Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

नाशिकच्या वाइनला जीआय टॅग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

भौगौलिक उपदर्शनामुळे (जिऑग्राफीकल इंडिकेशन किंवा जीआय टॅग) कोकणातील कोकमे, नाशिकची वाइन आणि महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी जागतिक व्यासपीठावर पोहोचणार आहेत. जीआय टॅग मिळाल्यावर या पदार्थांच्या गुणवत्तेचा दर्जा सिद्ध होईल. यासाठी युरोपियन युनियनचा पाठिंबा मिळाला असून या माध्यमातून राज्यातील हे तीनही वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ १०७ हून अधिक देशांपर्यंत पोहोचणार आहेत. दार्जिलिंगच्या चहाला आज जगभरात जे स्थान आहे तेच स्थान राज्यातील या तीन पदार्थांना मिळण्याचा हा प्रवास सुरू झाला आहे.

राज्यामध्ये एकूण २८ जीआयवर काम झाले असून त्यातील २६ जीआय शेतीविषयीचे आहेत. यामध्ये २४ पदार्थांची नोंद झाली असून दोन पदार्थ अंतिम टप्प्यात आहेत. मात्र केवळ पदार्थांची नोंद होऊन शेतकऱ्यांना फायदा झाला नसता त्यासाठी व्यासपीठाची गरज आहे. त्या अनुषंगाने युरोपियन युनियन आणि भारतात करार झाला असून या पदार्थांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या व्यासपीठाच्या बळावर या वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. थायलंडमध्ये ३१ मेपासून थाईफेक्स २०१७ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला सुरुवात होत आहे. या प्रदर्शनामध्ये भारतातील एकूण १० वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ सादर होणार आहेत. यात कोकणातील कोकम, नाशिकमधील वाइन आणि महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी यांचा समावेश आहे. या पदार्थांना जागतिक व्यासपीठ देणारे हे पहिले प्रदर्शन आहे.

ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीचे अध्यक्ष आणि जीआयसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कारविजेते प्रा. गणेश हिंगमिरे यांनी ही माहिती दिली. हे पदार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी हिंगमिरे यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कालिदास’ झळाळणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिराच्या दुरवस्थेबद्दल शहरात उमटलेल्या एकूण प्रतिक्रिया पाहता लवकरच ‘कालिदास’चे नूतनीकरण होणार असून, याबाबत महापालिकेने टेंडरदेखील काढले आहे. शहरातील नाट्यगृहांच्या बाबतीत ‘मटा’ने कॅम्पेन सुरू केल्यानंतर त्यात कालिदास कलामंदिराची दुरवस्थाही मांडली होती. त्याच पार्श्वभूमीवर ‘कालिदास’च्या नूतनीकरणाची लगबग सुरू झाली आहे.

नाशिकच्या सांस्कृतिक विभागाचे नाक असलेल्या कालिदास कलामंदिराची काही महिन्यांपासून दुरवस्था झालेली आहे. येथील स्वच्छतागृहांची कमालीची तुटफूट झालेली असून, बेसिनही तुटलेल्या अवस्थेत आहेत. कलाकारांच्या मेकअप रूममधील स्वच्छतागृहे घाणेरड्या अवस्थेत आहेत. कालिदास कलामंदिर हे सांस्कृतिक घडामोडींचे मुख्य केंद्र असले, तरीही त्याकडे महापालिकेचे त्याप्रमाणात लक्ष नव्हते. ‘कालिदास’ची स्थिती सामान्य माणसाच्या फारशी लक्षात येत नसली, तरी जाणकाराला मात्र अनेक खटकणाऱ्या बाबी आढळल्या आहेत. स्वच्छतागृहांची कमालीची दुरवस्था झालेली असून, येथे सतत दुर्गंधी येत असते. ‘कालिदास’मध्ये बरेच साहित्य अडगळीत पडलेले असून, तेथे डासांचे प्रमाणही अधिक आहे. जेवणाच्या व्यवस्थेचीही तशीच बोंब असून, बाहेरून येणारा कलाकार हातात ताट घेऊन जेवण करतो. अद्यापही त्याच्या बसण्याची सोय करण्यात आलेली नाही. जेवणासाठी जी रूम दिलेली आहे ती दिव्यच असून, तेथे सतत अंधारलेली परिस्थिती असते. कालिदास कलामंदिराचे अनेक वेळा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, येथील खुर्च्यांची परिस्थिती जैसे थेच आहे. अनेक खुर्च्या मोडकळलेल्या अवस्थेत असून, आताआताच काही खुर्च्या बदलण्यात येत आहेत. आतमध्ये गेल्यानंतर असलेल्या चिल्ड्रेन रूमची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. या ठिकाणी लहान मूल घेऊन कुणी बसूच शकत नाही. कारण, तेथे मद्यपींचा नेहमीच वावर असतो. तेथील खुर्च्या तुटलेल्या असून, स्पीकरदेखील खराब झालेला आहे. या साऱ्या उणिवा ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेला टेंडर काढण्याची उपरती आली असून, लवकरच नाशिककरांना एक आधुनिक नाट्यगृह पाहायला मिळणार असल्याने कलावंतांनी समाधान व्यक्त केले आहे.


