Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

श्रीकाळाराम जन्मोत्सवाची मंगळवारपासून पर्वणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

श्री काळाराम संस्थानतर्फे मंगळवार (दि. २८)पासून श्री काळाराम जन्मोत्सवास प्रारंभ होणार आहे. पावन कुंभपर्व सरल्यानंतर आलेला यंदाचा श्रीरामनवमी उत्सव संस्मरणीय व्हावा याकरिता वौशिष्टपूर्ण व भक्तिरसाने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या प्रांगणातील या वासंतिक नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे अध्यक्षस्थानी राहतील. चंदन पूजाधिकारी आहेत. रथोत्सव शुक्रवार (दि. ७ एप्रिल) रोजी होणार आहे.

जन्मोत्सव अन् व्याख्याने

जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात मंगळवारी (दि. २८) उद्घाटनानंतर मानसी पाटील व सहकारी यांचा भावगीतांचा कार्यक्रम होईल. दि. २९ मार्च ते दि. २ एप्रिल या कालावधीत विवेक घळसासी यांचे ‘राष्ट्रचैतन्य श्रीराम’ या विषयावर व्याख्यान होईल. सोमवारी (दि. ३) रोजी सप्तमीचा महाप्रसाद होईल. मंगळवारी (दि. ४) दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल. बुधवार (दि. ५) प्रमोद केणे यांचे गिरणा परिक्रमा, (दि. ६) रोजी तुळशीराम महाराज गट्टे यांचे ‘पसायदान’ व डॉ. अनिता कुलकर्णी यांचे ‘रामायणातील राजस्त्रिया’ या विषयावर व्याख्यान होईल. ही व्याख्याने सायंकाळी ५.३० वाजता होतील.

सांस्कृतिक कार्यक्रम

सांस्कृतिक कार्यक्रमांत दि. २८ रोजी श्रेयसी राय, चेतन थाटसिंगार व संदीप थाटसिंगार यांचा ‘रामरंग’ हा हिंदी-मराठी भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम, दि. २९ रोजी शिल्पा देशमुख यांचा ‘नाचू कीर्तनाचे रंग’ हा नृत्य-गायन-कीर्तनाचा कार्यक्रम, दि. ३० रोजी चंदाताई तिवारी यांचा भजनी भारुड लोकजागर, दि. ३१ रोजी कलानंद कथक नृत्यसंस्थेच्या संजीवनी कुलकर्णी यांची ‘कृष्णकथा’ ही संगीत नृत्यमय नाटिका, दि. १ एप्रिल रोजी आदर्श शिंदे यांचा भक्तिरंग हा भाव-भक्तिगीतांचा कार्यक्रम, दि. २ रोजी जयंत नाईक यांच्या गुरुकृपा तबला परफार्मिंग अकादमीचा ‘रंग त्रितालाचे’ हा कार्यक्रम, दि. ३ रोजी डॉ. ऋचा देव-हिर्लेकर यांचा ‘राष्ट्रजागरणासाठी गीतरामायण’ हा कार्यक्रम होणार आहे. सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरू होतील.

७ एप्रिल रोजी रथयात्रा

दि. १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वंशपरंपरागत पूजाधिकारी व या वर्षाचे मानकरी चंदन पूजाधिकारी यांच्या हस्ते श्री प्रभुरामास तुलसीअर्चन करण्यात येईल. दि. २ रोजी सकाळी ७ वाजता मोहन उपासनी व सहकारी यांचा ‘वेणुमधुरम’ हा कार्यक्रम होईल. दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीराम व गरुड रथयात्रा काढण्यात येईल. रास्ते आखाडा तालीम संघ, अहिल्याराम व्यायामशाळा तालीम संघ व काळाराम संस्थान यांच्यातर्फे हा रथोत्सव होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकला आणखी खासदार

$
0
0

गौतम संचेती, नाशिक

‘आमचा बाप आन आम्ही’चे लेखक, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगरू, अर्थतज्ज्ञ व राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी आपल्या निधीचा विनियोग करण्यासाठी नाशिक जिल्हा नोडल डिस्ट्रिक्ट म्हणून निवडला आहे. त्यामुळे नाशिकला राज्यसभेचा पहिल्यांदा खासदार मिळाला आहे. डॉ. जाधव यांचे मूळ गाव ओझर असले तरी ते मुंबईला स्थायिक झालेले आहेत; पण आपल्या मूळ गावाच्या आठवणी ते आजही जोपासत असल्यामुळे त्यांनी नोडल डिस्ट्रिक्ट म्हणून नाशिकची निवड केली आहे. त्यामुळे देशभर त्यांच्या खासदार निधीचा पैसा आता नाशिकहून दिला जाणार आहे. राष्ट्रपती नियुक्त खासदारांना देशातील सर्व ठिकाणी निधी देण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांच्या निधीचा नाशिकच्या बँकेमध्ये जिल्हा नियोजन अधिकारी यांनी खाते उघडले आहे.

डॉ. जाधव यांच्या खासदार निधीतून ८५ लाख रुपये नाशिक जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी देण्यात आले आहेत. यापुढे त्यांचा जास्तीत जास्त निधी नाशिकला मिळणार आहे. जिल्ह्याला अगोदर तीन खासदार लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्याबरोबरच आता जिल्ह्यात राष्ट्रपती नियुक्त खासदार असणार आहे. डॉ. जाधव यांनी ‘आमचा बाप आन आम्ही’ या पुस्तकात अर्धे वर्णन नाशिक जिल्ह्याचे केले आहे. त्याप्रमाणे आपली बोली भाषा नाशिकची असल्याचे ते अभिमानाने सांगतात. त्यांच्या पहिल्या पुस्तकालाही कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची प्रस्तावना वजा आशीर्वाद असावे म्हणून त्यांचा आग्रह होता व त्यांनी तो मिळवला. त्यामुळे त्यांचे नाशिकप्रेम अजूनही कायम आहे.

खासदार झाल्यानंतर प्रत्येक खासदारांना त्यांचे नोडल डिस्ट्रिक्ट निवडण्याचा अधिकार असतो. त्यासाठी एक फॉर्म असतो. तो भरून दिल्यानंतर नोडल डिस्ट्रिक्टमधून त्यांच्या निधीचे वाटप खासदारांच्या पत्रानुसार केले जाते. डॉ. जाधव यांनी आतापर्यंत औरंगाबाद, पुणे, जळगाव, पालघर, नागपूर, दिल्ली येथे निधी दिला आहे, तर नाशिक जिल्ह्यासाठी ८५ लाख दिले आहेत. त्यातून विविध विकासकामे होणार आहेत.

