Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

डॉ. रेखा चौधरींना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

$
0
0

धुळे : नंदुरबार येथील डॉ. रेखा चौधरी यांना भारताच्या वेलनेस ब्रॅन्ड ऍम्बेसेडर सहित दोन आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

‘द पिलर ऑफ हिंदुस्थानी सोसायटी’ हा पुरस्कार एशियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज यांच्यावतीने रेखा चौधरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या मराठमोळ्या संस्कृती आणि नंदुरबारसाठी ही अभिमानाची बाब आहे. या सोहळ्यात रशिया, यु. के., स्पेन आणि अाफ्रिका त्याचप्रमाणे अनेक देशातील जनरल कौन्सिल, राजदूत व मंत्री, अधिकारी यांचा सहभाग होता. डॉ. चौधरी यांना दुसरा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला तो फेमिना महिला विशेष अच‌व्हिर पुरस्कार. २०१६-१७ या वर्षात आरोग्य, ब्युटी आणि वेलनेस क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. हा अॅवॉर्ड स्वीकारल्यानंतर डॉ. रेखा चौधरी यांनी, संपूर्ण जगातील ४७ डायनॅमिक स्त्रियांमध्ये हा अवॉर्ड घेण्याचा मान मला मिळाल्यामुळे अभिमानाने माझे मन भरून आल्याचे यांनी सांगितले. डॉ. रेखा चौधरी या तैलिक समाजाचे ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी यांच्या कन्या तसेच आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेमी युगुलाची धुळ्यात आत्महत्या

$
0
0

म.टा.वृत्तसेवा,धुळे

शहरातील देवपूर परिसरातील बिलाडी गावाच्या रस्त्यालगत बुधवारी दुपारी प्रेमी युगुलाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याघटनेमध्ये आत्महत्येचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी याबाबत तपास सुरू असल्याचे सांगितले.

शहरातील देवूपर परिसरात सिंघलनगर, नगावबारी जवळील महिला कॉलेजमागे राहणारा कल्पेश संजय नंदन (वय ३०) अभियांत्रिकी शिक्षणासाठी धुळ्यात आला होता. त्याचे शहरातील राहत असलेल्या परिसरतील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र या दोघांच्या प्रेमाला घरच्यांचा विरोध होता. कारण कल्पेश हा सामान्य कुटूंबातील वाहनचालकाचा मुलगा होता. तर तरुणीला वडील नसल्याने ती आईसह मावशीच्या गावी धुळ्यात राहण्यास आली होती. त्यामुळे प्रेमीयुगुलाच्या प्रेमाला मान्यता मिळणे शक्य नसल्यानेे दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा निर्यातीचा विक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाने कृपादृष्टी केल्याने वर्ष २०१६-१७ मध्ये कांदा निर्यातीने उच्चांक गाठला आहे. नोव्हेंबर २०१६ च्या आकडेवारीनुसार २० लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त कांदा निर्यात झाली असून, निर्यातीचा आतापर्यंतच हा विक्रम ठरला आहे. यावर्षी कांदा निर्यात ३० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र निर्यात वाढूनही वाढलेल्या उत्पादनामुळे कांदा दर सरासरी ५०० रुपये क्विंटलवर ‌स्थिरावल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही.

यंदा पाऊस चांगल्या झाल्याने कांदा उत्पादन तिप्पटीने वाढले आहे. बाजारात मागणीपेक्षा आवक जास्त होत असल्याने कांदादर घसरले आहेत. विक्रमी निर्यात होऊनही उत्पादनाच्या तुलनेत निर्यात न वाढल्याने कांदादरात वाढ होऊ शकलेली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. सन २००९-१० मध्ये १८.७३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाली होती. निर्यातीचा हा उच्चांक होता. मात्र यावर्षी हा विक्रमही मोडीत निघाला आहे. नोव्हेंबर २०१६ पर्यंत २०.१० लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाली आहे. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व चालू मार्च महिन्यात सरासरी दोन ते लाख मेट्रिक टन कांदा निर्यात झाल्याचे गृहित धरल्यास वर्ष २०१६-१७ मध्ये कांदा निर्यात २५ ते ३० लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचणार आहे.

यावर्षी सुमारे गतवर्षापेक्षा २५ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन वाढले आहे. निर्यातीच्या आकड्यांवर नजर टाकल्यास यावर्षी पहिल्या आठ महिन्यांतच विक्रमी निर्यात झाली आहे. मात्र अजूनही कांद्याची भरमसाठ आवक होत असल्याने निर्यात वाढणार आहे. असे असूनही याचा शेतकऱ्यांना फायदा होताना दिसत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडी सेविकांवर जिल्हाभर करण्यात येत असलेली लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची सक्ती बंद करावी, कामासाठी सेविकांचे खर्च झालेले पैसे सेविकांना तातडीने मिळावेत यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.

