Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

विसरवाडीत कॉप्यांचा पाऊस

0
0

धुळे : नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे माजीमंत्री माणिकराव गावित विद्यालयात मंगळवारी, दहावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉप्याचा पाऊस पडला. या परीक्षा केंद्रावर खुलेआम कॉपी सुरू असल्याचे समजताच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिक्षण विभागातील पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. सकाळी अकरा वाजता विसरवाडी येथील गावित विद्यालयात अचानक कॉपी पुरविण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली तर गाईड, झेरॉक्स प्रती व इतर साधनाचा आधार घेत वर्गात पेपर सोडविण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस व शिक्षण विभागातील यंत्रणेने मात्र बघ्याची भूमिका घेतली. हा सर्व प्रकार परीक्षा केंद्रात सुरू असताना शाळेतील पथक आणि भरारी पथक नेमके काय करत होते, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फी न भरल्याने हॉल तिकिटासाठीच ‘परीक्षा’

0
0

अन्यायग्रस्त विद्यार्थ्याच्या पालकांची पोलिसात धाव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/ सिडको

शाळेस अपेक्षित असणारी फी विद्यार्थ्याने न भरल्याने त्याचे दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीटच शाळेने दिले नसल्याचा गंभीर दावा करीत त्याच्या पालकांनी पोलिसात धाव घेत व्यथा मांडली आहे. आजपासून (८ मार्च) दहावीच्या इंग्रजी माध्यमाची परीक्षा सुरू होत आहे. या स्थितीत इतर विद्यार्थी अभ्यासाची उजळणी करीत असताना मात्र एका विद्यार्थ्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुंबई नाका पोलिस ठाण्यातच ठिय्या द्यावा लागल्याची गंभीर घटना मंगळवारी घडली. रात्री उशिरापर्यंत या विद्यार्थ्याला हॉलतिकीट न मिळाल्याने घोळ सुरूच होता.

इंग्रजी माध्यमाची दहावीची परीक्षा आज सुरू होत आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षेच्या अगोदर अदनान खान हा सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये हॉल तिकीट घेण्यास गेला होता. तेथे त्याला फी न भरल्याने हॉल तिकीट नाकारण्यात आल्याची तक्रार त्याचे पालक इलियास खान यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. याबाबत अधिक खुलासा करताना कोर्टाच्या आदेश असतानाही शाळेनेच अधिकृत फी सांगण्यास टाळाटाळ केल्याने आम्ही फी भरू शकलो नसल्याची बाजू त्यांनी मांडली. शाळेच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे संस्थाचालकांसह प्रशासनावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खान यांनी केली आहे. मुंबई नाका पोलिस ठाण्यात खान यांच्यासह शाळेचे पालक समितीचे उपाध्यक्ष नरेश माळोदे, भाजपचे प्रदीप पेशकार आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्याने साधावा संपर्क

हॉल तिकीट घेऊन जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते शाळेच्या निरोपास प्रतिसाद देत नसल्याची बाजू सेंट फ्रान्सिस शाळेने माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ आणि शिक्षण विभागाकडे मांडली आहे. यामुळे आज त्या विद्यार्थ्याला शाळेकडून हॉलति‌कीट मिळते की नाही याकडे लक्ष लागले आहे.

सर्व विषयांचा अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येला शाळेच्या आडमुठेपणामुळे मला पोलिस स्टेशन गाठावे लागले आहे. अन्याय दूर करण्यासाठी येथेच अभ्यास करण्याची वेळ ओढावली आहे. शाळेकडून मिळणारी वागणूक योग्य नाही. शाळेवर कारवाई व्हावी.

- अदनान खान, विद्यार्थी

शाळेने अधिकृत फी वसूल करावी असा कोर्टाचा आदेश आहे. मात्र शाळेने आतापार्यंत अधिकृत फी ची रक्‍कम जाहीर केलेली नाही. मग आम्ही फी कशी भरणार? नियमानुसार विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट राखून ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. पाल्याचे नुकसान झाल्यास त्यास शाळा प्रशासन व शिक्षण विभाग जबाबदार राहील.

- इलियास खान, पालक

कुठल्याही स्थितीत शाळेला विद्यार्थ्याचे परीक्षा हॉल तिकीट नाकारता येणार नाही. शाळेने असा प्रकार केल्याचे आढळल्यास मान्यता रद्द करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत. मात्र, या प्रकरणात शाळा व विद्यार्थी दोघांचीही बाजू समजावून घेऊन विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्याची बोर्डाची भूमिका आहे.

- राजेंद्र मारवाडी, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावानाच्या वादावर निवडणुकीचा उतारा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावणेदोनशे वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिकचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर करण्यात आला. २ एप्रिल रोजी मतदान होणार असून, ३ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. ५ मार्च रोजी विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी संपला असल्याने निवडणूक अधिकारी माधव भणगे यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. गैरव्यवहाराच्या आरोपाने सावाना चर्चेत आले आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूकही गाजण्याची चिन्हे आहेत.

सावानाचे एकूण ८५०० सभासद असून, पैकी १७२४ आजीव व १८५६ सर्वसाधारण मतदारांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. एकूण ३५८० मतदार मतदान करतील. ज्यांनी फेब्रुवारी २०१७ पर्यंतची फी भरलेली आहे आणि सभासद होऊन ज्यांना एक वर्ष पूर्ण झाले आहे अशांनाच मतदानाचा अधिकार असल्याने ही संख्या रोडावलेली दिसत आहे. मंगळवारी, ७ मार्च रोजी अंतिम सभासद, मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज, विक्री व स्वीकृती सुरू झाली असून, ती १३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. गुरुवार, १६ मार्च रोजी उमेदवार अर्ज छाननी होणार असून, शुक्रवार १७ मार्च रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे. शुक्रवार, १७ मार्च ते रविवार, १९ मार्च हे तीन दिवस उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून, सोमवारी २० मार्च रोजी उमेदवारांची माघारीनंतरची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. मंगळवार २१ मार्च रोजी चिन्हवाटप होतील. रविवार २ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून, सोमवारी ३ मार्च रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

