Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

केंद्र सरकार जाणून घेतेय शेतीच्या समस्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजप सरकार शेती आणि शेतकरीविरोधी असल्याचा कलंक पुसण्यासाठी केंद्र सरकार झपाटून कामाला लागले आहे. याचाच एक भाग म्हणून नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद देशाच्या विविध भागांतील शेती, त्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दौरा करीत आहेत. चंद यांनी नाशिकमध्ये येऊन आधुनिक शेतीतंत्राची माहिती घेतली. त्यामुळे नजीकच्या काळात केंद्राकडून कृषीक्षेत्राबाबत ठोस कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे.

शेतीमधील आधुनिक तंत्र व वेगवेगळ्या बदलाचा अभ्यास करून भविष्यात शेतीचे धोरण कसे असावे, यासाठी रविवारी केंद्राच्या नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी नाशिक येथे सह्याद्री फार्म येथे भेट देऊन तेथे आधुनिक शेतीचे प्रयोग बघितले. केंद्रातील भाजप सरकार शेतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत असताना शेतीचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावर देशातील शेतीचे धोरण ठरवण्याचे काम आता सुरू झाले आहे. त्यामुळे शेतीतज्ज्ञ असलेले चंद देशभर भेटी देत असल्याचे बोलले जात आहे.

मोहाडी येथे ६५ एकरावरील सह्याद्री फार्म येथून द्राक्ष थेट अमेरिका आणि जर्मनीच्या सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना भुरळ घालत असल्यामुळे नीती आयोगाचे याकडे लक्ष गेले व त्यांनी नाशिक भेट ठरवली. या भेटीत त्यांनी शेती उद्योगातील अनेक प्रयोग येथे बघितले व त्यानंतर शेतीवर धोरण ठरवताना काय करता येईल, यावरही चर्चा केली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील हा आयोग केंद्र आणि राज्य सरकारांना धोरण आखणीसाठी विचारगट म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे या आयोगाच्या सूचना महत्त्वाच्या व अभ्यास करून असतात.

सह्याद्री फार्म ही कंपनी द्राक्षे निर्यात करणारी सर्वांत मोठी कंपनी आहे. त्यामुळे त्याच्या तंत्राचा येथे अभ्यास करण्यात आला. देशात

शेतीमालाची निर्यात करताना काय नवे नवे प्रयोग करून निर्यात कशी वाढवता येईल, यासाठी देशभर हा मंत्र देण्यासाठी नाशिकचा हा दौरा नीती आयोगाला उपयोगी पडणार आहे.

नीती आयोग धोरण आखणारी शिखर संस्था!

देशाच्या आर्थिक नियोजनासाठी ६५ वर्षे नियोजन आयोग होते; पण केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नीती आयोगाची स्थापना केली. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया असे नाव त्याला दिले. भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था असल्यामुळे तिचे महत्त्व आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या आयोगात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमितभ कांत यांच्याकडे जबाबदारी असून, उपाध्यक्ष अरविंद पंगारिया व पदसिद्ध सदस्य राजनाथसिंह, अरुण जेटली, सुरेश प्रभू, राधामोहन सिंग आहेत. त्याचप्रमाणे विशेष आमंत्रित सदस्यांत नितीन गडकरी, थावरचंद गेहलोत, स्मृती इराणी यांचा समावेश आहे. आयोगात पूर्णवेळ सदस्य म्हणून अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय, तर शेतीतज्ज्ञ म्हणून विजयकुमार सारस्वत, रमेश चंद यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे नियामक परिषदेमध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपालसुद्धा आहेत. त्यामुळे अशा आयोगाचे शेतीतज्ज्ञ सदस्यांची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वायनरी रोडवरील वेगाला हवी वेसण!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिकमधील बरेच तरुण सुट्टीच्या दिवशी फेरफटका मारण्यासाठी गंगापूर धरणावर बॅक वॉटरला जात असतात. त्यातच सावरगाव, गंगावऱ्हे रस्त्यावर वाइनचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पाहुण्यांची वर्दळ असते. या दोन्ही कारणांनी वाढलेल्या वाहनांच्या संख्येने या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रंगपंचमीच्या दिवशी डॉ. प्रण‌िल लोढा हे गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांना प्राण गमवावे लागले आहेत. नुकतीच डॉक्टरकीची पदवी घेतलेल्या डॉ. प्रणिल यांना सुसाट वेगाने बेधुंद होत वाहन चालविणाऱ्यांमुळे प्राण गमवावे लागल्याने दिवसभर राहत्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. वाइनरोडला वेग मर्यादा पोलिस प्रशासनाने निश्चित करावी अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

गंगापूर धरण परिसरात बाराही महिने तरुणाईची मोठी गर्दी होत असते. निर्सगरम्य वातावरणात ग्रुपने अनेकजण याठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येतात. त्यातच गंगापूर बँक वॉटरकडे जाणाऱ्या या रोडला वाइनरोडच म्हटले जाते. देश, विदेशातून वाइनप्रेमी वाइनचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. या रोडवर मद्यधुंद तरुण सुसाट वाहने चालवत असल्याने अनेकदा अपघात होतात.

रंगपंचमीच्या दिवशी डॉ. प्रणिल आपल्या मित्रासमवेत दुचाकीने फार्म हाऊसवर जात असताना भरगाव वेगाने येणाऱ्या फिएटा कारने समोरून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाले होते. गंगावऱ्हे गावाकडे जाताना कॅनॉलच्या वळणावर डॉ. प्रणिल यांना चारचाकीने उडविले. डॉ. प्रणिल व त्यांच्या मित्राला गंगापूर ग्रामस्थांनी तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखलही केले. परंतु, उपचार सुरू असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. हुशार असलेल्या व नुकतीच डॉक्टरची पदवी मिळविलेल्या डॉ. प्रणिल यांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे गंगापूर गाव, गंगावऱ्हे ते सावरगाव रोडला पोलिसांनी वेगमर्यादा ठेवावी, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. अपघाताचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालेराव करत आहेत.

अतिउत्साह घेतो जीव

उन्हाळ्याच्या दिवसात गंगापूर धरणातील पाणीसाठी कमी होत असतो. यामुळे साहज‌िकच उन्हाळ्याच्या दिवसात गरमीपासून सुटका मिळविण्यासाठी अनेकजण धरणाच्या बॅक वॉटरला येत असतात. पाणीसाठा कमी झाल्याने अनेक ठिकाणी पर्यटकांना पाण्याचा अंदाज बांधता येत नाही. यामुळे उत्साही असलेले अनेक तरुण पाण्यात उड्या मारत असतात. यात अनेकांचे जीव गेल्याच्या घटना घटल्या आहेत. या उन्हाळ्यात गंगापूर बॅक वॉटरला तरुणाची गर्दी होणार असल्याने याकडे जलसिंचन विभाग व पोलिस प्रशासनाने वेळेवरच कारवाई करणे योग्य ठरेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीएच्या आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त आणि औषध निरीक्षकांनी औषध विक्रेत्यांकडून तब्बल तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा सनसनाटी आरोप जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनने केला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यात आली असून, या संदर्भात चौकशीचे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिल्याची माहिती असोसिएशनने केला आहे.

एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी घेतली जात असल्याबाबत असोसिएशनने सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यानुसार, गोळे कॉलनीत औषध विक्रेते मधुसूदन कलंत्री व सचिन पटणी यांच्याकडून अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त भूषण पाटील व औषध निरीक्षक हेमंत मेतकर यांनी तीन लाखाची खंडणी वसूल केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष गोरख चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असून, अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे, असेही चौधरी म्हणाले.

पाटील व मेतकर हे अधिकारी ११ मार्च रोजी कलंत्री व पटणी यांच्या दुकानात गेले. तेथे दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या औषधांच्या साठ्यावर आक्षेप घेतला. या जागेला परवानगी नसल्याचे कारण पुढे करून त्यांनी ३० लाख रुपयांची औषधे जप्त करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांना दुकानदारांनी कारवाई न करण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी ३० लाखांच्या या औषधांच्या किमतीच्या २० टक्के रकमेची मागणी केली. ती सहा लाख होती; पण या दुकानदारांकडे पैसे नव्हते म्हणून त्यांनी पैसे नंतर देतो असे सांगितले; पण त्यांनी तीन लाख आता द्या, असे सांगितल्यानंतर दुकानदारांनी आजूबाजूच्या दुकानातून पैसे गोळा करून तीन लाख दिले. संघटनेला या घटनेची जेव्हा माहिती झाली, तेव्हा त्यांनी चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर पहिले कलंत्री व पटणी यांच्या नावाने थेट पोलिस स्टेशनमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रीतसर तक्रार करण्यात आली. त्यानंतर मुंबई येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याबाबत सविस्तर घटनाक्रम सांगितला. त्यानंतर गुप्तवार्ताच्या पथकानेही ही तपासणी केली. धमकी दिल्यामुळे भीतीपोटी ही रक्कम दुकानदाराने दिली आहे. खरं तर जागेचा परवाना नव्हता, या गोष्टीचे भांडवल करून ही कारवाई केलेली आहे. या ठिकाणी कोणातीही विक्री करण्यात येत नव्हती. तरीसुद्धा त्याचा फायदा उचलून हे पैसे उकळण्यात आले आहे.

या घटनेबद्दल केमिस्ट संघटनेत प्रचंड संताप असून, सोमवारी ५०० विक्रेत्यांची बैठक होऊन या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे. आम्ही मंत्री गिरीश बापट व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा मुंबईत भेटून कारवाईची मागणी करणार असल्याचे या वेळी चौधरी यांनी सांगितले. या वेळी पत्रकार परिषदेत सुरेश पाटील, सुरेश आहेर, योगेश बागरेचा, अनिल कुंदे, मधुसूदन कलंत्री, अभय बुरड आदी केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

औषध विक्रेत्यांमध्ये फूट

खंडणी प्रकरणात केमिस्ट असोसिएशनच्या काही सभासदांनी असे काही घडलेच नाही असे म्हणत घुमजाव केले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी घेतली जात असल्याचे असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन सांगितले. मात्र या प्रकरणी आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही आम्हाला यात गोवले जात असल्याचा आरोप यातील काही विक्रेत्यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, काही महिन्यापूर्वी येथील होलसेलरवर एफडीए कार्यालयाकडून सिपला कंपनीचा स्किम घोटाळा उघडकीस आणला होता. नाशिकच्या अधिकाऱ्यांनी येथील काही होलसेलरवर कारवाई केली होती. त्यामुळे एफडीए व होलसेलर यांच्यातील संबंध दुरावले गेले होते. काही होलसेल विक्रेत्यांनी वैयक्तिक इर्षेपायी आरोप केले आहेत. एफडीएचे अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप हा चुकीचा आहे. या अफवा उठवल्या गेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनजमिनी आदिवासींच्या नावे करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देवळा तालुक्यातील निंबोळा येथील काही वनजमिनी आदिवासी बांधव अनेक वर्षे कसत असून, त्या आदिवासी बांधवांच्या नावे कराव्यात, अशी मागणी भारतीय लहूजी एकलव्य सेनेने केली आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना सोमवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले.

निंबोळा येथील आदिवासींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे, की गावातील काही वनजमिनी आदिवासी भिल्ल समाजाची २१ कुटुंबे गेल्या ३० वर्षांपासून कसत आहेत. वनदाव्यांबाबतची कागदपत्रे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिली असून, तेथून ती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आमचे वनदावे तत्काळ मंजूर करून सातबारा उतारे द्यावेत, अशी मागणी दगा तलवारे, शिवराम पवार आणि बाळासाहेब बागूल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जमीन चांगल्यारीतीने कसता यावी, यासाठी तेथे पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी या जमिनींवर विहिरी खोदण्याची, बोअरवेल करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषण केले जाईल व त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.

वडगाव पिंगळा येथेही अन्याय

सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथे एका आदिवासी समाजाच्या कुटुंबाची जमीन बिगरआदिवासी कुटुंब कसत आहे. या जमिनी आदिवासी कुटुंबाच्या ताब्यात मिळाव्यात, अशीही मागणी भारतीय लहूजी एकलव्य सेनेने केली आहे. या प्रश्नाबाबत सिन्नर तहसील कार्यालयाबाहेर आंदोलन करूनही उपयोग झाला नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय द्यावा, अशी मागणी बाळासाहेब बागूल, भिका पवार आणि गणेश पवार यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीची तोडफोड

$
0
0

धुळ्यातील प्रकार; तक्रार दाखल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो गाडीवर रविवारी (दि. १९) रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी दगड मारून काच फोडल्याचा प्रकार घडला आहे. हे राजकीय विरोधकांनी केले असून माझ्या कामांवरून मला विचलित केले जात आहे, असा आरोप हिलाल माळी यांनी केला आहे. शिवसेना पक्षात असलेले शिवसैनिक खचून जात नाही. मात्र पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माळी यांनी बोलताना केली. याप्रकरणी माळी यांनी आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

शहरातील जुने धुळे भागात राहत असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या महिंन्द्रा बोलेरो क्रमांक (एमएच १८ एजी - ९००९) या गाडीचा मागील काच रविवारी, मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या अज्ञात दोन जणांनी दगड मारून फोडला. काच फुटल्याच्या आवाजाने नागरिक जागे झाले असता त्यांना दुचाकीवर दोनजण जाताना दिसून आले. मात्र नेमके कोण होते ते मात्र समजू शकले नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना असे प्रकार विरोध केल्याशिवाय राहत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून विरोध जाणीवपूर्वक त्रास देत आहेत, असे हिलाल माळी म्हणाले. परंतु, हे प्रकार यापुढे पुन्हा घडले तर यावर काहीतरी उपाय शोधल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागतयात्रा ठरणार लक्षवेधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने ‘स्वागत यात्रां’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील साक्षी गणेश मंदिर, आयुर्वेद महाविद्यालय, पंचवटी द्वारका या ठिकाणांहून २८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता ही स्वागतयात्रा निघणार आहे. या यात्रेस जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, महंत रामस्नेहीदास महाराज, महंत रामकिशोरदास महाराज, योगगुरू अरुण एकबोटे, ब्रह्माकुमारी वासंतीद‌िदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी यंदाही गोदापटांगणावर महावादन महारांगोळीचे विशेष आकर्षण राहणार आहे.