शहरातील विविध मार्गांवरुन हा मोर्चा जिल्हा परिषदेवर पोहचला. तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी मिल‌िंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले. तुमच्या मागण्या मंत्रालय स्तरावर पोहचवल्या जातील, असे आश्वासन शंभरकर यांनी दिले. यावेळी अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्याने या मार्गावरची वाहतूक खोळंबली होती. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना लाइन लिस्टिंगचे काम करण्याची जिल्हाभर सक्ती केली जात आहे. या कामासाठी जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांनी आतापर्यंत दोन हजार रुपये पदरचे खर्च केले आहेत. लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची अंगणवाडी सेविकांना सक्ती करू नये, असे आयुक्त कार्यालयाने आदेश दिले असतानाही वरिष्ठांकडून कामावरुन काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. नाशिक जिल्हा परिषद व प्रकल्प कार्यालय आयुक्तालयाच्या आदेशाचे पालन करीत नाही. अधिकारी आपल्या अधाकराचा गैरवापर करुन अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर अन्याय करीत आहेत. या कामाच्या सक्तीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. लाइन लिस्ट‌िंगच्या कामाची सक्ती काढून टाकण्यात यावी, सेविकांचा व कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत झालेला खर्च त्वरित देण्यात यावा, आयुक्तालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. प्रलंब‌ित मागण्यांसाठी १० मार्च रोजी अंगणवाडी कृती समितीच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद व नागपूर उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानसेवी न समजता प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा, अंगणाडी कर्मचाऱ्यांना शासकीय वेतनश्रेणी व भत्ते लागू करण्यात यावे, केंद्र सरकारच्या आदेशानुसार अंगणवाडी कर्माचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कायदा लागू करण्यात यावा. टीएचआरचे सेवन लाभार्थी करीत नसल्याने महाराष्ट्रात कुपोषण व बाल मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. म्हणून टीएचआर बंद करुन सर्व लाभार्थींना ताजा शिजवलेला आहार देण्यात यावा, आजारपणासाठी १५ दिवसांची रजा देण्यात यावी, सेवा समाप्त होण्याच्या दिवशी सेवासमाप्तीचा लाभ देण्यात यावा. अंगणवाडी सेविकांना व मिनी अंगणवाडी सेविकांना समान मानधन देण्यात यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मानधन, टीए-डीए आहार बिलाचे पैसे देण्यात यावे, दरमहा मोबाइल खर्च देण्यात यावा अशा मागण्या करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हमाल हत्याप्रकरणी चार संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अनैतिक प्रेम संबंधातून नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दक्षिण प्रवेशद्वाराजवल झालेल्या दीपक दगडू अहिरे या हमालाचा शनिवारी (दि. ४) रात्री खून झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी सोमवारी चार संशयितांना ताब्यात घेतले, असून त्यातील दोघे अल्पवयीन आहेत. त्यांच्याकडून या खून प्रकरणी आणखी तपास सुरू आहे.

पालेभाज्यांच्या बाजारात साईनाथ व्हेजिटेबल कंपनीत हमालीचे काम करणाऱ्या दीपक अहिरे हा युवकाचा शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घरी जात असताना न्यू उत्तम हिरा या हॉटेलजवळ जुन्नरे अॅग्रो ब्रदर्ससमोर त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. खून करून आरोपी फरार झाले होते. सीसीटीव्ही फूटेज व खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे रविवारी मयूर किरण पगारे (२०, रा. इंद्रकुंड दर्गाजवळ, पंचवटी) आणि दिगंबर किशोर वाघ (१८, रा. शनिमंदिरमागे, नवनाथ नगर, सिद्धी विनायक चाळ, पंचवटी) या दोघांना संशयितांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या दोघांवर या आधी अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. हे संशयित अट्टल गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी दोघांन ताब्यात घेण्यात आले. ते दोघे अल्पवयीन आहेत. या प्रकरणात अजून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेची पहिली सोडत सोमवारी काढण्यात आली. यामध्ये तीन हजार १३७ विद्यार्थ्यांचा समावेश असून त्यांना १५ मार्चपर्यंत संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. शासकीय कन्या विद्यालयात ही सोडत काढण्यात आली.

नाशिक जिल्ह्यातील ४५८ शाळांमध्ये ही प्रक्रिया सहा हजार ३८० जागांसाठी राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षापर्यंत ही प्रक्रिया जून महिन्यात सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना अर्धे शैक्षणिक वर्ष उलटून गेल्यावर प्रवेश मिळत होता. त्यामुळे यंदा ही प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यातच सुरू करण्यात आली. दोन मार्चपर्यंत पालकांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवारी पहिली सोडत काढण्यात आली. यात तीन हजार १३७ विद्यार्थ्यांचा क्रमांक आला असून त्यांचे या योजनेंतर्गत प्रवेश निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी २०७ विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त शाळांमध्ये सोडत लागली आहे. त्यांना त्यांच्या पसंतीनुसार हवी ती शाळा निवडता येणार आहे.

असा घेता येणार प्रवेश!
आरटीईच्या वेबसाइटवरून अॅडमिट कार्ड डाउनलोड करून पालकांना ते सर्व आवश्यक कागदपत्रांसह ते शाळेत सादर करायचे आहे. वेबसाइटवर कागदपत्रांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. एखाद्या शाळेने कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारल्यास वेळीच तक्रार निवारण समितीकडे दाद मागावी. दुसरी सोडत २० मार्चला काढण्यात येणार आहे. तोपर्यंत पहिल्या सोडतीतील सर्व प्रवेशप्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, असे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

ठराविक शाळांना पालकांची पसंती
आरटीईची अर्जप्रक्रिया सुरू झाल्यापासून पालकांनी ठराविक शाळांनाच पसंती दिल्याचे दिसून आले. यामध्ये सिम्बॉयसिस स्कूलमध्ये ३० जागांसाठी तब्बल ८३२ अर्ज, गुरू गोविंद सिंग स्कूलमध्ये ६० जागांसाठी ७७८ अर्ज, नाशिक केंब्रिज स्कूलमध्ये १०० जागांसाठी ७७३ अर्ज दाखल झाले आहेत. तर ६५ शाळांमध्ये एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. यंदा अनेक नवीन शाळाही या प्रक्रियेत समाविष्ट झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ५०० जागांची वाढ झाली. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधाराने नाशिकरोड परिसरात सोमवारी ४० लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याने भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला असून गुटखा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

‘एफडीए’चे सह आयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी व अन्य सहकाऱ्यांनी कारवाई केली. राज्य सरकारने गुटखा उत्पादन व विक्रीवर बंदी घातली असतांना शहरात सर्रासपणे गुटख्याची खरेदी विक्री केली जाते. याबाबत ‘एफडीए’कडे अनेक तक्रारी येत असतात. सोमवारीही अश‌ीच गुप्त माहिती ‘एफडीए’ला कळविण्यात आली.

