Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

चारशे दुचाकीस्वारांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेटचा वापर न करता वाहन चालवणाऱ्या जवळपास ४०० दुचाकीस्वारांवर या आठवड्यात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. बेशिस्त रिक्षाचालकांवरदेखील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेल्मेटचा वापर करीत नसलेल्या दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात येते. या आठवड्यात वाहतूक शाखेने तब्बल ४०० दुचाकीस्वारांवर कारवाई केल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले. शनिवारी जवळपास ५० दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. शुक्रवारी हा आकडा ६० इतका होता. त्यापूर्वी तीन दिवसांत १९६ दुचाकीस्वारांवर कारवाई झाली होती. या आठवड्यात जवळपास ४०० दुचाकीस्वारांवर कारवाई झाल्याचे बजबळे यांनी स्पष्ट केले. वाहतूक विभाग सतत कारवाई करतो. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करायला हवा, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतो. मात्र, वाहतुकीच्या इतर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरदेखील कारवाई होते, असे बजबळे यांनी स्पष्ट केले.

दुचाकी अपघातात अनेक मृत्यू डोक्याला मार लागून होतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर दुचाकीस्वारांनी करावा, यासाठी कारवाईला वेग दिला जात असल्याचे बजबळे यांनी स्पष्ट केले. गत मंगळवारी ११२ दुचाकीस्वारांवर हेल्मेटचा वापर न केल्याने कारवाई झाली होती, तर याच दिवशी २७, बुधवारी ५७, गुरुवारी ५७ आणि शुक्रवारी तसेच शनिवारी ५० पेक्षा जास्त दुचाकी जप्त करण्यात आल्या. हेल्मेटचा वापर न केल्यास वाहनचालकाकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मात्र, त्या वेळी वाहनचालकाने पैसे भरण्यास असमर्थता दर्शवली तर वाहन जप्त करण्यात येते. वाहनचालकाने तडजोड शुल्क भरल्यानंतरच त्यास वाहन परत करण्यात येते. हेल्मेटचा वापर न करणाऱ्यांविरोधात नाशिक-पुणे हायवे, गंगापूर रोड, कॉलेज रोड, इंदिरानगर अंडरपास, मुंबई नाका अशा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संघर्षयात्रा म्हणजे प्रस्थापितांचे ढोंग

$
0
0

प्रा.शरद पाटील, संजय शर्मा यांचे पत्रक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे-नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पैशांवर उभे राहिलेल्या सहकारी संस्था उद्ध्वस्त करून खासगी प्रतिष्ठाने उभी करणाऱ्या सत्तेच्या ठेकेदारांना सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांचा कळवळा आला आहे. त्यांची ही संघर्षयात्रा म्हणजे निव्वळ ढोंग असल्याचे पत्रक माजी आमदार प्रा. शरद पाटील व भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजय शर्मा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना उद्देशून या पत्रकात त्यांनी अकरा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात धुळे तालुक्यासह जिल्ह्यात बंद पडलेले सहकारी उद्योग, शिंदखेडा सहकारी, संजय सहकारी, पांझराकान सहकारी कारखान्यांचा व सूतगिरण्यांच्या उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा बँकेतून कॉटन फोल्डरच्या नावाने दिलेले गेलेले 90 कोटीचे कर्ज, जिल्हा बँकेचे जळीत प्रकरण, जिल्हा परिषदेत वीस वर्षांत भास्कर वाघाने केलेला अपहार, त्यातील लाभार्थी नेते, एकाधिकार तूर खरेदी केंद्रावर बाजार समितीच्या कोणत्या संचालकांना फायदा झाला याची नावे जाहीर करावीत अशा ११ प्रश्नांचा या पत्रकात समावेश आहे. संघर्षयात्रा शेतकऱ्यांप्रती कळवळा

दाखवून काढलेल्या संघर्षयात्रेच्या निमित्ताने या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असेही प्रा. पाटील व शर्मा यांनी पत्रकात नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशाकडून एक लाखाचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