ही तर अध्यक्षांची पराभूत मानसिकता

सर्व प्रकारचे बेकायदेशीर मार्ग वापरून आम्हाला निवडणुकीपासून दूर ठेवण्यात अध्यक्ष विलास औरंगाबादकर यशस्वी ठरले आहेत आणि तो त्यांना त्यांचा अंतिम विजय वाटतो आहे. सुज्ञ नाशिककरांना औरंगाबादकरांचा खरा चेहरा या सर्व प्रकरणात जवळून पाहायला मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद जहागीरदार, स्वानंद बेदरकर आणि प्रा. विनया केळकर यांनी व्यक्त केली आहे. जहागीरदार म्हणाले, की आमची नावे मतदारयाद्यांमध्ये येऊ नयेत यासाठी न्यायालयीन प्रक्रियेचा अवमान करून घाईघाईने निवडणूकप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातून अध्यक्षांची पराभूत मानसिकता स्पष्ट दिसून येते. कायदेशीर मार्गाने लढण्यापेक्षा आमच्यासारखे चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीत वार करण्यात ज्या औरंगाबादकरांना पुरुषार्थ वाटतो, त्यांच्याकडून यापेक्षा दुसरी अपेक्षा काय ठेवणार? निवडणूकप्रक्रिया मंगळवारी घोषित झाल्यावर मतदारयाद्या मिळणे अपेक्षित होते. मात्र, आज तीन वाजेपर्यंतच याद्या मिळतील, असे सांगितले होते आणि रात्री ७ पर्यंत याद्याच उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. वाचनालयाला बुधवारी सुटी आहे. तेव्हा मतदारांनी करायचे काय, असा सवालही जहागीरदार यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीच्या ढोलवर थकबाकीदारांनी धरला ताल...

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिकेने थकबाकीदारांकडून मालमत्ता करवसुलीसाठी मंगळवारीही ढोलताशांची मदत घेतली. शहरात वसुलीच्या ढोलची मात्रा थकबाकीदारांना चांगलीच लागू पडली आहे. ढोल बडवण्यापूर्वीच थकबाकीदार चेक पुढे करीत असल्याचे चित्र आहे. पंचवटीत महापालिकेला ११ लाख रुपयांची वसुली झाली आहे. त्यामुळे या वसुलीच्या ढोलवर थकबाकीदारांनी चांगलाच ताल धरल्याचे चित्र आहे.

पंचवटी परिसरात ढोलताशांसह महापालिकेचे वसुली पथक येताच अनेक थकबाकीदारांनी धनादेश देण्यात तत्परता दाखविली. पंचवटीतील पेठ रोड, नवनाथनगर, रामवाडी, तळेनगर, क्रांतीनगर आदी परिसरात नऊ ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. त्यात ११ लाख रुपयांची वसुली झाली.

पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांच्यासह पंचवटीतील कर्मचाऱ्यांचा ताफा पंचवटी परिसरात ढोलताशांसह फिरू लागल्याने अनेकांच्या नजरा या पथकाकडे वळत होत्या. मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांना महापालिकेतर्फे यापूर्वीच नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. स्मरणपत्रही देण्यात आले होते. तरीही महापालिकेच्या नोटिसांकडे दुर्लक्ष करीत थकबाकी भरण्यास टाळाटाळ करीत असलेल्या मोठ्या थकबाकीदारांनी ढोलताशांचा चांगलाच धसका घेतलेला दिसत आहे. वसुलीसाठी पथक दारासमोर हजर होताच ढोल वाजविण्याच्या अगोदर थकबाकीच्या रकमेचे चेक देण्याची लगबग करण्यात येत होती.

महापालिकेतर्फे मार्च महिन्यात वसुलीची मोहीम राबविण्यात येत असते. मात्र, यंदा ढोलताशांचा नवा फंडा आणल्याने ढोलचा आवाज हा थकबाकीदारांची अब्रु चव्हाट्यावर आणणारा ठरू लागल्याने थकबाकी वसुलीसाठी हा चांगला मार्ग निघाल्याचे अधिकारी आणि कर्मचारी सांगत आहेत. या वसुली मोहिमेत ५० हजारांपेक्षा जास्त रकमेची थकबाकी असणाऱ्या वसुलीवर अगोदर लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यानंतर ५० हजारांपेक्षा कमी रकमेच्या थकबाकीदारांकडे ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ए. पी.वाघ यांनी सांगितले.

नाशिकरोडमधून १५ लाख वसूल

सिन्नर फाटा ः नाशिकरोड प्रभागात मंगळवारी थकबाकीदारांकडून तब्बल १५ लाख ६२ हजार रुपयांची वसुली झाली. पालिका उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, सहाय्यक अधीक्षक नामदेव जाधव यांच्या पथकाने जेलरोडवरील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ढोल बडवले. यावेळी उपायुक्त दोरकुळकर यांनी राजराजेश्वरी मंगल कार्यालय सील करण्याचे आदेशही दिले. मात्र, मंगल कार्यालयाचे मालक राठोड यांनी ११ लाख ६८ हजार रुपये तीन टप्प्यांत धनादेशाद्वारे तत्काळ भरणा केल्याने कारवाई टळली. आनंदनगर येथे डावखर यांनीही थकबाकीपोटी ७७ हजार रुपयांचा धनादेश जमा केला. आयसीआयसीआय बँकेकडील २४ लाख रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे अधिकारी गेले असता, त्यांनी दोन दिवसांची मुदत मागून घेतली.

७० लाखांची वसुली!

महापालिकेच्या नोट‌िसांना केराची टोपली दाखवणाऱ्या थकबाकीदारांवर ढोल-ताशांची मात्रा कामी येत असून, मंगळवारी तब्बल ७० लाख ६८ हजारांची वसुली झाली आहे. या मोहिमेत महापालिकेने सात मिळकती जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मिळकतींमध्ये नामवंत बिल्डरांसह निवासी मिळकतींचाही समावेश आहे. प्रत्येक विभागात तीन अशा सहा विभागांत १८ ढोलपथके पालिकेने वाढवले आहेत. ढोलताशांच्या भीतीने मिळकतधारक आता आढेवेडे न घेता रक्कम जमा करण्याची तयारी दर्शवत आहेत.

नाशिकरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या मालकाने ढोल वाजवण्यापूर्वीच ११ लाख २० हजारांचा चेक पालिका पथकाच्या स्वाधीन केला. बिटको चॅरिटेबल ट्रस्टने ३ लाख १७ हजार, अलय कन्स्ट्रक्शन (रुपी बँक) ६ लाख ८५ हजार, स्पार्क इंफ्रा १ लाख ८६ हजार, हकीम कांचवाला १ लाख ३ हजार, नरहरी खंडू नवले यांनी ४ लाख रुपये जमा केले. दिवसभरात जवळपास ६० मिळकतींकडे पालिकेच्या ढोलपथकांनी जाऊन ढोल बडवले. त्यातून पालिकेच्या पदरात ७० लाख ६८ हजार रुपयांची वसुली झाली आहे, तर सात मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारच्या कारवाईत ६८ लाख ५२ हजारांची वसुली करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी वसुलीत वाढ झाली आहे.

या मिळकती केल्या जप्त

शहा पूर्णिमाबेन अशोक (शॉप), विनायककुमार पांडे (शॉप), एस. एम. करवंदे (शॉप), महेंद्र पवार (निवासी), मोहन वायखंडे (निवासी), आरीफ मोहंमद (शॉप), वैतरा बिल्डर्स (शॉप).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावरून महासभेत गोंधळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महापालिका सभागृहात मंगळवारी (दि. ७) महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, उपायुक्त डॉ. पाठारे यांच्या उपस्थिती महासभा बोलावण्यात आली होती. महासभेच्या प्रारंभीपासूनच सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे तसेच विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करित एकच गोंधळ घातला. तसेच प्रशासनास धारेवर धरले. तब्बल तासभर हा गोंधळ सुरू असल्याने अखेर महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम यांनी महासभा तीन दिवसांसाठी तहकूब केली. अनेक विषयांवर महासभेत चर्चा होणे अपेक्षित असताना झालेल्या गोंधळामुळे महासभा तहकूब करण्यात आली.

महासभेच्या प्रारंभीच नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला आहे. रुग्णालयात रेबीजसारख्या गंभीर आजारांवरील औषधे तसेच इंजेक्शन उपलब्ध नाहीत, असे सांगितले. त्यामुळे शहरातील गरीब जनतेला महागड्या रुग्णसेवा घ्यावा लागत आहेत. प्रसूतीसाठी वाडिया, अली अकबर, पालिकेच्या रुग्णालयात आलेल्या महिलांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात येते आहे. ही संतापजनक बाब असून यास आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे जबाबदार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याबाबत उपस्थित सर्वच नगरसेवकांनीदेखील विविध मुद्दे उपस्थित करीत डॉ. डांगे हे महासभेस वारंवार अनुपस्थित का राहतात, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. यामुळे सभागृहात विषय पत्रिकेवरील विषय चर्चेला येण्याआधीच कमालीचा गोंधळ सुरू झाला.

या गोंधळाच्या परिस्थितीच उपमहापौर युनुस इसा यांनी गुलशनगर येथील सार्वजनिक शौचालय ठेकेदाराकडून पाडण्यात आल्याचे सांगत येथील नागरिकांच्या शौचालयाचा प्रश्न निर्माण झाला असून ठेकेदाराने पाडण्यात आलेल्या शौचालयांचे मलबा तसेच भंगार गायब केल्याचा आरोप केला. याबाबत शहर उपअभियंता संजय जाधव यांनी, पाडण्यात आलेल्या शौचालयाच्या जागी नवीन शौचालय बांधण्यात येणार असून संबंधित ठेकेदारास मलबा व भंगार जमा करण्याबाबत नोटीस देण्यात आलेली आहे, असे सांगितले. दरम्यान, महासभेच्या प्रारंभीपासूनच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने कामकाज होऊ शकले नाही. अखेर महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम यांनी या गोंधळातच महासभा तीन दिवसांसाठी तहकूब करण्यात आल्याचे जाहीर करीत महासभा गुंडाळली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल कंपन्या नरमल्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेला मालमत्ता कर भरण्यास नकार देणाऱ्या मोबाइल कंपन्यांचे टॉवर सील करण्याच्या नोटिसा दिल्यानंतर मोबाइल कंपन्या अखेरीस नरमल्या आहेत. शहरातील इमारतींवर अनधिकृतपणे मोबाइल टॉवर्स उभे करणाऱ्या कंपन्यांनी पालिकेच्या दणक्यानंतर कर भरण्याची तयारी दर्शवली असून, त्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदत मागितली आहे. या कंपन्यांनी पालिकेला लेखी हमी देत, टॉवर सील न करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पालिकेचा आता चार कोटींच्या वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने थेट मोबाइल सेवा बंद करण्याचा इशारा दिला होता.

महापालिका क्षेत्रातील इमारतींवर काही मोबाइल कंपन्यांनी अनधिकृतपणे टॉवर्स उभारून सेवा सुरू केली आहे. शहरात जवळपास २०० टॉवर्स अनधिकृत असतानाही त्यांच्याकडून कर मिळत नव्हता. महापालिकेचा कर आम्हाला लागू होत नसल्याचे सांगत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, हायकोर्टाने या कंपन्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे या मोबाइल कंपन्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. गेल्या महिन्यातच सुप्रीम कोर्टाने मोबाइल कंपन्यांची याचिका फेटाळत महापालिकांना कर भरण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे करवसुलीसाठी महापालिका आक्रमक झाली होती. आता राज्य सरकारने महापालिकांना शंभर टक्के थकबाकी वसूल करण्याचे आदेश काढल्यानंतर महापालिकेने या कंपन्यांना कर भरण्यासाठी १० मार्चचा अल्टिमेटम दिला होता.