‘एफडीए’चे सह आयुक्त वंजारी व अन्न सुरक्षा अधिकारी पाटील यांनी सहकाऱ्यांसह नाशिकरोडच्या मालधक्का परिसरात संशयित असलेला ट्रक तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्या ट्रकमध्ये तब्बल ४० लाख ४३ हजारांचा प्रतिबंधिक गुटखा आढळून आल्याचे पाटील यांनी ‘मटा’ला सांगितले. संबंधित गुटखा परराज्यातून महाराष्ट्रात आला. गुटखा बाळगण्यासह विक्री केल्याबद्दल लोहिया ट्रेडर्सचे संचालक रामविलास शिवनारायण लोहिया यांच्यावर ‘एफडीए’कडून कारवाई करण्यात आली आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कारवाईनंतर पुन्हा साठा
‘एफडीए’ने यापूर्वीही लोहिया ट्रेडर्सवर कारवाई केली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा गुटखा विक्री होत असल्याचे या निमित्ताने उघडकीस आले आहे. सर्वसामान्य नागरीकांनीही गुटख्याचा साठा बाळगणाऱ्यांची माहिती द्याावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

उत्पादनस्थळी कारवाई कधी?
‘एफडीए’कडून अनेकदा लाखोंचा गुटखा जप्त केला जातो. परंतु, प्रत्यक्ष गुटखा उत्पादनाच्या ठिकाणी एफडीए कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सापडलेला गुटखा साठा ताब्यात घेण्याची कारवाई झाल्यानंतर पुन्हा पुढे काहीही होत नसल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात गुटख्याचे उत्पादन होत असेल तर त्यावर कारवाई होणार की नाही असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गांधीहत्या आणि मी’ द्वितीय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

५६ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातील मेनली अमॅच्युअर्स या संस्थेच्या ‘गांधीहत्या आणि मी’ या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला. ‘गांधीहत्या आणि मी’ नाटक अतिशय संवेदनशील असून ते योग्य पध्दतीने हाताळण्यात आले.

अंतिम स्पर्धेत रंगभूषेचे द्वितीय पारितोषिक माणिक कानडे यांना तर संगीत दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक तेजस बिल्दिकर यांना मिळाले. उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक महेश डोकफोडे यांना तर स्त्री कलाकार सुरभी पाटील यांना मिळाले. अभिनयासाठी गुणवत्ता प‍्रमाणपत्रे अक्षय मुडावदकर यांना मिळाले.

नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या केल्यानंतर जे वादळ उठले, त्याचा इतिहास सर्वसामान्यांना माहीत नाही. परंतु, त्यातून जे निभावून गेले त्यांच्यावर काय आपबिती झाली याचा उहापोह करणारे ‘गांधीहत्या आणि मी’ हे नाटक होते. नथुराम गोडसेच्या गांधीहत्येनंतर जे घडते ते दाखविण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला. नथुरामचे बंधू गोपाळ गोडसे शिक्षा भोगत आहेत. त्यांना भेटायला त्यांची पत्नी सिंधू येते आणि तिच्या हाती ते ‘गांधीहत्या आणि मी’ हे पुस्तक ठेवतात. येथून प्लॅशबॅक दाखविण्यात आला आहे. गांधीजींचे मृत्युच्या दिवशी प्रार्थनेला निघण्या अगोदरचे सिंग साहेबांचे कृपाणवरून त्यांच्याशी भांडण दाखविण्यात आले. त्यानंतर नथुरामचे गांधींना मारणे, स्वत:ला अरेस्ट करून देणे आणि इतर बाबींतून या सर्व प्रकारावर प्रकाश टाकण्यात आला.

या नाटकात महेश डोकफोडे, प्रफुल्ल लेले, माधुरी जोशी, अक्षय मुडावदकर, डॉ. प्राजक्ता लेले, आशिष चंद्रचूड, अनिकेत कुलकर्णी, डॉ. प्रसाद धर्माधिकारी, सिमरपाल सिंग, सुरभी पाटील, प्रितम नाकील हर्षल भट, अमेय कुलकर्णी, अश्विनी शिरसाठ, स्वरूप बागूल, कैवल्य एखंडे यांनी भूमिका केल्या. नेपथ्य सुनील परमार यांचे होते. प्रकाशयोजना ईश्वर जगताप यांची होती. संगीत तेजस बिल्दिकर यांचे तर

वेशभूषाडॉ. प्राजक्ता लेले, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकाचे दिग्दर्शन महेश डोकफोडे यांनी केले. प्रा. रवींद्र कदम यांची नाटकाची निर्मिती केली. ‘गांधीहत्या आणि मी’ने नाशिक केंद्रातून दिग्दर्शनासह प्रकाशयोजना, रंगभूषा, उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक तसेच अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्रही मिळवले होते.

