Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

अतिरिक्त शिक्षकांचे होणार समायोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे राज्यभरात हजारो शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. सन २०१६-१७च्या संचमान्यतेनुसार अशा शिक्षकांची यादी तयार करण्यात आली असून अशा शिक्षकांना इतर शाळांमध्ये समायोजित करुन घेण्याची प्रक्रिया बुधवार (५ एप्रिल) पासून सुरू होणार आहे. पारदर्शी प्रक्रिया व्हावी, यासाठी ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाणार असून ३१ मेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सन २०१६-१७च्या संच मान्यतेनुसार खासगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे काही शाळांमध्ये शिक्षक अतिरिक्त होत असल्याची तर काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे शिक्षकांची गरज निर्माण झाल्याचे संचमान्यतेतून दिसून आले. या बाबींचा विचार करून अतिरिक्त शिक्षकांना जागा रिक्त असलेल्या शाळांमध्ये समायोजित करणे गरजेचे झाले आहे. त्यानुसार या प्रक्रियेचे वेळापत्रक तयार करण्यात आले असून ३१ मेपर्यंत ही प्रक्रिया आयुक्त, शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या निकषांनुसार शैक्षणिक संस्थांनी पूर्ण करायची आहे.

या वेळापत्रकानुसार शिक्षक संवर्गाची १ जानेवारी रोजीची सेवाज्येष्ठता यादी अंतिम करून अतिरिक्त शिक्षक निश्चित करणे, शाळांतर्गत, संस्थांतर्गत समायोजन करणे ही प्रक्रिया ५ ते १० एप्रिलदरम्यान राबविली जाणार आहे. त्यानंतर संस्थेकडील अतिरिक्त शिक्षक, आरक्षण व विषयनिहाय रिक्त पदे आदी बाबींसाठी शिक्षणाधिकारी यांची मान्यता, निर्णय, रिक्त जागांची यादी प्रसिद्धी, अतिरिक्त शिक्षकांना लेखी कळविणे आदी बाबी केल्या जाणार आहेत. १६ ते २२ मे दरम्यान अतिरिक्त शिक्षकांना समायोजित शाळेत रुजू होण्यासाठी जुन्या शाळेतून कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया संस्थांमध्ये राबविली जाणार आहे. तर १७ ते ३१ मे दरम्यान अतिरिक्त शिक्षकांना समायोजित शाळेत रुजू करून घेणे, जॉईनिंग फॉर्ममध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाइन नोंद करण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हॉटेल मॅनेजमेंटसाठी १४ मे रोजी सीईटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी-एसएमसीटी) या अभ्यासक्रमाची सीईटी १४ मे रोजी होणार आहे. बारावीनंतर या चार वर्षांच्या पूर्ण वेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या परीक्षेची पद्धती, निकष राज्य सीईटी विभागाने जाहीर केले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून वेगळे क्षेत्र म्हणून हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची मोठी पसंती मिळते आहे. देशात मिळणाऱ्या विविध संधींबरोबरच थेट परदेशातही मोठ्या संधी या क्षेत्रातील व्यक्तींसाठी उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांचा या क्षेत्राकडे कल वाढतो आहे. त्याबरोबरच हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे केवळ हॉटेल इथपर्यंतच मर्यादित न राहता ट्रॅव्हल अॅण्ड टुरिझमची मोठी जोड या क्षेत्राला मिळाली आहे. या व अशा कारणांमुळे हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला चांगली पसंती आहे. www.dtemaharashtra.gov.in/hmct2017 या वेबसाइटवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरता येणार आहेत.

अशी आहे परीक्षा पद्धती

ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. एमसीक्यू, वस्तूनिष्ठ पद्धतीने पेपर सोडवायचा असून केवळ इंग्रजी भाषेत प्रश्नपत्रिका असणार आहेत. इंग्रजी भाषा, रिझनिंग आणि जनरल नॉलेज अॅण्ड अवेअरनेस या विषयाचा अभ्यासक्रम सीईटीसाठी असणार आहे. जनरल नॉलेजमध्ये नॅशनल, इंटरनॅशनल अफेअर्स, कल्चर, ट्रेड अॅण्ड कॉमर्स, स्पोर्टस्, वैज्ञानिक शोध, ट्रॅव्हल अॅण्ड टूरिझम यांचा समावेश असणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दीड तासाचा वेळ मिळणार आहे. यामध्ये नकारात्मक गुणपद्धती नसून प्रत्येक प्रश्नाला एक गुण असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेचे सदस्य पुन्हा सहलीला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या बुधवारी, ५ एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसह विविध पक्षांचे सदस्य पुन्हा सहलीवर गेले आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही हे सदस्य सहलीला गेले होते. या वेळीही कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेतली आहे. बुधवारी चार सभापती निवडले जाणार आहेत. त्यामुळे ही सदस्यांची शॉर्ट ट्रीप ठरणार आहे. उन्हाळ्यात शाळेला सुटी लागल्यानंतर विद्यार्थ्यांना सहलीचे वेध लागते; पण जिल्हा परिषदेच्या सदस्यांना ही सहल महिनाभरातच दोन वेळेस झाली आहे.

या सहलीला राष्ट्रवादीचे सदस्य आधी गेले. त्यानंतर इतर पक्षांनी हालचाली सुरू केल्या, तर काही जण सोमवारी जाणार होते. त्यामुळे रात्रीतून किती पक्षांचे सदस्य बाहेर गेले याचा आकडा समजू शकला नाही. सभापती निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकत्र आलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये फूट पडण्याची चर्चा रंगली. त्यामुळे सर्वच पक्षांनी काळजी घेतली आहे. जिल्हा परिषदेत ७३ सदस्यांपैकी शिवसेनेचे २५, राष्ट्रवादीचे १८, भाजपचे १५, काँग्रेसचे ८, तर माकप १, बंडखोर २ व ४ अपक्षांचा समावेश आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३७ सदस्यांनी एकत्र येत शिवसेना- काँग्रेस आघाडीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले होते. या वेळी शिवसेनेकडे अध्यक्ष, तर काँग्रेसकडे उपाध्यक्षपद गेले. विषय समितीच्या पाच समित्या असून, त्यात चार समित्यांसाठीच निवडणूक होणार आहे. त्यात काँग्रेसने एका समितीची मागणी केल्यामुळे गोंधळ वाढला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आपले जास्तीत सभापती व्हावे यासाठी सर्व पातळ्यांवर चाचपणी केल्याचे बोलले जात आहे, तर काँग्रेसनेही शिवसेनेला घाम फोडत सभापतिपदासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात सर्वांत जास्त रस्खीखेच सुरू आहे. बुधवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान सभापतिपदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ वाजेदरम्यान छाननी होणार आहे. दुपारी २ वाजता आवश्यक वाटल्यास मतदान होणार आहे. त्यामुळे मंगळवारचा एकच दिवस यासाठी बाकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेएनएनयूआरएम सुनावणी लोकायुक्तांकडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जेएनएनयूआरएम प्रकल्पांतर्गत भुयारी, पावसाळी आणि पाणीपुरवठा योजनेत झालेल्या २२५ कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य लोकायुक्तांकडे १२ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी तक्रारदार देवांग जानी यांच्यासह महापालिका आयुक्तांना बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात आले आहे. त्यामुळे लोकायुक्तांनी संबंधित तक्रारीची गंभीर दखल घेतल्याने पालिकेची यंत्रणा या कथित घोटाळाप्रकरणी खळबडून जागी झाली आहे.

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम प्रकल्पातील भुयारी गटार योजना, पावसाळी गटार योजना, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापनासह गोदावरी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट या योजनांमध्ये २२५ कोटींच्या भ्रष्टाचाराची तक्रार देवांग जानी यांनी लोकायुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी महापालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण अहवाल मागवण्यात आला होता. मात्र, या दाखल अहवालावर जानी यांनी पुराव्यानिशी जोरदार हरकत घेतली होती. अहवालात प्रोजेक्ट कॉस्ट ते पूर्णत्वाच्या रकमेत विसंगती असून, मोठ्या प्रमाणात रक्कम वाढवण्यात आलेली आहे. महापालिकेने एप्रिल २००९ पासून द्विनोंदी लेखापरीक्षण पद्धती स्वीकारलेली असून, तसा उल्लेख जेएनएनयूआरएमच्या २०१४ च्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद आहे. महापालिकेने २०१० ते २०१६ पर्यंत द्विनोंदी लेखापरीक्षणच केलेले नसून, वर्षानुवर्षांपासून चालत आलेला भ्रष्टाचार लपवण्याचा उद्योग महापालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप जानी यांनी केला होता.

माहिती अधिकारअंतर्गत ऑडिटेड बॅलन्स शीटसाठी अर्ज केल्यावर महापालिका प्रशासनाला जाग आली. त्यानंतर महापालिकेने सनदी लेखापाल मुथा यांची हकालपट्टी करून नवीन सीए नियुक्तीसाठी टेंडर नोटीस काढली. त्यामुळे या सर्व बाबींची गंभीर दखल घेत लोकायुक्तांनी महापालिका आयुक्तांना १२ एप्रिल रोजीच्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश पारित केले. सोबतच जानी यांनाही तक्रारीच्या कागदपत्रासह हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १२ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना आता उपस्थित राहावे लागणार असून, पालिकेने केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत वितरणची ३७८ कोटींची वसुली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नाशिक परिमंडळाची मार्चअखेर तब्बल ३७८ कोटींची वसुली झाली आहे. त्यात नाशिक शहर २२१ कोटी, मालेगाव सर्कल ५० कोटी व अहमदनगर जिल्ह्यातून १०७ कोटी रुपयांचा समावेश आहे. काही दिवसांपासून ही वसुली मोहीम सुरू झाल्यानंतर त्यात वीज मंडळाला यश आले आहे.

