Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पश्चिममध्ये आघाडीचा वरचष्मा

$
0
0

भावेश ब्राह्मणकर, नाशिक

शहराच्या अन्य पाच भागांत भाजप व शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले असताना पश्चिम विभागात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले आहे. उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीयांची लक्षणीय संख्या असलेल्या या प्रभागात भाजपने सर्वाधिक पाच जागा मिळविल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी चार, तर मनसे आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. एका जागेवर अपक्षाला संधी मिळाली आहे.

गेल्या निवडणुकीत पश्चिम प्रभागामध्ये १३, १४, १५, २२, २३ आणि २४ असे एकूण ७ प्रभाग होते. आताच्या प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक ७, १२, १३ आणि १४ यांचा समावेश प्रभागात झाला आहे. प्रभागरचनेमुळे यंदा व्यापक झालेल्या पश्चिम प्रभागात जोरदार रस्सीखेच होती. गंगापूररोड, महात्मानगर, कॉलेज रोडसारखा उच्चभ्रू परिसर, व्यापारी बाजारपेठ आणि जुन्या नाशिकचा काही भाग, पाच ते सहा झोपडपट्ट्या यामुळे या प्रभागाकडे सगळ्यांचेच लक्ष होते. गेल्या निवडणुकीत मनसेचे पाच, भाजप आणि काँग्रेसचे प्रत्येकी ३, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक जण विजयी झाला होता. यंदा राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा झाला आहे, तर मनसेला सर्वाधिक तोटा.

प्रभाग ७ मध्ये भाजपच्या विद्यमान तिन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या ठिकाणी तीन जागा मिळवत आमदारांनी प्रतिष्ठा राखली असली तरी एका जागी मात्र शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. भाजपच्या आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि डॉ. राहुल आहेर या तिघांच्या दृष्टीने प्रभाग ७ मधील चारही लढती अतिशय महत्त्वाच्या होत्या. कारण डॉ. आहेर यांच्या चुलतभगिनी हिमगौरी आहेर-आडके या ‘ब’ गटातून उमेदवारी करीत होत्या. हिरे यांचे दीर योगेश हिरे ‘ड’ गटातून नशीब आजमावत होते, तर ‘क’ गटात स्वाती भामरे या खान्देशवासीय उमेदवार फरांदे यांच्या समर्थक होत्या. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांना निवडून आणणे आमदारत्रयींना आवश्यकच होते. संपूर्ण महापालिका निवडणुकीत तिन्ही आमदारांनी प्रभाग ७ वगळता शहराच्या अन्य भागांत तुरळकच प्रचार केल्याचे बोलले जात होते. या तिघांनी महात्मानगरपासून रविवार कारंजापर्यंत सारा परिसर पिंजून काढला. घराघरांत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. दांडगा संपर्क, चारही पॅनलच्या उमेदवारांच्या साथीने प्रचार या जोरावर या ठिकाणी भाजपला तीन ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे. खान्देशातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भामरे यांची उमेदवारी देण्यात आली. हिरे यांच्या समर्थनाला स्वामी समर्थ भक्त परिवार, तसेच कळवण, सटाणा आणि मालेगाव या कसमा पट्ट्यातील मतदार मदतीला आले. याच पट्ट्यातील मतदारांना आकर्षित करताना डॉ. आहेर यांनी आपल्या चुलतबहिणीला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. तिन्ही आमदारांचे संपूर्ण कुटुंबीय, तसेच उमेदवारांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या साऱ्यांनीच प्रभाग पिंजून काढला होता. त्यामुळेच मतदार भाजपच्या पाठीशी राहिल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते ‘अ’ गटातून विजयी झाले आहेत. काही वर्षांपासून त्यांचा या प्रभागात दबदबा निर्माण झाला आहे. उपमहापौर म्हणूनही त्यांनी कारभार पाहिला आहे. सुशिक्षित मतदारांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. याचा फायदा बोरस्ते यांना झाला आहे. त्यांच्या रूपाने प्रभागात केवळ एकमेव यश सेनेला मिळाले आहे. मात्र, महानगप्रमुख असून केवळ स्वतःचा विजय वगळता संपूर्ण चार उमेदवार निवडून आणण्यात बोरस्ते यांना अपयश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर नगरसेवकपद भूषविलेले गोकुळ पिंगळे यांनी निवडणुकीच्या तोंडावर अचानक शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांचे बंधू तथा राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे नाशिक बाजार समितीतील कारभारामुळे सध्या जेलमध्ये आहेत. याचाही फटका गोकुळ यांना बसला. त्यामुळेच ‘ड’ गटात योगेश हिरे यांच्या विजयाचा मार्गही मोकळा झाला.

प्रभाग १२ मध्ये भाजपचे निष्ठावंत आणि सामान्य कार्यकर्ते किशोर घाटे यांची कन्या प्रियंका हिच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. या प्रभागातही भाजपची लाट होती. मात्र, भाजपला दोनच ठिकाणी विजय मिळाला. ‘ब’ गटात भाजपला बंडखोरी भोवली. या ठिकाणी सुरेश पाटील हे अधिकृत उमेदवार हेमंत धात्रक यांची अडचण ठरले. त्याचा फायदा काँग्रेसचे युवा कार्यकर्ते समीर कांबळे यांना झाला. काँग्रेसचे निष्ठावंत, तसेच ज्येष्ठ नगरसेवक उत्तम कांबळे यांचा या भागातील दबदबा त्यांचे पुत्र समीर यांना कामी आला. ‘क’ गटात काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील विजयी झाल्या. त्यांना भाजपच्या प्रेरणा बेळे यांनी कडवी झुंज दिली. बेळे प्रथमच निवडणूक लढवत असल्या तरी भाजपच्या लाटेमुळे त्यांना चांगली मते मिळाली. उद्योगापासून अन्य भागातील मतदारांनीही बेळे यांना साथ दिली; पण ती कमी पडली. अत्यल्प मतांनी डॉ. पाटील विजयी झाल्या. अटीतटीच्या लढाईत यश मिळविणाऱ्या डॉ. पाटील यांना विजयोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभले नाही. कारण त्यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्या माहेरी गेल्या होत्या. ‘ड’ गटात काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेले आणि पक्षांतरानंतर भाजपकडून उमेदवारी करणारे ज्येष्ठ नगरसेवक शिवाजी गांगुर्डे विजयी झाले. त्यांचा सामना काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि वारसा लाभलेले शैलेश कुटे यांच्याशी होता. मात्र, गांगुर्डे यांनी एकहाती दबदबा कायम राखला. पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य मिळवत गांगुर्डे यांनी विजय मिळवला. त्यामुळे या प्रभागातील त्यांचा वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला. या प्रभागात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.

प्रभाग १३ कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून होते. कारण सर्व प्रभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे पॅनल प्रचार करीत होते. या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे या तीन पक्षांच्या चारही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. आघाडीला मनसेचे इंजिन लागल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. प्रत्यक्ष गाठीभेटी आणि प्रभागातील नातीगोती, तसेच जनसंपर्क या जोरावर या पॅनलला भाजप लाटेचा कुठलाही फटका बसला नाही. या ठिकाणी मनसेचे पहिले महापौर अशी राज्यात ओळख निर्माण झालेले यतीन वाघ यांनी पक्षांतरानंतर हाती शिवबंधन बांधले. त्यांच्यासह अन्य तीन शिवसेना, चारही भाजप व अन्य उमेदवार या साऱ्यांना धोबीपछाड देत काँग्रेसचे शाहू खैरे आणि वत्सला खैरे, वाघ यांना पराभूत करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष गजानन शेलार आणि मनसेच्या सुरेखा भोसले यांनी या ठिकाणी विजय प्राप्त केला. ‘प्रभागाचा विकास करणार कोण, घड्याळ, इंजिन, पंजे दोन’ या टॅगलाइनखाली पॅनलचा प्रचार चांगलाच रंगला. त्यामुळे तेली समाजाच्या मतांसह अल्पसंख्याक मतदारांनीही भाजप व शिवसेनेला नाकारले. या भागातील बाजारपेठही महत्त्वाची होती. व्यापाऱ्यांनी शिवसेना- भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून येते.

