Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धुळ्यात दोन दुर्घटनांत नऊ जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरात रविवारी झालेल्या दोन दुर्घटनांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. तर दहा जण जखमी आहेत.

धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ पाचकंदिलजवळील रहिवासी राम शर्मा यांच्या घराला रविवारी पहाटे दीड-दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा आगीत मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत रविवारी, सकाळी धुळे तालुक्यातील मुकटी गावाजवळ सुरतहून पारोळ्याकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या गाडीवर महामार्गावरील खड्डे चुकविण्याचा नादात ट्रक आदळल्याने सुमो वाहनातील चार जणांचा मृत्यू झाला; तर दहा जण जखमी झाले. आगीच्या घटनेत धुळे मनपा अग्निशमन विभागाचा बंब वेळेवर दाखल न झाल्याने शर्मा कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. धुळे मनपा अग्निशमन विभागाच्या सुस्त कारभारामुळे या घटनेत काही लोकांचे प्राण वाचवता आले असते, अशी चर्चाही घटनास्थळी होती. तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा सुरत-नागूपरवरील अपघातात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवले असते, तर अपघात घडला नसता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात उभारली शौर्याची गुढी

$
0
0

धुळे : सैन्य दलातील धुळे तालुक्यातील बोरविहीर गावातील जवान चंदू चव्हाण यांच्या घरी जावून पुण्यातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी उभारली शौर्याची गुढी उभारली. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी चंदू चव्हाण, भूषण चव्हाण, बहिण रुपाली, आजोबा चिंधा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पुण्यातील अमित बागुल व सहकारी गुढी उभारण्यासाठी पुण्याहून ४०० कि.मी. थेट धुळ्यात दाखल झाले होते.

धुळे शहरात नववर्षानिमित्त मंगळवारी (दि. २८) सकाळी महात्मा गांधी पुतळ्यापासून तरुणी-महिलांनी भगवे फेटे परिधान करून मोटारसायकल रॅली काढली. शहरातील चौका-चौकात तरुणांनी नववर्षानिमित्त गुढी उभारली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्यसंमेन 'तापणार' दुपारी ठेवणार बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे

अनेक वादाच्या विषयांमुळे आणि एकमेकांवरच्या कलगीतुऱ्यामुळे संमेलनांचा पारा चढलेला महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मात्र, यंदा उस्मानाबाद येथे रंगणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उन्हाच्या तडाख्याने पारा चढणार आहे. त्यामुळेच संयोजकांनी दुपारी एक ते चार या वेळेत संमेलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाच्या झळांमुळे यंदाही नाट्यसृष्टीतील दिग्गज कलाकार संमेलनाकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन २४ ते २६ एप्रिल दरम्यान उस्मानाबाद येथे पार पडणार आहे. दर वर्षी नाट्यसंमेलन फेब्रुवारी महिन्यात होते. यंदा राज्यातल्या निवडणुका लक्षात घेऊन संमेलन पुढे ढकलण्यात आले. उस्मानाबादमध्ये उन्हाळ्यात तापमानाचा पारा कायम ४० अंशांच्या वर असतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तुलनेने कमी त्रास होईल, या कारणाने सुरुवातीला पहिल्या आठवड्यातच संमेलन घेतले जाणार होते; परंतु परीक्षांचा काळ मध्येच आल्याने संमेलन अखेर २४ ते २६ एप्रिल दरम्यान घेण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. आता ऐन उन्हाळ्यात आणि त्यातही उस्मानाबादमध्ये संमेलन होणार असल्याने संमेलनावर उन्हाळ्याचे सावट आले आहे. ही बाब लक्षात घेऊन संयोजकांनी दुपारी एक ते चार दरम्यान संमेलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, बाहेरगावाहून येणारे नाट्यरसिक दुपारच्या वेळेत संमेलन स्थळ सोडून कुठे जाणार? त्यांच्यासाठी संयोजकांकडून काही व्यवस्था करण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, हिवाळा असो वा उन्हाळा कधीही संमेलन घेतले तरी त्याकडे पाठ फिरवणाऱ्या नाट्यसृष्टीतील कलाकारांना यंदा ‘आयते कोलीत’ हातात मिळाले आहे. कायम ‘एअर कंडिशन’ मध्ये राहणारे कलाकार ४५ अंश तापमान असलेल्या प्रदेशात तग धरणार का, हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.


१५ते १९ एप्रिलमध्ये नाट्य महोत्सव

नाट्यसंमेलनापूर्वी १५ ते १९ एप्रिल दरम्यान उस्मानाबाद येथे नाट्य महोत्सव रंगणार आहे. त्यामध्ये ‘मोरूची मावशी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘तो मी नव्हेच’ अशा गाजलेल्या नाटकांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या ‘तुझं आहे तुजपाशी’ या नाटकाने होणार आहे.


उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता संमेलनात दुपारी एक ते चार दरम्यान कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. त्याऐवजी रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम चालतील. तशी परवानगी घेण्यात आली आहे. कलाकारांची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सर्वांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. या संमेलनात यंदा कलाकारांची लक्षणीय उपस्थिती असेल- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी उधळली स्ट्रिप्टीज पार्टी

$
0
0

मुंबई मिरर वृत्त । नाशिक

ऐन मध्यरात्री मोठ्या आवाजातील गाण्यांसह सुरू असलेल्या स्ट्रिप्टीज पार्टीवर छापा टाकून नाशिक पोलिसांनी १३ तरुण-तरुणींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असून त्यांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. पार्टीच्या ठिकाणांहून पोलिसांनी अनेक वाहनंही ताब्यात घेतली आहेत.