नाशिक व अहमदनगर जिल्हा मिळून ७०८ कोटींच्या आसपास बिल बाकी होते. त्यात ही वसुली करण्यात आली आहे. या बिलामंध्ये शेतीपंपाच्या बिलांचा समावेश नाही. घरगुती, वाणिज्य व औद्योगिक वापराच्या बिलांचा यात समावेश आहे. नाशिक परिमंडळात तीन सर्कल असून, त्यात नाशिक अर्बन सर्कल, मालेगाव सर्कल व अहमदनगर सर्कलचा समावेश आहे. नाशिक अर्बन सर्कलमध्ये सर्कल ऑफिस, चांदवड, नाशिक ग्रामीण व नाशिक शहर- १ व नाशिक शहर २ चा समावेश आहे. मालेगाव सर्कलमध्ये सर्कल ऑफिस, कळवण, मनमाड, सटाणा, मालेगाव या विभागांचा समावेश आहे. अहमदनगर सर्कलमध्ये संपूर्ण जिल्ह्याचा समावेश आहे. नाशिक अर्बन सर्कलमध्ये २९२ कोटींच्या आसपास बिल होते. त्यापैकी २२१ कोटींची वसुली झाली आहे. मालेगाव सर्कलमध्ये ११४ कोटी बिल होते. त्यापैकी ५० कोटींची वसुली झाली आहे, तर अहमनगर येथे ३०२ कोटींचे बिल होते. त्यापैकी १०७ कोटींची वसुली झाली आहे.

गेल्या वर्षी मार्चअखेरीस ही थकबाकी वसूल करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने जोरदार प्रयत्न केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातून ९२ कोटी ६ लाख, नाशिक शहरातून ९९ कोटी ४५ लाख, तर नाशिक जिल्ह्यातून १२४ कोटी ६२ लाख वसूल झाले होते. या तिन्ही विभागांचा आकडा हा ३१४ कोटी १३ लाख होता, तर थकबाकीचा आकडा २,३८० कोटी ६ लाख आहे. या तिन्ही विभागांत घरगुती, वाणिज्य, औद्योगिक व शेतीपंपाच्या ग्राहकांची संख्या ९ लाख ८६ हजार ९२७ होती, तर अहमदनगर जिल्ह्यात ग्राहकांची संख्या ५ लाख १८ हजार ७६८, नाशिक शहराची ग्राहकसंख्या ८९ हजार ९६८, तर नाशिक जिल्ह्याची संख्या ३ लाख ७८ हजार १९१ होती. यंदा ग्राहकांची संख्या वाढलेली आहे, तर शेतीपंपाची थकबाकी यावेळी पकडण्यात आली नाही. विशेष म्हणजे गेल्या वेळेपेक्षा ही वसुली ६४ कोटींनी वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिवंत हृदयाची वाहतूक यशस्वी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतातून आखाती देशात कार्गो विमानाने शेळ्या-मेंढ्यांची यशस्वी निर्यात झाल्यानंतर ओझर विमानतळाहून एअर अॅम्बुलन्सद्वारे जिवंत हृदयाची वाहतूक यशस्वी झाली आहे. प्रवासी विमानसेवा सुरू नसली तरी या विमानतळाच्या ठिकाणाहून अशा प्रकारे विक्रम घडत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातीलच रस्ते अपघातात एक २९ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. त्यानंतर ब्रेनडेड झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पूर्ववत होण्याच्या आशा धूसर असल्याने कुटुंबीयांनी त्या तरुणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गरजूंचा शोध सुरू झाला. जळगाव येथील १३ वर्षीय मुलीला हृदय देण्याचे निश्चित झाले आणि त्यानंतर मोठे नियोजन सुरू झाले. नाशिकमधील वोक्हार्ट हॉस्पिटलमधून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये या हृदयाची वाहतूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. हृदय प्रत्यारोपणासाठीचे पथक रविवारी पहाटेच्या सुमारास दाखल झाले. त्यानंतर सकाळी सव्वाआठच्या सुमारास पोलिस आयुक्तांना विनंती करण्यात आली. अवघ्या १५ मिनिटांत रस्त्यावर कडक बंदोबस्त लागला. सकाळी साडेआठला वोक्हार्ट हॉस्पिटलमधून जिवंत हृदय घेऊन अॅम्बुलन्स निघाली आणि अवघ्या १५ मिनिटांत ती ओझर विमानतळावर पोहोचली. तेथून एअर अॅम्ब्युलन्सने जिवंत हृदय थेट पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोहोचले. तेथून ग्रीन कॉरिडॉरद्वारे हे हृदय रुबी हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

जळगावच्या मुलीला जीवदान

‘तेरा वर्षांची ही मुलगी मूळची जळगावची. गेल्या वर्षीच तिच्या वडिलांचे निधन झाले. तिची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तिला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तिला ‘कार्डिओमायोपॅथी’ नावाचा हृदयाचा आजार झालेला आहे. तिच्यावर उपचारासाठी तिच्या आईसह ती अनेक हॉस्पिटलमध्ये चौकशी करून आली. मात्र, सर्वत्र निराशा आली. अखेर रुबी हॉस्पिटलमध्ये ती मुलगी दाखल झाली. दोन महिन्यांपासून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रकृती सुधारली होती. त्यानंतर हृदयप्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकवरून मिळालेले हृदय रुबी हॉस्पिटलला आल्यानंतर १० वाजून २२ मिनिटांनी तिच्यावर प्रत्यारोपणासाठी सुरुवात करण्यात आली. दुपारी एक वाजता ऑपरेशन यशस्वी झाले,’ अशी माहिती हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समन्वयक सुरेखा जोशी यांनी दिली.

दरम्यान, त्याच पेशंटचे यकृत मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्याचे ठरविण्यात आले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नाशिकहून ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे केईएम हॉस्पिटलमध्ये यकृत अडीच तासांत आणण्यात आले,’ अशी माहिती पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली. ‘नाशिकवरून ‘ग्रीन कॉरिडॉर’ने दुपारी साडेबारा वाजता यकृत आले. ४७ वर्षांच्या एका पेशंटला दोन वर्षांपासून ‘लिव्हर सिरॉसिस’चा आजार होता. यकृत मिळविण्यासाठी सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती,’ असे केईएम हॉस्पिटलच्या प्रत्यारोपण समन्वयक उल्का वाखारे यांनी सांगितले.

ग्रीन कॉरिडॉरसाठी आम्हाला संदेश देण्यात आला. तत्परतेने आम्ही बंदोबस्त लावला. हृदय आणि यकृत या दोन्ही अवयवांसाठी आम्ही दोन रस्त्यांवर कॉरिडॉर केला. तो यशस्वी ठरला.

- जयंत बजबळे, एसीपी, वाहतूक


जिवंत हृदय प्रत्यारोपणासाठी नेण्यासाठी आम्हाला संपर्क करण्यात आला. आम्ही तत्काळ होकार दिला. सेस्मा एअरक्राफ्टद्वारे अवघ्या ४० मिनिटांत आम्ही नाशिकहून पुणे गाठले.

- मंदार भारदे, संचालक, मॅब एव्हिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीव अनमोल, हेल्मेटचे जाणा मोल!

$
0
0

दखणे, मोरे कुटुंबीयांची उत्तरकार्याला हेल्मेट वाटपातून आदरांजली

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

आमची तरूण मुलं अपघातात गेली... आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला... कोणत्याही पालकांवर तरूण मुलाला खांदा देण्याची वेळ येऊ नये... पोरांनो वाहन चालविताना स्वतःच्या जीविताची काळजी घ्या अन् पालकांचाही जरा विचार करा, असे सांगत गावातील १३ मुलांना हेल्मेटचे वाटप व जनजागृती करीत मनमाडजवळील नागापूर येथील प्रकाश दखणे व नागू मोरे या पालकांनी अपघातात गमावलेल्या आपल्या दोघा तरूण मुलांचा दशक्रिया विधी अभिनवरित्या पार पाडला.

आजच्या तरुणांमध्ये वाहतूक सुरक्षिततेविषयी जागर करणारा हा उपक्रम पालकांच्या दुःखावर थोडीशी फुंकर घालणारा ठरला. नागापूर गावातील गोपी दखणे व किरण मोरे हे दोघे एकमेकांचे जीवाभावाचे तरूण मित्र मालेगाव येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. पण अवघ्या काही किलोमीटरवर घर असताना ते घरी पोहोचू शकले नाहीत. जळगाव चोंडीजवळ त्यांच्या मोटरसायकलला अपघात झाला. यात त्या दोघा मित्रांचा जागीत मृत्यू झाला. या दोघांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते.

हेल्मेट घातले असते तर...