प्रोसेसनंतर होणार कार्यवाही

महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यात ‘कालिदास’चा मोठा वाटा आहे. एकही दिवस या कलामंदिराची तारीख रिकामी राहत नाही. नाटक, एकांकिका, बालनाट्ये, शाळांची स्नेहसंमेलने असे अनेकविध कार्यक्रम येथे होत असतात. परंतु, असे असतानाही ‘कालिदास’च्या मेंटेनन्सकडे महापालिका अजिबात लक्ष देत नसल्याची स्थिती आहे. स्वच्छतागृहाचे पाइप फुटलेले, नळ तुटलेले, तसेच पाण्याची व्यवस्था नाही. खाण्यापिण्याची पाकिटे खुर्च्यांखालीच टाकलेली असतात, अशी ‘कालिदास’ची एकूणच दुरवस्था ‘मटा कॅम्पेन’ प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर महापालिकेने तातडीने दुरुस्तीबाबत टेंडर काढले आहे. टेंडर भरल्यानंतर प्रोसेस होऊन लगेचच ‘कालिदास’च्या कामाला सुरुवात होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळ्यात कडकडीत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी तसेच संबंधित आरोपीला या कृत्यात सहकार्य करणाऱ्यांनाही कठोर शासन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी (दि. ११) देवळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे दिवसभर शहरात शुकशुकाट होता. या बंद दरम्यान शहरात ‌कोणताही गैरप्रकार झाला नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

देवळा बंदमध्ये सर्व व्यापारी व सर्वसामान्य जनतेने अत्यावश्यक सेवा वगळता उत्स्फूर्त सहभाग घेतला. याबाबत देवळा पोल‌िस ठाणे व तहसीलदारांना देवळावासीयांकडून संशयितास कठोर शिक्षा करण्यात यावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

देवळा शहरातील वाढती गुन्हेगारी व छेडछाडीचे प्रकार नित्याने घडत असल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शहरातील बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला एका मुलाने फूस लावून पळवून नेले आहे. त्याच्या निषेधार्थ तसेच संबंधित आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या संशयित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी सर्वपक्षीय देवळा बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडता सर्व घटकांनी बंदमध्ये सहभाग घेतला आहे. आजचा बंद यशस्वी करण्यासाठी देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लक्ष्मीकांत आहेर, ज्येष्ठ नगरसेवक अशोक आहेर, गटनेते जितेंद्र आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर, दिलीप आहेर, नगरसेवक अतुल पवार, बाळू आहेर, प्रदीप आहेर, सामाजिक कार्यकर्ते पंकज अहिरराव, मनसेचे तालुकाध्यक्ष योगेश आहेर, केदा वाघ, शिवराजे मित्रमंडळाचे अध्यक्ष किरण आहेर, बाबाजी निकम, उमेश आहेर, रघु नवरे, राजेंद्र देवरे, सतीश सूर्यवंशी, चेतन आहेर, अशोक आहेर, विजय आहेर आदींसह ग्रामस्थांनी, व्यापारी बांधवांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी बापुरावांचा उलटा पायी प्रवास

$
0
0

म. टा. वृतसेवा, मालेगाव

गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी राज्यभरात लाखोंच्या संख्येने निघणारे समाजबांधवांचे मोर्चे लक्षवेधी ठरले आहेत. मोर्चे निघूनही मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नाही. आरक्षणाच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ‘त्या’ अवलियाने मात्र अनोखा मार्ग अवलंबला आहे. पुणे येथील ५७ वर्षीय बापूराव उर्फ श्रीपतराव दगडोपंत गुंड यांनी पुणे ते दिल्ली उलटा पायी प्रवास सुरू केला आहे. या अनोख्या प्रवासादरम्यान बापूराव झोडगे गावी मुक्कामाला आले होते.

वेगवेगळ्या कारणासाठी पायी प्रवास करणारे अनेकांनी पहिले असतील. परंतु, मराठा आरक्षणासाठी उलटा पायी प्रवास करणारे बापूराव मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चात ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा चांगलीच लोकप्रिय ठरली. याच घोषणेने बापूराव प्रभावित झाले आहेत. ५ मार्च रविवार ते झोडगे येथे मुक्कामी आले होते. झोडगे येथील तरुणांना त्यांच्या या प्रवासाची माहिती सोशल मीड‌ियावर मिळाल्याने त्यांना भेटण्यासाठी सगळेच उत्सुक होते. त्यांनी मराठा आरक्षणासोबत विविध विषयांवर आपले मते व्यक्त केले.

लक्षवेधी वेशभूषा

गुंड यांनी परिधान केलेली वेशभूषा देखील लक्षवेधी आहे. जाडजुड पिळदार मिशा, डोक्यावर छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला टोप, कळ्यात लाल तबकडी माळा, हातात भगवा झेंडा, अंगात खास आरक्षणाच्या संबंधी विविध मागण्या असलेला टी शर्ट असा हटके लूक आहे.

मराठा आरक्षणाबाबत पायी प्रवास करण्याचे मनात होते. परंतु, मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा उलटा पायी प्रवास सुरू केला आहे. या प्रवासा दरम्यान गावागावात स्वागत होत आहे. लोकांशी संवाद साधला की ऊर्जा मिळते.