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील एका अलिशान बंगल्यात मोठमोठ्या आवाजात गाणी सुरू असल्याची तक्रार रविवारी मध्यरात्री एका इसमानं पोलिसांना केली. तक्रारीनंतर लगेचच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा संबंधित बंगल्यामध्ये अनेक तरुण-तरुणी डीजेच्या तालावर थिरकत होते. हे सर्व लोक अमली पदार्थ व दारूच्या नशेत धुंद होते. तिथं स्ट्रिप्टीज पार्टी सुरू असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी लगेचच सर्वांना ताब्यात घेतलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांमध्ये वाहतूक सहपोलीस आयुक्त, औरंगाबादचे सहाय्यक जिल्हाधिकारी, ठाण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याचा मुलगा व नागपूरच्या पोलीस उपायुक्तांचा भाच्याचा समावेश आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणींना पोलीस ठाण्यात घेऊन येताच पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई, नागपूर व पुण्याहून आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले. 'मुंबई मिरर'ला मिळालेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये पोलीस घटनास्थळी येताच तरुणी कपडे घालताना दिसत आहेत. पार्टीत उपस्थित असलेले युवक अंमली पदार्थ आणि दारूच्या नशेत धुंद झाले होते. पकडल्या गेलेल्या तरुणांच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतरच यावर अधिक बोलणं योग्य होईल,' असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.

ही बातमी हिंदीत वाचण्यासाठी इथं क्लिक करा...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाव झळकताच वाढली वसुली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नाशिक महापालिकेपाठोपाठ कळवण नगरपंचायत प्रशासनाने घरपट्टी थकबाकी विरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेत गेल्या दहा वर्षांपासून थकबाकीदार असलेल्यांची नावे सार्वज‌न‌िक ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. काहींनी थकबाकी भरण्यास सुरुवात केली आहे. या बॅनरबाजीमुळे नगरपंचायतीची वसुली १३ टक्क्यांवरून ५३ टक्क्यांवर पोहोचली आहे.

राज्यातील आघाडी सरकार पायउतार होण्याच्या टप्प्यात कळवण ग्रामपालिकेचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. मात्र ग्रामपालिकेच्या सत्तेपासून अर्थात गेल्या दहा वर्षांपासून असलेली थकबाकी वसुल होऊ शकली नाही. आता मुख्याधिकाऱ्यांनी वसुलीबाबत कठोर धोरण अवलंब‌िले आहे.

कळवण नगरपंचायत हद्दीत दहा हजारांवरील ४०० थकबाकीदारांकडे ५० ते ६० लाखांची घरपट्टी थकीत आहे. दीड वर्षांपासून थकलेली पाणीपट्टी आतापर्यंत ३० टक्के वसुली झाली आहे. कळवणमध्ये अनधिकृत नळकनेक्शन मोठ्या प्रमाणात आहेत. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र, आता मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी कठोर पावले उचलायला सुरवात केली आहे. या मोहिमेचे सुज्ज्ञ कळवणकरांनी स्वागत केले आहे. तर कुठलीही पूर्वसूचना व नोटीस न देता थकबाकीदारांची नावे बॅनरवर झळकल्याबद्दल त्यांच्या विरोधात नाराजी आहे. तर काहींनी बॅनरवर नाव झळकताच थकबाकी भरून पुढील धोका टाळला आहे. नगरपंचायतीनेही ज्यांच्याकडून थकबाकी वसूल झाली अशांची बॅनरवरील नावांसमोर पांढरी पट्टी चिटकवली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरात कटुता टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी केले. शिवाय थकबाकीचा आकडा वाढत गेला तर अनेक प्राथमिक बाबींसाठी शासनस्तरावरून अनुदान येणार नाही. त्यामुळे ग्रामविकासासाठी प्रशासनाला ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी विनंती पटेल यांनी केली आहे.

वसुलीतून विकासकामे

शहरात कचरा डेपोसाठी जागा नाही. पाइपलाइन दुरुस्ती, लाइट दुरुस्ती असे प्राथमिक कामे या वसुलीतून करण्यात येतील, असेही पटेल यांनी सांगितले. बॅनरवर नाव झळकल्यामुळे १३ टक्क्यांची वसुली ५३ टक्क्यांवर आल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच मोबाइल टॉवर सील

कळवण नगरपंचायत हद्दीतील विविध कंपन्यांचे पाच मोबाइल टॉवरही सील केले आहेत. त्यांच्यावर प्रत‌िकात्मक कारवाई सुरू केली आहे. या टॉवर कंपन्यांकडे १५ लाखांची थकबाकी आहे. सटाणा शहरापाठोपाठ कळवणमध्येही वसुली मोहीम सुरू असल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदी रक्षणासाठी गोदावरी मार्च

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नदी साक्षरता, नदी सन्मान आणि प्रदूषण याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी तसेच गोदावरीच्या रक्षणासाठी लवकरच गोदावरी मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय जलतज्ञ आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्रसिंह यांनी केले.

सप्तशृंगगडावरील जलकुंडांबाबतची बैठक आटोपून राजेंद्रसिंह नाशिकरोड येथे सायंकाळी नाशिकरोडला आले तेव्हा दंड ज्वेलर्समध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अभिनेता चिन्मय उद्गीकर, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, पर्यावरणप्रेमी राजेश पंडित, भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, गोपाळ पाटील, मिलिंद दंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गोदावरी नदीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करुन राजेंद्रसिंह म्हणाले की, गोदावरी मार्चअंतर्गत पर्यावरणप्रेमी व नागरीक गोदावरीचे रक्षण करण्यासाठी गोदाकाठावर जाऊन जनप्रबोधन करतील. नदीचे काँक्र‌िटीकरण करण्याचे चुकीचे काम देशात सर्वात प्रथम त्र्यंबकेश्वर व नाशिकमध्ये घडले आहे. त्यामुळे गोदावरी मृत झाली आहे, हे समाजाला सांगणे ही सरकारची जबाबदारी आहे. काँक्र‌िटीकरण फोडून नदीतील जलस्त्रोत मोकळे करुन नदी जिवंत करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारला ६ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