हेल्मेट घातले असते तर आपली पोरं जगली असती असे त्यांच्या पालकांना राहून राहून वाटते. प्रचंड दुःख गाठीशी असताना प्रकाश दखणे व नागू मोरे यांनी आपल्या गमावलेल्या मुलांच्या दशक्रियेला १३ तरुणांना हेल्मेट वाटप करून घरी तुमची कोणीतरी वाट बघतेय... असाच संदेश दिला. हेल्मेटचा वापर न करता गाडी चालविणाऱ्या आजच्या तरुणाईला वाहतूक सुरक्षिततेविषयी युक्तीच्या चार गोष्टी सांगणारा हा अभिनव प्रयत्न सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवून गेला.

वाहतूक सुरक्षिततेबाबत नागापूर गावात राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. आपल्या मुलांच्या अपघाती मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून अशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून १३ हेल्मेट वाटप करणाऱ्या पालकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

- पुंडलिक सपकाळे, पोलिस निरीक्षक, मनमाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइलवर बोलाल, तर लायसन्स गमवाल!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे धोकादायक ठरते. मात्र, तरीही वाहनचालक वाहन चालवतांना सर्रास मोबाइलचा वापर करतात. पोलिसांनी पकडले तर १००-२०० रुपयांत सुटका होते. त्यामुळे ही धोकादायक पध्दत जोर पकडते आहे. या पार्श्वभूमीवर, वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) अशा वाहनचालकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दुचाकी नव्हे तर सर्व प्रकाराच्या वाहनचालकांवर अशी कारवाई केली जाणार आहे.

ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह तसेच वाहन चालवताना मोबाइलचा वापर या दोन कारणांनी अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. याचमुळे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मागील काही वर्षात याबाबत कडक धोरण स्वीकारत दंडाच्या तुलनेत भरीव वाढ केली आहे. या शिवाय काही प्रकरणात थेट वाहन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात येतो. दरम्यान, शहरात मोबाइल वापरणाऱ्यांविरोधात पोलिस तसेच आरटीओकडून अधूनमधून मोठी कारवाई करण्यात येते. याशिवाय, दररोज कमी अधिक प्रमाणात वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात येतो. मागील वर्षी या वाहनचालकांकडून १०० रुपये दंड वसूल करण्यात येत होता. आता त्यात १०० रुपयांची वाढ करण्यात आली. २०१६ मध्ये जानेवारी महिन्यात मोबाइल वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिम राबवली होती. या वर्षातील जानेवारी महिन्यात ४२५, फेब्रुवारीत १०० आणि मार्च महिन्यात ४३४ अशा एकूण ९५९ प्रकरणात दंडात्मक कारवाई करण्यात आली. यंदा, याच तीन महिन्यात फक्त ४३५ केसेस झाल्या असून, त्याद्वारे ८७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. केसेसची संख्या कमी झाली असली तरी दंडाच्या रक्कमेत भरीव वाढ झाली असून, या काळात हेल्मेटकडे विशेष लक्ष पुरवण्यात आल्याचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले. वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दंडात्मक कारवाईने फरक पडेलच असे नाही. त्यामुळे यापुढे थेट लायसन्स निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी लागलीच सुरू झाल्याचे बजबळे यांनी स्पष्ट केले. याबाबत ‘आरटीओ’सोबत बैठक पार पडली असून, वाहनधारकाकडून घेतलेले लायसन्स थेट आरटीओ कार्यालयात जमा होणार आहे.

बुधवार, शुक्रवारी सुनावणी

वाहतूक पोलिसांकडून जमा होणारे लायसन्स निलंबित का करू नये, या बाबतचे म्हणणे मांडण्यासाठी वाहनधारकांना आरटीओ कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या कालावधीत वाहनधारकांना ही संधी मिळेल. वाहनचालकाचा खुलासा समाधानकारक नसेल तर संबंधित वाहनचालकाचा परवाना किमान तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी निलंबित होऊ शकतो. एखाद्या वाहनचालकाकडून सातत्याने नियमाचे उल्लंघन झाल्यास त्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अशोका स्कूलच्या चौकशीचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एका विद्यार्थिनीस शाळेची फी भरली नसल्याचे तोंडी कारण देऊन तिचा दाखला कुरिअरद्वारे घरी पाठवल्याच्या पालकांच्या तक्रारीमुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी दिले आहेत. या आदेशानुसार आता जिल्हा शिक्षणाधिकारी अशोका युनिव्हर्सल स्कूलला विचारणा करणार आहे.

अशोका युनिव्हर्सल स्कूलमध्ये शमिका नरेंद्र जोशी ही विद्यार्थिनी नववीत शिक्षण घेते. ती आठवी उत्तीर्ण होऊन नववीत गेल्यानंतर शाळेची फी भरली नसल्याचे तोंडी कारण देत शाळेने थेट मुलीचा दाखलाच कुरिअरद्वारे घरी पाठविला असल्याची तक्रार तिचे पालक नरेंद्र जोशी यांनी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे केली होती. या प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत समक्ष जाऊन प्रकरणाची चौकशी करावी व विद्यार्थिनीस शाळेत पुन्हा प्रवेश द्यावा, यासाठी योग ती कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शाळेच्या बेकायदेशीर शैक्षणिक शुल्क वसुलीविरोधात दाद मागितल्याने शाळेने ही भूमिका घेतल्याची पालकांची तक्रार आहे. या प्रकारे बेकायदेशीरपणे शाळा सोडल्याचा दाखला देता येणार नाही, असे शाळेला स्पष्ट कळविण्याच्या सूचनाही शिक्षण उपसंचालक जाधव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या प्रकरणी प्रशासनासोबत लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करून विद्यार्थिनीस न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अयोनी संभव.. प्रगटला राघव!

$
0
0

टीम मटा

चैत्र शुद्ध नवमी, या चैत्रातील नवव्या दिवशी प्रभू रामचंद्र यांचा जन्म झाला. हा दिवस भाविकांकडून रामनवमी म्हणून साजरा करण्यात येतो. मंगळवारी शहर परिसरात श्रीरामनवमी पारंपरिक उत्साहात साजरी झाली. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वा‌हण्यात आली. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटण्यात आला. या उत्सवात रामजन्माच्या पाळण्याला महिलावर्गाने प्रचंड उपस्थिती दाखवली. ठिकठिकाणच्या राम मंदिरांत भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांद्वारे जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, गीत रामायणाचे गायन हे कार्यक्रमही झाले.

संकलन ः प्रशांत धिवंदे, डॉ. बाळकृष्ण शेलार, राजन जोशी, नवनाथ वाघचौरे, रामनाथ माळोदे, नामदेव पवार, अभिजित राऊत

छायाचित्रे ः सतीश काळे, पंकज चांडोले, विजय चव्हाण



पंचवटीत श्रीराम नामाचा जयघोष

--

पंचवटी ः परिसरात पहाटेपासूनच भाविकांचा उत्साह दिसून आला. श्री काळाराम मंदिराचा परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेला होता. सकाळी दहापासूनच काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाला भाविकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी श्रीरामाचे दर्शन घेतले. भाविकांना दर्शन घेणे सोयीचे होण्यासाठी मंदिराच्या मंडपात लोखंडी जाळ्या आणि बल्ल्या लावण्यात आलेल्या होत्या. पांरपरिक वेशभूषेतील भाविकांनी लक्ष वेधून घेतले होते. मुठे गल्लीतील गोरेराम मंदिरातही जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

तपोवनात अखंड पाठ

तपोवनातील श्रीराम पर्णकुटीतील संतसेवा शिबिर अन्नक्षेत्र चॅरिटेबल ट्रस्टतर्फे जन्मोत्सवानिमित्त श्रीराम चरितमानसचे अखंड पाठ करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष महंत बैजनाथ रामदयाल महाराज, जसवीरसिंह आनंद, संदीप बनकर, मनोज घिमान, शिवकुमार शर्मा, बंटी कोहली, सुरेश पारीख, मगन परदेशी, सुनील लुथेरिया आदींच्या उपस्थितीत अखंड पाठाची पूर्णाहुती करण्यात आली. रामकुंडावरील अहिल्यादेवी मंदिरातरही सोहळा रंगला.

वात्मीकनगरला सत्कार

येथील श्रीराम मंदिरात जन्मोत्सवात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजन भानसी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नगरसेवक हेमंत शेट्टी, जगदीश पाटील, प्रा. सरिता सोनवणे, शांता हिरे यांनी संयोजन केले.