- श्रीपतराव गुंड

असा आहे प्रवास…

पुणे ते दिल्ली १ हजार १०० किमीचा प्रवास

२२ फेब्रुवारीपासून फुरसिंगी येथून प्रवासाला सुरुवात

मराठा आरक्षणासाठी दिल्लीत केंद्र सरकारला निवेदन देणार

पुणे ते झोडगे ४०० किमीचा टप्पा १५ दिवसात केला पार

साधारण ५० दिवसात दिल्लीला पोहचण्याचे लक्ष

दिवसभरात २५ किमी अंतर चालतात

रस्त्यावरील गाव, वस्ती कुठेही मुक्काम करतात

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकीस्वार तरुण अपघातामध्ये ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव वेगातील दुचाकीसमोर कुत्रा आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही शरणपूररोडवरील राजीव गांधी भवन जवळ घडली. जखमी विद्यार्थ्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघात गुरुवारी मध्यरात्री घडला.

सागर नारायण कडभाने (२४, रा. रामनगर, सायखेडा, ता. निफाड) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, त्याचा देवेन माळी हा मित्र जखमी झाला आहे. गंगापूररोडवरील मोतीवाला कॉलेजचे हे दोघे विद्यार्थी आहेत. गुरूवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास सीबीएसकडून शरणपूररोडमार्गे ते दुचाकीने (एमएच ४६ एएल ५४१६) कॅनडा कॉर्नरकडे येत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. राजीव गांधी भवन परिसरातील तनिष्क शोरूमसमोर त्यांच्या भरधाव दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा गेल्याने अपघात घडला. यामुळे भरधाव वेगातील दुचाकी दुभाजकावर आदळली आणि हेल्मेट परिधान न केलेले सागर कडभाने व त्याचा मित्र देवेन माळी दूरवर फेकले गेले. कडभानेच्या डोक्यासह इतर ठिकाणी गंभीर जखमा झाल्यात. अतिरक्तश्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला. माळी देखील गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक धर्मेंद्र माळी करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदाराला गंडविण्याचा प्रयत्न

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सनद घेतलेली नसताना वकिली करून सामान्यांना गंडा घालणाऱ्या तोतया वकिलाच्या अटकेनंतर अनेक कारनामे समोर येत आहे. तोतया वकिलाने काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक व विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाही याचिका मागे घेण्यासाठी ब्लॅकमेल करीत तब्बल ५० ते ६० लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी आमदार हिरे यांच्या तक्रारीनुसार, गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, यामुळे खळबळ उडाली आहे.

बाळासाहेब अनंत चौधरी उर्फ गोपाळ अनंत अडावदकर (रा. मंदार सोसा., गोळे कॉलनी) असे संशयित तोतया वकिलाचे नाव आहे. वकिलीची पदवी नसताना चौधरीने जिल्हा तसेच हायकोर्टात व्यवसाय करीत असल्याचे चित्र रंगवून ज्येष्ठ वकिल रमेश बाफना यांना लाखो रुपयांना गंडविले आहे. अनेक वर्षे मालमत्तेच्या वादात बाफना यांचे हायकोर्टात चौधरीने काम पाहिले. या काळात त्याने बाफना यांच्याकडून मोठी रक्कम उकळली. चौधरीची तोतयागिरी लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. बाफना यांनी त्याच्या पदवीवर आक्षेप नोंदवित कायदेशीर लढा सुरू केला. यात चौधरीचे पितळ उघडे पडले. कोर्टाने त्याच्या वकिलीस प्रतिबंध घालून अटक करण्याचे आदेश सरकारवाडा पोलिसांना दिले होते. सध्या चौधरी नाशिकरोड कारागृहात आहे. दरम्यान चौधरीचा पर्दाफाश झाल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये चौधरीविरोधात फिर्याद दिली.