जलसाक्षरता केंद्रे सुरू होणार

राजेंद्रसिंह म्हणाले की, नदी, नाले जिवंत करुन ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना चांगली आहे. जलवायू परिणाम रोखण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे. समाज व सरकार या दोघांनी मिळून या योजनेला बळ देणे आवश्यक आहे. यावर्षी जलयुक्त शिवाराची कामे कमी झाली आहेत. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यासंदर्भात पुणे येथे यशदामध्ये लवकरच चर्चासत्र आयोजित केले जाणार आहे. जलसाक्षरता वाढविण्यासाठी पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि औरंगाबाद येथे जलसाक्षरता केंद्र सुरू केली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्यामुळे यात्रांची ‘शोभा’!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून नागरिकांना स्वच्छतेचे धडे दिले जात असले तरी स्वच्छता विभागाकडून कचरा उचलण्यास दिरंगाई झाल्याने ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच शोभायात्रेदरम्यान शहरातील रस्त्यांवरील कचऱ्याच्या ढिगांमुळे स्वच्छता विभागाच्या कामकाजाची पुरती शोभा झाल्याचे दिसून आले.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मंगळवारी सकाळी शहरातून नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी भव्य शोभा यात्रा काढली. या यात्रेत नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले. परंतु, शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पडून असलेल्या कचऱ्याच्या ढिगांमुळे निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांवर नाक बंद करण्याची वेळ आली. परिणामी नागरिकांच्या उत्साहावर विरजण पडले.

शोभायात्रेत विद्यमान नगरसेवकही सहभागी झाले होते. त्यांच्यासमोरच रस्त्यावरील कचऱ्याचे ओंगळवाणे चित्र नागरिकांना बघायला मिळाले. खासकरुन देवळाली गावातील बहुतांश रस्त्यांवर कचरा पडून असल्याचे चित्र बघायला मिळाले. सणासाठी तरी पालिकेच्या स्वच्छता विभागाने शहरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक होते.

गुढी पाडव्याच्या निमित्ताने शहरात विशेष स्वच्छता मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. परंतु, दैनंदिन स्वच्छताही केलेली नसल्याने शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना कचऱ्याचे नाईलाजाने दर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली. पालिकेच्या स्वच्छता विभागाप्रमाणेच स्थानिक नगरसेवकांचेही प्रभागांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड झाले.

जीपीएस प्रणालीनुसार कचरा संकलनाचे कामकाज सुरु झाल्यापासून कचरा उचलण्यास विलंब होत आहे. कारण सर्व ३५ घंटागाड्यांना निश्चित केलेल्या मार्गावरील कचरा विशिष्ट वेळेतच उचलावा लागतो. त्यामुळे काही मार्गांवर घंटागाडीची वेळ दुपारनंतर असते. तोपर्यंत कचरा पडून राहतो.

-संजय दराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक

आपल्या प्रभागात कोणताही सार्वजनिक उत्सव असेल तर त्यापूर्वी त्या भागाच्या स्वच्छतेची काळजी स्थानिक नगरसेवकांनी घेतली पाहिजे. याशिवाय नागरिकांनीही घंटागाडीतच कचरा जमा केला पाहिजे.

-संगीता गायकवाड, नगरसेविका, प्रभाग २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीकरांना द्राक्ष उत्पादनाचे धडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

भारतीय द्राक्ष मालाला जागतिक बाजारपेठेत चांगला भाव मिळावा, उत्पादनात वाढ कशी करावी, निर्यातक्षम द्राक्ष कसे घ्यावेत यासाठी बारामती येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड व चांदवड तालुक्यातील द्राक्ष उत्पादन व निर्यातक्षम बागांना भेटी दिल्या.

निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील द्राक्ष उत्पादक नंदू गायकवाड, भाऊसाहेब वाकडे व वडनेर भैरव चांदवड येथील बाळासाहेब शिंदे यांच्या द्राक्षबागांना बारामती येथील शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. त्यांनी या भागातील द्राक्ष उत्पादकांची द्राक्ष पिके घेतांना ती कोणत्या पद्धतीने घेतात, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन कसे घ्यावे, या बाबत माहिती करून घेतली. तसेच नाशिक पिंपळगाव महामार्गावर असणाऱ्या कमल पॅकिंग हाऊसला भेट देऊन तेथील एक्स्पोर्ट व पॅकिंगची प्रक्रियाही समजून घेतली. बारामतीच्या बोरी गावातील भारत शिंदे, अशोक पाटील, गोटांदी गावातील कैलास पाटील आदी शेतकरी सहभागी झाले होते.

महिंद्रा अॅग्रो सोल्युशन लिमिटेड (नाशिक) आणि इंडियन सोसायटी ऑफ ऍग्री बिझिनेस प्रोफेशल्स (न्यू दिल्ली) यांनी हा अभ्यास दौरा आयोजित केला होता. कृष्णा पाटील, किशोर गजघाटे, नरेंद्र देवरे यांनी हे नियोजन केले होते.

बारामती येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षाचे उत्पादन घेताना बहुतांश सिडलेस व काळी प्रकारची द्राक्ष पिकवतात. ही द्राक्ष चीनला निर्यात करतात. युरोपातही द्राक्ष निर्यात करता यावीत यासाठी व्हाईट म्हणजे नाशिक भागातील सोनाका, थामसन इ प्रकारच्या जातीची द्राक्ष पीक कशी घ्यावी निर्यातक्षम उत्पादन कसे घ्यावे यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोडला सभापतीपदासाठी लॉबिंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मनसेच्या हातून नाशिक महानगर पालिकेतील सत्तेच्या चाव्या अगदी लिलया आपल्या हाती घेतलेल्या भाजपच्या नगरसेवकांना आता प्रभाग सभापतीपदाची ओढ लागली आहे. नाशिकरोड प्रभागात २३ जागांपैकी १२ जागा भाजपला व ११ जागा शिवसेनेला मिळालेल्या आहेत. त्यामुळे नाशिकरोड प्रभाग सभापतीपदावर भाजपचाच दावा राहणार असून, या पदावर आपली वर्णी लागावी यासाठी भाजपच्या काही नगरसेवकांनी भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्यापुढे लॉब‌िंग सुरू केले आहे.