या यशाने खूप आनंद झाला आहे. संस्था स्थापन व्हायला आता २० वर्षे झाली. परंतु, पहिल्यांदाच अंतिम फेरीत गेलो होतो. नाटक द्वितीय आल्याने ती लढाई जिंकलो आहोत. त्याचा आनंद आहे. तो शब्दात व्यक्त करू शकत नाही. स्वप्न पूर्ण झाले आहे.

- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, मेनली अमॅच्युअर्स संस्था

मी भरून पावलो आहे. पाहिलेल स्वप्न पूर्ण झाले. दोन स्पर्धेत तब्बल २१ बक्षिसे मिळवली. आताही चार लाखांचं बक्षिस मिळालं. हे आम्हाला आर्थिक पाठबळ देणारं आहे. नथुराम, गोपाळ गोडसे लोकांपर्यंत पोहोचवल्याचं व त्यांना ते समजल्याचा खूप आनंद आहे.
- महेश डोकफोडे, लेखक व दिग्दर्शक, ‘गांधीहत्या आणि मी’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मुक्त’च्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पंधराव्या कुलगुरुपदी डॉ. ई. वायुनंदन यांची निवड करण्यात आली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी राज्यपाल भवनात ही निवड केली.

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी प्रमोद येवले, मोहन काशिकर आणि ई. वायुनंदन या तिघांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली होती. प्रमोद येवले यांच्या नावाची शेवटपर्यंत चर्चा होती. मात्र ई. वायुनंदन यांचा अॅकॅडेमिक बायोडाटा वजनदार भरल्याने त्यांची या पदावर निवड झाली. डॉ. ई. वायुनंदन हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ऑगस्ट १९८७ पासून कार्यरत आहेत. त्यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयात पदविका घेतलेली असून, सामान्य प्रशासन विषयात एम. ए. केलेले आहे. ते एमफिल व पीएचडीदेखील आहेत. त्यांना २५ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असून, त्यांनी संशोधनदेखील केलेले आहे. कुलगुरूपदाच्या निवडीसाठी तीन जणांची समिती नेमण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत ‘नीट’चे संचालक अजयकुमार शर्मा, सीताराम कुंटे यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: सत्ता येताच गुजराती भाषेतले बोर्ड झळकले

$
0
0

नाशिक : महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळताच गुजराती भाषेला अच्छे दिन येऊ लागले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम संपताच रामकुंडावर गुजराती भाषेचे सूचनाफलक झळकायला लागल्याने पर्यटकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाराष्ट्रात मराठीऐवजी गुजराती भाषेचा वापर अचानक वाढल्याने मुंबईकरांनी नुकतेच आंदोलन केले होते. त्याची लागण नाशिकला झाली असून, पंचवटीतील अनेक धार्मिक स्थळे आणि रस्त्यांवर अचानक गुजराती भाषेतील बोर्ड लागल्याने यात्रेकरू आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

मुंबईवर मराठी माणसाचे वर्चस्व की गुजराथी माणसाचे असा अनेक वर्षांपासून वाद आहे. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही आवाज उठवला होता. मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील वातावरण अचानक बदलले असून, अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांचे बोर्ड मराठीबरोबरच गुजराती भाषेतून तयार केले असून, महाराष्ट्र सरकाराचे नियम धाब्यावर बसवले आहेत. मध्य रेल्वेने उपनगरीय गाड्या व आरक्षण तिकिटांवर गुजराती भाषेचा वापर केला आहे. महाराष्ट्रातून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्या तसेच, ज्यांचे प्रवासी हे हिंदी भाषिक आहेत त्यांनाही गुजराथी भाषेची तिकिटे दिली जात असून, अनेक रेल्वे स्टेशनवरचे दिशादर्शक बोर्डही गुजराथी भाषेत नव्याने तयार केले आहेत. बेस्टकडून व रिलायन्सकडून देण्यात येणाऱ्या विजेचे बिल गुजराथी भाषेत देण्यास सुरुवात झाली असून, महाराष्ट्रात अचानक गुजराथी भाषेचे बोर्ड चमकू लागल्याने असे परिवर्तन कसे झाले? याचा अनेकांना प्रश्न पडला आहे.

एचडीएफसी बँकेने आपल्या वेबसाईटवर मुंबईची प्रमुख भाषा म्हणून गुजराथीचा उल्लेख केला होता. मात्र मुंबईच्या नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर हा उल्लेख काढून टाकण्यात आला. याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने रामकुंडावर गुजराती भाषेतील बोर्ड लावले आहेत. हे बोर्ड मराठी, गुजराथी व इंग्रजीतून लावण्यात आले आहेत.

केवळ गुजराती भाषेचेच बोर्ड का?

रामकुंडावर देश-विदेशातून लोक येत असतात. येथे हिंदीचा वापर केल्यास अनेकांना ही भाषा समजू शकेल. गुजराती भाषेत बोर्ड लावून ती किती लोकांना समजेल असा प्रश्न आहे. नाशिक महापालिकेने बोर्ड लावताना केवळ गुजराथी भाषेचीच का निवड केली? इतर भाषांनी काय घोडं मारलं असा सवाल नागरिक विचारत आहेत. या भाषा बदलामागे काय दडलं आहे हे तपासण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन बांधकाम ठेकेदारांकडे प्राप्तिकर विभागाचा सर्व्हे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील दोन नामांकित बांधकाम ठेकेदारांकडे आयकर विभागाने सर्व्हे करून त्यांच्या व्यवहाराची तपासणी केल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. या सर्व्हेमध्ये बी. पी. सांगळे व हर्ष कन्सस्ट्रक्शनचा समावेश आहे. या सर्व्हेत काय मिळाले किंवा त्यांच्यावर काय कारवाई केली याबाबत प्राप्तिकर विभागाने गोपनीयता पाळली आहे. सराफानंतर आता प्राप्तिकर विभागाने शहरातील बिल्डरांवर लक्ष केंद्रीत केले आहे.

