Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

‘जीवन उत्सव’मधून प्रेरणा घेऊन जातेय

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

‘मी तुम्हाला काय संदेश देणार? उलट जीवनउत्सव सारख्या जगणं समृद्ध करणाऱ्या आणि सामाजिकता व पर्यावरणाची जाणीव करून देणाऱ्या जीवनशैली सप्ताहातून मीच प्रेरणेचा संदेश घेऊन चालले आहे. नाशिककरांनी आयोजित केलेल्या या महोत्सवात सहभागी होण्याचे हे क्षण कायम माझ्यासोबत राहतील, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी दिली. निमित्त होते जीवनउत्सव महोत्सवातील प्रकट मुलाखतीचे.

गेले आठवडाभर नाशिककरांना साध्या सोप्या उपायांतून पर्यावरणपुरक आणि निसर्गप्रेमी जीवनशैली शिकविणाऱ्या जीवनउत्सव सप्ताहाचा ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या प्रकट मुलाखतीने समारोप झाला.

मुक्ता नावरेकर आणि डॉ. धनंजय अहिरे यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान आपला कलेचा प्रवास आणि सामाजिक जीवनाचा पटच ज्योती सुभाष यांनी उलगडून दाखविला. आईवडील सेवादलाच्या चळवळीत कार्यकर्ते होते. त्यांना पाहतच लहानाचे मोठे झालो. कलेची उर्मी लहानपणापासूनच अंगी होती. पुढे राष्ट्रसेवादलाच्या कला पथकांमधून अभिनयाची संधी मिळाली. निळूभाऊ (निळू फुले) वसंत बापट यांच्यासोबत काम करायला मिळाले. त्यातूनच पुढे नृत्य, नाटक, साहित्य, सिनेमा असा प्रवास घडला. मात्र या संपूर्ण प्रवासात माणसांशी, मातीशी नाळ जोडणारे सिनेमे, नाटक यांच्याशी नाते दृढ होत गेले, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरवात रुपाली काळे बेलगावकर आणि गौतमी बेलगावकर यांच्या सुरेल गायनाने झाली. प्रास्ताविक संगीता पानगव्हाणे यांनी केले. आभार ऋता नावरेकर हिने मानले. यंदाचा जीवनउत्सव श्रद्धा मॉल येथे घेण्यात आला. या उत्सवात शेकडो नाशिककरांनी पर्यावरणपुरक जीवनशैलीची प्रेरणा घेतली.


..म्हणूनच आडनाव सुभाष ठेवले

समाजात जात धर्म यांच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून जगणे मला महत्त्वाचे वाटते. म्हणूनच मी आडनाव न लावता पती सुभाष यांचे नाव लावले. त्यातूनच ‘ज्योती सुभाष’ असे नाव मी घेतले. या मुलाखतीत सुभाष यांना पर्यावरणपुरक जीवनशैलीसह त्यांची आवडीनिवडीबद्दलही त्यांनी मोकळेपणे भाष्य केले. या महोत्सवात आल्याचा मला फायदाच झाला आहे, असे सांगून ज्योती सुभाष यांनी उपस्थितांसह आयोजकांची मने जिंकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासगी शिक्षकांना निवडणूक कामातून दिलासा

0
0

अश्विनी कावळे, नाशिक

नाशिक : राज्यभरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खासगी शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. शालेय कामकाजाबरोबरच निवडणुकीचे कामकाज करणे अशक्य असल्याबाबतची ओरड यापूर्वीच शिक्षक आणि शाळा संस्थाचालकांनी उपस्थित केली होती. या संदर्भात ठाण्यातील ‘अनएडेड स्कूल फोरम’ने ठाणे महापालिका आयुक्तांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेनुसार राज्यभरातील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय शिक्षकांसाठी महत्त्वाचा ठरला आहे.

अशैक्षणिक कामांनी वैतागलेल्या शिक्षकांच्या डोक्यावर महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणूक कामांची टांगती तलवार होती. फेब्रुवारी महिना सुरू झाला असल्याने एकीकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तयारी, तर दुसरीकडे निवडणूक कामकाजाची धास्ती या गर्तेत शिक्षक अडकले होते. यापासून दिलासा मिळण्यासाठी ठाण्यातील अनएडेड स्कूल फोरमने गेल्या आठवड्यात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई हायकोर्टाने मंगळवारी हा निर्णय दिला. यापूर्वीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत असा प्रश्न उद््भवला होता. शाळांमधील शिक्षकांची सविस्तर माहिती निवडणूक कामकाजासाठी मागवण्यात आली होती. तेव्हादेखील ठाण्यातील विनाअनुदानित शाळा संघटनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करून त्यावर शिक्षकांच्या बाजूने निर्णय झाला होता, तसेच पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे महापालिका निवडणुकांमधील कामकाजापासून मुक्तता मिळाली आहे.

