Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉ. रेखा चौधरींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

धुळे : नंदुरबार येथील डॉ. रेखा चौधरी यांना भारताच्या वेलनेस ब्रॅन्ड ऍम्बेसेडर सहित दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी’ हा पुरस्कार एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज यांच्यावतीने रेखा चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मराठमोळ्या संस्कृती आणि नंदुरबारसाठी ही अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यात रशिया, यु. के., स्पेन आणि अाफ्रिका त्याचप्रमाणे अनेक देशातील जनरल कौन्सिल, राजदूत व मंत्री, अधिकारी यांचा सहभाग होता. डॉ. चौधरी यांना दुसरा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला तो फेमिना महिला विशेष अच‌व्हिर पुरस्कार. २०१६-१७ या वर्षात आरोग्य, ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा अॅवॉर्ड स्वीकारल्यानंतर डॉ. रेखा चौधरी यांनी, संपूर्ण जगातील ४७ डायनॅमिक स्त्रियांमध्ये हा अवॉर्ड घेण्याचा मान मला मिळाल्यामुळे अभिमानाने माझे मन भरून आल्याचे यांनी सांगितले. डॉ. रेखा चौधरी या तैलिक समाजाचे ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी यांच्या कन्या तसेच आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेमी युगुलाची धुळ्यात आत्महत्या

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,धुळे

शहरातील देवपूर परिसरातील बिलाडी गावाच्या रस्त्यालगत बुधवारी दुपारी प्रेमी युगुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याघटनेमध्ये आत्महत्येचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.

शहरातील देवूपर परिसरात सिंघलनगर, नगावबारी जवळील महिला कॉलेजमागे राहणारा कल्पेश संजय नंदन (वय ३०) अभियांत्रिकी शिक्षणासाठी धुळ्यात आला होता. त्याचे शहरातील राहत असलेल्या परिसरतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र या दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. कारण कल्पेश हा सामान्य कुटूंबातील वाहनचालकाचा मुलगा होता. तर तरुणीला वडील नसल्याने ती आईसह मावशीच्या गावी धुळ्यात राहण्यास आली होती. त्यामुळे प्रेमीयुगुलाच्या प्रेमाला मान्यता मिळणे शक्य नसल्यानेे दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हायवे सहावर कामबंद पाडणार

$
0
0

पंकज काकुळीद, धुळे

धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे चौपदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या आहेत. त्याचा सरकारने योग्यरितीने दिला नसल्याचे वृत्त ‘मटा’ने दि. २८ फेब्रूवारीला प्रसिद्ध केले होते. त्यामुळे महामार्गालगत चौपदरीकरणासाठी भूसंपादन जमीन केलेल्या जमिनीचे मालक व शेतकऱ्यांना नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे मोबदला न मिळाल्याने शेतकरी दि. २४ मार्चपासून कामबंद पाडणार असून त्याठिकाणी कुटुंबासह बेमुदत आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यानंतर अखेर ‘मटा’चे भाकित खरे ठरले असून, शेतकऱ्यांनी नवापूर ते धुळे तालुक्यातील मुकटीपर्यंतच्या तब्बल साठ गावांतील एक हजारहून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून आंदोलनाची दिशा ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याची सविस्तर माहिती तालुक्यातील संग्राम पाटील व शिष्टमंडळाने ‘मटा’शी बोलताना दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्यालगत जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून जमिनीचे अधिग्रहण करून सरकारकडून मोबदला देण्यात आला आहे. मात्र ज्यावेळी जमीन भूसंपादित करण्यात आल्या त्यानुसार काही शेतकऱ्यांना जुन्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदला एकपट मिळाला. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला नवीन कायद्यानुसार चारपट देण्यात आला. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना समन्यायी पद्धतीने मोबदला न देता शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याबाबत नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी केंद्रिय रस्ते विकास व बांधकाम मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री, महसूलमंत्री, नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. याप्रसंगी संग्राम पाटील, शामकांत शिंदे, शेतकरी संघटनेचे बाळू सोनवणे, गोकूळ खिवसरा, संजय शिंदे, फकिरा चौधरी, पंकज खैरनार, विलास पाटील उपस्थित होते.



पोलिस कारवाईस सामोरे जाण्यास तयार

जवळपास १५० किलोमिटरच्या अंतरावरील ६० ते ७० छोटे-मोठ्या गावातील शेतकरी कुटुंबासह ज्या-ज्या ठिकाणी महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याठिकाणी शेतकरी कुटुंबासह आंदोलनाला बसणार आहेत. आंदोलनात काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही वाहन न अडवत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये ज्याठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत त्याठिकाणीच आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत सरकार यावर निर्णय घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल. पोलिस कारवाई जरी झाली तरी त्यास सामोरे जाण्यास शेतकऱ्यांची तयारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक महिलादिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे महापौर महिला मॅरेथॉन

$
0
0

धुळे : जागतिक महिलादिनानिमित्त धुळे महापालिकेतर्फे महापौर मॅरथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एक धाव स्त्री सन्मानासाठी’ हे घोषवाक्य ठेऊन तसेच ‘बेटी बचाओ’चा संदेश जनमानसात देण्यासाठी जागतिक महिलादिनी नारीशक्ती एकवटली होती. बुधवारी (दि. ८) सकाळी सात वाजता मनपा आवारातून शेकडो महिलांनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेत १८ ते ६५ वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. विजेत्या महिलांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत महापौर कल्पना महाले, आयुक्त संगीता धायगुडे, माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्यासह शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. तर स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या. एस, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पायऱ्यांवरच ओतला कांदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

केंद्र व राज्यातील सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. शेतकरी विरोधी धोरण अवलंबणाऱ्या या सरकारचा निषेध नोंदवत शेतकरी संघटनेद्वारे शहरातील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर कांदा ओतून दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष पद मिळताच शेतकरी नेते देवीदास पवार यांनी शासनाच्या विरोधात एल्गार पुकारत. प्रांत कार्यालयाबाहेर शेकडो

शेतकऱ्यांच्या साक्षीने कांदा फेक करत निषेध नोंदवला. कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, तसेच तूर डाळीला रास्त भाव मिळाला पाहिजे, या प्रमुख मागण्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे

करण्यात आल्या.

