Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘विकासाच्या मुद्यावरच लढणार काँग्रेस’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्व ८४ जागा संपूर्ण ताकदीने लढणार असून, प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत सर्व उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पक्ष विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढणार असून, गेल्या निवडणुकीपेक्षाही अधिक जागावर पक्ष विजयी होईल, असा विश्वास आमदार असिफ शेख यांनी व्यक्त केला.

येथील उर्दू मीडिया सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शेख रशीद, साबीर सत्तार आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. पक्षातर्फे ५५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत विद्यमान १५ नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच २५ महिला उमेदवारांनाही संधी दिली आहे. शेख म्हणाले, उर्वरित २९ उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर करण्यात येईल. काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत प्रभाग २० मधून माजी आमदार रशीद शेख व त्यांच्या पत्नी माजी महापौर ताहेरा शेख निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगाव मनपात ‘चौरंगी लढत’

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

येथील महापलिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेवादारी अर्ज दाखल करण्याच्या टप्पापर्यंत सर्वच राजकीय पक्षात उमेदवारी कुणाला? याबाबत सस्पेन्स कायम आहे. मुस्ल‌िमबहुल असलेल्या या शहरात मुस्ल‌िम मतांचे प्राबल्य असल्याने पूर्व भागात कोणता पक्ष बाजी मारतो त्यावरच सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. हिंदू बहुल असलेल्या पश्चिम भागातील चार प्रभागात सर्वाधिक जागा जिंकून किंगमेकरच्या भूमिकेत राहण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे.

येथील महापालिकेचा आजवरचा राजकीय इतिहास हा कमालीचा अस्थिर राजकारणाचा आणि अभद्र युती आघाड्यांचा राहिलेला आहे. अगदी मागील निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस व महाज निवडणूक निकालानंतर मात्र सत्तेसाठी एकत्र आले. प्रारंभीच्या अडीच वर्षांत काँग्रेसचे माजी आमदार असिफ शेख यांच्या पत्नी ताहेरा शेख यांनी महापौरपद भूषविले. परंतु, महाज व काँग्रेसचा हा सत्ता संसार कायम कुरबुरीच्या राजकारणात अडकून राहिला. त्यामुळे अडीच वर्षांनंतर महाज आणि काँग्रेसचा तलाक झाला. महाजने शहर विकास आघाडीच्या मदतीने व शिवसेनच्या अप्रत्यक्ष पाठ‌िंब्याने सत्ता हस्तगत करून महापौरपदी महाजचे हाजी मोह. इब्राहीम तर उपमहापौरपदी ‘शविआ’चे युनुस इसा विराजमान झाले. त्यामुळे ‘सत्तेसाठी काहीही’ हाच मनपाच्या राजकारणाचा फोर्मुला राहिला असल्याने २०१२ च्या निवडणुकीनंतरचे राजकीय चित्र पूर्ण बदलेले. कालचे शत्रू आजचे मित्र व काळाचे मित्र आजचे शत्रू झाले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत शहरात प्रभाग पुनर्रचना झाल्याने नगरसेवकांची संख्या ८० वरून ८४ झाली आहे. एकूण २१ प्रभाग आहेत. यामुळे राजकीय समीकरणे देखील बदली आहेत. अनेक इच्छुकांनी प्रभागातून आपली उमेदवारी निश्चित मानून प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणूक रणसंग्रामात पूर्व व पश्चिम अशी अलिखित विभागणी असल्याने एकाच शहरात दोन वेगवेगळी राजकीय लढती पाहायला मिळणार आहेत. मुस्ल‌िमबहुल असलेल्या पूर्व भागात १७ प्रभाग आहेत. त्यामुळे येथील लढतीकडे साऱ्यांचे लक्ष आहे. गेली अडीच वर्ष सत्तेत असलेले शहर विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (महाज) यांच्यात तू-तू मै-मै झाल्याने शहर विकास आघाडीच्या नेत्यांनी ‘एमआयएम’चा झेंडा हाती घेतला आहे. तर राष्ट्रवादीने जनता दलाशी सलगी केली आहे. त्यामुळे पश्चिम भागात जनता दल-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असून एमआयएम तिसरा भिडू म्हणून निवडणुकीत रंग भरणार आहे. त्यामुळे पश्चिम भागात तिरंगी लढत पाहायला मिळेल. अर्थात गेल्यावेळी पश्चिम भागात नामोनिशाण नसलेल्या भाजपने यावेळी धाडसी खेळी करण्याचा मनसुबा आखला आहे. मुस्ल‌िमबहुल असलेल्या पूर्व भागात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. नुकत्याच झालेल्या उमेवारांच्या मुलाखतीसाठी या भागातून मुस्ल‌िम महिलांची इच्छुक उमेदवार म्हणून झालेली गर्दी अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. त्यामुळे भाजपचा अनेक निवडणुकीतील विजयी रथ मालेगावातून किती धावतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. या भागात काँग्रेसचे विद्यमान आमदार असिफ शेख, माजी आमदार रशीद शेख, जनतादलचे बुलंद इक्बाल, राष्ट्रवादीचे माजी आमदार हाजी मोह. इब्राहीम (आधीचा तिसरा महाज), एमआयएमचे उपमहापौर युनुस इसा, माजी महापौर मलिक युनुस इसा (आधीचे शहर विकास आघाडी) या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