अहमदाबाद-धुळे एसटी बसमध्ये एका प्रवाशाच्या ताब्यात प्रतिबंध असलेला सुमारे १ लाख रुपये किमतीचा हिरा गुटखा व सुगंधित तंबाखूचे चार पोते आढळून आल्याने मंगळवारी (दि. १८) साक्री पोलिसांकडून ते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी संशयित रमेश रामचंद्र पाटील यास पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदाबाद-धुळे या एसटी बसमधून (एमएच २०, बीएल ४१३१) प्रतिबंध असलेला गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती साक्री पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर साक्री शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर एसटी बसची तपासणी करण्यात आली. त्यावेळी रमेश पाटील यांच्या ताब्यात सुमारे १ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही कर्जमाफी द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सकारात्मक निर्णय घेऊन कर्जमाफी देतांना फक्त थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊ नये, तर जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांनाही याचा लाभ मिळायला हवा, असे मत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली नाही, तर आगामी कालावधीत नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरीही कर्ज थकित ठेवण्यावर भर देतील. यामुळे वित्तीय व्यवस्थेवर विपरित परिणाम होईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत पहिल्या एटीएम केंद्राचे उद््घाटन करून शेतकरी सभासदांना रुपे डेबिट कार्ड वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज पाटील उपस्थित होते. सर्व शाखा 'सीबीएस'अंतर्गत मुख्य कार्यालयातील डाटा सेंटरशी जोडल्या आहेत. तसेच सर्व ९० शाखांमध्ये शेतकऱ्यांना एनईएफटी, आरटीजीएस, एबीबी, एसएमएस अलर्ट सेवा प्रदान करण्यात येत आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. शेतकरी खाते धारकदेखील कॅशलेस व्यवहारात पुढे यावा, या उद्देशाने जिल्हा बँकेने सर्व ५३ हजार कर्जदार शेतकऱ्यांना रुपे किसान क्रेडिट कार्डवाटपाचे तसेच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जिल्हा बँकेचे एटीएमचे नियोजनाचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

परभणी जिल्हयातील पूर्णा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर गावातील जातीयवादी मानसिकता असणाऱ्या जमावाने अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे स्त्री-पुरुष व बालकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे गुरुवारी (दि. २०) मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला.

याप्रकरणी प्रशासनाने हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अटक न करता मिरवणुकीतील जखमीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितांना तात्काळ अटक करण्यात यावी. तसेच अल्पसंख्यांकाना संरक्षण देण्यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात यावे, दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचे सामाजिक ऑडीट करण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले. यावेळी दलित पँथरचे सिद्धार्थ वाघ, विशाल थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारूनिर्मिती कारखान्यांवर छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील पारोळा रोडलगत भरवस्तीत बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांना समजले. यावर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पथकाने छापा टाकून मद्य तयार करण्याचे साहित्य व हजारो रुपयांचे स्पिरिटपासून तयार केलेले विषारी मद्य जप्त करून तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मद्यविक्री बंद झाल्यानंतर धुळे जिल्ह्यासह शहरात बनावट मद्यविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळेच शहरात मद्याची सर्रासपणे विक्री होत आहे. याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांना मिळताच त्यांनी पारोळारोडवरील एका घरात बनावट मद्य तयार करण्यासाठी लागणारे साहित्य व सुमारे दोनशे लीटर बनावट दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात घटनांवर पोलिस विभागातील एलसीबी विभागाकडून लक्ष ठेवण्यात येते. मात्र अवैध मद्यनिर्मितीचा कारखाना सुरू असल्याचे समजताच एलसीबी विभागाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शेतकऱ्यांचा अंत पाहू नका’

$
0
0

धुळे : सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये संपूर्ण कर्जमाफी करून राज्य सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर आता कर्जमाफी द्यावी. तसेच शेतीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

‘संवादपर्व’ अंतर्गत खासदार सुप्रिया सुळे गुरुवारी (दि. २०) जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी धुळे शहरातील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, शेतकरी आत्महत्या विषय गंभीर असल्याचे सांगितले. आतापर्यंत कधी नव्हे एवढे गंभीर चित्र असताना सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाही. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, महापौर कल्पना महाले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेचे सभासद असलेल्या ६,३७१ शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर झाला आहे. या शेतकऱ्यांना २ कोटी ८८ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी दिली आहे.

यावेळच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे झालेल्या नुकसानीपोटी ६,३७१ शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील ५,८५१ शेतकऱ्यांना २ कोटी ६७ लाख ९८ हजार १८ रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील ५२१ शेतकरी सभासदांना २० लाख १६ हजार ६३४ रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. पीक विम्याची रक्कम विमा कंपन्यांकडून बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत बँकेतून शेतकरी सभासदांच्या बचत खात्यात ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

दरम्यान मंजूर करण्यात आलेला विमा हा फक्त खरीप हंगामासाठी आहे. खरीप हंगामासाठी धुळे जिल्ह्यातून रिलायन्स इन्शुरन्स कंपनीला तर नंदुरबार जिल्ह्यासाठी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आले होते. दरम्यान, पीक विम्याची रक्कम खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे शिक्षणाधिकारी कार्यालय रामभरोसे