राष्ट्रवादीचे नेते तथा कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, भिला आहेर, एकनाथ गांगुर्डे, कारभारी वाघ आदींच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात प्रशासकीय इमारतीच्या मुख्य द्वारावर दीड तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही वेळासाठी प्रशासकीय इमारतीत बघ्यांची गर्दी झाली होती. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत सरकारचा निषेध केला. तसेच गोणीत आणलेला कांदा कळवणच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या पायऱ्यांवर ओतून सरकारी कामकाज आणि पोकळ घोषणांचा निषेध केला.

प्रशासनाच्या वतीने कळ्वणचे तहसीलदार कैलास चावडे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, महादू खैरनार, रत्नाकर पाटील, पोपट खैरनार, धीरज पाटील, माकपचे भाऊसाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त करीत शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपसंचालक येताच विद्यार्थ्यांना घाम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्या भरारी पथकाने पाहणी केली. बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर सुरू होण्यापूर्वीच शिक्षण उपसंचालक दाखल झाल्यामुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. परीक्षा केंद्रावर त्यांनी जवळपास एक तास ठाण मांडले. जाधव यांनी प्रत्येक वर्गात फिरून पाहणी केली. याच केंद्रावर दुसरे आणखी एक महिलांचे पथक दाखल झाले होते.

त्र्यंबकेश्वर केंद्रावर होणाऱ्या कॉप्या यामुळे हे केंद्र तपासणी पथकांच्या रडावर असून, येथे अवघड समजल्या जाणाऱ्या विज्ञान शाखेचे निकाल १०० टक्के कसे लागतात याचे इंग‌ित शोधण्याचे अाव्हान परीक्षा बोर्डाने घेतले असावे. त्र्यंबकेश्वर येथील नूतन विद्यालयात बारावीचे केंद्र आहे. येथे सर्व शाखांचे मिळून १६४० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पहिल्या पेपरपासून दररोज तपासणी पथके येत आहेत.

तालुक्यात बारावी विज्ञान शाखेचे शिक्षण देणाऱ्या काही नामवंत शाळा आहेत. ठाणापाडासारख्या दुर्गम भागातही शासकीय आश्रमशाळेस जोडून बारावी विज्ञानाचे वर्ग आहेत. गेल्या काही वर्षांपासून बारावी विज्ञाना शाखेचे निकाल शंभर टक्के लागत असल्याने याकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. दुर्गम भागातील या विज्ञान शाखेस बहुतेक शहरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. अर्थात केवळ नावाला अॅडम‌िशन घेऊन परीक्षा द्यायलाच हजर होतात, असे निर्दशनास आले आहे. म्हणूनच येथे वारंवार तपासणी पथक येत असावे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसांची बाइक रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
एरव्ही रस्त्यावर तसेच वरिष्ठ नेमतील तेथे प्रामाणिकपणे बंदोबस्त करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा बुधवारी महिला दिना निमित्त सन्मान करण्यात आला. या महिला पोलिसांनी यंदा प्रथमच शहरातून बुलेट रॅली काढून नागरिकांना स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळा असे आवाहन केले.
समाजातील सर्वच स्तरातील महिलांनी बुधवारी महिला दिन उत्साहात साजरा केला. शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीनेदेखील महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यंदा प्रथमच शहरातून महिला पोलिसांची बाइक रॅली काढण्यात आली. गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्तालयापासून रॅलीची सुरुवात झाली.
यावेळी पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्यासह अधिकाऱ्यांना महिलांना शुभेच्छा दिल्या. पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांपासून शिपाई पदापर्यंतच्या सुमारे २०० महिला पोलिस या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. बुलेटवर स्वार महिला पोलिस नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. मोटारसायकल, मोपेड अशा वाहनांवरही महिला पोलिस स्वार होऊन रॅलीत सहभागी झाल्या. विशेष म्हणजे प्रत्येक महिला पोलिसाने हेल्मेट परिधान केले होते. गंगापूर रोड, कॅनडा कॉर्नर, कॉलेजरोड, महात्मानगर, एबीबी सर्कल, त्र्यंबक रोड, सीबीएस, अशोकस्तंभामार्गे पुन्हा पोलिस आयुक्त कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप झाला.
रॅलीत सहभागी वाहतुकीचे नियम कटाक्षाने पाळले. तसेच नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करावे असा संदेश दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गंधीने घुसमटतोय ‘पलुस्कर’चा दम

$
0
0

रामनाथ माळोदे, पंचवटी

तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकिक असलेल्या पंचवटीकरांचे सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. पंचवटीतील सांस्कृतिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हक्काच्या व्यासपीठाची गरज लक्षात घेऊन सोळा वर्षापूर्वी नाशिक महापालिकेने पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवन उभारले. मात्र, त्याच्या जागेची निवड, प्रेक्षकांची क्षमता, पार्किंग यांचा नीटसा विचार झाला नाही. जवळूनच वाहणारी गटारीची दुर्गंधी हैराण करणारी ठरत आहे. महापालिका आणि रसिक प्रेक्षकांचेही नेहमीच दुर्लक्ष झालेल्या या भवनाचा परिसर गांजा आणि मद्यपींचा हक्काचा अड्डा बनला आहे. संस्कार देणाऱ्या या जागेत स्वैराचार बोकाळत असल्याने येथे क्वचितच कार्यक्रम होत आहेत.

२४ डिसेंबर १९९८ ला इंद्रकुंडाच्या पश्चिमेला असलेल्या नाल्याजवळ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या हस्ते पं. विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन झाले. तीन वर्षांत या सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण होऊन संगीत मार्तंड पंडित जसराज आणि मधुरा जसराज यांच्या हस्ते २१ ऑगस्ट २००१ रोजी उद््घाटन झाले. या सांस्कृतिक भवनामुळे पंचवटीकरांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. मिनी थिएटर म्हणून त्याची ओळख होईल, असे वाटले होते. मात्र, प्रेक्षकगृहाच्या मर्याद‌ित जागेमुळे छोटेखानी कार्यक्रमच येथे होत गेले. त्याची सुरुवातीची जी संख्या होती, ती हळूहळू कमी होत गेली. आता तर रविवार वगळता कार्यक्रमच होत नसल्याची परिस्थिती आहे.

