Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

त्र्यंबकच्या प्रभारी नगराध्यक्षपदी काण्णव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा अभिजित काण्णव यांच्याकडे आली आहे. नगराध्यक्ष विजया लढ्ढा रजेवर गेल्याने काण्णव यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी काण्णव म्हणाले, की राज्य सरकारचे अडीच कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्यानंतर लगेच प्रभारी नगराध्यक्षपदाची धुरा माझ्याकडे आल्याने जबाबदारी वाढली आहे. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष दीपक लढ्ढा, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, योगेश तुंगार, धनंजय तुंगार, तृप्ती धारणे, यशोदा अडसरे, अनघा फडके, माधुरी जोशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कंधाणे फाट्यावरील अपघातात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील राज्य महामार्गावरील कंधाणे फाट्यावर मोटारसायकल व टेम्पो वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. या आठवड्यात राज्य महामार्गावरील हा तिसरा अपघात असून, आतापर्यंत तीन जणांना अपघातात प्राण गमवावा लागला आहे. राजेंद्र बाबूराव चंद्रात्रे (वय ५५, रा. सटाणा) मोटारसायकलने डांगसौदाणे येथून शेतीकामे आटोपून घरी परतत होते. या वेळी कंधाणे फाट्यावर वळणावर मोटारसायकल समोरून येणाऱ्या टेम्पोवर (एमएच ०६/जी ८५४५) जावून आदळली. यात मोटारसायकलस्वार चंद्रात्रे जागीच ठार झाले. परिसरातील शेतकऱ्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच चंद्रात्रे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी रात्री उशिरा अपघाताचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतापूरच्या देवस्थानाच्या पैशांची चौकशी करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले तालुक्यातील अंतापूर येथील दावल मलिक देवस्थानच्या पंचमंडळी देवस्थानला प्राप्त होणाऱ्या धनप्राप्तीचा दुरुपयोग होत असून, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार शेख जैनोद्दीन शेख करीम मुजावर यांनी तहसीलदार व जायखेडा पोलिस ठाण्यात केली आहे.

तक्रारीत नमूद केले आहे, की या देवस्थानची पंचमंडळी गेल्या दहा वर्षांपासून कामकाज करीत आहे. दावल मलिकबाबा देवस्थानात दर गुरुवारी भाविक कंदोरीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे बोकडाच्या चामडीपासून अंदाजे ५० हजार रुपये पंच कमिटीला मिळतात. दावल मलिक मूळ देवस्थान, बिबीसाहब देवस्थान, कवड्यापीर देवस्थान, पाचपीर देवस्थान यांना भाविकांनी चढवलेले सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू असे मिळून लाखो रुपये पंच कमिटाला प्राप्त होतात. या रकमेचा विनियोग पंच कमिटी कशा प्रकारे करते याचा कोणत्याही प्रकारचा हिशेब गेल्या दहा वर्षांपासून पंच मंडळी देत नाही. या उत्पन्नातून देवस्थानाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च पंच मंडळी करीत नाही. दावल मलिक देवस्थानचा गाभारा व परिसरात सुधारणा नाहीत. परिसरात भक्तनिवास नाही. पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. उत्पन्नाच्या बाबतीत पंच मंडळींना कुणी विचारणा केल्यास अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी देतात. पंच मंडळी देवस्थानच्या उत्पन्नाचा अपहार करीत असून, त्यांची चौकशी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

उन्हाळ कांद्याच्या दरात घसरणीचे सत्र सुरूच असून, शेतकऱ्यांसमोर ‘अर्थसंकट’ गडद होत चालल्याचे चित्र आहे. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी अवघा पावणेचारशे रुपये दर मिळाला.

येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक वाढत असली तरी बाजारभावाचा आलेख घसरत चालला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी येवला बाजार समितीत उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० ते कमाल ५८० (सरासरी ४५०) असा बाजारभाव मिळाला होता. नुकत्याच संपलेल्या आठवड्यात दर पुन्हा खाली आल्याचे चित्र दिसून आले. येवला बाजार समितीच्या मुख्य आवारात शनिवारी सुमारे ७ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. मात्र, किमान २०० ते कमाल ५२० (सरासरी ३७५) रुपये क्विंटलमागे दर होते. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शनिवारी सुमारे ४ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली असताना किमान २०० ते कमाल ४७५ (सरासरी ३५०) रुपये दर क्विंटलमागे होते. बहुतांश शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल शंभर ते दीडशे रुपये दर मिळाला होता. म्हणजेच अवघा एक ते दीड रुपया किलोचा भाव मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहिंसेच्या मार्गाने शेतकरी संप करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांनी एक जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानिमित्त शेतकऱ्यांपर्यंत जाऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी संयोजकांकडून प्रचार- प्रसार सुरू आहे. संयोजकांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या वेळी अण्णा हजारे यांनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन संयोजकांना केले.

