेला असावा, ती व्यक्ती महापालिकेच्या सेवेत नसावी व राजकीय पक्षाचा पदाधिकारी नसावा या प्रमुख अटी आहेत. त्यामुळे अनेकांच्या इच्छांना ब्रेक लागला आहे. या अटींची पूर्तता केलेल्या संस्था व त्याचे पदाधिकारी शोधणे सध्या तरी अशक्य दिसत आहे. राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती नसावी ही अट असली तरी पक्षाच्या पदाधिकारी पदाचा राजीनामा देऊन प्रभाग समितीवर सदस्य म्हणून नियुक्त होता येणे शक्‍य असल्याने त्यादृष्टीने पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची कसरत सध्या सुरू आहे. तसेच, काही ठेकेदारांना या ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपमध्ये आतापासूनच लॉबिंग सुरू झाले आहे.

संख्याबळानुसार निवड

महापालिकेच्या सहा प्रभाग समित्या आहेत. प्रत्येक समितीवर नगरसेवकांव्यतिरिक्त दोन अशा १२ अशासकीय सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यांना समित्यांमध्ये मतदानाचा अधिकार राहणार नाही. प्रभागामधील बलानुसार या सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे तीन समित्यांमध्ये भाजपचे सहा सदस्य जवळपास निश्चित आहेत. सिडकोत शिवसेनेचे सदस्य निवडले जातील. ज्या व्यक्तीला सदस्य म्हणून नियुक्त व्हायचे आहे, त्या व्यक्तीचा अर्ज त्याच्या नोंदणीकृत संस्थेमार्फत विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करावा लागणार आहे. विभागीय अधिकाऱ्यांकडून छाननी झाल्यानंतर विभागीय समितीच्या बैठकीत नगरसेवकांसमोर प्रस्ताव ठेवला जाईल. त्यात सदस्याची नियुक्ती जाहीर केली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककरांची संपेना चलन प्रतीक्षा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये पुन्हा नोटांची टंचाई जाणवत असून, आजमितीस स्टेट बँक ऑफ इंडियाकडे केवळ ४० कोटींचे चलन शिल्लक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अन्य बँकांमध्येही नोटांचा खडखडाट असून, मंगळवारपर्यंत जिल्ह्याला ८० कोटींचे चलन प्राप्त होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर नाशिककरांनी चलनटंचाई अनुभवली. ही परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आल्यानंतर आता पुन्हा चलनटंचाईच्या झळा नाशिककरांना बसू लागल्या आहेत. शहरातील बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये नोटांचा खडखडाट असून, पैसे मिळतील अशा एटीएमची शोधाशोध नागरिकांना करावी लागत आहे. एक ना अनेक बँकांचे एटीएम सेंटर्स धुंडाळूनही पैसे ‌मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तातडीने पैशांची आवश्यकता असलेले नागरिक बँकांमध्ये धाव घेऊ लागले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहर शाखांकडे १० कोटी, तर ग्रामीणमधील शाखांकडे ३० कोटींचे चलन आहे. बँकेचे शहरात १३६, तर ग्रामीण भागात १०० एटीएम सेंटर्स आहेत. यापैकी बहुतांश एटीएम सेंटर्समध्ये नोटांचा खडखडाट आहे. अन्य बँकांकडेही फारसे चलन नसण्याची शक्यताच अधिक आहे.

लवकरच होणार चलनप्राप्ती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मंगळवार (दि. १६ मे) पर्यंत ८० ते ९० कोटींचे चलन प्राप्त होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत उपलब्ध चलनावरच समाधान मानावे लागणार असल्याने नागरिकांना चलनटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शनिवार आणि रविवारी बँकांनादेखील सुटी असल्याने नागरिकांची अधिक गैरसोय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळाली कॅम्पमधील ९७ टक्के करभरणा रोखीने!