या भवनात सकाळी साडेसात ते रात्री साडेअकरापर्यंत चार सत्रात कार्यक्रम घेण्याची व्यवस्था आहे. १८५ प्रेक्षक बसू शकतील अशी क्षमता असलेले प्रेक्षकगृह आकाराने छोटे आहे. पाचशे रुपये अनामत रक्कम भरून कार्यक्रमानुसार भाडे आकारले जाते. येथे स्वतंत्र व्यवस्थापक नसल्यामुळे कार्यक्रमाच्या बुकिंगसाठी आयोजकांना कालिदास कला मंदिरातील व्यवस्थापकांकडेच जावे लागते. तेथेच बुकिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

इंद्रकुंडालगतच या भवनात जाण्यासाठी प्रवेशद्वार बनविण्यात आलेले आहे. कार्यक्रमाच्या वेळीच फक्त हे प्रवेशव्दार खुले राहते. इतर वेळी येथे वाहने मध्ये नेण्यास मनाई केली जाते. असे असले तरी मद्यपी आणि गांजा पिणारे जातात कसे, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. प्रवेशद्वारातून आत जाताच येथून वाहणाऱ्या गटारीची दुर्गंधी नाकाला झोंबते. हा भाग कचराकुंडीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे की काय, असे चित्र येथे दिसते. उद्यानाची देखभाल होत नसल्याचे दिसते. पूर्वी येथे चांगली हिरवळ होती. पाण्याअभावी ही हिरवळ सुकली आहे. येथील छोट्या देखण्या झुडपांची संख्या कमी झाली आहे. भवनाच्या जवळून वाहणाऱ्या गटारीसाठी पाइप टाकले असले, तरी त्याचे ढापे उघडे पडलेले आहेत. या उघड्या ढाप्यांमुळे गटारीचा वास या परिसरात पसरतो. ही दुर्गंधी येथे येणाऱ्यांची डोकेदुखी ठरते.

सुविधा नसल्याने नाट्यप्रयोग नाही

जेमतेम दोनशे खुर्च्या त्यांच्यातील काही खुर्च्यांची मोडतोड झालेली आहे. रंगमंचावर फॅनची व्यवस्था नसल्यामुळे छोटे नाट्यप्रयोग करताना कलाकारांना घाम फुटत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे येथे नाट्यप्रयोग करण्याची कुणी हिंमत करीत नाही. ध्वनी व्यवस्थेची बोंबाबोंब असल्यामुळे ज्या कार्यक्रम आहे, त्याला स्वतःला ध्वनी व्यवस्था करावी लागते. मेकअप रुममध्ये पाण्याची नीट व्यवस्था नाही. पडदा जुनाट झालेला आहे.

चार कर्मचाऱ्यांवर मदार

पलुस्कर भवनाची जबाबदारी सांभळण्यासाठी महापालिकेचे चार कर्मचारी आहेत. त्यात एक रंगमंच सहाय्यक, दोन सफाई कामगार आणि एक सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या काळात पलुस्करला कार्यक्रमांची चांगली रेलचेल असायची, ती हळूहळू कमी होत गेली.

नाट्यगृहाचा फलक नाही

इंद्रकुंडाजवळून जातानाही येथे एखादे सांस्कृतिक भवन असावे अशी त्याची एकही खूण रस्त्याच्या बाजूला नाही. रस्त्याच्या बाजूला कार्यक्रमांचा फलक लावण्यासाठी जागाच नाही. रस्त्याने जाणाऱ्यांना कार्यक्रमाची माहिती नजरेस पडावी, अशी व्यवस्था करण्यात आलेली नसल्यामुळे सांस्कृतिक भवनाचे अस्तित्वाची जाणीवच होत नाही. याउलट येथील पार्किंगच्या जागेलगतच सुलभ शौचालय, प्रसाधान गृह बांधण्यात आलेले आहे.

पार्किंगची समस्या गंभीर

कार्यक्रमास येणारे शक्यतो चारचाकी वाहनाने येत असतात. पलुस्करच्या पार्किंगमध्ये दुचाकींनाच जागा अपुरी पडते, तेथे चारचाकी वाहने थांबवायची कुठे, असा प्रश्न पडतो. पूर्वी पलुस्कर भवनाच्या पश्चिम बाजूला पार्किंगसाठी जागा ठेवण्यात आली होती. या जागेवरच अभ्यासिकेचे बांधकाम सुरू असल्याने ही पार्किंगची जागा कायमची बंद झालेली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्यांना पार्किंगचा प्रश्न सतावत असल्यामुळे केवळ २०० प्रेक्षकांची क्षमता असलेले प्रेक्षकगृहही भरू शकत नाही, अशी स्थिती या भवनाची झालेली आहे.

उद्यानाची दुरवस्था

भवनासमोर उद्यान विकसित करण्यात आलेले आहे. मात्र, सध्या देखभाल आणि दुरुस्तीअभावी या उद्यानाची पार वाट लागली आहे. हे उद्यान म्हणजे गांजा आणि मद्य पिणाऱ्यांसाठी मोकळे रान आहे. दुपारी मस्तपैकी ताणून देण्यासाठी काहीजण या उद्यानाचा सहारा घेतात. सायंकाळी ही जागा आपल्या हक्काचीच म्हणून गांजा आणि दारु पिणारे याचा खुलेआम वापर करतात. सकाळी या उद्यानात सहज फिरले तरी मद्याच्या ढिगभर रिकाम्या बाटल्या नजरेस पडतात. येथील सुरक्षारक्षकाला हे लोक जुमानत नाहीत. उलट त्यालाच धमकी देण्याचे प्रकार घडतात.


डासांचे साम्राज्य

दुर्गंधीयुक्त या भागात डासांचे साम्राज्य आहे. रात्रीच नव्हेतर दिवसाही डास तुटून पडतात. त्यामुळे कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्यांना कार्यक्रमातील योग्य ठिकाणी टाळ्या वाजविण्याऐवजी डास मारण्यासाठीच टाळ्यांचा आवाज करण्याची वेळ येते. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात व्यत्यय येतो.