किसान क्रांतीच्या राज्यभरात जिल्हा, तालुका कोअर कमिटी तयार करून प्रत्येक‌ जिल्ह्यात शेतकरी संपाबाबत जागृती करावी. राज्यभरातील प्रतिनिधींनी‌ त्याचा सविस्तर अहवाल तयार करून संपाची चळवळ अहिंसेच्या मार्गाने पुढे न्यावी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांनी किसान क्रांतीच्या समन्वयक समितीला राळेगणसिद्धी येथील भेटीप्रसंगी केले. या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारे यांना शेतकरी संपाचे सर्व नियोजन व रूपरेषा याची माहिती दिली.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत विशेष ठरावही करण्यात आला. सरकारने आंदोलनाची दखल‌ घ्यावी म्हणून किसान क्रांतीचे समन्वयक किशोर जाधव, संदीप थेटे, संदीप जगताप, योगेश रायते, डॉ. योगेश गोसावी, विजय काकडे, शंकर दरेकर, सचिन थेटे, बापू अडसारे, गंगाधर निखाडे, भास्कर भगरे आदींनी राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंची भेट घेऊन माहिती दिली. शेतकरी संपाचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणार असेल तर मी यात नक्की सहभागी होईन, असे आश्वासन अण्णा हजारे यांनी दिले. या वेळी राळेगणचे सुरेश पठारे, पारनेर येथील दिनेश बापू औटी, भाऊ पठारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीवर शुक्रवारी अभिरूप न्यायालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध प्रकारच्या सार्वजनिक समस्यांची दखल घेत संवेदना मंचची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध विषयांवर अभिरूप न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. यातील पहिले आयोजन वृक्षतोडीवर करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. १२) हे अभिरूप न्यायालय वैराज कलादालन येथे होणार आहे.

काही महिन्यात शहर परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि वृक्षतोड या साऱ्या बाबी लक्षात घेत शहराच्या आगामी विकासाचा विचार करून संवेदना मंच या अभिनव संकल्पनेचा उदय झाला आहे. शहरातील विविध ज्वलंत आणि सार्वजनिक समस्यांवर अभिरुप न्यायालय भरविण्यासह विविध प्रकारच्या संकल्पना राबविण्याचा मंचचा प्रयत्न आहे. या उपक्रमांतर्गत सरकारी आधिकारी, रिक्षा युनियन, एसटी वाहनचालक, डेपो व्यवस्थापक, रेल्वे अधिकारी, पोलिस कमिशनर, मनपायुक्त आदींना थेट प्रश्न विचारण्याची संधीही मिळणार आहे.

वृक्षतोडीबाबत प्रश्न, सूचना पाठवा

संवेदना मंच आणि आर्किटेक्ट व इंजिनीअर्स असोसिएशन यांच्यावतीने शुक्रवारी (दि. १२) शरणपूररोडवरील वैराज कलादालन येथे अभिरुप न्यायालय होणार आहे. वृक्षतोडीबाबत आयोजित या न्यायालयात नागरिकांना सहभागी होता येईल. त्यासाठी १२ मेपूर्वी लेखी स्वरूपात आपले प्रश्न कळवावेत. आयत्या वेळी प्रश्न विचारता येणार नाहीत. तसेच हा कार्यक्रम जनसमुदाय व नागरी स्वरुपाचा असल्याने कोणताही राजकीय पुढारी व पदसिद्ध व्यक्ती यात असणार नाही, असे मंचचे अध्यक्ष अजित पतकी यांनी कळविले आहे.

प्रश्न पाठविण्यासाठी संपर्क

अजित पत्की अध्यक्ष, संवेदन मंच ९१४६२७८३५७,
ajitpatki@gmail.com
सचिन गुळवे-अध्यक्ष- आर्कीटेक्ट्स व इंजिनिअर्स असोसिएशन
president@aandenashik.org

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून रोकड लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकाच्या कारची काच काढून चोरट्यांनी ६५ हजारांच्या रोकडसह महत्त्वाची कागदपत्रे चोरी केली. ही घटना जुना आग्रा रोडवरील कालिका मंदिरासमोर घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निशिकांत दामोदर लडके (६३, रा. हुंडीवाला लेन) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री जेवणासाठी लडके मुंबईनाका भागात गेले होते. कालिका मंदिर परिसरात फोर्च्युनर कार (एमएच १५ ईडी ७८६०) उभी करून ते नजिकच्या हॉटेलमध्ये गेले असतांना चोरट्याने संधी साधली. लडके यांच्या कारच्या दरवाजाची काच उघडून चोरट्यांनी ही चोरी केली. चालकाशेजारील आसनावर बॅगेत ठेवलेली ६५ हजार रुपयांची रोकड आणि बँकेचे महत्त्वाची कागदत्रे तसेच घराच्या चाव्या चोरट्यांनी चोरी केल्या. एका दिवसापूर्वी आर्टीलरीरोडवर चोरट्यांनी वाहनाची काच फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केली होती. आता या घटनेत चोरट्याने काच काढून चोरी केली. वाहनातील मुद्देमाल लंपास करण्याची नवनवीन शक्कल चोरटे लढवत असून, या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

उघड्या घरातून चोरी

कुटुंबीय घरकामात व्यस्त असल्याची संधी साधत चोरट्यांनी उघड्या घरात घुसून सव्वा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. ही धक्कादायक घटना बॉईज टाऊन शाळा परिसरात घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रशांत कांतीलाल साखला (४९, रा. दत्तात्रेय दर्शन) यांच्या फिर्यादीनुसार, साखला कुटुंबीय २७ एप्रिल रोजी दुपारी घरकामात व्यस्त होते. यावेळी दरवाजा उघड होता. ही संधी साधत चोरट्यांनी चोरी केली.