मुस्ल‌िम बहुल पूर्व भागात असे चित्र असताना कॅम्प-संगमेश्वर या पश्चिम भागात मात्र विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या भागात अस्तित्वहीन झालेले असताना शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांचा गड असलेल्या या भागात गेल्या काही दिवसात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेत एकत्र असलेले शिवसेना- भाजप इथे मात्र प्रतिस्पर्धी असणार आहेत. या भागात एकूण ४ प्रभाग असून २० नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे या वीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकणारा पक्ष किंगमेकर असणार आहे. या भागात एका एका जागेसाठी आठ ते दहा जण इच्छुक असल्याने उमेदवार निवड करताना पक्षश्रेष्ठीचा कस लागणार आहे. प्रभाग रचना बदल्याने अनेकांची अडचण झाली असून, काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही प्रभागात विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जावू शकते. अर्ज दाखल करण्याची प्रकिया सुरू झाल्यापासून पहिल्या दोन दिवसात कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले नसल्याने शेवटच्या दिवसात इच्छुकांची गर्दी होणार आहे. पुढील काही दिवसात पालिकेचा रणसंग्राम शिगेला पोहोचणार असून ११ मे रोजी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.


भाजपमधील वाद मिटला!

गेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने नेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वात यश संपादन केले आहे. तर शहरात महानगराध्यक्ष नगरसेवक सुनील गायकवाड यांनी आपला प्रभाव कायम ठेवला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर या दोघांमध्ये झालेल्या कुरबुरीमुळे भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले होते. यामुळे काही दिवस संभ्रमाचे वातावरण झाले होते. अखेर मालेगावचे भाजप प्रभारी नरेंद्र पाटील यांच्या मध्यस्थीने दोघांमधील वाद कमी झाल्याने पुन्हा नव्या दमाने कामाला लागले आहेत.

दोन दिवसांत २४ अर्ज दाखल

मालेगावत महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, बुधवारी एकूण २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली. मंगळवारी ३ अर्ज दाखल झाले होते. बुधवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक १६ अर्ज काँग्रेसच्या उमेदवारांचे आहेत. तसेच प्रभाग १४, १६, १८, १९, २०, २१ येथे एकही अर्ज दाखल झालेला नाही. ६ मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा अनुभवा ‘हॅपी स्ट्रीट’ची धमाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुमचं टेन्शन खल्लास करत तुम्हाला रीलॅक्सेशन देण्यासाठी ‘मटा’मार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांचा भाग असलेला ‘हॅपी स्ट्रीट्स’ तुम्हाला देणार आहे धमाल करण्याची अनोखी संधी. सेलिब्र‌िटींच्या खास उपस्थितीत ‘हॅपी स्ट्रीट्स’चा शुभारंभ होणार आहे. तर मग तयार राहा या रविवारी म्हणजेच ७ मे ला ‘फुल टू धमाल’ करण्यासाठी.

विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची नाव नोंदणी करण्याची गरज नाही. तुम्हाला केवळ रविवारी सकाळी ७.३० ते ९.३० यावेळेत कॉलेजरोडवर उपस्थित राहायचं आहे. एकूणच काय टेन्शन, तणाव आणि धावपळ हे टाळून तुम्हाला रस्त्यावर एन्जॉय करण्याची संधी ‘मटा’ देणार आहे. या रस्त्यावर सुरू असणाऱ्या विविध अॅक्टिव्ह‌िटीज््मध्ये सहभागी होऊन तुम्ही आनंद लुटू शकता. यावेळेत मॉडेल कॉलनी सर्कल ते बिग बझार सर्कल दरम्यानचा रस्ता फक्त आणि फक्त तुमचा असणार आहे.

मॉडेल कॉलनी सर्कलजवळ झुंबा, सेलिब्र‌िटी इंटरअॅक्शन तसेच तेसच ड्रॅगन डान्स होणार आहे. डॉन बॉस्को सर्कलवर हास्यक्लब, एचपीटी कॉलेज गेट ते बीवायके कॉलेज गेट यादरम्यान शिल्पकला, परफॉर्मिंग आर्ट आणि पेंटिंग एग्झिबिशन असणार आहे. विजू सर्कलला ढोल पथक तर एसके रेनबो कलर लॅब ते पंचम हॉटेल या भागात ‘बचपन गली’ असणार आहे. बिग बझार सर्कलला रांगोळी स्पर्धा, बासरी वादन तसेच गिटार वादन होणार आहे.

‘बचपन गलीत’ होणार धूम

बचपन गलीमध्ये लहान मुलांचे गेम्स व मॅस्कॉट्सही असणार आहेत. ज्या मुलांना स्केटिंगची आवड आहे त्यांनी स्केटिंग घेऊन यावे. कॉलजरोडवर होणाऱ्या हॅपी स्ट्रीट मध्ये राजू दाणी आणि ग्रुपतर्फे, नेल आर्ट, मेहंदी, फेस पेंटींग, कॅनव्हास पेंटींग, शॉपिंग बॅग मेकिंग, स्केच आर्ट, अॅबस्ट्रॅक्ट पेंटींग इत्यादी प्रकार सादर केले जाणार आहे. या वेळी उपस्थितांना हे प्रकार करुन घेता येतील. यावेळचे खास आकर्षण राहुल आंबेकर यांचा रॉक बॅण्ड शो होणार आहे. यावेळी इंड‌ियन क्लासिकल व वेस्टर्न क्लासिकल प्रकार सादर केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदास्वच्छतेसाठी मिळेना ठेकेदार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने गोदावरीच्या स्वच्छतेचा विषय प्राधान्याने घेतला असून, खासगी ठेकेदारामार्फत गोदावरी नदीतील पानवेली काढण्यासह केरकचरा काढून नदी स्वच्छतेसाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी गोदावरी नदीपात्राचे चार भागात विभाजन करण्यात आले आहे. त्यावर ८५ लाखांचा प्रस्ताव‌ित खर्च गृहीत धरण्यात आला आहे. परंतु, गोदावरीच्या स्वच्छतेसाठी दोनदा निविदा काढूनही ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. बुधवारी ठेकेदारांची प्री-ब‌िड बैठक झाली. त्यात तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला.