--

काट्या मारुती मंदिर

श्री काट्या मारुती मंदिरात रामभक्त हनुमानासमोरील मंदिराच्या गाभाऱ्यातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्तींची सजावट करण्यात आली होती. दुपारी बारा वाजता मंदिराचे पुजारी विवेक राजहंस हस्ते अभिषेक झाला. त्यानंतर विधिवत सेवा, पूजा, आरती करण्यात आली. भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. पूजेनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

नाग चौकात पालखी

नाग चौक परिसरातील नागेश्वर मित्रमंडळातर्फे सायंकाळी नाग चौक, काळाराम मंदिर, पंचवटी कारंजा, गजानन चौक या मार्गाने सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी दुपारी पूजा, आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसाद वाटप झाले. सायंकाळी साई भजनसंध्या झाली. परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---



देवळालीत अवतरले चैतन्य

देवळाली कॅम्प ः रामजन्माच्या अभंगाबरोबरच देवळालीचे वातावरण श्रीराम जय राम जय जय रामच्या घोषाने भारावले होते. लामरोडवरील भैरवनाथ मंदिरात सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रामजन्माचे अभंग झाले. सर्व भाविकांच्या हातात गुलाल पुष्प देऊन प्रभू रामरायांचा दुपारी १२ वाजता शंख, टाळ, मृदंगांच्या गजरात जन्म सोहळा होऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. हभप रामचंद्र गोडसे यांच्या हस्ते सपत्नीक आरती झाली. सर्व जोडप्यांनी राधे कृष्ण सीता रामच्या नामघोषात फुगडी खेळली. पंजिरी व फळांच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशीसह जिल्हाभरातून भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

श्रीराम प्रतिष्ठानतर्फे शोभायात्रा

येथील श्रीराम प्रतिष्ठानने धनुष्यबाण हाती असलेली १५ फुटी प्रभू रामचंद्रांची भव्य मूर्ती असलेल्या रथासह विविध साधू-महंतांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढली. प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचा पेहराव केलेले कलाकार लक्ष वेधून घेत होते. मागे ढोल-ताशा पथकासह नागरिकांनी सहभागी होत सिलेक्शन कॉर्नर-हौसनरोड-झेंडा चौक-वडनेररोडवरील शारदा स्टॅण्ड-मिठाई स्ट्रीटमार्गे जुने बस स्थानकपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. चारणवाडी लेझीम पथक, दांडपट्टा, लाठीकाठी, भिंगरीसह विविध कसरती करण्यात आल्या. जुन्या स्थानकावर मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येऊन युवकांनी बाईक रॅली काढत प्रभू रामचंद्रांच्या नावासह हनुमंताच्या नावाचा जयघोष केला.

श्रीराम मंदिरात अभिषेक

वडनेररोडवरील विद्याविनय सोसायटी येथील अलंकार आणि पुष्पहारांनी सजलेल्या श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती, आकर्षक रांगोळ्या, राम भजनात तल्लीन झालेल्या भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेल्या श्रीराम मंदिरात कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक सचिन ठाकरे यांच्या उपस्थितीत अमित कांडेकर यांनी सपत्नीक अभिषेक केला. रामजन्मोत्सवाची पूजा झाली यावेळी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे नगरसेवक भगवान कटारिया, दिनकर आढाव उपस्थित होते. दुपारी १२ ते ३ या वेळेत हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सांयकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

श्रीकृष्ण मंदिरात मैफल

देवळालीतील मेन स्ट्रीटवरील श्रीकृष्ण मंदिरात राम जन्मला गं सखे राम जन्मला या गीतांचे स्वर गुंजले. सोहळ्यापूर्वी गायक नंदकुमार देशपांडे यांसह मंगेश टाकळकर, उत्तम टाकळकर यांनी दशरथा घे हे पायसदान, अबीर गुलाल, ध्यान लागले रामाचे, अमुचा कैवारी हनुमान आदी पारंपरिक भक्तिगीते सादर केली. दिनेश हाबडे, मुकेश गायकवाड, महेश गायकवाड, राहुल नाणेगावकर, सागर नागरे आदींनी संयोजन केले.

विठ्ठल मंदिरात सोहळा

देवळालीतील प्राचीन विठ्ठल मंदिरात वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. आरतीनंतर सुरेश वाघुळकर, प्रकाश वाघुळकर, लक्ष्मण पाटोळे, पांडुरंग झोंबाड, राजाराम भिवागडे, दीपक शिंदे आदी भाविक उपस्थित होते.

---

नाशिकरोडला विधिवत सोहळा


नाशिकरोड - सिन्नर फाटा ः नाशिकरोड, देवळालीगाव, विहितगाव, जेलरोड, टाकळी परिसरातील राम मंदिरांत दुपारी रामजन्म सोहळा झाल्यानंतर भाविकांनी जय श्रीरामचा जयघोष केला. परिसरातील विविध मंदिरांत भाविकांचा मोठा उत्साह दिसून आला.

मुक्तिधाममध्ये महापूजा

येथील मुक्तिधाम मंदिरात सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत रामायणपाठ झाला. दिवसभर भजन झाले. दुपारी बाराला रामजन्मोत्सोव साजरा करण्यात आला. धर्मादाय आयुक्त घुगे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत यांनी सपत्नीक आरती केली. मुक्तिधामचे विश्वस्त हिरालाल चौहन, विजय चौहान, नटवरलाल चौहान, जगदीश चौहान आदींची प्रमुख उपस्थिती होती. राजेंद्र कुलकर्णी, सुरेश मानकर, ज्ञानेश्वर यंदे, नाना पवार, सुनील शिरसाठ संजय बेलेकर, तुकाराम निमसे, मंदिराचे पुजारी नागेश शास्त्री देशपांडे, जयंत मिश्रा, कृष्णानंद वाघमारे आदींनी संयोजन केले. गुरुवर्य वैरागकर प्रतिष्ठानतर्फे शंभर विद्यार्थ्यांनी सामुहिक तबलावादन सादर केले.

देवळालीगावात अभिषेक

देवळालीगावातील राम मंदिरात सकाळी मूर्तीला अभिषेक करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक वसंतराव तनपुरे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी शांतारामबापू कदम, रुंजा पाटोळे, मनोहर कोरडे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सत्यभामा गाडेकर, श्याम गोहाड, मनोज जोशी, संतोष कोल्हे, सतीश शिंदे, प्रमोद बुवा, किशोर बोराडे, महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. गाडेकर मळ्यातील साईबाबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. गांधीनगर येथील रामलीला समितीतर्फे सकाळी गांधीनगर येथील शिवाजीच चौकात भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतली. देवी चौकातील राम मंदिरात भजन-कीर्तनाचा कार्याक्रम झाला.

---

टाकळीत पालखी सोहळा

टाकळीतील मारुती देवस्थान आणि रामदास स्वामी मठात दुपारी बाराला श्रीरामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. रामदास स्वामी मठातून सर्मथांच्या पादुका व कुबडी पहाटे पाचला काळाराम मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आल्या. त्यासाठी पालखी सोहळा झाला. सकाळी पाच ते आठ या वेळेत धार्मिक कार्यक्रम झाले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एन. के. ब्रह्मे सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, प्रकाश पवार, विजया माहेश्वरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मंगळवारपासून सायंकाळी व्याख्यानमालेला सुरुवात झाली. ती ११ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

--

विष्णूनगर गजबजले

सिन्नर फाटा येथील विष्णूनगरमधील हनुमान मंदिरात दुपारी बारा वाजता श्री रामजन्मोत्सव साजरा झाला. याप्रसंगी उपस्थित भाविकांनी टाळ-मृदंगांच्या गजरात केलेल्या रामनामाच्या गजराने संपूर्ण परिसर गजबजून गेला. तरुण महाराष्ट्र मित्र मंडळातर्फे आतषबाजी करण्यात आली. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दिलीप पवार, संदीप गायकवाड, विलास चव्हाण, अर्जुन दवते, नितीन वराडे, संजय घुले, अशोक वराडे, किशोर चव्हाण आदींनी संयोजन केले.

चेहेडी पंपिंग स्टेशन

येथील हनुमान मंदिरात सकाळी भजन झाले. स्थानिक भाविकांनी या वेळी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता श्री रामजन्मोत्सव साजरा झाला. याप्रसंगी उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. चेहेडी गावातील मुख्य मंदिरातही भजनाचे आयोजन केले गेले.

---

सिडकोनगरी दुमदुमली

सिडको ः सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात सकाळपासूनच सिडको व इंदिरानगर परिसर गजबजला होता. परिसरातील सर्वच मंदिरांत भाविकांचा उत्साह दिसून आला. सर्वच मंदिरांची फुले व रोषणाईद्वारे सजावट करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सामाजिक संस्थांनी प्रसादवाटप केले.

उत्तमनगरला महापूजा

उत्तमनगर येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी पुजारी नंदकिशोर उपासनी व अविनाश उपासनी यांनी पौराहित्य करीत महाअभिषेक, महापूजा केली. हभप गजेंद्र महाराज राजपूत यांचे हरिकीर्तन झाले. दुपारी आमदार सीमा हिरे, नगरसेवक राजेंद्र महाले, मुकेश शहाणे, दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, नगरसेविका प्रतिभा पवार, छाया देवांग, रत्नमाला राणे, कल्पना पांडे, डॉ. मंजूषा दराडे, गोविंद घुगे, संजय भामरे, डॉ. संदीप मंडलेचा आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने ३१ फूट भव्य कळसाची उभारणी केली जात असल्याचे सांगण्यात आले.

शिवाजी चौकात अभिषेक

येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त दर वर्षीप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्रीरामाला अभिषेक घालण्यात येऊन महापूजा करण्यात आली. भाविकांच्या हस्ते पाळणा हलवून श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दिवसभर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.

रायगड चौकात महाआरती

येथील श्रीराम मित्रमंडळातर्फे अभिषेक व महापूजा करण्यात आली. नगरसेवक सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, श्याम साबळे यांच्या हस्ते श्रीरामाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हरिभाऊ आढाव, दिलीप ठाकूर, अंबादास संधान, त्र्यंबक उशीर, गोविंद शिंपी, प्रकाश माळी, सुनील खैरनार, लक्ष्मण गोसावी, सोपन राणे, चिंधू ठाकरे, नानासाहेब निकम, शिवाजी निकम, गोपीनाथ सोनवणे यांच्यासह परिसरातील भाविक उपस्थित होते.