प्रभाग १४ हा जुन्या नाशिकचा भाग आहे. या ठिकाणी मुस्लिम मते निर्णायक होती. कारण या ठिकाणी असलेल्या मुस्लिम मतदारांची संख्या. या भागात मातब्बर उमेदवार देण्यापासून शिवसेना, भाजपची पंचाईतच होती. त्यांनी उमेदवार दिले असले तरी ते विजय खेचून आणतील असे नव्हते. भाजपच्या एका अधिकृत उमेदवाराने माघार घेऊन चक्क शिवसेनेला अनपेक्षितरीत्या पाठिंबा दिला. त्यामुळे येथे शिवसेनेला अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी तीन मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक सुफी जीन, समिना मेमन यांचा समावेश आहे, तर गेल्या वेळी शहर विकास आघाडी आणि यंदा अपक्ष उमेदवारी करणारे सय्यद मुशीर यांनी यश मिळविले आहे. मुशीर यांनी काँग्रेसचे नासीरखान पठाण यांचा पराभव केला, तर ‘अ’ गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शोभा साबळे यांना संधी मिळाली आहे. त्या राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय साबळे यांच्या पत्नी आहेत. दुबई वॉर्ड अशी ओळख असलेल्या या भागात झोपडपट्टीतील मतदार आणि मुस्लिम मते निर्णायक आहेत. नाशिकचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाला आहे. याच अंतर्गत जुने नाशिक भाग विकासासाठी घेण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील मतदारांना त्याची उत्सुकता आहेच; पण याच मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिल्याने ही बाब महत्त्वाची आहे. एकंदरीतच प्रभागामध्ये मनसेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संख्याबळ पाचवरून एकवर आले आहे. राष्ट्रवादीच्या जागा एकवरून चार झाल्या आहेत, तर भाजपच्या तीनवरून पाचवर गेल्या आहेत. शिवसेनेची एक जागा कमी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपच्या विजयावर विरोधकांचे प्रश्नचिन्ह

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील भाजपच्या निर्विवाद बहुमताला कायद्याच्या चौकटीत अडकवण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. प्रभाग ३ च्‍या एव्हीएम मशिनमधील गोंधळावर विरोधकांनी एकत्रित येत भाजपच्या विजयाला आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी पंचवटीत झालेल्या घटनेच्या निषेधार्त व भाजपच्या एकाकी विजयावर आक्षेप घेत शुक्रवारी आडगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला, तर विरोधी उमेदवारांनी पत्रकार परिषद घेत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एव्हीएम मशिनमध्ये घोळ करून भाजपने विजय मिळवल्याचा आरोप या पराभूत उमेदवारांनी केला आहे. बॅलेट मशिन सील नसणे, झालेले मतदान आणि मोजणी केलेल्या मतदानात तफावत असणे याबाबींबाबत पुरावे जमविण्याचे काम या पराभूत उमेदवारांनी सुरू केले आहे. हे सर्व पुरावे हायकोर्टात सादर करून भाजपला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून, आरोपांना कायद्याच्या चौकटीत अडकवले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तो’ डीसीपीआर अधिकृतच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक विधानाला नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद देत भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता दिली. मात्र चोवीस तासातच भाजपने नाशिककरांची फसवणूक केली आहे. शहर विकासाचे भवितव्य ठरविणारी शहर विकास नियंत्रण नियमावली (डीसीपीआर) नगर विकास विभागाने पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, यापूर्वी फुटलेलीच नियमावली सही शिक्क्यानिशी समोर आली आहे. या नियमवलीने कपाटाचा प्रश्न प्रलंबितच राहणार असून, बांधकाम व्यवसायाची कोंडी होणार आहे.

अधिकृत प्रसिध्द झालेली नियंत्रण नियमावली व यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल नियमावलीत काडीमात्र फरक नाही. त्यामुळे भाजपचा खोटारडेपणा आता उघड झाला आहे. व्हायरल डीसीपीआरच आता सही शिक्क्यानिशी आला आहे.

बांधकाम व्यावसायिकांची नाराजी

नऊ मीटरच्या आत टीडीआर लागू केला नसल्याने नव्या नियमावलीत बांधकामातील कपाटांचा प्रश्‍न निकाली निघत नाहीचं, शिवाय छोट्या बिल्डरांनादेखील व्यवसाय करणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे डीसीपीआरवर बांधकाम व्यावसायिकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. दरम्‍यान, भाजपने खोटारडेपणा करीत सत्ता मिळवल्याचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादीने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात साकारणार एज्युकेशनल मॉल

$
0
0


नाशिक : केजीच्या इयत्तेपासून अगदी पीजीपर्यंतची, स्पर्धा परीक्षांची, एवढेच काय तर धार्मिक, ऐतिहासिक पुस्तकेदेखील एकाच छताखाली मिळाली तर? सर्वांनाच किती सोयीचे होईल, नाही? नाशिककरांना येत्या काही कालावधीतच अशी सोय उपलब्ध होणार आहे. एकाच ठिकाणी वेगवेगळ्या विषयांची, प्रकाशनांची, लेखकांची हवी ती पुस्तकं एकाच छताखाली मिळतील, असा एज्युकेशनल मॉल नाशिकमध्ये साकारला जाणार आहे. दी नाशिक डिस्ट्रिक्ट बुक सेलर्स अॅण्ड स्टेशनर्स असोसिएशन यांच्याकडून हा मॉल साकारण्याची प्रक्रिया शहरात सुरू झाली आहे.

नाशिकमध्ये काही वर्षांपूर्वी साकारलेल्या एका स्पोर्टस मॉलला नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकाच छताखाली सर्व प्रकारचे क्रीडा साहित्य या मॉलमुळे उपलब्ध झाले. या मॉलच्या संकल्पनेवर आधारित हा मॉल असणार आहे. स्पर्धा परीक्षा, ऐतिहासिक, धार्मिक पुस्तके मिळविताना अनेकांची होत असलेली दमछाक यामुळे थांबणार असून, ग्राहकांना हवे ते पुस्तक उपलब्ध करून देण्याच्या व पुस्तक विक्रेत्यांनाही जोडधंदा मिळवून देण्याच्या उद्देशाने हा मॉल स्थापला जाणार आहे. या प्रकारचा भारतातील हा पहिला मॉल होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवार यांनी दिली आहे.

यांची राहणार उपलब्धतता

एसएससी, सीबीएससी, आयसीएससी या बोर्डांच्या पुस्तकांसह एमपीएससी, यूपीएससी, कायद्यावर आधारित पुस्तके, नोट्स, धार्मिक ग्रंथ, स्तोत्र, नित्यपाठ, आरती संग्रह, कथा, कादंबरी अशी वेगवेगळी पुस्तके विभागानुसार या मॉलमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याशिवाय शैक्षणिक सीडीज्, मेडिकल इंजिनीअरिंगचे साहित्य, नामांकित कंपन्यांच्या वह्या, दप्तरं, पेन, पेन्सिल अशी स्टेशनरी, चित्रकलेसाठी लागणारे रंग, ब्रश, क्राफ्ट, आर्ट गॅलरी अशा शैक्षणिक बाबींशी निगडित सर्व वस्तूंचा समावेश या मॉलमध्ये असणार आहे.