$
0
0

वरिष्ठ लिपिकाने नेमला खासगी व्यक्ती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे असल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रवींद्र बेडसे यांनी स्वत:ची कामे करण्यासाठी कार्यालयात खासगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. याबाबत शिक्षण विभागाला कोणतीही कल्पना त्यांनी दिली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करून लिपीक रवींद्र बेडसे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते संग्राम पाटील यांनी दिले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेल्या महिन्यांत शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली. त्यानंतर रिक्त जागेवर प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती होणे अपेक्षित असताना, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील विस्तार अधिकारी शांताराम दुसाणे यांच्याविरोधात आधीच फौजदारी गुन्हे दाखल असताना त्यांच्याकडे उपशिक्षणाधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत लिपीक रवींद्र बेडसे यांनी स्वत:च्या सोयीसाठी कार्यालयीन कामकाजासाठी खासगी व्यक्तीची कार्यालयात नेमणूक करून दररोज या व्यक्तीकडून कार्यालयीन वेळेत कामकाज करून घेत आहे, असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे रविवारी आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही संबंधित व्यक्ती कार्यालयात काम करताना दिसते, असेही यात नमूद केले आहे. शासनाची परवानगी नसतांना एक लिपिक स्वत:च्या सोयीसाठी खासगी कर्मचारी नियुक्त करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संग्राम पाटील यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याविषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रभारी शिक्षणाधिकारी यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणाचे पाणी देण्यास विरोध

$
0
0

साक्री तालुक्यातील मालनगाव धरणाबाबत शेतकऱ्यांसह समिती आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाला शनिवारी (दि. २२) धरणालगतच्या गावातील शेतकऱ्यांसह मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीने तीव्र विरोध केला. तसेच याविरोधात आंदोलन करण्याचा इशारादेखील या आंदोलकांनी प्रशासनासह सिंचन विभागाला दिला आहे.

मालनगाव धरणातून साक्री शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव पाठबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला. मात्र, मालनगाव धरणाच्या लाभदायक क्षेत्रातील २५ गावातील शेतकऱ्यांनी या प्रस्तावास जोरदार विरोध दर्शवित मालनगाव धरण बचाव संघर्ष समितीकडून आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात मालनगाव रोपवाटिकेत नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत साक्री शहराला पिण्यासाठी पाणी देण्यास विरोध नाही. पण जलवाहिनी ऐवजी साक्री शहरासाठी आरक्षित पाणी कॅनलद्वारे किंवा नदीपात्रातून घेऊन जावे, अशी भूमिका घेण्यात आली. मालनगाव धरणातून थेट साक्रीपर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी घेऊ दिले जाणार नाही, असे समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंचन विभाग काय भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांसह संघर्ष समितीचे लक्ष लागले आहे.

समितीने धरणातून जलवाहिनीद्वारे पाणी घेतल्यास परिसरातील व नदीपात्रालगत असणाऱ्या विहिरींची पाण्याची पातळी कमी होईल. परिणामी, दुष्काळाला सामोरे जावे लागेल. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीही कोरड्या होतील. धरण बांधण्यासाठी ज्यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी दिल्या त्यांच्याच तोंडाचे पाणी पळवण्याचा हा प्रकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाने रोखले तरुणांचे विवाह

$
0
0

जुन्नेर ग्रामस्थांचा पाण्यासाठी संघर्ष

पंकज काकुळीद, धुळे

गेल्या काही वर्षांपासून धुळे तालुक्यातील जुन्नेर गावात ऐन उन्हाळ्यात मोठ्या दुष्काळ परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गावात सरकारकडून पाण्यासाठी विविध योजना राबवूनदेखील त्या यशस्वी होत नाही कारण गावालगत जलस्रोत नाही. त्यामुळे जुन्नेर ग्रामस्थांसाठी उन्हाळा हा ऋतू शापच ठरत आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात जुन्नेरकरांना पाण्यासाठी चौफेर भटकंती करावी लागते. विशेष म्हणजे सततच्या टंचाईमुळे आता जुन्नेर गावातील तरुणांना मुली मिळणे कठीण झाले आहे. तसेच मुलासाठी स्थळ आले तर सर्वप्रथम गावात पाणीटंचाई असल्याने विवाहाची बोलणी दुरच गावाचे नाव ऐकूनच मुलीवाले गावात येत नसल्याचे ग्रामस्थांनी ‘मटा’शी बोलताना माहिती दिली. परिणामी, विना विवाहाच्या उपवरांची संख्या गावात कमालीची वाढलेली आहे.