$
0
0

प्रशांत धिवंदे, देवळाली कॅम्प

सरकार सर्वच सरकारी कार्यालयांचा कारभार डिजिटल व कॅशलेस करण्याचा प्रयत्न असतानाच देवळालीत मात्र केवळ २ ते ३ टक्के नागरिकच ऑनलाइन पद्धतीचा वापर करत असल्याची स्थिती दिसून येत आहे. देशातील सर्वांत मोठ्या क्षेत्रफळात विस्तारलेले एकमेव कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणून लौकिक असलेल्या या शहरात कॅशलेसकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. देवळालीत नागरिकांना अजूनही विविध प्रकारचा करभरणा करण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

५४ हजार लोकसंख्या असलेल्या देवळाली कॅन्टोन्मेंटचा करभरणा वर्षअखेरीस तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यापैकी केवळ दोन ते तीन टक्के करभरणा ऑनलाइन पद्धतीने होतो. मात्र, उर्वरित ९७ टक्के करभरणा थेट रोख स्वरूपाचा होत असल्याने नागरिकांना हा कर भरण्यासाठी दिवसभर रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशा वेळी आणखी एखादे काउंटर भरणा करण्याकरिता सुरू करावे किंवा डेबिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. प्रशासनातर्फे करभरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वतंत्र व्यवस्था करण्यासाठी पावले उचलली जात असताना कॅशलेस होण्याबाबत मात्र उदासीनता दिसून येत आहे. एखाद्या बँकेमार्फत जर करभरणा करता आला, तर अधिक सोयीचे होणार असल्याने तसा प्रयत्नही प्रशासन का करू पाहत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

वेबसाइटबाबत अनभिज्ञता

देवळालीतील नागरिकांना करभरणा करण्यासाठी www.cbdeolali.org.in या वेबसाइटवर सुविधा उपलब्ध आहे. मात्र, तरीही नागरिक ऑनलाइन सुविधेचा वापर केवळ २ ते ३ टक्के एवढाच करतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाइन करभरणा करण्याकरिता या वेबसाईटचा वापर वाढविण्याकामी प्रबोधनाची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, २४ मेपर्यंत मुदत असल्याने नागरिकांनी करभरणा करून बोर्डास सहकार्य करण्याचा आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

अनेक नागरिक व्यवसायानिमित्त दिवसभर घराबाहेर राहतात. अशा वेळी रक्कम काढून कोणाच्या हातात देऊन करभरणा करावा लागत आहे. बोर्डाने याबाबत सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

-डॉ. जगदीश कागदे, नागरिक

--

कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून लवकरच खासगी किंवा राष्ट्रीयीकृत बँकेच्या आधारे स्वॅप मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे.

-विलास पवार, सीईओ, बोर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनमंत्री रावल आज नाशकात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल शनिवारी नाशिक जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. तान, ऑल इंडिया वायनरी असोसिएशन तसेच हॉटेल असोसिएशनशी संबंधित समस्या ते समजून घेणार असून, जिल्हा परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत.

पर्यटनस्थळांची पाहणी करून विकासाला गती देण्यासाठी रावल शनिवारी (दि.१२ मे) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता ते सप्तशृंगी गडावरील फ्रॉनिक्युलर ट्रॉलीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या ट्रस्टींशी चर्चा करणार आहेत. दुपारी अडीच वाजता हॉटेल गेट वे येथे तान, नाशिक हॉटेल असोसिएशन, ऑल इंडिया वायनरी असोसिएशन तसेच इगतपुरी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. गंगा आरती सुरू करण्याबाबत ते पुरोहित संघाशी चर्चा करणार आहेत. दुपारी पावणेचारच्या सुमारास ते आंबा महोत्सवाला भेट देणार आहेत. त्यानंतर तपोवनात शुर्पनखा मंदिर, पंचवटीतील कपालेश्वर मंदिर, काळाराम मंदिर, रामकुंडाची पाहणी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मिसेस इंडिया’मध्ये मानसी उपविजेत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तर महाराष्ट्रच्या कन्या मानसी भावसार-अरबट्टी यांनी पुण्यात झालेल्या मिसेस इंडिया २०१७ स्पर्धेत द्वितीय क्रमांक व मिसेस टॅलेंटेड किताब पटकावला. प्रथम क्रमांक मुंबईतील मॉडेल अंजली राऊत यांनी पटकावला. शेवटच्या राउंडला २५ स्पर्धक पोहोचले होते. या प्रत्येक स्पर्धकांच्या वेगवेगळ्या फेऱ्या घेण्यात आल्या. त्यात मानसी यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