विक्रेता-ग्राहकांचाही लाभ

इतर विक्रेत्यांबरोबर असलेली स्पर्धा, बदलणारा अभ्यासक्रम, डेड स्टॉक यांसारख्या समस्यांचा वारंवार विक्रेत्यांना सामना करावा लागतो. या सर्व समस्यांपासून या मॉलमुळे मुक्तता मिळू शकते. ग्राहकांनाही स्वस्तात वस्तू उपलब्ध होण्याचा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.


असोसिएशनचे मेंबर्स, रिटेलर्स अशा सर्वांच्या मान्यतेनंतर हा मॉल साकारण्याचा आम्ही निर्णय घेतला. कोणत्याही एका व्यक्तीची यावर मक्तेदारी राहणार नसून, छोट्या व्यापाऱ्यांनाही यातून लाभ व्हावा, अशी आमची इच्छा आहे. या माध्यमातून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार आहोत.

-अतुल पवार, अध्यक्ष, दी नाशिक डिस्ट्रिक्ट बुक सेलर्स अॅण्ड स्टेशनर्स असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मातब्बरांच्या आप्तांना दे धक्का!

$
0
0


नामदेव पवार, सातपूर

महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूर विभागात चार सदस्यीय प्रभागात सर्वच पक्षांनी उमेदवार उभे केले होते. यात केवळ प्रभाग ९ मध्येच भाजप व शिवसेनेत सरळ लढत होती. परंतु, चारही प्रभागांतील मातब्बरांच्या आप्तांना मतदारांनी चांगलाच धक्का दिला आहे. प्रभाग ११ मधील विद्यमान नगरसेवक प्रकाश लोंढे यांना येथे पराभूत व्हावे लागले. नगरसेवक दिनकर पाटील यांचे पुत्र अमोल आणि माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम, नगरसेवक सलिम शेख यांच्या पत्नी फरिदा शेख यांनादेखील या विभागातून पराभव पत्करावा लागला. गुन्हेगारीचा आरोप असलेले एक नगरसेवक पराभूत झाले असताना दुसरीकडे गुन्हेगारीचा आरोप असलेले योगेश शेवरे प्रभाग ११ मध्ये मनसेकडून निवडून आले आहेत. विभागातील ८, ९, १० व ११ या सर्वच प्रभागांत मतदारांनी मातब्बरांना चांगलाच धक्का दिल्याचे दिसून आले.

प्रभाग ८

येथे खरी लढत शिवसेना व भाजपमध्येच होती. गंगापूर व आनंदवली गावाच्या मतदानावर दोन्ही उमेदवारांनी डोळा ठेवला होता. यात शिवसेना गावातील मतदान घेण्यास समर्थ ठरली. भाजपच्या उमेदवारांना मात्र गावाने नाकारल्याने शिवसेनेचा विजय झाला. नगरसेवक दिनकर पाटील यांच्या गंगापूर गावातील मतदारांनीदेखील भाजपला मतदान न केल्याने मोठ्या फरकाने अमोल पाटील यांना पराभव पत्करावा लागला. आनंदवली गावातील शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनाच मतदारांनी साथ दिल्याने भाजपच्या अशोक जाधव यांना हार मानावी लागली. शिवसेनेचे विलास शिंदे, नयना गांगुर्डे, राधा बेंडकुळे विजयी झाले.

प्रभाग ९

येथे नगरसेवक दिनकर पाटील यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. एससी पुरुषाचे आरक्षण प्रभाग ९ मध्ये पडल्यावर नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी जोरदार प्रचार केला होता. परंतु, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकाला बरोबर घेणार नाही, असे ठामपणे नगरसेवक पाटील यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यामुळे साहजिकच पाटील व लोंढे यांच्या जुंपली होती. त्यात पाटील गटाची सरशी होऊन लोंढे पराभूत झाले. यात भर म्हणून माजी महापौर दशरथ पाटील यांनी भावाच्या विरोधात पुत्र प्रेम पाटील याला उभे करीत राजकारण करण्याचा प्रयत्नही केला. नगरसेवक पाटील यांच्या विरोधकांशी छुपी युतीच माजी महापौरांनी केल्याने निवडणुकीत रंगत वाढली होती. परंतु, मुरब्बी राजकारणी असलेले नगरसेवक पाटील यांनी वेळेवर विरोधकांना घरी बसविण्याचे काम केले. पक्षातीलदेखील काही पदाधिकारी नगरसेवक पाटील पडणार असा थेट उल्लेख करत प्रचार करीत होते. परंतु, प्रभागात केलेल्या कामांची पावती म्हणून पुन्हा नगरसेवक पाटील यांना मतदारांनी देत चारही भाजपचे उमेदवार निवडून दिले. येथून भाजपच्याच रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, वर्षा भालेराव यांनीही विजय मिळविला.

प्रभाग १०

विद्यमान नगरसेवक शशिकांत जाधव यांच्यासमोर शिवसेना व अपक्षांचे मोठे आव्हान उभे होते. प्रभागात काही ठिकाणी ओढावून घेतलेली नाराजी नगरसेवक जाधव यांना डोकेदुखी ठरणार होती. परंतु, शिवसेनेने तिकीट नाकारलेले माजी नगरसेवक राजू नागरे यांनी अपक्ष निवडणूक लढविल्याने शिवसेनेच्या शांताराम कुटे यांना तिसऱ्यांदा नगरसेवक जाधव यांच्यासमोर हात मानावी लागली. पिंपळगाव बहुलामधील मतविभाजनाचा मोठा फटका कुटे यांना बसल्याने जाधव पुन्हा निवडून आले. सर्व भागातून नगरसेवक जाधव यांनी मते घेतली. गावातील ज्येष्ठ नागरिक सुदाम नागरे यांनाही मतदारांनी पसंती दिली. भाजपत गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या माधुरी बोलकर यांनाही मतदारांची साथ लाभली. फरिदा शेख पराभूत झाल्या. पल्लवी पाटील यांना केवळ ११ मतांनी विजय मिळविता आला. मनसेच्या कलावती सांगळे यांना गावातील अपक्ष उमेदवार प्रतीक्षा नागरे यांना मिळालेल्या ३६१ मतांचा फटका बसल्यानेच पल्लवी पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.

प्रभाग ११

येथे मनसे, शिवसेना, रिपाइं, भाजप, माकप, बसप, भारिप, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी उमेदवार दिले होते. चार जागांवर तब्बल ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. विद्यमान स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक सलिम शेख यांच्याच पॅलनची सरशी होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, योगेश शेवरे हा गुन्हेगारीचे आरोप असलेल्या उमेदवार मनसेने घेतल्याने त्याचा फटका पक्षासह शेख यांना बसला. मात्र, ते दोघेही विजयी झाले. सर्व समाजातील मतदारांशी जवळचे संबंध असलेल्या नगरसेवक शेख यांना मतदारांनी विरोधी उमेदवारांना मोठे मताधिक्य देत मोठा धक्का दिला. विद्यमान सभापती तथा नगरसेवक सविता काळे यांचा प्रभावच प्रभागात राहिला नसल्याने नवख्या दीक्षा लोंढे यांना मतदारांनी विजयी केले. शिवसेनेच्या रुपाली गांगुर्डे यांनी त्यांना लढत दिली. येथून शिवसेनेच्या सीमा निगळ यांचाही विजय झाला. बसपच्या सुजाता काळे यांनी त्यांना लढत दिली. भाजपाच्या माधुरी काळे यांनादेखील चांगली मते पडली. शिवसेनेचे सुभाष गुंबाडे केवळ ३०८ मतांनी पराभूत झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॅक्टिकलचा निकाल द्या; अन्यथा दंड

$
0
0

जितेंद्र तरटे, नाशिक

वैद्यकीय विद्याशाखेचे अनेकदा विलंबाने लागणारे निकाल हजारो विद्यार्थ्यांच्या करिअरवरच दूरगामी परिणाम करून जातात. ही बाब हेरून आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उशिरा प्रॅक्टिकलचे मार्क्स जमा करणाऱ्या कॉलेजांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढे मेडिकल कॉलेजांनी वर्षभरातील दोन्हीही सत्रांच्या प्रॅक्टिकल परीक्षेचे मार्क्स विद्यापीठाला वेळेत न दिल्यास कॉलेजांना कारणे दाखवा नोटिशीपासून १० हजार रुपयांपर्यंतच्या शास्तीला सामोरे जावे लागणार आहे.