राज्यभरातील शिक्षक टेन्शनलेस

या महिन्याच्या मध्यापासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांना, तसेच कलमापन चाचणीला सुरुवात होणार आहे. या परीक्षांच्या कामकाजाचा भार शिक्षकांवर असल्याने निवडणूक कामकाजाबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकांचे कामकाज व या परीक्षांचे कामकाज यांचा समन्वय साधणे शक्य नव्हते. त्यामुळे हा निर्णय राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा देणारा ठरला आहे.

शालेय कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजात घेऊ शकत नाही, या संबंधित नियमानुसार आम्ही याचिका दाखल केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय झाल्याने राज्यभरातील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

- एस. सी. केडिया, सेक्रेटरी, विनाअनुदानित शाळा संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेसाठी आजपासून अर्ज स्वीकृती

0
0

म. टा. नाशिक, नाशिक

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज, बुधवारपासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जिल्ह्यातील १५ तहसील कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली असून, याबाबची तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यामुळे ग्रामीण भातील कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. बहुतांश पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या असल्या तरी उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात (दि. २१ फेब्रुवारीला) मतदान प्र‌क्रिया राबविण्यात येणार असून, इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र गट आणि गणांमधील रंगतदार लढतींचे चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. खेडोपाडी आणि तालुक्याच्या गावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडत असून १ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयांमध्ये अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ अशी अर्ज स्वीकारण्याची वेळ असून,

पक्ष आणि उमेदवारांच्या सोयीसाठी रविवारी (दि. ५ फेब्रुवारी) रोजी देखील अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारिया यांच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे.

एका तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांसह किमान सात कर्मचारी अर्ज स्वीकृतीच्या प्रक्रियेसाठी नेमण्यात आले आहेत. तर पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज स्वीकृतीसाठी किमान १० कर्मचाऱ्यांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे.

अर्ज छाननीवेळी अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी अर्ज स्वीकृती करतानाच पुरेपूर दक्षता घ्या, असे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. अर्जासोबत लगेचच एबी फॉर्म देण्याची आवश्यकता नसली तरी अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या दिवशी (दि. ६ फेब्रुवारी) रोजी दुपारी तीनपर्यंत तो सादर करणे अपरिहार्य असणार आहे. उमेदवार स्वत: किंवा त्याचा कार्यकर्तो, किंवा पक्षाशी संबंधितांनी अर्ज आणून दिल्यास तो स्वीकारला जाणार आहे.

जिल्हा परिषदेसाठी बुधवारपासून तहसील कार्यालय स्तरावर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. प्रत्येक तहसील कार्यालयात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अर्ज स्वीकारण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार असून, या दिवशी दुपारी ३ पर्यंत उमेदवारांनी एबी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉट सर्किटने चार घरांना आग

0
0

रमजान बाबा नगरमधील दीडशे कुटुंब उघड्यावर

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील नटराज टॉकीज परिसरातील रमजान बाबा नगरमध्ये बुधवारी (दि. १) पहाटे चार घरांना शॉट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत अकरा घरे जळाली असून त्यातील रहिवाशांच्या लग्नासाठी जमा केलेल्या तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या आहेत.

या भीषण आगीत एकूण दीडशे ते दोनशे जणांचे कुटूंब उघड्यावर आले आहे. घरातील साहित्यासह संसारोपयोगी वस्तूदेखील जळाल्या आहेत. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन बंब उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने नागरिक संतप्त झाले होते. ही आग विद्युत कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लागली असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.रमजान बाबा नगरात पहाटेच्या सुमारास घरातून धूर निघत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यावेळी तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीने चार घरांना वेढले. याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली मात्र बंब वेळेत न पोहचल्याने लाखोंचे साहित्य जळून खाक झाले होते.