वैद्यनगरला चेन स्नॅचिंग

पायी जाणाऱ्या महिलेस ढकलून दुचाकीस्वार भामट्यांनी तिच्या गळ्यातील पोत तोडून नेल्याची घटना पाटीदार भवन येथील वैद्यनगर परिसरात घडली. नीता अनिल पंडित (रा. ठाणे) यांच्या तक्रारीनुसार, त्या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. रविवारी (दि. ७) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्या वैद्यनगर परिसरातून पायी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या संशयिताने त्यांना धक्का देऊन त्यांच्या गळ्यातील ३४ हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबाडून नेली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

शिवाजीनगरला घरफोडी

सातपूर परिसरातील शिवाजीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. वैशाली सोमनाथ जाधव (३६, रा. धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. ५ ते ७ मे दरम्यान जाधव कुटुंबीय बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी संधी साधली. त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील २० हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने आणि एलईडी टीव्ही असा सुमारे ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

अपघातात चालक ठार

भरधाव वेगात दुभाजकावर आदळून वाहन पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची घटना शनिवारी (दि. ६) रात्री तपोवनातील लक्ष्मी नारायण मंदिरासमोर झाली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

संजय सिद्धप्पा शिवंगी (३२, रा. क्रांतिनगर, संभाजी चौक, सिडको) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. संजय हे शनिवारी रात्री छोटा हत्ती (एम. एच. १५ डी. के. ५०६४) या वाहनातून तपोवनमार्गे प्रवास करीत असताना अपघात झाला. लक्ष्मी नारायण मंदिरासमोर त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे वेगात जाणारे वाहन दुभाजकावर आदळून वाहन पलटी झाले. यात चालक संजय गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ

सि‌व्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी नोंद केली असून, घटनेचा अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर वकिलीच करणार बंद!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कायद्याची पदवी घेतलेली नसताना वकिली करणाऱ्या तोतया वकिलांचा शोध घेण्याचे काम सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बार कौन्सिलमार्फत सुरू आहे. आजपर्यंत आपल्या पदवीची माहिती सादर न करणाऱ्या वकिलांसाठी १५ मे पर्यंत शेवटची संधी असून, त्यानंतर संबंधितांवर थेट काम करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

बनावट कायद्याची पदवी धारण करून वकिली व्यवसाय करणाऱ्या भामट्यांमुळे न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर मोठा परिणाम होतो. पीडीत व्यक्तीला न्याय मिळतच नाही. मात्र, आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. नाशिकमध्येदेखील अशी तोतया वकिलांचा यापूर्वी पर्दाफाश झाला आहे. अशा काही घटनांच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने सर्व वकिलांची एलएलबीची पदवी बार कौन्सिलमार्फत विद्यापीठाकडून तपासून घेण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी दिले. २५ मे २०१७ पर्यंत संबंधित विद्यापीठाकडे बार कौन्सिल पदव्या पाठवणार आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवातर्फे हे काम सध्या सुरू आहे. आजवर सादर झालेल्या पदव्यांची माहिती विद्यापीठांना सादर करण्यात आली असून, त्याचा अहवाल २५ जून २०१७ पर्यंत बार कौन्सिलला सादर होणार आहे. ज्या वकिलांनी व्हेरीफिकेशन फॉर्म किंवा घोषणापत्र आजपर्यंत भरलेली नाही. अथवा फार्म भरून डिग्री सादर केलेली नाही अशा वकिलांना ही शेवटची संधी असणार आहे.

उपरोक्त मुदतीत व्हेरीफिकेशन झाले नाही तर संबंधीत वकीलांना प्रॅक्टीसींग अॅडव्होकेटच्या यादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या व्यक्तींना भविष्यात स्थानिक वकील संघ, राज्य वकील परिषदेच्या निवडणुकांमध्ये सहभाग घेता येणार नाही.

१५ मेपर्यंत संधी

संबंधित वकिलांनी एलएलबीची पदवी, पासिंग सर्टिफीकेट, अंतिम वर्षाची गुणपत्रिका यासह २५ मेपर्यंत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मुंबई, औरंगाबाद, नागपूर तसेच गोवा येथील कार्यालयात व्यक्तीशः अथवा प्रतिनिधीमार्फत सादर करणे बंधनकारक आहे. पोस्ट अथवा कुरिअरने पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

जिल्ह्यात जवळपास चार हजार वकील असून, बहुतांश वकीलांनी अर्ज सादर केले आहे. उर्वरीत वकीलांनी शेवटीची संधी म्हणून त्वरीत अर्ज सादर करणे अपेक्षीत आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार वकीली देखील करता येणार नाही.
- अॅड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार कौन्सिल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारनियमनाचा कृषिपंपाना चटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

विजेच्या पुरेशा उपलब्धतेअभावी महावितरणने कृषी ग्राहकांना करण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यात आणखी दोन तासांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कृषी ग्राहकांना दिवसा व रात्री प्रत्येकी आठ तास असे दिवसाला १६ तास वीज पुरवठा केला जात आहे.