महापालिकेने गोदावरी नदीतील पानवेली, प्लास्ट‌िक, केरकचरा काढून नदीपात्र स्वच्छ ठेवण्याचे काम ठेकेदारामार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. यांत्रिक बोटींऐवजी मनुष्यबळाच्या मदतीने हे काम केले जाणार असून, त्यासाठी गोदावरी नदीपात्राचे चार विभाग करण्यात आले आहेत. त्याचे स्वतंत्र काम दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आनंदवली ते चोपडा लॉन्स पूल, दुसऱ्या टप्प्यात चोपडा लॉन्स पूल ते होळकर पूल, तिसऱ्या टप्प्यात होळकर पूल ते कप‌िला गोदावरी संगम, कपिला गोदावरी संगम ते दसक पंचकपर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने दोन मह‌िन्यांपूर्वीच निविदा काढली होती. परंतु, पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. परंतु दुसऱ्या निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनावर तिसऱ्यांदा निविदा काढण्यात वेळ आली आहे. त्यासाठी येत्या १० मेपर्यंत ठेकेदारांना निविदा ऑनलाइन भरता येणार आहेत. आरोग्य विभागाने बुधवारी इच्छुक ठेकेदारांची प्री-बिड बैठक घेतली. त्याला ठेकेदारांची भरपूर उपस्थिती आवश्यक असताना केवळ तीनच ठेकेदारांनी हजेरी लावली.


चार भागांमुळे अडचण

महापालिकेने गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी चार टप्पे केले आहेत. तसेच चारही टप्प्यांसाठी स्वतंत्र ठेकेदाराकडून निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक टप्प्याला साधारण वीस लाख रुपयेच येतात. तर संबंधित काम हे यांत्रिकीऐवजी मनुष्यबळाद्वारे केले जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारांची अडचण वाढली असून, नफ्या-तोट्याचा अंदाज बांधून या ठेक्याला प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा ठेकेदारांमध्ये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात सोळा टक्के उपयुक्त जलसाठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांत ६२.८७ दशलक्ष घनमीटर म्हणजे केवळ १६.८६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा साठा एक टक्के कमी झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे ऐन मे महिन्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील बारा मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी लाटीपाडा, मालनगाव, जामखेडी, कनोली, बुराई, करवंद, अनेर सुलवाडे या आठ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत उपयुक्त जलसाठा आहे. तर अमरावती, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी या चार प्रकल्पांत उपयुक्त जलसाठ्याचे प्रमाण नगण्य आहे. अक्कलपाडा वाडीशेवाडी प्रकल्पातून मार्च महिन्यात नदी काठावरील गावांसाठी पाणी सोडण्यात आले होते. अक्कलपाड्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ऐंशीपेक्षा अधिक तर वाडीशेवाडी प्रकल्पातील पाण्यामुळे वीसपेक्षा अधिक गावांची तहान भागली होती. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यातील गावांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील पंचायत समितीच्या सभांना तीन महिन्यांपासून गैरहजर राहणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा निकाल नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयाने दिला आहे. दि. २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना हे सदस्य गैरहजर राहिल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत नुकताच निकाल देण्यात आला असून, या सदस्यांमध्ये विद्यमान सभापतींचा समावेश असल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

धडगाव येथील पंचायत समितीचे सदस्य तथा विद्यमान सभापती काळूसिंग सुन्या पाडवी, सदस्या मिसरीबाई गोविंद पाडवी, कविता तानाजी पावरा, देवजी पारशी वळवी, गौतम दशरथ वसावे हे पाच सदस्य २३ मार्च ते २६ जून २०१६ दरम्यान आयोजित पंचायत समितीतील सभांना वारंवार गैरहजर राहिले होते. याबाबत सदस्य रवींद्र पराडके यांनी सदस्यांविरुद्ध अपात्र करण्यात यावे, या मागणीची तक्रार नाशिक विभागीय आयुक्तांकडे केली होती. नुकतीच याबाबत सुनावणी नाशिक विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात घेण्यात आली. सभांना गैरहजर राहिल्यामुळे या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. हा निकाल नाशिक विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या न्यायालयाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवेचे मनपाकडे हस्तांतरण करू नये