नोटाबंदीनंतर प्राप्तिकर विभागाने जोरदार कारवाईला सुरुवात केली. त्यानंतर थोडीशी विश्रांती घेत हा विभाग आता पुन्हा सक्रिय झाला आहे. प्राप्तिकर विभागाने शनिवारी (दि. ४) हा सर्व्हे केल्यानंतर सोमवारी त्याबाबत सर्व कागदपत्रे व माहिती ही एकत्रित करून पुढील कारवाईसाठी पुणे येथील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे. या सर्व्हेमुळे शहरातील ठेकेदार व बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहे. सर्व्हे करण्यात आलेले दोन्ही ठेकेदार मोठे असून प्राप्तिकर खात्याच्या वेगवेगळ्या चमूने दिवसभर हा सर्व्हे केला. आर्थिक व्यवहाराच्या हिशेबातील काही व्यवहाराचा संशय आल्याने ‘प्राप्तिकर’ने ही धडक दिली असल्याचे बोलले जात आहे. या सर्व्हेत अनेक कागदपत्रांची पाहणी केली असून संशयास्पद गोष्टींची माहिती घेण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी भानसी, प्रथमेश गिते उपमहापौर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नव्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक १४ मार्च रोजी होत असून, भाजपतर्फे महापौरपदासाठी रंजना भानसी, तर उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेल्या प्रथमेश गिते यांची निवड होण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे या दोन नावांची शिफारस केली असून, त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

भानसी या अकराव्या महापौर होणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजपचे प्रभारी वसंत गितेंच्या मुलाला उपमहापौरपदाचे पक्षाकडून बक्षीस देण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सभागृह नेता आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची शक्यता आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, मुंबईत भाजपने महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेना उमेदवार देण्याची शक्यता कमीच आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पोलिस कुंभकर्णी झोपेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागरिकांचा ऐवज सुरक्षित राहील यासाठी उपायोजना करण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी ती पार पाडण्यात पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरते आहे. चोऱ्या आणि घरफोड्यांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून पोलिस स्टेशन्सचे कारभारी आणि त्यांच्या हाताखालची यंत्रणा आणखी किती दिवस कुंभकर्णी झोप घेणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटना वाढल्या आहेत.

घरे बंद करून बाहेरगावी जाणे नागरिकांना भितीदायक वाटू लागले आहे. कुलप लावलेली घरे चोरट्यांसाठी निमंत्रण ठरत असून कष्टाने कमावलेला लाखोंचा ऐवज नागरिकांना गमवावा लागतो आहे. नागरिकांच्या मालमत्तांचे रक्षण ही पोलिसांचीही जबाबदारी असून ती पार पाडण्यास पोलिस असमर्थ ठरू लागल्याची टीका नागरिक उघडपणे करीत आहेत.

सिडको, इंदिरानगर, पंचवटी, नाशिकरोडसह दाट लोकवस्तीच्या परिसरांकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला आहे. दररोज कोठे ना कोठे कुणाचे ना कुणाचे घर फोडले जात असून लाखो रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार होत आहेत. गतवर्षी शहरात रात्री २३४ तर दिवसा ४९ घरफोड्यांच्या घटना घडल्या होत्या. अशा

गुन्ह्यांपैकी केवळ २५ टक्केच गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ७५ टक्के गुन्ह्यांमधील आरोपी मोकाट असून त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. नववर्षातही चोरी आणि घरफोड्यांच्या घटनांचा आलेख उंचावतोच आहे. जानेवारीत २६ आणि फेब्रुवारीत घरफोडीच्या २८ घटना घडल्याची नोंद पोलिस दफ्तरी झाली आहे.

डीबी पथक करते काय?
प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे शोध पथक कार्यान्वित असते. पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यांचा शिताफीने तपास करून आरोपींना गजाआड करण्याची जबाबदारी या पथकावर आहे. सहायक पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी या पथकाचा प्रमुख असतो. स्वत:ची ओळख लपवून पोलिसांना कामगिरी बजावावी लागत असल्याने या पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना गणवेश परिधान न करण्याची मुभा आहे. परंतु, शहरातील अनेक पोलिस स्टेशन्समधील डीबी पथक कामगिरी बजावण्यात अपयशी ठरत असून त्यांना झोपेतून उठविण्याची वेळ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर येऊन ठेपली आहे.