डॉ. जाधवांचा प्रवास

राष्ट्रपती नियुक्त खासदार होणे तसे नाशिकच्या भाग्यात आले नाही; पण डॉ. नरेंद्र जाधव यांच्यामुळे ते नाशिकला लाभले. डॉ. जाधव हे मराठी अर्थशास्त्रज्ञ व रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य, तसेच इतर सामाजिक विषयांवर मराठी, इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. ते नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते. त्यांचा जन्म एका सामान्य दलित कुटुंबात झाला असून, त्यांच्या आत्मचरित्राचे जगातील वीसपेक्षा अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रोत्सवावरून झाडाझडती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठाचा दर्जा असलेल्या श्री सप्तशृंग गडावरील चैत्रोत्सव जवळ आला असतांनाही उत्सवाची कुठलीच तयारी पूर्ण झालेली नसल्याची बाब शुक्रवारी आढावा बैठकीत निदर्शनास आली. त्यामुळे प्रातांधिकारी डी. गंगाधरन यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या पाच दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश गंगाधरन यांनी दिले आहेत.

येत्या ४ ते ११ एप्रिल दरम्यान चैत्रोत्सव साजरा होत आहे. त्यादृष्टीने प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, गड ग्रामपंचायत यांच्या तयारीला वेग आला असला तरीही अनेक कामे अजून अपूर्ण आहेत. बैठकीत प्रांताधिकारी म्हणाले, दरवर्षी परिवहन महामंडळ हे फक्त उत्पन्न घेण्यासाठी काम करते. त्यांनी ताबडतोब दहा फिरते स्वछतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून द्यावी. नियोजनात हलगर्जीपणा केल्यास एकही कारण ऐकून घेतले जाणार नाही. त्वरित कडक कार्यवाही केली जाईल. प्लास्टिक बंदीसाठी नियोजन करून पाण्याच्या पाऊच ऐवजी पाणपोईची व्यवस्था करावी. हागणदारी मुक्तीसाठी तातडीने गुडमॅर्निग पथकांची नेमणूक करून संबंधितांवर कडक कार्यवाही करा. पायी येणाऱ्या भाविकांसाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून.

भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार होता कामा नये. जर कामे वेळेत पूर्ण केली नाही तर आपत्ती निवारण काद्यानुसार संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला.

गडावर चार एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चैत्रोत्सवाची पूर्वतयारी म्हणून प्रांताधिकारी डी. गंगाधरन यांच्या अध्यक्षतेखाली गडावर ट्रस्टच्या हॉलमध्ये तालुक्यातील मुख्य अधिकारी, व्यावसायिक व ग्रामस्थाची आढावा बैठक घेण्यात आली. यात्राकाळात तयार करण्यात येणारे तात्पुरते बसस्थानक लवकर उभारण्यात यावे. बसस्थानक परिसरात दोन कंट्रोल रुम याशिवाय नियोज‌ित बसस्थानकाच्या जागी मुरूम व खडी टाकून व्यवस्था करण्यात यावी. भाविकांसाठी निवारा शेड करण्यात यावे आदी सूचना करण्यात आल्या. बैठकीस तहसीलदार कैलास चावडे, देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, पोलिस उप निरीक्षक विनोद जाधोर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता केदार, ग्रा. प. सदस्य राजेश गवळी, भगवान नेरकर, भिकन वाबळे, संदीप बेनके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पाच दिवसांत अहवाल द्या
आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, ट्रस्ट व सप्तशृंग गड ग्रामपंचायत यांना उत्सव काळातील जबाबदारीबाबत अहवाल देण्याचे सांगण्यात आले आहे. उत्सवात पार पाडण्याची कामे, कोणती तयारी झाली याचा आहवाल येत्या पाच दिवसात प्रांत कार्यालयाला पाठवावा लागणार आहे.


भाविकांचा विमा

भाविकांचे सुरक्षा व जीविताच्या रक्षणाच्या दृष्टीने न्यासाने दोन कोटी रकमेचा जनसुरक्षा विमा वर्षभरासाठी उतरविला आहे. त्याअंतर्गत सर्व प्रकारचे अपघात, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, गर्दीतील चेंगराचेंगरी व दहशतवादी हल्ला या आपत्ती प्रसंगी होणारा मृत्यू व जखमींच्या कौटुंबिक व जीवित सुरक्षिततेसाठी दोन कोटीचा विमा उतरविण्यात आला आहे. त्यात नांदुरी ते सप्तश्रुंग गड साडेतीन हजार पायऱ्यांचा पायी रस्ता नांदुरी ते सप्तश्रुंग गड घाट रस्ता व चंडिकापूर ते सप्तशृंग गड ६० पायऱ्यांचा रडतोंडी घाट यासह गडाचा सर्व परिसर गृहीत धरला आहे.


असे असणार उत्सवाचे नियोजन

मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार

तीन ठिकाणी संपर्क कक्षांची स्थापना

६५ सीसीटीव्ही कॅमेरे, ८० सुरक्षारक्षक, ५ बंदुकधारी सुरक्षारक्षक

दर्शनासाठी १५ बारी लावण्यात येणार

महाराष्ट्र राज्य पोलीस, राज्य गृहरक्षक दलाचे कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी वर्ग तैनात

२४ तास अग्निबंब सुविधा

प्रथमोपचार केंद्र कार्यान्वित

अल्पदरात निवास व्यवस्था

यात्रा दरम्यान दोन वेळेचे मोफत अन्नदान

एकूण ११ पाणपोई व २४ तास लॉकरची सोय

पाच जनरेटरद्वारे अखंडित वीजपुरवठा

५० स्वच्छता कर्मचारी तैनात राहणार

१०८ अत्यावश्यक अम्ब्युलन्स सेवा उपलब्ध

वाहन पार्किंग नांदुरी येथे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभर हाल, सायंकाळी दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारल्याने दिवसभर रुग्णांचे अतोनात हाल झाले. खासगी हॉस्पिटल्समधील डॉक्टर्सही संपात सहभागी असल्याने रुग्णांना सिव्ह‌िल हॉस्पिटलसह सरकारी हॉस्पिटल्सच्या सेवेवर समाधान मानावे लागले. डॉक्टर्स संघटनांची मुख्यमंत्र्यांसमवेतची बैठक यशस्वी झाल्याने सायंकाळी साडेपाचपासून अत्यावश्यक सेवांसह ओपीडीतील कामकाजही पूर्ववत सुरू झाल्याची माहिती आयएमएच्या सुत्रांनी दिली.

संपकरी डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. ही चर्चा यशस्वी झाल्याचा दावा करीत नाशिक आयएमएने सायंकाळी संप मागे घेतला. सायंकाळी साडेपाचपासून अत्यावश्यक सेवांसह ओपीडीदेखील सुरू करण्यात आल्या. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना दिलासा मिळाला आहे.

औषधांवरच मानले समाधान

तब्येतीच्या कुरबुरींपासून तात्पुरता आराम मिळावा यासाठी रुग्णांनी मेड‌िकल दुकानांकडे धाव घेतल्याचे चित्र शहरात आणि ग्रामीण भागातही होते. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, पोटदुखी, डोकेदुखी, जुलाब, मळमळणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींवर डॉक्टरांकडून लगेचच उपचार मिळणे शक्य नसल्याने रुग्णांनी औषधांवरच समाधान मानले. मेड‌िकल दुकानांमध्ये औषधे खरेदीसाठी गर्दी असल्याचे पहावयास मिळाले.