मिसेस इंडिया ही विवाहित महिलांसाठी अनोखी स्पर्धा असून, केवळ सौंदर्यापेक्षा व्यक्तिमत्त्व, गुणवत्ता आणि संस्कृती आदी निकष यात प्राधान्यक्रमाने येतात. मानसी यांचे शिक्षण नवरचना हायस्कूल व धुळे येथील जय हिंद विद्यालयात झाले आहे. मानसी यांनी संगणक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली असून, त्यांचा आयटी कन्सल्टिंगचा व्यवसाय आहे. नाशिक-धुळे येथील बांधकाम व्यावसायिक दिलीप भावसार व तेजस्विनी महिला मार्गदर्शन केंद्राच्या पदाधिकारी संगीता भावसार यांच्या त्या कन्या असून, मुंबई येथील स्पाइन सर्जन डॉ. निखिल अरबट्टी यांच्या त्या पत्नी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३७३ उमेदवार मनपासाठी रिंगणात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी माघारीची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एक जागेवर काँग्रेसच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे आता ८३ जागांसाठी ३७३ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पार पडली.

सकाळी ११ ते ३ यावेळेत सात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना त्या-त्या पक्षाचे चिन्ह मिळाले. अपक्ष उमेदवारांना त्यांनी नामनिर्देशन पत्रात मागितलेली चिन्हे देण्यात आली. एका प्रभागात एक चिन्ह दोन अपक्षांना मागितल्यास त्यासाठी चिठ्ठी टाकून निर्णय घेण्यात आला. चिन्ह वाटप झाल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे.

बॅटला मागणी, नारळ नकोसे!

चिन्ह वाटपसाठी आयोगाकडून देण्यात आलेल्या चिन्हांचा चार्ट लावण्यात आला होता. अपक्ष उमेदवारांनी आपल्या पसंतीचे चिन्ह अर्ज दाखल करतांना नमूद केले होते. त्यात अनेकांनी बॅट, शिट्टी, कपबशी या चिन्हांना पसंती दिली. नारळ या चिन्हाला अनेकांनी नापसंती दर्शवली होती.

काँग्रेसचे उमेदवार जास्त

माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले असून, कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाही. सर्वाधिक ७३ उमेदवार काँग्रेसने दिले असून, गेल्या निवडणुकीत भाजपचा एक ही उमेदवार नव्हता. यावेळी भाजपने ५६ उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादी ५२, एमआयएम 3५, शिवसेना २६, जनता दल १०, इतर ८, तसेच १०१ अपक्ष उमेदवार रिंगणात कायम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् जिल्हा बँक ताळ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

‘कई बार सीधी उंगलीसे घी निकलता नहीं, उसके लिए उंगली टेढी करनी पडती है...’ याचा प्रत्यय महावितरणला नुकताच आला. महावितरणने जिल्हा बँकेविरुद्ध पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करताच बँकेने महावितरणचे ३५ कोटी २५ लाख रुपये एकरकमी भरले आहेत. महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

वीजग्राहकांनी जिल्हा बँकेच्या शाखेत भरलेले वीजबिलाचे ३३ कोटी २२ लाख ३७ हजार ६५७ रुपये बँकेने महावितरणकडे जमा न केल्याने महावितरणने मुंबई नाका पोलिस ठाण्यात २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. ही रक्कम जिल्हा बँकेने महावितरणकडे न भरता स्वतःसाठी वापरली. त्यामध्ये नाशिक मंडळाचे १७ कोटी २२ लाख, तर मालेगाव मंडळाचे सुमारे १७ कोटी असे एकूण ३३ कोटी २२ लाख रुपये होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस हेलपाटे मारल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

जिल्हा बँक व महावितरण यांच्यात वीजबिल भरण्याबाबत २०१६ ते २०१९ या कालावधीसाठी करार झाला. दोन महिन्यांपासून ग्राहकांनी वीजबिलाचे पैसे बँकेत भरले मात्र, बँकेने ते महावितरणच्या बँक खात्यात भरलेच नाहीत. बँकेने पैसे स्वतःसाठी वापरले, बनावट कागदपत्रे करून पैसे भरल्याचे दाखवले, कराराचे उल्लंघन केले आदी बाबींचे पुरावे महावितरणने सादर केल्यानंतर बँकेचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वित्तीय व्यवस्थापकांविरुद्धा गुन्हा दाखल झाला.