दुरुस्ती कधी होणार?

भवनाची झालेली दुरवस्था सुधारण्यासाठी दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची गेली कित्येक दिवसांपासूची चर्चा आहे. दुरुस्ती करायची असली तरीही रविवारच्या दिवशी कार्यक्रमांचे बुकिंग केले जात आहे. सध्या असे बुकिंग असल्यामुळे दुरुस्तीचे काम कधी होणार, हा प्रश्न आहे.


नागरिक म्हणतात

पंचवटीकरांसाठी पलुस्कर सांस्कृतिक भवनाच्या रुपाने कार्यक्रमांसाठी हक्काची जागा मिळाली. ही वास्तू बांधली गेली आहे. पण तिच्या भोवतीचा परिसर हा अत्यंत गल‌िच्छ असल्याने येथे येणार कोण, असा प्रश्न पडतो. एकतर या हॉलची क्षमता ही दोनशे प्रेक्षकांची आहे. त्यात सुविधा नसल्यामुळे हे भवन दुर्लक्ष‌ित राहिले आहे.

-सुनील महंकाळे

पलुस्कर सांस्कृतिक भवनाच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष झालेले दिसते. येथून वाहणारी गटार ही या सभागृहाच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी आहे. तिच्या दुर्गंधीमुळे येथील कार्यक्रमांची संख्या कमी झालेली आहे. फार क्वचितच येथे कार्यक्रम होतात.

-मोहन मिश्रा

छोट्या कार्यक्रमांसाठी उपयुक्त असलेल्या या पलुस्कर सांस्कृतिक भवनाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत घाण आहे. पलुस्करच्या दक्षिणेकडील नाल्याच्या वरच्या भागातील घाण, येथे होणारी छुपी वर्दळ रोखण्यात यायला हवी. या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांना शोभेल असे वातावरण असायला हवे.

-उमेश पटेल

व्यवस्थापकाविना पोरक्या असलेल्या पलुस्कर सांस्कृतिक भवनाला प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असायला हवी. येथील प्रवेशव्दार केवळ कार्यक्रमांच्या वेळीच खुले ठेवण्यात यावे. व्यसनी लोकांना येथे येण्यास मज्जाव केल्यास या भवनातील कार्यक्रमांची संख्या नक्कीच वाढेल.

-भरत जेजुरकर

कलाकार म्हणतात

नाटकांच्या रंगीत तालमी, बालनाट्याचे प्रयोग, छोटेखानी कार्यक्रम यांच्यासाठी पलुस्कर सांस्कृतिक भवन हे उत्तम आहे. मात्र, ते अशा ठिकाणी उभारण्यात आलेले आहे की, तेथील वातावरणच सांस्कृतिक कार्यक्रमास शोभेसे नाही. मद्य, गांजा पिणाऱ्यांना हा भाग जणू मोकळे रानच मिळाला आहे. त्यांच्यावर कुणाचा अंकुश नाही. अशा ठिकाणी कार्यक्रम करणार तरी कसे? येथे पार्किंगसाठीही पुरेशी जागा नाही.

-डॉ. प्रशांत वाघ


नाटकाचे प्रयोग करायचे ठरले तर येथे ध्वनीव्यवस्था, लाइटस् व्यवस्था कलाकारांना स्वतःला करावी लागते. मर्यादीत १८५ प्रेक्षक बसू शकतील एवढीच क्षमता असल्याने नाटकाचे छोटे प्रयोग येथे करावेत, असे कलाकारांना वाटत असते. मात्र, येथील सभोवतालचे वातावरण सांस्कृतिक कार्यक्रमांना बाधा आणणारे ठरत असल्याने प्रेक्षक येथे येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे येथे आता नाट्यप्रयोग होत नाहीत.

-प्रदीप देवरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणुकीनंतरही बॅरिकेड्स जैसे थे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी व मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सिडको परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्तासाठी वापरण्यात आलेले बॅरिकेड्स हे विविध ठिकाणाहून गोळा करून आणण्यात आले होते. मात्र आता निवडणुकीचा निकाल लागून आठवड्याच्या वर उलटूनही ते बॅरिकेड्स अद्याप जैसे थे आहेत. ते आवश्यक त्या जागी न उभारल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे, याची पोलिस प्रशासनाने दखल घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिकेची निवडणुकीकडे यंदा सर्वांचेच लक्ष लागले होते. मतमोजणीसाठी तीन-तीन प्रभागांच्या स्वतंत्र ठिकाणी नियोजन करण्यात आले होते. सिडकोतील सहा प्रभागांची मतमोजणी ही राजे संभाजी स्टेडियम व प्रबोधनकार ठाकरे सभागृहात करण्यात आली. या मतमोजणीसाठी बंदोबस्त म्हणून किमान दोनशे मीटरवरच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक व नागरिकांना प्रवेश बंद केला होता. त्यामुळे सिडकोतील दोन्ही मतमोजणी केंद्रांवर कोणताही गैरप्रकार झाला नाही.

पोलिसांनी बंदोबस्तासाठी आणलेले बॅरिकड्स हे लेखानगर येथील रस्त्यावर दुतर्फा दाखविण्यासाठीचे होते किंवा अन्य ठिकाणी वाहतूक सुरळीत होईल त्या ठिकाणचे हे बॅरिकेड्स आणण्यात आले होते. निकाल लागल्यानंतर हे बॅरिकेड्स योग्य जागी जाणे अपेक्षित होते. मात्र आज आठवडा उलटून गेला असतांनाही मतमोजणीसाठी आणलेले बॅरिकेड्स अद्याप केंद्राच्या जवळच आहेत.

