Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

कृषी विद्यापीठासाठी विद्यार्थ्यांचा सायकल मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपकेंद्रास जागा न देणे, कृषी विद्यापीठ स्थापनेस टाळाटाळ करणे, धुळ्यातील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज बंद करण्याचा निर्णय याविरुद्ध युवा सेनेने गुरुवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांकडून सायकल मोर्चा काढण्यात आला.

भाजप सरकारचे निर्णय जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे असून याविरुद्ध भूमिकेतून युवा सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. देवपूरातील महाजन हायस्कूलपासून दुपारी बारा वाजता युवासेना जिल्हाध्यक्ष पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चास आग्रारोडने सुरुवात झाली. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभाग नोंदविला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी हुलवळे यांना मोर्चेकरांनी निवेदन दिले. शासकीय तंत्रनिकेतन बंद न करण्याचे तोंडी आश्वासन देऊ नका तर लेखी पत्र प्राचार्याना देण्यात यावे, तसेच कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्याचा हक्क नाही तर अधिकार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, जमीन, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आदी सर्व उपलब्ध आहेत. तरीदेखील कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यात स्थापन होण्यासाठी अनेकांचा विरोध का होत आहे, अशा सवालह‌ी यावेळी विचारण्यात आला. आंदोलनात ऐश्वर्या अग्रवाल, संदीप मुळीक, हरीष माळी, मनोहर जाधव, आकाश शिंदेसह विद्यार्थी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मृत्यूच्या कारणांसाठी मायलेकाची परवड

$
0
0

arvind.jadhav
@timesgroup.com
Tweet : @ArvindJadhav
नाशिक : उपचारांदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांना संबंधित डॉक्टरांना तोंड देता आले नाही तर मृत्यूचा विजय होतो. या काळात पेशंटच्या नातेवाइकांना हॉस्पिटलकडून योग्य माहिती दिली गेली नाही, तर वेगळाच गोंधळ उभा राहतो. सध्या गिरणारे गावातील मायलेकास हाच अनुभव येत आहे. त्यांना पेशंटच्या मृत्यूचे ठोस कारण मिळत नसून, यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची त्यांची तक्रार आहे. हॉस्पिटल, पोलिस, ग्राहक न्यायालय सगळीकडे उंबरठे झिजवणाऱ्या मायलेकास त्यांच्या प्रश्नांची उत्तरे तरी मिळणार का, असा प्रश्न आहे.
साधारणतः साडेचार महिन्यांपूर्वी गिरणारे गावातील शिवाजी गायकर या व्यक्तीचा अशोक स्तंभावरील खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गायकर यांना काही तपासण्यांसाठी दाखल करण्यात आले. चालता-बोलता उपचार घेणाऱ्या गायकरांचा रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. अवघ्या बारा तासांत काय झाले, असा प्रश्न गायकरांच्या पत्नीसह मुलाला सतावतो आहे. हॉस्पिटलकडे केलेल्या उपचारांबाबत, फाइलबाबत माहिती मागितली. मात्र, ती देण्यात आली नसल्याची तक्रार गायकर यांच्या विठ्ठल या मुलाने केली. शवविच्छेदन अहवालात नक्की कारण पुढे आले नाही. म्हणून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. जानेवारी महिन्यात व्हिसेराचा रिपोर्ट आला. मात्र, त्यातही ठोस कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गायकर यांच्या जमिनीवरून काही कौटुंबिक वाद सुरू आहेत. त्यातच गायकर यांचा अचानक मृत्यू झाल्याने पत्नी सीताबाई तसेच मुलगा विठ्ठल संशयाच्या भोवऱ्यात सापडले. मागील पाच महिन्यांपासून आम्ही त्रस्त झालो आहोत. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याचवेळी योग्य कारण आणि कागदपत्रे दिली असती तर ही वेळ आली नसती. पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा सीताबाई गायकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, या केससंबंधी आवश्यक कागदपत्रे त्याचवेळी सिव्हील हॉस्पिटलकडे जमा केली असल्याची माहिती संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांसाठी शाळांत आता ‘लेखनिक बँक’

$
0
0

ashwini.kawale
@timesgroup.com
Tweet : @ashwinikawaleMT
नाशिक : अंध, मतिमंद, बहुविकलांग यांना महत्त्वाच्या परीक्षांसाठी लेखन प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने शाळांमध्ये लेखनिक बँकांची स्थापना केली जाणार आहे. इयत्ता पहिलीपासून ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्याची योजना असली तरी प्रामुख्याने दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे मत माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, नाशिक विभागाचे सहसचिव एम. व्ही. कदम यांनी व्यक्त केले.
दिव्यांगांना लेखनिकांची आवश्यकता असूनही ते मिळत नसल्याची तक्रार वारंवार पुढे आली आहे. या अनुषंगाने शाळांमध्ये लेखनिक बँक असावी, हा विचार पुढे आला. या बँकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन व मूल्यांकनातील समस्या दूर करणे, या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक संधी उपलब्ध करुन देणे, लेखनिकांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असावी, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे, अध्ययन प्रक्रियेतील अडथळा दूर करणे यासाठी ही बँक मदतीची ठरणार आहे. यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नववीच्या विद्यार्थ्याची लेखनिक म्हणून नेमणूक केली जाणार असून इच्छुक विद्यार्थ्यांकडून नोंदणीपत्र भरुन घेतले जाणार आहे. अंशतः अंध, पूर्णतः अंध, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, स्वमग्न, सेरेबल पाल्सी, मतिमंद अशा विद्यार्थ्यांसाठी या बँकेचा लाभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्थापित विरुद्ध नवख्यांचा सामना!

$
0
0


fanindra.mandlik

@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक ः महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस राहिले असताना नाशिकरोडच्या निवडणुकीकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत नागरिकांनी ज्यांना भरघोस मतांनी विजयी केले, त्यांच्या पारड्यात मतांचा कौल पडणार, की नवख्या उमेदवारांना मतदार पसंती देणार याबाबत चर्चा रंगत आहे. राज्यात युती न झाल्याने शिवसेना व भारतीय जनता पक्ष यांच्यातच घमासान सुरू असून, त्याचे पडसाद नाशिकरोडमध्येही दिसून येत आहेत. गेली अनेक वर्षे बरोबर असलेल्या उमेदवारांनी एकमेकांविरोधात शड्डू ठोकले असून, त्याचा फायदा नक्की कुणाला होईल, हे येणाऱ्या काही दिवसांतच जनतेसमोर येईल.

नव्या प्रभागरचनेत नाशिकरोड विभागातील अनेक नगरसेवकांचे भाग वगळल्याने विद्यमान नगरसेवकच आमनेसामने उभे आहेत. प्रभागरचना आणि आरक्षण यामुळे सत्ताधारी नगरसेवकांपैकी काहींची प्रचंड अडचण झाली आहे. काही नगरसेवकांनी कुटुंबातील महिलांना उमेदवारी मिळवून सत्तेत सामील होण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय अनेक माजी नगरसेवकांचेही राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता वर्तविली जात असून, नाशिकरोड विभागाची निवडणूक सर्वाधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. नव्या रचनेनुसार या विभागात प्रभाग क्रमांक १७, १८, १९, २०, २१, २२ या प्रभागांचा समावेश झाला आहे. पूर्वीच्या प्रभागरचनेत प्रत्येक प्रभागात दोन नगरसेवक होते. त्याची संख्या २४ होती. नवीन रचनेनुसार प्रभाग क्रमांक १९ सोडल्यास नगरसेवकांची संख्या चार असणार आहे. त्यामुळे नाशिकरोड विभागात यापुढे एक नगरसेवक कमी होणार आहे.

प्रभाग क्रमांक १७

हा प्रभाग अनुसूचित जाती, महिला ओबीसी, सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. अनुसूचित जाती गटासाठी एकूण १३ उमेदवार रिंगणात असून, खरी लढत माजी महापौर अशोक दिवे यांचे पुत्र व शिवसेनेचे उमेदवार प्रशांत दिवे, भाजपच्या सुनंदा मोरे, कॉँग्रेसचे शशिकांत उन्हवणे व मनसेचे प्रमोद साखरे यांच्यात आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला गटात सहा उमेदवार उभे, असून शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका मंगला आढाव व भाजपच्या ज्योती आढाव यांच्यात लढत आहे. सर्वसाधारण महिलांच्या गटात शिवसेनेच्या आशा पवार, राष्ट्रवादीच्या कुंदा सहाणे, भाजपच्या सुमन सातभाई यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. याच प्रभागात सर्वाधिक चुरस माजी नगरसेवक भाजपचे दिनकर आढाव व विद्यमान नगरसेवक शैलेंद्र ढगे यांच्यात पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीतील त्यांच्यातील चुरस नाशिकरोडकरांच्या चर्चेचा विषय झाली होती. माजी महापौर अशोक दिवे यांची राहुल व प्रशांत ही दोन्ही मुले वेगवेगळ्या पक्षांकडून लढत आहेत. प्रशांत दिवे अखेरच्या क्षणी शिवसेनेचे उमेदवार बनल्याने सगळी समीकरणे बदलली आहेत.