वैद्यकीय विद्याशाखेत पहिल्या वर्षात प्रवेशाची प्रक्रिया दीर्घकाळ लांबते. परिणामी उर्वरित वेळेत अत्यंत कमी दिवसांचे शैक्षणिक वर्ष वाट्याला येते. इतरही वर्गांच्या निकालाची स्थिती अशी असते. हाती असणाऱ्या थोडक्या दिवसांमध्ये दोन्हीही सत्रांचा समतोल साधताना विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांचीही तारांबळ उडते. परिणामी, विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक बदलून त्याचा निकालावरही प्रतिकूल परिणाम होतो. ही बाब हेरून विद्यापीठाने याबाबतीत मुळापासूनच सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ. कालिदास चव्हाण यांनी मेडिकल कॉलेजांचे प्राचार्य आणि अधिष्ठाता यांना पत्र पाठवून त्वरित प्रॅक्टिकलचे मार्क्स विद्यापीठाकडे जमा करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. या विषयासंदर्भात परीक्षा मंडळाने घेतलेल्या निर्णयाचा संदर्भ देत त्यांनी निकाल देण्यात उशीर करणाऱ्या कॉलेजांना कानपिचक्या दिल्या आहेत.

यापुढे कॉलेजांनी हिवाळी आणि उन्हाळी अशा दोन्हीही सत्रांच्या प्रॅक्टिकल परीक्षा संपल्यानंतर संबंधित वर्षाची विषयनिहाय गुणपत्रिका व उत्तरपत्रिका मोहोरबंद लिफाफ्यात विद्यापीठास सादर करायच्या आहेत. यासाठी कॉलेज प्रतिनिधीच्या हस्ते थेटपणे विद्यापीठास हा तपशील पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून भत्ताही पुरविला जातो. तरीही बहुतांश कॉलेज त्यांच्या मर्जीप्रमाणे हा तपशील पोस्टाद्वारे विद्यापीठास देतात. परिणामी, दिलेल्या मुदतीत हा तपशील मिळत नसल्याने एकूणच निकालप्रक्रिया लांबली जाते.

हे चित्र बदलण्यासाठी परीक्षा संपल्यानंतर दिलेल्या मुदतीत कॉलेजांनी हा तपशील बायहँड जमा न केल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. कॉलेजांचा यावर खुलासा झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या कॉलेजांकडून किमान १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे कॉलेजांना पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ ‘मसाप’तर्फे उद्या ‘रंग अक्षरांचे’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कविवर्य सुरेश भट हे गझल या प्रकाराला वैभव मिळावे म्हणून सदैव प्रयत्नशील होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम असावा, अशी त्यांची इच्छा होती. गझलची वाढती लोकप्रियता बघून यंदाच्या डोंबिवलीतील साहित्य संमेलनात गझल कट्टा हा कार्यक्रम आयोजित केला होता.

यामध्ये नाशिकच्या कवींनी आपली छाप पाडली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फेही मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी गझल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ६ वाजता ‘रंग अक्षरांचे’ हा कार्यक्रम आशानगर सभागृह, व्यापारी बँकेसमोर, बिटको चौकाजवळ, नाशिकरोड येथे आयोजित करण्यात आला आहे.

गझल सादर करतांना कवीचा कस लागतो. या साहित्य प्रकारास मोठ्या प्रमाणात स्वीकारल्यास त्यास राज्यस्तरावर मान्यता मिळेल आणि म्हणून नाशिक शहरातील रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, प्र. कार्यवाह प्रसाद पवार, जिल्हा प्रतिनिधी नितीन ठाकरे, कोषाध्यक्ष सुदाम सातभाई, प्रशांत केंदळे, दशरथ लोखंडे, कामिनी तनपुरे, सुरेखा गणोरे, सुजाता हिंगे, विश्वास गायधनी, हर्षल भामरे, शिवाजी म्हस्के, रमेश औटे, मानसी घमंडी, मनीषा विसपुते, राहुल बोराडे, महेश वाजे आदींनी केले आहे.


‘शेर’ ठरणार आकर्षण

नाशिकचे वैभव ज्ञानपीठ पुरस्कारविजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेने या वर्षी मराठी गझलांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये नाशिकचेच ज्येष्ठ कवी गौरवकुमार आठवले आणि ज्यांच्या नावावर गझलांचे रेकॉर्ड आहे असे हरहुन्नरी कवी संतोष हुदलीकर यांच्या गझलांचा कार्यक्रम होणार आहे. गझल पेश करण्याच्या आधी एक शेर सादर करण्याची परंपरा असल्याने त्यासदेखील तेवढेच महत्त्व असते आणि म्हणूनच ही मैफल रंगत जाते. परिसरातील रसिकांना या साहित्याच्या मेजवानीचा लाभ मिळवा यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालव्याला प्लास्टिकचा वेढा

$
0
0

पाण्यासोबत शेतात जातोय कचरा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गंगापूर डाव्या कालव्याला सध्या आवर्तन सोडण्यात आलेले आहे. या कालव्यात सर्रासपणे कचरा टाकण्यात येत असून त्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. प्लास्टिक स़डत नसल्यामुळे कालव्याला या कचऱ्याने वेढा दिलेला आहे. अनेक ठिकाणी पाण्यावर तरंगणाऱ्या या कचऱ्यामुळे कालवा तुंबून तो फुटण्याचा धोकाही निर्माण होत आहे. कालव्यातील पाणी शेतीला नेण्यात येत असताना हा प्लास्टिकचा कचरा वाहून जाऊन तो थेट शेतात प्लास्टिक जमा होऊन समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.

कचऱ्याची विल्हेवाट लावताना घरातील कचरा कुठेही फेकून देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. घरातील कचरा घंटागाडी येईपर्यंत प्रतीक्षा करीत बसण्याचे कोणीही कष्ट घेत नाही. घराबाहेर पडताना प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हा कचरा कुठेही फेकून देण्यात येतो. ज्या भागात पाण्याचा प्रवाह असतो अशा ठिकाणी कचऱ्याची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावली जाते. नदीप्रमाणेच कालव्यातही कचरा टाकण्याचे प्रमाण मोठे आहे.

कालव्यातील पाणी हे थेट शेतात सोडले जात असल्यामुळे शेतात हा कचरा जातो. सडणारा कचरा असेल तर तो थोड्याच दिवसात सडून त्याचे खत बनते. मात्र प्लास्टिकचा कचरा शेती जाऊन त्या कचऱ्याखाली आलेले पिकाच्या वाढीला अडथळा निर्माण होतो. मशागतीच्या वेळी यंत्रांमध्ये हा कचरा अडकून मशागतीलाही अडथळा होतो. हा कचरा सडत नसल्याने त्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो.