२०१२ मध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असललेल्या हिरे यांच्या समर्थ महिला मंडळाविरोधात चौधरीने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. जागेच्या वापराबाबत हा मुद्दा होता. या याचिकेत चौधरीने निवृत्त आयकर आयुक्त, नवी दिल्ली व लिगल प्रॅक्टीशिनल असल्याची नोंद नमुद करून याचिका मागे घेण्याच्या बदल्यात ५० ते ६० लाख रुपयांची लाच मागितली होती. ही जनहित याचिका अद्यापही हायकोर्टात न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, चौधरीला कोणतेही अधिकार नसताना फसवणुकीच्या दृष्टीकोनातून त्याने संपर्क साधल्याचे समोर आल्याने आमदार हिरे यांनी गंगापूर पोलिसांकडे फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रदेश पातळीकडे सर्वांच्या नजरा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत प्रमुख राजकीय पक्षांनी स्थानिक युती व आघाडी करून सत्ता स्थापनेचे मनसुबे आखले असले तरी प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयामुळे त्यांना ब्रेक लागला आहे. राज्य पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादीने राज्यात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपाने व शिवसेनेबरोबर प्रदेश पातळीवर युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षात काय निर्णय होतो यावरच जिल्हा परिषदेच्या सत्तेचा मार्ग सुकर होणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी प्रदेश पातळीवर होणाऱ्या निर्णयामुळे सर्वांचा तूर्त तरी सर्वांचा गोंधळ वाढला आहे. शिवसेनेची या संदर्भात बुधवारी मुंबईत बैठक झाली असून अद्याप चर्चाच सुरू आहे.तर भाजपाच्या तीन बैठका जिल्हा परिषदे संदर्भात झाल्या आहे. आता अंतिम निर्णय घेण्यासाठी एक बैठक होणार आहे. त्यानंतर राज्याबरोबरच नाशिकचे चित्र स्पष्ट होणार आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेने काँग्रेसबरोबर आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या तर भाजपने राष्ट्रवादी बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्याचे मनसुबे आखले. पण या सर्व पक्षाच्या या हालचालीला तूर्त प्रदेश पातळीमुळे ब्रेक लागला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ सदस्यांमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य निवडून आले. त्याखालोखाल राष्ट्रवादीचे १८, भाजप १५, काँग्रेस ८, माकप ३, अपक्ष ४ सदस्य आहेत. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनासाठी ३७ मॅजिक फिगर लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेने आपल्या २५ सदस्याबरोबर काँग्रेसचे ८ सदस्य बरोबर घेऊन अपक्ष व माकपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. तर दुसरीकडे भाजपने आपल्या १५ सदस्याबरोबर राष्ट्रवादीचे १८ सदस्य बरोबर घेऊन अपक्षांशी बोलणी पूर्ण केली. त्यामुळे ऐनवेळी प्रदेश पातळीवर स्थानिक नेत्यांना अधिकार दिल्यास ही आघाडी व युती प्रत्यक्षात येणार आहे. राज्यात काही ठिकाणी शिवसेना व भाजपला एकमेकांची गरज आहे. आघाडीचीही तशीच स्थिती आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवर होणारे निर्णय भाजप-शिवसेनेला एकत्र करणारा असला तरी राष्ट्रवादी व काँग्रेसची अडचण होणार आहे. शिवसेनेला मात्र निर्णय काही झाला तरी सत्ता स्थापनेची संधी आहे.

पंचायत सभापतीची मंगळवारी निवड
जिल्ह्यात आघाडी व युतीच्या हालाचील सुरू असून १५ पंचायत समितीतही सभापतीच्या हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक तालुक्यातील तेथील राजकीय समीकरण लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे तूर्त ठरले आहे. येत्या मंगळवारी (दि. १४) या निवडणुका होणार असून प्रत्येक तालुक्यात पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार असणार आहे.

स्थानिक पातळीवर आम्ही तयारी केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख काय निर्णय देतात त्यावर सर्व अवलंबून आहे. त्यांच्याकडून निर्णय झाल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली गतिमान होतील.
- दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

जिल्हा परिषदेची सर्व जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. याबाबत रविवारी (दि. १२) चित्र स्पष्ट होईल. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होतो, त्यावर सर्व अवलंबून आहे.
- दादा जाधव, जिल्हाध्यक्ष भाजप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरणारा फरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती सिलिंडरमधील गॅस अवैधरित्या वाहनात भरीत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता संशयित रिकामी व भरलेले सिलिंडर तसेच मशिनरी सोडून फरार झाल्याची घटना बागवानपुरा भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, १४ हजाराच्या साहित्यासह घटनास्थळी उभी असलेली शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी मारुती व्हॅन पोलिसांनी जप्त केली आहे.

बागवानपुरा येथील सार्वजनिक ठिकाणी घरगुती सिलिंडरमधून वाहनात अवैधरित्या गॅस भरला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. मात्र, पोलिस येत असल्याचे समजताच संशयित फरार झाला. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या रिकाम्या व भरलेल्या टाक्या, इलेक्ट्रिक मोटार, लोखंडी टॉलवर मशिन असे वाहनात गॅस भरण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. सुमारे १४ हजार रुपयांच्या या मुद्देमालासह घटनास्थळी उभी असलेली शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी मारुती व्हॅन पोलिसांनी जप्त केली. या व्हॅनच्या मालकाचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक लांडे करीत आहेत.

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
नाशिकरोड उड्डाणपूल येथे काही महिन्यापूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हॅन गॅस लिक झाल्याने जळून खाक झाली होती. सुदैवाने चालकाला विद्यार्थ्यांना वेळीच व्हॅनमधून बाहेर काढता आले. यानंतर, पोलिस व प्रादेशिक परिवहन विभागाने अनधिकृत गॅस कीट वा इंधन वापर करणाऱ्या चालकांना रडारवर घेतले. मात्र, ही कारवाई थंडावताच पुन्हा अलबेल झाल्याचे चित्र बागवानपुरा येथील कारवाईमुळे समोर आले आहे. भद्रकाली पोलिस जप्त केलेल्या स्कूल व्हॅनच्या मालकाचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिकाऊ मेकॅनिक सुसाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शिकाऊ मोटार मेकॅनिककडून अनियंत्रित झालेली बस पंचवटी डेपोतील वाहन परीक्षक कक्षात शुक्रवारी शिरली. या अपघातात पाच जण जखमी झाले. यातील एकास जबर मार लागला आहे. दरम्यान, बस चालविणारा संबंधित मेकॅनिक फरार झाला असून त्याचा उशिरापर्यंत तपास लागला नव्हता.