यंदा धुळे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अवघे ७४ टक्के पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील ३६८ गावांची आणेवारी पन्नास पैशांच्या खाली आहे. बहुतांश गावांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. मात्र या सर्व टंचाईग्रस्त गावांपैकी तालुक्यातील जुन्नेर गावात बारा महिने पाणीटंचाईची सवयच होऊन गेलेली आहे. मागील तीस वर्षांपासून सातत्याने गावकऱ्यांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्नेरला दहा वर्षांत दोनवेळा शासकीय योजना राबविण्यात आल्या. मात्र सभोवताली तीन किलोमिटरच्या अंतरावर सक्षम जलस्त्रोत नसल्यामुळे त्या अयशस्वी ठरलेल्या आहेत. सक्षम जलस्त्रोतांच्या अभावामुळे दरवर्षी गावकऱ्यांना टँकरव्दारे अवलंबून रहावे लागते.

योजना केवळ कागदे रंगविण्यासाठीच

यंदाच्या वर्षीदेखील फेब्रुवारी महिन्यापासून जुन्नेर ग्रामस्थांची पाण्यासाठीची पायपीट सुरू झालेली आहे. जुन्नेरकरांसाठी टंचाई जणू शापच ठरलेली आहे. कारण गेल्या तीन वर्षांपासून तर जुन्नेर गावातील तरुण मुलांना कोणीही मुली देण्यास तयार नसल्यामुळे उपवरांचे विवाहच खोळंबलेले आहेत. अडीच हजार लोकसंख्या असलेल्या जुन्नेर गावात आठ हजारांचे पशुधन आहे. पावसाळ्यात या पशुधनाची संख्या दुप्पट वाढते तर डिसेंबर, जानेवारी महिन्यात गावकरी निम्म्यापेक्षा जास्त पशुधनाची मातीमोल किमतीने विक्री करतात. मात्र यासर्वबाबत सरकारकडे वारंवार कैफियत मांडण्यात येऊनही निव्वळ कागद रंगवित योजना कागदावरच राबविण्यात येतात.

तीन किलोमीटरची पायपीट

जुन्नेर गावाच्या लगतच्या बहुतांश विहिरींनी तळ गाठलेला आहे. गावकऱ्यांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करून पाण्याची व्यवस्था करावी लागते. पूर्ण दिवस पाण्याच्या शोधातच वाया जात असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण हंडाभर पाणी मिळविण्यासाठी रणसंग्रामच लढावा लागत असल्याचे वास्तव आहे. कुणाला पोटभर पाणी मिळते तर कुणाली घोटभर अशी परिस्थिती या गावातील नागरिकांची झाली आहे. पाण्यासाठीची होणारी पायपीट थांबत नसल्यामुळे गावकऱ्यांनी अनोखी शक्कल शोधलेली आहे. याकरीता लहान आकाराचे टँकर तयार केले आहेत. हे मोटारसायकलला जोडून पाणी आणले जाते. एका टँकरवरून २०० लिटर पाणी घरी पोहचते. त्यामुळे डोक्यावर पाणी आणण्याऐवजी ही व्यवस्था असल्यामुळे घरोघरी या दुचाकीचे टँकर दिसून येतात.

गेल्यावर्षी गावविहीर खोदली मात्र विहिरीला पाण्याचा पाझरदेखील फुटला नाही. यावर्षीदेखील परिस्थिती तशीच असल्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर जुन्नेर गावातील लोक कालांतराने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- मानाबाई गवळी, सरपंच, जुन्नेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त अधिकारी संदीप खडसेंबाबत निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील वादग्रस्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप खडसे यांची नागपूर येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर पुणे येथील जयंत चव्हाण रुजू झाले आहेत. परंतु, खडसे हे अद्यापही धुळ्यातच असल्याने त्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी अॅड. अमित दुसाणे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे यांना निवेदन दिले.

खडसे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हमरीतुमरी करणे, ओव्हरलोड गाड्यांच्या संदर्भात कारवाई न करता पैसे घेऊन सोडून देणे, आरटीओ कार्यालयातील १७ लाख रुपयांच्या अपहाराबाबत गुन्हा नोंदवताना हेतुपुरस्सर केलेली दिरंगाई, चुकीच्या पद्धतीने वाहनांची पासिंग करणे आदी कारणांमुळे वादग्रस्त ठरले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

सरकारने त्यांची नागपूर येथे बदली केली असून, तसे आदेश धुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयास १० एप्रिलला प्राप्त झाले आहेत. त्यांच्या जागी नवीन अधिकारी जयंत चव्हाण रुजू झाले आहेत. तरीही खडसे हे येथील कार्यालयात वावरत आहेत.

खडसे हे नागपूर येथे जाण्यास इच्छुक नसून, मालेगाव किंवा जळगाव येथे जाण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना तत्काळ रुजू होण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी दुसाणे यांनी केली आहे.

नागपूर येथे बदली तर झाली आहे. मात्र, महिना संपल्यावर आणि पगार झाल्यानंतर कार्यालयीन प्रक्रिया पार पडेल. त्यानंतरच बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे लागेल.