संस्कृतीचे संवर्धन व्हावे, त्याबाबत नागरिकांना माहिती व्हावी तसेच, युवावर्गापर्यंत हिंदू संस्कृती आणि परंपरा समजून त्यापुढील पिढीत ती रुजावी, या हेतूने या स्वागत यात्रांचे आयोजन केले जाते. गुढीपाडव्याला सकाळी साक्षी गणेश मंदिर, आयुर्वेद महाविद्यालय, द्वारका या ठिकाणांहून ही स्वागत यात्रा सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी काढण्यात येणार आहेत. याबरोबरच प. पू. गुरूगोविंद सिंगजी महाराज यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त शनिवारी (दि. २५) सायंकाळी ६.३० वाजता गोदाघाटावरील गांधी तलाव परिसरात महाढोलवादन करण्यात येणार आहे. त्यात शहर तसेच जिल्ह्यातील १८ ते २० पथके सहभागी होणार आहेत. साधारणत: ६०० ढोल व १२५ ताशे या वादनात सहभागी होणार आहेत.

महारांगोळी
यंदा ‘संतांची मांदियाळी’ या विषयावर २०० बाय १०० फूट आकाराची महारांगोळी रविवारी (दि. २६) रेखाटण्यात येणार आहे. संतांच्या परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचे विशेष महत्व आहे. त्यामुळे रांगोळीच्या रेखाटनात वारकरी संप्रदायातील अनेक बाबींचे रेखाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही रांगोळी शहरातील १२५ महिला रेखाटणार असून त्यासाठी गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सराव करत आहेत.गोदाकाठ परिसरात साकारण्यात येणारी महारांगोळी सर्वांसाठीच विशेष आकर्षण ठरणार आहे. या रांगोळीसाठी २०० गोण्या रंग आणि ७० गोण्या रांगोळीचा वापर केला जाणार आहे. ही रांगोळी काढण्यासाठी रविवारी (दि. २६) सकाळी ६ वाजता प्रारंभ होईल.

विविध सामाजिक, सेवाभावी संस्थांचे कार्य समाजापर्यंत पोहचावे यासाठी प्रदर्शनदेखील मांडण्यात येणार आहे. देण्यात आली. या वेळी प्रफुल्ल संचेती, नीलेश देशपांडे, आसावरी धर्माधिकारी, राजेंद्र दरगोडे, मनोज कुलकर्णी, ओंकार भोज आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा बांधिलकीवर मंथन

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये महाराष्ट्र युवा परिषद या सामाजिक संघटनेच्या युवा संसदेत विविध विषयांवर मंथन झाले. या संसदेची सुरुवातच युवकांना भेडसावणाऱ्या समस्या आणि आजचे राजकारण या प्रश्नांची होळी करून झाली. या कार्यक्रमासाठी सामाजिक विचारवंत सुभाष वारे, महाराष्ट्र युवा परिषदेचे

प्रदेशाध्यक्ष आशिष मेस्त्री व उपाध्यक्ष राजेश गायकवाड, राजेश हिवरे, नितीन मते यांची उपस्थिती होती.

सुभाष वारे यांनी युवा व आरक्षण या विषयावर विचार मांडले. त्यानंतर अमित नारकर यांनी युवकांचे सामाजिक क्षेत्रात योगदान व बांधिलकी या विषयावर मार्गदर्शन केले. त्यासंदर्भातील एकूण प्रवास त्यांनी मांडला. दुसऱ्या सत्रात हरीश इथापे यांनी युवकांचे सामाजिक क्षेत्रात योगदान व बांधिलकी या युवकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्यानंतर आमदार कपिल पाटील व भीम रासकर यांनी युवा संघटनांची गरज व अस्तित्व यावर चर्चा केली. या संसदेसाठी महाराष्ट्रातून २८ जिल्ह्यांतील युवक व युवती, तसेच जिल्हा प्रतिनिधी असे ३०० युवक प्रतिनिधी सहभागी झाले होते.

युवा संसदेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संजय अपरांती होते. त्यांनी युवा व प्रशासन या विषयावर विचार मांडले. दुसऱ्या सत्राचे वक्ते निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी विवेचन केले. संसद यशस्वीतेसाठी अमोल नेमणार, किरण मोरे, किरण पावले, ज्ञानदेव कुदनर, मोहित गोवेकर, सुरेश ताठे, प्रिया ठाकूर, दिनेश काळे आदींनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधाबाईंचं वेदनादायी जगणंं झालं ‘सोन्याचं’!

$
0
0

विठाबाई नारायणगावकर पुरस्काराने होणार आज गौरव

नाशिक : पायात नादावणारे चाळ...हातात हिरवा-पिवळा चुडा...गळ्यात सोन्या-पुतळ्यांची माळ...केसाला मोगऱ्याचा गजरा अन् तोंडात पानाचा तोबरा भरलेला असला की हे रूप कुणाचं आहे हे सांगावं लागत नाही. ‘तमाशातील बाई’ असं बिरूदच तिला लाभलेलं असतं. परंतु, राधाबाईंची कहाणी मात्र यापेक्षा वेगळी आहे. आज सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे. एका नाशिककर कलावंताचा हा सन्मान नाशिकची मान उंचावणारा ठरणार आहे.

राधाबाई कारभारी खोडे-नाशिककर असं त्यांचं नाव. तमाशातील हे मोठं नाव इतकं मोठं की त्यांच्या नावाने आज एक फड उभा आहे. हिराबाई नाशिककर आणि राधाबाई नाशिककर ही तमाशातली दोन मोठी नावं. हिराबाईंनी तमाशाचा फड चांगलाच गाजवला. त्याचप्रमाणे राधाबाईदेखील कमी नाही. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून त्या तमाशामध्ये काम करीत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व फडांमध्ये केले काम

राधाबाई नाशिककर तशा उपेक्षितच कलावंत. आयुष्यभर त्यांनी कामाच्या वेदना सोसल्या. वयाच्या १२ व्या वर्षापासून राधाबाई नाशिकला आल्या आणि नाशिकच्याच झाल्या. फुलेनगरमध्ये त्यांचे वास्तव्य. महाराष्ट्रातल्या सर्व फडांमध्ये त्यांनी काम केले.