प्रभाग क्रमांक १८

या ठिकाणी अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण असे आरक्षण आहे. अनुसूच‌ति जाती या वर्गामध्ये सहा उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या शोभना शिंदे, कॉँग्रेसचे मनोज रोकडे, भाजपचे शरद मोरे व अपक्ष उमेदवार नगरसेवक पवन पवार यांच्यात खरी लढत आहे. महिलांच्या गटात शिवसेनेच्या रंजना बोराडे या माजी नगरसेविका व व्यापारी बॅँकेवर संचालक असल्याने त्यांना या प्रभागात मताधिक्य मिळू शकते. भाजपतर्फे मंदा फड व राष्ट्रवादीतर्फे संगीता तुपे यादेखील नशीब आजमावत आहेत. सर्वसाधारण महिला गटात मीरा हांडगे, मनसेतर्फे रोहिणी पिल्ले व शिवसेनेच्या शीतल ताकाटे रिंगणात आहेत. या प्रभागातील खरी चुरस अपक्ष माजी नगरसेवक सुनील बोराडे, भारतीय जनता पक्षाचे विशाल संगमनेरे व शिवसेनेचे अशोक सातभाई यांच्यात आहे. विशाल संगमनेरे यांनी अनेक कार्यक्रम राबवून आपला वेगळा ठसा उमटवला आहे, तर पूर्वाश्रमीचे मनसेचे व सध्याचे शिवसेनेचे उमेदवार अशोक सातभाई हे व्यापारी बॅँकेवरही संचालक असल्याने त्याचाही त्यांना फायदा होऊ शकतो. सुनील बोराडे यांनीही राष्ट्रवादीतून प्रवेश केला होता. तथापि, एबी फॉर्मच्या घोळामुळे त्यांना अपक्ष लढावे लागत आहे. पक्षांतर करुनही उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली असून, शिवसेनेला ती महागात पडू शकते.

प्रभाग क्रमांक १९

या प्रभागात संमिश्र वस्ती आहे. मागील निवडणुकीत या प्रभागात मतदारांची संख्या कमी होती. यंदा भौगोलिक स्थितीचा विस्तार झाल्याने परिस्थिती बदलली आहे. हा परिसर अनुसूचित जाती, नागरिकांचा मागस वर्ग प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. अनुसूचित जाती गटात या ठिकाणी हरीश भडांगे मागील वेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंदा ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. नगरसेवक कन्हैया साळवे भाजपकडून, तर माजी नगरसेवक संतोष साळवे शिवसेनेकडून रिंगणात आहेत. महिलांच्या गटातही चुरस आहे. यात राष्ट्रवादीच्या शोभा आवारे, भाजपच्या नंदा भोर, शिवसेनेच्या जयश्री खर्जुल यांच्यात खरा सामना होणार आहे. सर्वसाधारण गटात शिवाजी भागवत भारतीय संग्राम परिषदेतर्फे, मनसेतर्फे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीतर्फे विक्की खेलूकर, तर शिवसेनेतर्फे माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे निवडणूक रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमांक २०

हा प्रभाग अनुसूचित जाती, नागरिकांचा मागस वर्ग प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण यासाठी राखीव करण्यात आला आहे. हा प्रभाग उच्चभ्रू असल्याने गेल्या दोन्ही वेळी तो भाजपचे संभाजी मोरुस्कर यांच्याकडे होता. या प्रभागात इतर प्रभागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या कमी असली, तरी तुल्यबळ लढत होईल अशी चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे कार्यकर्ते असलेले अंबादास पगारे यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याचप्रमाणे या गटात शिवसेनेतर्फे अशोक पगारे हेदेखील रिंगणात आहेत. मागास प्रवर्ग महिला गटात अवघ्या दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी नगरसेविका सीमा ताजणे या भाजपतर्फे, तर शिवसेनेतर्फे सुनीता गायकवाड उभ्या आहेत. सर्वसाधारण महिलांच्या गटात विद्यमान नगरसेविका संगीता गायकवाड भाजपतर्फे निवडणूक लढवित असून, त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेनेतर्फे योगिता गायकवाड या आहेत. या प्रभागात खरी चुरस आहे ती सर्वसाधारण गटामध्ये. यात भाजपचे विद्यमान नगरसेवक संभाजी मोरुस्कर, शिवसेनेचे गिरीश मुदल‌ीयार व मनसेचे विक्रम कदम यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. या प्रभागातील बालाजी मंदिर पाडण्याचा विषय चांगलाच तापला असून, त्याचे फायदे-तोटे नेमके कोणाला होतील यावर चर्चा झडत आहेत.

प्रभाग क्रमांक २१

या ठिकाणी स्लम वस्तीचा भाग अधिक असल्याने तेथील मतदारांवरच उमेदवारांची भिस्त राहणार आहे. त्याचप्रमाणे या प्रभागात मारवाडी, जैन व मुस्लिम समाज लक्षणीय असल्याने त्यांची मते कुठे झुकतात, यावर निकाल अवलंबून राहील. हा प्रभाग अनुसूचित जाती (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण (महिला), सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. या प्रभागात महिलांच्या अनुसूचित जाती गटात माजी मंत्री बबनराव घोलप यांची कन्या तनुजा घोलप या शिवसेनेतर्फे निवडणूक लढवित असून, त्यांना तुल्यबळ लढत देण्याचे काम शिवसेनेतून भाजपत गेलेल्या नगरसेविका कोमल मेहरोलिया यांना करावे लागत आहे. नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग गटात बहुजन समाजवादी पक्षातर्फे प्रतिभा भालेराव मैदानात असून, मनसेचे नगरसेवक रमेश धोंगडे यंदा शिवसेनेकडून निवडणूक लढवित आहेत. भाजपतर्फे नितीन खोले, मनसेतर्फे शिवसेनेचे माजी नगरसेवक अस्लम मणियार व ‘एमआयएम’चे सत्तार तांबोळी यावेळी एकमेकांसमोर उभे आहेत. सर्वसाधारण महिला गटात विद्यमान नगरसेविका वैशाली दाणी व शिवसेनेच्या ज्योती खोले यांच्यात चुरस आहे. सर्वसाधारण खुल्या गटात विद्यमान नगरसेवक सूर्यकांत लवटे यांची माजी नगरसेवक सतीश मंडलेच्या (भाजप) व रईस शेख (कॉँग्रेस) यांच्याशी चुरशीची लढत होत आहे.

प्रभाग क्रमांक २२

नाशिकरोडच्या मध्यवस्तीचा हा भाग असून, यात दिग्गजांची बाजी पणाला लागली आहे. अनुसूचित जाती विभागात शिवसेनेच्या उमेदवार व माजी महापौर नयना घोलप व त्यांच्या भावजय सुषमा रविकरण घोलप एकमेकांच्या समोर निवडणूक लढवित आहेत. नागरिकांच्या मागस वर्ग प्रभागात शिवसेना महिला विभागाच्या प्रमुख व माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर शिवसेनेतर्फे निवडणूक लढवित असून, त्यांना कॉँग्रेसच्या लंकाबाई हगवणे, भाजपच्या दीपाली कोठुळे, मनसेच्या पुष्पा रोकडे यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागणार आहे. सर्वसाधारण महिला गटात राष्ट्रवादीच्या स्नेहल देशमुख, शिवसेनेच्या सुनीता कोठुळे, भाजपच्या गौरी साडे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्वसाधारण गटात अपक्ष म्हणून चैतन्य देशमुख, भाजपतर्फे प्रभाकर पाळदे, शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक केशव पोरजे, राष्ट्रवादीचे चंद्रकांत साडे यंदाही नशीब आजमावून बघत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोरंजन!

$
0
0

मनोरंजन!

प्रचार आता रंगात येऊ लागला होता... रायबा अन् सायबाच्या उमेदवारांसह डोअर टू डोअर भेटी झालेल्या होत्या... प्रचारगाड्या भोंगे घेऊन ओरडत होत्या... आता बारी प्रचारसभांची असल्यानं वर्कर मंडळी त्याच्याच तयारीत लागली होती... नाशकात बाणवाल्यांचं लक्ष त्यांच्या नेत्याच्या पहिल्या सभेकडं लागलं होतं... पाठोपाठ सगळ्याच पार्टीवाल्यांची नेतेमंडळी मैदानं गाजवणार होती...