- संदीप खडसे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, धुळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालगाडीच्या इंजिनात बिघाड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड
मध्य रेल्वेच्या लासलगाव आणि समिट स्टेशनदरम्यान मालगाडीच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने मुंबईकडून भुसावळकडे जाणाऱ्या गाड्याचा सोमवारी खोळंबा झाला. सायंकाळच्याच वेळी झालेल्या या घटनेमुळे डाऊनच्या मार्गाकडे जाणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर थांबविण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

मनमाड-नाशिक दरम्यान विशेषतः मनमाड-लासलगाव दरम्यान रेल्वेबाबतीत घडणाऱ्या घटनांनी प्रवासी वर्गात असंतोष वाढत आहे. तपोवन एक्स्प्रेसचे चार डबे इंजिनसह पुढे धावणे मालगाडीचे डबे खाली घसरणे या घटना ताज्या असताना सोमवारी त्यात पुन्हा भर पडली. इंजिन बिघाडामुळे सर्व गाड्या अर्ध्या ते एक तास उशिराने धावत होत्या.

मनमाडजवळ रेल्वे रुळांना तडे जाणे, तपोवन एक्स्प्रेसचे चार डबे इंजिनसह पुढे निघून जाणे अशा घटना चर्चेत असताना रविवारी मनमाड स्टेशनजवळ मालगाडीचे दोन डबे रुळावरून खाली घसरले. लासलगाव ते समिट दरम्यान पुन्हा मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने मुंबई आणि भुसावळकडे जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक ठप्प झाली. आठवडाभरात घडलेल्या या घटनांनी प्रवासी वर्ग हवालदिल झाले आहेत. गाड्या उशिरा धावत असल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने भुसावळकडे जाणाऱ्या गाड्या विविध स्टेशनवर थांबवण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रॉमा सेंटर उभे राहिले, ‘आरोग्य’ला नाही दिसले!

$
0
0

नाशिक : सरकार विभागाच्या सावळ्या-गोंधळाच्या अनेक सूरस कथा वारंवार समोर येतात. असाच प्रकार आताही समोर आला आहे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे ग्रामीण रुग्णालयाच्याच जागेत तब्बल तीन कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक ट्रॉमा केअर युनिट बांधले असले तरी त्याचा कुठलाच थांगपत्ता आरोग्य विभागाला नाही. त्यामुळे हे सेंटर उभारूनही अद्याप धूळखातच पडले आहे. समन्वयाअभावी हा सारा प्रकार होत असतानाच हे सेंटर प्रत्यक्षात कधी सुरू होईल, याबाबत साशंकताच आहे.

अपघातग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचा निर्णय झाला. लोकप्रतिनिधींच्या शिफारशींनुसार आदिवासी विकास भवनने लागलीच सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. सार्वजनिक बांधकाम खात्याने तत्परता दाखवित बांधकाम केले. ठेकेदाराचे बिलही अदा झाले. मात्र, असे काही काम सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या गावी पोहचलेच नाही. इमारतीचे काम पूर्ण झाले पण आता मनुष्यबळच उपलब्ध होत नाही. पदांना नक्की कधी मंजुरी मिळेल आणि प्रत्यक्षात ट्राम्प सेंटर कधी सुरू होईल, याबाबत अनभिज्ञताच आहे.

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जीवघेण्या अपघाताचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अपघातानंतर वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून शेकडो नागरिकांचा दरवर्षी मृत्यू होतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाच्या रस्त्यांवर ट्राम्प सेंटर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला होता. या सेंटरमध्ये २४ तास अस्थीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, फिजीशियन, रेडिओलॉजिस्ट असा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग तैनात करण्यात येतो. ट्रामा सेंटरसाठी किमान ३० ते ४० डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, आरोग्य विभागाकडे अद्यापपर्यंत मनुष्यबळाबाबतचा प्रस्तावच पोहचला नसल्याचे समोर आले आहे. सर्वांनी मिळून फक्त इमारत बांधण्यावरच जोर दिला. मागील आठवड्यात आरोग्य उपसंचालिका डॉ. लोचना घोडके यांनी वणी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

वर्षाकाठी ३०० अपघात

श्री सप्तश्रृंगी गडामुळे येथील प्रमुख दोन महामार्गावर भाविकांची वर्षभर मोठी वर्दळ असते. वणी येथे एक ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून, त्यास १९८४ मध्ये मंजुरी मिळाली आहे. येथे अवघे तीन डॉक्टर कार्यरत आहे. बाळंतपण असो की जीवघेणा अपघात सर्व जबाबदारी थोड्याबहुत कर्मचाऱ्यांवर टाकली जाते. पर्याय नसल्याने अनेकदा पेशंटला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले जाते. ट्रॉमा सेंटरचे योग्य नियोजन करून काम झाले असते तर मोठा कर्मचारी वर्ग उपलब्ध झाला असता. या परिसरात वर्षाकाठी ३००च्या आसपास अपघात होतात. नुकतेच कृष्णागाव येथे अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर एकाला अत्यवस्थ अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलला पाठवण्यात आले होते. ट्रॉमा सेंटर सुरू झाल्यास नागरिकांचे हाल थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उपचारासाठी प्रवासयातना