लय भारी वाटतंय. भयंकर कष्ट केले, त्याचं चीज झालं. देवाने माझं गाऱ्हाणं ऐकलं. हे माझं यश असलं तरी त्याला अनेकांच्या आशीर्वादाची जोड आहे. सरकारचेही लई धन्यवाद की त्यांनी माझी गरिबाची दखल घेतली. हा पुरस्कार मी आई शेवंताबाई पागे यांच्या पायी लावते.

- राधाबाई खोडे, नाशिककर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोलपंपचालकांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदीनंतर पेट्रोलपंपावर २५ टक्क्यांहून अधिक विक्री वाढल्यामुळे प्राप्तिकर विभागाने पेट्रोल पंप चालकांना नोट‌िसा पाठवून त्यांच्याकडून माहिती मागितली आहे. त्यामुळे पेट्रोलपंप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. काळा पैसा पांढरा केल्याचा या खात्याला संशय असून, त्यामुळे देशभरातील काही पेट्रोल पंपांवर छापे टाकण्यात आले आहेत.
पेट्रोलपंप मालकांनी बँक खात्यांमध्ये किती पैसा जमा केला आणि किती विक्री केली, विक्री रक्कम आणि बँकेत जमा केलेली रक्कम हा सर्व हिशोब आता प्राप्तिकर विभाग तपासणार आहे. प्राप्तिकर विभागाच्या यावर पेट्रोलपंप मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या काळात जास्त विक्री झाली असली तरी त्याचा हिशोब आमच्याकडे असतो असे सांगत कंपनीकडून आलेला माल व त्यानंतर तो विक्री झालेला माल याचे मिटर ‌रीडिंग असते. त्यामुळे कंपनीव्यतिरिक्त असे कोणतेही जास्तीचे व्यवहार आम्हाला करता येत नाहीत. त्यामुळे या नोट‌िसा केवळ त्रास देण्याचा प्रकार असल्याचे पंपचालकांचे म्हणणे आहे. प्राप्तिकर विभागाला नोटाबंदीदरम्यान पेट्रोल पंपांकडून विक्री रकमेपेक्षा १५ टक्के रक्कम अधिक बँकेत जमा केल्याचाही संशय आहे. त्यामुळे जमा केलेल्या पैशांची जर योग्य माहिती नाही देता आली तर त्या पेट्रोलपंप मालकावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिसीचे करा वनटाइम पेमेंट

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वनटाइम पेमेंट भरून पॉलिसी देण्यात येईल, तसेच तीन वर्षांनंतर पॉलिसीची सर्व रक्कम काढता येईल किंवा १० हजार शिल्लक ठेवल्यास पॉलिसी कायम करून १० वर्षांपर्यंत १५ टक्के व्याजदराने पॉलिसी मिळेल, अशी प्रलोभने दाखवून तब्बल २ लाख २० हजारांच्या चार पॉलिसी काढणाऱ्या ग्राहकाला वनटाइम मोड करून पैसे देण्याचे आदेश ग्राहक न्यायमंचाने एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीला दिले आहेत.

अागर टाळळी येथील संतोष एकनाथ गरड यांनी याबाबत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार केल्यानंतर हा निकाल देण्यात आला. गरड यांनी या तक्रारी म्हटले आहे, की मी २ लाख २० हजार रुपयांच्या चार पॉलिसी घेतल्या. त्यात एक २५ हजारांची होती. त्याची मुदत २० वर्षे, दुसरी ४५ हजार ५०० रुपयांची होती. तिची मुदत २४ वर्षे होती. तिसरी पॉलिसी ६० हजारांची होती. तिची मुदत ३० वर्षे व चौथी ९० हजारांची होती तिची मुदत २० वर्षे होती. या पॉलिसींचा कालावधी पेपर्स मिळाल्यानंतर लक्षात आला. त्यामुळे मी इन्‍शुरन्स कंपनीबरोबर १५ ते २० दिवसांनंतर बोलणी करून वनटाइम मोड करण्याचे सांगितले. कंपनीने आश्वासनही दिले. पण, कंपनीने रक्कम दिली नाही.

या तक्रारीनंतर एक्साइड लाइफ इन्‍शुरन्स कंपनीने युक्तिवाद करताना सांगितले, की गरड यांना वेलकम लेटरसोबत अटी व शर्तींसह पॉलिसी शेड्यूल देण्यात आले होते. पॉलिसीच्या अटी व शर्ती मान्य नसल्यास पॉलिसी डॉक्युमेंटस मिळाल्यापासून १५ दिवसांत पॉलिसीज रद्द करून घेण्याबाबत तक्रारदारांना कळविण्यात आले. मात्र, गरड यांनी १५ दिवसांत पॉलिसी रद्द करून घेतल्या नाहीत. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्याच्या तारखेपासून सरेंडर बेनिफिटसह तीन वर्षांनंतर देण्याची त्यांची जबाबदारी आहे.


विमा कंपनीचे टोचले कान

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ग्राहक न्यायमंचाने पॉलिसी व डॉक्युमेंटसोबत अटी व शर्ती पाठवल्या होत्या. याबाबत पोस्टाचा अगर कोणताही पुरावा कंपनीने दाखल केला नाही, असे सांगत विमा कंपनीचे कानही टोचले. यावेळी न्यायमंचाने निकालात म्हटले, की विमा कंपन्यांकडून त्यांच्या एजंटमार्फत वेगवेगळी प्रलोभने दाखवून अटी व शर्तींची माहिती न देताच पॉलिसीज विकल्या जातात, असे सर्वसाधारण अनुभवास येते. त्यामुळे वनटाइम पेमेंटचे प्रलोभन दाखवून पॉलिसी विकल्याच्या तक्रारीत आम्हाला तथ्य वाटते, म्हणून कंपनीने सर्व पॉलिसीची रक्कम तक्रारदाराला द्यावी. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्जचा खर्च तीन हजार रुपये अदा करावा, असे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माकप-शिवसेनेची नाशिकमध्ये अनोखी युती?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अभूतपूर्व व ऐतिहासिक युती सत्तेवर येण्याची शक्यता बळावली आहे. डाव्या विचारांच्या माकपने शिवसेनेसोबत जाऊ नये, यासाठी सोमवारी दिवसभर गल्ली ते दिल्ली प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतरही माकपने ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या न्यायाने शिवसेनेबरोबरच राहण्याचा निर्णय पक्का केल्याने आता भगवा, तिरंगा व लाल बावट्याची सत्ता नाशिक जिल्हा परिषदेत येणे जवळपास निश्चित झाले आहे. आज, मंगळवारी सकाळी अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, रात्री उशिरापर्यंत राजकीय हालचाली सुरूच होत्या.

