Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

महापालिकेसाठी ४५७० बॅलेट युनिट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली असून, मतदानासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. रविवारी साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदानासाठी १६०० टीम तयार करण्यात आल्या असून, त्यांना दोन सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, मतदानासाठी साडेचार हजार बॅलेट युनिट प्राप्त झाले असून, उमेदवारांच्या संख्येनुसार आणखी बॅलेट पेपर मागवले जाणार आहेत. मुख्य निरीक्षक दीपक कपूर यांनी शनिवारी नाशिकमधील निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

अर्ज छाननी व माघारीची धामधूम संपताच मतदानासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी रविवारी (०५) साडेचार हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दादासाहेब गायकवाड, कालिदास कलामंदिर व संभाजी स्टेडियम येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच केंद्राध्यक्ष सहाय्यक केंद्राध्यक्षांना स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांनतर १२ फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतदानासाठी महापालिकेला १६२० कंट्रोल युनिट, ४५७० बॅलेट युनिट व १५९५ मेमरीकार्ड प्राप्त झाले आहेत. उमेदवारांची संख्या पाहून अजून बॅलेट युनिट मागवले जाणार आहेत.

महापालिकेसाठी नियुक्त केलेले मुख्य निरीक्षक दीपक कपूर यांनी शनिवारी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. कपूर यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबतच शनिवारी सहा विभागीय कार्यालयांना भेटी देऊन अर्ज छाननी प्रक्रियेची पाहणी केली. तसेच, आयुक्तांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पाडण्यासह आचारसंहितेच्या तक्रारी तत्काळ सोडवण्याचे निर्देश दिले.

आचारसंहिता कक्ष २४ तास

राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता कक्ष २४ तास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेनेही पालिकेतील आचारसंहिता कक्ष २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारीसाठी २३१७६०६ हा स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर नागरिक थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बस थांब्यांना अवकळा

$
0
0

परिवहन महामंडळ लक्ष देणार का; प्रवाशांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसबाबत नेहमीच प्रवासी तक्रारी करत असतात. परंतु, आता शहरात असलेल्या बस थांब्यांच्यादेखील अडचणी प्रवाशांना सहन करण्याची वेळ येत आहे. महात्मानगरच्या दोन्ही बाजूंना असलेल्या बसथांब्यांना अवकळा आलेली आहे.

यामध्ये महात्मानगर साईडला असलेले बस थांबा मोडकळीस आला आहे. तर महात्मानगरच्या समोरच्या बाजूला त्र्यंबकरोडला असलेले बस थांब्याची आसन व्यवस्थाच चोरट्यांनी गायब केली आहे. यामुळे केवळ नावालाच बस थांबा उरल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. परिवहन मंडळ याकडे कधी लक्ष देणार असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

शहराच्या वाढत्या लोकवस्तीत चारही बाजूंनी रहिवासी भाग झपाट्याने वाढला आहे. वाढत्या लोकवस्तीत शहर बससेवादेखील पुरविण्याचा प्रयत्न परिवहन महामंडळाकडून केला जातो. परंतु, रुंद झालेले रस्ते व लांबीने मोठी असलेल्या सिटी बस यामुळे अनेकदा चालकदेखील हैराण होत असतात. त्यातच शहरी बसच्या अनेकदा प्रवाशीच तक्ररी करत असतात. आता शहरी बस थांब्यानाच अवकळा आली असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत. उच्चभ्रू लोकवस्ती म्हणून गणल्या जाणाऱ्या महात्मानगरच्या बस थांबा मोडकळीस आला आहे. हा थांबा असलेले निवारा शेडच कधीही पडून प्रवाशांना दुखापत होण्याची शक्यता आहे. यामुळे बस थांब्यात न उभे राहता प्रवाशी निवारा शेड बाहेरच उभे राहणे पसंत करतात. त्यातच त्र्यंबकेश्वरला जाताना दुसऱ्या बाजूला असलेल्या बस थांब्याचे आसनच चोरट्यांनी लंपास केले आहे. यामुळे महात्मानगरचे दोन्ही बस थांबे केवळ नावालाच राहिल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. परिवहन महामंडळाचे अधिकारी बस थांब्याच्या दुरवस्थेकडे कधी लक्ष घालणार, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. मोडकळीस आलेल्या निवारा शेड तरी हटविण्यात यावे, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

महात्मानगरच्या दोनही बस थांब्यांना अवकळा आली आहे. बस थांब्यावर प्रवाशी न बसता बाहेरच उभे राहणे पसंत करतात. मोडकळीस आलेला हा बस थांबा दुरूस्ती करण्याची गरज आहे. तर चोरट्यांनी लंपास केलेली आसन व्यवस्था एसटी महामंडळाने बसविली पाहिजे.

-महेश देसले, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शिवीगाळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटी विभागात प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवार कविता पवार यांचे नामनिर्देशनपत्र छानणीत नामंजूर केल्यामुळे त्यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी नितीन गावंडे यांना शिवीगाळ केली. यावेळी पवार व त्यांच्यासोबत आलेल्या केतन पगारे यांनी गोंधळ घातल्याने दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सकाळपासून पंचवटी विभागात तिसऱ्या मजल्यावर प्रभाग क्रमांक ३, ४ व ५ मधील उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राची छानणी सुरू होती. त्यात प्रत्येक प्रभागाचे प्रवर्गानुसार उमेदवारांना सोडले जात होते. पवार यांच्या प्रभागाचा नंबर आल्यानंतर त्या गैरहजर होत्या, पण त्यानंतर त्या कार्यालयात आल्या. त्यावेळेस त्यांनी आपला अर्ज नामंजूर का केला असे विचारल्यानंतर त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारणे सांगितली. पण, त्यांना ही सर्व कारणे न पटल्यामुळे त्यांनी शिवीगाळ करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा आल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी गावंडे यांनी पोलिसांना सकाळी शिवीगाळ करून गोंधळ घातल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले.

व्हिडीओ क्लिप

हा सर्व प्रकार झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या सर्व प्रकारची व्हीडीओ क्लीप मागवली असून, त्यानंतर सविस्तर तक्रार नोंदविण्यात येणार आहे.

यामुळे फेटाळला अर्ज

पवार यांच्या नामनिर्देशनपत्रात त्यांनी सुचक व अनुमोदक दुसऱ्या प्रभागाचे टाकले, तर प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे त्यांचा हा अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे पोलिसांनीही संताप व्‍यक्त केला. दोघांना व्हॅनमध्ये बसवून पोलिस स्थानकात नेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाननीनंतर १०३५ उमेदवार रिंगणात

$
0
0

उमेदवार व कार्यकर्त्यांची गर्दी, रात्री उशिरापर्यंत अर्ज छाननी सुरू;‌ चोख पोलिस बंदोबस्त

टीम मटा

महापालिकेच्या सहाही प्रभागात किरकोळ वाद वगळता शांततेत अर्ज छाननी पार पडली. सुमारे १०६ अर्ज अवैध ठरले असून, ३१ प्रभागांच्या १२२ जागांसाठी अर्ज छाननीनंतर आता १०३५ उमेदवार रिंगणात आहेत. शनिवारी रात्री उशिरापर्यंत अर्ज छाननी सुरू होती. चार प्रभागांच्या अर्जांची छाननी प्रलंबित आहे. यामुळे उमेदवारांची संख्या वाढणार आहे.