$
0
0

शिवसेनेच्या सतीश महालेंचे धुळे महापौरांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे मनपाकडे हस्तांतरण करू नये, असा महापालिकेने महासभेत ठराव पारित करून केंद्र व राज्य सरकारकडे पाठवावा, अशी मागणी शिवसेना महानगरप्रमुख सतीश महाले यांनी केली आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन नुकतेच महापौर कल्पना महाले यांना दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बहुतांश दारू विक्रीची दुकाने १ एप्रिलपासून बंद झाली आहेत. मात्र, आदेशानंतर राष्ट्रीय व राज्य महामार्ग हा शहरातील जाणारे रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मोठ्या प्रमाणात सपाटा लागलेला आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. परंतु, धुळे महानगरामध्ये कुठल्याही परिस्थितीत नवीन दारू दुकाने उघडण्यात येऊ नये. याची दक्षता म्हणून धुळे महानगरातून जाणारे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग मुंबई-आग्रा व सुरत-नागपूर महामार्ग हे धुळे महापालिकेकडे वर्ग करण्यात येऊ नये. तसेच यासंदर्भात तातडीने महासभेत ठराव करून सरकारकडे पाठविण्यात यावा, अशी मागणी यात केली आहे. जेणेकरून धुळे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणूनच कायम राहतील. त्यामुळे महापालिकेला या दोन्हीही महामार्गांवर वर्षाकाठी येणारा ५ ते ६ कोटी रुपयांचा नूतनीकरणाचा खर्च पेलावा लागणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी गंगाधर माळी, सुनील बैसाणे, दिनेश पाटील, डॉ. माधुरी बाफना, संजय गुजराथी, प्रशांत श्रीखंडे, अॅड. राजू गुजराथी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात नवीन रेल्वे द्यावा

$
0
0

पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंकडे मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील रेल्वेविषयक प्रश्नांबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भुसावळ-सुरत-मुंबई या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. शिवाय मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केल्याबद्दल रावल यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

रावल हे दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी नुकतीच याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली आहे. या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. यावेळी रावल यांनी जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यात भुसावळ-नंदुरबार-सुरत-मुंबई या मार्गावर ‘साने गुरुजी एक्स्प्रेस’ ही नवीन गाडी सुरू करण्याची मागणी केली. तसेच अमृतसर-सीएसटी एक्स्प्रेसला धुळ्यासाठी टू-टायर वातानुकूलित डबा जोडण्यात यावा. डेक्कन ओडिसी या विशेष गाडीत काय सुधारणा करता येईल, यावरही चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या वाढीसाठी महाराजा एक्स्प्रेसच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अशी गाडी सुरू करता येईल काय? याबाबत चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांना अडचण येता कामा नये

$
0
0

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण येता कामा नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच खरीप हंगामाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी विकास अधिकारी बी. व्ही. बैसाणे, मोहीम अधिकारी आर. एम. नेतनराव, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक आर. डी. पाटील व तालुका स्तरावरील सर्व निरीक्षक उपस्थित होते. या वेळी पेरणी क्षेत्र नियोजन, बी-बियाणे पुरवठा नियोजन, रासायनिक खते पुरवठा नियोजन व खत विक्रीचे नियोजन याबाबतही या बैठकीत आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक सांगळे यांनी, जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ७५ हजार ६०० हेक्टर असून, येत्या खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४ लाख ५८ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी कापूस, ज्वारी, बाजरी, भात, मका, मूग, सोयाबीन, उडीद, तूर व भुईमूग या प्रमुख पिकांसाठी एकूण ४७ हजार २४३ क्विंटल विविध पिकांचे व ९.८५ लाख कापूस बियाणे पाकिटे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाबीज संस्थेकडून १८ हजार ४२ क्विंटल विविध पिकांचे व खासगी कंपनीमार्फत २८८१६ क्विंटल बियाण्यांचा समावेश आहे. तसेच कापूस बियाण्याच्या एकूण ९.८५ लाख पाकिटांची आवश्यकता असून, यामध्ये महाबीजकडून दहा हजार तर खासगी कंपनीकडून ९.७५ लाख पाकिटे पुरवठा करण्याचे नियोजन आहे, याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाआरोग्य शिबीर आजपासून

$
0
0

धुळे : राज्य सरकारतर्फे नंदुरबार शहरातील मोदी मैदानावर आज, रविवारी महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन होणार आहे. शिबिरात दोन हजार तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांची तपासणी करणार आहेत. शनिवारी शिबिरस्थळी सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकाऱ्यांनी घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन तरुणांचा विहिरीत बुडून मृत्यू

$
0
0

धुळे : धुळे तालुक्यातील कुसूंबा गावालगत असलेल्या भवानी माता मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत गावातील आठ तरुण शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी सागर उर्फ धर्मराज सूर्यकांत शिंदे (वय २०, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) आणि कमलेश पंडित चौधरी (वय १९, रा. कुसूंबा ता. जि. धुळे) हे दोन्ही विहिरीत बुडून मृत झाले आहेत. मात्र, विजेचा शॉक लागल्याचा प्राथमिक अंदाज सोबत पोहत असलेल्या मित्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नंदुरबारला लवकरच वैद्यकीय कॉलेज

$
0
0

महाआरोग्य शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पहिल्या दिवशी विक्रमी गर्दीचा अंदाज

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार शहरात लवकरच शासकीय वैद्यकीय कॉलेज कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे महाआरोग्य शिबिर ऐतिहासिक असून, नंदुरबार जिल्ह्यातील या शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सध्या राज्याकडून वीस खाटांचे रुग्णालय सुरू करण्यात येत असून, केंद्राच्या माध्यमातून पन्नास खाटांचे रुग्णालयदेखील सुरू होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांना आता मुंबई, पुण्यात उपचार घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.