आयडिया, जीटीएल इन्फ्रा, रिलायन्स, जिओ, टी-२४ या कंपन्यांकडे महापालिकेची जवळपास चार कोटींची थकबाकी आहे. वसुलीसाठी महापालिकेने शनिवारी या सर्व कंपन्यांना अंतिम नोटिसा बजावल्या होत्या. कर न भरल्यास १० तारखेपासून मोबाइल टॉवर सील करण्याचे फर्मान काढले होते. त्यामुळे मोबाइल सेवा महागण्याच्या भीतीने अखेरीस मालमत्ता कर भरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी १५ मार्चची मुदत मागितली असून, तशी लेखी हमी दिली आहे. त्यामुळे पालिकेने तूर्तास कारवाईला स्थगिती दिली आहे.

जीटीएलचे प्रयत्न असफल

महापालिकेला कर न भरण्यावर अडून असलेल्या जीटीएल इंफ्रा या कंपनीने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पुन्हा अंतरिम स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सुप्रीम कोर्टाच्या बेंचपुढे अर्ज केला. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या बेंचने अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता मालमत्ता कर भरल्याशिवाय पर्याय उरला नसल्याने कंपनीने अखेरीस कर भरण्याची तयारी दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयसीयूतूनच मयूर देतोय दहावीचे पेपर

0
0

अपघातानंतर जिद्दीने मयूर दहावी परीक्षेस प्रविष्ट

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

इयत्ता दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी असते मात्र दहावीची परीक्षा सुरू होण्याआधीच त्याचा दुर्दैवी अपघात झाला. मात्र या अपघातानंतरदेखील खचून न जाता रुग्णालयात उपचार घेत असतानाच अतिदक्षता विभागातून (आयसीयू) दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार त्याने केला. मंगळवारी (दि. ७) त्याने दहावीचा पहिला मराठीचा पेपर दिला सुद्धा. ही कहाणी आहे येथील के. बी. एच. विद्यालयात इयत्ता १० वीस असलेल्या जिद्दी मयूर प्रकाश वाघ याची. मंगळवारपासून दहावीचे पेपर सुरू झाले असून येथील बालाजी रुग्णालयातून मयूरने पहिला मराठीचा पेपर दिला आहे. दहावीचे वर्ष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा निर्धार त्याने केला आहे.

येथील के. बी. एच. विद्यालयात मयूर शिकत असून निळगव्हाण येथील प्रकाश वाघ यांचा तो चिरंजीव आहे. दि. १ मार्चला त्यांच्या गावाहून मालेगावला स्कुटीने येत असताना रस्त्याच्या मध्यभागी अचानक तीन मुले आल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याचा दुर्दैवी अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, त्याच्या उजव्या मांडीचे हाडाचे तीन तुकडे होत मोठी दुखापत झाली. त्यास तात्काळ उपचारासाठी बालाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या मयुरला दहावीच्या परीक्षेसाठी घेत असलेल्या मेहनतीवर पाणी फिरणार याचा सल मनात होता.

वडील प्रकाश वाघ यांनाही या दुर्दैवी अपघाताने मयुरचे नुकसान होऊ नये असे वाटत होते. परंतु, त्याच्या मांडीला झालेली दुखापत अत्यंत गंभीर असल्याने त्यावर उपचार करणारे डॉ. महेश तेलारांधे यांनी त्यास हालचाल करता येणार नसून धोका टळलेला नसल्याचे सांगितले.

यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला बाप आणि मुलाच्या जिद्दीचा प्रवास. मयूरनेदेखील उपचार घेत असताना परीक्षा देण्याची तयारी दाखवली आणि त्याच्या या जिद्दीला वडिलांनी प्रोत्साहित केले. त्याला रुग्णालयातूनच दहावीची परीक्षा देता यावी, असा विनंती अर्ज वडिलांनी नाशिक विभागीय मंडळाकडे केला. विभागात पहिल्यांदाच असा प्रसंग आल्याने बोर्डाचे अधिकाऱ्यांनी त्याची भेट घेतली व डॉक्टरांशी याबाबत चर्चा केली. अखेर बोर्डानेदेखील त्यांची रुग्णालयातील अतिदक्षता विभागातून पेपर देण्याची विनंती मान्य केली.

मंगळवारी, येथील बालाजी रुग्णालयात मयूरच्या पेपरसाठी केंद्र संचालक, पर्यवेक्षक, पोलिस कर्मचारी, बोर्डाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. परीक्षा कालावधीदरम्यान त्याच्या कक्षात अन्य कुणालाही प्रवेश देण्यात आला नाही. मयूरनेदेखील या सगळ्याचे कोणतेही दडपण न घेता वर्षभर केलेल्या अभ्यासाच्या जोरावर सलग तीन तास रुग्णालयातूनच पेपर दिला. त्यावेळी सगळ्यांनीच त्याचे कौतुक करीत त्यास भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मी वर्षभर दहावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करीत होतो. माझ्यासोबत झालेल्या दुर्दैवी अपघाताने माझी मेहनत वाया जावू द्यायची नव्हती. मी परीक्षा देऊ शकतो, अशी इच्छा वडिलांकडे व्यक्त केली. यासाठी वडिलांनी खूप प्रोत्साहित केले. मला माझ्या वर्गमित्रांच्या समवेतच दहावी उत्तीर्ण व्हायचे आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

- मयूर वाघ

मयूर लहानपणापासून हुशार आणि जिद्दी आहे. त्याचा अपघात झाल्याने आम्हाला मोठा धक्का बसला होता. परंतु, त्याचे दहावीचे वर्षदेखील वाया जाईल अशी काळजी वाटली. रुग्णालयातूनच पेपर देण्याची तयारी त्याने दर्शवली आणि मी बोर्डाला तशी विनंती केली. तो किती गुणांनी उत्तीर्ण होईल यापेक्षाही अपघतानंतरदेखील त्याने जिद्द सोडलेली नाही हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

- प्रकाश वाघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उगाव घटनेच्या निषेधार्थ तहसीलवर मोर्चा

0
0

पाच जणांविरुद्ध कारवाईसाठी नातेवाईकांचे निवेदन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

द्राक्षांच्या व्यवहाराच्या पैशांवरून शेतकऱ्यांनी केलेली मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याने द्राक्ष व्यापाऱ्याचे मुनीम रवीराज वाघ यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना उगाव येथे घडली. याप्रकरणी उगाव येथील ५ जणांविरुद्ध निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, या मागणीसाठी उगाव येथे मंगळवारी (दि. ७) बंद पाळण्यात आला. तसेच मृताच्या नातेवाईक व मित्रपरिवारच्या वतीने निफाड तहसीलवर मोर्चाही काढण्यात आला.