वाहनचालकांना त्रास

लेखानगर येथे भुयारी मार्ग नसला तरी सिडको, इंदिरानगरकडून येजा करणाऱ्यांना लेखानगरला पुलाखालून वाहतूक करावी लागत असते. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी याठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते. मात्र बॅरिकेड्स अद्यापही याठिकाणी आणण्यात आले नसल्याने लेखानगर भागातून वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. बंदोबस्तासाठी आणलेले हे बॅरिकेड्स योग्य ठिकाणी कोण नेणार, असा प्रश्न उपस्थित होेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधव संकुल वळणावरचे खड्डे बुजेनात

$
0
0

त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरला रोजच वाहनांची मोठी गर्दी होत असते. परंतु, त्र्यंबकेश्वर रोडलगतच असलेल्या जाधव संकुलच्या वळणावर खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त झाले आहेत. खड्डेमय झालेल्या रस्त्याने वाहनांचा प्रवास खडतर बनला आहे.

एकीकडे कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली असताना जाधव संकुल वळणावरील रस्ताच सोडण्यात आल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकदा वाहनचालकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच आरोप वाहनचालकांनी केला आहे.

महापालिकेने निवडणूकीच्या काही दिवस अगोदर शहरातील तब्बल १९२ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू केली होती. यात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्तेदेखील केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. सातपूर विभागातदेखील अनेक ठिकाणी अंतर्गत रस्त्यांची कामे महापालिकेने हाती घेतली आहे. पंरतु, यात अतिमहत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डयांची दुरुस्ती करण्यात महापालिकेला विसर पडल्याचे समोर आले आहे.

या रस्त्याबाबत अनेकदा वाहनचालकांनी स्थानिक नगरसेवक तथा महापालिकेच्या बांधकाम विभागाला कळविले आहे. मात्र, वाहनचालकांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप वाहनचालक करत आहेत. भविष्यात या रस्त्यावर एखादा मोठा अपघातात कोणी दगावल्यास त्याला महापालिकेच्या बांधकाम विभागालाच जबाबदार धरावे, अशी मागणीही वाहनचालकांनी केली आहे.

अपघाताचा धोका

अशोकनगरच्या जाधव संकुलकडे त्र्यंबकरोडवरून वळतांना अपघाताचा मोठी धोका वाहनचालकांना पत्करावा लागत आहे. वेगाने येणाऱ्या वाहने खड्डे वाचविण्यासाठी पर्याय शोधत असतात. यात मात्र वळण घेणाऱ्या वाहनचालकांची त्यांच्यामुळे मोठी फसगत होताना दिसते.

जाधव संकुलच्या वळणावर मोठ्या अपघाताची वाट महापालिका बघतेय काय. कोणी दगावल्यास त्यास जबाबदार कोण याचे उत्तर महापालिकेलाच द्यावे लागणार आहे.

-योगेश आहेर, वाहनचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी काँग्रेस देणार उमेदवार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापौर व उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रंजना भानसी व उपमहापौरपदासाठी प्रथमेश गिते अर्ज दाखल करणार आहेत. जोरदार शक्तिप्रदर्शन करीत दोघांचे अर्ज भरले जाणार आहेत. अन्य पक्षांनी महापौर व उपमहापौरपदासाठी बुधवारपर्यंत अर्ज घेतले नसले तरी निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसकडून आशा तडवी यांचा महापौरपदासाठी अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, १२२ पैकी ६६ जागांवर भाजपला विजय मिळाला आहे. बहुमताचा ६२ जागांची आकडा भाजपने पार केलेला आहे. शिवसेना ३५ जागा घेवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेची अवस्था एक आकडी झाली आहे. त्यामुळे विरोधाची जबाबदारी शिवसेनेवरच आहे. भाजपकडे बहुमत असल्याने महापौर व उपमहापौर भाजपचाच होणार आहे. १४ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. रंजना भानसी यांनी दोन, तर प्रथमेश गिते यांनीही दोन अर्ज घेतले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेकडे संख्याबळ नाही. तरीही निवडणूक बिनविरोध होवू नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. काँग्रेसकडे आशा तडवी यांच्या रुपाने उमेदवार असून, गुरूवारी त्यांचा अर्ज भरला जाणार आहे. तर उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार आहे. शेवटच्या क्षणी माघारी घेवून विरोधकांकडून भाजपला सुखद धक्का दिला जाण्याचीही शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेडिकल कॉलेज चौफुली धोकादायक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

आडगाव परिसरातील मुंबई आग्रा महामार्गावरील मेडिकल कॉलेजजवळील चौफुली प्रशासनाच्या नियोजनाअभावी धोकादायक ठरत आहे. चौफुलीवर रोज छोटे मोठे अपघात घडतात. चारही बाजूने व राँग साइडने येणाऱ्या वाहनांमुळे वाहनधारकांची तारांबळ उडते. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत.

या परिसरात पोलिस वसाहत, मेडिकल कॉलेज, भुजबळ कॉलेज, डॉ. वसंतराव पवार रुणालय असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. आडगावात जाणारा रस्ता असल्याने स्थानिकांचीदेखील गर्दी असते. शिवाय आडगाव-म्हसरूळ रस्तादेखील चौफुलीला येऊन मिळतो. मुंबई-आग्रा महामार्ग सहापदरी झाला त्यावेळी सर्विस रोड कोणार्क नगर पर्यंतच मर्यादित ठेवला गेला. त्यामुळे आडगावात जाण्यासाठी जत्रा चौफुली क्रॉस करून मागे यावे लागते त्यामुळे हा सोयीस्कर मार्ग आहे. नागरिक यासाठीच सर्रासपणे राँग साइडने येतात त्यामुळे अचानक भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे वाहनचालकांचे अपघात होतात.