नाशिक : शहर आणि जिल्ह्यात रस्ते अपघातात किमान एक हजार व्यक्ती मृत्यूमुखी पडतात. जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांचे मजबूत जाळे पसरले असून, रस्ते अपघातात वेळीच वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने बळ जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय ठरते. या पार्श्वभूमीवर ट्रॉमा केअर सेंटर महत्त्वाचे ठरतात. दुर्दैवाने जिल्ह्यातील ट्रॉमा सेंटर कागदावरच असून, जखमींना दोन ते तीन तासांच्या अंतराने उपचार मिळतो.

जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांमध्ये सिन्नर तालुक्याचा प्रथम क्रमांक लागतो. सिन्नर, मुसळगाव आणि वावी पोलिस स्टेशन हद्दीत वर्षात शभंरावर नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. या ठिकाणी ट्रॉमा सेंटरसाठी जागेची अनेक वर्षांपासून शोधाशोध सुरू आहे. मात्र, जागाच उपलब्ध होत नाही. इगतपुरीच्या सेंटरचे बांधकाम ७५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. चांदवड आणि सटाणा या अपघातप्रवण तालुक्यांमध्ये ट्रॉमा सेंटर सुरू असल्याचे सांगितले जाते. येथील इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात भूलतज्ज्ञ आहे तर अस्थीरोगतज्ज्ञ नाही, अशी परिस्थिती आहे. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये किमान चार ते पाच तज्ज्ञ डॉक्टर आणि २० पेक्षा अधिक सहायक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीदेखील आवश्यक आहे. मात्र, याचा गांभीर्याने विचार होत नाही. अपघातानंतर जखमींना थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात येते. शहरापासून दूरवर झालेल्या अपघातग्रस्तांना दोन ते तीन तासांनी उपचार मिळतो. यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून, राज्य सरकारने याचा गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् वाहिला माणुसकीचा झरा

$
0
0

नागपूरऐवजी नामपूरला आलेल्या महिलेस मदत

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

साधारण दोन महिन्यांपूर्वीची गोष्ट नागपूरवरून रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी निघालेली शोभा बोरकर नावाची महिला चुकून मनमाड येथे उतरली. काहीच कळेना कुठे जावे काही सांगताही येईना. नागपूर सांगता सांगता चुकून मनमाडवरून नामपूर (ता. सटाणा) येथे आली. भूकेने व्याकुळ झालेली..अंगात ताकत नाही..कपडे मळकटलेले. अशा परिस्थितीत ती येथील बसस्टँडवर राहू लागली. भीक मागून खाऊ लागली. थोड्याच दिवसात ती येथील पेट्रोल पंपासमोर आली तिची अशी परिस्थिती पाहून येथील हॉटेल व्यावसायिक मयूर ठाकुर या तरुणाने तिच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था केली. दिवसा मागून दिवस जात होते मयूर याने त्या महिलेची विचारपूस केली. आधी न बोलणारी ती महिला या सामाजिक आदरातिथ्याने बोलती झाली आणि तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला. माझे मूळ गाव काटोल जि. नागपूर, मुंबई येथे जातांना मी चुकून येथे पोहोचली आता मला परत घरी जायचे आहे, असे सांगू लागली. यावेळी दीपक सोनवणे, प्रमोद सावंत, दीपक बच्छाव, अजित खुटाडे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक कोळी यांनी काटोल पोलिसांना सर्व प्रकार सांगितल्याने महिलेची ओळख पटली.


सुरू झाला परतीचा प्रवास...