पंचवटी डेपोत शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. डेपोतील वाहन परीक्षक कक्षात सकाळी साडेनऊच्या सुमारास अरविंद राजे, नानासाहेब पाटील, सतीश कोळी हे आपापली कामे करीत असताना शिकावू मोटार मेकॅनिकने दुरुस्तीसाठी आलेली बस (एमएच १५ एके ८०७१) चालविण्याचा प्रयत्न केला. त्याला मुळात बसचा चालविण्याचा अनुभव नव्हता. तरीही तो बस सुरू करायला गेला. यावेळी सुरू केलेल्या बसवर त्याला नियंत्रित मिळविता आले नाही. वेगाने निघालेली बस थेट समोर असलेल्या वाहन परीक्षक कक्षाला थेट जाऊन धडकली. बसचा आघात इतका जबरदस्त होता की यात पक्के बांधकाम असलेल्या वाहन परीक्षक कक्षाची भिंत कोलमडून पडली. तसेच या कक्षाशेजारीच उभी असलेली मोपेड गाडी या भितींखाली दबली गेली.बसची पुढील काच फुटली. वाहन परीक्षक अरविंद राजे, नानासाहेब पाटील, वाहन नियंत्रक सतीश कोळी, चालक सुनील शिंदे आणि भास्कर साळवे हे पाच जण जखमी झाले. यापैकी राजे यांना जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्वरित हलविण्यात आले. अपघाताची बातमी परिसरात वेगाने पसरली. त्यामुळे अनेकांना पंचवटी डेपोमध्ये गर्दी केली. अपघातानंतर शिकाऊ मोटार मेकॅनिकने तेथून पळ काढला. तो अद्याप सापडला नव्हता.

मेकॅनिकचे नाव कळेना!
शिकाऊ मोटार मेकॅनिकचे नेमके नाव काय? तो मूळ कुठला? तो किती दिवसांपासून पंचवटी डेपोमध्ये गाड्या दुरुस्तीचे काम करतो? याबाबत कोणतीही माहिती सायंकाळी उशिरापर्यंत एसटी महामंडळाकडून देण्यात आली नाही. विशेष म्हणजे पोलिसांकडेही माहिती नव्हती. त्यामुळे या प्रकरणी लपवाछपवी तर केली जात नाही ना, अशी एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