बंद घरांवर चोरांचा डोळा
बंद घरे दिसताच ती फोडली जात आहेत. त्यामुळे रात्री पोलिस गस्त घालतात की फेरफटका मारतात? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. चोरट्यांना गजाआड करणे पोलिसांचे प्राथमिक कर्तव्य असले तरी ते पार पाडण्यात त्यांना अपयश येऊ लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंदिरानगरला घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर येथील राजसारथी सोसायटीतील एका इमारतीच्या सर्वच घरांना बाहेर कडी लावून या इमारतीतील फ्लॅट नंबर एकमधील सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पोलिसकडून रात्री गस्ती कमी होत असल्याने अशा चोऱ्या होत असल्याचा आरोप इंदिरानगरवासीयांनी केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद भाऊसाहेब जाधव (रा. बी - १२ फ्लॅट नं. १, राजसारथी सोसायटी, इंदिरानगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. जाधव हे कुटुंबीयांसह चार मार्चपासून बाहेरगावी गेले होते. जाधव यांना सोमवारी (दि. ६) त्यांच्यासह शेजारील फ्लॅटचे कुलूप तोडण्यात आल्याचे समजले. त्यानुसार जाधव यांनी तातडीने नाशिकला धाव घेत घराची पाहणी केली. त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यांनी पोलीसांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून श्वानपथकाकडून चोरट्यांचा तपास करण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्वानपथकाने राजसारथी सोसायटीच्या मागील बाजूपर्यंत मार्ग दाखविल्याचे पोलिसांनी सांगितले. चोरट्यांनी इमारतीत प्रवेश केल्यावर सर्वच फ्लॅटच्या दारांना बाहेरून कड्या लावल्याचेही नागरिकांनी सांगितले. फ्लॅट नंबर दोनमध्ये कोणताही ऐवज मिळून आला नसला तरी फ्लॅट नंबर एकमध्ये २२,५०० रुपये रोखसह सुमारे दोन लाख ८४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योगी’ पोलिसांची कुंडली बनवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मलाईदार पदांवर वर्षानुवर्षे गोचिडासारखे चिकटून बसणाऱ्या वसुली पंटर पोलिस कर्मचाऱ्यांची कुंडली बनवा, असे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लवकरच अशा कर्मचाऱ्यांची उचलबांगडी होणार असून, काही कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सिंघल यांनी दिली. या प्रकरणाला वाचा फुटल्याने पोलिस वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

पैशाचा माज आणि पोलिस असल्याची मस्ती काही पोलिसांच्या डोक्यात भिनली असून, त्यामुळे पोलिस दलाची बदनामी होत आहे. परिणामी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा विश्वास ढेपाळत असून, त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचा उद्रेक अलिकडेच एका पत्रातून झाला. काही कर्मचाऱ्यांनी थेट पोलिस आयुक्तांनाच पत्र लिहून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कैफियत मांडली. महाराष्ट्र टाइम्सने या पत्राला रविवारी वाचा फोडली. ‘सीपी साहेब एक झटका द्याच!’ या शिर्षकाखाली रविवारी, ५ मार्च रोजी वृत्त प्रसिध्द करण्यात आले. क्राइम राइटर, हजेरी मास्तर, ठाणे अंमलदार, डीबी कर्मचारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचे राइटर, बीट मार्शल अशा विशिष्ट जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वर्षानुवर्षे गोंजारण्याचे काम शहरात सुरू असल्याकडे या वृत्तातून लक्ष वेधण्यात आले. या वृत्ताची पोलिस वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच पोलिस आयुक्तांनीही त्याची गंभीर दखल घेतली आहे.

सिंघल यांनी खास या विषयाला अनुसरून पोलिस आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. पोलिस प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगणाऱ्या वसुली पंटर कर्मचाऱ्यांची माहिती द्या, असे आदेश यावेळी देण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घातल्यास गय केली जाणार नाही, असा इशाराही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहर पोलिस दलातील काही कर्मचारी केवळ वसुली पंटर म्हणूनच काम करीत असल्याचे सिंघल यांच्या निदर्शनास आले आहे. वर्षानुवर्षे काही कर्मचाऱ्यांची मलाईदार पदावरच वर्णी लागत असल्याचेही स्पष्ट झाले असून, हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा सिंघल यांनी दिला आहे.

‘त्या’ अधिकाऱ्यांवरील कारवाईकडे लक्ष

पोलिस आयुक्तांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा निर्णय घेतला ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. परंतु, असे डॅमेज कंट्रोल तात्पुरते न करता आयुक्तांनी कारवाईद्वारे आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. पोलिस स्टेशन्समधील ज्या अधिकाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी कर्मचारी ‘उद्योग’ करतात त्यांच्यावरही पोलिस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

काही कर्मचाऱ्यांचे पत्र मला मिळाले असून, याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पोलिस दलास बदनाम करणाऱ्या वसुली पंटर कर्मचाऱ्यांची यादी बनविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये डीबीसह अनेक बेशिस्त व बेजबाबदार कर्मचारी असून, त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल.

- डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार सानपांकडून फरांदे ‘चेकमेट’!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत एकहाती सत्ता मिळवलेल्या भाजपने महापौर व उपमहापौरपदासाठी नावे निश्चित केली आहेत. महापौरपदासाठी पाचव्यांदा निवडून आलेल्या रंजना भानसी, तर उपमहापौर पदावर नवख्या प्रथमेश गितेंची वर्णी लावली आहे. महापौर व उपमहापौर पदावर एक जुना, तर एक नवा असा उमेदवार देवून जुना नवा असा संगम साधला असला तरी गितेंच्या निवडीने पक्षातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षातून अनेक जेष्ठ निवडून आले असताना नवख्या गितेंकडे उपमहापौर पदाची जबाबदारी देवून घराणेशाहीची सुरूवात भाजपने केल्याची चर्चा आता पक्षात सुरू झाली आहे. तर आमदार प्रा. देवयानी फरांदे यांना शह देण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून वसंत गितेंना थेट चाल दिली जात असल्याचे बोलले जात आहे.