सध्या राज्यात वीजटंचाई निर्माण झाल्याने विजेची मागणी व पुरवठ्यात मेळ घालतांना महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी महावितरणने सोमवारपासून कृषी ग्राहकांसाठी भारनियमन आणखी दोन तासांनी वाढविले आहे. आता नव्या नियोजनानुसार कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास आणि रात्री आठ तास असे १६ तास वीजपुरवठा केला जाणार आहे. तर दिवसभरात आठ तास भारनियमन केले जाणार आहे. रात्री एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन टप्प्यांत अखंडित वीजपुरवठा केला जाणार आहे. परंतु, वीज उपलब्धतेचा प्रश्न सुटताच कृषिपंपांना दिवसा आठ तास व रात्री दहा तास अखंडित वीज पुरवठा केला जाणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी कळविले आहे.

वीजपुरवठा करा सुरळीत

देवळाली कॅम्प : शेतीला पाणी देण्यासाठी आवश्यक पुरेशी वीज मिळत नसल्याने संतापलेल्या लहवित, लोहशिंगवे परिसरातील शेतकऱ्यांना वीज महावितरण कंपनीच्या भगूर येथील सब-स्टेशनवरील प्रबंधक परिहार यांना नुकतेच निवेदन दिले. वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामरक्षक दलाचा मद्यविक्रीवर ‘वॉच’

$
0
0



नाशिक : अवैध मद्य विक्री तसेच वाहतुकीचे प्रकार रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारने ग्राम सुरक्षा रक्षकांवर टाकली आहे. याबाबत ग्राम सुरक्षा रक्षकांची तक्रार आल्यास पोलिस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाला १२ तासात कारवाई करावी लागणार आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या मद्यपीकडून गोंधळ घातला जात असेल तर अशा माहितीची दखलही पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

ग्रामीण भागात सुरक्षेची मोठी जबाबदारी ग्राम रक्षक दलाच्या खांद्यावर आहे. जिल्ह्याचे क्षेत्र मोठे असून, मनुष्यबळाची कमतरता असल्याने जिल्ह्याच्या दुर्गम अथवा दुर्लक्षित भागात ग्रामरक्षक दलाची भूमिका महत्त्वाची ठरते. आता राज्य सरकारने एक अद्यादेश काढून ग्रामरक्षक दलाच्या खांद्यावर अवैध मद्य विक्री तसेच वाहतूक रोखण्याची जबाबदारी टाकली आहे. जिल्ह्यात ग्राम रक्षक दलाचे १७ ते १८ हजार सदस्य आहेत. विशेष म्हणजे यात तरुणांची संख्या मोठी आहे. अनेक छोटे-मोठे गुन्हे ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांकडून रोखले जातात. तसेच तपास कामातदेखील या सदस्यांची माहिती महत्त्वाची ठरते. ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांच्या माहितीमुळे गंभीर गुन्हे उघडकीस येतात. राज्य सरकारने नुकतेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीअंतर्गत येणाऱ्या अवैध मद्य विक्री, बाळगणे, वाहतूक करणे इत्यादी गुन्ह्यांबाबतची माहिती नजिकच्या पोलिस स्टेशन अथवा संबंधित अधिकाऱ्यांना ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी देण्यासंदर्भातील तरतूद ग्राम रक्षक दल नियम, २०१७ मध्ये करण्यात आली आहे. या तरतुदींनुसार ग्रामरक्षक दलाच्या सदस्याने माहिती दिल्यास पोलिस अथवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना १२ तासांच्या आत कारवाई करून गुन्हा दाखल करावा लागणार आहे. एवढेच नव्हे तर असे कृत्य करणाऱ्या संशयिताकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेऊन त्याच्याविरोधात प्रचलित कायद्यानुसार कारवाई होणार आहे. सराईत व्यक्तिविरोधात हद्दीपारीची कारवाई करण्याबाबत अद्यादेशात नमूद करण्यात आले आहे. तीन वेळेपेक्षा अधिक गुन्हे दाखल झाल्यास संबंधित व्यक्तिविरोधात हद्दीपारीच्या प्रस्तावासाठी पोलिसांनी कालमर्यादा निश्चित करावी. ही कारवाई वेळेत पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे.

कंट्रोलशी साधा संपर्क

याबाबत नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले की, या निर्णयाची अंमलबजावणी लागलीच सुरू झाली आहे. ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांनी नजिकच्या पोलिस स्टेशन अथवा थेट पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाच्या ०२५३-२३०९७०० या क्रमांकावर संपर्क साधवा. माहिती मिळाल्यानंतर लागलीच कारवाई केली जाईल. एखादा मद्यपी गोंधळ घालून शांतता भंग करीत असल्याची माहिती सदस्यांकडून मिळाल्यानंतरदेखील त्वरित कारवाई केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ मेपासून पेट्रोलपंप रविवारी बंद!

$
0
0

कमिशन वाढवून मिळविण्यासाठी निर्णय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोल-डिझेलचे कमिशन वाढवून मिळावे, या मागणीसाठी १४ मेपासून दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय सीआयपीडी आणि फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनने घेतल्यामुळे वाहनधारकांचे हाल होणार आहेत. कमिशनच्या विषयावर निर्णय न झाल्यास दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय कायम राहणार आहे. याबाबत २८ मे रोजी मुंबईत असोसिएशनची बैठक होणार आहे.