राजीवनगरला लघुरुद्राभिषेक

येथे नाशिक सोशल ग्रुपच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दर वर्षीप्रमाणे यंदाही श्रीरामाच्या मूर्तीला लघुरुद्राभिषेक करण्यात आला. दिवसभर या ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप सुरू होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निकेत भोसले, सुरज वराडे, अजिंक्य वडनेरे, मनीष व्यास, किरण नागरे यांच्यासह सदस्य प्रयत्नशील होते.

चेतनानगरला मिरवणूक

चेतनानगर येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात हभप उदयकुमार गंधे महाराज यांची श्रीराम जीवनगाथा या विषयावर प्रवचनमाला झाली. मंगळवारी सकाळी दहा ते बारा या वेळात प्रवचन झाले. सकाळी श्रीरामाची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बारा वाजता मंदिर आवारात श्री रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हभप तुकाराम महाराज ढोमसे यांचे काल्याचे प्रवचनही यावेळी झाले. नगरसेविका पुष्पा आव्हाड, संगीता जाधव, भगवान दोंदे, सुदाम ढेमसे, सतीश सोनवणे, सुप्रिया खोडे, श्याम बडोदे, दीपाली कुलकर्णी व अर्चना जाधव यांची उपस्थितीत होती.

विनयनगरला पालखी

विनयनगर येथे दशरथनंदन बहुउद्देशीय संस्थेतर्फे रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी रामाला अभिषेक करून महापूजा करण्यात आली. दुपारी बारा वाजता परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पाळणा हलवून रामजन्मोत्सव करण्यात आला. सायंकाळी मंदिरापासून ढोल-ताशांच्या गजरात श्रीरामाची पालखी काढण्यात आली. महिलांनी पालखी मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. संस्थेच्या अध्यक्षा पूनम खन्ना, उपाध्यक्ष श्रीधर बागुल, सचिव दिलीप चव्हाण यांच्यासह पंढरीनाथ अमृतकर, अरुण पटेल, इंदुमती अमृतकर, सुमन वाकडे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

--

सातपूरला हरिनाम सप्ताह

सातपूर ः शिवाजीनगर येथील ध्रुवनगर भागात श्रीराम नवमीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मंदिरात अमोल पाटील यांच्या हस्ते वीणापूजन करून सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. हभप भास्कर महाराज पानसरे यांच्या वाणीचा लाभ भाविकांनी घेतला. हनुमान मित्रमंडळाचे मोहन शिंदे, सतीश साखरे, विजय पुंड, बाळासाहेब चव्हाणके, संदीप मगर आदी यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम मनी वसावा, चित्ती दिसावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

ढोल-ताशांचा सुरू असलेला गजर, आकर्षक विविधरंगी रांगोळ्यांनी सजलेला काळाराम मंदिर परिसर, श्रीराम कथेवर आधारित कीर्तनात श्रीरामनामाचा जयघोष, मंदिरातील गाभ्यात सजविलेल्या राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती... हे चैतन्यदायी चित्र होते काळाराम म‌ंदिर परिसरातील. रामजन्माचा सोहळा ‘याचि देही’ पाहण्यासाठी मंदिरासमोर दुपारी बारा वाजता रखरखीत उन्हातही भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झालेल्या महिला, फुगडी खेळण्यात आणि श्रीरामाचा पाळणा गाण्यात रमलेल्या सुवासिनी, अशा मंगलमय आणि पवित्र वातावरणाने काळाराम मंदिर परिसर भक्त‌िमय झाला होता. ‘जय श्री राम’, ‘सियावर रामचंद्र की जय’ असा उद्घोष प्रत्येकाच्या मुखी होता. दुपारी बारा वाजता ‘राम जन्मला गं सखे राम जन्मला’ असे म्हणत श्रीरामजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

चैत्र शुद्ध नवमीला होणाऱ्या जन्मोत्सवासाठी काळाराम मंदिर संस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आली होती. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. प्रभू रामचंद्रांची काकड आरती, त्यानंतर काळारामास स्नान घालण्यात आले. यंदाचे मानकरी चंदनबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. गाभाऱ्यातील मूर्तींची सजावट झाल्यानंतर दुपारी बारा वाजता गाभाऱ्याचा पडदा उघडण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आरती करण्यात आली. पालकमंत्री गिरीश महाराज, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक कमलेश बोडके, विजय साने, वसंत गिते आदी उपस्थित होते.

मंदिराच्या आवारात भाविकांना सुंठ आणि साखर यांच्यापासून बनविलेल्या पंजरी, खडीसाखर, बुंदी यांचा प्रसाद वाटप करण्यात येत होता. मंदिराच्या पूर्व दरवाजाला गुरुदत्त सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा संस्थेतर्फे भाविकांसाठी शीतपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.

शहरभर भक्तिमय वातावरण

रामजन्मोत्सवानिमित्त नाशिकमधील सर्व मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण होते. मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा, प्रसादवाटपाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरांमध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या दिसून येत होत्या. काही मंडळांकडून भाविकांना प्रसादवाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजी मंदिर अनुभवण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक शहरातील सांस्कृतिक व सामाजिक वैभवात भरीव योगदान देणारे श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्ट म्हणजेच गोदाकाठचे बालाजी मंदिर. शहराच्या वैभवाच्या अनेक खुणा आज जीर्णावस्थेत, मोडकळीस आलेल्या आहेत. अशा अवघड वळणावर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना अन् आपल्या उपस्थितीतून नाशिककरांच्या मनाला नव्याने ऊर्जा देण्याचे प्रयत्न बालाजी मंदिर संस्थान करताना दिसते. हा वारसा आजही शहराचे वैभव झळाळून टाकतो. हा वारसा नेमका कसा उभा राहिला अन् कोणकोणत्या उपक्रमातून आपले योगदान देतो आहे हे अनुभवता यावे, यासाठी ‘गोदावरीशी नाते जोडूया..’ या उपक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे बालाजी मंदिरात ९ एप्रिल, रविवारी सकाळी ८.३० वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर ही आपल्या संस्कृतीमधील एक सुंदर अन् व्यापक संकल्पना. पण मंदिर ही संकल्पना जीवन जगताना किती महत्त्वाची भूमिका बजावते या अंगाने आपण कधी विचारही केलेला नसतो. मात्र मंदिर आपले काम करीत असते अन् त्याचा ठसा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपल्या व्यक्त‌िमत्वावर उमटत असतो. मग आपण कधी मंदिरात गेलो नाही तरीही दररोज येता-जाता डोळ्यात भरणारे अन् आरतीच्या स्वरांतून अनुभवयाला मिळणारे मंदिर आपोआप मनाचा ठाव घेते. म्हणूनच मंदिराबाबत असे म्हटले जाते की, स्वत:शी संवाद साधून शांतपणे एकाग्र होण्याची एक निवांत जागा म्हणजे मंदिर. नाशिकमधील गोदाकाठच्या बालाजी मंदिराशीही नाशिककरांचे असेच नाते जोडले गेले आहे. मग तो ब्रह्मोत्सव असो व गाण्याची मै‌फिल, कीर्तन प्रवचनांची परंपरा पुढे घेऊन जाणारे हे व्यासपीठ असो वा उमेदीच्या कलाकारांना बळ देणारे हे ठिकाण नेमक कसं साकारले गेले हे या हेरिटेज वॉक मधून जाणून घेता येणार आहे. बालाजीवाले घराण्यातील सदस्या वैशाली बालाजीवाले उपस्थितांना याबाबत माहिती देणार आहेत.

मंदिराची अनोखी शैली..!

दगडी बांधणीचे बालाजी मंदिर व वाडा अनोख्या अन् वैशिष्टयपूर्ण वास्तू रचनेचे प्रतीक आहे. हे मंदिर व वाडा कोणी बांधला, कधी बांधला, त्यामागील अख्यायिका तसेच बालाजीवाले घराण्याची परंपरा जाणून घेता येणार आहे. मंदिरातील ५० वर्ग फुटाचा हॉलचे कोणत्याही आधाराशिवाय असलेले छत मंदिराचे वास्तुशास्त्र उलगडते तर भगव्या रंगामुळे संपूर्ण गोदाघाट उजळून निघतो. मंदिरातील श्री व्यंकटेश बालाजीची शालीग्रामातील मूर्ती तर रमा आणि लक्ष्मीची तांब्याची मूर्ती लक्ष वेधून घेते. याच वाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर कुसुमाग्रजांचे काही काळ वास्तव्य होते. मंदिर व वाडा वाडा संस्कृतीचा उत्तम अनुभव येथे घडतो.

कुठे जमायचे?

ठिकाण : बालाजी मंदिर, सराफ बाजार

‌दिनांक : ९ एप्रिल, रविवार

वेळ : सकाळी ८.३० वाजता

नावनोंदणी आवश्यक

बालाजी मंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘मटा’ हेरिटेज वॉकतर्फे सहभागी होण्यासाठी रमेश पडवळ यांच्या ८९९९००८५८८ या क्रमांकावर आपले नाव व आपल्यासोबत येणाऱ्यांची संख्या व्हॉटसअॅप करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ झाडांना दुभाजकांचे कवच

$
0
0



डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

विकासाच्या नावाखाली रस्ते वाढवल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडे रस्त्यात आली. त्यात या झाडांनाच दोषी ठरवून त्यांची कत्तल करण्यास सुरुवात झाली आहे. जेलरोडला अशा झाडांभोवती दुभाजक बांधून त्यांना वाचविण्याचे पुण्यकर्म महापालिकेच्या हातून घडले, ते पर्यावरणप्रेमींच्या दबावामुळेच. जेलरोडचा हा पॅटर्न तपोवनात राबवून तेथील झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी मोहीम उघडली आहे. शहरातील अन्य भागातही त्याला प्रतिसाद मिळत आहे.