पंचवटीत उशिरापर्यंत छाननी

पंचवटी विभागातील ६ प्रभागातील २४ जागांवरील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पाडली. या छाननीत प्रभाग ४, ५ व ६ मधील छाननी साडेचारपर्यंत संपली. पण प्रभाग १, २ व ३ मधील छाननी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

काँग्रसेच्या उमेदवार विमल पाटील यांनी ए फॉर्मबरोबर बी फॉर्म न भरल्यामुळे त्यांना पक्षाची उमेदवारी गमवावी लागली. राष्ट्रवादीच्या उमेदवार सोनाली काळे यांनी उमेदवारी अर्जात पक्षाचे नाव न टाकल्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. या विभागात प्रभाग क्रमांक ४, ५ व सहामध्ये पाच उमेदवाराचे अर्ज बाद झाले. दोन ठिकाणी नामनिर्देशनपत्र भरलेल्या सात उमेदवारांचे एकच अर्ज ठेवण्यात आले. त्यामुळे या विभागात ९८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यात प्रभाग ४ मध्ये ४०, प्रभाग ५ मध्ये २८, प्रभाग ६ मध्ये ३० उमेदवार असणार आहेत. या विभागात अवैध ठरलेल्या नामनिर्देशनपत्रात कविता पवार, नवनाथ जीवराम जाधव, सविता मोठे व हेमंत वाघ यांचे अर्ज अवैध ठरवले. सुनीता काकड यांनी जातप्रमाणपत्राची पोहच न लावल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजूर केला.

‘पूर्व’मध्ये दोन अर्ज अवैध

नाशिक पूर्वमधील सहा प्रभागांमधून दोन अर्ज छाननीत बाद करण्यात आले. प्रभाग चारमधील शिवसेनेच्या तीन उमेदवारांचा एबीफॉर्म झेरॉक्स असल्याने त्यांना अपक्ष ठरवण्यात आले असून, संजय चव्हाण यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. दरम्यान, काही समर्थकांनी कार्यालयाबाहेर एकच गर्दी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.

नाशिकपूर्व मध्ये प्रभाग १३, १४, १५ तसेच १६, २३, ३० असे सहा प्रभाग आहेत. संजय चव्हाण यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असली, तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कागदपत्र स्वीकारणार नसल्याचे सांगून त्यांना गॅसवर ठेवले आहे. माजी महापौर यतीन वाघ व नगरसेवक मुशीर सैय्यद यांच्यावरील हरकती फेटाळण्यात आल्या. प्रभाग २३ अ मधील रुपाली गांगुर्डे या उमेदवाराचे पती हे मनपा ठेकेदार असल्याची तक्रार रुपाली निकुळे यांनी केली. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग १६ मधील रेखा गांगुर्डे यांचे कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. प्रभाग ३० मधील शिवसेनेचे उमेदवार संजय चव्हाण, रशिदा शेख, शकुंतला खोडे, नीलेश चव्हाण यांचे एबीफॉर्म हे झेरॉक्स होते. तसेच झेरॉक्सवरच काळ्या पेनाने सह्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे अर्ज फेटाळण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, संजय चव्हाण यांच्या वकिलाने आक्षेप घेतला. तसेच सुनावणीसाठी वेळ मागितली.

नाशिकरोडला २७ अर्ज अवैध

नाशिकरोड प्रभागात दाखल झालेल्या ३१८ उमेदवारांच्या अर्ज छाननीत विविध कारणांनी २७ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र बाद झाले असून, २९१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. छाननीनंतर नाशिकरोडमधील प्रभाग १७, १८ व २० मधून मनसे व प्रभाग १८ व २० मधून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आपले पॅनलही पूर्ण करू न शकल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेला २३ पैकी ६, तर आघाडीला ३ जागांवर आपले उमेदवारच देता आलेले नाहीत. प्रभाग १८ मधून बाबुराव आढाव यांनी दिनकर आढाव यांच्या एबी फॉर्ममध्ये व्हाईटिंग लावून खाडाखोड केलेला असल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा, अशी मागणी केली. प्रभाग १८ मधून अशोक सातभाई व सुनील बोराडे यांच्या अर्जांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सातभाईंनी अगोदर आपला अर्ज सादर केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला.


पश्चिमच्या तीन प्रभागांत ९० उमेदवार

अर्ज छाननीनंतर पश्चिम विभागातील प्रभाग सात, १२ आणि २४ मध्ये एकूण ९० उमेदवार रिंगणात आहेत. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी कोण माघार घेते याकडे सर्वांचे लक्ष असून, त्यानंतरच या प्रभागातील खरे चित्र स्पष्ट होईल. सर्वाधिक उमेदवार प्रभाग २४ मध्ये आहेत.

पश्चिम विभागातील तीन प्रभागांसाठी तब्बल १७२ अर्ज सादर झाले होते. अनेक उमेदवारांनी दोन ते तीन ठिकाणाहून किंवा एकाच जागेसाठी अर्ज सादर केले होते. ते सर्व अर्ज छाननीत बाद झाले. त्यानंतर तब्बल ९० उमेदवार रिंगणात आल्याचे दिसते. यात, अपक्षांचाही भरणा मोठा असून, अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरी लढत सुरू होईल. निवडणूक अधिकाऱ्यांनी सकाळी छाननी प्रक्रिया सुरू केली. काही किरकोळ हरकती समोर आल्या. मात्र, त्यांचा लागलीच निर्णय झाला. दुपारी अडीच वाजेपर्यंत छाननी प्रक्रिया पूर्ण झाली होती. प्रभाग ७ अ मधून चार, ब मधून नऊ, क साठी तीन तर ड मधून १० उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग १२ च्या अ, ब, क आणि ड मध्ये अनुक्रमे नऊ, सहा, पाच आणि आठ इतके उमेदवार आहेत. सर्वांचे लक्ष असलेल्या प्रभाग २४ च्या अ मध्ये पाच, ब मध्ये पाच, क मध्ये नऊ तर ड मध्ये तब्बल १३ उमेदवार आहेत.

सातपूर प्रभागात तीन अर्ज बाद

नाशिक महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शनिवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी सांगितले. यामुळे सातपूरच्या चार प्रभागांत १६ जागांसाठी १८५

उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता माघारीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

सातपूर विभागातील चार प्रभागांची अर्ज छाननी विभागीय कार्यालयातील निवडणूक विभागात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी बेहेरे यांनी सकाळी ११ वाजेपासून छाननीला सुरुवात केली. यात प्रभाग ८ अ मधून मीना डोळस यांचा उमेदवारी अर्ज जात प्रमाणपत्र नसल्याने बाद करण्यात आला. प्रभाग ९ अ मधून सदावर्ते परमेश्वर यांचेही जात प्रमाणपत्र नसल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. प्रभाग ११ अ मधून आशा शेलार यांना तीन अपत्य असल्याने उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

अर्ज छाननीला सकाळी ११ वाजेच्या आतच चारही प्रभागातील उमेदवारांनी गर्दी केली होती. उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने पोलिसांच्या मदतीने उमेदवाराचे नाव वाचून दोन जणांनाच प्रवेश देण्यात आला. अर्ज छाननीत तीन अर्ज बाद झाल्याने आता १६ जागांसाठी तब्बल १८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारीनंतरच उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल.

सिडकोत हरकतींचा निर्णय प्रलंबित!

महापालिकेच्या निवडणुकीसाठी सिडकोतील दोन प्रभागांमध्ये शिवसेनेचे पंधरा, तर भाजपचे दोन एबीफॉर्म आले असल्याने या हरकतींवरून सिडकोतील विभागीय कार्यालयात सकाळपासूनच उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी केली होती. या हरकतींबाबत सर्वच उमेदवारांचे मत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणून घेतले. मात्र रात्री उशिरापर्यंत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला नाही.