या निवडणुकीसाठी माकपची भूमिका निर्णायक असली तरी त्यांचा कल शिवसेनेकडेच असल्याने शिवसेना- काँग्रेस आघाडीचा सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. माकपने राष्ट्रवादी, भाजप आघाडीला सहकार्य करावे, यासाठी दस्तूरखुद्द शरद पवार यांनी माकप नेते सीताराम येच्युरी यांचीही मनधरणी केल्याचे सांगितले जात असून, त्यातून काही वेगळा निर्णय झाला तरच जिल्हा परिषदेत चमत्कार घडू शकेल. राष्ट्रवादीने केरळमध्ये माकपला पाठिंबा दिल्यामुळे जिल्हा परिषदेत माकपने आम्हाला पाठिंबा द्यावा, असे समीकरण मांडले गेल्याची चर्चा आहे. दिल्ली दरबारात होणाऱ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत. याचबरोबर राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर चर्चा करून अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याचा आग्रह धरला आहे. शेवटपर्यंत माकपने आपली भूमिका जाहीररीत्या स्पष्ट केली नसली तरी त्यांचे चार सदस्य शिवसेना कॅम्पमध्ये असल्याने प्रत्यक्ष कृतीतूनच त्यांचा निर्णय स्पष्ट असल्याचे सांगितले जात आहे. माकपने निर्णयाचे सर्वाधिकार आमदार जिवा पांडू गावित यांना दिले असून, त्यांनी कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपशी असलेली स्पर्धा लक्षात घेऊन शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्र्यंबक पंचायत समितीत सभापती निवडीत माकपला शिवसेनेने पाठिंबा दिल्याने आता त्याची परतफेड माकप करणार असेल तर त्यात गैर काय, असा सवाल दोन्ही पक्षांतील नेते करीत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी मंदाकिनी बनकर यांना माकपचा पाठिंबा मिळेल, असे राष्ट्रवादीतर्फे सांगितले जात आहे. शिवसेनेतर्फे अध्यक्षपदासाठी सविता पवार, शीतल सांगळे, सुरेखा दराडे यांचे नाव आघाडीवर आहे.

जिल्हा परिषदेत एकूण ७३ सदस्य निवडून आले असून, या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या दोन्ही सत्ताधारी पक्षांनी वेगवेगळी मोट बांधली. शिवसेनेने काँग्रेसला बरोबर घेऊन एका अपक्षाच्या मदतीने आपला आकडा ३४ वर नेला, तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच दोन अपक्षांच्या मदतीने आपल्या संख्याबळाचा आकडा ३५ पर्यंत नेला आहे. या दोन्ही पक्षांना बहुमतासाठी लागणारा ३७ चा आकडा पार करण्यासाठी माकपची गरज लागणार आहे. माकपकडे एका अपक्षासह चार सदस्य आहेत.

शिवसेना काँग्रेसचे सदस्य इगतपुरीत

वेगवेगळे सहलीला गेलेले शिवसेना, काँग्रेसचे सदस्य खंडाळ्यात आले; पण ते वेगवेगळ्या हाॅटेलमध्ये होते.मात्र सोमवारी हे सदस्य इगतपुरीला एकत्र आले.याच हाॅटेलमध्ये रविवारी राष्ट्रवादीचे सदस्य होते.ते नाशिकला गेले व या सदस्यांनी या हाॅटेलमध्ये आपला मुक्काम ठोकला.या सदस्यांबरोबर माकपचे सदस्य असल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी व भाजपनेही आपले सदस्य शनिवारी स्वतंत्ररीत्या पाठवले. त्यानंतर ते इगतपुरीला एकत्र आले व त्यानंतर हे सदस्य सोमवारी नाशिकच्या एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये एकत्र आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची लढाई राष्ट्रवादी व शिवसेनेत आहे, तर उपाध्यक्षपदासाठी भाजप व काँग्रेसमध्ये लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

दिग्गज नेते नाशिकला

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे पालकमंत्री गिरीस महाजन, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह प्रमुख नेते दिवसभर नाशिकमध्ये होते. त्यामुळे ते या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषी कॉलेजेस रडारवर

$
0
0

तंत्रशिक्षण संचालनालय बजावणार कारणे दाखवा नोटीस

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

संस्थेची मान्यता टिकविण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर तद्दन खोटी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयास सादर करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करू पाहणाऱ्या संशयास्पद इंजिनीअरिंग कॉलेजांबाबत ‘मटा’ ने प्रकाशित केलेल्या वृत्ताचे सकारात्मक पडसाद उमटताहेत. तंत्रशिक्षण सहसंचालनालयानेही या वृत्ताची दखल घेतली असून, या प्रक्रियेतील दोषी कॉलेजेसना कारणे दाखवा नोटिसा बजावली जाणार आहे.

‘इंजिनीअरिंग कॉलेजांचा कारभारच संशयास्पद’ या मथळ्याखाली ‘मटा’ ने २० मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले होते. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागांतर्गतच जिल्ह्यांमधील तब्बल ४७ इंजिनीअरिंग कॉलेजांनी परिषदेने घालून दिलेली मानके धुडकावून लावत मान्यता पदरात पाडून घेण्यासाठी खोटा अहवाल संचालनालयास सादर केला आहे. या सर्व कॉलेजांना संचालनालयाने पाठीशी घालण्याचे प्रयत्न चालविल्याच्या मुद्द्यावर ‘मटा’ ने प्रकाशझोत टाकला होता. एकदा संस्थांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे डीटीईने धडधडीत वेबसाईटवरील आदेशात मान्य केल्यानंतरही तंत्रशिक्षण विभागाने कुठल्या नियमान्वये या कॉलेजेसना पुन्हा बाजू मांडण्याची संधी दिली.

‘त्या’ अभ्यासक्रमांची फी कमी करावी

व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी संबंधित परिषदा कॉलेजेसना मानके नियंत्रित करण्याची गळ घालतात. या मानकांतर्गत प्राधान्याने जमीन, इमारत, पुरेसा शिक्षकवर्ग यासह पायाभूत सुविधांचा विचार केला जातो. मात्र, नाशिक विभागातील व्यावसायिक अभ्यासक्रम देणाऱ्या कॉलेजेसने यातील काही सुविधांना फाटा दिला असेल, तर दोषी कॉलेजेसची चुकीच्या निकषांवर आकारली जाणारी फी एकूण फी मधून वजा करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

मटा भूमिका
मान्यतेसाठी घालून दिलेली मानके धुडकावण्याचे धाडस करणाऱ्या नाशिक विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिसा देण्याची हिंमत दाखविण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने ठरविले असले तरी प्रत्यक्षात या कॉलेजेसना पाठिशी घालण्याचाच प्रयत्न केला गेला असल्याने कारवाईबाबत संदिग्धता कायम आहे. चांगल्या हेतूने डीटीईने काही मानके ठरविली होती. पण त्याला हरताळ फासून या कॉलेजेसनी धूळफेक केली. त्याचा बभ्रा झाल्यानंतर आता कारवाईची भाषा केली जात असली तरी शिक्षण सम्राटांच्या दबावापुढे सरकारने नमता कामा नये. यानिमित्ताने खोटारडेपणा करणाऱ्या संस्थांना धडा शिकविण्याची हीच वेळ आहे, ती शासनाने गमावू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारकरी मंडळ आक्रमक

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दारूबंदीबाबत येत्या एप्रिल महिन्यापासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय वारकरी महामंडळाने घेतला आहे. दारूबंदीसाठी जिवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज्य सरकार संरक्षण देत नसल्याने टाळ-मृदंगांसह रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी दुपारी नाशिकमधील हुतात्मा स्मारकात झाली. यावेळी अनेक निर्णय घेण्यात आले.