--

अखेर पैसे मिळाले

कुमठेकर यांनी सांगितले, की हे पैसे ग्राहकांचे होते. आम्हाला कायदेशीर कारवाई करणे भाग पडले. गुन्हा दाखल होताच बँकेने ३५ कोटी २५ लाख रुपये महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड मुख्य कार्यालयात एकरकमी जमा केले. त्यावरील दोन महिन्यांचे व्याजाचे ८० लाख रुपये आता बाकी आहेत. बँकेने पैसे भरले असले, तरी न्यायालयीन प्रक्रिया सुरूच राहील. या बँकेकडे वीजबिल भरणा बंदच ठेवण्यात आला आहे. वीजबिल भरण्यासाठी नवीन केंद्रे उघडण्यात आली आहेत. त्यामध्ये वक्रांगी संस्थेच्या ३५८ आणि महावितरण ऑनलाइनच्या ३८८ केंद्रांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभ्यासक्रमात आधुनिकता आणणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुक्त विद्यापीठामार्फत ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षणक्रमावर भर देण्यात येणार असून, अभ्यासक्रमातील सुधारणांबरोबरच त्यात अत्याधुनिकपणा आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. लोकशाहीच्या प्रमुख स्तंभापैकी पत्रकारिता हा महत्वाचा स्तंभ आहे. समाजाच्या तळागाळातील प्रश्न मांडण्याबरोबरच समाजाच्या संवेदना जपण्याची गरज असून, वस्तूनिष्ठ पत्रकारिता करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांनी केले.
मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंज्ञापन विभागाच्या वार्षिक गुणगौरव आणि जनसंपर्क या अनियतकालिकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
शंकराचार्य कुर्तकोटी सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोल‌िस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, विद्यापीठाचे विभागीय संचालक प्रकाश देशमुख, एचपीटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
मुक्त विद्यापीठाचे यापूर्वी काही अभ्यासक्रम केवळ खर्च जास्त होतो म्हणून बंद करण्यात आले होते. त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन बंद पडलेले विविध अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात येतील. समाजातील प्रत्येक घटक शिकला पाह‌िजे, यासाठी नाशिकरोड कारागृहातही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र मोफत सुरू करण्यात येणार आहे, असे सांगून वायूनंदन यांनी आगामी काळात अभ्यासक्रमात यूजीसीच्या धर्तीवर बदल करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धोकादायक पूल होणार भक्कम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील जुन्या पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. आता त्यातील चार धोकादायक पुलांचे काम सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आॅनलाइन निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार साडेसात कोटींच्या खर्चाचे हे काम सहा महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे.

यासंदर्भातील निविदा प्रक्रिया १२ मेपासून सुरू झाली असून, २३ मे रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. धोकादायक पुलामुळे गेल्या वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच धडकी भरली होती. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पुलांचे दुसऱ्यांदा सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानुसार आता या चार पुलांच्या कामाच्या दुरुस्तीला वेग येणार आहे. शासनाच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे या पावसाळ्यात हे पूल दुरुस्त होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

--

हे पूल टाकणार कात

महाडच्या दुर्घटनेनंतर सर्वाधिक चर्चेत आलेल्या व धोकादायक ठरलेल्या सायखेडा येथील पुलाबाबत प्रचंड तक्रारी होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील जड वाहतूक बंद केली होती. आता हा गोदावरी नदीवरील पूल दुरुस्त केला जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी २३ लाख ३४ हजार ६९४ रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर डुबेरे-सोनारी-सोनांबे-पांढुर्ली-भगूर रस्त्यावर असणाऱ्या दारणा नदीवरील पुलाची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ४९ लाख ९८ हजार ७४७ खर्च केला जाणार आहे. या दोन पुलांबरोबरच घोटी-सिन्नर येथील पुलाचीदेखील दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी १ कोटी ३८ लाख १३ हजार २९२ रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर-देवगाव-घोटी रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या दुरुस्तीसाठी ५० लाख १८ हजार ८०० रुपये खर्च केले जाणार आहेत.