सिडकोतील प्रभाग २८ मध्ये शिवसेनेचे सात, तर भाजपचे दोन एबीफॉर्म दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या जादा तीन एबीफॉर्मबद्दल हरकती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये २८ अ मधून विद्यमान नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांच्या विरोधात स्वीकृत नगरसेवक माणिक सोनवणे यांनी हरकत घेतली असून, प्रभाग २८ ब मधून नगरसेविका शीतल भामरे यांच्या विरोधात सोनाली काकडे यांनी, क गटातून नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्या विरोधात रेणुका गायधनी यांनी एकमेकांविरोधात हरकती घेतल्या आहेत. या प्रभागातील क गटातून भाजपच्या विद्या लगड व अपर्णा गाजरे यांनी एकमेकांविरोधात हरकती घेतल्या आहेत. प्रभाग २९ अ मधून सुमन सोनवणे यांनी माधुरी खैरनार यांच्या विरोधात, तर ब गटातून नगरसेविका रत्नामाला राणे यांनी माजी नगरसेविका सुमन सोनवणे यांच्या विरोधात, तसेच क गटातून नगरसेवक अरविंद शेळके यांनी भूषण देवरे यांच्या विरोधात, ड गटातून दीपक बडगुजर व सतीश खैरनार यांच्या परस्परविरोधात हरकती दाखल केल्या आहेत. त्याचप्रमाणे ब गटातून भाजपच्या संगीता बरके व सोनाली मंडलेचा यांनीही परस्परविरोधात हरकती दाखल केल्या आहेत. शिवसेनेच्या वंदना बिरारी यांच्या विरोधात सर्वच उमेदवारांनी जात प्रमाणपत्राची हरकत घेतली आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांची गर्दी विचारात घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याबाबतचा निकाल हा ई मेलद्वारे देण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना तोंडघशी!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बंडाळी टाळण्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वाटप करणे शिवसेनेसह भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीला भोवले आहे. छाननीप्रक्रियेत शिवसेनेला सर्वाधिक फटका बसला असून, पक्षाच्या डझनभर उमेदवारांवर अपक्ष लढण्याची वेळ आली आहे. भाजपनेही दोन प्रभागांमध्ये घोळ घातल्याने पक्षाची अडचण झाली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराला अपक्ष लढवे लागणार आहे. रात्री उशिरापर्यंत हरकतींवर सुनावणी सुरू होती. एकूण २७ प्रभागांत १०६ अर्ज अवैध ठरले.

अर्ज छाननीचा फटका दिग्गजांना बसत असताना नाशिकरोडला दोन प्रभागांमध्ये हाणामारीचे गालबोट लागले आहे. दरम्यान, माजी महापौर विनायक पांडे यांनी शनिवारी मातोश्री गाठत हाणामारीच्या घटनेवर पडदा टाकला आहे. तर भाजपने दोन दोन लाखात उमेदवारी विकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पक्षाची बदनामी झाली. सोबत आमदार व पदाधिकाऱ्यांनी थेट

पक्षनेत्यांविरोधात बंड पुकारले आहे.

शिवसेनेने कोरे एबी फॉर्म दिल्याने प्रभाग क्रमांक ४ मधील चारही उमेदवार अपक्ष ठरले आहेत. तर प्रभाग क्रमांक ३० मध्ये झेरॉक्स एबी फॉर्म दिल्याने चारपैकी तीन उमेदवार अपक्ष ठरले आहेत. संजय चव्हाण यांचाही अर्ज अपक्ष ठरण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेनेचे सात एबी फॉर्म आले आहेत. त्यामुळे अधिकृत आणि अनधिकृतचा गोंधळ वाढला आहे. भाजपनेही प्रभाग २७ मध्ये दोन एबी फॉर्म दिले आहेत. तर २४ मध्येही एका उमेदवारीचा वाद निर्माण झाला आहे.

मनसेशी छुपी युती

अनेक प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर मनसेने छुपी युती केल्याचे पहावयास मिळत असून, प्रभाग १३ मध्ये तर त्यांनी एकत्रच अर्ज सादर करून व मनसेने तेथे तीन उमेदवार उभे न करून या युतीला दुजोरा दिला. पक्षाच्या शहराध्यक्षांच्या प्रभागातही उममहापौर गुरुमित बग्गा यांच्यासह मनसेचे दोघे, तर काँग्रेसच्या विमल पाटील या विद्यमान नगरसेविका असे पॅनल झाले आहे. पाटील यांच्या तांत्रिक चुकीमुळे त्यांना पंजा हे अधिकृत चिन्ह मिळणार नाही. ही चूक जाणूनबुजून केली गेली असावी असा कयास आहे. एकीकडे उमेदवारीसाठी मारामारी चालू असतांना राष्ट्रवादीचे विक्रांत मते या विद्यमान नगरसेवकाने मात्र तिकीट नाकारण्याचा, तर पक्षाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे यांनीही आघाडी व्हावी यासाठी आपल्या मातोश्रींचा अर्ज सादर न करण्याची भूमिका घेतली.

१०६ अर्ज अवैध

महापालिकेच्या दहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सकाळी ११ वाजेपासून छाननीची प्रक्रिया सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत जवळपास चार प्रभागातील अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू होती. ३१ प्रभागांपैकी २७ प्रभागांची छाननी पुर्ण झाली असून, त्यात १०६ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे १०३५ उमेदवारांचे १७१६ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. तर चार प्रभागांच्या अर्जांची छाननी प्रलंबित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत्युशय्येवरील अश्वाला जीवदान!

$
0
0

satish.kale@timesgroup.com

Tweet : @Satishkalemt

अश्वासारख्या उमद्या प्राण्याच्या रुपड्यावर कुणाचंही मन बसतं. पण, हाच उमदा अश्व मृत्यूच्या खाईत सापडतो तेव्हा त्याचा अभिमान बाळगणाऱ्या मालकाच्या आश्रयालाही पारखा होतो... असाच दाहक अनुभव काही प्राणीमित्रांनी घेतला. मात्र, यावर हळहळत न बसता मृत्यूशी झुंजणाऱ्या अश्वाला डॉक्टरांच्या मदतीने नवा जन्मच काही प्राणीमित्रांनी दिला आहे. अपघातातल्या माणसाकडेही पाठ फिरविण्याच्या काळात मुक्या प्राण्याच्या दु:खावर फुंकर घालत ‌काही प्राणीमित्रांनी माणुसकीचा वस्तुपाठच दिल्याची घटना म्हसरूळला घडली.

म्हसरूळ परिसरात अज्ञात मालकाने आजारी अवस्थेतील घोडा वर्षभरापूर्वी बेवारस सोडून दिला होता. ही माहिती संवेदनशील नागरिकांनी एका प्राणीमित्राच्या कानावर घातल्यानंतर सुरू झाली ती एका अश्वाच्या जीवन-मरणाची संघर्षगाथा. सिडकोतील रहिवासी पुरुषोत्तम आव्हाड या प्राणीमित्राने या घोड्याला सिडकोतील आपल्या मंगलरूप गोवत्स सेवा संस्थेत दाखल करून देखभाल सुरू केली. पशुवैद्यकांकडून त्याची तपासणी करून घेतल्यानंतर हा घोडा वर्षापासून कॅन्सरने पीडित असल्याचे त्यांना समजले. यातच त्याचा उजवा डोळाही निकामी झाला होता. क्षणाक्षणाला वेदना सहन करणाऱ्या या घोड्याची अवस्था बघून प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड आणि पक्षीमित्र उमेशकुमार नागरे यांनी शासनाच्या सर्व पशुचिकित्सालयात या घोड्यास दयामरण देण्याची विनंती डॉक्टरांना केली. काही गंभीर घटनांमध्ये डॉक्टरांनाही अशा पशूंना दयामरण द्यावे लागते. मात्र, अखेरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या घोड्याच्या डोळ्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली अन् चमत्कारिक गोष्ट म्हणजे ती यशस्वीही झाली. या उपचारांदरम्यान पशुचिकित्सालयातील सुनील गायकवाड, हर्षल सैंदाणे, अमर सोनटक्के, चैतन्य यादव, सुनील यादव, आकाश ठाकरे, सचिन कोदे आदींनी मदत केली.