तीन लाखांच्या नोटा खाक

या आगीत लग्नासाठी जमा केलेल्या अडीच लाखांच्या रोकडसह एकूण तीन लाखांच्या नोटा जळून खाक झाल्या. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले असून ते सरकारकडे पाठविण्यात येणार आहेत. बेघर अकरा कुटुंबियांनी तात्पुरता मोकळ्या जागेवरच राहण्याची व्यवस्था केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

0
0

टीम मटा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली खरी, मात्र पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकाही उमेदवाराने अर्ज सादर केला नाही. पक्षांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतरच अर्ज भरण्यास वेग येणार आहे. निवडणूक कक्षांमध्ये शुकशुकाटच होता. ऑनलाइनवर मात्र २६ उमेदवारांनी माहिती भरल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
मालेगाव ः तालुक्यातील सात जि. प. गट व १४ गणांसाठी निवडणूक होत असून, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. यावेळी प्रथमच इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचे असल्याने अनेक इच्छुकांचा पहिला दिवस ‘भाऊ ऑनलाइन अर्ज कसा भरायचा?’ या प्रश्नांचे उत्तर शोधण्यातच गेला. प्रशासनकडून अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यात आली असून प्रांत कार्यालात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली गट-गणनिहाय एक मंडळ अधिकारी, दोन तलाठी असे २१ अधिकारी, १२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ६ फेब्रुवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत.

निवडणुकीसाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी पहिल्या दिवशी ऑनलाइन प्रक्रिया अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे येथील प्रांताधिकारी कार्यालायात बुधवारी दिवसभर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया समजून घेण्यातच अनेकांचा वेळ गेला. यासाठी निवडणूक शाखेकडून उमेदवारांना मार्गदर्शन केले जात आहे. अर्ज दाखल करण्याचे संकेतस्थळ, आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र, बँक खाते आदी कागदपत्रे याबाबत उमेदवारांना निवडणूक नायब तहसीलदार गिरीश वाखारे, जगदीश निकम यांच्याकडून मार्गदर्शन केले जात असून, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळाव करण्यासाठी प्रांत, तहसील, न्यायालय आदी कार्यालयांच्या आवारात बुधवारी इच्छुकांनी गर्दी केली होती. ऑनलाइन प्रक्रियेत काही त्रुटी राहून आपला अर्ज बाद होऊ नये यासाठी उमेदवार काळजी घेत आहेत. प्रांत आवारात तालुक्यातील उमेदवारांकडून मात्र ऑनलाइन प्रक्रियेबाबत संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. अर्थात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या पद्धतीनेच प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने सर्वच इच्छुक कामाला लागले असून, महा ई-सेवा केंद्र, सायबर कॅफे याठिकाणी उमेदवारांनी गर्दी केली आहे. दोन दिवसात अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या वाढेल असा अंदाज आहे.

मनमाडमध्येही शांतता

मनमाड ः नांदगाव व चांदवड येथे एकही उमेदवारी अर्ज दाखल केला गेला नाही. जिप व पं स निवडणुकीसाठी उमेदवारी कोण करणार? कोणत्या पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली असून, आता गुरुवारी तरी उमेदवारी अर्ज भरण्याचा श्रीगणेशा होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारपासून दोन्ही तालुक्यांमध्ये वातावरण तापणार असून, पक्षांकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुककांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

निफाडमध्येही चाचपणी

निफाड ः तालुक्यात बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. नाशिक जिल्हा परिषदेत सर्वात जास्त दहा गट निफाड तालुक्यात आहेत. पंचायत समितीसाठी २० गण आहेत. मात्र बुधवारी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल झाला नाही.

येवल्यातही पाटी कोरीच

येवला ः जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस बुधवारी सुरुवात झाली खरी, मात्र येवला तालुक्यातील कुठल्याही गट अन् गणातुन बुधवारच्या पहिल्या दिवशी कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या निवडणूक प्रक्रियेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांनी आपले अर्ज राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर ऑनलाइन भरायचे असून, संकेतस्थळावर भरलेल्या या अर्जाची प्रिंट काढून संबधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करायची आहे. जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस बुधवारी (दि.१) सुरुवात झाली. मात्र पहिल्या दिवशी तालुक्यात कुणाचाही उमेदवारी अर्ज दाखल दाखल न झाल्याने पहिल्या दिवसाची पाटी कोरीच राहिली. येवला तालुक्यातील पाटोदा,मुखेड,नगरसुल,राजापुर व अंदरसुल या जिल्हा परिषदेच्या पाच गटांसह,येवला पंचायत समितीच्या पाटोदा,धुळगाव, मुखेड,चिचोंडी बुद्रुक,नगरसुल,सावरगाव,राजापुर, सायगांव,अंदरसुल व नागडे या दहा गणात पंचवार्षिक निवडणुक होत आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवाऱ्या जाहीर झाल्यावरच एकंदरीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस मोठा वेग येणार असल्याचे रागरंग दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदवीधर’साठी नाही एकही केंद्र संवेदनशील