नागरिकांची कसरत

उड्डाणपुलाखाली बस थांबा असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गर्दी असते. आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती असल्याने या परिसरात मालवाहतूक गाड्या, स्कूल बस, एस. टी. बस यांची दिवसभर वर्दळ असते. चारही बाजूने वाहने येत असल्याने नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. या चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविलेली नाही, झेब्रा क्रॉसिंगही दिसत नाही. त्यामुळे वाहनधारकदेखील बेशिस्तपणे वाहने चालवतात. त्यामुळे गरजेच्या ठिकाणी गतिरोधक, सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी, अशी मागणीही स्थानिक नागरिक करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​शिवसेनाही रिंगणात?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी भाजपचा महापौर व उपमहापौर बिनविरोध होवू नये यासाठी विरोधकांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेनेही महापौरपदासाठी उमेदवार उभा करण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबतचा निर्णय मात्र गुरुवारी घेतला जाणार आहे.
शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांच्या बैठकीत स्वतंत्र उमेदवार द्यायचा की काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. शिवसेनेकडे चंद्रकात खाडे हे महापौरपदाचे उमेदवार असून, ते रिंगणात उतरल्यास चमत्कार होण्याचा दावा काही लोकांकडून केला जात आहे. महापौर-उपमहापौर निवडणुकीला कलाटणी देण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र उमेदवार देणार आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपच्या विरोधात शिवसेना जाईल की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाही. परंतु, उमेदवार देण्यासंदर्भात किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात शिवसेनेची बैठक गुरुवारी सकाळी १० वाजता होत आहे. महापौर व उपमहापौर पदासंदर्भात काय निर्णय घ्यायचा याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवकांचे लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जॉगिंग ट्रॅकची झाली दुरवस्था

$
0
0

शहरातील मैदाने बनली धुळीचे आखाडे; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहराचे फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या नाशिकरोडमधील जॉगिंग ट्रॅकची प्रचंड दुरवस्था झाल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राखणे अवघड झाले आहे. शहरातील मोजक्या मैदानांवरील जॉगिंग ट्रॅकशिवाय इतर ट्रॅक धुळीचे आखाडेच बनलेली दिसून येत आहे. शहरात शिखरेवाडी, जिमखाना, १२५ शाळा, चेहेडी पंपिंग स्टेशन आदी ठिकाणी मैदाने आहेत. यातील काही मैदानांवर जॉगिंग ट्रॅक आहेत. जिमखाना मैदानावरील ट्रॅक सोडता इतर सर्वच मैदाने व त्यावरील जॉगिंग ट्रॅकचे आरोग्य व्हेंटिलेटरवर आल्यासारखी स्थिती आहे.

शिखरेवाडी मैदानावर मद्यपींचा अड्डा

शहराच्या मध्यवस्तीत असणारे शिखरेवाडी महत्त्वाचे मैदान आहे. या मैदानावर जॉगिंग ट्रॅक आहे मात्र हे मैदान आरोग्य संवर्धनाऐवजी आरोग्य बिघडण्यासाठीच जास्त कारणीभूत ठरत असल्याचे येथील नागरिक सांगतात. या मैदानावर एकही पथदिप नसल्याने रात्रीच्यावेळी हे मैदान मद्यपींचा अड्डाच बनते. त्यामुळे सूर्यास्तानंतर या मैदानाचा महिलांना वापर करता येत नाही.

स्वच्छतागृहाची दुरवस्था

या मैदानावरील स्वच्छतागृहाची देखभाली अभावी दुरवस्था झाली आहे. दोन स्वच्छतागृहांपैकी एकच वापरात असले तरी त्याठिकाणी पाण्याची कमतरता आहे. मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. या मैदानावर येणाऱ्या नागरिक, विद्यार्थी, खेळाडूंना पिण्याच्या पाण्याची सोयही नाही. येथे पाण्याची टाकी असूनही या टाकीचा वापर होत नाही.

ट्रॅक आरोग्याला घातक

या मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर माती व खडे जास्त प्रमाणात असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी नागरिकांना आरोग्याचा त्रास होतो. त्यामुळे हा जॉगिंग ट्रॅक आरोग्याला घातक ठरत आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या जॉगिंग ट्रॅकवर सकाळी एकदाच पाणी फवारले जाते. उर्वरित मैदानावर कधीही पाणी फवारले जात नाही. त्यामुळे या मैदानावर धुळीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झाले आहे. मुक्तिधामजवळील क्रमांक १२५ शाळेजवळील जॉगिंग ट्रॅकची स्थिती बऱ्यापैकी असल्याने या जॉगिंग ट्रॅकला नागरिक प्रथम पसंती देतात. मात्र, या ठिकाणीही धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

सभांमुळे नुकसान

या मैदानावर विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रीय नेत्यांच्या राजकीय सभा झाल्या होत्या.त्यावेळी या मैदानावर मुरुम पसरविण्यात आला होता. या मुरुमामुळे मैदानाचे मोठे नुकसान झाले.त्यानंतर स्थानिक खेळाडूंनी वर्गणी काढून या मैदानावरील मुरुम व दगड जमा केले होते.परंतु पालिकेने कोणतीही काळजी घेतली नाही.

चेहेडी पंपिंग स्टेशन मैदान

येथे दोन वर्षांपूर्वी पालिकेच्या मैदानाला उभारण्यात आलेले कुंपणही अपूर्णावस्थेतच आहे. या ठिकाणी अद्यापही जॉगिंग ट्रॅकची सोय नाही. या मैदानाचे प्रवेशद्वारही तुटले आहे. माजी नगरसेविका शोभा आवारे यांच्या प्रयत्नांतून येथे लावण्यात आलेली झाडेही देखभाल अभावी जळाली आहेत. या मैदानावर राजकीय मंडळींकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शिखरेवाडी मैदानावर मोठ्या प्रमाणात धुळ आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. या मैदानाच्या देखभालीकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

-सर्वज्ञ भुतडा, खेळाडू

शहरातील छोट्या-मोठ्या सर्वच मैदानांची काळजी घेतली जात नाही. स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विजेच्या दिव्यांची सोय, टवाळखोरांचे वाढते प्रमाण या समस्या शहरातील सर्वच मैदानांवर आहेत.