--

पावसाळ्यातही काम

तब्बल साडेसात कोटींच्या कामातून जिल्ह्यातील चार पुलांचे काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची अट या निविदेत नमूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सहा महिन्यांच्या कालावधीत पावसाचा कालावधी पकडण्यात आल्यामुळे हे काम कंत्राटदाराला वेगाने पूर्ण करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रतिमासंवर्धनासाठी घ्यावा पुढाकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जलद आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ प्रयत्नशील आहे. प्रशासनाची प्रतिमा चांगली राहील, अशी कामगिरी अधिकाऱ्यांनी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे यांनी शुक्रवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे महासंघाची बैठक झाली. बैठकीत महासंघाचे अध्यक्ष मनोहर पोकळे, सरचिटणीस समीर भाटकर, उपाध्यक्ष सुनील टावरे, बाळासाहेब घोरपडे, रामदास खेडकर, प्रदीप जायभाये, प्रमोद वानखेडकर, सरोज जगताप, उत्तमराव सोनकांबळे, ए. आर. पाटील, बाबासाहेब शिंदे, पंडितराव गवळी, सुनंदा जरांडे आदी उपस्थित होते.

कुलथे म्हणाले, की सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अधिकारी महासंघ प्रयत्नशील आहे. मात्र, त्याचबरोबर रिक्त पदे भरण्याबाबत महासंघाची आग्रही भूमिका आहे. जनतेने या कायद्याचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना महासंघाचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

राजपत्रित अधिकारी महासंघामार्फत उभारण्यात येणाऱ्या कल्याण केंद्र इमारतीबाबत ते म्हणाले, की महासंघ स्वमालकीची इमारत असलेली एकमात्र संघटना ठरणार आहे. जुलै महिन्यात इमारतीच्या कामास सुरुवात होणार आहे. इमारतीत ३०० चौरस फूट आकाराच्या ३५ वातानुकूलित सदनिका, मोठे सभागृह, दोन लहान सभागृहे, दोन मजल्यांवर मोठ्या डॉर्मिटरी, महिला व गरजू नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय, पार्किंग व्यवस्था राहणार आहे. एकूण ३० हजार चौरस फुटांचे बांधकाम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण केंद्रासाठी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यभावनेने निधी द्यावा, असे आवाहनही पोकळे यांनी केले.

--

मागण्यांप्रश्नी भूमिका

भाटकर यांनी सातव्या वेतन आयोगातील तरतुदींची माहिती दिली. बालसंगोपन रजा, पाच दिवसांचा आठवडा आदी महासंघाच्या मागण्यांविषयी त्यांनी भूमिका मांडली. यावेळी कल्याण केंद्र इमारतीसाठी नाशिक जिल्ह्यातर्फे तीन लाख ५१ हजारांचा निधी एकत्रित करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपार गुंडाचा धुमाकूळ

$
0
0

तक्रार केल्याने पुन्हा केली जाळपोळ; नारायणबापू सोसायटीमधील घटना

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील नारायणबापू सोसायटीचे स्टोअर रूम व कार्यालय पेटविणारा तडीपार गुंड रुपेश जाधव याच्याविरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी तक्रार केल्यानंतरही त्याने त्याच रात्री सोसायटीच्या कार्यालयात पेटते बोळे टाकून पेटवले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. रहिवाशांच्या संतापाचा उद्रेक होताच पोलिसांनी रुपेशला अटक केली.

