Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

धुळ्यात परतताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

पाकिस्तानच्या तावडीतून सहिसलामत सुटलेला '३६ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण याने आपल्या धुळ्यातील बोरविहीर या गावी आज तब्बल नऊ महिन्यांनी परतला. बोरविहीर गावच्या भूमीत पाऊल ठेवताच चंदूच्या भावनांचा बांध फुटला आणि चंदूला अश्रू अनावर झाले. चंदूला पाहताच चंदूच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या महिलांचे डोळेही पाणावले. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे देखील चंदूसोबत होते.

धुळ्यात पोहोचताच चंदूचे जंगी स्वागत करण्यात आले. मात्र धुळ्यात पोहोचल्यानंतर सर्वप्रथम चंदूने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर तो बोरविहीर या आपल्या मूळ गावी रवाना झाला. बोरविहीर गावात पोहोचताच चंदूला आपल्या दिवंगत आजीची आठवण झाली. चंदूला पाकिस्तानने ताब्यात ठेवल्याचे कळताच चंदूच्या आजीचे धक्क्याने निधन झाले होते. जो पर्यंत चंदू परतत नाही, तो पर्यंत आजीच्या अस्थींचे विसर्जन करणार नाही असे चंदूच्या भावाने म्हटले होते.

सर्जिकल स्ट्राइकनंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी चंदू नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा देशसेवेसाठी राहीन तत्पर

$
0
0

पाकिस्तानातून सुखरूप परतलेल्या चंदूचा विश्वास; बोरविहीर ग्रामस्थांचा जल्लोष

म. टा. वृत्तसेवा, धुळे

‘माझी पाकिस्तानातून सुटका करण्यासाठी देशातील सैन्य दलासह, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे मोठे योगदान आहे. मात्र मी देशाच्या रक्षणासाठी पुन्हा तयार आहे. लवकरच सैन्याच्या सेवेत हजर होऊन पुन्हा देशसेवेसाठी तत्पर राहील’, अशी प्रतिक्रिया चंदू चव्हाण यांनी धुळे तालुक्यातील बोरविहीर गावी त्याच्या घरी परतल्यानंतर दिली.

पाकिस्तानातून सुखरूप सुटका झालेला भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण याचे शनिवारी (दि. ११) दुपारी साडेबारा वाजता धुळे शहरातील मालेगाव रोडनजीक शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आगमन झाले. त्याच्यासोबत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे होते. डॉ. भामरे यांनी जवान चंदू चव्हाणची सुटका करून नातेवाईकांसह जिल्हावासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली. चंदू गावी येणार म्हणून गावातील तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिकांनी बोरविहीर गावाच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली होती. गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन चंदूला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी चंदूच्या गावी येथे डॉ. भामरे व चंदूचे औक्षण करण्यासाठी महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवान चंदू हा धुळे शहरात दाखल झल्यानंतर त्याठिकाणी भाजपचे महानगराध्यक्ष अनुप अग्रवाल, हिरामण गवळी, गोपाळ केले, अरविंद जाधव, संजय बोरसे आणि धुळे शहरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे स्वागत केले.

आपण चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांना दिलेला शब्द पाळला असून, त्याची पाकिस्तानच्या ताब्यातून सुखरूप सुटका करून घरी परत आणण्यात यश मिळवले आहे.

डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळेः रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । धुळे

दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धिंगाणा घातल्याचा प्रकार धुळ्यात घडला आहे. त्यांच्या मारहाणीत डॉक्टर रोहन मामूनकर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यानं, त्या फूटेजच्या आधारे पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.

शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा २० वर्षांचा तरुण दुचाकी अपघातात जखमी झाला होता. त्याला धुळ्यातील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. पण तो वाचू शकला नाही. त्यामुळे त्याचे कुटुंबीय बिथरले आणि त्यांनी या मृत्यूचं खापर डॉक्टरांवर फोडत हॉस्पिटलमध्ये धुडगूस घातला. ऑपरेशन थिएटरमध्ये तोडफोड करत त्यांनी डॉक्टरांनाही धक्काबुक्की केली. त्यात डॉ. रोहन मामूनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.


या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन डॉक्टरांनी मारहाण करणाऱ्यांना अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, दहशत निर्माण करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे तसेच डॉक्टरांवरील हल्ला प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पोलिसांनी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी नऊ जणांची रवानगी १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.


मारहाणीच्या घटनेनंतर स्थानिक डॉक्टरांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त केला आहे. या मारहाणीचे पडसाद राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये उमटू लागलेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरला अमानुष मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला म्हणूनसंतप्त झालेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टर रोहन मामुनकर यांना अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या नातेवाईकांनी रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याची मोडतोडही केली असून, याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यातील एका संशयित आरोपीने मंगळवारी पोलिस कोठडीतच आत्महत्या केल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.

चैत्राम उर्फ राजू शिवाजी लष्कर (वय २१, रा. चक्करबर्डी परिसर धुळे) हा तरुण रविवारी मोटारसायकलवरून जात असताना, मोटारसायकल घसरून गंभीर जखमी झाला. होता. त्यावेळी त्याला तत्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सिटीस्कॅननंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला न्युरोतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. मात्र, जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याने जखमी तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यादरम्यान राजू लष्कर याचा मृत्यू झाला.