बाहेर अपघात झाला तर आम्ही तातडीने कारवाई करतो. पण हा अपघात आमच्याच डेपोमध्ये झाला आहे. त्यामुळे अंतर्गत विषय असल्याने घटनेची अगोदर चौकशी केली जाईल. कोणी व्यक्ती दोषी आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल. बस दुरुस्तीसाठी डेपोत आलेल्या बसकडून हा अपघात झाला आहे.
- यामिनी जोशी, विभाग नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्सिंग होमवर पालिकेची वक्रदृष्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्यभरातील सर्व नर्सिंग होम व खासगी रुग्णालयांच्या परवानग्यांसंदर्भात उच्च न्यायालयाने जाब विचारल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. मॅटर्निटी, नर्सिंग होम व हॉस्प‌िटल्स चालवण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असतानाही शहरातील तब्बल ३८३ हॉस्प‌िटल्सनी नूतनीकरण केलेले नाही. पालिकेच्या वैद्यकीय विभागानेच ही आकडेवारी जाहीर केल्याने ही हॉस्प‌िटल्स बेकायदा सुरू असल्याचे समोर आले आहे.
शहरातील ५६६ मॅटर्निटी, नर्सिंग होम व हॉस्प‌िटल्सपैकी केवळ १८३ जणांकडेच परवाना आहे. २७१ हॉस्पीटल्सनी परवानगीसाठी अर्ज केले असले तरी, वैद्यकीय विभागाने त्यांना अद्याप परवाना दिलेला नाही. विशेष म्हणजे १५३ हॉस्पीटल्सनी अद्याप नूतनीकरणासाठी अर्जच केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागासह हॉस्प‌िटल्सची बेफिकीरी समोर आली आहे.
राज्यातील अनधिकृत मॅटर्निटी, नर्सिंग होम्स व हॉस्प‌िटल्सच्या परवानगीसंदर्भात पुण्यातील अतुल भोसले यांनी अॅड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आहे. गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांनी ती दाखल करून सरकारचा राज्यातील किती हॉस्पिटल्स परवानाधारक आहेत, याची आकडेवारी कोर्टासमोर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. म्हैसाळ येथील घटनेनंतर या परवानग्यांचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे महापालिकेचा वैद्यकीय विभाग जागा झाला आहे. मुंबई शुश्रृषागृहे अधिनियम, १९४९ व सुधारीत नियम, २००६ अन्वये महापालिका क्षेत्रात कार्यरत असलेली रुग्णालये व प्रसुतीगृहांना नर्सिंगहोम रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
वैद्यकीय विभागाने शुक्रवारी शहरातील मॅटर्निटी, नर्सिंग होम्ससह हॉस्प‌िटलच्या नूतनीकरणाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात शहरात ५६६ एकूण हॉस्पीटल्स असून, त्यात १८२ मॅटर्निटी होम व ३८४ हॉस्प‌िटल्स आहेत. परंतु, १८२ मॅटर्निटी होमपैकी १०५ मॅटर्निटी होमनीच नूतनीकरण केले आहे. ७७ मॅटर्निटी होम हे नूतनीकरणाविना सुरू आहेत. ३८४ हॉस्प‌िटल्सपैकी केवळ ७८ हॉस्प‌िटल्सनीच आपला परवाना नूतनीकरण केला आहे. ३०६ हॉस्प‌िटल्स विनापरवाना सुरू आहेत. नूतनीकरण केलेल्या ३८३ पैकी २३० हॉस्पिटल्सनी नूतनीकरणासाठी अर्ज केले असून, ते पाइपलाइनमध्ये आहेत. १५३ हॉस्प‌िटल्सनी अद्याप अर्जच केलेले नाहीत.
फायर अॅक्टची अडचण
दरम्यान, परवान्यांच्या नूतनीकरणाला नवा फायर सेफ्टी अॅक्ट कारणीभूत ठरला आहे. कोलकाता येथील दुर्घटनेनंतर आलेल्या या अॅक्टमध्ये हॉस्प‌िटल्सच्या परवानग्या अधिक कडक करण्यात आल्या असून, त्यात २० हजार लिटर पाण्याची टाकी, रस्ता रुंदीसह अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. त्या अटी बहुसंख्य हॉस्प‌िटल्सना पूर्ण करणे शक्य नाही. त्यामुळे काही जणांनी कोर्टातही धाव घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना घरे ‌मिळाली, ना गुन्हा दाखल झाला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
घरखरेदी केल्यानंतर जीवन सार्थक होण्याचा आनंद कुटुंबाला मिळतो. गरीब असो वा श्रीमंत, घराची ऊब प्रत्येकासाठी महत्वाची असते. मात्र, सध्या पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांना घरखरेदीचे हेच स्वप्न त्रासदायक ठरू पाहत आहे. पोलिसच पोलिसांची तक्रार दाखल करून घेत नाहीत. वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून, लवकरच हा प्रश्न कोर्टापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
आडगाव परिसरातील पोलिस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर पोलिसांसाठी एैसपैस संकुल असावे, यासाठी २०१० मध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सोसायटी स्थापन केली. तब्बल २९४ सदनिका उभारण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक मिलिंद भारांबे यांनी पुढाकार घेतला. भारांबे सध्या मुंबईत पोलिस महानिरीक्षक म्हणून वाहतूक विभागाचा कार्यभार पाहतात. भारांबे सोसायटीच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष झाले. स्वतः भारांबे यांनी अग्रस्थानी असल्याने महाराष्ट्र तसेच मुंबई पोलिस सेवेतील तब्बल २८८ जणांनी घरे बुक केली. यात कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश होता. बांधकामाचे भूम‌िपूजन झोकात झाले. २०१२च्या अखेरीस पोलिसांना घर मिळणे अपेक्ष‌ित होते. मात्र, अद्याप सोसायटीने किंवा बिल्डरने सदस्यांना घरांचा ताबा दिलेला नाही. घरांसाठी नाशिकरोड येथील एका राष्ट्र‌ियीकृत बँकेकडून बहुतांश सदस्यांनी कर्ज घेतले. कर्जाचे हप्ते देखील सुरू झाले. एकीकडे घराचा ताबा मिळत नाही, तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते भरावे लागत असल्याची खंत काही सदस्यांनी बोलून दाखवली. या प्रकरणात मोफ्फा कायद्याचे उल्लंघन केल्याचे अनेक पुरावे सदस्य असलेल्या पोलिसांकडे आहेत. मात्र, यात भारांबे यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव येत असल्याने कारवाई होत नाही. सोसायटीचे सचिव असलेले पोलिस निरीक्षक देवीदास शेळके यांचीही आता दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली आहे.

आमच्याकडे व्हॅट आणि सर्व्हिस टॅक्सची अतिरिक्त रक्कम मागितली जात आहे. २०१२ मध्ये घरे ताब्यात मिळाली असती, तर हे नवीन कर आमच्या माथी आले नसते.
- विनय केदार, तक्रारदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवमोगरा देवीच्या यात्रेस सुरुवात

$
0
0

नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथे तयारी जोरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्डीपाडा येथील देवमोगरा देवीचे मंदिर विसरवाडी गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नाही. अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे. पायथ्यापासून सुमारे २६४० फूट अंतर पार करून या देवीच्या दर्शनाला जावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमधील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या आमावस्येला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते, याची तयारी आता सुरू झाली आहे.

गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती नंदुरबारमधील बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. तसेच आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडे घालायला या ठिकाणी येतात. कणीपूजन करून मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात. या यात्रेसाठी आदिवासी बांधव १५ दिवसांपासून तयारीला लागतात. मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. मंदिराच्या पायथ्याशी सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेल्या कच्च्या रस्त्याची पायवाट आहे. तेथूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक मार्गस्थ होतात.

देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत ‘याहा मोगी’ म्हटले जाते. ‘याहा’ म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहा मोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून देवत्व बहाल केले. आदिवासी भाषेतच देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा-विधी होतात. आजही धान्य, वन भाजी, तांदळाची व ज्वारीची भाकरी आणि मव्हाच मद्य (दारू) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी ग्रामदैवत देवमोगरा देवीची माहिती सांगतात.