रायबा : अरं, मुंबईत लई सामना रंगलाय बाणाविरुद्ध कमळाबाईचा... लई चिखलफेक झालीय... दोन्ही पार्टीवाल्यांनी तिसऱ्याला मंधी घुसूनच दिलेलं नाही म्हणे... आपल्याकडं बी लई मज्जा येणार आहे.

सायबा : होय होय... सामना रंगलाय अन् सामना पेपर बंद ठेवायची बी मागणी झालीय म्हणे...

रायबा : हा सामनाच कमळ वाल्यांच्या अंगावर येऊ शकतो बघ सायबा... मंडळी एकदम हमरीतुमरीवर आलीय... युती तोडण्याची घोषणा झालीय, आता सरकार पडलं तर डबल इलेक्शन लागायचं!

सायबा : आपल्याला बरंच आहे की... आपलं मीटर सुरू राहील... पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

वर्कर-३ : वेडे झाले का, इलेक्शन त्यांना बी परवडायचं नाही अन् आपल्यालासुद्धा... उद्या दोन रुपये मिळतील, पण लगेच दहा रुपये मोजावं लागतील बघा... लई अवघड काम होईल...

रायबा : बरोबर आहे भाऊ तुझं... इलेक्शन सोपं नव्हं... ह्ये मतदान पार पडलं की घेतील दमानं दोन्ही पार्ट्या... त्यांना बी ते कळतंच की... आता फुगवायच्या तेवढ्या बेटक्या फुगवतील...

वर्कर-३ : आपला टॉपिक सभेवरून थेट सरकारवर जाऊन पोचला मंडळी... आपल्याकडं घड्याळवाल्या सुप्रियाताईंनी शेतकऱ्यानं जाळलेला कांदा सीएमना भेटणार देणार असल्याची घोषणा केलीय... सरकारला लई झोडपलं त्यांनी... बाणवाल्यांना बी मांजर म्हणाल्या...

सायबा : आमचं इजिनवालं राजाभाऊ आलं की त्ये बी झोडपंल सगळ्यांना... एकदम हॉट फेवरिट माणूस आहे आपला... नुसत्या शिट्या अन् टाळ्या पडत्यात... पब्लिक वेडं होतंय राव त्यांना पाहिल्यावर... त्ये कोणला काय म्हणतंय, ते बघू...

रायबा : लोक सभेला गर्दी करत्यात... नेत्यांना, त्यांच्या भाषणांना एन्जॉय करतात... पण, मत त्यांनाच टाकतील याचा काही नेम नसतो राव...

वर्कर-३ : ह्ये अगदी खरं आहे... एका पार्टीसाठी गोल्फ क्लब मैदान भरवलं अन् दुसरीकडं त्याच पार्टीचं उमेदवार पाडल्याचं आपण पाहिलंय राव...

(कुणी किती बी हायटेक प्रचार केला, तरी मतदारांनी त्यांचा विचार पक्का केलेला असतो, या मतावर सगळ्या वर्करच एकमत झालं होतं... पार्टीवाल्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली असली, तरी सरकार पडणार नाही, याची बी खात्री तिघांना पटली होती... सगळ्या नेत्यांच्या सभांकडे मनोरंजन म्हणून पाहायचं, त्या एन्जॉय करायच्या, हे त्यांनी आता ठरवून टाकलं होतं...)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारसाठी नवीन पार्किंग

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील रेल्वे स्टेशनकरिता सुभाषरोड भागात लवकरच चारचाकींसाठी नवीन पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. हे नवीन पार्किंग सुरू करण्यासाठी रेल्वेच्या भुसावळ मुख्यालयाला पुढील आठवड्यात प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती नाशिकरोड स्टेशनचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी ‘मटा’ला दिली. रेल्वे स्टेशनच्या चारचाकी वाहन पार्किंग घोटाळ्याचे वृत्त गुरुवारी ‘मटा’मध्ये मध्ये प्रसिद्ध होताच बेकायदेशीर वसुली थांबली असून, प्रशासनाने त्वरित दखल घेत नवीन पार्किंगसाठी कार्यवाहीस प्रारंभ केला आहे.

रेल्वे स्टेशनमध्ये दुचाकीच्या दोन अधिकृत पार्किंग आहेत. चारचाकी पार्किंग पार्सल कार्यालयामागे अडगळीत आहे. त्यामुळे असंख्य वाहनचालक रेल्वे पोलिस कार्यालयामागील सिमेंटच्या पटांगणात गाड्या लावतात. तेथे दुचाकीचे पार्किंग असले, तरी काही व्यक्ती चारचाकींच्या चालकांकडूनही बेकायदेशीररीत्या शुल्क वसूल करीत होते. विशेष म्हणजे त्याच्या पावत्याही दिल्या जात होत्या.


प्रशासन झाले सतर्क

याबाबतचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध होताच रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ निरीक्षक जुबेर पठाण, सहाय्यक निरीक्षक संजय गांगुर्डे, तसेच रेल्वे पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन पवार यांनी याची दखल घेतली. पठाण यांनी ‘मटा’ च्या वृत्ताचे क्लिपिंग आणि पत्र स्टेशनप्रमुख, रेल्वेचे बांधकाम विभागाचे अभियंता आदींना दिले. पार्किंगचा प्रश्न त्वरित सोडविण्याची मागणी पत्रात केली. त्यानंतर त्वरित बेकायदेशीर शुल्क वसुलीही थांबवली.


जागेची केली पाहणी

रेल्वे स्टेशनचे मुख्य वाणिज्य निरीक्षक आर. एस. गोसावी यांनी सांगितले, की नवीन पार्किंगसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल पुढील आठवड्यात भुसावळ मुख्यालयाला पाठविण्यात येईल. लवकरच सुभाषरोड मार्गावर अधिकृत चारचाकी पार्किंग होऊन बेकायदेशीर शुल्क वसुलीला आळा बसेल. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांनी सांगितले, की नवीन पार्किंगची मागणी आपण भुसावळ कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत गेल्या जुलै महिन्यातील बैठकीत केली होती. रेल्वे पोलिस कार्यालयामागील मोकळ्या जागेत बॅरिकेडिंग लावावेत, हा परिसर सुशोभित करावा, पार्किंग सुरू करावी, अशीही मागणी केलेली आहे.


पार्किंगचा प्रश्न गंभीर

नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. बस, रिक्षा व टॅक्सी, तसेच व्यावसायिकांचा गराडा रेल्वे स्टेशनला पडल्याने रेल्वे स्टेशन येथे वाहने नेताना नाकी नऊ येतात. रेल्वे प्रवाशांना वाहने कोठे लावावीत, असा प्रश्न पडतो. दुचाकी वाहनचालक तिकीट विक्री केंद्र, रिझर्व्हेशन कार्यालय, रेल्वे कॅन्टिन, देवी चौक, पार्सल कार्यालय येथे वाहने उभी करतात. मात्र, चारचाकी वाहनचालकांना स्थानकाच्या आवारात, रेल्वे पोलिस कार्यालयामागे किंवा सुभाषरोडला वाहनांचे पार्किंग करावे लागते. वाहनचालकाने बेकायदेशीर शुल्क देण्यास विरोध केला, तर तो गेल्यानंतर वाहनाच्या चाकांची हवा सोडून दिली जाते. काचा फोडून सीटवर ब्लेड मारले जाते. सिन्नर फाटा तिकीट बुकिंग येथे वाहनतळ आहे. परंतु, बिटको उड्डाणपुलावरून तेथे जाणे परवडत नसल्याने सिन्नर फाटा वाहनतळ रिकामाच असतो.


गरिबांना रोजगार

सूत्रांनी दावा केला, की रेल्वे पोलिस कार्यालयामागील दुचाकी पार्किंगचे टेंडर तीस लाखांच्या आसपास गेले आहे. रोजचा सरासरी खर्च सात हजार रुपये आहे. वाहनांची देखभाल करण्यासाठी पाच कर्मचारी नेमावे लागले आहेत. त्यामुळे परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. देवी चौक आणि पार्सल ऑफिसजवळील अधिकृत चारचाकी पार्किंगमुळेही रोजगारनिर्मिती झाली आहे. नवीन पार्किंग झाल्यानंतर बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात २५३ केंद्रे संवेदनशील

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत २६४६ मतदान केंद्रांपैकी तब्बल २५३ केंद्रे हे संवेदनशील तर १५ मतदान केंद्रे हे अतिसंवेदनशील आहेत. अतिसंवेदनशील केंद्रात सुरगाणा तालुक्यातील १३ तर निफाडचे २ मतदान केंद्राचा समावेश आहे. संवेदशीनल केंद्रात मालेगाव तालुक्यात सर्वाधीक ९४ केंद्र आहे. तर त्या खालोखाल नांदगाव तालुक्यात ३४ व निफाड तालुक्यात ३१ केंद्र आहेत. विशेष म्हणजे देवळा, चांदवड, नाशिक, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यात एकही संवेदनशील केंद्र नाही.