-अनमोल बेद, खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​७६ कोटींच्या वसुलीचे टार्गेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने मालमत्ता करासह पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली असली तरी मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा डोंगराएवढा आहे. मार्चपर्यंत मालमत्ता कराचे ४३ कोटी, तर पाणीपट्टीची थकबाकी ३३ कोटींपर्यंत आहे. त्यामुळे जवळपास ७६ कोटी रुपयांची वसुली करण्याचे खडतर आव्हान महापालिकेसमोर आहे. विशेष म्हणजे या वसुलीसाठी आता अवघे २२ दिवस उरले आहेत.
महापालिकेने चालू वर्षी मालमत्ता कराचे ११६ कोटींचे उद्दिष्टे ठेवले होते. त्यापैकी ११ महिन्यात ७३ कोटी ३८ लाखांची वसुली झाली आहे. त्यामुळे अजूनही जवळपास ४३ कोटींची थकबाकी आहे. तर पाणीपट्टीचे उद्दिष्टे ५५ कोटींचे ठेवले होते. गेल्या अकरा महिन्यात फक्त २२ कोटी १३ लाखांची वसुली झाली आहे. त्यामुळे पाणीपट्टीची थकबाकी ३३ कोटींपर्यंत गेली आहे. आता वसुलीसाठी अवघे २२ दिवस राहिले आहेत. त्यात ७६ कोटींची वसुली कशी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य सरकारने महापालिकांना आपला मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली शंभर टक्के करण्याचे आदेश काढले आहेत. आयुक्तांचा केआरएही त्याच्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे शंभर टक्के वसुली करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. परंतु, विविध कर विभागाकडे कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने ही वसुली होण्याची शक्यता कमीच आहे. सध्या पालिकेने विशेष मोहीम राबवली असली तरी वसुली १० ते १५ कोटींच्या वर जाणार नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


​उन्हाळी सुटीसाठी ४८ जादा गाड्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
उन्हाळी सुट्यांसाठी एसटी महामंडळाने जिल्ह्यातून ४८ जादा बसेसचे नियोजन केले असून त्यासाठी त्यांनी मध्यवर्ती कार्यालयात त्यासाठी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. गर्दी बघून त्यानंतर त्यात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. दरवर्षीप्रमाणे उन्हाळी सुट्यात या जादा गाड्या सोडल्या जातात. त्यानुसार या गाड्यांचे नियोजन एसटीने केले आहे.
गेल्या वर्षभरात एसटीला वेगवेगळ्या कारणाने चांगलाच आर्थिक फटका बसला. त्यामुळे या उन्हाळी जादा गाड्याने एसटीला फायदा होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या जादा बसेसमध्ये नाशिक जिल्ह्यातून ११ डेपोमधून या बसेस सुटणार असून त्यात नाशिक डेपोतून सर्वाधिक बसेस असणार आहेत. एप्रिल, मे व जून या तीन महिन्यासाठी या जादा बसेस असणार आहेत. या जादा बसेसमध्ये नाशिक विभागातून बाहेर जाणाऱ्या ३७ बसेस असणार असून ११ बसेस या विभागातंर्गत सोडल्या जाणार आहे.
विभागातंर्गत ११ जादा बस
नाशिक विभागातंर्गतही नाशिकहून नंदुरबार, कसारासाठी जादा बस सोडण्यात येणार आहे. तसेच नाशिक दोनमधून शिर्डी, कसारा, सटाणा येथून पाचोरा, नंदुरबार तसेच इगतपुरी येथून पाचोरा, चोपडा, शिरपूर, नंदुरबार, शिर्डी येथे बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​घरकुल योजना ठरतेय डोकेदुखी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेने सुरू केलेल्या अर्ज विक्रीवर नागरिकांच्या उड्या पडल्या आहेत. आठवडाभरात महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांतून तब्बल ३० हजार अर्जांची विक्री झाली असून, अजूनही अर्जासाठी पालिकेच्या कार्यालयांबाहेर रांगा लागत आहे. त्यामुळे आवास योजना पालिकेसाठी डोकेदुखी ठरली असून, एवढ्या नागरिकांना घरे कुठून द्यायची असा प्रश्न आता उभा ठाकला आहे. शहरात एवढ्या घरांसाठी पालिकेकडे जागा नसतानाही अर्जाचा भडीमार सुरूच असल्याने पालिकेसमोर संकट उभे राहिले आहे.
केंद्र सरकारने सन २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा विडा उचलला असून, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हे प्रत्येकाला हक्काचे घर दिले जाणार आहे. या घरकुलांसाठी पालिकेने शहरातील १५१ झोपडपट्यांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. सोबतच घरांसाठी पालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये विक्रीसाठी अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अर्जविक्रीला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून, अर्ज भरण्यासाठी उड्या पडत आहेत. कार्यालयांबाहेर दररोज रांगा लागत आहेत. गेल्या आठवडाभरात जवळपास २९ हजार ९५६ अर्ज पालिककडे दाखल झाले आहेत. पालिककडे एवढ्या नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्याची ताकद नाही. अगोदरच्याच लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देताना नाकीनऊ आले आहेत. त्यामुळे एवढ्या नागरिकांना घरे कुठून द्यायची, असा प्रश्न पालिकेसमोर आहे.
विभाग व अर्जांची संख्या
पंचवटी विभाग- ६६००
नाशिक पश्चिम-५९००
नाशिक पूर्व- ५५१०
सिडको- ४६४६
सातपूर- ४७००
नाशिकरोड- २६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लबच्या महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व सुयश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त महिलांसाठी सर्वांगीण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई नाका येथील सुयश हॉस्पिटलमध्ये शनिवारी (११ मार्च) सकाळी १० ते २ या वेळेत ही तपासणी करण्यात येणार आहे.
बदलती जीवनशैली व आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष ही समस्या आज अनेकांसाठी हानीकारक ठरत आहे. निरोगी राहण्यासाठी काय करायला हवे, याची जाण आता प्रत्येकातच असणे आवश्यक झाले आहे. शिवाय, त्यासाठी नियमित आरोग्यविषयक तपासण्या करुन घेण्याची गरजही वाढली असून त्यासाठी हे शिबिर महत्त्वाचे ठरणार आहे. जनरल चेकअप, ब्लडप्रेशर, उंची, वजन, रक्त तपासणी, सोनोग्राफी स्क्रिनिंग, ब्लडशुगर रँडम, कर्करोग निदानाशी संबंधित पॅप्सनिअर या तपासण्या केल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे स्त्रीरोगज्ज्ञांकडून या तपासण्या होतील. या सर्व तपासण्यांचे रिपोर्टसही महिलांना लगेचच देण्यात येतील. त्यानंतर स्त्रीरोगतज्ज्ञांचे आरोग्यविषयक मार्गदर्शनही महिलांना लाभणार आहे.
नोंदणी आवश्यक
या तपासणी शिबिराचा लाभ मर्यादित महिलांना मिळणार असून प्रथम नोंदणी केलेल्या महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ७०४०७६२२५४ किंवा ६६३७९८७ या क्रमांकावर सकाळी ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. तपासणीस येताना प्रत्येक कल्चर क्लब महिला सदस्याकडे कल्चर क्लबचे ओळखपत्र आवश्यक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विल्हेवाटीची बिकट वाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड येथून तब्बल ४० लाख ४३ हजार रुपये किमतीचा पान मसाला गुटखा पकडला होता. यानंतर एफडीएने संबंधित गुटखा बाळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली होती. परंतु, जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची विल्हेवाट लावणे किती कठीण काम आहे, याची प्रचीती प्रत्यक्ष खत प्रकल्पावर अधिकारी व कर्मचाऱ्यांना आली.
गुटख्याच्या पिशव्यांची विल्हेवाट लावताना सर्वांचीच दमछाक झाली. त्यातच एफडीएमध्ये कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी जणू आमचा काही संबंधच नाही, अशा प्रकारे वावरत असल्याने इमाने इतबारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यापुढे गुटखा जप्त करावा की नाही असा सवाल उपस्थित केला आहे. शासनाचाच एफडीए एक विभाग असताना काही अधिकारी व कर्मचारी केवळ नावालाच काम करत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उदय वंजारी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुटखा पान मसाल्याचा ट्रक नाशिकरोड भागात असल्याचे समजले. यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी सहकाऱ्यांसह नाशिकरोड येथील मालधक्क्याच्या बाजूला पान मसाला व सुगंधीत तंबाखू म्हणजेच गुटख्याने भरलेला ट्रक ताब्यात घेतला होता. ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमध्ये तब्बल ४० लाख ४३ हजार रुपयांचा गुटखा एफडीएने जप्त केला होता. यानंतर कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर गुटख्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान एफडीएसमोर होते. गुटख्याची विल्हेवाट लावण्यासाठी खत प्रकल्पाची जागा निवडण्यात आली. जप्त करण्यात आलेला ट्रक व एफडीएचे अधिकारी यांना गुटख्याची विल्हेवाट लावण्यासाठी खत प्रकल्पावर जवळपास अर्धा किलोमीटर आत जावे लागले. खत प्रकल्पावर पसरलेल्या दुर्गंधीने सगळेच हैराण झाले होते. असे असतानाही जप्त केलेल्या गुटख्याची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने खत प्रकल्पावर खड्डा खोदून गुटख्याच्या पिशव्या त्यात टाकण्यात आल्या. यानंतर गुटख्याने भरलेल्या पिशव्या फोडण्यात आल्या. सातपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पालकर व चार पंच एफडीएने घेतले होते. त्यांनाही खत प्रकल्पाची हवा काही तास सहन करावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीत ‘वायफाय’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीद असलेल्या एसटी महामंडळाने आपल्या प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करुन देतानाच इतरही प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी वायफाय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील ३१२ बसमध्ये वायफाय कार्यान्वित झाले आहे. याद्वारे प्रवाशांना स्मार्टफोनवर सिनेमा, नाटक आणि मालिकांचा मोफत आनंद घेता येणार आहे.
स्मार्टफोनचा वाढता वापर आणि डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना साकार करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यात तब्बल ३१२ बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे ही सुविधा शिवनेरी, हिरकणीपासून ते साध्या बसमध्येही देण्यात आल्यामुळे सर्वांना या सेवेचा फायदा होणार आहे. नाशिकच्या २२ सिटी बसही वायफाय कनेक्ट झाल्या आहेत.
प्रायोगिक तत्वावर पुण्यात ही सुविधा दिल्यानंतर राज्यातील १८ हजार बसमध्ये ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ही सेवा टप्प्याटप्प्याने सर्वत्र सुरू केली जात आहे. जिल्ह्यात जानेवारीपासून हे काम सुरू झाले असून, हळूहळू आता बहुतांश डेपोतील बसमध्ये ही सेवा पुरवण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामंडळाने हे हायटेक पाऊल उचलले आहे. मराठी ,हिंदी चित्रपट, काही मालिका व मराठी नाटक या सुविधेमुळे प्रवाशांना बघता येणार आहे. पण या सेवेमध्ये व्हॉट्सअॅप व इंटरनेटची सुविधा मात्र उपलब्ध नसेल.