कालवा फुटण्याचा धोका

हा प्लास्टिक कचरा कालव्याला आवर्तन सुटल्यानंतर पाण्याच्या प्रवाहसोबत वाहत जातो. त्यातील प्लास्टिकचा कचरा काही ठिकाणी विशेषतः ज्या ठिकाणी कालव्याला नाल्याचा

प्रवाह कालव्याच्या प्रवाहाला छेदतो त्या ठिकाणी कालव्याचा प्रवाह हा खोल भागातून खास सोय करून पाणी खालून वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याला सायपण असेही म्हटले जाते. अशा ठिकाणी हा प्लास्टिकचा कचरा साचून राहतो. हा साचलेला कचऱ्याचे प्रमाण वाढून पाणी तुंबते या तुंबलेल्या पाण्यामुळे कालवा फुटण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाच टक्के करवाढीचा नाशिककरांवर बोजा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका प्रशासनाने सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी बजेट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पालिकेच्या उत्पन्नात होणारी घट ही बजेटच्या पथ्थ्यावर पडली आहे. गेल्या वर्षापेक्षा बजेटमध्ये जवळपास ५० कोटींची घट होणार असून, साधारण १३१० कोटींपर्यंत बजेट स्थिरावणार आहे. बजेटच्या अंमलबजावणासाठी घर व पाणीपट्टीच्या दरात पाच टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सुचविल्याने नव्या सत्ताधाऱ्यांना दरवाढीचा हा कटू निर्णय घ्यावा लागणार आहे.

पालिका निवडणुकांमुळे लेखानुदान मंजूर करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली होती. परंतु, आयोगाने त्यास मंजुरी दिली नसल्याने प्रशासनाने अखेरीस आता बजेट अंतिम करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी १३५८ कोटींचे बजेट सादर केले होते. परंतु, या वर्षीचे उत्पन्न ११७० कोटी गृहित धरण्यात आले आहे. त्यामुळे बजेट हे १३१० कोटींवर स्थिरावणार आहे. बजेटच्या अंमलबजावणासाठी प्रशासनाने घर व पाणीपट्टीत साधारण पाच टक्के करवाढ करावी असा प्रस्ताव तयार केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भावभावनांचा भुलय्या ‘अतर्क्य’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिक आयोजित पसा नाट्ययज्ञात नाट्यरंगनिर्मित ‘अतर्क्य’ हे नाटक सादर करण्यात आले.

‘अतर्क्य’ ही प्रवास अपूर्ण राहिलेल्या एका लेखकाची कथा आहे. या लेखकाला भ्रष्टाचार खपत नाही, असा त्याचा पिंड आहे. लिखाण करता यावे म्हणून तो जॉब सोडतो. मात्र, त्याचा एकच लेखसंग्रह प्रसिद्ध होतो. घरात उपासमार होत असल्याने बायकोला कामाला जावे लागते. तिलाही कमी पगार असल्याने मग मुलाला दुसऱ्याच्या घरी शिकायला ठेवतात. त्यातून लेखकाची ससेहोलपट वाढत जाते. पुढे एकदा त्याला पैशाने भरलेली बॅग सापडते. मात्र, त्या पैशांना तो हात लावत नाही. बॅगच्या मालकाला शोधण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा अॅक्सिडेंट झाल्याचे त्याला कळते. मात्र, एके ठिकाणी चहा पीत असताना बॅगची अदलाबदल होते आणि लेखकाला पैशांऐवजी कपडे मिळतात. अशा प्रकारे त्याचा प्रवास अपूर्णच राहतो. अशा आशयाचे कथानक या नाटकात दाखविण्यात आले.

सुबोध हर्डीकर लिखित या नाटकाचे निर्मितीप्रमुख बाबा चिटणीस होते. नेपथ्य राहुल शिरवाडकर, रंगभूषा नारायण देशपांडे, वेशभूषा जान्हवी भट, सानिका मेहत्रे, प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा, संगीत भूषण कासार, तर रंगमंच सहाय्य विजय धुमाळ, दुर्गेश महाडळकर यांनी केले आहे. या नाटकात अर्चना नाटकर, अभिजित कार्लेकर, दीपक ठाकूर, मंदार खांडेकर, भावेन पोकार, विजय धुमाळ व राहुल शिरवाडकर यांनी भूमिका केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चित्रकारांनी चित्रकलेत आणावी आधुनिकता’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकची चित्रपरंपरा सर्वार्थाने संपन्न असून ज्येष्ठ चित्रकारांनी या नगरीत कलामूल्यांची प्रामाणिकपणे जोपासना केली आहे. त्यांची जाणीव आजच्या चित्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे व आपल्या चित्रकृतींमध्ये आधुनिकता आणून आपले वेगळेपण सिद्ध करावे, असे प्रतिपादन आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांनी केले.

साधना आर्ट गॅलरी, दीपालीनगर येथे नाशिकमधील निवडक चित्रकारांच्या ‘व्हीजन-२०१७’ शीर्षकांतर्गत चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ आर्किटेक्ट शिंदे यांच्या हस्ते झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत रोज सकाळी १० ते रात्री ८.३० या वेळात हे प्रदर्शन चित्ररसिकांसाठी खुले राहणार आहे.

यावेळी बोलताना ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांनी, चित्रकार वा. गो. कुलकर्णी यांनी चित्रकलेत मोठे काम केले, आम्हा सर्वांचे ते गुरूच आहेत. चित्रकारांनी गुरूंचे स्मरण ठेवून कलासाधना करावी व यशस्वी व्हावे, असे मत व्यक्त केले. प्रदर्शनात चित्रकार अशोक ढिवरे, मनीष जोगळेकर, कैलास ह्याळीज, मिनानाथ खराटे, संतोष मासाळ, गणेश कदम, रवींद्र दंडगव्हाळ, वसंत पवार, जितेंद्र सोनवणे, रामभाऊ डोंगरे, सुनील मोरे, नितीन बिल्दीकर, संजय सोनवणे, किरण मोरे, मकरंद बोकील यांच्या चित्रकृती आहेत.

याप्रसंगी मृगनयनी पुराणिक आणि आर्किटेक्ट दीपक देवरे, बबन जाधव, धनंजय गोवर्धने, सुहास जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विशाखा’ चे आज वितरण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यशवंतराव चव्हाण महारष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या विशाखा काव्यसंग्रहाच्या नावाने काव्य लेखनासाठी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विशाखा पुरस्कारांची घोषणा कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी केली. सर्व पुरस्कारमूर्तींना आज, रविवारी (दि. २६) नाशिक येथे होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. पुरस्कार्थींचा परिचय असा.

‘बोलु कवतिके’ आज

मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि मुक्त विद्यापीठाच्या वतीने रविवारी सुरभी, पुणे निर्मित ‘बोलु कवतिके’ सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक रवींद्र साठे, अनुराधा मराठे,

योगिता गोडबोले, श्रीरंग भावे, अशोक काळे यांसारखे दिग्गज सहभागी राहणार असून, प्राजक्ता राज (अत्रे) नृत्ये सादर करतील. केदार परांजपे यांचे संगीत संयोजन असून, तुषार दळवी, मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी अभिवाचन करणार आहेत. हा कार्यक्रम नि:शुल्क असून, उपस्थितीचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.

डॉ. योगिनी सातारकर-पांडे

नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठात भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार, कै. सावित्रीबाई जोशी पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्य पुरस्कार मिळाले आहेत.