जिल्ह्यात चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुका १५ तालुक्यात होणार असून, त्यासाठी १,०३१ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गटांसाठी ३५३, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी ६७८ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. या दोन्ही निवडणुकांसाठी एकूण ६९० उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले, तरी उमेदवारांची संख्या जास्त आहे. जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकीत कोणताही गैरप्रकार होवू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी २६४६ मतदान केंद्राची तपासणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली असून, त्यातून ही यादी तयार केली आहे. या संवेदशील केंद्रावर आता अतिरिक्त पोलिस बंदोबस्त दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नोकरी मागणारे न बनता देणारे बना!’

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपली अर्थव्यवस्था ग्रामीण भागावर अवलंबून असून, शेतकरी या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, शेतीवर आधारित उद्योग-धंदे वाढीस लागणे काळाची गरज आहे. युवकांनी नोकरीमागे न धावता शेती आधारित उद्योगांना प्राधान्य द्यावे. नोकरी मागणारे न बनता नोकरी पुरविणारे बना, अशी ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत ‘जनावरांचे आरोग्य व्यवस्थापक’ आणि ‘आळंबी उत्पादन’ या दोन विषयांवर आजपासून प्रत्येकी ३० दिवसांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, वित्त अधिकारी मगन पाटील आणि आडगाव येथील पशुधन व्यवस्थापन पदविका विद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर परदेशी उपस्थित होते.

कौशल्य हे यशस्वी उद्योजक बनण्याची पहिली पायरी असल्याचे मत, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी यावेळी व्यक्त केले. महिनाभर चालणाऱ्या या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींनी संपूर्ण कौशल्य प्राप्त करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. वित्त अधिकारी मगन पाटील यांनी शेतमाल उत्पादनाच्या विपणनाकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज बोलून दाखविली.

या प्रशिक्षण कालावधीत जनावरांची निगा, लसीकरण, विविध आजार व त्यांचे निदान, प्राथमिक औषधोपचार, तसेच उत्पादनवाढीसाठी शास्रीय दृष्टिकोनासंबंधी संपूर्ण प्रशिक्षण ‘जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन’ याविषयीची माहिती देण्यात येणार आहे. आळंबीचे प्रकार, स्पॉन तयार करणे, माध्यमे बनविणे, रोगांचे व्यवस्थापन, वातावरणातील घटक नियंत्रण, बेड भरणे व एकूणच आळंबी उत्पादन करणे यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. पशुसंवर्धनतज्ज्ञ डॉ. श्याम पाटील, गृहविज्ञानतज्ज्ञ अर्चना देशमुख मार्गदर्शन करतील. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. रावसाहेब पाटील यांनी प्रास्ताविक केले. विस्तार शास्रज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी सूत्रसंचालन केले. पशुसंवर्धनतज्ज्ञ डॉ. श्याम कडूस यांनी आभार मानले. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील ४० प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला आहे.


तांत्रिक ज्ञान पुरविणार

डॉ. म्हैसेकर म्हणाले, की युवकांनी स्वयंरोजगार निर्माण करावेत. स्वयंरोजगाराची गरज ओळखूनच कृषी विज्ञान केंद्रामार्फत कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालून यशस्वी उद्योजक बनता येते, याची प्रचीती केंद्राने यापूर्वी राबविलेल्या प्रशिक्षणातून तयार झालेल्या प्रशिक्षणार्थींना पाहून येते. आज ते मोठे व्यावसायिक बनले असून, ग्रामीण भागातील महिलांना व ग्रामीण युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरवीत आहेत. आगामी काळात ग्रामीण युवकांनी उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, त्यांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत तांत्रिक ज्ञान पुरविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रचार करावा तरी कसा?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रंगात आली असली तरी उमेदवारांपुढे एकच प्रश्न उभा आहे, तो म्हणजे प्रचार कसा करावा?. माघारीपर्यंत म्हणजेच १३ तारखेपर्यंत सर्वकाही गपगार होते. आता मतदानास अवघे चार दिवस उरले असता धावपळ उडाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी घेतलेले अद्यापही वरपासून काही रसद मिळेल या आपेक्षेवर आहेत. रोजच होत असलेल्या चर्चा, आदळआपट अथवा भ्रमणध्वनी केलेला त्रागा यामधून जाणवत आहे, उमेदवारांची निधीसाठीची घाळतेळ जाणवत आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत असून अव्वाच्या सव्वा अश्वासनांची खैरात होत आहे. तथापि प्रचरात मुक्त हस्ते होणारा खर्च हा प्रमुख विषय असतो. नोटाबंदीमुळे याचा थेट परिणाम जाणवत आहे.

त्र्यंबक तालुक्यात तीन गट आहेत. मतदार संख्या सरासरी ३० हजारांच्या आसपास आहे. तथापि भौगोलीक विस्तार मात्र मोठा आहे. धुमोडीपासून देवगाव येल्याची मेटपर्यंत पसरलेला अंजनेरी गट, हरसूल गटाचा अर्धा भाग वाघेरा घाटाच्या वर आणि अर्धा अधिक घाटाच्या खाली, ठाणपाडा गटात दुर्गम विखुरलेल्या वस्ती यामुळे या तिनही गटात प्रचारासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारांची दमछाक होत आहे. एका टोकापासून निघाल्यास दुसऱ्या टोकास संपर्क साधायचा कसा, त्यात मोबाइल रेंजचा प्रश्न आहेच.

या सर्वांवर मात करत हरसूल ठाणापडा भागात उमेदवार गेले तर तेथे स्थलांतराची समस्या जाणवते. एकट्या ठाणापडा गटातून १७ हजार मतदार रोजगारासाठी बाहेर गेले आहेत, असे एका कार्यकर्त्याने चर्चेत सांग‌ितले. तरी एवढ्या मतदारांना वाहनाने आणायचे कसे, जो आणेल तो त्यांची पानसुपारी आणि प्रवास खर्च करून आणेल, अशीदेखील चर्चा आता होत आहे. प्रचारासाठी वाहनांच्या झुंडी फिरतात. वाहनात असलेली कार्यकर्त्यांची फौज रॅलीची शोभा वाढवते. घरोघर लहान मुले, चकीत होऊन या प्रचारकांकडे पाहणारी लहान उघडी नागडी मुले, एखाद दुसरा वयोवृद्ध इसम किंवा घराला लागलेले टाळे असेच दृष्य ग्रामीण भागात दिसून येत आहे.

तहसील कार्यालयाने चेकपोस्ट सुरू केल्याने वाहनातून जाणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची पंचाईत झालेली पहावयास मिळत आहे. वाहनांचा फौजफाटा सोबत असतो. त्यामध्ये प्रचार साहित्य, झेंडे, स्टिकर लावलेले असल्याने गाडी तपासणी होताच कार्यकर्त्यांचे धाबे दणाणत आहे. कागदपत्र दाखवत अधिकाऱ्यांची समजूत काढतांना नाकीनऊ येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबे-सुकेणेत शिवसेनेपुढे आव्हान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील राजकीय पटलावर कसबे-सुकेणे गट हा सर्वच पक्षाच्या वतीने महत्त्पूर्ण मानला जातो. आरक्षणामुळे काहीसा निरुत्साह असलेल्या या गटात पक्षीय पातळीवर तिरंगी त्यातच नागरी विकास आघाडीनेही उमेदवार दिल्याने चौरंगी लढत रंगणार आहे. दरम्यान या गटात विद्यमान आमदार अनिल कदम यांच्या विरोधात स्व. आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र यतीन कदम यांनी रणशिंग फुंकले असून, नारायणगाव गणात मोगल घराण्यातील राजकीय वारसा लाभलेल्या दोन स्नुषा आमनेसामने आहेत. त्यामुळे यंदा या गटात भाऊबंदकीत राजकारण तापणार आहे.