प्रत्येक सीटसमोर स्टिकर
वायफाय सुविधा देण्यात आलेल्या बसमध्ये प्रत्येक सीटसमोर लाल रंगाचे स्टिकर लावण्यात आले असून त्यात या सुविधेबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजूबाजूला ‘विनाडेटा मोबाइलवर सिनेमा’, ‘एसटीचा प्रवास, करमणूक हमखास’ असेही स्टिकर्स लावण्यात आले आहेत.

असे वापरता येईल

ही सुविधा प्रवाशांना बसमध्ये मिळवण्यासाठी स्मार्टफोनमधील वायफायवर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर kiviची निवड केल्यानंतर सेटिंग्जमधून बाहेर पडून chrome ब्राऊजर उघडावे लागेल. त्यानंतर kivi.com टाइप करुन enter केल्यानंतर चित्रपट, नाटक व मालिका बघायला मिळणार आहेत. मुंबईच्या यंत्रा मीडिया सोल्यूशन नामक कंपनीद्वारे बसमध्ये हे वायफाय यंत्र बसवण्यात आले आहे. प्रवाशांना प्रवासात फक्त एकदाच वायफाय कनेक्ट करावा लागणार आहे. महिन्यातून दोनदा मनोरंजन मेन्यू पुन्हा रिफ्रेश केला जाणार आहे. त्यामुळे दरवेळेस प्रवास करताना नवीन सिनेमे वायफाय सेवेद्वारे उपलब्ध होणार आहेत. वायफाय सेवेसाठी प्रत‌िवर्ष महामंडळ एक कोटी रुपये मोजणार आहे. त्याचप्रमाणे हे यंत्र दुरुस्त करण्यासाठी प्रत्येक डेपोत एक टेक्निश‌ियन असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images