नारायणबापू सोसायटीतच रुपेश जाधव हा तडीपार गुंड राहतो. त्याने सोसायटीचे कार्यालय काही दिवसांपूर्वी पेटवून दिले होते. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी त्याने स्टोअररूम पेटवून दिली होती. त्यामुळे विजेच्या वायरी जळून सोसायटी कार्यालयाचे कामकाज बंद पडले आहे. अध्यक्ष मिलिंद सोनवणे यांनी शुक्रवारी (ता.१२) सायंकाळी रुपेश विरुध्द उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर काही तासातच रुपेशने रात्री साडेबारा ते दोनच्या दरम्यान सोसायटी कार्यालयाच्या खिडकीची काच फोडून पेटते बोळे आत फेकले. त्यामुळे सोसायटीचा महत्त्वाचा दस्तावेज दुसऱ्यांदा खाक झाला. रात्री सोसायटीचे संचालक उपनगर पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी कैफियत मांडल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक साहेबराव पवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी येऊन पंचनामा केला. रुपेशला सकाळी अटक केली.

जाळपोळीचा सूत्रधार

नारायणबापू सोसायटी व परिसरात जाळपोळ करण्यामागे तडीपार गुंड रुपेश जाधवचाच हात आहे. २०११, २०१२, २०१६ आणि आता २०१७ अशा चार वर्षांत त्याने सोसायटी रहिवाशांची वाहने पेटवली होती. महिनाभरापूर्वी सोसायटी ऑफिसच्या काचा फोडून त्याने आत पेटते बोळे फेकले होते.

पंधराशे लोक वेठीस

नारायणबापू हौसिंग सोसायटीत २४ इमारती असून, त्यामध्ये ३५० प्लॅट आहेत. त्यामध्ये सुमारे दीड हजार रहिवाशी राहतात. सर्व जाती धर्माचे हे रहिवासी मध्यमवर्गीय आहेत. सोसायटीचे वीस संचालक कारभार पाहतात. रुपेशन चार वेळा जाळपोळ करून आपल्याच सोसायटीच्या लोकांना वेठीस धरले आहे. पोलिसांच्या मते तो मनोविकृत आहे.

तडीपार असूनही वावर

रुपेशने रहिवाशांची रिक्षा आणि दुचाकी पेटवल्यानंतर उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याला शिर्डी येथे तडीपार करण्यात आले होते. तरीही तो सोसायटीत खुलेआम वावरत असतो. सोसायटीच्या गार्डनमध्ये गोंधळ घालत असतो. त्यामुळे बायका-मुलींना सायंकाळी बाहेर पडणे अवघड झाले आहे. महिनाभरात त्याने तीनदा जाळपोळ केली.

तडीपार गुंडामुळे महिलावर्गात दहशत आहे. सायंकाळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. त्याच्यावर कठोर कारवाई करून महिलावर्ग आणि रहिवाशांना पोलिसांनी दिलासा द्यावा.

- एक त्रस्त नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युततारांना अडथळे ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीकडून अनेक कामी हाती घेण्यात आली आहेत. यात रस्त्यालगत असलेल्या विद्युत पोलांवरील तारांना अडथळे ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटणीचे कामही जोमाने सातपूर भागात सुरू आहे.

दरवर्षी विद्युततारांना अडथळा ठरू पाहणाऱ्या वृक्षांच्या फांद्या काढव्या लागत असल्याचे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाळ्यात विद्युततारांमध्ये वृक्षाच्या फांद्या राहिल्यास विद्युत पुरवठा खंडित होण्याचे अनेक प्रकार होत असतात.

यामुळे पावसाळ्यापूर्वी सातपूर भागातील सर्वच परिसरात तारांना धोका ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. तसेच विद्युत जनित्रांचीदेखील तपासणी करत स्वच्छता केली जात आहे. यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह खासगी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे.

रहिवाशी हैराण

दरम्यान पावसाळ्यापूर्वी अनेक काम महावितरणला करावी लागत असल्याने शनिवारी सकाळी १० ते ५ वाजेच्यादरम्यान महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला जात असतो. दिवसभर विद्युत पुरवठा खंडित असल्याने त्याचा मात्र रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. बत्तीगुल असल्याने उकाड्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images