पेट्रोलपंपचालकांच्या या निर्णयामध्ये १० मेपासून दर रविवारी पेट्रोल पंप बंद ठेवणे, तसेच १५ मेपासून फक्त दिवसभरच पेट्रोलपंप सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्याची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ६ राहणार आहे. त्यानंतर ते रात्री बंद ठेवण्यात येणार आहेत. नाशिक शहरात असेही रात्री पेट्रोलपंप बंद राहतात पण ते चार तास अगोदर बंद राहणार आहेत.

जिल्ह्यात त्याचा परिणाम होणार आहे. केंद्र शासनाने २०११ मध्ये अपूर्वा चंद्रा कमिटीची स्थापना करून पेट्रोल-डिझेलच्या कमिशनबाबत तोडगा काढण्यात आला. वर्षातून दोनवेळा कमिशन वाढविण्याचे ठरले. नाशिक जिल्ह्यात भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन सरकारी कंपन्यांचे मिळून ३५० पेट्रोल पंप आहेत. नाशिक शहरात ७० पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे हे सर्व पेट्रोलपंप १४ मेनंतर रविवारी बंद राहतील व इतर वेळी रात्री बंद राहण्याची शक्यता आहे.

१० मे रोजी खरेदी नाही

गेल्या दोन वर्षांपासून संघटना याविषयी लढा देत आहे. मात्र तेल कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केला आहे. तसेच कंपन्यांनी वारंवार याबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली. ही मुदत ९ मे रोजी संपत असल्याने १० मे रोजी एकदिवस खरेदी बंद आंदोलन करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक संचालकांना सरकारी मदतीची आस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनाने मदत करावी, यासाठी जिल्हा बँकेचे शिष्टमंडळ आज, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. याअगोदर दोनदा या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीविना रिकाम्या हाती परतावे लागले आहे. आता भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी मध्यस्थी केल्यानंतर ही भेट होणार आहे.

या भेटीत बँकेच्या एकूण आर्थिक स्थितीचे चित्र मांडले जाणार आहे. राज्य सहकारी बँकेकडून मदत मिळवून देण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन प्रयत्नशील आहेत. सुमारे तीन हजार कोटींचे कर्ज थकल्याने जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. शेतकऱ्यांना खरिपाचे कर्ज देण्यासाठी बँकेकडे दमडीही शिल्लक नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत शेतकरी व शिक्षकांनी बँकेला ताळे ठोकले. त्यातच राज्यात आर्थिक संकटात सापडलेल्या जिल्हा बँका शिखर बँकेत विलीन करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. त्यामुळे संचालक मंडळ धास्तावले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांची भेट महत्त्वाची ठरणार आहे.

प्रशासक नेमण्याच्या हालचाली

बँकेचे चेअरमन व व्हा. चेअरमन शिवसेनेचे आहेत. त्यामुळे मध्यंतरी बँकेची स्थिती खालावल्यानंतर भाजपकडून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. बँकेवर आलेले संकट टाळण्यासाठी व आपले पद वाचवण्यासाठी भाजपाशी सलगी करण्याचा प्रयत्नही या भेटीमागे असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेरी’च्या अधिकारांना कात्री

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी) या राज्यातील एकमेक संस्थेच्या अधिकाराचे काही नियंत्रण आता मुंबईतील ई-प्रशासन मंडळाला देण्यात आल्यामुळे मेरीला आता घरघर लागली आहे.

राज्यात धरणांचे संकल्पन, बांधकाम करण्यासोबत अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाच्या उद्देशाने १९५९ मध्ये नाशिकमध्ये स्थापन झालेली मेरी संस्था दिंडोरी रस्त्यावर सुमारे दीडशे एकर जागेत उभी आहे. त्यातील रिसोर्स इंजिनीअरिंगचे काम आता ई-प्रशासन मंडळाच्या नियंत्रणात मुंबईला गेले आहे. नाशिकच्या मेरीमध्ये जलाशय गाळ सर्वेक्षण व सुदूर सर्वेक्षण, सामग्री चाचणी, संरचनात्मक संशोधन, महामार्ग संशोधन, भूकंप आघात सामग्री, सामग्री चाचणी असे आठ विभाग आहेत. त्यातील मेरीचे रिसोर्स इंजिनीअरिंग सेंटरचे नियंत्रण ई-प्रशासन मंडळाकडे देण्यात आले असून, महासंचालकाचे अधिकार कमी करण्यात आले आहेत. त्यासाठी शासनाने एक परिपत्रक काढले आहे. त्यात जलसंपदा विभागाव्दारे करण्यात येणाऱ्या विविध कामात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विभागाचे कामकाज कार्यक्षम व पारदर्शक करण्यासाठी विविध स्तरावर वापरात असलेल्या सॉफ्टवेअर व माहिती संकलनाच्याबाबतीत एकसूत्रीपणा आणण्यासाठी ई-प्रशासन मंडळाची स्थापन करण्यात आली आहे. या मंडळाकडेचे हे अधिकार देण्यात आले आहेत. मेरीचे अधिकार नाशिकचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्या जलसंपदा विभागाने काढले आहेत.