मोहन कुंभार

 कणकवली (सिंधुदुर्ग) येथे बी. व्ही. देसाई कॉलेजात अध्यापन करतात. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, अण्णा भाऊ साठे आदर्श साहित्यिक पुरस्कार, यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार त्यांच्या ‘जगण्याची गाथा’ या काव्यसंग्रहाला प्राप्त झाला आहे.

कवी विष्णू थोरे

 चांदवड (नाशिक) येथील कवी विष्णू थोरे हे शेतकरी असून, साहित्यविषयक पुस्तकांचे मुखपृष्ठही रेखाटतात. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा काव्य पुरस्कार, अ. ना. देशपांडे, गदिमा तुकोबा मानदेश साहित्य पुरस्कार प्राप्त आहे. चौर्य आणि घाटी या चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...जनस्थान हा ‘जीर्ण पाचोळा’ नव्हे!

$
0
0

कुसुमाग्रज पहाट कार्यक्रमाला बगल; वितरणाला नाही प्रमुख पाहुणे
Prashant.bharvirkar @timesgroup.com

Tweet : @bharvirkarPMT​

ना‌शिक : ज्ञानपीठ पुरस्काराच्या मानधनातून सुरू करण्यात आलेला ‘जनस्थान’ हा मानाचा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या आत्मकेंद्री कारभारामुळे दिवसेंदिवस ‘जीर्ण पाचोळा’ बनत चालला आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार देण्यासाठी तर प्रतिष्ठानला प्रमुख पाहुणेच मिळालेले नसून, कुसुमाग्रज पहाट या परंपरा असलेल्या कार्यक्रमालाही बगल देण्यात आली आहे. त्यामुळे या पुरस्काराने कुसुमाग्रजांच्याच कवितेतील जीर्ण पाचोळ्याचे रूप घेतले आहे की काय अशी शंका नाशिककरांना येऊ लागली आहे.

नाशिक शहराची ओळख ज्या बाबींमुळे आहे, त्यात एक महत्त्वाची आणि मानाचे पान असलेली बाब म्हणजे जनस्थान पुरस्कार. कवीवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा पुरस्कार आतापर्यंत विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, इंदिरा संत, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, बाबूराव बागुल, ना. धों. महानोर, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे आणि अरुण साधू अशा दिग्गजांना बहाल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा पुरस्कार देण्यासाठीही त्याच तोलामोलाचे दिग्गज बोलावले जात असत. जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यासाठी आतापर्यंत विजया मेहता, गिरीश कार्नाड, देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांना बोलाविले गेले. मात्र यंदाच्या वर्षी पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याच हस्ते देण्यात येणार आहे. त्यासाठी कुणीही प्रमुख पाहुणा बोलावण्याची तसदी प्रतिष्ठानने घेतलेली नाही. जी बाब प्रमुख पाहुण्यांची तीच प्रतिष्ठानतर्फे कुसुमाग्रज जयंती ते पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या सप्ताहाची आहे. दरवर्षी या सप्ताहाची सुरुवात कुसुमाग्रज पहाट या संगीतमय कार्यक्रमाने करण्यात येते मात्र यंदा या विशेष कार्यक्रमालाच बगल देण्यात आली आहे. सप्ताहाच्या कार्यक्रमातही शॉर्टकट मारण्यात आलेला आहे.

या सर्वांवर कडी करणारी एक बाब म्हणजे कधीही कोणत्या कार्यक्रमासाठी सहकार्याची अपेक्षा न करणारे प्रतिष्ठान आता विशेष सहकार्य घेऊ लागले असून याची सुरुवात बहुदा जनस्थान पुरस्कारापासून होत आहे. सपकाळ नॉलेज हबचे सहकार्य या पुरस्कार सोहळ्यासाठी घेण्यात आले असून, त्यांचा नामोल्लेख प्रत्येक पत्रिकेवर रबरी शिक्के मारून करण्यात आला आहे. एखाद्या संस्थेचे सहकार्य होत असले तर ती चांगली बाब आहे, परंतु ती आर्थिक स्वरूपात असेल तर प्रमुख पाहुण्यांवर खर्च होऊ नये ही केवळ शोकांतिकाच! त्यामुळे या पुरस्काराला प्रतिष्ठानचे पदाधिकारी तात्यासाहेबांच्याच‍ कवितेतील ‘जीर्ण पाचोळा’ समजलेत की काय अशी शंका डोके वर काढू लागली आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे ज्येष्ठ साहित्यिक आहेत. त्या नात्याने ते पुरस्कार देणार आहेत. पहाटचा कार्यक्रम रसिकांच्या उपस्थितीअभावी स्मरण कार्यक्रमात ठेवण्यात आला आहे, तो रद्द केलेला नाही.

- मकरंद हिंगणे, कार्यवाह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक उपक्रमांतून आदर्श उभा करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या कार्यातून तसेच सामाजिक उपक्रमातून आदर्श उभा करावा, असे प्रतिपादन इएसडीएस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमाणी यांनी केले. जैन सोशल ग्रुपच्या सदस्यांनी गत अनेक वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजासाठी एक वेगळाच आदर्श ठेवला आहे. नूतन कार्यकारिणी ही परंपरा पुढे सुरू ठेवेल, असा विश्वासही सोमाणी यांनी व्यक्त केला. जैन सोशल ग्रुप नाशिकच्या नूतन कार्यकारिणीच्या पदग्रहण समारोह सोहळ्यात ते बोलत होते. वर्ष २०१७ साठीचे अध्यक्ष प्रणय संचेती व त्यांच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच राका ग्रीन स्क्वेअर येथे पार पडला.

या कार्यक्रमात सर्वप्रथम मावळते सचिव संदीप कटारिया यांनी गतवर्षीचा अहवाल सादर केला. मावळते अध्यक्ष विजय लोहाडे यांनी गत वर्षाच्या प्रमुख कार्यक्रमांची माहिती दिली. यामध्ये वर्ष २०१६ मध्ये जैन सोशल ग्रुपने मिशन जलसेवा हा कार्यक्रम घेतला होता. या अंतर्गत जैन समाज व अन्य दानशूरांच्या मदतीने त्र्यंबक तालुक्यातील १० आदिवासी पाड्यांना ६० दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अनेक कायमस्वरूपी कामे करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. चांदवड तालुक्यातही जलयुक्त शिवारासाठी नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. वृक्षारोपण, पर्यावरण जागृती यासाठीही अनेक उपक्रम घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी वास्तुविशारद संजय पाटील यांनी जैन सोशल ग्रुपच्या उपक्रमांचे कौतुक करून स्वच्छ भारत अभियानातही त्यांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमादरम्यान प्रख्यात नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांच्या बहारदार नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. संस्थेचे सदस्य संदीप कटारिया, हेमंत दुगड, अमित कोठारी, पवन पटणी व डॉ. सचिन कोचर यांना २०१६ वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबाबत अध्यक्षीय पुरस्काराने गौरविण्यात आले. शपथग्रहण अधिकारी सचिन गांग यांनी प्रणय संचेती यांच्या टीमला शपथ दिली. आपल्या मनोगतात नूतन अध्यक्ष प्रणय संचेती यांनी येत्या वर्षात समाजासाठी व जैन बांधवांसाठी अनेक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला. जैन सोशल ग्रुप २०१७ ची कार्यकारिणीमध्ये सचिवपदी दिलीप पहाडे, उपाध्यक्षपदी प्रवीण संचेती, सहसचिव पदासाठी हेमंत दुगड व अमित कोठारी, कोषाध्यक्षपदी नीलेश भंडारी, जनसंपर्क अधिकारी मुग्धा शहा व भावना कासलीवाल, सल्लागार मोहन बागमार व ललित मोदी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या नगरसेविकेकडे फॉरिनची डिग्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या निवडणुकीत उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तुलनेने कमी पाहायला मिळते. मात्र, ज्या उच्चशिक्षित उमेदवारांनी निवडणूक लढवली, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा फायदाच झाला. प्रभाग क्रमांक ९ मधून निवडून आलेल्या भाजपच्या वर्षा भालेराव या त्यापैकीच एक म्हणता येतील. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीतून पीएच.डी. मिळवलेल्या त्या एकमेव नगरसेविका आहेत.