जिल्हा रुग्णालयात न्युरोतज्ज्ञ नसल्याच्या रागातून राजूच्या नातेवाईकांनी निवासी डॉ. रोहन मामुनकर यांना बेदम मारहाण केली. तसेच रुग्णालयातील पलंग, खुर्च्यांसह इतर साहित्याचीही तोडफोड केली.

संशयित आरोपीची कोठडीत आत्महत्या

डॉक्टरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्यांपैकी प्रदीप वेताळ याने मंगळवारी, शहर पोलिस ठाण्यातील कोठडीतील शौचालयाच्या खिडकीला चादर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे प्रदीपचे संतप्त नातेवाईक व इतरांनीही शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडार समाजाचे प्रशासनाला निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात रविवारी (दि. १२) निवासी डॉक्टर रोहन म्हामूनकर यांना झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाला संशयित आरोपीच्या आत्महत्येने नवीन वळण मिळाले आहे. पोलिस ठाण्यातच आत्महत्या केलेला संशयित प्रदीप वेताळ आणि चैत्राम शिवाजी लष्कर या दोघांच्या मृत्यूने वडार समाज संप्तत झाला आहे. या दोन्ही घटनांना डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत बुधवारी (दि. १५) वडार समाजाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

शहरातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील सर्वोपचार रुग्णालयातील अपघात विभागात रविवारी, रात्री निवासी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. रोहन म्हामूनकर यांना जमावाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात वडार समाजातील २५ जणांवर गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली होती. अटक केलेल्यांपैकी प्रदीप सदाशिव वेताळ या तरुणाने मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात पोलिस कोठडीत आत्महत्या केली. या घटनेनंतर मृत प्रदीपच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात आंदोलन केले. दरम्यान, पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या सर्व घडामोडीनंतर वडार समाजातर्फे बुधवारी (दि. १५) सकाळी दोन्ही तरुणांच्या मृत्यूला डॉ. रोहन म्हामूनकर हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात, डॉ. म्हामूनकर हे सर्वोपचार रुग्णालयात कामावर कार्यरत असताना, दारूच्या नशेत होते. त्यांनी उपचार करण्यास नकार दिला होता. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे तरुणावर उपचार न झाल्याने संप्तत झालेल्या नातेवाईकांनी डॉ. म्हामूनकर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, हा सर्व प्रकार झाल्यानंतर प्रदीप वेताळसह सर्वांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. प्रदीप हा सुशिक्षित तरुण होता. परंतु, पोलिसांनी त्याला अटक केल्याने तो घाबरला आणि निराश होऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोपही वडार समाजाने केला आहे. या प्रकरणात डॉ. म्हामूनकर दोषी असून त्यांच्यावर ३०४ व ३०२ नुसार गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

कोट

पोलिस कोठडीत आत्महत्या केलेल्या प्रदीप वेताळ या तरुणाचे बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले आहे. प्रथमदर्शनी या अहवालानुसार गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करकण्यात आली आहे.

- दिवाणसिंग वसावे, पोलिस निरीक्षक, शहर पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात डॉक्टरांचा मूकमोर्चा

$
0
0

जिल्हा प्रशासनाला दिले मागण्यांचे निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे


धुळे शहरासह जिल्ह्यातील डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तत्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सुरक्षारक्षक आणि विशेष बंदोबस्त कायमस्वरुपी तैनात करावा, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशने बुधवारी शहरातून मूकमोर्चा काढला. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात डॉक्टरांवरील हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना कराव्या, या घटनेत विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्यावर झालेली कारवाई रद्द करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा रुग्णालयाच्या तातडीच्या सेवा मूकमोर्चाच्या काळात सुरू होत्या, तर उर्वरित सुविधा बंद ठेवून पुन्हा सुरू करण्यात आल्या. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने ठोस उपाय योजना कराव्या, वैद्यकीय महाविद्यालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी, या घटनेत महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी ज्यांच्यावर कारवाई झाली ती रद्द करण्यात यावी, यासारख्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

यावेळी ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, ‘महाराष्ट्र आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, डॉ. पार्थिव संघवी, डॉ. मंगेश पाटे, डॉ. निसार शेख, डॉ. विजया माळी, डॉ. सविता नाईक, डॉ. गिरीश मोदी यांच्यासह सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोस्टमनचे धरणे आंदोलन

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस येथील डाक कर्मचारी व पोस्टमन यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी आखिल भारतीय डाक कर्मचारी पोस्टमन संघटना वर्ग-४ आणि ऑल इंडिया पोस्टल एम्प्लाईज युनियन पोस्टमन व ग्रूप-डी आणि आखिल भारतीय डाक कर्मचारी संघटना वर्ग-३ यांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन मुख्य पोस्ट ऑफिसबाहेर करण्यात आले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानुसार, आऊट सोर्सींग पोस्टल एजंट योजना करा करण्यात यावी, पोस्टमन व एमटीएसच्या जागा त्वरित भरण्यात याव्यात, नोडल वितरण व्यवस्थेबाबत संघटेशी चर्चा करून बदल करावा, नवीन भरती होईपर्यत रोजंदारी कर्मचारी लावण्यावरील निर्बंध उठविण्यात यावे, रविवार व सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलविणे थांबविण्यात यावे, कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळोवेळी बैठका घेवून त्यातील निर्णयाची अंमलबजावणी करावी.