मृत रवीराज वाघ यांच्या नातेवाईकांनी शंकर वाघ यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, निफाड तहसीलवर मोर्चा काढला. सोमवारी (दि. ६) त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. पोलिस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे, तहसीलदार विनोद भामरे यांची भेट घेत नातेवाईकांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. गिऱ्हे व भामरे यांनी या प्रकरणात संशयित आरोपींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. मंगळवारी (दि. ७) या मागणीसाठी उगाव येथे कडकडीत बंद पाळून आठवडे बाजारही रद्द करण्यात आला. मृत वाघ यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंबार्थ सहाय्य योजनेतून २० हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार भामरे यांनी दिले. ढोमसे कुटुंबीयांनी या व्यवहारात आमचे द्राक्षांचे पैसे दिले नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू, असा दम देऊन धमक्या दिल्या. या सर्व जाचाला कंटाळून रवीराज वाघ यांनी विषारी औषध पिऊन घेतले, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतीत राबून कष्टाने सावरला संसाराचा गाडा

0
0

महिला दिन विशेष : तिची झुंज

रामनाथ माळोदे

पतीचे अपघाती निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबाला सावरायचे कसे, चार मुलांची जबाबदारी सांभाळायची कशी, आयुष्य कसे निभावून न्यायचे अशा अनेक प्रश्नांचे माथ्यावर ओझे झालेल्या ताराबाई गावले यांनी स्वतःला तर सावरलं, मुलांना मायेची ऊब दिली, सुसंस्कार दिले. शेतात राब राब राबल्या, जोमाने शेती फुलवली. मुलाला पदव्युत्तर, एका मुलीला पदवी पदवीपर्यंत शिक्षण दिलं आणि दुसऱ्या मुलीला डॉक्टर बनविले. प्रचंड मेहनत आणि जिद्दीने प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत संसाराचा गाडा सावरला, त्यांच्या प्रेरक लढ्याची कहाणी.

निफाड तालुक्यातील सायखेड्याजवळील सोनगाव हे ताराबाई गावले यांचे गाव. पती पांडुरंग गावले यांचा ओझर येथे अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल सव्वीस दिवस त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, ती झुंज अखेर अपयशी ठरली. या अपघाती निधनानंतर गावले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या पुरत्या खचून गेल्या. मुलगा संजय, मुली अनिता, सुनीता आणि मनीषा यांची जबाबदारी पेलण्याचे शिवधनुष्य खांद्यावर उचलले.

मोठी मुलगी अनिता हिचा विवाह पती असतानाच झालेला होता. संजय, सुनीता आणि मनीषा यांचे शिक्षण सुरू होते. घर, शेती आणि मुलांचे शिक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. मुलांची आई आणि वडील या दुहेरी भूमिका त्यांनी समर्थपणे पेलत होत्या. आता शेतीच्या मशागतीपासून, बियाण्यांची खरेदी, लागवडी, खते, औषधे, पेरणी, काढणी अशा सर्वच कामांचे नियोजन करण्याची जबाबदारी वाढली. त्यांनी पिकविलेली द्राक्ष परदेशातही निर्यात झाली आहेत.

मुलगा संजयने हिंदी विषय घेऊन पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याने आईला शेती कामात साथ देण्यास सुरवात केली. मुलगी सुनीता हिने मानसशास्त्र विषय घेऊन कला शाखेची पदवी घेतली. मनीषा हिने वैद्यकीय शिक्षण घेतले. लग्नानंतर ती नांदगाव येथे यशस्वीरित्या प्रॅक्टिस करीत आहे. मुलगा आणि तिन्ही मुलींचे लग्न समारंभ थाटात केले. लग्नानंतर मुलींचा सुखाचा संसार बघून ताराबाई यांना समाधान वाटत आहे. मुलगा आणि मुलीचे मुलेही उच्च शिक्षण घेत असल्याचे बघून अभिमानाने त्यांचा उर भरून येतो. गुणी नातवंडांमध्ये रममाण होत असताना त्यांना झालेला विरह, दुःख, आतना या साऱ्यांचा त्यांना विसर पडत, असल्याची भावना त्या व्यक्त करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंगी स्वागताने भारावला अंध क्रिकेटपटू

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आधारे भारताला अंधांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजय मिळवून देणाऱ्या नाशिकरोडच्या अनिस फक्रुल्ला बेग याचे आज येथील रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत करण्यात आले. अंधांच्या स्पर्धेत नाशिकचे नाव उंचावणाऱ्या या क्रिकेटवीराची चाहत्यांनी नाशिकरोडच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत घोड्यावर मिरवणूक काढली. शिवाजी महाराज आणि आंबेडकर पुतळ्यास अनिसने हार अर्पण करून अभिवादन केले. अनिसचे जंगी स्वागत बघून त्याच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

अंधांची विश्वकरंडक स्पर्धा नुकतीच झाली. त्यामध्ये भारताने ११ सामने खेळले. नाशिकरोड स्थानकावर येताच रिक्षा टॅक्सी युनिनयचे अहमद शेख याने अनिसला खांद्यावर उचलून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात अनिसची रेल्वे स्टेशन परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या वेळी मनसेचे नेते भय्या मणियार, श्याम गोहड, हरीश भडांगे, आमदार योगेश घोलप मित्र मंडळाचे संस्थापक रानी लव्हेरी, संतोष क्षीरसागर, अन्वर तांबोळी, बबलू बागवान, मुस्ताक शेख, युसूफ शेख, स्वप्निल दोंदे, रोहित लव्हेरी, राहुल चटोले, सचिन मेहेरोलिया, बबलू तांबोळी, मोहम्मद तांबोली, विनोद धोत्रे, राजेंद्र हिरेमठ, राहुल पाखरे, आदेश बागूल, देविदास कटारे, मनीष जगवानी, सचिन गांगुर्डे आदी उपस्थित होते. पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे, पंढरीनाथ ढोकणे, रेल्वे सुरक्षा दलाचे जे. ए. पठाण आदींनी अनिसचा सत्कार केला.