नाशिक मनपा निवडणुकीत भाजपला नाशिकरोड प्रभागात अपेक्षेपेक्षाही जास्त यश मिळाले आहे. भाजप शिवसेना वगळता इतर सर्व राजकीय पक्षांची वाईट अवस्था झाली होती. आता प्रभाग सभापतीपदासाठी इच्छुकांनी शहराध्यक्षांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. आतापर्यंतच्या राजकीय हालचाली बघता सभापतीपदाचा मान जेलरोडला जाण्याची शक्यता आहे.

महिला सभापतीपदाच्या शर्यतीत

नाशिकरोड प्रभाग सभापतीपद प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकाला देण्याची भाजपच्या स्थनिक गोटातून चर्चा आहे. त्यात महिला नगरसेवकाला प्राधान्य दिले जाणार आहे. तसे झाल्यास प्रभाग क्र. १७ क मधून निवडून आलेल्या सुमन सातभाई, प्रभाग १८ क मधील मीरा हांडगे व प्रभाग २२ अ मधील सरोज आहिरे या तिघींपैकी एकीची प्रभाग सभापतीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. या तिघींपैकी सुमन सातभाई यांचे भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानपांशी असलेले निकटचे राजकीय संबंध बघता त्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. संगीता गायकवाड, कोमल मेहरोलिया व सीमा ताजणे यांचा स्थायीसाठी आग्रह आहे.

प्रभाग रचनेचा अडसर

सातपूर व सिडकोत प्रभाग रचनेवरुन वाद निर्माण झालेला असल्याने हा वाद मिटेपर्यंत प्रभाग सभापती निवडणुका होणार नाहीत. प्रभाग रचनेच्या वादावर पालिकेच्या महासभेत डॉकेट दाखल होणार असून, त्यास मंजुरी मिळाल्यानंतरच प्रभाग रचनेचा वाद संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत प्रभाग सभापती पदासाठी इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैतरणा परिसरात बिबट्याचा वावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्याचा पश्चिम पट्टा असलेला वैतरणा परिसरात बिबट्यांचा वावर वाढला आहे. वैतरणा परिसरातील नागोसली शिवारात एका आदिवासी शेतकऱ्यांच्या दोन शेळ्यांचा फडशा बिबट्याने पाडला. दरम्यान, सोमवारीही तीन बिबट्यांचा एकत्रित वावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या संदर्भात भगवान मधे यांनी वनविभागाकडे याबाबतची माहिती दिली. तसेच बिबट्यांचा बंदोबस्त करावा व बिबट्यांनी फडशा पाडलेल्या शेळ्यांच्या मालकाला नुकसान भरपाई द्यावी व या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद

करण्याची मागणी केली. बिबट्यांच्या या बिनधास्त वावरमुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. याबाबत मधे यांनी जिल्ह्याचे वनाधिकारी व तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी ढोमसे यांच्याशीही चर्चा करून पिंजरा लावण्याची मागणी केली. दरम्यान, तीन दिवसापूर्वी (२५ मार्च) ढोऱ्या डोंगर परिसरात बिबट्याचे शेळ्यांवर हल्ला केला होता. तर रविवारी रात्रीच्या नागोसली शिवारातील शिदवाडी येथे तीन बिबटे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार शिदवाडी परिसरातील मानवी वस्तीत बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्यांना जंगलात सोडले जाईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी ढोमसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा सन्मान’वर नाशिककरांची मोहोर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अतिशय मानाचे पान असलेल्या ‘मटा सन्मान’वर यंदा नाशिककरांनी आपली मोहर उमटवली. एकूण आठ नामांकने असलेल्या या सन्मान सोहळ्यात तब्बल तीन पुरस्कार नाशिककर कलावंतांनी जिंकले असून, हा नाशिकसाठी मोठा सन्मान आहे.
‘मटा सन्मान’मध्ये यंदाच्या वर्षी सुरुवातीपासूनच अत्यंत चुरस पहायला मिळत होती. भारतभर गाजत असलेल्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाला आणि त्याचा दिग्दर्शक सचिन शिंदे, लेखक दत्ता पाटील तसेच नाटकाला मानांकन होते. तसेच मूळ नाशिकचा असलेला राम दौंड या दिग्दर्शकाला तसेच त्यांच्या ‘हे राम’ नाटकाला आणि त्यातील अभिनेत्रीला मानांकन होते. ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या अतिशय लोकप्रिय असलेल्या सिरियलमधील जुईची भूमिका बजावणाऱ्या नाशिककर मृणाल दुसान‌िस, तसेच सावित्रीबाई फुले यांची भूमिका केलेल्या अभिनेत्री नेहा जोशी यांना मानांकने होती. यापैकी कोण पारितोषिक पटकावते याची उत्सुकता संपूर्ण नाशिककरांनाच होती. त्यामुळे मटा सन्मानकडे लक्ष लागलेले होते. सोमवारी झालेल्या बहारदार सोहळ्यात ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाला सर्वोत्कृष्ट, दिग्दर्शक सचिन शिंदेला तसेच मृणाल दुसानिस व नेहा जोशी यांनाही सन्मानित करण्यात आले.