यासह विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेचे आर.ए. पाटील, डी.एल. पाटील, डी.ए. सैंदाणे. पी.के. जोशी. ए.बी. बागूल, एस.आर. पाटील यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मचारी संघटनेचे भजन आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेने लेखणी बंद आंदोलनाच्या सहाव्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयासमोर भजन म्हणून आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त केला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प झाले आहे.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक दिली जात आहे. समान न्याय व संधी या मागणीसह विविध मागण्यासाठी दि. १५ मार्चपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाचा सोमवारी (दि. २०) सहावा दिवस होता. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन पुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. सी. राजपूत यांनी सांगितिले. यावेळी सी. जी. देवरे, नंदकिशोर चौधरी, सुशील सोनवणे, विरेंद्र सावळे, डी. एम. पाटील, प्रकाश बोरसे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था वाढविणार

$
0
0

पोलिस अधीक्षकांची वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील डॉ. रोहन म्हामूनकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तेथील सुरक्षा व्यवस्थेचा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी मंगळवारी (दि. २१) पोलिस अधिकाऱ्यांसह आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करून त्याबाबत काय उपाययोजना करता येतील याबाबतही महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणीही वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक चैतन्या एस. उपपोलिस अधीक्षक हिंमत जाधव, पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्यासह अन्य जणांनी मंगळवारी (दि. २१) महाविद्यालयाची पाहणी केली. या पाहणीनंतर सविस्तर चर्चा करून वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्याचे आश्वासन पोलिस विभागाकडून वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहे. तर खासगी सुरक्षारक्षकांचीदेखील नेमणूक करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रकरणातील अपघातात जखमी झालेल्या राजू लष्कर नावाच्या युवकावर उपचार करण्याच्या वादातून जमावाने निवासी डॉक्टर रोहन म्हमूनकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यांना झालेल्या बेदम मारहाणीच्या प्रकरानंतर राज्यातील सर्व डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. या मारहाणीच्या विरोधात मोर्चे काढून त्याचा निषेधही व्यक्त केला होता.

डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा

पोलिस अधिक्षक चैतन्या. एस यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व कर्मचारी आणि डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी रुग्णांकडून होणाऱ्या त्रासाबाबत आपल्या भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडल्या. तसेच यावेळी संपूर्ण महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. डॉक्टरांवर होणारे हल्ले कसे रोखता येतील यावर तात्काळ सुरक्षाव्यवथा आणि इतर गोष्टीची माहिती मिळवून बंदोबस्त करण्यात येतील असेही पोलिस अधिक्षकांनी कर्मचाऱ्यांना सांगितले. रुग्णालयातील कोणत्याही कर्मचाऱ्याने उपचार करणाऱ्या डॉक्टराशी वाद घालू नये. रुग्णाला कोणतीही तक्रार करावयाची असल्यास अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांच्याकडे करावी, असे पोलिस अधीक्षकांनी रुग्णाशी भेटीदरम्यान त्यांच्या नातेवाईकांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोर शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी अटकेत

$
0
0

धुळ्यातील घटना; दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिक्षण संस्थामध्ये नियुक्या करताना नियमांचा भंग केल्याप्रकरणी तक्रारदाराला गुन्ह्यात आरोपी करू नये, यासाठी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी साडेतीन लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी तक्रारदाराकडून दोन लाख ३० हजार रुपयांची लाच घेताना धुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना मंगळवारी नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक, मान्यता व संबंधितांच्या आस्थापनांचे काम गेल्या तीन वर्षांपासून संबंधित तक्रारदाराकडे आहे. सन २००७ ते २०११ या कालावधीत शैक्षणिक संस्थांमध्ये कायम आरक्षित, खुल्या व इतर पदांवर नियुक्त्या करताना, संबंधित तक्रारदाराने नियमांचा भंग केला होता. याप्रकरणी चौकशी करून उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी २४ फेब्रुवारीला तक्रारदाराविरुद्ध धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराचे आरोपी म्हणून नाव न टाकण्यासाठी शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांनी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती दोन लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार मंगळवारी दोन्ही अधिकाऱ्यांना लाच घेताना नंदुरबार जिल्हा लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांचा काढता पाय

शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील आणि उपशिक्षणाधिकारी किशोर पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेतला. त्यानंतर काही वेळाने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात शिक्षकांनी गर्दी केली होती. अजून काही लाच घेणारे कर्मचारी व अधिकारी या कार्यालयात आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी चर्चा दबक्या आवाजात शिक्षकांमध्ये सुरू होती.

चांगला अधिकारी हवा

धुळ्यात आतापर्यंत कारवाई झालेले प्रवीण पाटील हे सातवे माध्यमिक शिक्षणाधिकारी आहेत. यापूर्वी जे. के. ठाकूर, जी. के. पाडवी, भगवान सूर्यवंशी, जी. एन. पाटील, डी. एल. साळुंखे आणि परचुरे अशा सहा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर कोणत्या ना कोणत्या कारणाने निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यामुळे आता तरी शिक्षण विभागात प्रामाणिक अधिकारी येणे गरजेचे आहे, अशी मागणी शिक्षकांनी ‘मटा’शी बोलताना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेळाव्याने दिली रोजगारसंधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, नाशिक यांच्या विद्यमाने मंगळवारी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या रोजगार मेळाव्यास शहरातील बेरोजगार तरुणांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी अडीच हजार उमेदवारांनी विविध कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या.