आयएमएच्या नाशिक शाखेने दुपारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संप रद्दचा निर्णय घेतला. ओपीडी व अन्य सेवा सायंकाळी साडेपाचपासून सुरू झाल्या आहेत. रुग्णांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

-डॉ. प्रशांत देवरे, सचिव, आयएमए

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊंची वाढविण्यासाठी नकली विग लावला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । नाशिक

नोकरी मिळविण्यासाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, नाशिकमध्ये पोलीस भरती सुरू असताना एका तरुणाने केवळ ऊंचीमुळे नोकरी जाऊ नये म्हणून डोक्यावर केसांचा नकली विग लावला. त्यांची ऊंचीही बसली. पण एका चाणाक्ष हवालदारामुळे त्याचे बिंग फुटले आणि पकडला गेला.

किसन पाटील असे या तरूणाचे नाव आहे. नाशिकमध्ये गेल्या चार दिवसांपासून पोलीस भरती सुरू आहे. त्यामुळे किसन पाटील या तरूणाने त्याची ऊंची १७५ सेंटीमीटरच्यावर दिसावी यासाठी हा बनावट विग घातला. तपासणीवेळी त्याची उंचीही जास्त मोजली गेली. मात्र एका पोलीस कॉन्स्टेबलला संशय आल्यानं त्यानं किसनची पुन्हा नीट तपासणी केली. यावेळी त्याच्या डोक्यावर विग आढळला आणि त्याचं बिंग फुटलं. दरम्यान या प्रकारानंतर किसन पाटील या तरुणाला संपूर्ण भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आलं आहे. तसंच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, या तरुणाने नकली विग घालून पोलिसांची फसवणूक केली असली तरी यातून बेरोजगारीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बेरोजगारी प्रचंड असल्यामुळेच नोकरी मिळविण्यासाठी अशी शक्कल लढवावी लागत असल्याचेही या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​पुन्हा येरे माझ्या मागल्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सतराशे विघ्न ठरलेली नाशिकची विमानसेवा पुन्हा मार्गी लावण्यासाठी एअर इंडियाने आणखी एकदा नाशिक-मुंबई-नाशिक विमानसेवेचा प्रस्ताव दिला आहे. मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध न झाल्याने यापूर्वीच ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा ही सेवा सुरू होणार का आणि सुरू झाली तरी त्यास प्रतिसाद मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक विमान सेवेमागे लागलेले शुक्लकाष्ट काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही सेवा प्रतीक्षेतच आहे. किंग फिशरची सेवा काही काळ सुरु राहिल्यानंतर जी सेवा बंद झाली ती अद्याप सुरू झालेली नाही. विमानतळाच्या ठिकाणी पायाभूत सोयी-सुविधा नसल्याचे कारण दाखविले गेले. या सुविधा निर्माण करतानाच अत्याधुनिक टर्मिनलही साकारण्यात आले. त्यासही आता दोन वर्षे होत आली आहेत. सर्वात मोठी धावपट्टीसह अनेक जमेच्या बाजू असतानाही ही सेवा झेप घेत नसल्याने नाशिककर वैतागले आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नातून एअर इंडियाने पुढाकार घेतला. त्यानंतर नाशिक-मुंबई-नाशिक ही सेवा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात मुंबई विमानतळावरील विमानांची गर्दी लक्षात घेता स्लॉट उपलब्ध होऊ शकणार नसल्याचे कारण देण्यात आले. त्यामुळे ही सेवा सुरू होण्यापूर्वीच ती बारगळली. यास एक वर्षे लोटत नाही तोच आता पुन्हा याच सेवेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सद्वारे नाशिक-मुंबई-नाशिक ही सेवा सुरू करण्यासाठी मुंबई विमानतळावर वेळ मिळावा, अशी मागणी एअर इंडियाने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या महाव्यवस्थापकांना पाठविले आहे. त्यामुळे नाशिकसेवेसाठी मुंबईत स्लॉट उपलब्ध होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई-आग्रा हायवेचे चौपदरीकरण आणि मुंबईत उड्डाणपुल साकारण्यात आल्याने नाशिक ते मुंबई हे अंतर खूपच कमी झाले आहे. त्यामुळे नाशिककर अवघ्या अडीच ते तीन तासात मुंबईत पोहचू शकतात किंवा तेथून नाशिकला येऊ शकतात. परिणामी, नाशिककरांना मुंबईसाठी विमानसेवा नको असल्याचा सूर उद्योग आणि अन्य वर्तुळातून आळवला जात आहे. नवी दिल्ली, हैदराबाद, बंगळुरु यासारख्या शहरांसाठी विमानसेवा देण्यात यावी. तसेच, दिल्ली-हैदराबाद जाणारे विमान नाशिकला थांबविण्यात यावे (हॉपिंग फ्लाईट), अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई सेवा सुरू झाली तरी त्यास प्रतिसाद लाभणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसाइटवर झळकले मराठीतील गुरुचरित्र

$
0
0



नाशिक ः आजची पिढी ही इंटरनेट व्हॉट्सअॅप, फेसबुक या माध्यमांमध्ये व्यस्त असून, त्यांना धार्मिक, सामाजिक प्रश्नांची जाण नाही, अशी ओरड केली जाते. मात्र, आता तरुणाईसह सर्वांनाच त्यांच्या आवडत्या माध्यमांद्वारे गुरुचरित्राच्या माध्यमातून जीवन जगण्याचे धडे देण्याकामी प्रभा आठवले यांनी पुढाकार घेतला आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी गुरुचरित्र या पोथीची वेबसाइट तयार केली असून, जगातील असंख्य यूजर्सपर्यंत ती पोहोचवली आहे. गुरुचरित्राचे मराठीत भाषांतर करून वेबसाइट बनविणाऱ्या त्या जगातील पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत.

आपल्या मुलीबरोबर आठवले या गोंदवले या ठिकाणी गेल्या असता, तेथे हाती लागलेली गुरुचरित्राची पोथी चाळून पाहताना त्यांना जाणवले, की यातील ओव्या या ४५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या असून, त्या सामान्य माणसाला समजणाऱ्या नाहीत. ही पोथी कानडी लेखक गंगाधर साखरे यांनी लिहिली असून, ती सर्वांना समजेल यासाठी मराठीत असावी, अशी इच्छा त्यांच्या मनात आली. त्यांनी लगेचच कामाला सुरुवात केली आणि मराठीतील भाषांतरानंतर वेबसाईटदेखील साकारली.

७९ व्या वर्षी मराठी टायपिंगचे धडे

गुरुचरित्राचे मराठीतील लिखाण जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी वेबसाइट या माध्यमाचा प्रयोग करण्याचे ठरविले. वेबसाइट तयार करण्याची माहिती नसल्याने यातील तज्ज्ञ दीप्ती नाशिककर व भाग्यश्री केंगे यांच्याकडून माहिती घेऊन गुरुचरित्राची पहिली वेबसाइट त्यांनी www.shrigurucharitra.com या नावाने साकारली. हे करण्यासाठी आठवले वयाच्या ७९ व्या वर्षी युनिकोडमध्ये मराठी टायपिंग शिकल्या.