नाशिकरोडला द्वारकापासून बिटकोपर्यंत पूर्वी दुतर्फा वड व कडुनिंबाची असंख्य झाडे होती. नाशिक-पुणे रस्ता रुंदीकरणासाठी ही झाडे केव्हाच तोडण्यात आली. आता द्वारका, बोधलेनगर, फेम चौक, डॉ. आंबेडकरनगर, उपनगर, दत्त मंदिर चौक परिसरात थोडीच झाडे उरली आहेत. त्यातीलही बरीचशी वाहतुकीला अडथळा ठरणारी म्हणून तोडली जाणार आहेत. झाडे तोडल्यावर रस्ता रुंद होणार. रस्ता रुंद झाल्यावर राजकीय आशीर्वादाने अतिक्रमणे वाढून पुन्हा वाहतुकीला अडथळा होणार. म्हणजे झाडे गेली आणि अतिक्रमणे आली, असे चित्र होणार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

जेलरोडला आदर्श

बिटको ते जेलरोडदरम्यान पूर्वी दाट वनराई होती. दुतर्फा सुंदर झाडे होती. त्यामुळे परिसराचे सौंदर्य खुलले होते. तथापि, बिटकोपासून जत्रा हॉटेलपर्यंत नागरी वस्त्या वाढल्या. पाठोपाठ नवे रस्ते झाले आणि झाडांची सर्रास कत्तल झाली. जेलरोडवर आता कमी संख्यनेने झाडे राहिली आहेत. माणसांच्या चुकीचा दाह आता उन्हाळ्यात नागरिकांना बसत आहे. जेलरोडला नांदूर नाक्याकडे जाताना संत जनार्दन स्वामी पूल सोडल्यावर धोकादायक वळण आहे. या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी सात-आठ झाडे आहेत. कुंभमेळ्याच्या वेळी रस्ता रुंद करताना त्यांचा प्रश्न आला, तेव्हा ती न तोडता त्याभोवती दुभाजक बांधण्यात आले. त्यामुळे झाडे वाचली आणि अपघातांनाही आळा बसला आहे. हा आदर्श म्हसरूळ, गंगापूररोडला घेता येईल.

--

टाकळीरोड सपाट

जेलरोडच्या नारायणबापू चौकातून टाकळीकडे जाताना रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून असंख्य झाडे महापालिकेतर्फे तोडण्यात आली. रस्ता रुंदीकरणासाठी नागरिकांनीही फारसा आक्षेप घेतला नाही. तथापि, आता अनेक वर्षे होऊनदेखील हा रस्ता रुंद झालेला नाही. रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. पथदीपही नाहीत. झाडेही गेली आणि रस्ताही झाला नाही, असे आजचे चित्र आहे. रामदास स्वामींनी तपश्चर्या केली, तो टाकळी परिसरही उजाड होत आहे.

--

तपोवन तरी वाचवावे

तपोवनात रस्त्यामधील झाडे आल्यामुळे ती तोडण्याची चूक महापालिका करणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कारण, ही झाडे तोडल्यावर तेथे दुभाजक येणारच आहेत. त्यामुळे जेलरोडप्रमाणे या झाडांभोवती दुभाजक करून ही झाडे वाचविणे शक्य आहे. तपोवनात असा प्रयोग अनेक ठिकाणी अगोदरच करण्यात आलेला आहे. त्यामुळेच तपोवनाचे पर्यावरण व सौंदर्य थोड्याफार प्रमाणात टिकून आहे. झाडांभोवती दुभाजक बांधल्यास हायकोर्टाचाही अवमान होणार नाही आणि पर्यावरणही वाचेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

--

फेम चौकात आधार

नाशिक-पुणे महामार्गावर बिटकोकडे जाताना फेम चौकात सिग्नल आहे. या चौकात रस्त्याच्या कडेला विलायती चिंचेचे झाड चांगलेच वाढलेले आहे. त्यावर चिमण्यांचे वास्तव्य आहे. उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने वाहनचालक याच झाडाखाली हिरव्या सिग्नलसाठी थांबतात. हे झाड रस्त्यात येत नाही. ते तोडू नये, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. याच चौकात फेमसमोर कडुनिंबाची चार-पाच झाडे आहेत. ती रस्त्यात नसली, तरी त्यावर कुऱ्हाड चालण्याची शक्यता आहे. डॉ. आंबेडकरनगर व गांधीनगरच्या प्रवेशद्वाराशेजारी, तसेच उपनगर पोलिस चौकीजवळही दोन-तीन झाडे वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. ती तोडणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उपनगरचा बस स्टॉप व द्वारका ते बिटकोदरम्यानची अतिक्रमणेही हटविणे आवश्यक आहे.

---

‘मटा’ने वाचवली शंभरावर झाडे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नांदूर नाका ते जत्रा हॉटेलदरम्यानचा रस्ता रुंद करण्यात आला. कॅनॉलच्या पुढे दुभाजकही टाकण्यात आले. या रस्त्यावर पूर्ण वाढलेली दुतर्फा शंभरावर झाडे आहेत, त्यांचा रस्त्याशी काही संबंध नाही. ती पूर्णतः कडेला आहेत. मात्र, तरीही फूटपाथ बांधून त्यातून आर्थिक हित साधण्यासाठी ही झाडे तोडण्याचा घाट घालण्यात आला होता. झाडे तोडण्यासाठी नंबरही कोरण्यात आले होते. या मार्गावर दुतर्फा शेती असताना फूटपाथ बांधून कोणाचे हित साधणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. त्यावेळी यासंदर्भात ‘मटा’मध्ये फोटोसह वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ही शंभरावर झाडे वाचली. आज ही झाडे दोन मजली इमारतीइतकी वाढली असून, त्यांना सुंदर फुलेही आली आहेत. यापासून बोध घेत हायकोर्टाच्या निर्देशांचा चुकीचा अर्थ लावून रस्त्यात न येणारीही झाडे तोडणे महापालिकेने त्वरित थांबवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

--

रस्त्यात अडथळा ठरणारी झाडे तोडलीच पाहिजेत, त्याबाबत वाद नाही. तथापि, रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडेही सध्या तोडण्याचे पाप महापालिका करीत आहे. झाडे लावून ती वाचविणे, वाढविणे किती कष्टाचे आहे, हे आम्ही अनुभवत आहोत. लोकप्रतिनिधींसह महापालिकेने नागरिक व कोर्टाची दिशाभूल करून झाडे तोडणे थांबवावे.

-शेखर गायकवाड

--

वृक्षतोडीमुळे जेलरोड आधीच बोडका झाला आहे. फार थोडी झाडे शिल्लक राहिलेली आहेत. तीही वाहतुकीला अडथळ्याच्या नावाखाली तोडली जाणार आहेत. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. प्रथम या झाडांच्या बदल्यात अन्यत्र झाडे लावावीत. झाडे तोडल्यामुळे पर्यावरण हाताबाहेर गेले आहे. त्याचे चटके सर्वांना बसत आहेत.

-जगदीश पवार

थंड हवामानाचा प्रदेश म्हणून नाशिकची ओळख होती. आता झाडांची संख्या विकासाच्या नावाखाली कमी केल्यामुळे तापमान ४५ अंशांच्या पुढे जाऊ लागले आहे. समंजस पुणेकरांनी रस्त्यात आलेल्या झाडांचा दुभाजकांप्रमाणे वापर केला. रस्त्याच्या कडेची झाडेही वाचवली. तसा समंजसपणा नाशिकनेही दाखवावा.

-अल्ताफ देशमुख

झाडे नसलेल्या रस्त्यावरही प्राण जातात. मग काय रस्ताच हटवायचा का? रस्त्यातील झाडांमुळे अपघात होतात, हा चुकीचा युक्तिवाद आहे. अतिवेगातील वाहने झाडांवर धडकल्यामुळे अपघात होत आहेत. दोष मात्र झाडांवर लादला जातो. संयमाने गाडी चालविल्यास झाडे तोडावी लागणार नाहीत. फक्त घातक झाडे तेवढी हटवावीत.

-राजेंद्र तिडके

झाडे वाचविण्याऐवजी ती तोडण्याकडेच कल दिसतो. मुंबई-आग्रा, नाशिक-औरंगाबाद महामार्गांपाठोपाठ नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणासाठी प्रचंड वृक्षतोड झाली आहे. त्याबदल्यात लावलेली झाडे आजपर्यंत वाढलेली नाहीत. महापालिकेने वृक्षतोडीच्या बदल्यात लावलेल्या झाडांची परिस्थिती अशीच असेल, त्यामुळेच चिंता वाटते.