अधिकाधिक बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी मिळाव्यात असा या रोजगार मेळावा आयोजनामागील उद्देश आहे. मंगळवारी झालेल्या मेळाव्यात तब्बल अडीच हजार तरुण तरुणींनी हजेरी लावली. यावेळी ४० कंपन्यांमध्ये ६६६ तरुणांना नियुक्तीपत्रके देण्यात आली. मेळावा बुधवारीही (दि. २२) सुरू राहणार असून त्यात बाराशे तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे. मेळावा महात्मा फुले कलादालन येथे सकाळी ९ वाजता सुरू होऊन सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहणार आहे. मंगळवारी झालेल्या मेळाव्याला महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्णा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, उपमहापौर प्रथमेश गिते, कौशल्य व रोजगार विभागाचे उपसंचालक अ. भि. पवार यांची प्रमुख उपस्थितीत होती. मेळाव्यात उमेदवारांना पात्रतेनुसार प्रत्यक्ष चाचणी व मुलाखतीद्वारे नोकरीची संधी प्राप्त होणार आहे. त्या अनुषंगाने अधिकाधिक पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह - सेवायोजन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बायोडाटा, फोटोसह (पाच प्रती) सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. ज्या उमेदवारांच्या जॉबचे नाव लिस्टमध्ये नसतील अशा उमेदवारांनी संपर्क साधला तरीही चालणार आहे. गरज भासल्यास त्याही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, असे महापालिकेने कळविले आहे.

या नोकरीच्या संधी

मेळाव्यात सर्व प्रकारचे जॉब उपलब्ध आहेत. यात लाइफ प्लॅनिंग ऑफिसर, आरएमओ, संगणक ऑपरेटर, सीएनसी ऑपरेटर न्यू प्रॉडक्ट डिझायनर, रिटेल कॅशियर, मॅकेनिक इलेक्ट्रीशियन, बी. टेक, बॉयलर अटेंडट, केमिकल इंजिनीअर, स्टोअर मॅनेजर, मॅकेनिकल ड्राफ्ट्समन, मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह, फार्मसिस्ट, फिटर, टर्नर व अशा अनेक प्रकारचे टेक्निकल व नॉन टेक्निकल पदे भरली जाणार आहेत.

या कंपन्यांचा सहभाग

पीआयजीओ (बारामती), डब्ल्यूएनएस, महिन्द्रा सोना, सुला वाईन यार्डस, इपीसी इंडस्ट्रीज, कन्ट्री क्लब, श्री गुरुजी रुग्णालय, नेटवीन सिस्टीम, ऋषभ मोटार्स, मयूर अलंकार, सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल (सर्व नाशिक), व्हीआयपी इंडस्ट्रीज, राईड फाईट फास्टनर्स, शान कार्स (सातपूर), जनरल मील्स, जिंदाल सॉ मिल (सिन्नर), सुदल इंडस्ट्रीज (अंबड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान!

$
0
0

नाशिक : इ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० या काळात नाशिक सातवाहन राजांच्या ताब्यात होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोदाकाठावरील गोवर्धन येथे व्यापाऱ्यांचे संघ होते.

मात्र, सातवाहन गोदावरीकडे कसे पाहत होते, याबाबतच्या काहीच खाणाखुणा मिळत नसल्याने संशोधकांना आश्चर्य वाटत होते. सातवाहनकालीन ‘श्री गोदावरी’ (सीरी गोला) असा उल्लेख असलेले नाणे व त्या नाण्यातील गोदावरी देवी नदीपात्रात उभी असलेल्या छापाचे सातवाहन नाणे पहिल्यांदाच आढळले आहे. सातवाहन संस्कृतीत गोदावरी नदीला देवतेचे स्थान दिल्याचे यातून स्पष्ट होते. गोदावरीचा उल्लेख असलेले हे एकमेव नाणे आहे.

भारतात सुमारे चारशे वर्षे राज्य करणारे घराणे म्हणून सातवाहन राजे ओळखले जातात. विशेष म्हणजे महाराष्ट्राचा किंवा दक्षिणेचा राजकीय इतिहास सातवाहन घराण्याशिवाय पूर्ण होत नाही. दक्षिणपथावरून मौर्यांचे आधिपत्य नाहीसे झाल्यावर सातवाहनांनी पूर्व-पश्चिम समुद्रांमधील प्रदेशावर राज्य प्रस्तापित केले. शिवसातकर्णीच्या काळात परदेशी क्षत्रपांनी आक्रमण करून महाराष्ट्रावर ताबा मिळवला. यानंतर सतरा वर्षांनी गौतमीपुत्र सातकर्णीने क्षत्रपांशी नाशिक येथे सुमारे इ. स. ७८ मध्ये युद्ध करून विजय मिळवित महाराष्ट्र स्वतंत्र केला. सातवाहनकाळ हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ समजला जातो. सातवाहनकाळाने महाराष्ट्राला नवीन ओळखही दिली. तसेच लेणी, शेती, बँकिंग व्यवस्था, युरोपापर्यंतच्या व्यापारामुळे समृद्धी दिली. या शौर्याचे प्रतीक असलेल्या राजांनी आपापल्या काळात पाडलेल्या नाण्यांवर राजाची प्रतिमा व लेणींवरील विविध चिन्हांचा वापर केल्याचे दिसते. मात्र, गोदावरी तटावर बहरलेल्या सातवाहन संस्कृतीच्या दृष्टीने गोदावरीचे महत्त्व आतापर्यंत कधीही अधोरेखित झाले नव्हते. ते नाशिकमधील नाणे अभ्यास चेतन राजापूरकर यांना गोदावरीपात्रातून मिळालेल्या गोदावरी देवतेच्या पोटिन धातूच्या नाण्यामुळे आता अधोरेखित होईल. सातवाहन गोदावरीला देवतेच्या स्थानी मानत होते, हे या नाण्यावरून स्पष्ट होते. या नाण्यांवर ब्राह्मी लिपित ‘सीरी गोला’ म्हणजेच श्री गोदावरी असा उल्लेख असून, नदीपात्रात उभ्या असलेल्या देवतेची प्रतिमा आहे. तर मागील बाजूस सातवाहन नाण्यांवर आढळणारे कुंडीतील वृक्ष हे चिन्ह आहे, असे नाणे अभ्यासक व संग्राहक चेतन राजापूरकर सांगतात.