दीड महिन्यापासून या घोड्याच्या डोळ्यात कॅन्सर पसरत होता. त्यामुळे या घोड्याला वाचवणे अशक्य होते. परंतु, आम्ही या घोड्याचा डोळा पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर औषधोपचार केले. त्यामुळे शरीरात पसरणारा कॅन्सरचा धोका टळला आहे. सध्या या घोड्याची प्रकृती स्थिर आहे.

-डॉ. संजय महाजन, पशुधन अधिकारी, पशुचिकित्सालय

बेवारस स्थितीत मिळालेल्या या घोड्याला मी वर्षभरापासून सांभाळत आहे. आजपर्यंत बऱ्याच प्राण्यांचे संगोपन करून त्यांच्यावर उपचार केले आहेत. सध्या तीस ते पस्तीस प्राण्याचे संगोपन करीत आहे. त्यासाठी मला दिवसाला तीन हजार रुपये खर्च लागतो. परिस्थिती नसतानाही मी प्राण्यांच्या प्रेमापोटी खर्च करतो.

-पुरुषोत्तम आव्हाड, प्राणीमित्र, मंगलरूप गोवत्स सेवा संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हिडीओवरून भाजपवर सर्वपक्षीय हल्लाबोल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या फुशारक्या मारणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा आज समोर आल्याचा आरोप मनसेसह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला कात्रीत पकडले आहे.

साम, दाम, दंड भेद वापरून इतर पक्षातले उमेदवार फोडून वाट्टेल त्या मार्गाने भाजप सत्ता मिळवत असून हा भयानक आजार त्यांच्याच पक्षाच्याच मुळावर कसा उठलाय हे नाशिकमध्ये घडलेल्या व्हिडीओमधून दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्या भाजपची आता पोल खुलल्याचे मनसेचे प्रवक्ते अविनाश अंभ्यंकर यांनी म्हटले आहे.

नाशिकच्या भाजप मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांना निवडणुकीचा अर्ज देण्यासाठी उघडपणे दोन लाख रुपये मागितले जात होते. भाजप पदाधिकारी नाना शिलेदार आणि अरुण शेंदुर्णीकर यांचे प्रताप व्हिडिओत शूट झालेत. त्यावर प्रतिक्रिया देतांना अभ्यंकर यांनी कोणत्याही कृतीचे समर्थन करण्यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नसल्याचे सांग‌ितले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे म्हणतात, की हे पैसे इच्छुकांकडून चेकच्या स्वरुपात माग‌ितले आहेत आणि हा पक्षनिधी आहे. पक्षनिधी भाजपने कसा जमा करावा ही त्यांची अंतर्गत बाब आहे, पण भाजपकडून ७०० इच्छुक उमेदवार आहेत. २ लाख प्रमाणे ही रक्कम १४ कोटींच्या घरात जाते. ही रक्कम निवडणुकीचा अधिकृत निधी म्हणून दाखवणार का? जर इच्छुकांकडून इतकी रक्कम घेतली जात असेल तर ज्यांना तिकिट दिले गेले आहेत त्यांच्याकडून किती पैसे घेतले जातात? खचितच भाजप नाशिकमधून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून अशी रक्कम गोळा करत असणार हे मानायला जागा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आर्थिक क्षमता हाच भाजपचा उमेदवारीचा निकष मानायचा का? आणि हे जनतेसमोर मान्य करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टी करणार का? नाशिकमधील दुसऱ्या आमदार सीमा हिरे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मग भाजपची खरी भूमिका कोणती? का भाजपच्या शिरस्त्याप्रमाणे ही पण धूळफेक? सत्ते आल्यापासून भाजपने लोकशाहीची क्रूर थट्टा सुरू केली आहे. पण ही घटना म्हणजे कळसच गाठला.

उमेदवारीसाठी पैसे मागणाऱ्या भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. नगरसेवकापासून ते केंद्रातील मंत्र्यांपर्यंत सर्वजण भ्रष्टाचारात सहभागी आहेत. अशांना सत्तेवर बसविल्यास लोकांचे काय हाल होतील हे सांगायला नको.

शरद आहेर, शहराध्यक्ष, काँग्रेस

नाशिक भाजप सुध्दा बंगारू लक्ष्मण यांचाच पक्ष आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नव्हती. माजी राष्ट्रीय अध्यक्षांचीच री कायम ठेवण्यात आली आहे. जनतेने आता योग्य निर्णय घ्यावा. तसेच निवडणूक आयोगाने या प्रकाराची दखल घ्यावी.
रंजन ठाकरे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लांडे मामा आता तरी टोपी घालणार का?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील ज्येष्ठ नेतृत्व मधुकर लांडे यांनी आमदार निर्मला गावित यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्याचे सांग‌ितले तेव्हापासून शहरात चर्चा सुरू झाली ती एकच की, ‘लांडे मामा आता टोपी घालणार का?’ याचीच.

लांडे मामा टोपी का घालत नाही याची पार्श्वभूमी अत‌िशय रंजक आहे. मधुकर लांडे हे काँग्रेसचे निष्ठावंत, सलग पंधरा वर्ष अंजनेरीचे सरपंच राहीलेले. लांडे यांनी आमदारकीच्या निवडणुका लढविलेल्या आहेत. २००९ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी जिजाबाईंना काँग्रेसचे तिकीट जाहीर झाले. मात्र निर्मला गावित यांना उमेदवारी देण्यात आल्याचे समजताच लांडे आणि समर्थकांना धक्का बसला. आपल्याला डावलले गेले म्हणून मधुकर लांडे पक्षापासून दूर गेले. तेव्हापासून त्यांनी टोपी घालणे सोडले. बोडख्या डोक्याने फिरणारे ऐटबाज लांडेमामा लक्ष वेधून घेत. ‘बाहेरच्या उमेदवारस तुम्ही निवडून दिले म्हणून मी सुतक पाळतो’, असे सांगत त्यांनी चर्चा निर्माण केली. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा चर्चा झाली. परंतु गावित विजयी झाल्या. आता वय वर्ष ७५ असलेले लांडे यांनी आमदार गावित यांची भेट घेत काँग्रेसचा झंझावात निर्माण करण्याचे अश्वासन दिलेे. अर्थात लांडे आता टोपी घालणार की बोडख्या डोक्याने प्रचार करणार याचे अद्याप स्पष्टीकरण झाले नाही. तथापि काँग्रेसच्या वरिष्ठांनी आणि आमदारांनी लांडे मामांना ‘टोपी घातली’ अशी चर्चा मात्र सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वकिलांनी चौकस दृष्ट‌िकोन ठेवावा

$
0
0

सत्र न्यायाधीश पी. एच. काळे यांचा सल्ला

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वाढत्या स्पर्धेत व‌किली क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या वकिलांनी चौकस दृष्ट‌िकोन ठेऊन या क्षेत्रात पदार्पण करण्याची आवश्यकता आहे. स्पर्धात्मक जगाची गरज म्हणून प्रत्येकाने या दृष्टीने विचार करूनच या क्षेत्रात उतरले पाहिजे, असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एच. काळे यांनी व्यक्त केले.