खान्देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, तसेच आदिवासी भागातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी दि. ३० एप्रिल ते २ मेपर्यंत तीनदिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील मोदी मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय उच्चशिक्षण मंत्री गिरीश महाजन, नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार हिना गावित, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघूवंशी, माजी वैद्यकीय मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार उदयसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री बोलतांना म्हणाले की, राज्यात आतापर्यंत झालेल्या महाआरोग्य शिबीरांपैकी नंदुरबार शहरातील आरोग्य शिबिर हे ऐतिहासिक झाले आहे. शिबिरात ज्या रुग्णांनी तपासणी केली आहे त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक, मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरातील डॉक्टरांची आवश्यकता असल्यास सरकारकडून मोफत उपचार देऊन बरे केले जाईल. नंदुरबार जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंतच्या नागरिकांनी महाशिबीरात तपासणीसाठी हजेरी लावली आहे. या जिल्ह्यासाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी सदैव प्रयत्न करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘संख्यात्मक आणि गुणात्मक आघाड्यांवर सर्वोत्तम’

खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबिर हे संख्यात्मक आणि गुणात्मक या आघाड्यावर सर्वोत्तम ठरल्याचा दावा वैद्यकीय उच्च शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ‘मटा’शी बोलताना केला. त्यांनी सांगितले की, महाआरोग्य शिबिरात सकाळपासूनच गर्दी झालेली दिसून आली. आतापर्यंत राज्यात वीस जिल्ह्यांमध्ये असे शिबिरे घेण्यात आली मात्र सर्वात जास्त्‍ा प्रतिसाद हा सातपुडा भागातील लोकांनी दिला आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी अकरा वाजेपर्यंत शिबिरात एक लाखांहून अधिक नागरिकांनी तपासणीसाठी हजेरी लावली. तर दोन लाख रुग्णांपेक्षा जास्त तपासणीसाठी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे गर्दीचा अंदाज लावणे कठीण होत आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याशेजारी असलेल्या गुजरात आणि मध्यप्रदेशातूनदेखील हजारो नागरिक शिबिरात तपासणीसाठी आले होते.

रुग्ण तपासणीचे नऊ डोम

याप्रसंगी २० प्रमुख आजारांबरोबरच ‘आयुष’मधील उपचार येथे असल्याने रुग्णांना आपल्या गरजेनुसार उपचार घेण्यासाठी त्या-त्या डोममध्ये गर्दी करत होते. आयुषसाठी असलेल्या डोममध्ये आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आदी वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित राहून रुग्णांना उपचार करत होते. यासाठी कर्मवीर व्यं. ता. रणधीर आयुर्वेद कॉलेज, शिरपूर, श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक कॉलेज आणि आर. डी. चोरडिया हॉस्पिटल, चांदवड (नाशिक) येथील डॉक्टर उपस्थित होते. प्रत्येक डोममध्ये प्रामुख्याने ग्रंथीविकार, मेंदुविकार, मनोविकारर, बीएमडी (हाडाचाठिसूळपणा) श्वसनविकार, हृद्यविकार, कर्करोग त्वचाविकार, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, मॅमोग्राफी, कान-नाक-घसा यासह शस्त्रक्रियासाठीच्या विविध आजारांसाठीच्या तपासणी करण्यात येत होत्या. यासाठी मुंबई मधील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट, केईएम, जे. जे. हॉस्पिटल, हिंदुजा, लीलावती, पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव येथील नामांकित डॉक्टर, विविध जिल्हा रुग्णालयांची वैद्यकिय तज्ज्ञांचे पथक हजर राहून उपचार करत होते. कोट्यवधी रुपयांची औषधे कंपन्या व रुग्णालयांनी

उपलब्ध केल्याचे समन्वयक रामेश्वर नाईक यांनी सांगितले. शस्त्रक्रिया नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचे व त्याद्वारे कोणत्याही गंभीर व मोठ्या आजारांची निश्चिती झालेल्या रुग्णांची नोंद घेऊन त्याचा संगणकीय डाटा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दंतरुग्णांसाठी मोबाइल व्हॅन

येथील दंतरोग कॉलेज, धुळे, जिल्हा रुग्णालय धुळे, एसएमबीटी डेन्टल हॉस्पिटल संगमनेर (अहमदनगर) यांचे पथक दंत रुग्णांसाठी सज्ज होते. त्यासाठी विश्वास पाटील ओरल हेल्थ मोबाइल युनिट हजर होते. येथील ३ मोबाइल व्हॅनमधील दंत चिकित्सायंत्रणेद्वारे जवळपास २८ डेन्टीस्टचे पथक तात्काळ तपासणी व उपचार करत होते. याचबरोबर नेत्ररुग्ण तपासणीची व रुग्णांना मोफत चष्मा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात दोनशे किलो भांग जप्त

$
0
0

धुळे : इंदूरकडून धुळ्याकडे खासगी कारमधून भांगची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी वाहनाची तपासणी केली असता सोमवारी (दि. १) सायंकाळी एका इंडिगो (क्र. एमएच ३९ जे १४७८) कारमधून कोरड्या भांगची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या गाडीतून दोनशे किलो कोरडी भांग जप्त करण्यात आली असून, याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांकडून गाडीसह ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धार्थ रवींद्र राणा (रा. माधवपुरा पालाबाजार) आणि त्याचा जोडीदार राजेशभाऊ यांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील राजेश हा पळून जाण्यात यशस्वी झाला. चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनचे प्रेमराज पाटील यांच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर लिपिक बेडसेंचे निलंबन