शोभा बोरकर यांची सर्व माहिती मिळाल्यावर येथील नागरिकांनी एकत्र येत पैसे जमवले. महिलांनी नवीन साडी दिली. नवीन साडी परिधान करून या महिलेचा परतीचा प्रवास सुरू झाला. प्रमोद सावंंत यांनी स्वतःची गाडी दिली. पोलिस हवालदार दादाजी मोरे व दोन-तीन लोकांनी सोबत जात तिला मालेगावपर्यंत सोडले. नागरिकांनी जमा केलेल्या पैशातून मालेगाव येथून या महिलेचे ट्रॅव्हलचे नागपूर पर्यंतचे तिकीट बुक केले. तिला खर्चासाठी पैसे दिले. ट्रॅव्हल मध्ये बसवून तिला परतीचा निरोप दिला. दुसऱ्या दिवशी ती महिला आपल्या बहिणीकडे नागपूर येथे पोहोचली आणि तिथून तिने मी सुखरूप पोहोचल्याचा फोन केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वे-ब्र‌जिसाठीची वाहने धूळ खात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वे-ब्रिज तपासणीसाठी वापरण्यात येणारी वजनमापे व वैधमापन शास्त्र विभागाकडील लाखो रुपये किमतीची दोन वाहने चालकांअभावी धूळ खात पडून असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचा परिणाम विभागातील वे-ब्रिज तपासणीवर होण्याची शक्यता आहे.

नाशिकरोड येथे वजनमापे व वैधमापन शास्त्र उपसंचालकांचे कार्यालय आहे. या कार्यालयाकडे वे-ब्रिज तपासणीसाठी लागणारी पाच टन क्षमतेची दोन वाहने आहेत. मात्र ती चालकांअभावी सध्या धूळ खात पडून आहेत. ही वाहने उत्तर ईशान्य भारतातील राज्यांसाठी केंद्र सरकारने खरेदी केली होती. मात्र हा संपूर्ण भाग डोंगराळ असल्याने ती वाहने त्या भागात निरुपयोगी ठरली. त्यामुळे ही वाहने देशातील इतर राज्यांना देण्यात आली. त्यातील काही वाहने महाराष्ट्रात देण्यात आली. नाशिक या उत्तर महाराष्ट्र विभागासाठीही त्यातून पाच टन क्षमतेची दोन वे-ब्रिज तपासणी वाहने मिळाली. या वाहनांसाठी चालक व क्रेन ऑपरेटरची आवश्यकता असते. मात्र वजनमापे व वैधमापन शास्त्र विभागात या वाहनांसाठी चालकांची पदे उपलब्ध नसल्याने सध्या ही वाहने वापराविना पडून आहेत.

उत्तर-ईशान्य भारतात निरुपयोगी ठरलेली व सध्या नाशिकमध्ये पडून असलेली तपासणी वाहने खूपच कमी क्षमतेची आहेत. त्यामुळेही त्यांचा वापर करता येत नसल्याचे संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नाशिक विभागात सध्या उपलब्ध असलेल्या १० टन क्षमतेच्या वे-ब्रिज तपासणी वाहनांचा वापर केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीच्या पात्रावर पुन्हा हिरवा गालिचा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या पाण्यात मिसळणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे सध्या गोदापात्रात पाणवेलींची वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. या पाणवेलीमुळे गोदापात्रावर पुन्हा हिरव्या रंगाचा थर पसरू लागला आहे. ही स्थिती पाणवेलीच्या वाढीची पहिली अवस्था असल्यामुळे याच अवस्थेत त्यांची वाढ रोखली नही तर पाणवेलींचा वाढ प्रचंड वेगाने होऊन त्या काढण्यासाठी कित्येक पटींनी खर्च वाढणार आहे.

गोदावरी नदीच्या पात्रात प्रदूषण व्हायला नको म्हणून गोदावरी संवर्धन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. मात्र या कक्षाला केवळ रामकुंड ते टाळकुटेश्वर पूल एवढ्याच पात्राच्या संवर्धनाचे काम देण्यात आलेले आहे. त्यापुढील गोदावरीचे महापालिकेच्या हद्दीतील पात्र हे थेट मानूर गावाच्या हद्दीपर्यंत असताना या पात्राच्या प्रदुषणाच्या बाबतीत मात्र महापालिका उदासीन असल्याचे दिसते. या भागात अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी थेट सोडण्यात येत आहे. अशा पाण्यात पाणवेलींची वाढ होत असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीगळतीने रस्त्यावर तळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अशोकनगर भागातील राज्य कर्मचारी वसाहतीत अनेकदा एकाच पाणी पुरवठा लाइनला गळती लागत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पाणीगळती केलेल्या पाइपलाइनला पुन्हा गळती लागली आहे. या गळतीने रस्त्यालाच तळ्याचे स्वरूप आले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नेहमीच पाणीगळती लागत असलेल्या लाइनची तात्काळ दुरुस्ती करत गळती रोखावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

राज्य कर्मचारी वसाहतीच्या अशोकनगर पोलिस चौकीच्या पाठिमागे मोठ्या प्रमाणावर पिण्याचे पाणी रस्त्यावरून वाहत वाया जात असते. आता पुन्हा त्याच लाइनीतून पाणीगळती होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. ही गळती होत असल्याने पहाटेपासूनच पाणी गळतीने अशोकनगरचा रस्ता पाण्याने भरलेला असतो. ऐन उन्हाळ्यात पाणी बचत करण्याचे आवाहन करण्यात येत असताना पाणीगळती तात्काळ रोखावी, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामकुंडात टोपल्यांद्वारे दीपदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