कसबे-सुकेणे गटावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या गटात कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओने, दिक्षी, नारायणगाव (खेरवाडी), साकोरे मिग अशी राजकीय दृष्ट्या सजग असलेली गावे येतात. यंदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे येथील प्रस्थापित पुढाऱ्यांची गैरसोय झाली असली तरी पक्षीय पातळीवर स्थानिक पुढाऱ्यांनी उमेदवार दिले आहेत. शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या गटात सेनेने ओझरहून दीपक शिरसाठ यांना आयात करून उमेदवारी दिली आहे. तर आघाडीने बाणगंगा काठाच्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची मोट बांधीत कसबे सुकेणेचे प्रकाश धुळे यांना रिंगणात उतरविले आहे. तिकडे शिवसेनेने तिकीट नाकारल्याने निफाड पंचायत समितीच्या माजी सभापती लता गाढवे यांनी सेनेला रामराम ठोकत भाजपकडून उमेदवारी मिळवली आहे. संपूर्ण ज‌िल्ह्याचे लक्ष असलेल्या ओझरच्या भाऊबंदकीने आता सिमोउल्लंघन केले असून, रावसाहेब कदम यांचे पुत्र यतीन कदम यांनीही या गटात लक्ष केंद्रित करून शिवसेनेला रोखण्यासाठी रमेश जाधव यांना पुरस्कृत करीत नागरी आघाडीने शिवसेनेसह आघाडीला आव्हान दिले आहे. याशिवाय विमल धुळे आणि संजय माळी हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. या गटात सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी सर्वाधिक प्रबळ असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बड्या पुढाऱ्यांनी नारायणगाव गणाकडे लक्ष ठेवले आहे. कसबे सुकेणे गट सेनेकडून ताब्यात घेण्यासाठी सेनेविरुद्ध सर्व अशीच लढाई राहणार आहे.

या गटात ओझर-सुकेणे-पिंपळस, कोकणगाव-सुकेणे-चांदोरी, वडाळी आदी प्रमुख रस्त्यांचा प्रश्न, कसबे सुकेणेत अद्यावत जलशुद्धीकरण केंद्र, शिवार रस्ते, उच्च शिक्षणाच्या सोयीत मागे पडलेले कसबे सुकेणे आणि शेतीशी निगडित प्रश्न, बाणगंगा नदीवरील नादुरुस्त बंधारे, ओने, दात्याने येथील प्रलंबित पूल, पिण्याचे पाणी, गावांतर्गत असलेल्या मूलभूत सुविधा आदी प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे आहेत. यतीन कदम यांनी सर्वप्रथम प्रचाराचा शुभारंभ करून आरोप प्रत्यारोपणाच्या फैरी झाडल्या आहेत. तर आघाडीने वैयत्तिक प्रचारास भर दिला आहे. कसबे सुकेणे गटात कसबे सुकेणे व नारायणगाव हे दोन गण असून याठिकाणी नारायणगाव गण निर्णायक ठरणार आहे. कसबे सुकेणेसह खेरवाडी, मौजे सुकेणे आणि दिक्षी आणि खेरवाडी या गावांची भूमिका या गटात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदापट्ट्यात आता आत्महत्या सत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी भाव कोसळल्याने पाच एकर क्षेत्रातील कांदा जाळल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच या तालुक्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पिंपळगाव जलाल येथील संतोष भाऊसाहेब आवारे (२५) याने शेततळ्यात उडी घेतली, तर राजापूर येथील अशोक मांजरे (२७) याने विषप्राशन करून आत्महत्या केली.

गेल्यावर्षी जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर यंदा दीड महिन्यात ही सहावी आत्महत्या आहे. जिल्ह्यात एकीकडे महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येमुळे प्रशासनही हादरले आहे. एकाच वेळी घडलेल्या या घटनेमागे नेमके कारण पुढे आलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी डोंगरे यांच्या शेताची बुधवारी पाहणी करून जळालेला कांदा मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचे सांगत आपला संताप व्यक्त केला होता. जिल्ह्यात दीड महिन्यात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, यातील बहुतांश आत्महत्या कांदा पिकणाऱ्या तालुक्यात झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय, पक्षासाठी घेतला आम्ही निधी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दोन लाख रुपये घेतल्याच्या त्या व्हिडीओ प्रकरणी भाजपने आचारसंहिता कक्षाकडे अखेरीस आपला कबुलीजबाब दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारांकडून पेसे घेतल्याची कबुली दिली असून, हा पैसा पक्षाच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. पक्षाकडून त्याचा रीतसर हिशेब आयोगाला सादर केला जाणार असल्याने या व्हिडीओची हवा आता निघून गेली आहे. दरम्यान, काही जणांकडून रोकड स्वरूपात घेतलेल्या पैशांबाबत आयोगाकडून त्यांना पुन्हा विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांसाठी तिकीटवाटपावेळी भाजप कार्यालयात प्रत्येक उमेदवाराकडून दोन लाख रुपये मागितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे भाजपची चांगलीच अडचण होऊन उत्तरे देताना तारांबळ उडाली होती. भाजपने तिकिटासाठी पैसे घेतल्याचा आरोप पक्षातीलच काही नाराजांनी केला होता, तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत आचारसंहिता विभागाने आमदार सानप यांना नोटीस बजावत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सानप यांनी खुलासा सादर केला आहे. त्यात उमेदवारांकडून दोन- दोन लाख रुपये घेतल्याची कबुली दिली आहे. मात्र, हा निधी पक्षाच्या प्रचारासाठी वापरला जाणार असल्याचा दावा केला आहे. पक्षाकडून प्रचारासाठी सामूहिक खर्च केला जाणार आहे. त्यासाठी हा निधी वापरला जाणार असून, त्याचा खर्च मुदतीत आयोगाकडे सादर केला जाणार असल्याचे स्पष्टीकरण सानप यांनी आयोगाच्या सरिता नरके यांच्याकडे केली आहे.

रोकडसंदर्भात विचारणा

आमदार सानप यांनी सादर केलेल्या खुलाशावर आयोगाकडून अभ्यास सुरू आहे. भाजपने काही उमेदवारांकडून रोख स्वरूपात पैसेही घेतले आहेत. त्यामुळे या रोकडसंदर्भात आमदार सानप यांनी पुन्हा विचारणा केली जाण्याची शक्यता आहे. सोबतच काही उमेदवारांनीही आपला खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. वेळेत त्यांनी आपला खर्च सादर केला नाही तर थेट निकाल थांबवण्याचाही इशारा आयोगाकडून देण्यात आला आहे, तसेच दहा लाखांच्या व्हिडीओबाबतही भाजपला दिलासा मिळाला असून, हा व्हिडीओ बनावट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोष्ट असह्य वेदनेच्या सुसह्य प्रवासाची

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत/ निफाड

असह्य मरणकळा, सोबतीला आई, मामी आणि गाठीशी अवघे पाचशे रुपये... गरीब गर्भवतीच्या जिवावर बेतणारा हा प्रसंग... वेदनेच्या कळा थांबत नव्हत्या. अशा परिस्थितीत कळवण रुग्णालयाने नाकारले आणि नाशिकच्या सिव्हिलनेही झिडकारले आणि गर्भवतीच्या पोटात असह्य कळ उमटली... आई, मामी भेदरल्या, त्यात रात्रीचा प्रसंग. मरणकळेच्या प्रवासाने अखेर माहेरची वाट धरली. मात्र, एका स्पीडब्रेकरने असह्य कळ उठली आणि या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला... सुदैवाने नॅच्युरल डिलीव्हरी झाली असली नामपूरजवळील शारदा गावातील मोलमजुरी करणाऱ्या माई रवी गायकवाड या महिलेच्या वाट्याला आलेला मरणकळांचा हा प्रवास अंगावर शहारे आणणारा आहे. अत्याधुनिक आरोग्य यंत्रणा असल्या तरी शासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांच्या प्रसूती अशा राम भरोसेच सुरू असल्याचे धक्कादायक वास्तवही या निमित्ताने समोर आले आहे.

नामपूरजवळ शारदा या गावातील मोलमजुरी करणारी माई रवी गायकवाड या महिलेचे पहिलेच बाळंतपण होते. असह्य वेदना सहन करत बुधवारी ही महिला कळवण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. मात्र, हृदयविकार आणि रक्तदाबाचे कारण सांगित तिला नाशिक सिव्हिलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, तेथेही या महिलेला तोच अनुभव आला. गर्भ व आईच्या जिवाला धोका असल्याचे सांगत तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला नाशिक सिव्हिलने दिला. सोबतीला आई कल्पना काशिनाथ बर्डे व मामी लीलाबाई भागा पवार या दोघीच होत्या आणि हातात अवघे पाचशे रुपये. त्यात नाशिक सिव्हिलने नाकारल्याने खासगी रुग्णालयाचा खर्च कसा परवडणार? हतबल झालेल्या या महिला रात्रभर नाशिक रुग्णालयाबाहेर जीव मुठीत धरून थांबल्या. एकीकडे मुलीच्या वेदना, दुसरीकडे उपचाराचा प्रश्न. अखेर त्यांनी देवाच्या भरवशावर गर्भवतीला सटाणा तालुक्यातील सौंदाणे येथे माहेरी नेण्याचा निर्णय घेतला. गर्भवतीचे दिवसही पूर्ण झाले होते. अशा अवस्थेत मरणकळा सोसणाऱ्या मुलीला घेऊन त्या पहाटे नाशिक-अक्कलकुवा बसमध्ये बसल्या. गर्भवतीच्या वेदनांचा प्रवास थांबला नाही.