$
0
0

शिक्षण उपसंचालकांकडून कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी गेल्या काही वर्षापासून खासगी व्यक्तीची कार्यालयातील कामांसाठी नियुक्ती केली होती. तर गेल्या काही वर्षांपासून बनावट दस्तऐवज तयार करून शिक्षक नियुक्तीचे प्रस्ताव मंजूर केले होते. तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक कागदपत्रांची अफरातफर करून आर्थिक फायदा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपिक बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ‘मटा’नेही याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. तसेच बेडसे यांच्याविरोधात आमदार अनिल गोटेंसह शिक्षक संघटना व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी लिपिक रवींद्र बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यात लाच प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. या कार्यालयातील लिपिक रवींद्र बेडसे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील पत्रव्यवहार, आमदार अनिल गोटे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केलेली तक्रार तसेच अनुसूचित जाती जमाती संघटना, नारायण पाटील, परशुराम पाकळे, संग्राम पाटील यांच्या लेखी तक्रारीची दखल घेत लिपीक बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत त्यांना जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात नेमण्यात आले आहे.

बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून जयहिंद शाळेतील शिक्षिका पुष्पा पाटील यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणदेखील सुरू केले होते. याप्रकरणी बेडसे यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आता तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय खेळाडूंना सवलतीचे गुण मिळावेत

$
0
0

धुळे : सरकार निर्णयानुसार ४२ खेळांव्यतिरिक्त इतर शालेय खेळांना सवलतीचे गुण नाकारल्याने याबाबत इतर शालेय खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तरी सरसकट सर्व शालेय खेळाडूंनाही सवलतीचे गुण मिळावेत याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा प्रशासनाला खेळाडूंनी दिले आहे.

निवेदनात, इतर खेळाडूंप्रमाणे आम्ही शालेय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन प्राविण्य मिळविले आहे. सरावासाठी अभ्यासाचा वेळ खर्च केला आहे. परीक्षेत कमी गुण मिळाले तर इतर मुले आमची अवहेलना करतील, यासाठी तत्काळ निर्णय घ्यावा, असे नमूद केले आहे.

यावेळी निवेदन देतांना जिल्ह्यातील खेळाडू ममता फटकाळ, दिपाली जोहरी, हर्षदा पाटील, रोहित गायकवाड, अश्विन पाटील, सोनू राजपूत आदी खेळाडू तथा क्रीडा शिक्षक मिनलकुमार वळवी, पंकज पाठक, रविंद्र सोनवणे, राजेश शहा, प्रशिक्षक राकेश माळी, जगदीश वंजारी, जितेंद्र माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरपूर नगर परिषदेला ३ कोटींचे बक्षिस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरपूर नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये ३ कोटी रुपयांचे बक्षिस देऊन गुरुवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांना मुंबई येथे गौरविण्यात आले.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेमार्फत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली जात असून, सुरुवातीस संपूर्ण महाराष्ट्रात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत शिरपूर नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर सातत्याने अतिशय चांगले काम नगर परिषदेमार्फत सुरू आहे. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार दि. २० एप्रिलला नगरविकास दिन म्हणून साजरा करण्यात आला होता. त्याबाबत पहिल्या

नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट ब वर्ग नगर परिषदांमधून शिरपूर वरवाडे नगर परिषदेला नाशिक विभागातून प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते मुंबईला नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. याबद्दल शिरपूर शहरातील समस्त नागरिकांनी समाधान व्यक्त करत मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील, सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी धुळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी (दि. १०) बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुळ्यात येत असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासह पांझरा नदी काठावरील दुतर्फा रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली. याशिवाय इतरही कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गोटे यांनी दिली आहे.

साक्री रोडलगत सिंचन भवनामागे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तसेच ७५ कोटी १६ लाख रुपये खर्चाच्या पांझरा काठावरील दोन्ही बाजूच्या रस्ते कामाचाही शुभारंभ यावेळी करण्यात येणार असल्याचे आमदार गोटे यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ताकामांमुळे दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड परिसरातील अंतर्गत रस्ते, खड्डे बुजवणे, गतिरोधकांची उंची कमी करणे, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारणे आदी कामे सुरू झाल्याने नागरिकांनी दिलासा मिळाला आहे.

प्रभाग क्रमांक १८ मधील बालाजीनगर, जुना सायखेडा रोड येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रंजना बोराडे, मीरा हांडगे, शरद मोरे व विशाल संगमनेरे या चार नगरसेवकांच्या हस्ते रस्ते कामाचे नुकतेच उद्‍घाटन करण्यात आले. याप्रसंगी सचिन हांडगे, प्रकाश बोराडे, पांडुरंग पाटील, अमजद पठाण, शाम कुमावत, बाबूराव निकम, प्रवीण कुमावत, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते. पावसाळ्याआधी काम पूर्ण होऊन येण्या-जाण्याची समस्या दूर होणार आहे.

गतिरोधकांची उंची अखेर घटविली

जेलरोडला सैलानी चौक, पंचक, महालक्ष्मीनगर आदी ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. शिवाजीनगर आणि मॉडेल कॉलनीसारख्या महत्त्वाच्या चौकातच गतिरोधक नाहीत. तेथे सतत अपघात होतात. अंतरांचा विचार न करता मागणीनुसार ठिकठिकाणी गतिरोधक टाकल्याने वाहनचालकांची हाल होत आहेत. गतिरोधकाजवळच खड्डेही आहेत. नवीन नगरसेवकांच्या पुढाकाराने गतिरोधकांची उंची नुकतीच कमी करण्यात आली आहे.