मटातील लेख ते मटा सन्मान

हंडाभर चांदण्या या नाटकाचे लेखक दत्ता पाटील म्हणाले की, २७ नोव्हेंबर २०१५ ला नाशिक मटासाठी दुष्काळाचं, पाणी टंचाईचं वास्तव बघून एक लेख लिहिला. ‘पूर्वेकडून धुरळा उडण्याची वाट पाहणाऱ्या गावाची गोष्ट’. टँकरची वाट पहाणारं एक गाव त्या गोष्टीचा नायक...! अर्थात राधा, कृष्ण, मोरपीस वगैरे ललितांना मोहरून ढिगाने प्रतिक्रिया देण्याची सवय अंगी लावून घेतलेल्यातील फार कुणी त्या लेखाची दखल घेतली नाही. दुष्काळाची दाहकता आणि त्यात पाण्याची वर्षानुवर्षे वाट पाहतानाही गाणारं गाव कळावं म्हणून हट्टानं काही मित्रांना शेअर केला. त्यानंतर महिनाभरात त्याच लेखावरून नाटक लिहिलं. हंडाभर चांदण्या! अर्थात सचिनच्या आग्रहावरून.. लेख मटामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १६ महिन्यांनी म्हणजे काल २७ मार्चला ‘मटा’नेच या लेखाच्या नाट्यरुपाचा ‘मटा सन्मान’ देऊन गौरव केला...अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

नाशिककरांचे खूप आभार, खरे तर सर्वच प्रेक्षकांचे खूप आभार. मी करीत असलेल्या भूमिकेला आपण उचलून घेतले. कलाकाराला फक्त प्रेक्षकांच्या टाळ्याच हव्या असतात. ‘मटा’ने आमचा सन्मान केला त्याबद्दल आभार.
-मृणाल दुसानिस, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिअल इस्टेटमध्ये उलाढालींची गुढी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरात रिअल इस्टेट क्षेत्रालाही झळाळी मिळाली आहे. त्यामुळेच शहर परिसरातील विविध प्रकल्पांमध्ये किमान शंभर फ्लॅटचे बुकिंग झाले आहे. रेडिरेकनरचे दर जैसे थे राहिल्यास येत्या काळात या क्षेत्राला आणखी फायदा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्राला काहीशी मरगळ आली आहे. कपाटांचा प्रश्न, रेडिरेकनरचे दर, परवडणारी घरे अशा विविध कारणांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात काहीसे मंदीचे वातावरण आहे. मात्र, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही मरगळ दूर होईल, अशी शक्यता होती. त्यानुसार नवीन वर्षारंभी रिअल इस्टेटची गुढी शहरात लागल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांना ३० ते ६० चौरस मीटर एवढ्या क्षेत्रफळापर्यंत नवीन घर बांधण्यासाठी किंवा जुन्या घराची वाढ करण्यासाठी बँकांमार्फत कर्ज मिळणार आहे. अत्यल्प व्याज दराने ६ लाख रुपयांपर्यंत मिळणाऱ्या या कर्जावरील ६.५ टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. मुंबईसह राज्यातील ५१ शहरांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठीही नाशकात अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळेच १५ ते २५ लाख रुपये किंमतीच्या फ्लॅट तसेच घरांना मागणी असल्याचे दिसून येत आहे. मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आपल्या मनातील घर खरेदीला नाशिककर पसंती दिल्याचे दिसून येत आहे. पाथर्डी फाटा, आडगाव, इंदिरानगर, मखमलाबाद रोड, कामटवाडे, तिडके कॉलनी अशा शहराच्या विविध भागात अनेक अपार्टमेंट उभ्या राहिल्या असून, त्या ग्राहकांना खुणावत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने बांधकाम व्यावसायिकांनी विविध ऑफर्सद्वारे ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यासही प्रतिसाद लाभला आहे. शहराच्या अनेक भागातील प्रकल्पांमधील घरे पाहण्यासाठी तसेच बांधकाम व्यावसायिकांच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी ग्राहक जात असल्याचे दिसून आले. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण होते.

सराफ बाजाराने साधला मुहूर्त

गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून नाशिककरांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली. नववर्षाच्या सुरुवातीला बहुतेकजण किमान एक ग्रॅम तरी सोने खरेदी करतात. मागील वर्षी एक्साइज ड्यूटी माफ व्हावी यासाठी सराफांनी केलेल्या आंदोलनामुळे या मुहूर्तावर ग्राहकांना सोने खरेदी करता आले नव्हते. त्या खरेदीची कसर यंदा ग्राहकांनी भरून काढली. मंगळवारी नाशिकच्या सराफ बाजारात ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी उसळली होती. उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी लोकांनी सकाळीच बाजारात जाणे पसंत केले. दुपारी सराफ बाजारात शांतता होती. सायंकाळी पुन्हा उत्साह दिसून आला.

इलेक्ट्रॉनिक्स मार्केटला झळाळी

नाशिकरोड ः साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेला झळाळी मिळाल्याचे दिसून आले. नाशिकरोडसह शहरातील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. शहरातील मॉल्सही त्याला अपवाद नव्हते. अनेकांनी ऑनलाइन शॉपिंगलाही प्राधान्य दिले. स्मार्ट मोबाइल खरेदीची सर्वांत जास्त क्रेझ दिसून आली. मंगळवारी पाडव्याच्या मुहूर्तावर नाशिककरांनी एसी, टीव्ही, फ्रीज आणि मोबाइल यांना प्राधान्य दिले. या वस्तूंना चांगली मागणी होती, असे सूत्रांनी सांगितले. ब्रॅन्डेड टीव्हीची किमत १५ हजारापासून लाखापर्यंत असल्याने मध्यमवर्गीयांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांनीच त्याची खरेदी केली.






मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत बॅचलर पार्टी उधळली!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लग्नापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या बॅचलर पार्टीत गोंधळ घालणाऱ्या तरुणांसह मुंबईतील बारबालांना इगतपुरी पोलिसांनी अटक करीत गुन्हा दाखल केला. संशयितांपैकी किमान तीन मुलांचे नातेवाईक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी असून, यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