धरण निगडीत कामांवर मुंबईतून नियंत्रण

या निर्णयामुळे धरणाच्या गाळ सर्व्हेक्षणासह धरणाशी निगडीत विषयाला मान्यता ई-प्रशासन मंडळ देणार आहे. याचे काम नाशिकच्या मेरीमध्ये होणार असले तरी त्यासाठी आता मुंबईच्या निर्णयाची वाट बघावी लागणार आहे. त्याचबरोबरच प्रत्येक वर्षाचे जुलै ते जून या दरम्यान गाळ सर्व्हेक्षण वार्षिक कार्यक्रम ई-प्रशासन मंडळ करेल. अशा रितीने तब्बल १० कामे ही नाशिकच्या महासंचालकाकडून काढून त्याचा निर्णय ई-प्रशासन मंडळ घेणार आहे. त्याचप्रमाणे पीकमोजणी क्षेत्र अभ्यासाची सुधारीत कार्यपध्दती सुध्दा मेरीकडून मान्यतेसाठी ई-प्रशासनाकडे गेली आहे.

अशी लागली घरघर

मेरीत धरणाशी संबंधित कामे येथे होत असल्यामुळे देश-परदेशातून येथे काम येत होती. नंतर संशोधन विभागात बाहेरील देशातून प्रतिकृती तपासणीची कामे बंद झाली. त्यानंतर राज्यातील धरणांची कामे येत नसल्याने हा विभागाला घरघर लागली. जलाशय गाळ सर्वेक्षण व सुदूर सर्वेक्षण हे दोन विभाग वगळता सामग्री चाचणी, संरचनात्मक संशोधन, महामार्ग संशोधन, भूकंप आघात सामग्री, सामग्री चाचणी अशा विभागांकडे फारशी कामे नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनप्रश्नी शिक्षक संघटना आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे वेतन गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एनडीसीसी बँकेकडे थकीत आहे. शिक्षकांच्या खात्यावर वेतनाची रक्कम जमा असूनही रोख रक्कम किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे मिळत नसल्याने शिक्षकांचे हाल होत आहेत. वारंवार आंदोलने करुनदेखील अद्याप परिस्थिती सुधारत नसल्याचे पाहता नाशिकमधील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत दोन दिवसांत निर्णय द्या, अथवा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाला दिले आहे.

चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतरच्या काळापासून शिक्षकांचे वेतन रखडलेले आहे. वेतन करण्यासाठी एनडीसीसी बँकेकडेच पैसे नसल्याचे उत्तर शिक्षकांना दिले जात आहे. मात्र यामुळे कुटुंबातील आजारपण, लग्न समारंभ, विमा हफ्ते, गृहकर्जाचे हफ्ते, मुलांची शैक्षणिक फी याबाबत खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणीमुळे शिक्षकांचे काही बरे वाईट झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये सरकारविषयी प्रचंड असंतोष व संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात दोन दिवसांत योग्य तो निर्णय घेतल्यास सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वेक्षणानुसार होणार जलयुक्तची कामे

$
0
0

कामांची उपयोगीता वाढण्यास लागणार हातभार

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

जलयुक्त शिवार योजनेतून करावयाची जलसंधारणाची कामे आता इथून पुढे शास्त्रीय माहिती, सर्वेक्षण व ग्राउंडवॉटर प्रायोरिटी मॅपच्या आधारेच केली जाणार आहेत. त्यामुळे जलयुक्त शिवार योजनेची कामे स्थानिक राजकारण्यांच्या प्रभावातूनही मुक्त झाली आहेत.

नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर व सेंट्रल डिपार्टमेंट ऑफ स्पेस या विभागांनी दिलेल्या शास्त्रीय माहितीच्या आधारे व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या प्रत्यक्ष सर्वेक्षण महितीच्या आधारे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटरने तयार केलेल्या ग्राऊंडवॉटर प्रायोरिटी मॅपच्या आधारेच जलयुक्तची कामे केली जाणार आहेत. राज्यात वारंवार टंचाई परिस्थिती निर्माण होत आहे. या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेवर आतापर्यंत राज्यभरात कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत या योजनेचे चांगले परिणामही दिसून आले आहेत.

राज्यात २०१५-१६ यावर्षी ६२०२ तर २०१६-१७ यावर्षी ५२८१ इतक्या टंचाईग्रस्त गावांची जलयुक्त शिवार योजनेत निवड करण्यात आली होती. नाशिक विभागातही सन २०१५-१६ यावर्षी ९४१ तर २०१६-१७ यावर्षी ९०० गावांची निवड करण्यात आली होती. आतापर्यंत निवड केलेल्या गावांत या योजनेंतर्गत जलसंधारणाचे काम कुठे करायचे यासाठी केवळ शिवार फेरीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेतला जात असे. अशा प्रकारे कामाची जागा निवडतांना कोणत्याही शास्त्रीय माहितीशिवाय केवळ स्थानिक राजकीय मंडळींचा शब्द प्रमाण मानला जात होता. परिणामी गेल्या दोन वर्षात झालेल्या कामांपैकी काही कामे चुकीच्या ठिकाणी झाल्याने त्यांच्यावरील संपूर्ण खर्च वाया गेला. त्याचा परिणाम जलयुक्तच्या परिणामकारकतेवरही झालेला दिसून येतो.