चार फोल्डर्सचा समावेश

गुरुचरित्राची चार फोल्डर्समध्ये वेबसाइट तयार केली असून, पहिल्या फोल्डरमध्ये गुरुचरित्र, दुसऱ्या फोल्डरमध्ये आशय असून, त्यात आधुनिक काळातील मीमांसा मांडण्यात आली आहे. तिसऱ्या फोल्डरमध्ये यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितला आहे. चौथ्या फोल्डरमध्ये प्रत्येक शब्दाविषयी चर्चा करण्यात आली आहे. ही वेबसाइट लॉन्च झाल्यानंतर जगभरातून प्रतिसाद मिळाला. त्यावर उत्तमोत्तम प्रतिक्रिया आल्या. सर्वांत जास्त प्रतिक्रिया अमेरिकेतून आल्या असून, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, जपान आदी देशांबरोबरच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथूनही प्रतिक्रिया आल्या आहेत.

२ अध्याय, ७४९१ ओव्यांचे भाषांतर

दोन वर्षांच्या अथक परिश्रामांनंतर ५२ अध्याय, ७ हजार ४९१ ओव्या यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लावून त्यांनी गुरुचरित्राचे मराठीत भाषांतर केले. गुरुचरित्रात जगण्याचा मंत्र दिला असून, तो सगळ्यांनी आचरणात आणावा, असे सांगण्यात आले आहे. अनेकांनी त्यांच्याकडून मराठी गुरुचरित्राच्या झेरॉक्स कॉपी घेतल्या. सोप्या भाषेत मराठी असल्याने त्याची मागणी वाढली. अनेक लोकांनी त्याचे पुस्तक करून विकावे, असा सल्लाही दिला. परंतु, मला या माध्यमातून पैसा नको, असे सांगून त्या शेकडो लोकांपर्यंत पोहोचवल्या.


ऑडिओदेखील अपलोड

गुरुचरित्र अंधांना समजावे यासाठी त्याचे ऑडिओदेखील अपलोड करण्यात आले आहे. अनेक लोक रोज एकतरी अध्याय वेबसाइटच्या माध्यमातून ऐकत आहेत. गुरुचरित्रात तुमची वागणूक कशी असावी, याचे मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे दत्तात्रयांनी सांगितलेले त्रिपुरा रहस्य हे मानसशास्त्र वेबसाइटच्या माध्यमातून आणण्याचा त्यांचा मानस आहे. वेबसाइट तयार करण्याचे जे काम तरुणांना येणार नाही ते काम प्रभा आठवले या सहजासहसहजी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंड नाशिकही तापले...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत असून, तापमान चाळिशीकडे चालले आहे. दरवर्षीच हॉट ठरणाऱ्या मालेगावने तापमानाची चाळिशी ओलांडली आहे. आता उर्वरित जिल्ह्यांची वाटचाल चाळिशीकडे सुरू असून, शनिवारी ३८.४ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली.

यंदाचा उन्हाळा तापदायक असणार असे सर्रास बोलले जात असून, मार्चच्या पहिल्या पंधरवड्यानंतरच त्याचा प्रकर्षाने प्रत्यय येऊ लागला आहे. होळीनंतरच्या उन्हाच्या झळा सोसणेही नाशिककरांना नकोसे वाटू लागले आहे. त्यामुळेच दुपारी बारानंतरच शहरातील अनेक रस्ते ओस पडू लागल्याचे पाहावयास मिळू लागले आहे. गतवर्षात नाशिककरांनी धुव्वाधार पाऊस आणि गारठून टाकणाऱ्या थंडीचा अनुभव घेतला. आता उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, आतापासूनच उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. त्यामुळेच टोपी, गॉगल यांसारख्या उन्हाच्या झळांपासून आरोग्याचे रक्षण करणाऱ्या वस्तूंना मागणी वाढली आहे. घरोघरी आणि कार्यालयांमध्येही पंख्याची पाती फिरण्यास सुरुवात झाली असून, एसीलाही मागणी वाढली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यातच एवढा उन्हाचा तडाखा जाणवत असेल तर एप्रिल आणि मे मध्ये किती हाल सोसावे लागणार या विचारानेच नागरिकांना घाम फुटू लागला आहे. गेल्या आठवड्यात ३३ अंशांपर्यंत असलेले कमाल तापमान आठच दिवसांत पाच अंश सेल्सियसने वाढून ३८ अंश सेल्सियसच्या वर पोहोचले आहे. शनिवारी कमाल तापमान ३८.४ अंश, तर किमान तापमान २०.२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या काही दिवसांत नोंदविले गेलेले तापमान ः

१५ मार्च ३४.५, १६ मार्च ३३.८, १७ मार्च ३३.८, १८ मार्च ३४.१, १९ मार्च ३३.७, २० मार्च ३३.९, २१ मार्च ३६.०, २२ मार्च ३७.३, २३ मार्च ३८.१, २४ मार्च ३८.१, २५ मार्च ३८.४ जिल्ह्याचे तापमान चाळिशीकडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुक्तिधामचा कोंडला श्वास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिकरोड

येथील प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिराचा जीव अतिक्रमणामुळे गुदमरला आहे. महापालिकेने अतिक्रमणापासून मुक्ती द्यावी, अशी मागणी भाविक आणि मंदिर प्रशासनाने केली आहे. अतिक्रमणामुळे मंदिराची सुरक्षाव्यवस्थाही धोक्यात आल्याचा दावा केला जात आहे.

नाशिकरोडला बिटको चौकापासून जवळच मुक्तिधाम हे भव्य मंदिर आहे. विविध देवी देवतांच्या आकर्षक, रेखीव आणि जिवंत मूर्ती यासाठी हे मंदिर भारतात प्रसिद्ध आहे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसाला सरासरी आठ हजार असून त्यामध्ये भरच पडत आहे. सकाळी महाभिषेक व सायंकाळच्या आरतीवेळी मोठी गर्दी होते. रामनवमी आणि हनुमान जयंतीजवळ आल्यामुळे त्यादिवशी गर्दी वाढणार आहे. कार्तिक स्वामींची मूर्ती मंदिरात आहे.

सुरक्षेला धोका

मुक्तिधामसारख्या मंदिरात ठराविक कालावधीने मॉक ड्रील (सुरक्षा प्रात्यक्षिक) घ्यावीत, अशी भाविकांची मागणी आहे. मंदिराच्या स्थापनेपासून ५० वर्षात एकदाच मॉक ड्रील झाले आहे. तेदेखील गांभीर्याने झाले नाही. ड्रील पोलिसांनी नियमित घेतल्यास नागरिक आणि दहशतवाद्यांना योग्य संदेश मिळेल. या अतिक्रमणाचा गैरफायदा घेत दहशतवादी घातपात करू शकतात, असाही धोका संभवतो. भाविकांच्या सुरक्षेसाठी सुमारे पंधरा रक्षक, मेटल डिटेक्टर आहेत. मंदिराच्या आत, बाहेर आणि पार्किंगमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याद्वारे भाविकांच्या सुरक्षेची योग्य काळजी घेतली जाते.