वेगवेगळे डेज साजऱ्या करणाऱ्या तरुणांमध्ये सध्या बॅचलर पार्टीची चलती सुरू झाली आहे. लग्नापूर्वी अविवाहित मुलांसाठी अशा पार्टीचे आयोजन करण्यात येते. स्ट्रीपटीज या नावाने अशा पार्ट्या जगभर ओळखल्या जातात. भारतात मुंबई, बंगळुरू आदी महानगरांमध्ये यापूर्वी अशा पार्ट्या आढळून आल्या आहेत. स्ट्रीपटीज म्हणजे संगीताच्या ठेक्यावर अंगावरील एकेक वस्त्र उतरविणे. त्यासाठीच मुंबईहून या पार्टीत खास बारबालांना आणले गेले होते. पोलिसांनी जेव्हा छापा मारला तेव्हा या बारबाला अर्धनग्न अवस्थेत होत्या. त्यावरूनच ही स्ट्रीपटीज पार्टी असावी अशी अटकळ बांधली गेली आहे. याबाबत कोणतेही वरिष्ठ पोलिस अधिकारी काहीही खुलासा करण्यास तयार नाहीत. मात्र, टाइम्स समूहाच्या मुंबई मिरर या मुंबईतील दैनिकाने गेल्या रविवारी घडलेल्या या पार्टीचे छायाचित्रांसह वृत्त दिल्याने राज्यभर खळबळ उडाली. या पार्टीत सहभागी झालेले तरुण बड्या सरकारी अधिकाऱ्यांचे कुटुंबीय असल्याची माहितीही या वृत्तात असताना नाशिकच्या पोलिसांनी मात्र त्याबाबत चुप्पी साधणेच पसंत केले. तक्रार येताच गुन्हा दाखल केल्या असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालल्याचा आरोप अनाठायी आहे, अशी भूमिका पोलिसांनी मांडली.

गोंधळामुळे बिंग फुटले

या पार्टीचे आयोजन करणाऱ्या शहरातील तरुणांना मात्र ती चांगलीच महागात पडली आहे. एका मित्राचा विवाह ठरला असून, या पार्श्वभूमीवर पाच ते सहा जणांनी शनिवारी (२५ मार्च) इगतपुरीतील मिस्ट्री व्हॅली रिसॉर्टमधील बंगला क्रमांक ११ मध्ये अशा बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. मद्य, मुंबईतील बारबालांसह म्युझिक सिस्टीमचे नियोजन झाले. शनिवारी रात्री मदिरा आणि मदिराक्षीच्या नादात गोंधळ वाढला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेचा दणदणाट व तरुण- तरुणींच्या आरडाओरडीमुळे त्रस्त झालेल्या शशिकांत कुलकर्णी या निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने इगतपुरी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी लागलीच रिसॉर्टमध्ये पोहोचून संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर कलम २९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा जामीनपात्र असल्याने लागलीच त्यांची सुटका करण्यात आली.

दरम्यान, पोलिसांनी संशयितांकडून ५७ हजार रुपयांची रोकड, तसेच एक कार, सहा दारूच्या बाटल्या, एक लॅपटॉप, दोन स्पीकर जप्त केले. बारबालांचे बुकिंग ऑनलाइन झाल्याची माहिती असून, संशयितांमध्ये डीजेचे काम पाहणाऱ्या दोन तरुणांचा समावेश आहे.

आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांची मुलं?

शनिवारी झालेल्या या घटनेबाबत सर्वच स्तरावर मौन बाळगण्यात येत आहे. इगतपुरी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये काही आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश असल्याची चर्चा आहे. इगतपुरी पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले असले तरी संशयितांपैकी किमान तीन जण उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी रात्रीच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आयएएस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश नाही, तसेच कोणाचा दबावही नाही. पोलिसांनी आपले काम चोख बजावले आहे.

- अंकुश शिंदे, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! वाढतोय उष्णतेचा कहर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या वाढतच जाणाऱ्या तापमानात मंगळवारी मालेगावने चांगलीच भर टाकली. मंगळवारी मालेगावचे तापमान तब्बल ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. थंड हवामानाची ओळख सांगणाऱ्या नाशिकने यंदा उष्णतेच्या लाटेत मार्चअगोदरच उत्तर महाराष्ट्रात जळगावशी स्पर्धा केली आहे, तर नाशिकचा पारा ४०.३ इतका नोंदविला गेला. वाढते तापमान नाशिक जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून, उष्माघातापासून बचावासाठी दुपारी घराबाहेर जाणे टाळा असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

शहरात मंगळवारी गुढीपाडव्याचा माहोल असल्याने गत आठवडाभराच्या तुलनेत रस्त्यांवर दुपारी १२ वाजेपर्यंत बरीच गर्दी दिसून आली. मात्र, दुपारनंतर उन्हाच्या दहशतीने शहरातील रस्ते पुन्हा सुने सुने झाले होते. गेल्या मंगळवारच्या तुलनेत पाडव्याच्या दिवशी मंगळवारी या तापमानात साडेतीन अंशांची भर पडली आहे. सोमवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जिल्ह्यात मालेगावमध्ये करण्यात आली होती. या तापमानावर मंगळवारी पुन्हा मालेगावने कडी केली आहे. या पाठोपाठ नाशिकनेही दोन दिवसांत ४० अंशांचा पारा ओलांडण्यास सुरुवात केल्याने लाही लाही होत आहे. यामुळे थंड हवामानाची ओळख सांगणाऱ्या नाशिक शहराने यंदा मार्चमध्येच जळगावलाही मागे टाकले आहे. मालेगावच्या तापमानाची नोंद ४२.२ अंश सेल्सिअस झालेली असताना जळगावचे तापमान ४२ अंशांवर होते.

तिसऱ्या दिवशीही मालेगाव डेंजर झोनमध्ये

मालेगाव शहर व तालुक्यात सलग तीन दिवसांपासून तापमानाचा पारा चाळिशीच्या पुढे राहत असल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मराठी नववर्षाच्या प्रारंभीच मंगळवारी वैशाख वणव्याचा अनुभव नागरिकांनी घेतला. मालेगावचे काल कमाल तापमान ४३.२ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, तर किमान तापमानातदेखील ३ अंशांची वाढ होऊन ते २२.२ अंश इतके नोंदवले गेले. सलग तीन दिवसांपासून ४० अंशांच्या वर हा पारा जातो आहे. यामुळे आरोग्यदृष्ट्या मालेगावकर डेंजर झोनमध्ये वावरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाणा शहरात उलटला ट्रक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गुजरातकडून कनार्टककडे रंगाचे डबे घेऊन जाणारा ट्रक सटाणा बसस्थानकाजवळील दुभाजकाला धडकून उलटला. सुदैवाने कोणतीही जीव‌ितहानी झाली नाही. बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मात्र यामुळे दिवसभर शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला.