भालेराव फ्रवशी इंटरनॅशनल अॅकॅडमीमध्ये परीक्षा विभागाच्या इनचार्ज आहेत. ‘असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन टेक्निक फॉर परफॉर्मन्स एन्हान्समेंट इन मिडल स्कूल’ या विषयावर मार्च २०१५ मध्ये त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. राजकारण आणि शैक्षणिक या दोन्हींची पार्श्वभूमी असल्याने निवडून येण्याबाबत त्यांना विश्वास होता. आता स्थानिक पातळीवरील शैक्षणिक यंत्रणेत सकारात्मक बदल घडवून आणण्याचा त्यांचा मानस आहे. महापालिकेच्या शाळांचा दर्जा, भयमुक्त प्रभाग, स्मार्ट क्लासरूम अशा उपक्रमांसाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या. शिक्षण या अतिशय महत्त्वाच्या क्षेत्राला पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याचे मत मांडत शिक्षण विषयाला अनुसरून काम करण्याची इच्छाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

महापालिकेच्या शाळांमध्ये आयसीएससी, सीबीएसई बोर्डाप्रमाणे प्रभावी शिक्षणपद्धती वापरून गुणवत्तावाढीसाठी काम केले जाऊ शकते. शिक्षण हा सर्व गोष्टींचा पाया असल्याने या बाबींवर लक्ष देणे गरजेचे आहे.

– वर्षा भालेराव, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक-पुणे लोहमार्गाचे अंतिम सर्वेक्षण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे लोहमार्गाचे अंतिम सर्वेक्षण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून, त्यासाठी पुणे येथील कंपनी नियुक्त केली आहे. या सर्व्हेसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी रेल्वेने केली असून, त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांना रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांनी पत्रही पाठवले आहे. आता अंतिम (लोकेशन सर्व्हे रिपोर्ट) सर्वेक्षण झाल्यानंतर या कामाचा पुढचा टप्पा सुरू होणार आहे.

सर्व्हेचे काम पुण्यातील कोथरुड येथील मे. हायड्रोपनियम सिस्टीम ही कंपनी करणार आहे. त्यांना सर्व्हे करताना स्थानिकांकडून कोणताही अडथळा येऊ नये म्हणून हे पत्र पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहे. नाशिक-पुणे हा पाच ते सहा तासांचा प्रवास नागरिकांच्या दृष्टीने कंटाळवाणा आणि त्रस्त करणारा असल्यामुळे काँग्रेसच्या आघाडी सरकारने नाशिक ते पुणे मार्गाचे सर्वेक्षण केले होते. त्यानंतर हे काम पुन्हा रखडले. मात्र, भाजप आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला चालना मिळाली आहे. यासाठी पैशांची तरतूदही करण्यात आली आहे. या मार्गावर एकूण २५ स्थानके निश्‍चित करण्यात आली आहेत. या मार्गासाठी नाशिकच्या दिशेने रेल्वेलाइन टाकण्यात येणार आहे.

हा अंतिम सर्व्हे झाल्यानंतर मध्य रेल्वेतर्फे हा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला मंजुरी मिळाली, की मग जमिनीच्या किमती व त्या ताब्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या अंतिम अहवालातूनच या प्रकल्पाला किती खर्च येईल याचा आकडाही समोर येणार आहे.

लोहमार्गासाठी २०० कोटी

नाशिककरांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नाशिक-पुणे लोहमार्गासाठी या केंद्रीय अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या लोहमार्गासाठी राज्य व केंद्र सरकारचा प्रत्येकी ५० टक्के सहभाग राहणार आहे.

यांना होणार फायदा

नाशिक-पुणे लोहमार्गामुळे पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहूरोड, बागडेवाडी, चाकण, राजगुरुनगर, मावळ, निरगुडसर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, नांदूरखडरमल, पिंपळगावडेपा, संगमनेर, मालदाद, नांदूरशिंगोटे, सिन्नर, नाशिकरोड ही शहरे जोडली जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात एका दिवसात पाच घरफोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात एका दिवसात पाच ठिकाणी घरफोड्या करीत चोरट्यांनी तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यातील काही घटना शनिवारी दिवसभरात घडल्या असून, निवडणुकीतून मोकळे झालेल्या पोलिसांसमोर आता चोरट्यांचे आव्हान उभे ठाकले आहे.

नाशिकरोड येथील धोंगडेनगरमधील अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ८२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी विजय एकनाथ चिखले (रा. ईश्‍वर निकेतन अपार्टमेंट, धोंगडेनगर, नाशिकरोड) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शनिवारी (२५ फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास चिखले यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दुपारी १२ ते साडेचार वाजेच्या दरम्यान चोरी केली. चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडला. चोरट्यांनी चार तोळ्याचे दागिन्यांसह ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदिरानगर परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास संध्या कैलास आहेर (रा. साईसिद्धी पार्क, गुरू गोविंदसिंग, इंदिरानगर) यांचे घर फोडले. आहेर कुटुंबीय दुपारी साडेतीन ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत घराबाहेर गेले होते. या वेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील साडेनऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि २५ हजार रुपये रोख असा एक लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

दरम्यान, आडगाव शिवारातदेखील घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. शारदा चंद्रकांत निपुंगे (रा. अथर्वपुष्प सोसायटी, शरयू पार्क, आडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ते २३ फेब्रुवारीदरम्यान निपुंगे कुटुंबीय बाहेर गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ८० हजार रुपये किमतीची ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत त्यांनी लंपास केली. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी शनिवारी गुन्ह्याची नोंद केली. पंचवटीतदेखील दोन घरफोड्या झाल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनांमध्ये चोरट्यांनी तब्बल हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. नीलिमा सुनील निकाळे (रा. श्रीनिवास अपार्टमेंट, मेरी लिंकरोड) शनिवारी (दि. २५ फेब्रुवारी) सायंकाळी सव्वापाच ते पावणे सहाच्या दरम्यान घराबाहेर गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले. याच दरम्यान चोरट्यांनी रंजना किसन कुंवर (रा. साईसंपदा, साईनगर, पंचवटी) यांच्या घरातून दागिने लंपास केले. या दोन्ही घटनांत ७३ हजार रुपये किमतीचे ३८ ग्रॅम सोन्यांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बाइक रॅली’चे महिलांमध्ये आकर्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित ‘ऑल वूमेन बाइक रॅली’चे यंदाही महिलांमध्ये मोठे आकर्षण आहे. रॅलीत सहभागी होण्यासाठी आपल्या मैत्रिणींची नावे नोंदविण्यासाठी महिला उत्स्फूर्तपणे पुढे येत असल्याने त्यांची उत्सुकताही दिसून येत आहे. येत्या रविवारी (५ मार्च) सकाळी ७.३० वाजता ही रॅली भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू होणार आहे.