दोन्ही मार्गांवर वेढा

मुक्तिधाम मंदिराला पूर्व आणि दक्षिण असे दोन प्रवेशद्वार आहेत. दोन्ही मार्गावर अतिक्रमणाचा वेढा आहे. खाद्यपदार्थ विक्रेते, व्यावसायिकांची अतिक्रमणे सायंकाळी रस्त्यावर येतात. पे अॅन्ड पार्कही रस्त्यावरच आहे. पादचारी, वाहनांना जाण्यास जागा उरत नाही. मंदिरात पाच भक्त निवासात एक हजार भाविकांची राहण्याची सोय आहे. हे भाविक तसेच दररोजचे भाविक यांना अतिक्रमणाचा प्रचंड त्रास होतो. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने नाशिकरोड, जेलरोडची अनेक अतिक्रमणे हटवली. मात्र, मुक्तिधाम परिसराला त्यांनी अभय दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नेते मंडळी अतिक्रमण हटविण्याचे केवळ आश्वासन देतात. परंतु, अतिक्रमण हटविण्याचे धारिष्ट्य ते दाखवत नाहीत.

विश्वस्तांकडून मुक्तिधाम मंदिर परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर, पोलिस आयुक्त सर्वांना पत्रे देऊन अनेक वर्षे झाली. परंतु, ते हटविण्यात आलेले नाही. अतिक्रमणामुळे भाविकांच्या वस्तू चोरीस जातात. त्यामुळे अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विगची शक्कल तरुणाच्या अंगलट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उंचीबाबत साशंकता असलेल्या एका तरूणाने चक्क केसांचा विग लावत पोलिस भरतीला समोरे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, या तरुणाची ही चलाखी लागलीच उघडकीस आली. केसाने गळा कापला अशी एक म्हण आहे. मात्र, येथे केसाने दगा दिला असून, यानंतर सदर युवकाला भरतीप्रक्रियेतून बाद ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाची दिवसभर चर्चा सुरू होती.

नाशिक शहर पोलिस दलासाठी सध्या पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया सुरू आहे. दररोज साधारणतः एक हजार उमेदवारांना मैदानी परिक्षेसाठी पाचारण करण्यात येते. आज, शनिवारी त्र्यंबकेश्वर येथील एका युवकाचा क्रमांक आला. भरती प्रक्रियेच्या सुरुवातीला उमेदवारांची उंची तसेच छाती मोजली जाते. सदर युवक या टप्प्यात यशस्वी ठरला. मात्र, हजर झाल्यापासून तो पोलिस कर्मचाऱ्यांच्या संशयाच्या घेऱ्यात पोहचला होता. त्याचे केस जरा विच‌ित्र वाटत असल्याची तक्रार उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्याकडे केली. त्यांनी लागलीच याची खातरजमा करण्यासाठी संबंध‌ित उमेदवाराला बोलावून घेतले. त्याच्या डोक्याची तसेच केसांची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यात, त्याच्या केसांवर खोट्या केसांचा टोप (विग) लावल्याचे निदर्शनास आले. उंचीबाबत शाशंक असलेल्या सदर युवकाने हा उद्योग केल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले. पोलिस भरतीसाठी १६५ इंच उंची आवश्यक असून, संबंध‌ित युवकाने विनाकारण हा प्रकार केल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर युवकास तत्काळ भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले. किंबहुना फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो.

...तर त्याच्यावर बंदी

नोकरी मिळवण्याची तरुणांची धडपड योग्य असते. मात्र, असे गैरप्रकार खपवून घेतले जात नाही. यामुळे उमेदवाराच्या करिअरवरच प्रश्न लागते. गैरप्रकार करून भरती होण्याचा प्रयत्न केल्यास भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास कायमस्वरूपी बंदी येऊ शकते, याची जाणिव ठेऊन काम करावे, असे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्राच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचा समावेश केल्यानंतर चालू आर्थिक वर्षात ९० कोटी तर राज्य सरकारने आपल्या हिश्याचा ४५ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केला आहे. परंतु हा निधी येवून २0 दिवस झाले तरी जिल्हाधिकाऱ्यांनी हा पालिकेकडे वर्ग केलेला नाही. परंतु या संदर्भात संसदेत एका तारांक‌ित प्रश्नाच्या माह‌ितीसाठी केंद्रीय सचिवांनी पालिकेकडे माह‌िती मागताच जिल्हाधिकारी कार्यालय जागे झाले आणि १३५ कोटींचा निधी वितरीत करण्याची धावपळ सुरू झाली आहे. पालिकेला येत्या दोन दिवसात १३५ कोटींचा निधी मिळणार आहे.

महापालिकेने स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. योजनेसाठी केंद्राचे ५० तर राज्य व महापालिकेला प्रत्येकी २५ टक्के खर्चाचा वाटा आहे. केंद्र सरकारने ९० कोटी रुपयांचा तर राज्य शासनाने ४५ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वर्ग केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने हा निधी तातडीने एसपीव्ही या कंपनीकडे वर्ग करायला हवा होता. परंतु नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला १३५ कोटीच्या निधीचे पत्र प्राप्त होवूनही या कंपनीकडे निधी वितरीत झाला नाही. याच संदर्भात केंद्रीय अधिवेशनात स्मार्ट सिटीसाठी आतापर्यंत किती निधी पाठविला व संबधित महापालिकांना किती वितरीत केला याबाबत तारांक‌ित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्नासाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाचे सचिव संजय शर्मा यांनी लेखी माहिती मागितली.

यासंदर्भात पालिकेने उपलब्ध निधीचा गोषवारा देण्याची तयारी केल्याची कुणकुण जिल्हाधिकारी कार्यालयाला लागली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने स्मार्ट सिटीसाठी प्राप्त झालेला १३५ कोटी रुपयांचा निधी दोन दिवसात वितरीत करण्याचे आश्‍वासन महापालिकेला दिले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचा निधी पुढील आठवड्यात पालिकेच्या पदरात पडणार आहे.

स्मार्टस‌िटीसाठी बॉण्डची तयारी

स्मार्ट सिटीच्या नियोजित प्रकल्पांसाठी महापालिकेने स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र, राज्य व महापालिकेच्या निधीसोबतच या कंपनीलाही आता आपला स्वतंत्र निधी बॉण्डसच्या माध्यमातून उभा करावा लागणार आहे. त्यासाठी कंपनीने बॉण्डस काढण्याची तयारी सुरू केली आहे. स्मार्ट सिटी नियुक्त केलेल्या क्रिसिल या संस्थेने नाशिक महापालिकेचा ‘अ’ वर्गात समावेश केला आहे. त्यामुळे कंपनीला तातडीने कर्ज उभारता येणे शक्य आहे. त्याच आधारे आता एसपीव्ही कंपनीसाठी बॉण्डस उभारले जाणार असून, यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय संशोधनास मिळणार चालना

$
0
0




म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना मिळावी, या दृष्टीने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूदी करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचा रुपये ३७७ कोटी ७७ लाखांचा अर्थसंकल्प शुक्रवारी मंजूर झाला. तसेच अठरावा वार्षिक अहवाल विद्यापीठाच्या सन २०१७मधील पहिल्या अधिसभेमध्ये सादर करण्यात आला.