राजापूरकर म्हणाले, ‘हे नाणे कोणत्या सातवाहन राजाच्या काळात आले अथवा याचा कार्यकाळ कोणता हे शोधणे संशोधकांसमोर नवे आवाहन असणार आहे.’

इतर नाण्यांवरील नदी देवता

गोदावरीला दक्षिण गंगा, वृद्ध गंगा, जैन साहित्यात गोदा, गोयावी, सप्त गोदावरी असे म्हटले जाते. तर गाथा सप्तशतीमध्ये गोदावरी, गोदा-आ-अरी, गोला, गोलाई असेही संबोधले जाते. गोदावरी मुळात गोला या नावाने ओळखली जाते. तिचे दुसरे नाव पार्वती आहे. ही नावे आर्य प्रभावदर्शक आहेत. गोदावरीचे गोदा हे नाव द्रविडियन शब्दापासून आले आहे. ‘सीरी’ म्हणजे श्री व ‘गोला’ म्हणजे गोदावरी नदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानासाठी चिन्हवाटप

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील उमेदवारांना मंगळवारी चिन्हवाटप करण्यात आले. उमेदवारांकडून अर्ज मागवून त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना चिन्हे देण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे यांनी दिली.

सावाना निवडणुकीसाठी ग्रंथमित्र, जनस्थान आणि परिवर्तन हे तीन पॅनल करण्यात आले आहेत. यातील ग्रंथमित्र पॅनलला ‘फळा’, जनस्थानला ‘कॅमेरा’ तर परिवर्तन पॅनलला ‘पाटी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. वैयक्तिक निवडणूक लढविणाऱ्यांपैकी रमेश जुन्नरे यांना ‘कपबशी’ हे चिन्ह देण्यात आले आहे. कांतीलाल कोठारी यांना ‘ब्र‌िफकेस’, पद्माकर इंगळे यांना ‘चहाची किटली’, शरद दाते यांना ‘कपाट’ तर संजय येवलेकर यांना ‘गॅस सिलिंडर’ असे चिन्हवाटप करण्यात आले आहे.
मिलिंद जहागिरदार यांनी धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली असून, त्याचा निकाल मंगळवारी लागणे अपेक्षित होते. मात्र, धर्मादाय आयुक्तांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधव भणगे व सावानाचे अध्यक्ष प्रा. औरंगाबादकर यांना मंगळवारी सुनावणीसाठी हजर राहण्याची सूचना केली होती. पैकी भणगे यांनी निवडणुकीचे चिन्हवाटप असल्याचा अर्ज आयुक्तांकडे केला होता व सावानाकडून अधिकारी व्यक्तीचा जबाब नोंदवून घेण्यासाठी बुधवारची मुदत धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार वर्षांत ६१ कोटी पाण्यात

$
0
0

निधी वितरणाचे धोरण सरकारने बदलले

नाशिक : पाणीटंचाईच्या तीव्र झळा काहीशा सुसह्य करता याव्यात यासाठी विविध आठ योजनांवर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत तब्बल ६१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा निधी टंचाई निवारणासाठीच कामी आला असला तरी या निधीच्या विनियोगाला शिस्त लावण्याचे धोरण सरकारने अवलंबिले आहे. यंदा पारंपरिक आराखड्यानुसार निधी न देता प्रत्यक्ष खर्चानुसार निधी वितरीत करण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे टंचाई निवारणावर पाण्यासारखा पैसा ओतण्याच्या पध्दतीला बांध घातला गेला आहे.