शहरातील पश्चिम खान्देश दलित शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. बाबासाहेब स्मृती विधी महाविद्यालयात ‘वकिली व्यवसायातील संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद््घाटन न्यायमूर्ती काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानी अॅड. जितेंद्र निळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्च न्यायालयातील अॅड. राहुल सावंत, प्राचार्य व्ही. वाय. बहिरम, अॅड. महेंद्र निळे उपस्थित होते.

न्यायमूर्ती काळे यांनी, वाढत्या विस्तारीकरणात प्रत्येक वकिलांनी आपल्या ज्ञानकक्षांमध्ये वाढ केली पाहिजे. दररोज आपले ज्ञान वृद्धिंगत करावे, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांचा अंगीकार केला पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. अॅड. सावंत यांनी, वकिली व्यवसायात पदार्पण करणाऱ्या तरुणांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत पदार्पण करावे, असे सांगितले. त्यांनी अथक परिश्रम, संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे, उच्च न्यायालयात कामकाज करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी या संधीला सामोरे जाण्यासाठी स्वत:ला सज्ज ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

दुपारच्या सत्रात अॅड. एस. डी. पाटील यांनी ‘दिवाणी दावे आणि प्रक्रिया’ या संदर्भात तर जिल्हा सरकारी वकील सुनील जैन यांनी ‘फौजदारी खटले आणि कामकाज’ या संदर्भात मार्गदर्शन केले. परिषदेच्या समारोपप्रसंगी पोलिस उपअधीक्षक हिम्मतराव जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवाजवी शुल्क वाढीबाबत निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वाहनाचा परवाना मिळविण्यासाठी तसेच त्याचे नूतनीकरण करताना परिवहन कार्यालयातर्फे अवाजवी शुल्क आकारण्यात येते. हे अन्यायकारक असून ही अवाजवी शुल्कवाढ मागे घेण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात येईल, असे निवेदन मोटार वाहन स्कूल संचालक व नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे दिले आहे.

या निवेदनात, परिवहन विभागाने वाहनांचा परवाना, नूतनीकरण व इतर गोष्टींसाठी शासकीय शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढविले आहे. या शुल्क वाढीसंदर्भात मोटार वाहन स्कूल संचालक व नागरिकांना कार्यालयात नोटीस बोर्डावर कोणतीही सूचना अथवा माहिती दिलेली नाही. तसेच दि. २९ डिसेंबर २०१६ ते ७ जानेवारी २०१७ या कालावधीत जुन्या दराप्रमाणेच शुल्क मोटार वाहन स्कूल संचालक व एजंट यांच्याकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन नियमाविषयी कोणतीही पूर्वसूचना परिवहन विभागातील कार्यालयाकडून न मिळाल्याने शुल्क हे जुन्या दरानेच भरण्यात येईल, असे यात म्हटले आहे. यावेळी मिलींद बैसाणे, सुनील चौधरी, शरद गोसावी, शोभा आखाडे, दीपक बोरसे, अनिल चौधरी, सागर शिंदे, बापू साळवे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टेक्नोफेअर’ तंत्रस्पर्धेत भावी अभियंत्यांचे तंत्र अाविष्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तंत्रनिकेतने व अभियांत्रिकी कॉलेजेस अन् त्यातील भावी अभियंत्यांच्या तंत्रबुद्धीतून साकारणारी विविध ‘मॉडेल’ म्हणजे तंत्रयुगाच्या वाटचालीवरील श्रीगणेशा. त्यामुळेच अशा तंत्रनिकेतनासह अभियांत्रिकी कॉलेजेसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या तंत्रस्पर्धा भावी अभियंत्यांच्या दृष्टीने एक मोठं व्यासपीठ असतात.

येथील मातोश्री तंत्रनिकेतन कॉलेजला नुकतेच राज्यस्तरीय ‘टेक्नोफेअर’ तंत्रस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे एकापेक्षा एक सरस असे तंत्र अाविष्कार समोर केल्याचे चित्र दिसले. याप्रसंगी राज्य उद्योग विभागाचे सहसंचालक प्रवीण देशमुख, नगरसेवक रूपेश दराडे, प्राचार्य गीतेश गुजराथी यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद््घाटन करण्यात आले.

या स्पर्धेत राज्यातील वीसपेक्षा अधिक तंत्रनिकेतन कॉलेजेसच्या सहाशेच्या वर भावी अभियंत्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात प्रामुख्याने मोटो जीपी, ब्रिज मेनिया, सी कम्पायलेशन, तंत्र प्रश्नमंजुषा, इलेक्ट्रिकल वायरिंग डिझाइन अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बक्षीस वितरणाला डॉ. हरी कुदळ, हरिनारायण, प्राचार्य अनिल कपिले, अनंत जोशी, प्राचार्य जयप्रकाश कोकणे उपस्थित होते. सूत्रसंचालन भाविका गायकवाड यांनी केले. तर आभार प्रा. हेमंत गायकवाड यांनी मानले. संदीप कोल्हे, बाळासाहेब तांबे, सोमनाथ गाडे, यशवंत हिरे आदींनी संयोजन केले.


‘उद्योजक होण्यासाठी स्पर्धांचा मार्ग धरा’

विविध उद्योग सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एक पाऊल पुढे टाकावे. नवीन कल्पना, तंत्रज्ञान तसेच तंत्रशिक्षण यांची सांगड घालून जास्तीत जास्त उद्योजक घडविण्यासाठी कॉलेजेसनी प्रयत्नशील राहून सातत्याने विविध स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन सहसंचालक प्रवीण देशमुख यांनी केले. अशा स्पर्धांमधूनच विद्यार्थ्यांची प्रेरणाशक्ती वाढताना भावीकाळात उद्योजक निर्माण होत असतात, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरितसेनेत या, निसर्ग वाचवा!

$
0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet : @FanindraMT

राज्य सरकारची अनोखी मोहीम

महावृक्षलागवडीचे उद्दीष्ट साध्य करताना सर्वसामान्यांना त्यात सहभाही करुन घेण्यासाठी राज्य सरकारने नामी युक्ती योजली आहे. हरित सेनेसाठी ऑनलाइन सभासदत्व घेण्याबरोबरच त्याचे प्रमाणपत्रही ऑनलाइन मिळविण्याची मोहीम राज्य सरकारने आखली आहे. त्यासाठी सोशल मीड‌ियाचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन तसेच, सर्वसामान्यांनाच थेट कृतीयुक्त करण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने हरित सेना उपक्रम राबविला असून, या उपक्रमात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना व संस्थांना विशेष पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारतर्फे करण्यात आली. राष्ट्रीय वननीतीनूसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असणे गरजेचे आहे, तथापि राज्यात हे प्रमाण वीस टक्के असल्याने यात वाढ करण्यासाठी तीन वर्षात एकूण ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे. ही वृक्ष लागवड करण्यासाठी अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळाकरिता महाराष्ट्र हरित सेना ही संकल्पना राबविण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला. यात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना विशेष पारितोषिके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार वन, वन्यजीव, पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यांवर सोपविण्यात आली आहे. याशिवाय वन, वन्यजीव, नदी, तलाव या सारख्या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण व संवर्धन करणे तसेच प्राणिमात्रांबाबत आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. या करता महाराष्ट्र हरित सेना कार्य करणार आहे. महाराष्ट्र हरित सेनेत समाजातील सर्व स्तरातील घटक जोडण्याकरिता ऑनलाइन सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सरकारी कर्मचारी, अधिकारी, खाजगी संस्थांचे कर्मचारी, अधिकारी व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक इत्यादी सहभागी होणार आहेत. याकरता महाराष्ट्र हरित सेनेच्या सदस्यत्वासाठी www.greenarmy.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून, यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, शालेय-महाविद्यालयीन ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक केले आहे. या उपक्रमातील स्वयंसेवकांना वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वनांच्या संरक्षणाकरीता सामूह‌िक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणनेमध्ये सहभाग, वन विभागामार्फत साजऱ्या केल्या जाणाऱ्या वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागत‌िक वन दिन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. जे स्वयंसेवक वर्षभर सक्रीय सहभाग घेतील, त्‍यांची सरकारतर्फे विशेष दखल घेऊन त्‍यांना प्रमाणपत्र किंवा पारितोषिक देऊन पुरस्कृत केले जाणार आहे. तसेच स्वयंसेवकांना विविध वन क्षेत्र, अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पात लागणाऱ्या प्रवेश शुल्कात व इतर शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर ठेकेदाराने बुजवले खड्डे