अंकलेश्वर येथून एशियन पेन्ट्स कंपनीच्या रंगाचे डबे घेऊन जाणारा मालवाहू ट्रक (एमएच १२/ईएच ९७६५) बंगळुरूकडे निघाला होता. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा ट्रक शहरातील बसस्थानकाजवळील दुभाजकावर आदळला. या अपघातात ट्रकची पुढची चाके निखळली. त्यामुळे ट्रक महामार्गावरच उलटला. ट्रकमधील रंगांचे काही डबे उघडल्याने महामार्गावर रंगचरंग दिसू लागला. मध्यरात्री महामार्गावर कुत्रे आडवे आल्याने अपघात झाल्याचे ट्रक चालकाने सांगितले. अपघातामुळे राज्यमहामार्गावरील वाहतूक दिवसभर एकेरी ठेवण्यात आली होती. ट्रकमधील रंगाचे सर्व डबे दुसऱ्या मालवाहू ट्रकमध्ये टाकल्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक उभा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विषय समित्यांवरून झेडपीमध्ये रस्सीखेच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या ५ एप्रिल रोजी होणाऱ्या विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. सत्ताधारी व विरोधी गटाने या समितीत्यावर आपलेच वर्चस्व राहणार असल्याचा दावा केला आहे. ७३ सदस्य असलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेना-काँग्रेस आघाडीने ३७ सदस्यांनी एकत्र येत अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले. पण आता या आघाडीत काँग्रेसच्या दिंडोरी येथील एका सदस्याने सभापत‌िपद न मिळाल्यास आघाडीत बंडखोरी करण्याचा पवित्रा घेतल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. जिल्हा परिषदेमध्ये समाज कल्याण, अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, शिक्षण व आरोग्य, महिला व बालकल्याण या महत्त्वपूर्ण समित्या आहेत. यातील अर्थ व बांधकाम समितीवर आजपर्यंत उपाध्यक्षांना देण्याचा पायंडा असल्यामुळे त्यात काय निर्णय अध्यक्ष घेतात हे महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे पाच समित्या असल्या तरी चार समितीसाठीच मतदान होणार आहे.

बुधवारी (दि. ५) होणाऱ्या या निवडणुकीसाठी अप्पर जिल्हाधिकारी कान्हूराज बगाटे हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. त्यांनी याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्यासाठी सर्व सदस्यांना विशेष सभेचा अजेंडा पाठवण्यात आला आहे. सकाळी ११ ते १ दरम्यान सभापतीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देण्यात आली असून, त्यानंतर १ ते २ दरम्यान छाननी होणार आहे. दुपारी २ वाजता आवश्यक वाटल्यास मतदान होणार आहे. या समित्यांच्या सभापतिपदी आपली वर्णी लागावी यासाठी सत्ताधारी पक्षात जोरदार रस्खीखेच सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस व माकप व अपक्षांचे दोन सदस्य यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर माकपने आपल्या दोन सदस्यांची हकालपट्टी केली. राष्ट्रवादी व भाजपला बाजूला ठेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेने सर्व तडजोडी स्वीकारत अपक्ष व माकपच्या हकालपट्टी झालेल्या सदस्यांना सभापती पदासाठीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या हातात चारपैकी केवळ दोनच समितीचे सभापतीपद असणार आहे. या दोन समितत्यासाठी शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खातेदारांनी ठोकले बँकेला टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह नोकरदारांना गत तीन महिन्यांपासून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सटाणा शहर शाखेतून पगाराची रक्कम पूर्ण स्वरुपात न देता अवघे दोन हजार रुपयांची रोखीने दिले जात आहेत. जिल्हा बँकेचे धनादेश अन्य बँकेत वटत नसल्याने संतप्त कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनी बुधवारी शहर शाखेस टाळे ठोकून आंदोलन केले. संतप्त खातेदारांनी विभागीय अधिकारी एस. बी. अहिरे यांच्याशी चर्चा केली. जिल्हा बँकेला निधी प्राप्त होत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असून, निधी मिळताच गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिल्याने टाळे उघडण्यात आले.

सटाणा शहरातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शहर शाखेत राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह कर्मचारी व पगारदारांचे खाती आहेत. त्याचबरोबरच सर्वसामान्य ग्राहकांना दैनंदिन व्यवहार करतांना नोटाबंदी प्रकरणापासून गैरसोय निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या शाखेतून होणारे पगार नियमित न करता पगारादारांना अवघे दोन हजार रुपये रोख देवून रवाना करण्यात येत आहे. यामुळे रोख दोन हजार रुपयांत कुटुबीयांच्या गरजा भागविणे शक्य नाही. त्यातच जिल्हा बँकेचे धनादेश वटणे बंद झाल्याने ग्राहकांनी बुधवारी जिल्हा बँकेच्या शाखेस टाळे ठोकले. यावेळी विभागीय अधिकारी अहिरे यांनी वरिष्ठांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे संतप्त शिक्षक संघटनेचे विनायक बच्छाव, चंद्रकांत सोनवणे, सी. डी. सोळुंखे, उदय आहेर, पी. आर. जाधव, सुवर्णा मराठे, शरद बेडसे, एस. आर. पाटील, इम्तीयाज अन्सारी, इम्रान सैय्यद, योगेश मोरे, एच. एन. कोर, हरीनाम देवरे, स्वप्नील सोनवणे, विकास चव्हाण, वाय. एन. देवरे, एस. टी. गरूड आदी शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी कक्ष कार्यान्व‌ित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीसह त‌िच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने अखेर गंभीरपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी निवृत्त सैनिकांच्या पथकांची स्थापना करण्यापाठोपाठ महापालिकेतील बंद असलेला गोदावरी संवर्धन कक्ष पुन्हा नव्याने कार्यान्व‌ित करण्यात आला आहे. उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांच्याकडे या कक्षाची जबाबादारी देण्यात आली असून त्यांच्या दिमतीला दहा अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