स्पीडब्रेकरच्या धक्क्याने प्रसूती!

पिंपळगाव बसवंतजवळ कोकणगाव येथील स्पीडब्रेकरवर भरधाव बस आदळली आणि या महिलेची प्रसूती झाली. ही बाब लक्षात येताच बसचालक व वाहकांनी बस थेट पिंपळगाव बसवंत येथे सकाळी सहा वाजता आणली. पेपर विक्रेते संजय साळुंके यांच्या मदतीने बस पिंपळगावच्या रुग्णालयात नेली. तेथे डॉ. रेखा सोनवणे, डॉ. अश्विन काकड यांच्यासह कल्पना ठाकरे, गणेश जाधव, डोंगरे आदींनी महिलेची योग्य काळजी घेत उपचार सुरू केले. मुलगा झाला व बाळाची आई सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आईच्या जिवात जीव आला. एक प्रकारे हा दोन जिवांचा जन्म होता.

पिंपळगावात माणुसकीचा प्रत्यय

या महिलेच्या मदतीला गावातील अनेक जण पुढे आले. पिंपळगाव बसवंतचे सराफ व्यावसायिक प्रमोद आहेरराव ज्वेलर्स यांनी या महिलेला साडीचोळी व बाळंतविडा असे सर्व साहित्य दिले. संजय साळुंके, जगन आंबेकर, श्रावण मोरे, नीलेश सोनवणे, प्रदीप जोशी यांनी मदतीची जबाबदारी उचलली. दोन रुग्णालयांनी नाकारून अखेर बसमध्ये सुखरूपपणे प्रसूती झालेल्या या महिलेला पिंपळगाव बसवंतमधील माणुसकीने गहिवरून आले. तिच्या आरोग्याची व घरापर्यंत पोहोचविण्याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन डॉ. रेखा सोनवणे यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार निर्लज्ज!, उद्धव ठाकरेंचा घणाघात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार हे निर्लज्ज आहे, अशा शब्दांत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे जाहीर सभेत भाजपवर तोफ डागली. गोल्फ क्लब मैदानावर गुरुवारी सायंकाळी अर्ध्या तासाच्या भाषणात उध्दव यांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांना कांदा जा‍ळावा लागतो आहे. सरकारने याची जबाबदारी घ्यावी. शरद पवार मंत्री होते तेव्हा कांदा फेकला आता सरकार आले आहे, तेव्हा जबाबदारी घेऊन निर्णय घ्या, असे आव्हान उद्धव यांनी दिले.

नोटाबंदीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असून, त्याला संकटाच्या खाईतून काढणे अत्यावश्यक आहे. त्यामुळेच शिवसेनेचे सर्व मंत्री खिशात राजीनामे ठेवून आहेत. शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती आणि पुन्हा शेतकऱ्याला बिनव्याजी कर्ज द्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास तेथील शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याची घोषणा भाजप सरकार करीत आहे. प्रत्यक्षात महाराष्ट्रात सत्ता असताना येथे का कर्जमुक्ती करीत नाहीत, असा सवाल करीत उद्धव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांनी केवळ आता आयकर भरायचा आहे, हीच घोषणा आता बाकी राहिली आहे, असे उद्धव म्हणाले. भाजप देशात व राज्यात फसगत करीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेप्रमाणे सर्वांनी फसगतीविरुद्ध एकत्र या, असे आवाहन उद्धव यांनी केले. उद्धव यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे पुत्र प्रितेश छाजेड यांनी या वेळी शिवसेनेत प्रवेश केला. छाजेड यांच्यासह गोकुळ पाटील, बापू निमसे, अभय गुंजाळ आदींनी उद्धव यांच्या उपस्थितीत भगवा हाती घेतला.

मनसेला सॉफ्ट कॉर्नर

नाशिकमध्ये सत्ताधारी असलेल्या मनसेला उद्धव यांनी लक्ष्य केले नाही. गेल्या पाच वर्षातील नाशिकच्या स्थितीबाबत भाष्य करण्याच त्यांनी टाळले. त्यामुळे आपले चुलत बंधू राज यांना आणि त्यांच्या पक्षाला उद्धव यांनी सॉफ्ट कॉर्नर दिल्याची चर्चा होत होती.

उद्धव यांची आश्वासने

> नाशिकमध्ये महापालिकेचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून त्याद्वारे नाशिककरांना मोफत आरोग्य सेवा देणार

> शहरात बससेवा सुरू करून वाहतुकीचा प्रश्न सोडवू

> गोदावरीला प्रदूषणमुक्त करू

> स्वतः जातीने नाशकात येवून नाशिककरांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार

> नाशिकचा टीडीआर प्रश्न, झोपडपट्टी निर्मूलन हे प्रश्न सोडविणार

> मनपा शाळेत व्हर्च्यूअल क्लासरूम, विद्यार्थ्यांना टॅब देवू


सुरक्षेसाठी एन्काऊंटर करा

नाशिक शहरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुंडगिरी वाढल्याने असुरक्षा वाढली आहे. नाशकात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रसंगीत एक-दोन जणांचे एन्काउंटर केलं पाहिजे, असे वादग्रस्त विधान ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांनी या वेळी केले. उध्दव साहेब तुम्ही केव्हाही सांगा. राजीनामा खिशात आहे. मंत्री म्हणून दिलेल्या घरात माझे केवळ ३ ड्रेस आहेत. ते आमदार निवासात घेऊन येईन, असे भुसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

होय, हे आम्ही केलं!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘माझा शब्द व होय, आम्ही हे केलं’ अशी टॅगलाइन वापरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला सहा पानी जाहीरनामा अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. केलेल्या कामांचे निवडक फोटो व छोटेखानी निवेदन देत दुसऱ्या पर्वाची सुरुवात करायची आहे, तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे सांगत मतदारांना साद घातली आहे. या जाहीरनाम्यात केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पावर भर न देता सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भर देण्यात आला आहे.

प्लास्टिकमुक्त नाशिक, पायाभूत सुविधा, महिलांसाठी धोरण, मुबलक पाणीपुरवठा, आरोग्य, घरकुल योजना, सुरक्षितता, ई-गव्हर्नन्स, पर्यावरण, नाशिकच्या पुढील पिढीसाठी व्हर्च्युअल क्लासरुम्स, युवकांसाठी आयटी पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, क्रीडाधोरण, नाशिकच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी योजना, ब्रॅँण्ड नाशिकसाठी काय करणार या मुद्द्यांचा समावेश केला आहे.

त्याचप्रमाणे होय, हे आम्ही केलं यात उत्तम दर्जाचे खड्डेविरहीत रस्ते, मुकणे धरणातून थेट पाइपलाइन, जीपीएस सुसज्ज घंटागाड्या, घनकचऱ्यावर प्रक्रिया करून खत प्रकल्प, जकातीचे खासगीकरण रद्द, वाहतूक बेटाचं सुशोभीकरण, बोटॅनिकल गार्डनचा कायापालट, चिल्ड्रेन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क, बाळासाहेब ठाकरे ऐतिहासिक शस्त्र संग्रहालय, गोदापात्रात राज्यातलं सगळ्यात उंच कारंजा आणि वॉटर कर्टन, कुंभमेळ्याचं उत्कृष्ट नियोजन, भ्रष्टाचारमुक्त कारभार याचा उल्लेख केलेला आहे. त्याचप्रमाणे विविध विकासकामांच्या फोटोमध्ये यातीलच काही कामांचे निवडक फोटोही छापण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या अडथळ्यांचा उल्लेख

या जाहीरनाम्यात पाच वर्षे काराभार हा अडथळ्यांची शर्यत ठरला आणि खेदाने सांगावसं वाटतं, की हे अडथळे अनेकवेळा राज्य सरकारकडूनच निर्माण केले जात होते. तरीही आम्ही आमचा शब्द पाळला अशी खंत राज ठाकरे यांनी दुसऱ्या पर्वाच्या निवेदनात केली आहे.