भाजपने उपमहापौरपदासाठी प्रथमच निवडून आलेल्या प्रथमेश गिते यांच्या नावाची शिफारस प्रदेशाकडे केली आहे. त्यांच्या नावामुळे पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपात पुन्हा घराणेशाही सुरू झाल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे. पालिका निवडणुकीची जबाबदारी ही वसंत गिते यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे या विजयाचे बक्षीस म्हणून त्यांच्या घरात थेट उपमहापौरपद देण्यात आले आहे. पालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे पद गितेंना देण्यात आल्याने आता पक्षातील त्यांचे वजन चांगलेच वाढले आहे.

वसंत गिते आणि भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्यात फारसे सख्य नाही. तसेच, फरांदे यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशीही फारसे पटत नाही. त्यामुळे फरांदेना चेकमेट देण्यासाठी थेट गितेंनाच पक्षाने चाल दिल्याचे पक्षात बोलले जात आहे. पक्षातील गितेंचे वजन वाढवण्यासह पालिकेतील सत्ताही त्यांच्याच हातात देवून वरिष्ठ नेत्यांनी फरांदेनाही शह दिला आहे. तसेच, पुढील निवडणुकीत गितेंसाठी मध्य मतदारसंघाची वाटचाल सोपी करून दिली आहे. त्यामुळे या निवडीला पक्षातील काही लोकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढोल मोहिमेतून महापालिकेची ६८ लाखांची वसुली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या नोट‌िसांना केराची टोपली दाखवणाऱ्या थकबाकीदांरावर ढोल-ताशांची मात्रा कामी आली असून, सोमवारी महापालिकेची तब्बल ६८ लाखांची वसुली झाली आहे. या मोहिमेत पालिकेने १० मिळकती जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या मिळकतींमध्ये सिन्नरमधील प्रतिष्ठ‌ित भैरवनाथ पतसंस्थेच्या कार्यालयाचा समावेश आहे. सोबतच शहरातील नामवंत बिल्डरांसह हॉटेलचालकांच्या मिळकतींचाही समावेश आहे. ढोल-ताशांच्या गजरात आपल्या इभ्रतीचे तीनतेरा होऊ नयेत म्हणून थकबाकीदारांनी डोळे झाकून वसुलीचे चेक पालिकेच्या स्वाधीन केल्याने पालिका मालमाल झाली आहे.

महापालिकेने थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी सोमवारी ढोलताशांची मदत घेतली. सिडकोत सकाळच्या सत्रात उपायुक्त रोहीदास दोरकुळकर यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल पामवर साडेसहा लाखांच्या थकबाकीसाठी ढोल-ताशांच्या गजरात थकबाकीपत्र देण्यात आले. त्यामुळे हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांचा विचार करून हॉटेलचालकाने साडेसहा लाखांचा चेक दिला. त्यापाठोपाठ भैरवनाथ सहकारी पतसंस्थेवर थकबाकीसाठी कारवाई करण्यात आली. यावेळी पालिकेचे पथक पोहचताच तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यालय बंद करून घेतले. ढोल-ताशे वाजवून पालिकेने सील लावून ही मालमत्ता जप्त केली. सोमवारी या कारवाईत ६८ लाख ५२ हजारांची वसुली करण्यात आली. या कारवाईला मंगळवारपासून जोमात सुरुवात होणार असून, सहा विभागांत ढोल पथके लावण्यात आली आहेत. त्यामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.


या मिळकती केल्या जप्त

ठक्कर एन. एम. - शॉप

अमोल कन्स्ट्रक्शन- दोन शॉप

दुर्गेश बिल्डर - शॉप

राज डेव्हलपर्स- शॉप

सुरेश काबडी - निवासी

देवीदास गांगुर्डे - निवासी

बिरबल सैनी- शॉप

पुष्पा जावळे- शॉप

श्री भैरवनाथ पतसंस्था


नाशिकरोडला ६७ हजार वसूल

सिन्नर फाटाः सोमवारी नाशिकरोड प्रभागात पालिकेचा हा बँडबाजा फिरल्याने ६७ हजार रुपयांची वसुली झाली. याची चांगलीच चर्चा झाली. पालिकेच्या या गांधिगीरीने थकबाकीदारांची प्रतिष्ठा डावावर लागली आहे. आपल्या प्रतिष्ठेचे खोबरे होऊ नये यासाठी एका थकबाकीदाराने तर काही थकबाकीही भरली. त्यात शाम दासवाणी यांनी मिळकत करापोटी थकबाकीपैकी ५७ हजार २०० रुपये व पाणीपट्टीपोटी १० हजार रुपयांची थकबाकी तत्काळ भरली. जगन पिंटो, साईकिरण फर्निचरचे कांकरिया, जय मल्हार हॉटेलच्या मालकाने या पथकाकडे तीन दिवसांची मुदत मागवून घेतल्याची सहाय्यक अधीक्षक नामदेव जाधव यांनी दिली. नाशिकरोड प्रभागातील विविध मोबाइल कंपन्याच्या ४९ मोबाइल टॉवरकडे सुमारे ५० लाख रुपयांची थकबाकी आहे.ही थकबाकी वसूल करण्यासाठी १० मार्चनंतर धडक मोहिम राबविली जाणार असल्याची माहिती नाशिकरोड विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांनी दिली.

सिडकोत सहा लाख वसूल
सिडकोः महापालिकेने विविध करांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांच्या दारात ढोलताशे सुरू केले आहेत. पाथर्डी रोडवरील हॉटेल पाम येथे पहिल्याच दिवशी सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने ही ढोल वाजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेमुळे थकबाकीदाराने सहा लाख रुपयांपैकी काही रक्‍कम रोख व काही धनादेशाद्वारे दिल्याचे महानगरपालिका सुत्रांनी सांगितले.