$
0
0

ग्रामपंचायत प्रशासनाकडून दखल

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

शहरातील शिवाजीनगर भागात भूमिगत गटाराचे काम करणारा ठेकेदारच भूमिगत झाल्याचे वृत्त शुक्रवारी (दि. ३) ‘मटा’ने प्रकाशित केले होते. हे वृत्त झळकताच येथील ग्रामपंचायत प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. तातडीने संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी खोदलेली गटारीसाठीची नाली तसेच खड्डे जेसीबीने बुजविली आहेत. नागरिकांत याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

गेल्या शुक्रवारी, या संदर्भातील वृत्त ‘मटा’ने प्रकाशित केले होते. त्या वृत्ताचा परिणाम होत या संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून चांगल्याच कानपिचक्या दिल्या. त्यानंतर ठेकेदाराने लगेच जेसीबी मशीनसह आपले कामगार पाठवून गटारीसाठी खोदलेली नाली तातडीने बुजवून टाकली. यामुळे तातडीने शिवाजीनगर भागातील नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे.

येथील शिवाजीनगर परिसरात गत तीन चार आठवड्यापासून भूमिगत गटारांचे काम सुरू होते. या परिसरातील एका लेनमध्ये ठेकेदाराने पंधरा दिवसापूर्वी पाइप टाकण्यासाठी जेसीबीने नाली खोदली. नालीत पाइप टाकल्यानंतर चेंबर बांधले मात्र, नाली न बुजवताच ठेकेदार व त्याचे कामगार या भागात दिसेनासे झाले होते. या नाली आणि रस्त्यावर पडलेल्या मुरूमामुळे नागरिकांना व वाहन धारकांना त्रास सुरू झाला होता. त्यातच जेसीबीने अनेक नागरिकांचे नळ कनेक्शनही तोडून टाकले. त्यामूळे या भागातील नागरिकांमध्ये नाराजीची व संतापाची भावना होती. नागरिकांच्या नाराजीला लक्षात घेऊन ग्रामपंचायत प्रशासनाने नाली बुजविण्याचे व नळ कनेक्शन दुरूस्तीसाठी तातडीने पाऊले उचलली. यामुळे नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मैत्रेय’चे एक वर्ष सरले!

$
0
0

८५०० गुंतवणूकदारांना पैशांचे वाटप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात गाजलेल्या मैत्रेय घोटाळ्याबाबत गुन्हा दाखल होऊन वर्ष उलटले. तपास आणि निकाल या दोन्हींसाठी आव्हानात्मक ठरलेल्या गुन्ह्याची चांगली सोडवणूक करण्यात पोलिस यशस्वी ठरले. ऑगस्ट ते जानेवारी या महिन्यात आठ हजार ५०० गुंतवणूकदारांना तब्बल पाऊणे सात कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

जादा व्याजाचे आमिष आणि रिअल इस्टेटमध्ये आलेली मंदी यात मैत्रेय ग्रुपच्या दोन ते तीन कंपन्या सापडल्या. शेकडो गुंतवणूकदारांना पैसे मिळणे मुश्किल झाल्याने संतापाची प्रतिक्रिया उमटली. गेल्यावर्षी २ फेब्रुवारी रोजी अशाच काही गुंतवणूकदारांनी होलाराम कॉलनीतील कंपनीच्या कार्यालयावर हल्लाबोल केला होता. यानंतर काही गुंतवणूकदारांनी तत्कालीन पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांना भेटून आपली कैफियत मांडली. त्यानंतर ३ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीस सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत लागलीच मुंबई गाठली. ४ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक करण्यात आली.

राज्यभरात गुंतवणुकदारांचे जाळे पसरलेल्या कंपनीवर कारवाई झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चलबिचल झाली होती. पोलिसांवर विश्वास दाखवावा की कंपनीवर, या गोंधळात असलेल्या काही गुंतवणुकदारांनी ५ फेब्रुवारी रोजी कोर्टात गोंधळ घातला होता. जगन्नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय पन्हाळे आदींनी कंपनीकडील हार्डडिस्क आणि इतर पुराव्यांचा बारकाईने तपास केला. गुंतवणूकदारांना तत्काळ पैसे मिळावेत यासाठी कोर्टात पाठपुरावा केला. पैसे मिळण्याची शक्यता असेल तरच सत्पाळकरांना जामीन देण्यात यावा, यासाठी पोलिसांनी कोर्टात भक्कम बाजू मांडली. सत्पाळकरांनी यास होकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१९ जागांसाठी २७३८ इच्छुक

$
0
0

जिल्हा परिषद व पंचायत समितीतही बंडखोरी वाढण्याची शक्यता

Pravin.bidve

@timesgroup.com

Tweet : @bidvepravinmt

नाशिक : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून स्थानापन्न होण्यास तब्बल २७३८ इच्छुक आहेत. गट आणि गणांमधील एकूण २१९ जागांसाठी हा रणसंग्राम होत आहे. प्रत्येक जागेवर सद्यस्थितीत तब्बल १२ इच्छुकांनी दावा केला असून, बंडाळी अटळ मानली जात आहे. पक्षाची प्रतिमा मलीन झाल्याने उमेदवारांचा राष्ट्रवादीकडील ओढा कमी झाल्याचे पहावयास ‌मिळत आहे.

जिल्हा प‌रिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आखाडा तापू लागला आहे. आपल्या पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ७३ गट आणि १४६ गणांसाठी ही निवडणूक होत असून, शिवसेना आणि भाजपने वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हातात घालून आघाडीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा सोमवार (दि. ६ फेब्रुवारी) शेवटचा दिवस असला तरी अद्याप बहुतांश पक्षांनी आपले पत्तेच उघड केलेले नाहीत. बहुतांश पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असून, बंडखोरीची भीती पक्ष पदाधिकाऱ्यांना सतावत आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्याची संधी मिळावी यासाठी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षांकडे

उमेदवारीची मागणी केली आहे. शिवसेनेकडून सर्वाधिक ७८४ इच्छुक असून, त्या खालोखाल भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी ७५० जणांनी मुलाखती दिल्या आहेत. काँग्रेसकडून ५५० हून अधिकजण इच्छुक असून, राष्ट्रवादीत अवघे २५० इच्छुक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडेही २५० इच्छुक असले तरी ते फारतर १६५ जागा लढविणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणूक संग्रामात उडी घेतली असून, ते १८ जागा लढविणार आहेत. बहुजन समाज पक्षानेदेखील जिल्ह्यात २० गटांमध्ये आणि ४० गणांमध्ये कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीकडे इच्छुकांची मारामार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ कारावासात असून, पक्षाची प्रतिमा मलीन करणाऱ्या काही घटना गेल्या काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात घडल्या. माजी खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते देवीदास पिंगळे हे बेहिशेबी मालमत्तेप्रकरणात अडकल्याने पक्षाच्या अडचणी अधिकच वाढल्या. या सर्व प्रकारामुळे पक्षाचा जिल्ह्यातील दबदबा कमी झाला असून, पक्षाला निवडून येण्याची क्षमता बाळगणाऱ्या उमेदवारांची शोधाशोध करावी लागत आहे. अन्य पक्षांमध्ये शेकडो इच्छुक असताना राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या तोकडी आहे. जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार जिल्ह्यात आपला प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यामुळे ऐन निवडणूक काळात पक्षाने अविश्वास दाखवित त्यांना उमेदवारी वाटपाच्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवले आहे.