भाविक जेव्हा धार्मिक स्थळावर विशेषतः नदीपात्राच्या तीर्थस्थानावर येत असतात. तेव्हा तेथील पात्रात दीपदान करण्याची त्यांची प्रबळ इच्छा असते. रामकुंड येथे दीपदानाची जुनी प्रथा आहे. रामकुंडात दीपदानानंतर होणारे प्रदुषण रोखण्यासाठी येथील दिवे विक्री करणाऱ्या महिलांनी पुढाकार घेऊन दीपदान पात्र ठेवले तसेच आता रामकुंडाच्या विविध भागात टोपल्या ठेऊन त्यात दीपदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

रामकुंडावर येणारे भाविक ज्या श्रद्धेने स्नान करतात, त्या श्रद्धेने दीपदानही करीत असतात. या दीपदानामुळे रामकुंडाच्या पात्रात द्रोण, फुले, वाती तरंगत असायच्या, गोदापात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न होऊ लागल्यामुळे या दीपदानाचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे येथील दिवे विक्री करणाऱ्या महिलांनी पुढाकार घेऊन पदरचा खर्च करून येथे दीपदानपात्र तयार करून ठेवले. मात्र रामकुंडावर येणाऱ्या भाविकांची संख्या आणि विस्तीर्ण असलेल्या या पात्रात हे एक दीपदानपात्र अपुरे पडत होते. त्यामुळे आता दीपदानासाठी रामकुंडाच्या कोणत्याही बाजूला दिवे थेट रामकुंडात दान करता येतील, अशी व्यवस्था येथे लोखंडी आणि प्लास्टिकच्या टोपल्या थेट रामकुंडात ठेऊन करण्यात आली आहे. या टोपल्या एकाजागेवरून हलू नये यासाठी त्यात वजनदार दगड ठेवण्यात आलेले आहेत.

या व्यवस्थेमुळे भाविकांना थेट रामकुंडात दीपदान केल्याचा आनंद मिळत असल्यामुळे भाविका अत्यंत आनंदाने या पात्रात दीपदान करीत आहेत. रामकुंडाच्या पात्रात पूर्व, पश्चिम आणि उत्तर या दिशांना या ठेवण्यात आलेल्या टोपल्या आणि त्यातील तेवणारी दिवे हे नयनरम्य दृश्य येथे बघायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपोवन परिसरातील प्रसाधनगृहांची दुरवस्था

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

तीर्थस्थान आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध तपोवनात भाविक आणि पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. या वर्दळीच्या ठिकाण्‍ाी बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. त्याची अस्वच्छता आणि पावित्र्याला बाधा येऊ लागली आहे. दुर्गंधीमुळे येथे येणाऱ्यांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

तपोवनातील शूर्पणखा मंदिराच्या दक्षिणेस गोदावरीच्या पात्राच्या लगत हे प्रसाधानगृह बांधण्यात आलेले आहे. येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना त्याचा वापर करता यावा, असा याचा उद्देश असला तरी येथे पाऊल ठेवणेदेखील मुश्किल होत असल्याचे दिसते. येथील अस्वच्छतेमुळे कुणी त्यात जाण्याची धाडस करीत नाहीत. मध्ये गेले तर त्याचे दरवाजे तुटलेले आहेत. लोखंडी दरवाजे गंजून मोडून गेलेले असताना त्यांची दुरुस्ती करण्याचे कामदेखील करण्यात आलेले नाही. येथे पाण्याच्या नळाची व्यवस्था असून, त्या नळाला पाण्याची उपलब्धता असतानाही येथील स्वच्छता केली जात नाही. त्यामुळे हा भाग अत्यंत गलिच्छ झालेला आहे. येथून मूत्र बाहेर जाण्याचा मार्ग थेट गोदापात्रात असल्यामुळे गोदावरीच्या प्रदूषणात यामुळे आणखी भर पडत आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे ही स्थिती दिसत नसली तरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हे थेट वाहते.

पर्यटकांची गैरसोय

या प्रसाधनाच्या मागील भाग झाडाझुडपांनी वेढलेला आहे. त्यामुळे भिंतींना तडे गेले आहेत. भिंतींचीही पडझड झाली असून, अशी अवस्था असलेल्या या प्रसाधनगृहात येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना ओगंळवाणे दर्शन घेण्याची वेळ येत आहे. दुर्लक्ष झाल्यामुळे भाविक आणि पर्यटकांची गैरसोय होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images