मार्चअखेर महानगरपालिकेकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीकडे जास्तच लक्ष दिले जात असते. यंदा प्रथमच थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन ढोल वाजवून गाजावाजा करून वसुली करण्याची मोहीम प्रशासनाने सुरू केली आहे.

सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने एक लाख रुपयांच्या वर थकबाकी असणारे ३१ लोक असून, संपूर्ण सिडकोत दीडशे ते दोनशे लोकांकडे घरपट्टी बाकी आहे. सिडकोतील सर्व मिळून एक कोटी रुपयांच्या आसपास थकबाकी आहे. ज्या थकबाकीदारांनी रक्कम भरलेली नाही, अशांच्या घरांसमोर ढोल वाजवत वसुलीसाठी जाणार असून, न दिल्यास त्यांच्या मिळकती सील करणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांनी दिली. सिडकोतील टॉवरवरदेखील कारवाई करण्यात येणार असून, तेदेखील सील करणार आहेत.

सोमवारच्या कारवाईत नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी टॉवरच्या करांची वसुली १० मार्चनंतर सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डॉ. कुमावत, मालिनी शिरसाठ यांच्यासह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटनोंदणी धूमधडाक्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक मनपात मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपच्या सर्व नगरसेवकांची सोमवारी दुपारी विभागीय महसूल आयुक्तांकडे गटनोंदणी करण्यात आली. पक्षाच्या गटनेतेपदी संभाजी मोरुस्कर यांची निवड करण्यात आली. भाजपचे नगरसेवक भगवे फेटे परिधान करून गट नोंदणीसाठी उपस्थित होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी नियोजन सभागृहात प्रत्येक नगरसेवकांची उपस्थिती बघून गट नोंदणीसाठी कुणाची काही हरकत आहे का, याची खात्री केली.

नाशिक मनपाच्या चाव्या शिवसेनेच्या भात्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपने शिवसेनेला मात देत, नाशिक मनपात बहुमत प्राप्त केले. त्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी हजेरी लावून गटनोंदणी केली. तीन नगरसेवक पूर्वपरवानगीने अनुपस्थित राहिले. त्यापैकी कोमल मेहरोलिया या औरंगाबाद येथे परिक्षेकामी गेल्याचे सांगण्यात आले. नाशिकरोड भाजप मंडलाध्यक्ष बाजीराव भागवत यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिल्याने भाजपच्या गोटातून त्यांना आता पालिकेत स्वीकृत नगरसेवकपदी बढती देण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएमएची निवडणूक १५ मार्च रोजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
इंडियन मेडिकल असोसिएशन, नाशिक शाखेच्यावतीने २०१८-१९ या वर्षाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. तीन उमेदवारांनी दंड थोपटले असल्याने १५ मार्च रोजी निवडणूक होणार आहे.
आयएमएची निवडणूक गेली अनेक वर्षे बिनविरोध झालेली आहे. मागील दोन वर्षांपासून या ठिकाणी मतदान पद्धतीने निवडणूक होत आहे. दरवेळी इच्छुक उमेदवारांची मनधरणी करून निवडणुकीसाठी होणारा खर्च टाळला जात असे. यंदाही निवडणूक न होता अध्यक्षाची निवड बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र, मंगळवारी माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. आवेष पलोड (अर्थोपेडिक सर्जन), डॉ. चंद्रकांत सुरवसे (बालरोग तज्ज्ञ), डॉ. शोधन बांदेकर (स्त्रीरोग तज्ज्ञ ) हे रिंगणात आहेत. आयएमचे जिल्ह्यात १ हजार ३५० सभासद आहेत. १५ मार्चला मतदान होऊन त्याच दिवशी संध्याकाळी निकाल लागणार आहे.
डॉ. प्रशांत देवरे यांनी सांगितले, की आयएमएची सभासद संख्या वाढली आहे. प्रत्येक सभासदाला आपण काही तरी करून दाखवावे अशी इच्छा असते. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी तीनही उमेदवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्याला यश आले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेतील भुजबळ पर्व संपले!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
भाजप, शिवसेना, काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही महापालिकेतील गटनेत्यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक गजानन शेलार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर आता महापालिकेत पक्षाचा किल्ला लढवण्याची जबाबदारी असणार आहे. शेलार यांच्या निवडीमुळे पालिकेतील भुजबळ पर्वही संपले आहे. शेलार हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असून, माजी मंत्री छगन भुजबळ विरोधक अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीची गटनोंदणी बुधवारी केली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सहा नगरसेवकांची मंगळवारी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी एकमताने गजानन शेलार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. सर्वच सदस्यांनी एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. निवडीनंतर कार्यालयात शेलार यांचा सत्कार करण्यात आला. छगन भुजबळ यांच्याशी पंगा घेतल्याने गजानन शेलार काही काळ राष्ट्रवादीबाहेर होते. गेल्या वेळेस पालिकेत भुजबळ पर्व होते. परंतु, भुजबळ सध्या जेलमध्ये असल्याने भुजबळ पर्वही संपले असून, आता थेट पवार समर्थकांची वर्णी लागली आहे. शेलार आक्रमक तसेच जेष्ठ नगरसेवक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा किल्ला आता त्यांना एकतर्फी लढवावा लागणार आहे. राष्ट्रवादीचा एक सदस्य स्थायी समितीवर जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images