झेब्रा क्रॉसिंग

जेलरोडला वाहने वेगात धावतात. अवजड वाहनांना बंदी आहे. तसा फलक बिटको चौकात लावलेला आहे. तरीही गॅस टँकर व अन्य वाहनांना इंधन बचतीसाठी नाईलाजाने याच मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे भीमनगर, इंगळेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, सैलानी चौक येथे छोटे-मोठे अपघात होत आहेत. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे अवघड झाल्याने दसक-पंचक, महालक्ष्मीनगर, छत्रपती चौक येथे झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत.

खड्डे बुजवले

बिटको ते जेलरोड दरम्यान रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे झाले होते. रात्री वाहन चालवताना ते लक्षात येत नव्हते. छत्रपती शिवाजी चौक (सैलानी चौक) येथे पेव्हर ब्लॉक खालीवर झाले आहेत. गाडी चालवताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. छत्रपती चौकासह चरणदास मार्केट, टाकेकर वसाहत, सातभाईनगर, मोरे मळा येथील खड्डे बुजविण्यात आले आहेत.

जेलरोडचे अंतर्गत रस्ते करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परिसरात रस्त्यावर असलेले खड्डे खडी टाकून बुजवले जात आहेत. आवश्यक तेथे झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व दिले जात आहे.
- मीरा हांडगे, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घंटागाडी ठेकेदारांची पोलखोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची शहरातील नागरिकांना सक्ती करणाऱ्या महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे समोर आले आहे. महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी खत प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यात घंटागाड्यांमध्ये कचरा विलगीकरणाची व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या ठेक्यात घंटागाड्यांना ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याची अट असतानाही ठेकेदार मात्र या अटीचे सर्रास उल्लंघन करीत असताना आरोग्य विभाग त्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले असून, नागरिकांवरील कचरा विलगीकरणाच्या दंडाची कारवाई तूर्तास मागे घेतली आहे.

महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी गुरुवारी खत प्रकल्पाची पाहणी केली. महापालिकेने बुधवारपासून शहरात ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण करणे सक्तीचे केले असून, त्यासाठी चार प्रभागांची निवड केली आहे. नागरिकांनी घरातच ओला व सुका असे कचऱ्याचे वर्गीकरण करायचे असून, ठेकेदारानेही घंटागाडीत ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट करायची अट घालण्यात आली आहे. कचरा विलगीकरण केले नाही, तर नागरिकांना पाचशे, तर ठेकेदारांना पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. परंतु, महापालिकेच्या घंटागाड्यांमध्येच विलगीकरणाची व्यवस्था नसल्याच्या तक्रारी होत्या. संपूर्ण घंटागाड्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्या जात नसल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर महापौरांनी खत प्रकल्पाची पाहणी केली.

शहराला कचरा विलगीकरणाची शिस्त लावण्याच्या तयारीत असलेल्या प्रशासनासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांना खत प्रकल्पावर जाऊन तोंडघशी पडावे लागले. या ठिकाणी खत प्रकल्प पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित असला, तरी घंटागाडी ठेकेदारांच्या बनवेगिरीचा सामना खुद्द महापौरांनाच करावा लागला. घंटागाडी ठेक्यात घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट सक्तीचे केले होते. परंतु, नव्या घंटागाड्यांमध्ये अशी व्यवस्थाच नसल्याचे धक्कादायक वास्तव खुद्द महापौरांच्याच समोर आले. महापौरांनी स्वतःच तीन गाड्या तपासल्या. परंतु, एकाही गाडीमध्ये कचरा विलगीकरणाची व्यवस्था नव्हती. केवळ वॉटरग्रेस कंपनीच्या गाड्या वगळता उर्वरित गाड्यांमध्ये वर्गीकरणाची व्यवस्था नसल्याचे समोर आले. काही गाड्यांमध्ये छोटीशी चौकट ओल्या कचऱ्यासाठी करण्यात आली होती. त्यामुळे महापौरांसह गटनेत्यांचाही संताप अनावर होऊन त्यांनी जागेवरच आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांची खरडपट्टी काढली. अटी व शर्तींचे ठेकेदार पालन का करीत नाही, असा जाब विचारला. त्यावर डेकाटे यांनी दंड केला जात असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे महापौरांनी संतप्त होऊन ठेकेदारावर कारवाई करण्याचे फर्मान काढले, तसेच विलगीकरणासाठी दंडात्मक कारवाईला स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

--


कर्मचारी उघड्यावर

घंटागाडी ठेकेदारांना ठेका देताना घंटागाड्यांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोयी-सुविधा देण्याचे बंधन घातले होते. कामगारांना मास्क, गमबूट, हातमोजे यांसारखी सुरक्षेची साधने देण्याचे बंधन असताना प्रत्यक्षात कर्मचारी मात्र फाटक्या कपड्यांवरच या गाड्यांवर काम करीत असल्याचेही उघड झाले. महापौरांचा पाहणी दौरा पूर्वनियोजित असतानाही एकाही कर्मचाऱ्याकडे अशी साधने नव्हती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

--

ठेकेदारच ऐकेना

शहरातील चार ठेकेदारांपैकी दोन विभागांचा ठेका भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याला देण्यात आला आहे. वरपर्यंत पोहोच असल्याने तो अटी-शर्तींचे उल्लंघन करीत आहे. कचरा विलगीकरणातही त्याने तसेच केले असूनही त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाने कारवाईला सुरुवात केली, तर थेट मुंबईहून फोन येत असल्याने आता प्रशासनही हतबल झाले असून, कारवाई कशी करायची, हा प्रश्न पडला आहे. परंतु, महापौरांनी ठेकेदार कोणताही असो त्याच्यावर कारवाई कराच, असा पवित्रा घेतल्याने आता आरोग्य विभागाकडे लक्ष लागून आहे.