बैठकीला वारकरी महामंडळाचे महासचिव ह. भ. प. प्रभाकर फुलसुंदर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, महामंडळाचे जिल्हा सचिव पुंडलिकराव थेटे, संत निवृत्तिनाथ महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, डॉ.पी. के. पाटील, बाळासाहेब वीरकर, महामंडळाचे प्रचारप्रमुख राम खुर्दळ, गणेश सोनवणे, सुरेश भोर आदी उपस्थित होते.

जोग महाराज शिक्षण संस्था शताब्दी वर्षानिमित्त २२ ते २९ मार्च या कालावधीत आळंदी येथे हरिनाम सप्ताह होणार आहे. २४ मार्च रोजी नाशिक जिल्ह्यातील वारकरी बांधवांनी आळंदी येथे जाऊन या सप्ताहात सेवा देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. संत निवृत्तिनाथ देवस्थानने कोणताही निर्णय घेताना वारकरी महामंडळाला विश्वासात घ्यायला हवे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

राज्यभर दारूबंदी व्हावी यासाठी विविध संघटना त्यांच्या पातळीवर प्रयत्न करतात. परंतु, अजूनही अशा प्रयत्नांना अपेक्षित यश येऊ शकलेले नाही. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील अनेक संतांनी व्यसनाधिनतेवर त्यांच्या अभंगांमधून कोरडे ओढले आहे. जनजागृतीचे प्रभावी साधन असलेल्या कीर्तन, भारुड, प्रवचन अशा अनेक माध्यमांचा वापर दारूबंदी चळवळीसाठी केला जातो. परंतु, अजूनही सरकारने दारूबंदीचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच वारकरी या महामंडळाच्या माध्यमातून सरकारविरोधात चळवळ उभारणार आहेत. टाळ-मृदुंग हाती घेऊन धरणे व तत्सम आंदोलनांद्वारे सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.


ठिकठिकाणी होणार आंदोलन

दारूबंदीसाठी राज्यात अनेक कार्यकर्ते काम करतात. त्यांना सरकारचा ना आधार आहे ना संरक्षण. सरकारची ही भूमिका चुकीची असून, त्याचाही निषेध करण्यासाठी अशा राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यातून या आंदोलनांना सुरुवात केली जाणार आहे. राज्यात ठिकठिकाणी अशी आंदोलने केली जाणार असल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या १६९ जागांसाठी २७ हजार उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील १६९ रिक्त जागांसाठी तब्बल २७ हजार ७२० इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. अर्ज सादर करण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता.

शहर पोलिस आयुक्तालयातील शिपाई व बॅण्ड्समन पदाच्या रिक्त जागांपैकी शासन आदेशानुसार ७५ टक्के म्हणजेच अनुक्रमे ७९ व १८ जागांसाठी ही भरती प्रकिया राबविली जात आहे. तर ग्रामीण पोलिस दलासाठी याच निकषाने ७२ जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी २४ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली होती. १६ मार्चनंतर त्यात तीन दिवसांची वाढ करण्यात आली. २० मार्च अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने इच्छूकांची धावपळ सुरू होती. शहर पोलिस दलात भरती होण्यास एकूण १४ हजार २२० उमेदवार इच्छूक आहेत. यात, शिपाईपदासाठी १० हजार ६४२ तर ब्रॅण्डसमन पदासाठी एक हजार ४१० उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. याच जागासाठी एकूण दोन हजार १६८ महिला उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. यात शिपाई पदासाठी दोन हजार ८४ तर बॅण्डसमन पदासाठी ८४ महिला आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत उमेदवारांचा आकडा आणखी वाढू शकतो. शहर पोलिस दलाची भरती प्रक्रिया पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार असून, सोमवारी पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांना रूपरेषा समजावून सांगण्यात आली. दरम्यान, ग्रामीण पोलिस दलाच्या ७२ शिपाई पदासाठी १३ हजार ५०० उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत यात आणखी दोन-चारशे अर्जांची भर पडू शकते, असे पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण पोलिस दलाची भरती प्रक्रिया आडगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी पाच वाजेपासूनच सर्व प्रक्रिया सुरू होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यासाठी डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेजच्या मैदानाचा काही अंशी वापर होणार आहे. दरम्यान, यासाठी चार सहायक पोलिस अधीक्षक, १६ पोलिस निरीक्षक, ३५० पोलिस कर्मचारी व याव्यतिरिक्त काही बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वाहतूक मार्गात बदल

शहर पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेदरम्यान ८०० आणि एक हजार ६०० मीटर धावण्याची परिक्षा गंगापूररोडवरील शहीद अरूण चित्ते (बापू पूल) ते हॉटेल मिर्ची या रस्त्यावर पार पडणार आहे. त्यामुळे २२ मार्च ते पोलिस भरती प्रक्रिया संपेपर्यंत दररोज सकाळी ६ ते ११ आणि सांयकाळी ४ ते ७ या दरम्यान सदर रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्चएण्ड’ला बिलांची प्रतीक्षा

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

‘मार्चएण्ड’मुळे पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असले, तरी शहरातील अनेक नागरिकांना मात्र वर्षानुवर्षे पाणीपट्टी किंवा घरपट्टीची बिलेच मिळालेली नसल्याचे दिसून येते. मात्र, असे असले, तरी महापालिका प्रशासन मात्र सर्व मिळकतधारकांना वेळेत पाणीपट्टी व घरपट्टीची बिले पोहोच केली जात असल्याचा दावा करीत आहे.

सध्या शहरात पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. बड्या थकबाकीदारांना लाजविण्यासाठी त्यांच्या दारी गांधीगिरीचा मार्ग म्हणून थेट ढोल पथक उभे केले जात आहे. याशिवाय कायदेशीर नोटीस, प्रॉपर्टी सील करणे यांसारखे टोकाचे उपायही केले जात आहेत. या उपायांची मात्रा काहीअंशी लागू होताना दिसून येत आहे.

मात्र, एकीकडे थकबाकीदारांची संख्या वाढत असली, तरी दुसरीकडे काही मिळकतधारकांना पाणीपट्टी किंवा घरपट्टीच मिळत नसल्याचे दिसून येत आहे. काहींना दोन ते तीन वर्षांचे एकत्र बिल येते. या प्रकारांतून महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. महापालिकेची कारवाई नको म्हणून काही नागरिक बिल मिळाले नसतानाही स्वतःहून महापालिका कार्यालयात जाऊन आपल्या मिळकतीच्या करांचा भरणा करताना आढळून येत आहेत.