नाशिक जिल्ह्याच्या उशाला २३ धरणे असली तरी, येथील शेती ही पर्जन्यमानावरच अवलंबून आहे. गतवर्ष सोडले, तर त्यापूर्वीची तीन वर्षे अवकाळी पाऊस, गारपीट आणि पावसाने फिरविलेली पाठ यामुळे जिल्हावासी दुष्काळात होरपळून निघाले. ही परिस्थिती हाताळण्याचे जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान होते. गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, खासगी विहिरी गावकऱ्यांसाठी अधिग्रहित करणे, तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, नळयोजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहीर घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी उपायोजनांवर कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. सन २०१३-१४ ते २०१६-१७ या चार वर्षांत टंचाई कालावधीत घ्यावयाच्या आठ योजनांवर तब्बल ६१ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च झाला. २०१५-१६ मध्ये १९ कोटींहून अधिक निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १३ कोटी ८३ लाखांचा निधी चालू वर्षात वापरण्यात आला. विशेष म्हणजे टंचाई निवारणासाठी आठ योजना असल्या तरी सर्वाधिक खर्च टँकरद्वारे पाणीपुरवठा, विहिरींचे अधिग्रहण आणि तात्पुरत्या नळ योजनांवरच होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आता प्रत्यक्ष खर्चानुसार मागणी

टंचाई निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या आठ उपाययोजनांवर पूर्वीपासून आराखड्यानुसार निधीची मागणी केली जात असे. परंतु, या पध्दतीत अनेक त्रूटी असल्याने त्यात बदल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेला वितरीत केलेल्या निधीपैकी किती निधी कोठे वापरला गेला याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र वारंवार मागणी करूनही जिल्हा प्रशासनाला प्राप्त होत नव्हते. असा कोट्यवधींचा निधी पडून राहात असल्याने आता प्रत्यक्ष खर्चानुसार निधी पुरविण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. त्यामुळे निधी पडून राहण्याऐवजी तो सरकारला अन्य योजनांसाठी वापरणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा रिक्षांची लपाछपी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) संयुक्तपणे राबविलेल्या मोहिमेतंर्गत परवाना नसलेल्या ३६० रिक्षा जप्त करण्यात आल्या. ही कारवाई प्रभावीपणे सुरू असल्याने बेकायदा रिक्षाचालकांचे धाबे दणाणले असून, शहरातील रिक्षा चालकांनी काही दिवसांपुरता व्यवसायच बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते.

वाहतूक पोलिस आणि आरटीओने एकत्रित १६ मार्चपासून मोहिमेस सुरुवात केली. रिक्षा आणि बेशिस्त वाहनचालकांना रडारवर घेण्यात आले आहेत. आतापर्यंत परवाना नसलेल्या तब्बल ३६० रिक्षा जप्त करण्यात आल्या. कागदपत्रे नसणे तसेच मोटारवाहन कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३५८ रिक्षाचालकांकडून ९३ हजार ७०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. याशिवाय, वाहन परवाना नसणे तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे नसलेल्या १९ रिक्षाचालकांविरोधात मोटार वाहन कोर्टात खटले दाखल करण्यात येणार आहे.

शहरात अधिकृत आणि अनधिकृत रिक्षांची संख्या २५ हजारांवर आहे. हा फरक लक्षात यावा, यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या रिक्षांना एक विशिष्ट स्टिकर लावण्यात येते आहे. एकदा स्टिकर लावले, की त्या रिक्षाचालकाची कागदपत्रे सहसा पुन्हा तपासली जाणार नाहीत. उर्वरित रिक्षाचालकांची मात्र सातत्याने तपासणी केली जाईल. ज्या रिक्षाचालकांकडे परवाना, फिटनेस, लायसन असेल अशा रिक्षाचालकांना शहर वाहतूक शाखेतर्फे स्टिकर देण्यात आले आहे. आतापर्यंत ८८८ रिक्षांना स्टिकर लावण्यात आले. रिक्षाचालक स्वतः पुढे येत असून, या कारवाईबाबत प्रामाणिक व सर्व बाबींची पूर्तता असलेल्या रिक्षाचालकांकडून समाधान व्यक्त होते आहे. ज्या रिक्षाचालकांकडे सर्व कागदपत्रे आहेत त्यांनी स्वतः वाहतूक शाखेत येऊन कागदपत्रांची तपासणी करून घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोहीम सुरू झाल्याने अनेक बेकायदा व्यावसायिक परागंदा झाले. प्रामाणिक रिक्षाचालकांनी या कारवाईचे कौतुक होत आहे. टॅक्स भरणाऱ्या या रिक्षाचालकांना बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांपासून संरक्षण मिळालेच पाहिजे.
- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा प्रशासनाकडून ८९ टक्के महसूल वसुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर थंडावलेल्या महसूल वसुली मोहिमेने जोर पकडला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८९ टक्के महसूल वसुली पूर्ण झाली असून महिनाभरात ३४ टक्के वसुली करण्यात आली आहे.

स्थानिक निवडणुकांमध्ये जिल्हा प्रशासन अडकून पडले होते. त्याचा परिणाम महसूल वसुलीच्या कामकाजावरही झाला होता. फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केवळ ५५ टक्के महसूल वसुली झाली. दीड महिन्यात उर्वरित ४५ टक्के वसुली करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे होते. गेल्या सव्वा महिन्यात तब्बल ३४ टक्के वसुली करण्यात आली आहे. शिक्षण कर आणि रोजगार हमी योजना करांपोटी ३१ कोटींपैकी १५ कोटी ७७ लाखांची वसुली करण्यात आली आहे. वाळू घाटांचे लिलाव, गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांकडून दंड, करमणूक कर, जमीन नजराणा तसेच विविध करांच्या माध्यमातून सुमारे १८४ कोटी म्हणजेच ८९ टक्के महसूल वसुली झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीचे गणित बिघडले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत निर्णयाक बहुमत मिळवणाऱ्या भाजपला स्थायी समितीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यासाठी आता झगडावे लागणार आहे. महापालिकेत निवडून आलेल्या तीन अपक्षांसह आरपीआयच्या सदस्यानी भाजपचे स्थायीतील बहुमताचे गणित बिघडवले.