--

खत प्रकल्पात सुधारणा

खत प्रकल्प हा नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला चालविण्यासाठी दिल्यानंतर येथील कामकाजात चांगली सुधारणा झाली आहे. खत प्रकल्प सध्या पूर्ण क्षमेतेने कार्यान्वित असून, दररोज कचऱ्याचे विघटन केले जात आहे. पावणेदोन लाख टन साचलेल्या कचऱ्याचे लँडफिलिंग हे दीड वर्षात करण्याचे नियोजन सुरू केले आहे. खताचीही निर्मिती सुरू झाली असून, प्रकल्पातील दुर्गंधी काही प्रमाणात नियंत्रित झाली आहे. त्यामुळे हा एकमेव दिलासा वगळता आरोग्य विभागाचे कामकाज ढिसाळपणे सुरूच आहे.

--

घंटागाडी ठेक्यातील अटी व शर्तींचे आरोग्य अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पालन करावे. अटी व शर्तींचे पालन केले नाही, तर ठेकेदारांवर कारवाई करावी. घंटागाड्यांमध्ये विलगीकरणाची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत नागरिकांवर दंडात्मक कारवाई मात्र प्रशासनाने करू नये.

-रंजना भानसी, महापौर

--

मटा भूमिका

स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकची अभूतपूर्व घसरण कशी झाली याची चर्चा चालू असतानाच आपल्या आदर्श घंटागाड्यांच्या ठेकेदारांनी कचरा विलगीकरणाची यंत्रणाच धाब्यावर बसविल्याचे उघड झाले, हे बरे झाले. दस्तुरखुद्द महापौरांसमोरच ठेकेदारांची बनवेगिरी पुढे आली अन् हे महाशय चक्क आपल्याच पक्षाचे निघावेत हे पाहून महापौरही खजील झाल्या असतील. ज्यांच्या केवळ नावावर सत्ता मिळाली त्या पंतप्रधान मोदींचा स्वच्छतेचा नाराही प्रामाणिकपणे पाळला जात नसल्याचे चित्र निर्माण होणे कोणाच्याच हिताचे नाही. पक्ष याची योग्य दखल घेईल अन् संधीसाधूंपेक्षा जनहिताला महत्त्व देईल, अशी अपेक्षा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक्स्प्लोर’द्वारे मिळणार करिअरविषयी मार्गदर्शन

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परीक्षा संपून सध्या सुटीचा काळ सुरू असला तरी कोणत्या क्षेत्रात करियर करावे हा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर उभा आहे. या संदर्भात विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनासाठी ‘एक्स्प्लोर २०१७’ या करियर प्रदर्शन व सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. कुसुमाग्रज स्मारक येथे ६ व ७ मे रोजी सकाळी १० ते ७ या वेळेत सेमिनार होणार आहे. पूर्णतः विनामूल्य असलेल्या या सेमिनारमध्ये जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हेदेखील मार्गदर्शन करणार आहेत.

वेगवेगळ्या १०० करियरविषयी इत्यंभूत माहिती या सेमिनार व प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. अशा प्रकारचे देशातील पहिले प्रदर्शन असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. सेमिनारमध्ये इंजिनीअरिंग, डिझाईन, आर्टस, सिव्हिल सव्हिर्सेस या क्षेत्रातील नामवंत वक्ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सेमिनार सकाळी १० ते दुपारी एक या वेळात होणार आहे. तर दुपारच्या सत्रात दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत होणार आहे.

तज्ज्ञ करणार मार्गदर्शन

प्रदर्शन व सेमिनारचे उद्‍घाटन शनिवारी (दि. ६) सकाळी १० वाजता होणार आहे. त्यानंतर ‘यशस्वी करियर कसे निवडाल?’ याविषयी बी. राधाकृष्णन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दहावी, बारावीनंतरचे करियर याविषयी करिअर कॉर्नरचे ऋषिकेश हुंबे, डिझाईन करियरमधील संधी या विषयावर समीर पारकर, इंजिनीअरिंगमधील संधी विषयावर डॉ. परिमल मांडके मार्गदर्शन करणार आहेत. तर ‘पदवीनंतरचे करियर’ याविषयी ऋषिकेश हुंबे, डिझाईन करियरमधील संधी नवीन बागलकोट, सिव्हील सर्व्हिसेस, एमपीएससी, यूपीएससीमध्ये करियरविषयी कोंकण डिव्हिजनच्या म्युनिसिपल अॅडमिन मृदुला अंडे रविवारी (दि. ७) मार्गदर्शन करणार आहेत.

करियरविषयी इंटरनेटवर माहिती उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांना करियर ठरविणे अवघड जाते. या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही एक्सप्लोर २०१७ चे राज्यभरात १० ठिकाणी आयोजन केले आहे. या उपक्रमाचा विद्यार्थी आणि पालकांनी जरूर लाभ घ्यावा.
- ऋषिकेश हुंबे, आयोजक व संस्थापक, करियर कॉर्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images