या अधिसभेसाठी कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर हे अध्यक्षस्थानी, प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगांवकर, प्र. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. अजय चंदनवाले यांनी अधिसभेत अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठाच्या सन २०१७-२०१८ अर्थसंकल्प परीक्षण, विकास आणि स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधनाला चालना मिळण्यासाठी विद्यापीठाच्या ध्येय धोरणाशी सुसंगत योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक व गुणवत्ता वाढीस चालना, विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक गुणांना वाव मिळावा, शिक्षकांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाविषयी प्रोत्साहन मिळण्यासाठी शिष्यवृत्ती, शिक्षकांना अपघात सहाय्यता, संपूर्ण प्रशासकीय कामकाजाचे संगणकीकरण, कर्मचायांसाठी कल्याणकारी योजना, विद्यापीठाच्या विकास कामांसाठी भरघोस आर्थिक तरतूदी करण्यात आल्या आहेत.



प्रोत्साहन मिळण्यासाठी तीन कोटींची तरतूद
विद्यापीठ व संलग्नित कॉलेजांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात संशोधन विभाग या स्वतंत्र विभागाची स्थापना करून त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी रुपये ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार असून त्यासाठी रुपये १ कोटी तरतूद केली आहे. विद्यापीठ व विभागीय केंद्राच्या ठिकाणी अद्ययावत संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात यावी याकरीता संशोधकांना मानधन, वेतन देण्यासाठी रुपये १ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर संशोधनासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक निर्माण करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे यासाठी रुपये २५ लक्ष इतकी तरतूद केली आहे. वैद्यकीय शाखेतील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, हा यामागील उद्देश असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नलवरील झेब्रा पट्टे झाले गायब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

प्रादेशिक परिवहन विभागाने नुकतीच झेब्रा पट्टे क्रॉसिंग करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. परंतु, यात शहरात असलेल्या अनेक सिग्नलवरील झेब्रा पट्टेच गायब झाले आहेत. यामुळे सिग्नल यंत्रणेच्या ठिकाणी प्रथम झेब्रा पट्टे बनवावेत नंतरच आरटीओ विभागाने वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. त्यातच अवजड वाहनांची सर्रास वाहतूक रहिवाशी भागात होत असतांना त्यावर कारवाई कोण करणार, असाही सवाल वाहनचालकांनी उपस्थित केला आहे.

नाशिक शहराचा विकास गेल्या काही वर्षांत झपाट्याने झाला आहे. वाढत्या शहरात चारही बाजूंनी लोकवस्तीदेखील वाढली आहे. यामुळे वाहनांची संख्याही वाढलेली पहायला मिळते. त्यातच रहिवाशी भागात सर्रासपणे अवजड वाहनांचा नेहमीच शिरकाव होताना दिसतो. परंतु, याकडे वाहतूक पोलिस व प्रादेशिक परिवहन विभाग नेहमीच दुर्लक्ष करताना दिसतो. दुसरीकडे मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांची कारवाई नेहमीच सुरू असते. यात भर म्हणून आरटीओ विभागाने झेब्रा पट्टे क्रॉसिंग करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. अनेक वाहनचालकांनी हे क्रॉसिंग केल्याने आरटीओ विभागाने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना मात्र शहरातील अनेक सिग्नलवरील झेब्रा पट्टेच गायब झाल्याने वाहनचालकही सर्रासपणे झेब्रा पट्ट्यांवर उभे राहताना दिसतात. यासाठी अगोदर गायब झालेले झेब्रा पट्टे वाहतूक पोलिस व आरटीओ विभागाने डोळ्याला दिसतील, असे करावेत मगच वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

नाशिक शहरात वाढलेल्या वाहनांमुळे रोजच अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यात आरटीओ विभागाने झेब्रा पट्टे क्रॉसिंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली असली तरी, ती केवळ नावालाच आहे, असाही सवाल उपस्थित होतो. अनेक सिग्नलवर झेब्रा पट्टेच गायब झाले आहेत.

-अनिल चिखलठाणे, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जीआर’चा प्रश्न दिल्लीदरबारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील लष्करी हद्दीलगतच्या मिळकतींसाठी अडचणीचा ठरलेला संरक्षण मंत्रालयाने नुकताच जारी केलेला शासकीय आदेश रद्द व्हावा, या मागणीसाठी बाधित मिळकतधारकांचे शिष्टमंडळ खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय संरक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहे. याशिवाय हा प्रश्न थेट लोकसभेत उपस्थित करण्याचे आश्वासनही खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी दिले.

संरक्षण मंत्रालयाच्या या वादग्रस्त ‘जीआर’मुळे बाधित होणाऱ्या मिळकतधारकांची नाशिक-पुणे महामार्गावरील उपनगर येथील इच्छामणी लॉन्स येथे शनिवारी दुपारी खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले. शहरातील संरक्षण विभागाच्या हद्दीलगतचे बहुतांश मिळकतधारक या बैठकीस उपस्थित होते.

या मिळकतधारकांवर संरक्षण मंत्रालयाच्या ‘जीआर’मुळे अन्याय होणार असल्याची बाब या बैठकीत अधोरेखित करण्यात आली. या पार्श्वभूमीवर ‘जीआर’संदर्भात अधिक विचारविनिमय करून पुढील धोरण आखण्यासंदर्भात शनिवारी इच्छामणी लॉन्स येथे मिळकत बाधितांची बैठक झाली. यावेळी नगरसेवक केशव पोरजे, प्रशांत दिवे, नगरसेविका सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, तसेच नरेश कारडा, माजी नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे आदी उपस्थित होते.


असा आहे ‘जीआर’...

संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका ‘जीआर’नुसार नाशिकमधील लष्करी हद्दीपासून १०० मीटरपर्यंत बांधकामांना प्रतिबंध, तर ५०० मीटर पर्यंत १५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकामांना प्रतिबंध घालण्यात आला आहे. या निर्णयाचा फटका नाशिकमधील लष्करी हद्दीलगतच्या शेतकऱ्यांसह व्यावसायिक, उद्योजक, शासकीय व निमशासकीय संस्थांना बसणार आहे.