पक्षनिहाय इच्छुक

काँग्रेस : ५५०ए भाजप : ७५०, शिवसेना : ७८४, मनसे : २५०, राष्ट्रवादी काँग्रेस : २५०, स्वाभिमानी संघटना : १८, रिपब्लिकन पक्ष : २१, बहुजन समाज पक्ष : ६०, राष्ट्रीय समाज पक्ष : ५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्ज स्वीकृतीचा आज शेवटचा दिवस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज (दि. ६ फेब्रुवारी) अखेरचा दिवस असून, रविवारी सुटीच्या दिवशीही अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचा ओघ वाढला होता. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी २९१, तर पंचायत समितीसाठी ५०८ अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले आहेत. ऑनलाइन अर्जांची संख्या हजारांपर्यंत पोहोचली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या उमेदवार गर्दी करतात. त्यामुळे उमेदवारांची प्रचंड गैरसोय होते. प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही कामाचा अधिक ताण पडतो. गैरसोय टाळता यावी, यासाठी रविवारी सुटीच्या दिवशीदेखील अर्ज स्विकृती सुरू ठेवा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिले होते. त्यानुसार रविवारी सर्व तहसील कार्यालयांमध्ये सकाळी ११ ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. शनिवारपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १०६, तर पंचायत समितीसाठी १५० अर्ज प्रत्यक्ष दाखल झाले होते. रविवारी अर्ज दाखल करण्यासाठी अधिक गर्दी झाली. जिल्हा परिषदेसाठी १८७ तर पंचायत समितीसाठी ३४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १ ते ५ फेब्रुवारी या पाच दिवसांत २९१ उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी, तर ५०८ उमेदवारांनी पंचायत समितीसाठी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत.

आज उमेदवारीचा फैसला

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. सर्वच पक्षांमध्ये शह काटशहाचे राजकारण सुरू असून, गट आणि गणांमधून कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याचा निर्णय आज (दि. ६ फेब्रुवारी) होणार आहे. सर्वच पक्षांनी अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. ज्या जागांवर एकपेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत तेथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ही बंडखोरी उफाळून येऊ नये यासाठी काही पक्षांनी अद्याप एबी फॉर्मचे वाटपच केलेले नाही. ऐनवेळी या फॉर्मचे वाटप केले जाणार असल्याने उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांकडून गोंधळ घातला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरचा आज फैसला!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

विधान परिषदेसाठी प्रतिष्ठेची लढत बनलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शुक्रवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (६ फेब्रुवारी) सकाळी अंबड वेअर हाऊस येथे होणार आहे. त्यामुळे या केंद्रास छावणीचे स्वरूप आले आहे. रात्री उशिरापर्यंत या निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

रविवारी दुपारी येथे विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यंत्रणेचा आढावा घेतला. पाच जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली येथे एकूण ३० टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी होणार मतमोजणी

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सर्व मतपत्रिकांची मोजणी करण्यात येईल. यानंतर मतपत्रिकांचे ५०-५० या संख्येनुसार गठ्ठे तयार केले जातील. येथे विशिष्ट मतसंख्येचा कोटा ठरवून त्या दिशेने मतमोजणीस पुढील टप्प्यात सुरुवात होईल. यानंतर दुसऱ्या फेरीत प्रत्येक टेबलवर एक एक हजार मतपत्रिका दिल्या जातील. या हजार पत्रिका उमेदवारनिहाय मोजण्यात येतील. यानुसार प्रत्यक्ष मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार आहेत. यातून पहिल्या क्रमांकाचे मतदान मोजले जाईल. कोटा गाठला नसल्यास पुन्हा नंतरची फेरी पार पडेल. त्यात सर्वात कमी मतदान पडलेल्या उमेवाराचे दुसऱ्या क्रमांकापासून पुढील क्रमांची मते मोजली जातील. यानंतर सर्वात अखेरच्या उमेदवाराकडून मतमोजणीस सुरुवात होईल. अखेरीलाही कोटा न गाठला गेल्यास सर्वाधिक मते पडलेल्या उमेदवारास विजयी घोषित करण्यात येईल. या निवडणुकीतील चिठ्ठीपध्दती लक्षात घेता अंतिम निकाल हाती येण्यासाठी मध्यरात्रही उलटण्याची शक्यता आहे.

छावणीचे स्वरूप

आज होणाऱ्या मतमोजणीसाठी अंबडला रविवारपासूनच बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत निवडणूक अधिकारी, कर्मचारी, निवडणूक आयोगाकडून पास मिळालेले पत्रकार, पोलिस आणि उमेदवारांचे पासधारक प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे लढविणार १६५ जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर लढण्याची इच्छा तब्बल २५० कार्यकर्त्यांनी दाखवली असली तरी १६५ जागांवरच उमेदवार देण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

नाशिककरांनी शहरात यापूर्वी मनसेचे तीन आमदार निवडून दिले आहेत. इतकेच नव्हे तर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्यादेखील पक्षाने विश्वासाने मनसेच्या हाती दिल्या आहेत. परंतु, जिल्हा परिषदेत अद्याप मनसेला करिश्मा दाखवता आलेला नाही. यंदा मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जोरदार मुसंडी मारू, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. महापालिका क्षेत्रात मनसेने चांगली कामे केल्याचा डंका जिल्हाभरात वाजवला जात असून, या कामांचेच निवडणूक प्रचारात भांडवल केले जात आहे. जिल्ह्यात २५० इच्छुकांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अन्य पक्षांकडून तिकिटे न मिळाल्यास मनसेची वाट धरण्याची तयारी अनेक इच्छुकांनी ठेवली आहे. त्यामुळे मनसेलाही गट आणि गणांमध्ये प्रबळ दावेदार मिळण्याची शक्यता बळावली असून, मनसे मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. निफाडमधील एका जिल्हा परिषद सदस्याने शनिवारी मनसेमध्ये प्रवेश केला.

उमेदवारी यादी आज जाहीर करणार

पक्ष ७४ पैकी ५५ गटांमध्ये उमेदवार उभे करणार आहोत. त्यापैकी ४० गटांमधील उमेदवारांना पक्षाकडून एबीफॉर्मचे वाटपदेखील करण्यात आले आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा आणि सिन्नर वगळता अन्य तालुक्यांमध्ये एबीफॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित १५ गटांमधील उमेदवार सोमवारी निश्चित होणार आहेत. याखेरीज मनसेने ११० गणांमध्ये उमेदवार देण्याची तयारी ठेवली असून, सोमवारी उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीला आम्ही सक्षमतेने सामोरे जाणार आहोत. ५५ गट आणि ११० गणांमध्ये उमेदवार देण्याची मनसेची तयारी आहे. ४० गटांमधील उमेदवारांना एबीफॉर्मचे वाटप करण्यात आले असून आज, उमेदवारी यादी जाहीर केली जाईल.