नकाशांचा वापर या खात्यांना करता येणार

- भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, राज्य पाटबंधारे, कृषी, केंद्रीय भूजल खाते, राज्यातील विद्यापीठे, अशासकीय संस्था इ.

मॅप आधारेच होणार ठिकाणांची निवड

चालू वर्षापासून जलयुक्तच्या कामांची ठिकाणे महाराष्ट्र सुदुर संवेदन उपयोजन केंद्राने (एमआरएसएसी) तयार केलेल्या ग्राऊंडवॉटर प्रायोरीटी मॅपच्या आधारेच निवडली जाणार आहेत. या नकाशांच्या आधारे प्रशासकीय यंत्रणेला प्रत्येक गावातील भूजलाचे अस्तित्वाचे विभाग व पुनर्भरण उपाययोजना राबविण्याची ठिकाण समजण्यास मदत होणार आहे. चालू वर्षापासून जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीसाठी या नकाशांचा वापर केला जाणार असल्याने तांत्रिकदृष्ट्या जलयुक्तच्या कामांची उपयोगिता वाढण्यास हातभार लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झोपडपट्टीत वाटणार डस्टबिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीत टाकावा, यासाठी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये डस्टबिनचे वाटप करण्यात येणार आहे. डस्टबिनच्या खर्चासाठी महापालिकेने खासगी कंपन्यांनाही साकडे घातले आहे.

नागरिकांनीच ओला व सुका कचरा वेगळा करून तो घंटागाडीत टाकावा, यासाठी शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये डस्टबिनचे वाटप करण्यात येणार आहे. या डस्टबिनना प्रायोजक मिळावे, यासाठी महापालिकेने काही खासगी कंपन्यांना साकडे घातले होते. त्यानुसार क्रेडाईशी प्राथमिक स्तरावर बोलणी झाली आहे. त्यांच्याकडून होकार येताच नागरिकांना डस्टबिन मिळणार आहे. काही झोपडपट्ट्यांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जातो.

ओला आणि सुका कचरा एकत्रित साठवल्याने रोगराई पसरून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. दोन डस्टबिनमुळे कचऱ्यांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. काही औद्योगिक कंपन्यांनी आपल्या सीएसआर निधीतून या उपक्रमाला मदत करण्यासाठी तयारी दर्शविली आहे. या कंपन्यांसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. त्‍यांच्याकडून निधी प्राप्त होताच झोडपडपट्टीत डस्टबिन वाटप करण्यात येणार आहे. यासाठी आज, मंगळवारी महापालिकेच्या आरोग्यधिकाऱ्यांच्या दालनात बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुमन सातभाई प्रभाग सभापतिपदी?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

महापालिकेच्या नाशिकरोड प्रभागातही सभापतिपदासाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. या प्रभागातील २३ जागांपैकी भाजपने १२, तर शिवसेनेने ११ जागांवर विजय मिळवला होता. एका जागेची आघाडी असल्याने प्रभाग सभापतिपदी भाजप उमेदवारालाच संधी मिळणार आहे. प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुमन सातभाई यांचे नाव सभापतिपदासाठी निश्चित मानले जात आहे.

फेब्रुवारीत झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. नाशिकरोड प्रभागात भाजपला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळाले. या प्रभागात २३ जागांपैकी भाजपने १२ जागांवर विजय मिळवून शिवसेनेपेक्षा एका जागेची आघाडी घेतली होती. तेव्हाच नाशिकरोड प्रभाग सभापतिपद शिवसेनेच्या हातून गेल्याचे निश्चित झाले होते.

नाशिकरोड प्रभाग सभापतिपदी प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या सुमन सातभाई यांचे नाव निश्चित मानले जात आहे. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडून त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकताच उरली आहे.

सरोज आहिरेंचेही पुनर्वसन

प्रभाग २२ मधून माजी महापौर नयना घोलप यांना धोबीपछाड देऊन विजय मिळविलेल्या भाजपच्या सरोज आहिरे यांचीही महिला व बालकल्याण समितीवर वर्णी लागणार आहे. येत्या १५ मे रोजी त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे त्यांचे नाव नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. प्रभाग क्रमांक २० मधून निवडून आलेल्या सीमा ताजणे व प्रथमच निवडून आलेले प्रभाग १८ मधील विशाल संगमनेरे यांची स्थायीवर यापूर्वीच वर्णी लागलेली असल्याने सुमन सातभाई यांच्यासाठी शर्यत सोपी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओला-सुका कचरा संकलनास प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापौर रंजना भानसी यांनी घंटागाड्यांची अचानक पाहणी करून कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. यावर तातडीने कारवाई करून कचऱ्याचे वर्गीकरण करावे, असे आदेश देण्यात आले. त्यानुसार शहरातील २०६ घंटागाड्यांमध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा संकलित करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आरोग्यधिकारी डेकाटे यांनी दिली.