...आता बंधने अयोग्य

सन १९९३ व २०१३ या वर्षाच्या नाशिक महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याच्या मान्यतेवर संरक्षण खात्याने हरकत घेणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही. त्यामुळे यलो झोनमध्ये नागरिकांनी मिळकती विकत घेतल्या. आता या मिळकतींवर अशा प्रकारची बंधने संरक्षण मंत्रालयाने घालणे अयोग्य असल्याची ठाम भूमिका याप्रसंगी उपस्थित मिळकतधारकांनी मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्लासेसच्या प्रवेशांवर पालकांची नजर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दहावी व बारावीच्या परीक्षा आता अंतिम टप्प्यात असून या विद्यार्थ्यांना लवकरच सुट्या लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा शुक्रवारीच संपल्या आहेत. तर दहावीचाही केवळ संस्कृतचा पेपर होणे बाकी आहे. या परीक्षानंतर पुढे काय करायचे?, याची दिशा अनेक विद्यार्थ्यांनी निश्चितही केली असून त्यादृष्टीने तयारीही सुरू झाली आहे. निश्चित शाखेनुसार अनेक विद्यार्थी, पालक शहरातील नावाजलेल्या क्लासेसमध्ये चौकशी करीत असून त्यांच्या नजरा अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यावर खिळल्या असल्याचे दिसून येत आहे.
दहावी व बारावी हे दोन्ही वर्ष विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. या वर्षांतील मार्कांवरच कोणत्या क्षेत्रात करिअर करता येणार याची दिशा निश्चित होत असते. या परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ताण हलका होतो. वर्षभर या परीक्षांच्या चिंतेमुळे कधी एकदा या परीक्षा होतायेत, अशी अनेकांची भावना झाली होती. त्यामुळे या परीक्षांच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थी निर्धास्त होत आहेत. परंतु, आजच्या स्पर्धेच्या युगात करिअरच्या पुढील टप्प्यांचे नियोजनही लवकरात लवकर करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळेच ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे व ज्यांच्या करिअरच्या दिशाही निश्चित आहे, असे विद्यार्थी थेट अकरावी, बारावीच्या वर्गांसाठी क्लासेसच्या पॅकेजची चौकशी करीत आहेत.
हल्ली कॉलेजपेक्षा विद्यार्थी क्लासेसमधील लेक्चर्सवर अधिक लक्ष केंद्रीत करीत असतात. सायन्स या शाखेसाठी अनेक प्रचलित क्लासेस शहरात असून या परीक्षा झाल्या की ताबडतोब अशा क्लासेसमध्ये प्रवेश घेण्याची चौकशी करून ठेवली जात आहे.



टायअपचं काय?
गेल्या काही वर्षांपासून क्लासेस आणि कॉलेजांचे टायअप हा विषय समोर आला आहे. दहावीतून अकरावीत गेलेल्या विद्यार्थ्यांनी अशा एखाद्या प्रचलित क्लासमध्ये प्रवेश घेतला की त्यांचा प्रवेश क्लाससोबत टायअप केलेल्या कॉलेजमध्येही निश्चित होतो. तसेच त्यांना कॉलेजांमध्ये उपस्थित राहण्याची सक्तीही नसते. मात्र, अशा नियमबाह्य पद्धतींमुळे प्रवेशांचा अतिरिक्त भुर्दंड विद्यार्थ्यांना सहन करावा लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे या शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजांवरही कारवाई केली जाईल, अशी तंबी शिक्षण विभागाने दिली होती. येत्या काळात अशा क्लासेसवर खरेच कारवाई होते की नाही, हेदेखील दिसून येणार आहे.



क्लासचालक प्राध्यापकांवर आक्षेप
कॉलेजांमध्ये चांगल्या वेतनावर काम करूनदेखील काही प्राध्यापक बाहेरही खासगी क्लासेस चालवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. खासगी क्लासेस संघटनांनी या विरोधात अनेकदा आक्षेपही घेतला आहे. त्यामुळे सजग पालक या बाबींची शहानिशाही करताना दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्त्यात वीजखांबांचा अडथळा

$
0
0

नाशिकरोड परिसरातील स्थिती; प्रशासनाकडे खांब हट‌विण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात अनेक ठिकाणी पथदीपांचे खांब रस्त्यात आल्याने अपघाताची भीती व्यक्त होत आहे. रस्त्यामध्ये असलेले हे विजेचे खांब रात्री दिसत नसल्यामुळे त्यांना वाहने धडकून चालक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे हे खांब त्वरित स्थलांतरित करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

जेलरोड येथील इंगळेनगर चौकातून पवारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण होऊन दोन वर्षे झाली तरी रस्त्यातील दोन डझन खांब हटवण्यात आलेले नाहीत. महापालिका आणि महावितरणकडे नागरिकांनी मागणी केल्यानंतर लवकरच खांब हटविले जातील असे सांगण्यात आले. परंतु, दोघांनीही अद्याप नागरिकांना दिलेला शब्द पाळलेला नाही. हा रस्ता भरपूर रुंद झाला आहे. तसेच खड्डेही बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे.

अपघाताचा धोका

इंगळेनगर चौकातून उपनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरही विजेचे खांब आता रस्त्याच्या मध्यभागी आले आहेत. या रस्त्यावरील पथदीपे अनेकदा बंद असतात. तसेच रस्त्यात खड्डेही आहेत. त्यामुळे अपघात होण्याची भीती आहे. परिसरातील सिन्नरफाटा, जयभवानीरोड, विहितगाव, देवळालीगाव, जेलरोड पवारवाडी, एकलहरे या ठिकाणी रस्त्यात येणाऱ्या खांबामुळे अपघात होऊन अनेक व्यक्ती जखमी झाल्या आहेत. रात्रीच्या वेळी दुचाकी आणि चारचाकी वाहने या मार्गावरून वेगाने जातात. खांब न दिसल्यामुळे अपघात झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे तातडीने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पवारवाडी रस्त्यावर महिनाभरापूर्वी महिला दुचाकीस्वार

खांबाला धडकून जखमी झाली. नेहरूनगरमधून शिखरेवाडीकडे जाताना असाच एक वीजेचा खांब अऩेक वर्षांपासून रस्त्याच्या मध्यभागी उभा आहे. नवीन वसाहतींमध्ये अशा खांबांची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे अशा अपघातग्रस्त विजेच्या खांबांचे सर्वेक्षण करून ते त्वरित हटवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिकरोड, उपनगर, टाकळीसह शहरातील विविध भागातील कालन्यांमधील रस्त्यात आलेले पथदीप हटविणे महावितरण आणि महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते हटविणे आवश्यक आहे. अपघात झाल्यास प्रशासनच त्याला जबाबदार राहील.

-सोपान वाटपाडे, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षांचा धोका रोखणार कोण?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेने शहरातील रस्त्यात येणाऱ्या वृक्षांना हटविण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. परंतु, असे असतानादेखील रस्त्यात येणाऱ्या वृक्षांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यातच शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या गंगापूररोडवर वृक्षांचा धोका रोखणार कोण, असा सवाल वाहनचालकांसह रहिवाशी उपस्थित करत आहेत. महापालिका आयुक्तांनी नव्याने वृक्षांची लागवड करण्यासाठी ठेकेदार नेमला असताना मोडकळीस आलेल्या वृक्ष हटविण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे. तसेच रस्त्यात येणाऱ्या वृक्षांचा कायमस्वरूपी अडथळा दूर करण्यासाठी नव्याने वृक्ष लागवड सुरू करण्यात आली असल्याचे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ अशी म्हण अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात वृक्षांचे सर्वंधन करण्यासाठी ऐकत असतो. परंतु, तेच वृक्ष सर्वसामान्यांच्या जिवावर उठल्यावर काय म्हणायचे असाही प्रश्न समोर उभा राहतो. वृक्ष लागवड केली पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत नाही. परंतु, रस्त्यात येणारी वृक्ष कोणाच्या जिवावर बेतत असतील तर त्यावर उपाय करण्याचीदेखील गरज आहे.