- रतन इचम, मनसे जिल्हाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी प्रभागात बंडखोरी कोणाच्या पथ्यावर?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अधिकृत उमेदवारीसाठी लागणाऱ्या एबी फार्मच्या गोंधळामुळे भाजप आणि शिवसेनेची अब्रू चव्हाट्यावर आली. बंडखोरांमुळे या पक्षांनी आपल्याच हाताने आपल्याच पायावर जणू कुऱ्हाड मारून घेतली. भाजप आणि शिवसेनेने केलेल्या चुकांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे लाभ घेण्याची संधी चालून आलेली आहे.

निवडणुकीपूर्वीच पंचवटी परिसरात मुख्य लढत भाजप आणि शिवसेना यांच्यातच होईल असे चित्र उभे करण्यात आले. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांच्या नगरसेवकांनी भाजप व शिवसेनेची वाट धरली. असे होत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केवळ बघ्याची भूमिका घेतली. पंचवटीत प्रभाग एकमध्ये काँग्रेसने सुरेखा बदादे व वसंतराव मोराडे, तर राष्ट्रवादीने साहेबराव मोराडे व दीप्ती हिरवे यांना उमेदवारी दिली आहे. दोनमध्ये काँग्रेसने ऋषिकेश फुलकर व सारिका जेफ यांना, तर राष्ट्रवादीने सोनाली जगताप व डॉ. अनिता लभडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग तीनमध्ये काँग्रेसने गणेश मंडलिक, राष्ट्रवादीने समाधान जाधव, सुनीता शिंदे, गौरव गोवर्धने यांना तर प्रभाग चारमध्ये कविता कर्डक, राजश्री जाधव, राजेश माने व सागर लामखडे या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना संधी दिली. प्रभाग पाचमध्ये काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका विमल पाटील यांनी ए फार्म सोबत बी फार्म जोडला नसल्याने त्यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या पाटील यांच्याकडून ही हेतूपुरस्कर चूक केल्याची चर्चा आहे. मनसेचे उल्हास धनवटे आणि नंदिनी बोडके यांच्यासह अपक्ष गुरुमित बग्गा यांनी आघाडी करून प्रचारही सुरू करीत काँग्रेसपासून चार हात दूर राहणे पसंत केले. प्रभाग सहामधून राष्ट्रवादीचे उमेदवारी मिळालेल्या सोनाली काळे यांनी अर्जात पक्षाचे नावच टाकले नसल्याने त्यांना अपक्ष लढावे लागणार आहे. या प्रभागात राष्ट्रवादीच्या कविता आव्हाड आणि काँग्रेसच्या वैशाली गवळी या रिंगणात आहेत.

मुर्तडकांच्या खांद्यावर पॅनल िवजयाचे शिवधनुष्य

मागील पंचवार्षिकमध्ये मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झालेले बहुतांशी नगरसेवकांनी पक्षांतर केले. अशा परिस्थिती मनसेचे निष्ठांवत कार्यकर्ते आजही पक्षातच दिसत आहे. त्यातील बऱ्याच जणांना उमेदवारी मिळाली आहे. महापौर अशोक मुर्तडक प्रभाग सहामधून मनसेकडूनच उमेदवारी करीत आहेत. त्यांना स्वतःसह पक्षाच्या अन्य उमेदवारांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

शिवसेनेचा उतावीळपणा

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी एबी फार्म पाठविण्याची चूक करणाऱ्या शिवसेनेला प्रभाग चारमधून अधिकृत उमेदवार देता आले नाही. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे घाईघाई अर्ज देताना त्यावर नाव टाकण्याचे भानही शिवसेना नेत्यांना राहिले नाही. त्यामुळे प्रभाग चारमध्ये पक्षाला अधिकृत उमेदवार देता आले नाही.

मराठा मतदार नाराज

प्रभाग तीनमध्ये आमदार व भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र मच्छिंद्र सानप यांना भाजपची उमेदवारी मिळाली आहे. मात्र, या प्रभागात सर्वसाधारण एक आणि सर्वसाधारण महिला राखीव असे सर्वसाधारण तीन गट असताना भाजपने एकही मराठा उमेदवाराला संधी दिली नाही. या प्रभागात मराठा मतदारांची संख्या सर्वात जास्त असतानाही इच्छुक मराठा उमेदवारांना डावलण्यात आले. त्यामुळे मराठा मतदारांमध्ये असंतोष आहे. हा असंतोष पत्रक प्रसिद्ध करून व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर हे पत्रक व्हायरल झाल्याने शहराध्यक्ष सानप पुन्हा अडचणीत आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कारांचा पडला विसर

$
0
0

जलसंपदा खात्याला सापडेना मुहूर्त; पाणीवापर संस्था नाराज

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्य सरकार कितीही गतिमान प्रशासनाचा डांगोरा पिटत असले तरी सिंचन व्यवस्थापनातून पाण्याचे काटकसरीने व नेमक्या प्रमाणात वापर करण्यास प्रोत्साहन देणारे पाणीवापर संस्थांना मिळणाऱ्या पुरस्कारांचा राज्य सरकारला विसरच पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कार दिले गेले नसल्याने राज्य सरकारची शेतकऱ्यांसाठीची उदासीनता दिसून आली आहे. सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.

सहभागी सिंचन यशस्वी होण्यासाठी पाणीवापर संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम असणे व संस्थांनी स्वबळावर सुदृढ होणे आवश्यक असते. सिंचन व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील पाणीवापर संस्थांना राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणीवापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार देण्यात येतो.

राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असण्यासाठी सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. आघाडी सरकारने महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ सरकारने पारित केला होता. त्यानुसार सिंचन क्षेत्रात कार्यक्षमपणे काम करणाऱ्या पाणीवापर संस्थांना राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरावर पुरस्कार देण्यात येतात.

आघाडी सरकार असतांना राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारीला सिंचन दिनी हे पुरस्कार वितरित केले जातात. तर कधी ऑगस्टमध्येही या पुरस्कारांचे वितरण झालेले आहे. परंतु, राज्यात सत्ताबदल झाल्यावर सध्याच्या सरकारला या पुरस्कार वितरणाचा विसरच पडला आहे. त्यामुळे येत्या सिंचन दिनी अर्थात २६ फेब्रुवारीला तरी राज्य सरकारला या पुरस्कार वितरणाचा मुहूर्त मिळेल का, असा प्रश्न पाणीवापर संस्थांना पडला आहे.


शेतकऱ्यांप्रती अनास्था

राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर गेले दोन वर्षे या महत्त्वाच्या पुरस्कारांचे वितरणच झालेले नाही. विशेष बाब म्हणजे सन २०१४-१५ साठीच्या पुरस्कारांची घोषणा होऊनही राज्याच्या जलसंपदा खात्याला या पुरस्कार वितरणाचा मुहूर्तच सापडलेला नाही. यावरून भाजपप्रणीत सरकारचा गतिमान शासन व्यवस्थेचा दावा किती फोल ठरला आहे, याची प्रचिती राज्यातील सिंचन पाणीवापर संस्थांना आली आहे. परिणामी, राज्यातील पाणीवापर संस्थांमध्ये राज्य सरकारच्या कामकाजाबाबत नाराजीचा सूर उमटला आहे. या प्रकारातून शेतकऱ्यांप्रती अनास्थाही समोर आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images