महिलांमध्ये वेगवेगळे उपक्रम, कार्यक्रमांबाबत नेहमीच आकर्षण दिसून येते. रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढून धमाल करण्याची संधी त्यांना अशा कार्यक्रमांद्वारे मिळत असते. त्यामुळे ‘मटा’च्या ‘ऑल वूमेन बाइक रॅली’चेही महिलांमध्ये आकर्षण आहे. ग्रुप्समध्ये सहभागी होऊन धमाल करण्यासाठी अनेक महिला आठवडाभरापूर्वीच सज्ज झाल्या आहेत. भरजरी पैठणी, नऊवारी साडी, फेटा, नथ, दागिने असा मराठमोळा साज परिधान केलेल्या, तसेच जीन्स, टॉप, लेदर जॅकेट्स, शूज असा मॉडर्न लूक केलेल्या महिलांचा दरवर्षी या रॅलीत सहभाग असतो. यंदाही असाच सहभाग बघायला मिळणार आहे. गेल्या वर्षी या रॅलीत सहभागी होता न आलेल्या महिलांसाठी तर ही सुवर्णसंधी असणार आहे. भोसला मिलिटरी कॉलेजपासून सुरू झालेली ही रॅली कॉलेजरोड, डोंगरे वसतिगृह मैदान, गंगापूर रोड, जेहान सर्कल, नवशा गणपती, बारदान फाटा, साधना मिसळ, मोतीवाला कॉलेज, त्र्यंबक रोड, एबीबी सर्कल व पुन्हा भोसला मिलिटरी कॉलेज असा रॅलीचा मार्ग असणार आहे.

हे आवश्यक

बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी वाहन परवाना आवश्यक असेल. रॅलीत १८ वर्षांपुढील महिला सहभागी होऊ शकतात. रॅलीदरम्यान सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान केलेले असावे, मोपेड किंवा गीअर बाइक चालतील, तसेच एका गाडीवर दोन महिला येऊ शकतात. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सामाजिक संदेश देणारी थीम किंवा पेहराव करून आल्यास उत्तम. सामाजिक संदेश देणारी ही रॅली असल्याने शिस्त आणि शांतता अपेक्षित आहे.

नोंदणी आवश्यक

रॅलीत सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून, नावनोंदणीसाठी मोबाइलवर BIKERALLYNSK टाइप करून ५८८८८ या क्रमांकावर एसएमएस करा किंवा ६६३७९८७ या नंबरवर संपर्क साधा. http://allwomenbikerally.com या वेबसाइटवरही आपण रजिस्ट्रेशन करू शकता. चला, तर मग तयार राहा बाइक रॅलीचा आनंद लुटण्यासाठी आणि आजच नावनोंदणी करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची एन्ट्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गटात २ व गणात तब्बल ५ जागा जिंकून शिवसेनेने मुसंडी मारली. तरीही शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भालूर गडावर मात्र भाजपने यश मिळवत सेनेच्या झंझावातातदेखील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

शिवसेनेतून भाजपत डेरेदाखल झालेले माजी आमदार संजय पवार आणि त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी भालूर गडावर आपला वरचष्मा असल्याचे दाखवत तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दिमाखाने एन्ट्री केली आहे. नांदगाव तालुक्यातील पंचायत समितीत ३ आणि जिल्हा परिषद गटात १ जागा जिंकून भाजपने तालुक्यातील आपला प्रभाव दाखवून दिला आहे.

माजी आमदार संजय पवार व त्यांचे बंधू राजेंद्र पवार शिवसेनेच्या तिकिटावर भालूर गटातून जिल्हा परिषदेवर या आधी निवडून गेले. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेना ते राष्ट्रवादी व पुन्हा शिवसेना ते भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या माजी आमदार संजय पवार यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनाच आव्हान निर्माण करत सेनेला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीपेक्षा शिवसेनेलाच लक्ष्य करणाऱ्या पवार बंधूंनी आपल्या नेतृत्वाखाली भालूर गटाची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. संजय पवार यांना तालुक्यात आपले अस्तित्व दाखवण्याची संधी या निवडणुकीने आणून दिली. भालूर गटातील व पंचायत समितीच्या दोन्ही जागा जिंकून भाजपने शिवसेनेला भालूरला त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत करून प्रथमच भाजपला या गडावर नंबर वनवर आणून ठेवले. शिवसेना तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे आव्हान मोडून काढत शिवसेनेच्या गटातील उमेदवार आशाबाई जगताप व गणातील उमेदवार श्रावण गोरे व साहेबराव नाईकवाडे यांनी विजय संपादन केला आहे. पवार यांना शह देण्यासाठी कांदे यांच्यासह शिवसेनेचे शिलेदार या पुढील काळात अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. मात्र या विजयाने संजय पवार, राजेंद्र पवार यांना नवसंजीवनी मिळाली एवढं निश्चित!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदी नव्हे, चलन शुद्धीकरणाचे धोरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारने पाचशे व हजारच्या नोटा बंद करण्यामागे काही तरी मोठा विचार ठेवला आहे, ही बाब जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. केंद्राच्या ज्या निर्णयास नोटाबंदी म्हटले जाते, ती प्रत्यक्षात केवळ नोटाबंदी नसून ते चलन शुद्धीकरणाचे धोरण भारताच्या हितासाठीच राबविले गेले आहे हे लक्षात घ्यायला हवे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले.

केटीएचएम कॉलेजच्या वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. गोविलकर म्हणाले, की नोटाबंदी धोरणास चलन शुद्धीकरणाचे धोरण असे म्हणणे योग्य होईल. चौदा ते साडेचौदा लाख कोटी रुपये बँकेत जमा झाले ते चलनात होते. मात्र, ते पैसे बँकेत येत नव्हते. परिणामी, देशात समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती. ती देशाच्या आर्थिक विकासास घातक होती.

ते म्हणाले, की दरवर्षी देशाचे बजेट राज्यघटनेच्या कलम ११२ नुसार लोकसभेत मांडावे लागते. त्यावर सदस्यांची चर्चा व त्यानंतर त्यांची मंजुरी मिळाल्यावरच सरकारला खर्च करण्यास मुभा मिळत असते. चर्चा व मंजुरी यात बराच कालावधी अंदाजे दोन ते तीन महिने जात असत. त्यामुळे त्याची अंमलबजावणी उशिराने होत असे. तो उशीर आता टाळता येणार आहे. त्याचप्रमाणे दुसरा बदल म्हणजे रेल्वे बजेट आता स्वतंत्रपणे मांडणे बंद केले. कारण पूर्वी ब्रिटिशांच्या काळात रेल्वेवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असे. आता त्याचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातच रेल्वे बजेटचा समावेश केलेला आहे. या अर्थसंकल्पाचे आणखी वैशिष्ट्य असे, की या अर्थसंकल्पात योजना खर्च व योजनेतर खर्चाची तरतूद नाही. कारण पूर्वी नियोजन आयोगाच्या योजनेनुसार अर्थसंकल्पात तरतूद केली जात असत. आता नियोजन मंडळच बरखास्त केल्यामुळे याचा विचार केलेला नाही. या अर्थसंकल्पानुसार २१ लाख ४६ हजार कोटी सरकारने खर्च करावयाचे आहेत. त्यातील ११ लाख ५७ हजार कोटी हे अनुत्पादक खर्चासाठी म्हणजे पेन्शन, संरक्षण, सबसिडी व व्याजात जाणार आहे. सर्व करांपासून सरकारला १२ लाख २७ हजार कोटी उत्पन्न मिळणार आहे. सरकार ५ लाख ४६ हजार कोटी कर्ज घेणार आहे. सरकारला या वर्षी ५ लाख २३ हजार कोटींचे कर्जावरील व्याज द्यावे लागणार आहे. आपल्या देशाचे कर्ज हे जीडीपीच्या ५६ टक्के इतके आहे. हेच प्रमाण अमेरिकेत १०४ टक्के आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images