-डॉ. संजय शिंदे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनआयएफटीच्या रँकिंगमध्ये तेजस अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फॅशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण देणाऱ्या देशातील अव्वल दर्जाच्या एनआयएफटी या संस्थेच्या प्रवेश परीक्षेत नाशिकमधील विद्यार्थ्याने ओबीसी प्रवर्गातून देशात नववा क्रमांक पटकावला आहे. हे सुयश मिळविणारा तेजस विलास शिरोरे हा दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचा विद्यार्थी आहे.

फॅशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या देशपातळीवर अव्वल दर्जाच्या एकूण १७ संस्था आहेत. यापैकी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) दिल्ली ही संस्था यात अव्वल दर्जाची मानली जाते. केंद्र सरकारच्या टेक्स्टाइल मंत्रालयातर्फे ही संस्था चालविली जाते. येथून फॅशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी जगभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात.

या संस्थेतील अभ्यासक्रमांसाठी १२ फेब्रुवारी २०१७ मध्ये प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच ३० मार्च रोजी जाहीर करण्यात आला. परीक्षेत तेजसने ओबीसी प्रवर्गातून नववा, तर सर्वसाधारण प्रवर्गातून ८९ वा क्रमांक मिळवला आहे. परीक्षेस देशभरातील सुमारे २५ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. या यशामुळे त्याची निवड आता बी.एफ.टेक. (बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी) या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी झाली आहे. खेडगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्याने करिअरसाठी वेगळी वाट निवडू शकलो, असे तेजसने सांगितले. त्याचे वडील पेठ येथील शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटक पोलिस पथक कार्यान्वित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

धार्मिक संस्कृती जपलेल्या नाशिक शहरासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटक पोलिस ही संकल्पना आकारास आली आहे. पर्यटकांना येणाऱ्या अडचणी, व्हिसा, निवास, भोजन, हेल्पलाइन नंबर, पर्यटनस्थळ याबाबतची सर्व प्रकारची माहिती व मार्गदर्शन या पर्यटक पोलिस पथकामार्फत करण्यात येणार आहे.

श्रीकाळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोर रामनवमी या पवित्र दिवसाचे औचित्य साधून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पर्यटक पोलिस पथक कार्यान्वित करण्यात आले. आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या उपस्थितीत पर्यटक पोलिस पथकासाठी विशेष आकर्षक वाहन तयार केले आहे. त्या वाहनाला लावलेली फीत कापून उद्घाटन करण्यात आले. पोलिस आयुक्त, उपायुक्त परिमंडल १ व २, तसेच एमटीडीसी, नाशिक यांच्या सन्मवयाने हे पोलिस पथक कार्यान्वित करण्यात आले.

--

येथे ठेवणार वॉच

नाशिकचे प्रमुख पर्यटन केंद्र असलेले रामकुंड, गंगाघाट, तपोवन, काळाराम मंदिर, सोमेश्वर, बालाजी मंदिर, सीतागुंफा, लक्ष्मण रेखा, बॉटनिकल गार्डन, फाळके स्मारक, नवश्या गणपती, पांडवलेणी, मुक्तिधाम, भक्तिधाम आदी ठिकाणी गस्त ठेवली जाणार आहे. संवेदनशील पर्यटनस्थळावर जास्तीत जास्त पेट्रोलिंग ठेवून पर्यटकांना मार्गदर्शन, त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध, संशयित वस्तू व व्यक्ती यांच्याकडे बारकाईने लक्ष ठेवून गैरकृत्यांना आळा घालण्याचे कामही या पथकामार्फत केले जाणार आहे.

--

वाहनात व्हिजिट बुक

पर्यटक पोलिस पथकासाठी विशेष आकर्षक वाहन तयार केले आहे. या वाहनात ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यात आलेली आहे. वाहनात पर्यटकांच्या सूचना, तक्रारी, शेरा यासाठी व्हिजिट बुक ठेवण्यात आलेले आहे. वाहनावरच हेल्पलाइन नंबर दर्शनीय भागावर लिहिण्यात आलेले आहेत. एमटीडीसी व पोलिस आयुक्तालय नाशिक यांची माहितीपत्रकेही ठेवण्यात आलेली आहेत.

--

यांची झालीय नियुक्ती

पर्यटक पोलिस पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव, उपनिरीक्षक चांदनी पाटील, हवालदार विठ्ठल आव्हाड आणि सात पोलिस कर्मचारी यांची या पथकासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकास महाराष्ट्र पर्यटन विकास केंद्र, नाशिक कार्यालयाच्या समन्वयाने पर्यटनस्थळांबाबतची माहिती व सॉफ्ट स्किलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेसला अखेर सातवा आयोग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोडच्या प्रेस कामगारांना सातवा वेतन आयोग मे महिन्याच्या पगारात लागू होणार असल्याने प्रेस कामगारांमध्ये दसरा-दिवाळीप्रमाणे आनंदाचे वातावरण आहे. नाशिकरोडच्या दोन्ही प्रेसमधील एकूण साडेपाच हजार कामगारांना याचा लाभ होणार आहे. एरिअर्स देण्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

येथील भारत प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयाचे महामंडळात (एसपीएमसीआयएल) रूपांतर झालेले असल्याने त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आयोग मिळणे अवघडच होते. त्यातच २००८ मध्ये प्रेस युनियनच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापनाशी करार करून पुढील वेतनवाढ आयडीए पे स्केलप्रमाणे स्वीकारली जाईल, असे आठव्या क्लॉजमध्ये नमूद केल्याने सातव्या वेतन आयोगाच्या उरल्यासुरल्या आशाही मावळल्या होत्या. तथापि, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी देशातील सर्व नऊ प्रेसमधील कामगार संघटनांची एकजूट केली. कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. अपेक्स कमिटीमध्ये महामंडळाच्या व्यवस्थापनापुढे हा प्रश्न मांडून पाठपुरावा केला. खासदार हेमंत गोडसेंच्या मदतीने केंद्रीय मंत्रालयापुढे आपली बाजू मांडली. दिल्लीत २३ व २४ जानेवारी २०१७ रोजी अपेक्स कमिटीच्या बैठकीत प्रेस महामंडळाच्या व्यवस्थापनाने देशातील सर्व नऊ प्रेस युनिटला सातवा वेतन आयोग देण्यास मंजुरी दिली. हा प्रस्ताव महामंडळाच्या बोर्डाकडे पाठविण्यात आला. १६ मार्च २०१७ रोजी बोर्डाने देशभरातील नऊ प्रेसमधील अकरा हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली. यानंतर २७ मार्चला जगदीश गोडसे पुन्हा दिल्लीत जाऊन महामंडळ बोर्डाच्या संचालकांना भेटले. आयोगाच्या ऑर्डर्स त्वरित देण्याची विनंती केली. येत्या आठवडाभरात ऑर्डर देण्याचे मान्य करण्यात आले आहे. एप्रिलचा पगार मेमध्ये सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार असल्याने प्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कार्यालयात आनंदोत्सव

प्रेस मजदूर संघाचे भारत प्रतिभूती मुद्रणालयाच्या आवारात कार्यालय आहे. तेथे सातवा वेतन आयोगाची वार्ता येताच दिवाळी साजरी झाली. संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष माधवराव लहांगे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, नंदू पाळदे आदी पदाधिकाऱ्यांना कामगारांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी गर्दी झाली होती.

मजदूर संघाने सातव्या वेतन आयोगासाठी जोरदार प्रयत्न केले. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी हा आयोग मिळण्याचे दरवाजे बंद केले असतानाही आम्ही तो नाशिकरोडसह देशातील सर्व प्रेस कामगारांना मिळवून दिला, याचा विशेष आनंद वाटतो.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस प्रेस मजदूर संघ

प्रेस कामगारांना दिलेले आश्वासन आम्ही पूर्ण करू शकलो याचे मोठे समाधान वाटते. कामगारांचा विश्वास व एकजूट, तसेच मजदूर संघाचे प्रामाणिक प्रयत्न यामुळेच हे शक्य झाले. सातवा आयोग मिळाल्याबद्दल कामगारांचे हार्दिक अभिनंदन.

- ज्ञानेश्वर जुंद्रे, कार्याध्यक्ष, प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विभागात जम्बो भरती

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक अप्पर आयुक्तालयातील अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहातील वर्ग तीन संवर्गाच्या १५० जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात आली आहे. या जम्बो भरतीप्रक्रियेसाठी आदिवासी विभागाने उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. या पदामंध्ये पुरुष व स्त्री अधीक्षक व गृहपाल ही महत्त्वाची पदे असून, पात्र उमेदवारांकडून २४ एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.

नाशिक अप्पर आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या नाशिक, कळवण, नंदुरबार, तळोदा, यावल, राजूर या प्रकल्प कार्यालयांच्या क्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये पुरुष व स्त्री अधीक्षक व गृहपालांची पदे रिक्त आहेत. आदिवासी वसतिगृहामंध्ये सोयी-सुविधांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. त्यामुळे अधीक्षक व गृहपालांची पदे तत्काळ भरती करण्याची मागणी केली जात होती. त्याला राज्य सरकारनेही ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अप्पर आयुक्त नाशिक कार्यालयात तब्बल १५० जागांसाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेंतर्गत असलेले सर्व नियम या भरतीप्रक्रियेसाठी लागू असणार आहेत.