ताप असतानाही पाकविरुद्ध झुंजला

बेंगळूरू येथे अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध झाला. त्यावेळी अनिस तापाने फणफणत होता. तरीही तो जिद्दीने खेळला. भारताने पाकिस्तानला नऊ विकेट्सने हरवून विजेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरले. नाशिकच्या या खेळाडून नुकतीच सहकाऱ्यांसह नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदींनीही या सर्वांचे कौतुक केले. त्यानंतर अनिस आज मुंबईहून जनशताब्दीने रात्री आठच्या सुमारास नाशिकरोड स्थानकावर आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक- पुणे महामार्गावर तिहेरी अपघात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक- पुणे महामार्गावर पळसे गावाजवळील बंगालीबाबा बस थांब्याजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता तीन वाहनांचा अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालेले नसले तरी सिन्नरच्या दिशेने जाणारी रिट्झ कार (एमएच १५/ईएक्स ७८७६) या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

रिट्झ कार सिन्नरच्या दिशेने जात असताना पळसे गावाजवळील बंगालीबाबा बस थांब्याजवळ या कारला मागून येणाऱ्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. त्यामुळे कार पुढे बसवर जाऊन आदळली. यात बस व कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने प्रवासी बचावले. अपघातानंतर कारचालक कार सोडून पसार झाला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्तृत्वानं ‘तिचं’ आयुष्य झालं प्रकाशमान!

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet : @FanindraMT

नाशिक : प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. असे असले तरी वीजक्षेत्रात महिला वायरमन म्हणून काम करणे नक्कीच सोपे नव्हते. मात्र पुरुषांनाही लाजवले अशी खांबावर चढण्यापासून ते मीटर रिपेरिंगपर्यंतची सर्व कामे करीत वैशाली वनकर यांनी कामाचा ठसा उमटवला. पुरुषांच्या या क्षेत्रात जिद्द, मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर आज त्यांनी यशस्वी लाइनमन म्हणून ओळख निर्माण केली आहे.

आयटीआय प्रशिक्षणानंतर कऱ्हाड ये‌थे वीज मंडळात पहिली पोस्टिंग मिळाली. या काळात त्यांनी खांबावर चढून इलेक्ट्रिकची महत्त्वाची कामे करण्यास सुरुवात केली. महिला असूनही पुरुषांना लाजवेल असे काम करीत असल्याने तेथील नागरिकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे काम करण्याचे त्यांना बळ मिळाले. दोन वर्षानंतर त्‍यांची नाशिकच्या भद्रकाली भागात बदली झाली. बिलवसुली करणे, मीटर काढून आणणे, ट्रान्सफार्मरची दुरुस्ती करणे, त्याची निगा राखणे इत्यादी कामे त्यांनी यशस्वीपणे केली.

पुरुषांची कामे बाई करीत असल्याने पुरुषांना हेवा वाटायचा. काही लोक कामात मदत करायचे, तर काही लोक मुद्दाम त्रास द्यायचे. मात्र कृर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. चांगले अनुभव जास्त आल्याने वाईट अनुभव झाकले गेले, असे त्या म्हणतात. महावितरणच्या सबस्टेशनमध्ये असलेल्या व्हॅक्यूम सर्किट ब्रेकरवर सध्या त्या काम करतात.

कष्टाने फुलवला संसार

महावतिरणमध्ये इंजिनीअर असलेल्या विलास यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वयाच्या २१ व्या वर्षीच वैशाली वनकर यांच्या खांद्यावर संसाराचा भार पडला. दोन चिमुकल्या मुलांची जबाबदारी असल्यानेकाय करावे सुचेना.! पतीच्‍या जागी त्यांना तब्बल १७ वर्षांनी नोकरी मिळाली. मोठा मुलगा दोन वर्षांचा व लहान मुलगा अकरा महिन्यांचा होता. आज मोठा मुलगा वकील तर लहान मुलगा एमबीए झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संप मागे घ्या; अन्यथा गुन्हे दाखल करणार

0
0

धुळे मनपा कर्मचारी आंदोलनाबाबत आयुक्तांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेत गेल्या तीन दिवसांपूर्वी कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष अतिक्रमण विभागातील लिपिक प्रसाद जाधव यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. याबाबत कर्मचारी समन्वय समितीतर्फे शुक्रवारपासून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे हे आंदोलन करावे लागत असल्याचे कर्मचारी समन्वय समितीचे म्हणणे आहे. तर आयुक्त संगीता धायगुडे यांनी अखेर शनिवारी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. तसेच कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये दंड आकारून, आणि संप मागे न घेतल्यास पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा इशारा कर्मचारी समन्वय समितीला दिला आहे.

सोमवारी वाद उफाळणार?

मनपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून कामगारांच्या विविध मागण्यांवरील आंदोलनातून आयुक्त विरुद्ध कर्मचारी संघटना असा संघर्ष सुरू झाला आहे. कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांना निलंबित करण्यात आले. यासोबतच निलंबनानंतर संपात सामील कामगारांचे दोन दिवसांचे वेतन कपातीचे आदेशही आयुक्तांनी दिले. यानंतरही समन्वय समितीने कामबंद आंदोलन आणि मनपा आवारात धरणे आंदोलन सुरू केले. शुक्रवारी सहाय्यक उपायुक्त अविनाश जाधव यांनी कर्मचाऱ्यांना जाधव यांचे निलंबन मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शनिवारी आयुक्तांनी याप्रकरणी कोणतेही आदेश काढले नाहीत उलट कर्मचाऱ्यांना दंड आकारून सोमवारी कामबंद आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगितले आहे. यामुळे मनपा आयुक्त व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये सोमवारी मोठा वाद उफाळण्याची निर्माण शक्यता मनपा सूत्रांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार परिचारकांच्या पुतळ्याचे दहन

0
0

धुळ्यात शिवसेनेकडून कारवाई करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भारतीय सैनिकांचा आणि त्यांच्या पत्नीचा अपमान करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या आमदार प्रशांत परिचारकांची राजकारणातून हकालपट्टी करा तसेच त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करीत शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. २०) भाजप आमदार प्रशांत परिचारक यांचा प्रतीकात्मक पुतळा शहरातील महाराणा प्रताप चौकात जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

आमदार परिचारक हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. सोलापूर येथे भाजप आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत त्यांनी असभ्यपणे हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या एकाही नेत्याने आमदार परिचारकांना थांबविले नाही. त्यांनी त्यांची चूक लक्षात आणून दिली नाही. भारतीय सैनिक आणि त्यांच्या पत्नीबाबत वक्तव्य करून त्यांनी भारतीय सैनिकांचा आणि तमाम महिला वर्गाचा अपमान केला आहे. त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. झाल्याप्रकाराबाबत आमदार परिचारक यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्य हे त्यांची विकृत मानसिकताच दाखविते. अशा लोकांना घेवून भाजप नितीमत्तेचे धडे कोणत्या तोंडाने लोकांना देत आहे, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

भाजपने आपल्या पक्षाची अब्रू वाचविण्यासाठी परिचारक यांची आमदारकी काढून घेत त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख हिलाल माळी, माजी आमदार प्रा. शरद पाटील, महेश मिस्तरी, सुनील बैसाणे, भटू गवळी, पंकज गोरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजापुढे ठेवला तरुणाने नवा आदर्श

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार येथील विशाल शिरीष वारुळे याने साखरपुड्यातच लग्न लावून आपल्या समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला आहे. शहरातील शिरीष ताराचंद वारुळे यांचा मुलगा विशाल वारुळे यांचा साखरपुडा नाशिक येथील रहिवासी सुनील उमाजी वाघ यांची कन्या दीपाली हिच्याशी नाशिक येथे आयोजित केला होता.

साखरपुडा समारंभाच्या कार्यक्रम होत असताना फक्त एक मंगळसूत्र व सात फेऱ्यांची कमतरता होती, अशी भावना वधू व वराकडील नातेवाईकांनी व्यक्ती केली. यावर मुलाचे वडील शिरीष ताराचंद वारुळे व मुलीचे वडील सुनील वाघ तसेच नंदुरबार येथील माजी नगरसेवक किशोर सोनवणे, प्रा.गोपाल शिरसाठ, तात्या मगर, नाशिक येथील राजेंद्र अहिरे यांच्या मध्यस्थीने साखरपुड्यात लग्न करण्याचा विचार केला आणि साखरपुडा कार्यक्रमातच विवाह सोहळा पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चांगले आरोग्य ही विकासाची गुरूकिल्ली’

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारच्या वतीने प्रत्येक व्यक्तीला दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याचा प्रयत्न करण्यात येत असून चांगले आरोग्य हीच विकासाची खरी गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी लामकानी (ता. धुळे) येथे केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय, जळगावच्या वतीने लामकानी येथे राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी देशमुख बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून जनतेने सुद्धा आरोग्याच्या चांगल्या सवयी आत्मसात करण्याची गरज आहे. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंद मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील यांनी उपस्थितांना आरोग्य आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मनोज सोनोने यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या निमित्ताने सकाळी गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला सरपंच नाना पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला. रॅलीत शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बळीराम चव्हाण, क्षेत्रीय प्रचार सहाय्यक उल्हास कोल्हे, आर. एम. सोनसळ उपस्थित होते. राष्ट्रीय स्तरावरील या अभियानास आता विविध राज्यातील ग्रामीण भागांत पोहचवण्यासाठी ही मोहीम सुरू केल्याचेही देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात बसेसमध्ये वायफाय हॉटस्पॉट

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना खूश करण्यासाठी एसटीमध्ये प्रवास करताना मोफत वायफाय सेवेचा देणार असल्याची घोषणा परिवहन केली होती. त्याबाबत येत्या दहा दिवसांत धुळे आगारातील १३५ एसटी बसेसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे.

एसटीच्या या वायफाय सेवेत सोशल मीडियाचा वापर प्रवाशांना करता येणार नाही. तर मराठी, हिंदी गीते, चित्रपट मालिकाचा या सेवेत लाभ होणार आहे. यामुळे एसटीकडे प्रवासासाठी नागरिकांची संख्या वाढणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली. परिवहन महामंडळाच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील नऊ आगारांतील सुमारे ९०० बसेसमध्ये वायफाय सुविधा सुरू करण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यांत धुळे आगारातील १३५ बसेसमध्ये वायफाय सुविधा पुरविण्यासाठी यंत्र मीडिया सोल्युशन लि. कंपनीचे कर्मचारी आगारात दाखल होऊन यंत्रसामग्री बसविण्याचे काम करत आहेत.

वायफाय कसे असेल?

मीडिया सोल्यूशन कंपनीकडून एसटीमध्ये हॉटस्पॉट डिवाइस बसविण्यात येणार आहे. त्यासाठी सॅटेलाइटच्या माध्यमातून रेंज मिळविली जाणार आहे. वायफायचा कोड क्रमांक हा प्रत्येक प्रवाशाच्या सीटजवळ असेल तो आपल्या मोबाइलमध्ये प्रविष्ट केल्यास वायफाय सेवा मोबाइलमध्ये सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे मनपात समाजवादीचे अनोखे आंदोलन

0
0

कार्यकर्त्याने साकारला पिसाळलेला कुत्रा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नागरिक सध्या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यामुळे त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील कुत्र्यांचा आणि डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी समाजवादी पार्टीच्या नगरसेवक आमिन पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी मनपात लक्षवेधी आंदोलन केले.