या कक्षात गोदावरीसोबतच नासर्डी आणि वाघाडीच्या प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आपले नियम‌ित काम सांभाळून हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकीच्या ध्येयनाम्यात भाजपने गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीवर भर दिला होता. महापालिकेत सत्तारुढ झाल्यानंतर भाजपने गोदावरीसह नासर्डी व वाघाडी या त‌ीनही नद्यांच्या प्रदूषणाचा विषय गंभीरपणे घेतला आहे. हायकोर्टानेही गोदावरीच्या प्रदूषणासंदर्भात वेगवेगळे आदेश पारित केले आहेत. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी गेल्याच आठवड्यात गोदावरी नदीत प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर दंडाची तरतूद केली आहे. सोबतच गोदावरीत प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी निवृत्त सैनिकांचे पथक स्थापण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील अंमलबजावणी ही १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ आता गोदावरी कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांनी गोदावरीसह तीनही नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी संर्वधन कक्ष नव्याने स्थापन केला आहे. उपायुक्त रोह‌िदास दोरकुळकर यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, सहाय्यक आयुक्त निर्मला गायकवाड यांच्याकडे गोदावरी कक्षाचेही सहाय्यक आयुक्तपद देण्यात आले आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांच्याकडे समन्वय अधिकारी हे पद देण्यात आले आहे. कार्यकारी अभियंता एस. आर. वंजारी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. तीन स्वच्छता निरीक्षकांसह दहा अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता गोदावरीच्या प्रदूषण मुक्तीच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे.

नं‌द‌िनी, वाघाडीसाठी अधिकारी

गोदावरी सवंर्धन कक्षाअंतर्गतच गोदावरी, नं‌द‌िनी, वाघाडी या त‌िच्या दोन उपनद्यांच्या प्रदूषणासाठीही स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन स्वच्छता निरीक्षकांकडे स्वतंत्रपणे काम देण्यात आले आहे. स्वच्छता निरीक्षक सुधाकर शिंदे यांच्याकडे गोदावरी तीर, संजय गांगुर्डे यांच्याकडे नासर्डी तीर, के. टी. मारू यांच्याकडे वाघाडी तीराच्या प्रदूषणमुक्तीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तीनही नद्यांच्या काठावरील प्रदूषण रोखण्याची जबाबदारी या त‌िघांवर स्वंतत्रपणे राहणार आहे.

नियुक्तीवरून नाराजी

दरम्यान, नियम‌ित कामकाज सांभाळून यातील काही अधिकाऱ्यांकडे गोदावरी संवर्धन कक्षाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच परस्पर आरोग्य अधिकाऱ्यांनी नावे दिल्यावरून नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. शहराच्या आरोग्याचे प्रमुख काम सांभाळून गोदावरीच्या प्रदूषणाचे काम कसे सांभाळणार, असा संभ्रम या अधिकाऱ्यांमध्ये असून, आरोग्य अधिकाऱ्याच्या परस्पर उद्योगांमुळे नाराजी पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलशाली हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी संघट‌ित व्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राष्ट्र निर्मितीसाठी संत महंत कोठडी आणि जेलमध्येदेखील जायला तयार आहेत. मात्र समाजातील सज्जनांनीदेखील सक्रीय होणे काळजी गरज आहे. सज्जन निष्क्रिय असल्यानेच देशद्रोहींचे थैमान वाढले आहे. भविष्यातील शक्तिशाली व बलशाली हिंदूराष्ट्र निर्मितीसाठी सगळ्यांनी संघट‌ित व्हावे, असे आवाहन स्वाध्वी प्राचीदीदी यांनी केले.

शहरातील विश्व हिंदू परिषदेच्या वतीने डी. के. चौक मैदानात आयोजित विराट हिंदू संत संमेलनात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आचार्य जितेंद्र, शामजी महाराज, ह. भ. प. निवृत्ती बाबा वक्ते, सुरेश चव्हाणके, विहपचे जिल्हा सहमंत्री मच्छिंद्र शिर्के, महेश व्यास आदींसह संत मंडळी उपस्थित होते. यावेळी शामजी महाराज यांनी गो, गंगा, गायत्री व रामंदिराला विरोध करणारे देशद्रोही आहेत. तसेच शहरात सुरू असलेले बेकायदेशीर कत्तलखाणे बंद झाले पाहिजेत, अशी मागणी केली. तर संजय चव्हाणके यांनी औवेसी, आझमखान, संजय निरुपम आदींसह काँग्रेस नेत्यांवर टीका केली. संजय चव्हाणके यांना हिंदूवीर पुरस्कार देण्यात आला. विहपचे विभागममंत्री शैलेश भावसार, संघाचे प्रदीप बच्छाव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१९ हॉस्प‌िटल्समध्ये अनियम‌ितता

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्य विभागाच्या आदेशानंतर पालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील ५६६ रुग्णालये, ७२७ क्लिनिक, २५५ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाने ५९२ रुग्णालये, क्लिन‌िक व सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली असून, त्यापैकी २१९ ठिकाणी अनियम‌ितता आढळून आली आहे.

नियमानुसार प्रशिक्षित मनुष्यबळ नसणे, हॉस्प‌िटल्सची नोंदणी नसणे, औषधांसाठी योग्य नियम न पाळणे, प्रमाणपत्र नसणे यांसारख्या गंभीर त्रुटी या तपासणीत आढळून आल्या आहेत. १५ एप्र‌िलपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. या मोहिमेदरम्यान अचानक तपासणी करण्यात येऊन वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालयांच्या विविध कायद्यांनुसार आवश्यक असलेली नोंदणी प्रमाणपत्रे, वैद्यकीय परिषदेचे प्रमाणपत्र, विविध आवश्यक सुविधांची तपासणी करुन दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई शुश्रुषागृहे अधिनियम, १९४९ व सुधारित नियम, २००६ नुसार ही तपासणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images