अशी आहेत पदे

महिला अधीक्षक ः ११३

पुरुष अधीक्षक ः २२

पुरुष गृहपाल ः १०

महिला गृहपाल ः ५

२४ एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीच्या सभापत‌िपदी शिवाजी गांगुर्डे?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या स्थायी समितीच्या १६ सदस्यांची निवड जाहीर केल्यानंतर आता सभापत‌िपदी कोणाची वर्णी लावावी, यावरून भाजपमध्ये खलबते सुरू झाली आहेत. स्थायी समितीत १६ पैकी भाजपचे ९ सदस्य निवडून गेल्याने भाजपचाच सभापती होणार असून, सभापतिपद कोणाला द्यायचे यासाठी मंगळवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्थायी समितीच्या सदस्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्थायी समितीवर भाजपच्या कोट्यातून शिवाजी गांगुर्डे आणि शश‌िकांत जाधव या दोन ज्येष्ठ सदस्यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी गांगुर्डे आणि जाधव या दोघांमध्ये चुरस असली तरी अनुभवामुळे गांगुर्डे यांचे पारडे सध्या तरी जड आहे. सोबतच अलका अहिरे यांनीही या पदासाठी दावा केला आहे. भाजपकडून सभापतिपदासाठीचे पत्ते हे गुरुवारीच उघड केले जाणार आहेत.

स्थायी समितीच्या सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी होत आहे. गेल्या आठवड्यात महासभेत स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात भाजपचे ९ सदस्य असल्याने भाजपचाच सभापती होणार हे आता निश्चित आहे. भाजपतर्फे शशिकांत जाधव, शिवाजी गांगुर्डे, जगदीश पाटील, अलका अहिरे, विशाल संगमनेरे, डॉ. सीमा ताजणे, मुकेश शहाणे, श्याम बडोदे, सुनीता पिंगळे अशा नऊ जणांना स्थायीवर संधी देण्यात आली आहे. या नऊ जणांमध्ये शश‌िकांत जाधव आणि शिवाजी गांगुर्डे या दोन ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे. त्यात गांगुर्डे पाचव्यांदा निवडून आले असून, ते सर्वांत वरिष्ठ आहेत. त्यापाठोपाठ जाधव यांचा अनुभव आहे. त्यामुळे सभापतिपदासाठी दोघांमध्येच चुरस आहे. मात्र, सिडकोमधून अलका अहिरे यांनीही सभापतिपदाच्या स्पर्धेत उडी घेतली असून, प्रदेश पातळीवरून हे पद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

भाजपतर्फे सत्तेतील महत्त्वाची पदे देताना विभागीय समतोलही साधला जाईल, याची काळजी घेतली जाणार आहे. पंचवटी विभागातीलच महापौर असल्याने स्थायी समिती पंचवटी विभागाकडे जाण्याची शक्यता कमीच आहे, तर नाशिकरोडला गटनेतेपद दिल्याने नाशिकरोडचाही दावा संपला आहे. नाशिक पूर्वमध्ये उपमहापौरपद दिल्याने तो विभाग स्थायी समितीच्या स्पर्धेतून बाद झाला आहे. त्यामुळे सिडको, सातपूर आणि नाशिक पश्चिममधूनच सभापतिपदाची संधी मिळणार आहे. त्यातच नाशिक पश्चिम आणि सातपूर विभागालाच अधिकची संधी आहे. सभापतिपदासाठी गुरुवारपर्यंत (दि. ६) अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री महाजन यांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सदस्यांची बैठक घेतली. सोबतच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी जाधव आणि गांगुर्डे या दोन नावांवरच चर्चा झाली आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाची वर्णी लागेल हे निश्चित आहे.

गुरुवारीच पत्ते उघड

पालकमंत्री महाजन यांनी मंगळवारी सभापतिपदासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांशी चर्चा केली आहे. मात्र, त्यांनी सभापतिपदासाठी कोणाला संधी द्यायची याचा निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे. सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी होत असून, त्याच दिवशी स्थायीच्या सभापतिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. अगोदरच नाव घोषित केले तर नाराजी ओढवली जाऊ शकते. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या काही मिनिटे आधी उमेदवाराच्या नावाची घोषणा करून अर्ज दाखल केले जाणार आहेत. सभापतिपदासाठी गांगुर्डे आणि जाधव यांच्यात स्पर्धा असली तरी गांगुर्डे यांचे पारडे सद्यःस्थितीत जड आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झपाट्याने घटतोय धरणांतील पाणीसाठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाची तीव्रता वाढत असताना जिल्ह्यातील २४ धरणांमधील पाणी साठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. धरणांमध्ये आजमितीस २१ हजार ६४९ दशलक्ष घनफुट पाणी असून हा पाणीसाठा सरासरी ३३ टक्के आहे. शहरासह आसपासच्या तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा देखील साडे पाच महिन्यांत ९७ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांवर आला आहे.

पाणी हेच जीवन याची प्रचिती उन्हाळ्यात सातत्याने येत असते. जिल्हावासियांना पाणी पुरवठा करण्याची भिस्त गंगापूर, पालखेड आणि गिरणा धरण समूहांवर आहे. त्या त्या क्षेत्रांसाठी आरक्षित पाणी सोडतानाच जिल्हावासियांची पावसाळ्यापर्यंत तहान भागेल एवढ्या पाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाला ठेवावी लागते. जिल्ह्याच्या उशाला २४ धरणे असून त्यांची पाणी साठवण क्षमता ६५ हजार ८१४ दशलक्ष घनफूट एवढी आहे. जिल्हावासियांची पाण्याची गरज वाढल्याने धरणांमधील पाणी झपाट्याने कमी होऊ लागले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी सव्वा दोन महिन्यांत हा पाणी साठा ६१ टक्क्यांवरून ४८ टक्क्यांपर्यंत आला आहे. तो जुलैपर्यंत पुरविण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. आजमितीस जिल्ह्यातील ७ मोठे व १७ मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. तुलनेने यंदा दुपटीहून अधिक पाणी शिल्लक असून त्यामुळे नाशिककरांना गतवर्षी प्रमाणे यंदा तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे.

गत पावसाळयात सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यामुळे धरणे पुर्ण क्षमतेने भरली. त्यानंतरही पाऊस सुरूच राहील्याने धरणांमधील पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यंदा आरक्षणानूसार प्रत्येक तालुक्याला सिंचन आणि बिगर सिंचनाचे पाण्याचे आवर्तनही देण्यात आले. यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये २१ हजार ६४९ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत नऊ हजार ५५ दशलक्ष घनफुट म्हणजेच १४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गंगापूर धरणसमुहामध्ये ५० टक्के, पालखेड धरण समूहात ३७ टक्के, दारणात २१ टक्के तर गिरणा खोऱ्यात सर्वाधिक ७१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ११ गावे तहानलेली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागली आहे. बागलाण तालुक्यात ही समस्या प्रकर्षाने भेडसावत असून, तेथे आताच पाणी पुरविणाऱ्या टँकरची संख्या सातपर्यंत पोहोचली आहे. पेठ, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांतही टँकरची मागणी होऊ लागल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यंदाचा उन्हाळा नाशिककरांना घाम फोडणार असे एप्रिलच्या पंधरवड्यापासूनच जाणवू लागले आहे. ४० अंशांच्या पुढे गेलेला पारा अलीकडेच घसरला आहे. मात्र, दरवर्षीचा अनुभव पाहता, मेमध्ये तो वाढण्याची दाट शक्यता आहे. उन्हामुळे घसा सुकू लागला, की पाण्याची मागणी वाढते. माणसांबरोबरच जनावरांच्याही अंगाची काहिली होते. त्यामुळे त्यांनाही नेहमीपेक्षा अधिक पाण्याची गरज भासते. विहिरी, तलाव, बंधारे यांसारखे जलस्रोत आटू लागल्याने ग्रामीण भागात पाण्याचा शोध सुरू झाला आहे. बागलाण तालुक्यातील काही गावांमध्ये महिलांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने टँकरची मागणी होऊ लागली होती. त्यानुसार सुरुवातीला एक, त्यानंतर चार आणि आता सात टँकर ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी गावोगावी फिरू लागले आहेत. तालुक्यातील १० गावांमध्ये सात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये रामतीर, खिरमाणी, इजमाणे आणि राहूडपाठोपाठ आता चिराई, चौगाव, अहिराणे, सुराणे, देवळाणे, अजमेर सौंदाणे, भाक्षी या गावांचा समावेश आहे. सकाळपासूनच या गावांमध्ये टँकरच्या खेपा सुरू करण्यात आल्या आहेत.

मालेगाव तालुक्यातील एका गावातदेखील एका टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीटंचाई असलेल्या अशा ११ गावांमध्ये सध्या टँकरच्या ३१ फेऱ्या सुरू झाल्या आहेत. इगतपुरी आणि पेठ तालुक्यातही एक-दोन गावांमध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तेथेही टँकर सुरू करायला हवेत, असे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

सहा विहिरी अधिग्रहित

जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली, की टँकरद्वारे पाणी पुरविणे किंवा पाण्याचा मुबलक साठा असलेल्या परिसरातील विहिरींचे अधिग्रहण करणे असे दोन पर्याय जिल्हा प्रशासनापुढे असतात. या दोन्ही पर्यायांचा अवलंब प्रशासनाने यंदाही केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला बागलाण आणि मालेगाव तालुक्यात मिळून नऊ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. यंदाही आतापर्यंत सहा विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images