शहरातील गंगापूररोडवर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यात येणाऱ्या वृक्षांवरून वाहनचालक व रहिवाशी नाराजी व्यक्त करत असतात. त्यातच अनेकवेळा झालेल्या अपघातात अनेकांना आपले प्राणदेखील गमवावे लागले आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्तांनीच रस्त्यात येणारी वृक्ष हटविण्यासाठी नव्याने वृक्ष लागवडीचे काम ठेकेदाराला दिले आहे. नेहमीच होत असलेल्या अपघातांमुळे गंगापूररोडला अपघात रोड म्हणून जणू काही ओळखच निर्माण झाली आहे. यासाठी महापालिकेने तत्काळ रस्त्यात येणारी वृक्ष हटवून वाहनचालकांना रस्ता मोकळा करून द्यावा, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महापालिकेने गंगापूररोडवरील अतिक्रमण मोहिम हटविताना रस्त्यात येणारी वृक्ष मात्र हटवली नाहीत. यामुळे अनेकदा अपघात होत असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतो. मोळकळीस आलेल्या वृक्षांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची गरज आहे.

-गजानन गायकवाड, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसेवा पूर्ववत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉक्टरांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारल्यानंतर दोन दिवस शहरातील दवाखाने बंद होते. पण, शनिवारपासून जिल्ह्यातील सर्व हाॅस्पिटल्स व दवाखाने सुरू झाल्यामुळे रुग्णसेवा पूर्ववत झाली आहे. नाशिकमध्ये काही डाॅक्टरांनी शुक्रवारी सायंकाळपासूनच सेवा सुरू केली होती. मात्र, रुग्णांना माहिती नसल्यामुळे फारशी गर्दी नव्हती. पण, शनिवारी दोन दिवसांच्या बंदनंतर अनेक दवाखाने व हाॅस्पिटल्समध्ये गर्दी दिसून आली.

गुरुवारी जिल्ह्यात अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे असंख्य रुग्णांना दवाखान्यांतून उपचारांविना परतावे लागले होते. काम बंद केलेल्या डॉक्टरांनी सर्व रुग्णांना आम्ही महापालिका व जिल्हा रुग्णालयात पाठवत असल्याचे सांगितल्यामुळे रुग्णांमध्ये प्रचंड संताप होता. अगोदर हे आंदोलन तीन दिवस सुरू ठेवण्याची घोषणा डाॅक्टरांनी केली, त्यानंतर बेमुदत आंदोलन करण्याचे सांगितले. त्यामुळे रुग्णांचा प्रश्न तीव्र झाला होता. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण, डाॅक्टारंनी पूर्ण बंद पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. त्यावर सर्व स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने पुढाकार घेतला. डॉक्टर्स संघटनांची मुख्यमंत्र्यांसमवेतची बैठक शुक्रवारी यशस्वी झाल्याने काम बंद आंदोलन मागे घेण्यात आल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला. मुंबईत झालेल्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील डाॅक्टरांनी तातडीने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल पाच हजार डाॅक्टर्स व ९०० हून अधिक दवाखान्यांची सेवा पूर्ववत झाली आहे.

--

मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर शुक्रवारपासून आम्ही आंदोलन मागे घेऊन रुग्णसेवा सुरू केली. त्यानंतर शनिवारी सर्वांना माहिती झाल्यानंतर सर्वच ठिकाणी गर्दी होती. रुग्णांना चांगली सेवा देण्याची आमची प्राथमिकता आहे.

-अनिरुद्ध भांडारकर, अध्यक्ष, आयमा

--

‘सिव्हिल’मध्ये सशस्त्र पोलिस तैनात

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांकडून होणारी अरेरावी मोडून काढण्यासाठी दोन सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. शुक्रवारी याबाबत निर्णय झाला होता. रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ मार्ड संघटनेसह खासगी डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत बंदचे हत्यार उपसल्यानंतर पोलिस संरक्षण पुरविण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच येथे एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे आदींनी शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलला भेट दिली. सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. गजानन होले आदींशी चर्चा करीत लागलीच दोन सशस्त्र पोलिस पुरविण्याची हमी दिली, तसेच पोलिस बीट मार्शल दर दोन तासांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी दोन बंदूकधारी पोलिस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर झाले. खासगी हॉस्पिटल्समधील डॉक्टरांना पोलिस अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक देण्यात आले असून, अनुचित घटनेची जाणीव होताच संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारी व खासगी डॉक्टरांनी संप पुकारला होता. यामुळे सर्वांचे हाल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वासंती दुर्गापूजा २ एप्रिलपासून

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनातील भारत सेवाश्रम संघातर्फे श्री श्री महाशक्ती वासंती दुर्गा पूजा आणि हिंदुधर्म महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ते ६ एप्रिल या दरम्यान हा सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमात रोज सकाळी ७ वाजता भक्तांना दीक्षा, साधना व उपदेश प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी रविवारी (२ एप्रिल) रोजी महाषष्ठीपूजा होणार असून श्रींना आमंत्रण व अधिवास देण्यात येणार आहे. ३ एप्रिलला पूजा, पुष्पांजली, आरती, भंडारा, महाप्रसाद वितरण तसेच सायंकाळी ७ वाजता नृत्यांगण डान्स अकादमीतर्फे सृष्टी ग्रुपद्वारे डान्स हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शर्मिष्ठा सरकार यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तसेच संधीपूजाही होईल. ५ एप्रिल रोजी महानवमी पूजेत नाशिक बंगीय परिषदेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता रामकुंडात देवी मूर्ती विसर्जन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी परिपूर्णानंद महाराज यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुरट्या चोरट्यांनी पळविल्या कोंबड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चोरीचे अनेक प्रकार नागरिकांनी अनुभवले आहेत. चोरटे काय पद्धत वापरून चोरी करतील, याचा काही नेम नाही. मात्र, दागिने अथवा रोकड सोडून थेट कोंबडी पळवणाऱ्या चोरट्यांबाबत सध्या चर्चा सुरू आहे. बॉयलर कोंबड्यांचे वितरण सुरू असताना टेम्पोमधील ४४ कोंबड्या दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी पळविल्याची घटना वडाळानाका भागात घडली आहे.

मझहर अमान खान (रा.सारडा सर्कल) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. मझहर खान चिकन सेंटर्सला बॉयलर कोंबड्या पुरवण्याचा उद्योग करतात. बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास वडाळानाका भागातील रजा ट्रेंडर्स येथील हबीब शहा मार्केटमध्ये ते कोंबड्या पोहचविण्यासाठी गेले होते. तिथे कोंबड्याचे वितरण करीत असताना त्यांनी कोंबड्यांनी भरलेला टेम्पो (एमएच ०४ सीपी २७४८) रस्त्याच्या कडेला उभा केला होता. टेम्पोजवळ कोणी नसल्याची संधी साधत मोपेडवर आलेल्या भामट्यांनी चार हजार रुपये किंमतीच्या ४४ कोंबड्या चोरी करीत पोबारा केला. मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images