अपक्ष गुरूमीत बग्गा यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर काँग्रेसच्या विमल पाटील यांनी काँग्रेससोबत घरोबा केला आहे. तर मनसे आणि आरपीआयच्या सदस्याने शिवसेनेसोबत मोट बाधंली आहे. त्यामुळे संख्याबळ आणि पूर्णांकानुसार भाजपचे आठ, शिवसेना पाच, राष्ट्रवादी, काँग्रेस व मनसेचा प्रत्येकी एक सदस्य स्थायीत जाणार आहे. त्यामुळे भाजपचे स्थायीच्या अध्यक्षपदाचे स्वप्न भंगू शकते.

महापालिकेत १२२ पैकी ६६ जागा मिळाल्याने भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. परंतु, नेत्यांच्या गाफिलपणामुळे स्थायीची सत्ता मिळवण्यासाठी आता मोठी कसरत करावी लागणार आहे. महापालिकेत भाजप ६६, शिवसेना ३५, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी सहा, मनसेचे पाच, अपक्ष तीन आणि आरपीआयचा एक सदस्य निवडून आला आहे. या संख्याबळानुसार स्थायीवर भाजपचे नऊ, शिवसेनेचे पाच तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य जाणार होता. त्यामुळे १६ सदस्यांच्या स्थायीतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार होते. परंतु राजकारणात माहीर असलेल्या अपक्षांनी मात्र विरोधकांशी हातमिळवणी करत भाजपचे गणित बिघडवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोरीला लागेना ब्रेक!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वाहनांच्या चोरीचे सत्र सुरुच असून, त्यात एका कारसह तीन दुचाकींची भर पडली आहे.

जयभवानीरोड परिसरातील गुरुमित सिंग दिपीवाल हे १५ फेब्रुवारी रोजी लहवित येथे गेले होते. भाजी मार्केट परिसरात लावलेली त्यांची सुमारे चार लाख रुपये किमतीची कार (एमएच १५ ईएक्स १२६४) चोरट्यांनी पळवून नेली. देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखानगर येथील शंकर कोंडाजी भोर हे आठ फेब्रुवारी रोजी शरणपूररोड येथील पंजाब नॅशनल बँकेत गेले असता, त्यांनी सुयोजित हाइट्स इमारतीत त्यांची दुचाकी (एमएच १४ एफएच ४९७९) पार्क केली. मात्र, चोरट्यांनी काही मिनिटांतच दुचाकीवर हातसाफ केला. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरवायके कॉलेजच्या पार्किंगमधून १० मार्च रोजी हिरावाडी परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री लोया या विद्यार्थिनीची मोपेड (एमएच १५ डीवाय १०८०) चोरट्यांनी लांबवली. दुचाकीच्या डिक्कीत पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल होता.

महिलेचा विनयभंग

बिगबाजार मॉलमधील शॉपमध्ये सेल्समनचे काम करणाऱ्या २६ वर्षीय महिलेचा सहकारी तरुणाने विनयभंग केला. याप्रकरणी समीर तांबोळी याच्याविरोधात उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. बोधलेनगर भागात राहणारी महिला मॉलमध्ये सेल्समन म्हणून काम करते. संशयित चार महिन्यांपासून वेळोवेळी अश्लिल भाषेचा वापर करून शिवीगाळ करायचा. याबाबत समज देऊनही १४ मार्च रोजी त्याने पुन्हा शिवीगाळ करीत विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पिंजारघाट परिसरात चोरी

दुचाकीचोरीची तिसरी घटना पिंजारघाट परिसरात घडली. ध्रुवनगर येथील उद्धव रावसाहेब हिंगमिरे २ मार्च रोजी पिंजारघाट येथील धर्मात्मा रुग्णालयात गेले होते. रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची दुचाकी (एमएच १५ सीए ४२४५) चोरट्यांनी हातोहात लांबवली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिणीने चोरी केल्याची तक्रार

भावाच्या घरात राहणाऱ्या बहिणीने घरातील सोन्याच्या नेकलेससह रोकड लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल एक लाख ३५ हजार रुपयांच्या मुद्देमाल चोरीप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टागोरनगर येथील बाबुलाल जेना यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जेना यांच्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण कविता (३१) हिने मंगळवारी (दि. १४ मार्च) घरात कुणी नसल्याची संधी साधत कपाटातील सोन्याचा नेकलेस व रोकड असा सुमारे एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.

रोख रकमेसह १२ जुगारींना अटक

पंचवटी आणि भद्रकाली पोलिसांनी सोमवारी वेगवेगळ्या केलेल्या दोन कारवाईत १२ संशयित पकडले. रोकडसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरीरोडवरील महालक्ष्मी बाजार परिसरात पंचवटी पोलिसांनी सायंकाळच्या सुमारास छापा टाकला. तेव्हा पप्पू धर्मा कांबळे व त्याचे दोन साथीदार मटका जुगार खेळताना सापडले. त्यांच्या ताब्यातून एक हजार २५० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. दुसरी कारवाई मोठा राजवाडा भागात झाली. भद्रकाली पोलिसांनी आशिफ सय्यद नासर याच्यासह आठ जुगारींना जेरबंद केले.