प्रशासनाची उदासीनता

आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून, नवापूर तालुक्यातील आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग पहाडातून आणि दऱ्या, खोऱ्यातून, कच्या रस्ताने भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. तरी देवदर्शनासाठी प्रवास सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधवांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठासाठी युवासेनेचा रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे आणि धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवासेनातर्फे बुधवारी (दि. १) पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. या वेळी युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्यासह अनेक युवासैनिकांना पोलिसांनी कारवाई करीत अटक करून सुटका केली.

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे निर्णय नेहमीच घेतले जात असून याविरुद्ध जिल्हा युवा सेनेने हे आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. पारोळा चौफुलीवर हे रास्तारोको आंदोलन करून राज्य सरकारच्या धोरणाविरोधात युवकांनी घोषणाबाजी केली.

याआधीही युवासेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढून निवेदन दिले होते. कृषी विद्यापीठ धुळ्यात साकारून जिल्ह्याला न्याय देण्यात यावा, शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हा निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र शहरात उभारले जावे, यासारख्या मागण्यासाठी युवासेनेने आंदोलन केले. यासाठी देवूपरातील सर्व्हे नं. १११ व ११२ या जागेचा मनपाने पुन्हा ठराव करून उपकेंद्रासाठी जागा देण्यात यावी. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महाराष्ट्र राज्यात एकच विद्यापीठ करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. रेखा चौधरींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

धुळे : नंदुरबार येथील डॉ. रेखा चौधरी यांना भारताच्या वेलनेस ब्रॅन्ड ऍम्बेसेडर सहित दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी’ हा पुरस्कार एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज यांच्यावतीने रेखा चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मराठमोळ्या संस्कृती आणि नंदुरबारसाठी ही अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यात रशिया, यु. के., स्पेन आणि अाफ्रिका त्याचप्रमाणे अनेक देशातील जनरल कौन्सिल, राजदूत व मंत्री, अधिकारी यांचा सहभाग होता. डॉ. चौधरी यांना दुसरा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला तो फेमिना महिला विशेष अच‌व्हिर पुरस्कार. २०१६-१७ या वर्षात आरोग्य, ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा अॅवॉर्ड स्वीकारल्यानंतर डॉ. रेखा चौधरी यांनी, संपूर्ण जगातील ४७ डायनॅमिक स्त्रियांमध्ये हा अवॉर्ड घेण्याचा मान मला मिळाल्यामुळे अभिमानाने माझे मन भरून आल्याचे यांनी सांगितले. डॉ. रेखा चौधरी या तैलिक समाजाचे ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी यांच्या कन्या तसेच आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेमी युगुलाची धुळ्यात आत्महत्या

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,धुळे

शहरातील देवपूर परिसरातील बिलाडी गावाच्या रस्त्यालगत बुधवारी दुपारी प्रेमी युगुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याघटनेमध्ये आत्महत्येचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.

शहरातील देवूपर परिसरात सिंघलनगर, नगावबारी जवळील महिला कॉलेजमागे राहणारा कल्पेश संजय नंदन (वय ३०) अभियांत्रिकी शिक्षणासाठी धुळ्यात आला होता. त्याचे शहरातील राहत असलेल्या परिसरतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र या दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. कारण कल्पेश हा सामान्य कुटूंबातील वाहनचालकाचा मुलगा होता. तर तरुणीला वडील नसल्याने ती आईसह मावशीच्या गावी धुळ्यात राहण्यास आली होती. त्यामुळे प्रेमीयुगुलाच्या प्रेमाला मान्यता मिळणे शक्य नसल्यानेे दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हायवे सहावर कामबंद पाडणार

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा सरकारने योग्यरितीने दिला नसल्याचे वृत्त ‘मटा’ने दि. २८ फेब्रूवारीला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामार्गालगत चौपदरीकरणासाठी भूसंपादन जमीन केलेल्या जमिनीचे मालक व शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला न मिळाल्याने शेतकरी दि. २४ मार्चपासून कामबंद पाडणार असून त्याठिकाणी कुटुंबासह बेमुदत आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यानंतर अखेर ‘मटा’चे भाकित खरे ठरले असून, शेतकऱ्यांनी नवापूर ते धुळे तालुक्यातील मुकटीपर्यंतच्या तब्बल साठ गावांतील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याची सविस्तर माहिती तालुक्यातील संग्राम पाटील व शिष्टमंडळाने ‘मटा’शी बोलताना दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्यालगत जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करून सरकारकडून मोबदला देण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी जमीन भूसंपादित करण्यात आल्या त्यानुसार काही शेतकऱ्यांना जुन्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला एकपट मिळाला. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला नवीन कायद्यानुसार चारपट देण्यात आला. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने मोबदला न देता शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रिय रस्ते विकास व बांधकाम मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. याप्रसंगी संग्राम पाटील, शामकांत शिंदे, शेतकरी संघटनेचे बाळू सोनवणे, गोकूळ खिवसरा, संजय शिंदे, फकिरा चौधरी, पंकज खैरनार, विलास पाटील उपस्थित होते.