प्रत्येक प्रश्न सुटल्याचा दावा नाही

नाशिकमधला प्रत्येक प्रश्न सुटलाच आहे, असा दावा मी करीत नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी आपल्या या निवेदनात पण तो कसा सुटू शकेल याचं प्रारूप या पाच वर्षांत मी नक्की मांडले, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


के. के. वाघ उड्डाणपुलासाठी ४०४ कोटी मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

के. के. वाघ ते जत्रा हॉटेलदरम्यान उड्डाणपुलासाठी ४०४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. २७ फेब्रुवारीला त्याची निविदा प्रसिध्द होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

के. के. वाघ महाविद्यालयाजवळ शेकडो विद्यार्थी जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात. याठिकाणी अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे आंदोलनेही होत असतात. या ठिकाणी उड्डाणपूल होण्याची मागणी होती. खासदार गोडसे यांनी या मार्गाची पाहणी करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला त्रुटी दाखवून दिल्या होत्या. के. के. वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेलदरम्यान उड्डाणपुलाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास सरकारने तत्वतः मान्यता दिली होती. आज प्राधिकरणाच्या बैठकीत ४०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

वाहतुकी कोंडी सुटणार

नाशिक उड्डाणपूल तयार होऊनही द्वारका सर्कल, इंदिरानगर, लेखानगर, के. के. वाघ कॉलेज, अमरधाम क्रॉसिंग, जत्रा हॉटेल येथे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. वाहनचालक आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होतो. अमरधाम क्रॉसिंग आणि के. के. वाघ कॉलेजसमोर शेकडो विद्यार्थी जीव धोक्यात घालून राष्ट्रीय महामार्ग ओलांडतात. शहराचा अंतर्गत तीस मीटर रिंगरोड या महामार्गाला क्रॉस होतो. तसेच जत्रा क्रॉसिंगला बाह्य मार्गावरील नाशिक शहराचा साठ मीटर रिंगरोड महामार्गाला क्रॉस होतो. त्यामुळे अनेक अपघात घडले आहेत.


आराखड्यात त्रुटी

खासदार गोडसे यांनी विभागीय अभियंता राजीव सिंग, प्रकल्प अधिकारी खोडसकर आदींसमवेत के. के. वाघ-जत्रा हॉटेल मार्गाची पाहणी करुन आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. या सर्व क्रॉसिंगवर किती अपघात झाले व किती जणांचे बळी गेले हे आडगाव व पंचवटी पोलिसांच्या लेखी पुराव्यासह दाखवून दिले होते. त्यानुसार अनेक सूचना करण्यात आल्या होत्या. तसा प्रस्ताव केंद्राला पाठविण्यात आला होता. त्याचा पाठपुरावा गोडसे यांनी केला. ६ जुलै २०१६ च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ३१ कोटी ३५ लाखांच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. यातून काही सब वे, हायमास्टही मंजूर करण्यात आले होते. तसेच के. के. वाघ आणि जत्रा हॉटेलपर्यंतच्या २.३ किमी अंतरासाठी उड्डाणपुलाला मान्यता देण्यात आली होती. त्यासाठी अंदाजे २१२ कोटी रुपये लागणार असून सविस्तर अहवाल बनविण्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामे ऑक्टोबरनंतर सुरू करण्यात येणार आहेत. के. के. वाघ उड्डाणपुलाचा सविस्तर अहवाल तयार झाला असून, प्राधिकरणाच्या बैठकीत ४०४ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.



के. के. वाघ कॉलेजजवळ उड्डाणपूल झाल्यावर अनेक संभाव्य अपघात टळणार असून, अनेकांचे जीवही वाचणार आहेत. हा उड्डाणपूल लवकरात लवकर करुन वाहतूक कोंडी दूर करण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यासाठी दिल्लीपर्यंत पाठपुरावा करत आहे.

- हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिधन मेळाव्यात दीड कोटींची बक्षिसे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची माहिती देण्यासाठी आणि अशा व्यवहारांची भीती मनातून घालविता यावी यासाठी फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीला डिजिधन मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी मोठ्या प्रमाणावर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्या माध्यमातून नागरिक आणि व्यापाऱ्यांना एकूण दीड लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी शुक्रवारी दिली.
मेळाव्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, तहसीलदार सी. एस. देशमुख, लीड बँक मॅनेजर अशोक चव्हाण, बीएसएनएलचे व्यवस्थापक सुरेशबाबू प्रजापती आदी उपस्थित होते.
यावेळी राधाकृष्णन म्हणाले, नागरिकांमध्ये डिजिटल व्यवहारासंबंधी जागृती निर्माण करणे आणि त्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देणे हा मेळावा आयोजनाचा उद्देश आहे. मेळाव्याला केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांसाठी आधार नोंदणी, बँक खात्याशी आधार कार्ड किंवा मोबाइल क्रमांक संलग्न करणे आदी सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. डिज‌िटल व्यवहार करणाऱ्या नशिबवान ग्राहकांना एक कोटी रुपयांपर्यंतची तर व्यापाऱ्यांना ५० लाखांपर्यंतची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा जाहीरनामा शहराचा रोडमॅप!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ने शहरातील वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करून तयार केलेला जाहीरनामा हा शहर विकासाचा रोडमॅपच असल्याची भावना सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी व्यक्त केली. महापालिकेत सत्तेवर आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा संकल्पही जाहीरनामा प्रकाशन वेळी त्यांनी सोडला. शहराचे ब्रँडिंग, पर्यटनवाढीसाठी प्रयत्न, उत्पन्नाचे स्रोत, नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही यावेळी सर्वांनीच नाशिककरांना दिली. ‘मटा’च्या या स्तुत्य उपक्रमावर सर्वपक्षीय नेत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मटा’ने शहरातील विविध घटकांना आपले मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. निवृत्त पोलिस अधिकारी-कर्मचारी, रिक्षा व टॅक्सी संघटना, पर्यटन, ग्राहक पंचायत, व्यापारी व व्यावसायिक, औषधविक्रेते, गृहनिर्माण सोसायट्या, क्रीडा क्षेत्र, गणेश मंडळे, पर्यावरण क्षेत्र, बार असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक, सहकारी बँका, हॉटेल व्यावसायिक, क्रेडाई, आर्किटेक्ट, टाऊन प्लॅनर्स, संरक्षण क्षेत्र, वृत्तपत्र विक्रेते, कामगार व कष्टकरी वर्ग आदी घटकांनी महापालिका व निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. जवळपास एक महिना हा उपक्रम सुरू होता.

मटा जाहीरनामा या सदरातून त्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या. त्यांचे संकलन करून तयार केलेल्या समग्र पुस्तिकेचे प्रकाशन शुक्रवारी भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, मनसेचे गटनेते अनिल मटाले, माकपच्या सरचिटणीस डॉ. वसुधा कराड, माकपचे गटनेते तानाजी जायभावे, नगरसेवक सचिन महाजन, प्रकाश म्हस्के यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ‘मटा’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वपक्षीयांनी स्वागत केले. आपला पक्ष सत्तेवर आल्यास या आराखड्याची विकासाचा रोडमॅप म्हणून अंमलबजवाणी करणार असल्याची ग्वाही या नेत्यांनी यावेळी दिली.


सर्वपक्षीय जाहीरनाम्यात प्रतिबिंब

‘मटा’ने महिनाभर राबविलेल्या मटा जाहीरनामा या उपक्रमाचे सर्वच पक्षांनी स्वागत करीत आपल्या जाहीरनाम्यात त्याचा समावेश केला आहे. शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेस, माकप या पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यासाठी मटा जाहीरनाम्यात विविध घटकांनी अपेक्षित केलेल्या सूचनांचा समावेश केला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय जाहीरनाम्यात मटा जाहीरनाम्याचे प्रतिबिंब उमटले आहे.


सुसंवादाने रंगत

मतदानाला अवघे तीन दिवस बाकी असताना शहराध्यक्षपदावर असणाऱ्या नेत्यांना तसा प्रचारातून वेळ काढणे अवघडच. पण, या व्यस्त शेड्यूलमधून हे नेते आले व त्यांनाही परस्परांच्या दुर्मिळ भेटीचा वेगळा अनुभव आला. राजकारणात मतभेद असले, तरी राजकीय व्यक्ती एकमेकांच्या वैरी नसतात. त्यामुळे हे नेते एकमेकांशी सहज बोलले व आपल्याला निवडणूक काळात आलेल्या तिकीट वाटपापासून प्रचारापर्यंतच्या गोष्टींतले किस्सेही त्यांनी गमतीने सांगितले. विशेष म्हणजे सर्वांचे अनुभव सारखेच होते. त्यामुळे सर्वच नेत्यांना हायसे वाटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहुसदस्यीय पद्धतीने दमछाक

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे उमेदवारांची दमछाक होत असताना सर्वच पक्षांच्या शहाध्यक्षांनीसुद्धा या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली. ‘मटा जाहीरनामा’च्या प्रकाशनानिमित्त एकत्र आलेल्या शहरातील प्रमुख राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी या पद्धतीमुळे मतदानापासून तर कामापर्यंत कशा अडचणी येणार आहेत, यावर मत व्यक्त करीत त्यावर काही उपाय शोधल्याचेही सांगितले.