घंटागाडी कर्मचारी कचरा संकलित करताना तो ओला आणि सुका असे वर्गीकरण न करताच जमा करीत होते. ही बाब महापौरांच्या निदर्शनास आल्यानंतर यावर ताताडीने कारवाई करावी, असे आदेश आरोग्यधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार आरोग्यधिकाऱ्यांनी घंटागाडी ठेकेदारांची शनिवारी बैठक घेऊन प्रत्येक घंटागाडीत कचरा वेगळा टाकावा असे आदेश दिले. त्यानुसार ओला आणि सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यास सुरुवात केली आहे. नागिरकांनी ओला आणि सुका कचरा

वेग‍वेगळा जमा करावा यासाठी विभागनिहाय जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. जनजागृतीसाठी महापालिकेला पत्रके वाटणार आहे. तसचे रिक्षातूनही प्रचार करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षणक्रम मूल्यमापनाची निकड’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

काळाशी सुसंगत शिक्षणपद्धती विकसित करण्याची गरज असून, विद्यापीठांनी आपल्या शिक्षणक्रमांचे मूल्यमापन करणे गरजेचे असल्याचे मत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या गुणवत्ता व आश्वासन कक्षाच्या संचालिका डॉ. मंजुलिका श्रीवास्तव यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रम मूल्यमापन विभागाच्या वतीने विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारत सभागृहात ‘शिक्षणक्रम मूल्यमापन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायुनंदन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे, शिक्षणक्रम मूल्यमापन विभागाचे प्रमुख डॉ. सज्जन थूल उपस्थित होते.

डॉ. श्रीवास्तव म्हणाल्या, की स्पर्धेच्या युगात नवीन माध्यमे, दळणवळणाची साधने आणि संप्रेषणाच्या कक्षा यात आधुनिक तंत्रज्ञानामुळे अामुलाग्र बदल होत आहेत. बदलत्या जगाबरोबर शिक्षणपद्धती व मूल्यमापन पद्धतीत बदल अपरिहार्य आहे. पुढील डिजिटल युगाशी समन्वय साधणे काळाची गरज आहे. शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर खऱ्या अर्थाने करण्यासाठी देशभरातील सर्व विद्यापीठांनी ही संकल्पना राबविणे काळाची गरज आहे. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण व मूल्यमापन पद्धतीचा अवलंब, श्रेयांकांतरणावर आधारित मूल्यमापन पद्धती आणि श्रेयांकांतरण पद्धतीचा अवलंब, मागणीनुसार परीक्षेकडून ऑनलाइन परीक्षेकडे, बदलत्या आणि डिजिटल जगाशी समन्वय साधणारे शिक्षणक्रम व मूल्यमापन पद्धती, अंतर्गत मूल्यमापनासोबतच अंतर्गत परीक्षेलाही महत्त्व, सर्वंकष आणि सातत्यपूर्ण मूल्यमापनावर भर देण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुलगुरू प्रा. डॉ. वायुनंदन यांनीही शिक्षणक्रम मूल्यमापनासंदर्भात मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात डॉ. श्रीवास्तव यांनी प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षणक्रम मूल्यमापन संकल्पना उलगडून दाखविल्या. याकरिता पाच गट गठित करून गटप्रमुखांनी शिक्षणक्रम मूल्यमापनाचे सादरीकरण केले. कार्यशाळेत विविध विद्याशाखांचे संचालक, शिक्षक, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्वेता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. सज्जन थूल यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुनंदा मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिता थोरात यांनी आभार मानले.

--

दर्जा उंचावण्यास मदत

शिक्षणक्रमाचे मूल्यमापन केल्याने शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा उंचावण्यास मदत होते. शिक्षणक्रम विकसन आणि अंमलबजावणी करताना विविध प्रकारची तात्विक प्रात्यक्षिके, संशोधनासंदर्भात कार्य करावे लागते. यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त पूरक साहित्य पुरविण्यास शिक्षणक्रम मूल्यमापनाद्वारे मदत होत असल्याचेही डॉ. श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोहाडीच्या कन्येला नाइटिंगेल पुरस्कार

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी गावातील एकत्रित शेतकरी कुटुंबात वाढलेल्या, लहानपणापासून शेतीत राबणाऱ्या आणि वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतीत शेतमजुरीची कामे करीत नर्सिंगचे प्रशिक्षण घेऊन ३२ वर्षांपासून रुग्णसेवा करणाऱ्या मोहाडीच्या कन्या चंद्रकला चव्हाण-जाधव यांना २०१७ चा राष्ट्रीय फ्लॉरेन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी (दि. १२) रोजी राष्ट्रपती भवनात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

वडील पंढरीनाथ आणि आई सरुबाई यांच्या पाच मुली आणि चार मुले अशा मोठ्या शेतकरी कुटुंबात चंद्रकला होती. लहानपणापासूनच कष्टाची सवय असलेल्या चंद्रकला या १९८३ ला दहावी उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एक वर्षाचे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला त्यांनी चांदवड तालुक्यातील काजीसांगवी येथे, त्यानंतर वडाळीभोई येथे रुग्णसेवा केली. जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथील अविनाश चव्हाण यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्या चोपडा तालुक्यात बुदगाव येथे रुग्णसेविका म्हणून कार्यरत झाल्या. त्यानंतर एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव आणि चांदसणी येथे त्यांनी सेवा केली. सध्या त्या चोपडा तालुक्यातील अडावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून काम करीत आहेत. त्यांचे पतीही याच ठिकाणी आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. पुरस्काराचे स्वरुप ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरुप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images