पोलिस कारवाईस सामोरे जाण्यास तयार

जवळपास १५० किलोमिटरच्या अंतरावरील ६० ते ७० छोटे-मोठ्या गावातील शेतकरी कुटुंबासह ज्या-ज्या ठिकाणी महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी शेतकरी कुटुंबासह आंदोलनाला बसणार आहेत. आंदोलनात काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही वाहन न अडवत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये ज्याठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत त्याठिकाणीच आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत सरकार यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल. पोलिस कारवाई जरी झाली तरी त्यास सामोरे जाण्यास शेतकऱ्यांची तयारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसरवाडीत कॉप्यांचा पाऊस

$
0
0

धुळे : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे माजीमंत्री माणिकराव गावित विद्यालयात मंगळवारी, दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉप्याचा पाऊस पडला. या परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी सुरू असल्याचे समजताच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सकाळी अकरा वाजता विसरवाडी येथील गावित विद्यालयात अचानक कॉपी पुरविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली तर गाईड, झेरॉक्स प्रती व इतर साधनाचा आधार घेत वर्गात पेपर सोडविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस व शिक्षण विभागातील यंत्रणेने मात्र बघ्याची भूमिका घेतली. हा सर्व प्रकार परीक्षा केंद्रात सुरू असताना शाळेतील पथक आणि भरारी पथक नेमके काय करत होते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक महिलादिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे महापौर महिला मॅरेथॉन

$
0
0

धुळे : जागतिक महिलादिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे महापौर मॅरथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक धाव स्त्री सन्मानासाठी’ हे घोषवाक्य ठेऊन तसेच ‘बेटी बचाओ’चा संदेश जनमानसात देण्यासाठी जागतिक महिलादिनी नारीशक्ती एकवटली होती. बुधवारी (दि. ८) सकाळी सात वाजता मनपा आवारातून शेकडो महिलांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत १८ ते ६५ वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. विजेत्या महिलांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या. एस, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखणीबंद आंदोलन १५ मार्चपासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्हा परिषद व पंचायत समितीत कार्यरत विविध लेखा संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दि.१५ मार्चपासून लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने दिला आहे. हे आंदोलन संपूर्ण राज्यभरात राज्याध्यक्ष विजयसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात कर्मचारी संघटनेकडून आज (दि. १०) ते मंगळवार (दि. १४) या कालावधीत काळ्या फिती लावून काम करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रेड पे, पदोन्नती कोटा वाढ करणे, राजपत्रित दर्जा यासारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून आंदोलनास विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. वारंवार मागणी व पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणविरोधी मोहीम लांबणीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पांझरा चौपाटीबाबत येथील स्टॉलधारक को-ऑपरेटिव्ह सोसायटीने महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौपाटी नियमानुकूल करण्यास नकार दिल्याच्या निर्णयावर पुनर्विलोकन अर्ज राज्य सरकारकडे दाखल केला होता. त्यावर नैसर्गिक न्याय तत्वानुसार १ एप्रिलला सुनावणी होईल. त्यामुळेच १ एप्रिलला निर्णय जाहीर होईपर्यंत जिल्हा महसूल यंत्रणेने आज (दि. १०) चौपाटीवर होणारी अतिक्रमण निर्मुलन मोहीम तूर्त थांबवावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवारी (दि. ९) सायंकाळी दूरध्वनीद्वारे दिले आहेत. त्यामुळे स्टॉलधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

दुसरीकडे चौपाटीवरील कारवाई करू देणार नाही, अशी भूमिका लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांसह स्टॉल धारकांनी गुरुवारी (दि. ९) सकाळी घेतली. तेजस गोटे यांच्या नेतृत्वाखाली चौपाटीवर स्टॉल धारकांनी कुटुंबासह आंदोलनाला सुरुवात केली आहे. पांझरा किनारी आमदार अनिल गोटे यांनी उभारलेल्या चौपाटीवर अतिक्रमण ठरवून तेथील ५३ स्टॉल, ९० बाक, पाण्याच्या टाक्या आणि बांधकाम हटविण्याची नोटीस महापालिका प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. या नोटिसीनंतर आमदार गोटे आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे शहरात चांगलेच राजकीय वातावरण तापले होते.


पक्षांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

या सर्व प्रकाराबाबत धुळेकरांमधून निरनिराळ्या प्रकारचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, प्रशासनाने चौपाटीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाचे पाच ट्रॅक्टर, पाच ट्रक, १ जेसीबी, क्रेन, ५ ब्रेकर, कटर या साहित्यासह ३० कामगारांची व्यवस्था केली आहे. आता या कारवाईच्या स्थगितीचे आदेश आल्यानंतर मनपा आणि महसूल विभागाची तयारी सध्या तरी थांबवावी लागणार आहे. त्यामुळे आज (दि. १०) पांझरा चौपाटीवरील अतिक्रमण काढण्यासाठी विरोध करणारे आमदार गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाची काय भूमिका असले याकडे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळे अतिक्रमण निघत असल्याचा आरोपदेखील केला आहे. आता स्थगितीनंतर भूमिका काय, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images