सत्ताधारी-विरोधकांचे झाले एकमत

महापालिकेच्या निवडणुकीत कधी एक सदस्यीय तर कधी दोन, तीन सदस्यीय पद्धत आतापर्यंत करण्यात आली. पण, यावेळी चार सदस्यीय पद्धतीमुळे सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. या पद्धतीत नेमक्या काय अडचणी येतात व त्याचा काम करताना कसा त्रास होते, यावर सर्वांचे एकमतही यानिमित्ताने पुढे आले. विशेष म्हणजे सत्ताधारी व विरोधी पक्षात असलेल्या सर्वच शहराध्यक्षांनी या पद्धतीमुळे निवडणुकीत होणारी दमछाकही सांगितली.

मतदार नाराजीची भीती

बहुसदस्यीय पद्धतीत सर्वच पक्ष वेगवेगळ्या भागातून उमेदवार देतातच असे नाही. पण, निवडणुकीत त्याच भागाच्या उमेदवारांना प्राधान्य व मते दिले जातात. त्यामुळे इतरांना तेथील मते मिळतीलच असे होत नाही. त्याचप्रमाणे आपण नेमके कोणाला काम सांगावे हाही प्रश्न असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदार नाराज होण्याची भीतीदेखील यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी व्यक्त केली.

ग्रुप लीडरची जबाबदारी

आता या बहुसदस्यीय पद्धतीला सामोरे जाताना आम्ही मात्र आता जो ग्रुप लीडर असेल त्याला कामे सांगा, असे सांगून मतदारांचे समाधान करीत आहोत. त्यामुळे कोणाची जबाबदारी असा प्रश्न आला, की एकाचे नाव आम्ही सांगतो. त्यामुळे पुढील काळात या ग्रुप लीडरची जबाबदारी जास्त राहणार आहे, असेही सर्वपक्षीय शहराध्यक्षांनी स्पष्ट केले.


प्रश्न जाणण्यात अडचणी

एक सदस्यीय पद्धतीत निवडणुकीला सामोरे जाताना थेट संपर्क असतो व त्यातून मतदारांच्या अडीअडचणी सहज समजतात. निवडणूक संपल्यानंतर त्यावर उपाय शोधून त्या सोडवल्याही जातात. त्याचप्रमाणे मतदारही थेट कनेक्ट असतो व तो सहज आपल्या नगरसेवकांना आपल्या अडचणी सांगू शकतो. बहुसदस्यीय पद्धतीत मात्र प्रभाग मोठा असल्यामुळे सर्वांचे प्रश्न समजून घेणे अवघड असते. निवडून आल्यानंतर ते कोणी सोडवावेत, हा प्रश्नही असतो. त्यात चार सदस्य असल्यामुळे एकमेकांवर काम ढकलण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचप्रमाणे कामांच्या श्रेयाचेही शेअरिंग बरोबर होत नाही.

---
पक्ष वेगवेगळे, नेते मात्र एकत्र!

महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांचे उट्टे काढून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा जाहीरनामा’च्या प्रकाशनानिमित्त शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष व नेते शुक्रवारी एकत्र आले. निवडणुकीच्या धामधुमीत असे नेते एकत्र येणे तसे अवघड असते. पण, ‘मटा’च्या निमित्ताने एकत्र आलेल्या या नेत्यांनी निवडणुकीतील गमतीजमती शेअर करीत मनमोकळा संवाद साधला. यावेेळी सृदृढ लोकशाहीचे दर्शन घडवत त्यांनी एकमेकांना चिमटेही काढले.

मतदानानंतर भेटणार...

मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निकाल येण्यापूर्वी मधल्या दिवसात पुन्हा एकत्र भेटण्याचा कार्यक्रम या सर्व नेत्यांनी निश्चित करत लोकशाहीतील एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याच्या निर्णय घेतला. आता ही भेट व त्याचे ठिकाण निश्चित नसले, तरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी ही जबाबदारी घेतली आहे. मतदान संपल्यानंतर पुण्यातील वैशाली हाॅटेलमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्र भेटतात, तोच कित्ता आता नाशिकला गिरवला जाणार असून, त्याला सर्वच शहराध्यक्षांनी होकारही भरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभराची नोट!

$
0
0

शंभराची नोट!

बाज्याच्या घरी त्याचं स्नान आटोपण्यापूर्वी चार उमेदवार येऊन टेकले होते... बाहेर रंगीबेरंगी झेंडे लावलेल्या त्यांच्या महागड्या वाहनांचा ताफा रांगेत उभा होता... दारापुढं पहिल्यांदाच एवढ्या गाड्या पाहून बाज्याला एकदम झकास वाटत होतं... आपण बी समाजातील प्रतिष्ठित अन् महत्त्वाचं मान्यवर असल्याचं जाणवल्यानं त्याची छाती आज जरा जास्तच फुगली होती...

भाऊ लक्ष असू द्या, असं म्हणत ही मंडळी बाज्याच्या घरच्या धार्मिक मंडळींना साकडं घालत होती... निवडून आलो तर हरिनाम सप्ताह, साई भंडारा, देवीच्या कार्यक्रमांना भरघोस वर्गणी अशी आश्वासनं दिली जात होती... आम्ही स्वतःसाठी कधी कोणाचा एक रुपया घेतला नाही, असं बाज्या त्यांना अभिमानानं सांगत होता... त्यातच मावशीच्या आशीर्वादामुळंच आपण मागल्या खेपेला नगरसेवक बनल्याचंही एक उमेदवार सांगत होता... त्याच्या या वाक्यानंतर उरलेल्या तिघांनीही पटापट बाज्याच्या आईचे पाय धरले होते... ‘मावशी आशीर्वाद द्या’, असं ते म्हणत होते... बिचारी आजी चष्मा सांभाळत ‘तू कोणाचा रे’ म्हणत क्रमाने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवत होती...

आपल्या मताला किती किंमत आहे हे बाज्याच्या आज लक्षात आलं होतं... चार-चार उमेदवार घरी आल्यानं त्याची कॉलर एकदम टाइट झाली होती... तो सारखा दारातून बाहेर जाऊन आपल्या घराकडं कोण कोण बघतंय हे न्याहाळत होता... गल्लीतली पोरं बाहेरच उभी असल्याचं त्यानं आधीच पाहिलं होतं... उमेदवार आल्यावर त्यांच्याकडं पिण्याच्या पाण्यापासून ते घटांगाडीच्या तक्रारी करायच्या, हे वहिनींनी बाज्याला बजावून ठेवलं होतं... पण, अशा वेळेला कशाला समस्या सांगायच्या म्हणून बाज्यानं ते टाळलं होतं... वहिनी डोळे मोठे करून बाज्याला बोलण्यासाठी खुणावत होत्या... पण, तो त्यांच्याकडं दुर्लक्षच करीत होता... अर्थात, नंतर त्याबद्दल बरंच ऐकण्याची तयारी त्यानं ठेवली होती... शेवटी नाइलाजने वहिनींनीच उमेदवारांना चार शब्द ऐकवले होते... त्यावर ‘वहिनी, एवढ्या वेळी घ्या सांभाळून. निवडून आल्यावर तुमच्यासाठी पाण्याची नवी लाईन देऊ,’ असं म्हणत त्यांनी मान सोडवली होती…

उमेदवारांची चर्चा सुरू असतानाच वहिनींनी देवघरातून ओवाळणीचं ताट आणलं होतं... त्यांनी चारही उमेदवारांचं औक्षण करून त्यांच्यावरून ताट ओवाळलं होतं... ताट रिकामं जायला नको म्हणत चौघांपैकी एकानं लागलीच शंभराची एक नवी कोरी नोट ताटात ठेवली... पाठोपाठ

इतरांनीही तोच कित्ता गिरवला... बाज्याची आता ट्यूब पेटली होती... बायकोनं सकाळी-सकाळी बारा-पंधरा नारळं का मागवली, याचं कोडं त्याला उमगलं होतं... बायका पुरुषांपेक्षा हुशार असतात, हेही त्याला मनोमन पटलं होतं...

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images