नाशिकरोडमध्ये उशिराने बिले

नाशिकरोड प्रभागात पाणीपट्टी व घरपट्टीची बिले नागरिकांना उशिराने मिळाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहेत. एकत्र बिल मिळत असल्याने मोठी रक्कम भरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे यासंदर्भात पुरेशा उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.


नाशिकरोडला ७१ जणांना नोटिसा

नाशिकरोड प्रभागात पाणीपट्टी व घरपट्टीची थकबाकी असलेल्या ७१ मिळकतधारकांना महापालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. या थकबाकीधारकांनी आपल्याकडील थकबाकीचा भरणा न केल्यास पुढील आठवड्यात संबंधितांच्या मिळकती सील केल्या जाणार आहेत. नाशिकरोड प्रभागात ३० हजार पाणीपट्टीच्या, तर ७० हजार घरपट्टीच्या मिळकती असून या करांचा भरणा करण्यासाठी नाशिकरोड विभागीय कार्यालय, चेहेडी, दसक, पंचक या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे.

पोटनिवडणूक व त्यानंतर झालेली सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक यामुळे पाणीपट्टी व घरपट्टीची बिले नागरिकांना उशिरा पोहोच झाली आहेत. सुमारे चार महिने या विभागाचे काम थांबलेले होते.

-सोमनाथ वाडेकर, विभागीय अधिकारी, महापालिका

महापालिकेकडून घरपट्टी व पाणीपट्टीचे बिले वर्षानुवर्षे मिळत नाहीत. घरपट्टीची बिले तर मिळतच नाहीत. पाण्याचे बिल मोठ्या कालावधीनंतर एकत्र मिळाल्यास भरणा करताना अडचण होते.

-उत्तम कदम, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारच्या धडकेत बारावीचा विद्यार्थी ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव अल्टो कारच्या धडकेत बारावीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण शाळेजवळ सोमवारी (२० मार्च) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी कारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज सुभाष बाविस्कर (वय १९, रा. चव्हाण मळा, साईप्रेम हॉटेलशेजारी, तपोवन, नाशिक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विशाल पालवे (रा. चव्हाण मळा, तपोवन, नाशिक) गंभीर जखमी आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी अल्टो कारचालक राजश्री राहुल महाजन (रा. हिरावाडी, पंचवटी, नाशिक) यांच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वामीनारायण मंदिराजवळील हॉटेल साईप्रेम रस्त्यावर मनोज बाविस्कर व त्याचा विशाल पालवे दुचाकीजवळ (एमएच १५/ईएन ८३६२) उभे होते. त्या वेळी भरधाव अल्टो कारने (एमएच १५/ईपी १३७७) या दोघांना जबर धडक दिली. कार वेगात असल्याने धडक बसल्यानंतर मनोज रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या संरक्षक जाळीवर फेकला गेला. संरक्षक जाळी त्याच्या मानेत घुसली, तसेच डोक्यालाही गंभीर मार बसला. तेथे असलेले अशोक कापसे यांनी मनोजला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत जखमी विशालवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृत्युमुखी पडलेला मनोज हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. हवालदार डी. पी. भालेराव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला दिवसाआड पाणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

शहरात मंगळवार (दि. २१)पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरासाठी तीन योजनांवर कोट्यवधींचा खर्च करूनही पाणीप्रश्न सुटलेला नाही. सालाबादाप्रमाणे यावर्षीदेखील नागरिकांना कृत्रीम पाणीटंचाईस सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

शहर परिसरासह संपूर्ण तालुक्यात यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. गौतमी, बेझे धरणात त्र्यंबक शहरासाठी पाणीसाठा आरक्ष‌ित आहे. गौतमी बेझे योजनेसाठी सिंहस्थ नियोजनात सुमारे तीस कोटी रुपये खर्च झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ही योजना नगर परिषदेने ताब्यात घेतली आहे. अंबोली धरणातदेखील बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. उन्हाळ्यात या धरणातला गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे पाणीसाठा वाढला आहे. अहिल्या धरणाची खोली गतवर्षीच्या उन्हाळ्यात वाढविण्यात आली. यावर्षी पाऊस चांगला झाला. असे असतानाही दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील त्र्यंबकवास‌ीयांवर एक दिवसाआड पाणी असे संकट का यावे? असा सवाल उपस्थित होत आहे. आज गौतमी, बेझे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तर अंबोली धरणावर सर्रास विजपंप सुरू आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यात आलेला नाही. मात्र त्र्यंबकच्या नागरिकांना वेठीस धरण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्वर येथे तीन पाणीपुरवठा योजना आहेत. या योजना सुरू करण्याआधी शहरातील नागरिकांसह दररोज येणाऱ्या हजारो भाविकांचादेखील विचार करण्यात आला आहे. येथील आखाडे, आश्रम, देवालय व त्यामध्ये होत असलेले उत्सव आदी सर्वांनाच या कृत्रीम पाणीटंचाईचा फटका बसणार आहे.

दहा वर्षांपासून पाणीटंचाई

शहरास ७० व ८० च्या दशकात दोन वेळेस मूबलक पाणी मिळत होते. त्र्यंबक शहराचा विस्तार वाढला व भाविकांची संख्या वाढली तशी येथे पाणीटंचाईच्या झळा जाणवायला लागल्या. शहरातील मोठा पाझर तलाव असलेले अहिल्या धरण अपूर्ण पडायला लगले म्हणून सन १९९० मध्ये अंबोली धरण पाणीपुरवठा योजना आणली. त्यानंतर दिवसातून एकदा का होईना पाणीपुरवठा सुरळीत होता. मात्र सन २००७ पासून आजपर्यंत दरवर्षी उन्हाळ्यातील तीन महिने एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. सन २००७च्या उन्ह्याळ्यात भार नियमन वाढल्याने धरणांतून पंप‌िंगची अडचण सांगत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर २००८ मध्ये अंदाजे २५ लाखांच्या आसपास खर्च करून त्र्यंबक ते अंबोलीपर्यंत एक्स्प्रेस विद्युतलाइन टाकण्यात आली. तरीदेखील पुढच्या वर्षी उन्हाळ्यात पुन्हा एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला. आहिल्या धरणावर ८४ लाख रुपये खर्च करून जलशुद्धिकरण व जलकुंभ बांधण्यात आले. सिंहस्थ २०१५च्या निमित्ताने गौतमी-बेझे योजना आली. त्या सोबत शहरातील जुनाट झालेली वितरण व्यवस्था नव्याने सुरू करण्यात झाली.

पाणीपट्टी कमी करण्याची मागणी

सन २०००च्या दरम्यान पाणीपट्टी अवघी ९० रुपये होती. ती आता १२०० रुपये झाली आहे. दरवर्षी यात वाढ करण्यात येत आहे. त्र्यंबक ग्राहक पंचायतीने पाणीपुरवठा एक दिवसाआड केल्याने पाणीपट्टीही कमी करावी, अशी मागणी केली जात आहे.