या अनोख्या आंदोलनात एका कार्यकर्त्याने अंगावरील कपडे काढून पिसाळलेल्या कुत्र्याची भूमिका मनपा आवारात साकारली. कुत्रे पिसाळल्यानंतर काय अवस्था होते याचे विविध प्रात्यक्षिके समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करून दाखविले आणि शहरातील समस्येची वस्तुस्थिती दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धुळे शहरात विविध ठिकाणी पिसाळलेल्या व रोगट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, महिला, तरुणी व वृद्धांच्या अंगावर कुत्रे चावा घेण्यासाठी धाव घेतात. अशा घटना दररोज घडत आहेत. मनपाच्या यंदाच्या आर्थिक संकल्पात मोकाट कुत्रे व डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करणारे निवेदन महापौर कल्पना महाले यांना यावेळी देण्यात आले.

शहरातील नागरिकांच्या समस्येकडे मनपाचे लक्ष वेधण्यासाठी समाजवादी पक्षाचे नगरसेवक आमिन पटेल व कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन मनपात केले. जर मनपाकडून येत्या आठ दिवसांत मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त झाला नाही तर यापुढे मनपातील अधिकाऱ्यांच्या दालनात पिसाळलेले व मोकाट कुत्रे आणून सोडण्यात येतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवमोगरा देवीच्या यात्रेस सुरुवात

0
0

नंदुरबार जिल्ह्यातील बर्डीपाडा येथे तयारी जोरात

म. टा. वृत्तसेवा, धुळे

खान्देशातील आदिवासी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात बर्डीपाडा येथील देवमोगरा देवीचे मंदिर विसरवाडी गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यासाठी रस्ताही नाही. अशा ठिकाणी हे देवमोगरा मातेचे मंदिर उंच डोंगरावर वसलेले आहे. पायथ्यापासून सुमारे २६४० फूट अंतर पार करून या देवीच्या दर्शनाला जावे लागते. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमधील मराठी माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या आमावस्येला देवमोगराच्या मोगीची यात्रा भरते, याची तयारी आता सुरू झाली आहे.

गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील देवमोगरा मातेची ही प्रतिकृती नंदुरबारमधील बर्डीपाडा येथे पाहायला मिळते. तसेच आदिवासी भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकडे घालायला या ठिकाणी येतात. कणीपूजन करून मंडल शिवारातील देव देवतांचे पूजन करतात. या यात्रेसाठी आदिवासी बांधव १५ दिवसांपासून तयारीला लागतात. मोगी ही आदिवासी समाजाची कुलदेवता असून, महाराष्ट्र व गुजरात या राज्यातून हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव या यात्रेत सहभागी होतात. मंदिराच्या पायथ्याशी सुरू होणाऱ्या पायऱ्यांपासून केलेल्या कच्च्या रस्त्याची पायवाट आहे. तेथूनच देवीच्या दर्शनासाठी भाविक मार्गस्थ होतात.

देवमोगरा देवीला आदिवासी भाषेत ‘याहा मोगी’ म्हटले जाते. ‘याहा’ म्हणजे आई असा अर्थ आहे. महादुष्काळात याहा मोगीच्या या उदात्त आणि मानवतादी कार्यामुळेच त्यांना याहा, लोकमाता, कणी, कन्सरी आपली सर्व पालनहार संबोधून देवत्व बहाल केले. आदिवासी भाषेतच देवीचे पारंपरिक पद्धतीने पूजा-विधी होतात. आजही धान्य, वन भाजी, तांदळाची व ज्वारीची भाकरी आणि मव्हाच मद्य (दारू) असा नैवेद्य देवीला दिला जातो. त्यामुळे आदिवासी भाषेतच मंदिराचे पुजारी ग्रामदैवत देवमोगरा देवीची माहिती सांगतात.

प्रशासनाची उदासीनता

आदिवासी जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख असून, नवापूर तालुक्यातील आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग पहाडातून आणि दऱ्या, खोऱ्यातून, कच्या रस्ताने भाविकांना खडतर प्रवास करावा लागतो. येथेही सरकारी यंत्रणेची उदासीनता पाहायला मिळते. तरी देवदर्शनासाठी प्रवास सुखकर व्हावा, अशीच अपेक्षा आदिवासी बांधवांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी विद्यापीठासाठी युवासेनेचा रास्तारोको

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे आणि धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवासेनातर्फे बुधवारी (दि. १) पारोळा चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी महामार्गावरील वाहतूक अर्धातास ठप्प झाली होती. या वेळी युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्यासह अनेक युवासैनिकांना पोलिसांनी कारवाई करीत अटक करून सुटका केली.

धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे निर्णय नेहमीच घेतले जात असून याविरुद्ध जिल्हा युवा सेनेने हे आंदोलन केल्याचे यावेळी सांगण्यात आले. पारोळा चौफुलीवर हे रास्तारोको आंदोलन करून राज्य सरकारच्या धोरणाविरोधात युवकांनी घोषणाबाजी केली.

याआधीही युवासेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढून निवेदन दिले होते. कृषी विद्यापीठ धुळ्यात साकारून जिल्ह्याला न्याय देण्यात यावा, शासकीय तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेऊन जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. हा निर्णय सरकारने तात्काळ मागे घ्यावा. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकेंद्र शहरात उभारले जावे, यासारख्या मागण्यासाठी युवासेनेने आंदोलन केले. यासाठी देवूपरातील सर्व्हे नं. १११ व ११२ या जागेचा मनपाने पुन्हा ठराव करून उपकेंद्रासाठी जागा देण्यात यावी. अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी महाराष्ट्र राज्यात एकच विद्यापीठ करावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live


Latest Images