कारचालकास जामीन

पंचवटी : भरधाव वेगाने आलेल्या अल्टो कारच्या धडकेने सोमवारी बारावीत शिकणारा मनोज सुभाष बाविस्कर हा विद्यार्थी ठार झाला. या प्रकरणी कारचालक राजश्री राहुल महाजन यांच्या विरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यांना न्यायालयात जामीन मंजूर झाला.

दोन बालकांचे अपहरण

मैदानात खेळणारे दोघे मुले बेपत्ता झाल्याची घटना वडाळागावातील आढाव हॉटेल समोर घडली. बालकांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इंदिरानगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. खान तन्वीर अहमद तौहिद (१०) व शेख सोहेल फिरोज (१२, रा. दोघे गणेशनगर, वडाळागाव) अशी बेपत्ता बालकांची नावे आहेत. रविवारी (दि. १९ मार्च) सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते बेपत्ता झाले.

किराणा दुकान फोडले

किराणा दुकान फोडून चोरट्यांनी कॉस्मेटिक तसेच इतर साहित्याची चोरी केल्याची घटना अमृतधाम परिसरात घडली. आडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल रमेश वाकलकर यांचे विडी कामगार नगर येथे साईमाता नावाचे किराणा दुकान आहे. शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून दुकानातील रोख रक्कम, किराणा माल आणि कॉस्मेटिक वस्तू असा सुमारे आठ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलमध्ये तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उपचार सुरू असताना २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर वडाळा नाका येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत नातेवाइकांची समजूत घातली. हॉस्पिटलच्या दुर्लक्षामुळे पेशंटचा मृत्यू झाला. मोबादल्यात नातेवाईकांकडून भरपाईची मागणी करण्यात आली.

हेमलता निरंजन क्षीरसागर (महालक्ष्मी मंदिराजवळ, जेलरोड) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेच नाव आहे. नाशिकरोड येथील सह्याद्री हॉस्पिटलमधून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिला वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. यानंतर दीडशे-दोनशे नातेवाईक गोळा झाले. उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाल्यानेच हेमलताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. नुकसान भरपाई मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घटना समजताच सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ, मुंबई नाका तसेच नाशिकरोड पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी नातेवाईकांची समजूत काढली. दरम्यान, हॉस्पिटलने सर्व आरोप फेटाळून लावत पेशंटची तब्बेत गंभीर होती, असा दावा केला. हेमलताचा २०१५ मध्येच विवाह झाला होता. तसेच या दाम्पत्याला एका वर्षाचा मुलगा असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल कंपन्यांना दिलासा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालमत्ता कराची वसुलीसाठी महापालिकेने मोबाइल कंपन्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईला हायकोर्टाच्या आदेशाने पुन्हा सुरूंग लागला आहे. मोबाइल टॉवरचे वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले असल्याने आता महापालिकेच्या कारवाईला खीळ बसली आहे.

जीटीएल व एटीसी कंपन्यांना कारवाई थांबवण्यासाठी काही रक्कम महापालिकेकडे जमा करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे मोबाइल टॉवर्सचा वीज पुरवठा पूर्ववत होणार आहे. तर दुसरीकडे आता हायकोर्टाने टॉवर सील ऐवजी जप्त करा, असे आदेश दिल्याने महापालिका गोंधळात सापडली आहे.

सहा कोटीच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मोबाइल टॉवर सील करण्यास सुरुवात केली होती. त्यात पहिल्या टप्प्यात २७ टॉवर्स सील करत त्यांचे वीज जोडणी तोडले होते. परंतु, त्यामुळे नाशिकमध्ये नेटवर्क कनेक्शन विस्कळीत झाले. या कारवाईच्या विरोधात जीटीएल आणि एटीसी या कंपन्यानी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने मोबाइल कंपन्याची बाजू ऐकून घेत, महापालिकेला संबंधित मोबाइल टॉवर्सचे वीज कनेक्शन तोडू नये, असे आदेश बजावले आहेत. संबंधित कंपन्याकडून वसुलीसाठी टॉवर सील करण्याऐवजी जप्तीची कारवाई करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिका पेचात सापडली आहे. या मोबाइल टॉवर्सचे वीज कनेक्शन पूर्ववत करावे लागणार आहे. सील आणि जप्तीच्या कारवाईत काहीच फरक नसल्याने वसुलीसाठी काय करावे अशा पेचात महापालिका पडली आहे. हायकोर्टाने एकीकडे या कंपन्यांना दिलासा दिला असला तरी दुसरीकडे थकबाकीच्या रकमेपैकी काही रक्कम मात्र महापालिकेकडे तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेलाही काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, मोबाइल कंपन्यांनाही दिलासा मिळाला आहे.

जागामालक कारवाईच्या टप्प्यात

महापालिकेने आता कंपन्यांना दिलासा दिल्यानंतर मोबाइल टॉवर्ससाठी जागा देणाऱ्या जागा मालकांनाच कारवाईच्या रडारवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मोबाइल टॉवर्स कंपन्यांनी मालमत्ता कर भरला नाही त्यांच्या जागामालकांना नोटीस बजावली जाणार आहे. प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याच्या विचारात महापालिका असून त्यामुळे या कंपन्यांवर दबाव येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images