अपुरे मनुष्यबळ

त्र्यंबक नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. पाणीपुरवठा अभियंता अथवा सक्षम अधिकारी नाही. तीन योजना असतांना पावसाळ्यातही पाणी पुरवठा होत नाही. शहराच्या सर्व भागात समान दाबाने आणि सारखा पाणीपुरवठा होत नाही.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाणीसाठा आढावा घेण्यात आला. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाने एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाऊस लांबल्यास पुढे अडचण निर्माण होऊ नये म्हणून आज पाण्याची बचत करणे आवश्यक आहे.—डॉ. चेतना केरूरे, मुख्याधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या वाईनची थायलंडमध्ये चढणार नशा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। नाशिक

देशाची वाईन राजधानी नाशिक आता पाच दिवसीय 'थायफेक्स' या आशियातील सर्वात मोठ्या 'फूड अँड बेवरेजेस एक्स्पो'मध्ये झळकण्यासाठी सज्ज आहे. बँकॉकमध्ये हा एक्स्पो ३१ मे ते ४ जून २०१७ या कालावधीत होणार आहे. विशेष म्हणजे नाशिकच्या उत्तम वाईनवर पहिल्यांदाच लघुपट तयार करण्यात आला असून त्याचे चित्रीकरण सोमा वाईन विलेजमध्ये पार पडले. या लघुपटाचा कालावधी २५ मिनिटांचा आहे.

या लघुपटात नाशिकच्या वाईनचा द्राक्षबागा ते उत्पादन निर्मितीच्या अंतिम टप्प्यापर्यंतचा रंजक प्रवास चित्रित करण्यात आला आहे.

भौगोलिक निर्देशनानुसार एकूण १० उत्पादने डिस्प्लेसाठी निवडण्यात आली होती. त्यापैकी तीन उत्पादनांची निवड लघुपटासाठी करण्यात आली, ज्यामध्ये नाशिकच्या वाईनचाही समावेश होता. वाईनव्यतिरिक्त अन्य दोन भारतीय उत्पादनांची निवड झाली, त्यात केरळचा नावारा तांदूळ आणि रत्नागिर, तसेच सिंधुदुर्गातील कोकमाचा समावेश आहे.

या एक्स्पोचे आयोजन थायलंडचे डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन (डीआयटीपी), थाय चेंबर्स ऑफ कॉमर्स आणि व्यापारी प्रदर्शने भरवणारी कोयलनमेसी पीटीई लिमिटेड, सिंगापूर यांनी संयुक्तपणे केले आहे.

सोमा वाईन व्हिलेजचे सीएमडी प्रदीप पाच पाटील या बाबत बोलताना म्हणाले, ‘नाशिकमधल्या वाईन यार्डमध्ये (द्राक्षबागा) वाईन कशी तयार केली जाते, याविषयीचा २५ मिनिटांचा लघुपट जगातल्या सर्वांत मोठ्या व्यापारी प्रदर्शनात दाखवला जाणार आहे, ही नाशिककरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. बँकॉक येथे होणाऱ्या जगातल्या सर्वांत मोठ्या अन्न व पेय व्यापार प्रदर्शनात ‘जीआय टॅग’सह नाशिकच्या वाईनची माहिती दाखवण्यात येणार आहे.’

या लघुपटाचे स्पेन येथील दिग्दर्शक बॅटिस्ट मायगॉल यांनी सांगितले की, ‘संघटित सरकार आणि असोसिएशन ऑफ युरोप यांच्या मदतीने आम्ही एक माहितीपट बनवत आहोत. बॅंकॉकमधल्या व्यापारी प्रदर्शनात हा माहितीपट दाखवण्यात येणार आहे. नाशिकची वाईन सर्वोत्कृष्ट का आहे, ती कशी बनवली जाते आणि तिला “जीआय टॅग” कशाबद्दल देण्यात आला आहे, यावर या माहितीपटाचा भर असणार आहे.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुटकेनंतर जवान चंदू उद्या धुळ्यात येणार

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। धुळे

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातून सुटका होऊन आपल्या मायदेशी परतलेला '३७ राष्ट्रीय रायफल्स'चा जवान चंदू चव्हाण तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच उद्या, शनिवारी धुळ्यातील आपल्या बोरविहिर या गावी येणार आहे. आपला चंदू गावी येणार हे समजताच त्याचे कुटुंबीय आणि गावकरी यांना एखादा सण असल्यासारखे वाटत आहे. त्यांनी जवान चंदूच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. जवान चंदू ज्या मार्गाने गावात प्रवेश करेल तो मार्ग रांगोळीने सुशोभित करण्यात येणार आहे. शिवाय त्याचे औक्षणही करण्यात येणार आहे.

याबरोबर, बोरविहिर गावच्या महिला मंडळींनी जवान चंदूच्या आवडीच्या जेवणाचा खास बेत देखील आखला आहे.

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर २९ सप्टेंबर २०१६ या दिवशी जवान चंदू चव्हाण नजरचुकीने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानाच गेला होता. चंदूला भारताच्या ताब्यात देण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. भारताच्या प्रयत्नांनंतर अखेर २१ जानेवारी २०१७ या दिवशी पाकिस्तानने चंदूची सुटका केली होती.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करातील वरिष्ठ अधिकारी यांनी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते. चंदूच्या सुटकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉ. सुभाष भामरे काही कारणास्तव धुळ्यात येऊ शकणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदू चव्हाण आज धुळ्यात परतणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या कचाट्यातून सुखरूप परतलेला धुळ्याचा जवान चंदू चव्हाण आज, शनिवारी धुळ्यात परतत आहे. चंदू गावी येतोय असे कळताच संपूर्ण खान्देशमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

चंदूला पाकिस्तानच्या सैन्याने पकडले असे कळताच मानसिक धक्का बसून त्याची आजी लिलाबाई यांचे निधन झाले. मात्र चंदू परत येणार की नाही याविषयी खात्री नसतानाही त्याचा भाऊ, आजोबा यांनी चंदूच आजीच्या अस्थींचे विसर्जन करेल असे ठरविले होते. त्यानुसार आता उद्या, रविवारी चंदूच्या हस्ते आजींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे, असे चंदूचा भाऊ भूषण चव्हाण याने सांगितले.

भारतीय सैन्यदलाच्या प्रयत्नांमुळे ३७, राष्ट्रीय रायफल्सचा जवान चंदू सुखरूप भारतात परतला. तब्बल नऊ महिन्यांनंतर तो शुक्रवारी सायंकाळी दिल्ली येथून विमानाने भाऊ भूषणसह इंदूर येथे आणि तेथून कारने बोरविहीर गावी परतणार आहे. आज दुपारपर्यंत चंदू धुळ्यात पोहोचेल. त्यानंतर गावामध्ये त्याची मिरवणूकही काढण्यात येणार आहे.‍

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images