0
0


म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी (दि. ३) होत असून, या निवडणुकीची प्रशासकीय पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. नाशिक
विभागातील पाच जिल्ह्यांतील एकूण ३५३ मतदान केंद्रांवर या निवडणुकीसाठीच्या मतदानाची सोय करण्यात आली असून, यापैकी एकही मतदान केंद्र संवेदनशील नसल्याचे निवडणूक प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक विभागाची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक १७ उमेदवार लढवीत असले, तरी खरी लढत भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांतच होत आहे. काँग्रेसला ही जागा आपल्याकडे राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत, तर भाजपनेदेखील ही जागा पुन्हा आपलाकडे खेचून आणण्यासाठी कंबर कसली आहे.

यंत्रणा कामाला

या निवडणुकीसाठी विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. उपायुक्त (सामान्य प्रशासन) ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघत आहेत. याशिवाय विभागातील सर्व ५४ तालुक्यांचे तहसीलदार झोनल ऑफिसर म्हणून कामकाज पाहत आहेत.


मतदान केंद्रनिहाय कर्मचारी नियुक्त

या निवडनुकीसाठी एकूण ३५३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्र अध्यक्ष, तीन पोलिंग ऑफिसर, एक शिपाई व एक सूक्ष्म निरीक्षक असे सहा कर्मचारी कामकाज बघणार आहेत. याप्रमाणे नाशिक विभागातील सर्व मतदान केंद्रांसाठी एकूण २,११८ कर्मचाऱ्यांचे प्रशासकीय नियोजन पूर्ण झाले आहे. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी याप्रमाणे एकूण ३५३ पोलिस कर्मचारीही उपलब्ध असणार आहेत.

मतदानाची पद्धत अशी

पदवीधर मतदारसंघासाठी पसंतीक्रम पद्धतीने मतदान करावयाचे आहे. मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यानंतर मतदान अधिकारी मतदाराची ओळख पटवून मतदाराची स्वाक्षरी घेणार आहेत, तसेच मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावल्यानंतरच मतदाराला मतपत्रिका मिळणार आहे. मतदाराला आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावांसमोर अंकांतच पसंतीक्रम नमूद करावा लागणार आहे. जेवढे उमेदवार तेवढे पसंतीक्रम मतदारास देता येणार आहेत. त्याचप्रमाणे पसंतीक्रम लिहिला नसेल, पसंतीक्रमाचा बोध होत नसेल, एकाच उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रमाचे जास्त अंक असतील, पसंतीक्रमाशिवाय किंवा पसंतीक्रमासह कोणतीही खूण केलेली असल्यास, निवडणूक आयोगाने पुरविलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनव्यतिरिक्त इतर पेनने पसंतीक्रम लिहिल्यास, एक हा पसंतीक्रम एकापेक्षा जास्त वेळा लिहिल्यास मतदान बाद ठरविले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉलिटिक्स

0
0


देशाचं बजेट सादर झालं होतं... इतर ठिकाणी त्याच्यावर जोरजोरात चर्चा झडत होत्या.... नाशकात मात्र त्याच्याकडं लक्ष द्यायला कुणी तयार नव्हतं... म्युनिसिपाल्टी, झेडपी अन् पंचायत समिती एवढंच इच्छुक अन् वर्कर मंडळींना दिसत होतं... अनेकांनी तिकिटासाठी इभ्रतच पणाला लावली होती... हार-जीतपेक्षाही हाच टप्पा सगळ्यांनाच अवघड वाटत होता... अर्थात, तिकीट मिळालं म्हणजे अर्धं इलेक्शन जिंकल्यासारखच होतं... कधी एकदाची या त्रांगड्यातून सुटका होते, अशी सगळ्यांची भावना झाली होती... आधी जोशात असणारी बरीच मंडळी आता होश हरवून बसली होती...

रायबा : अरं हनुमानाची शेपटीही एवढी लांबली नसेल इतक्या लांबताय याद्या... पहिल्यांदाच असं घडलंय... अर्जाची मुदत दोन दिवसांवर आली, तरी पार्टीवाले तिकिटं सोडायला तयार नाहीत...

सायबा : होय की!... एवढं अवघड इलेक्शन आपण पाहिलंच नव्हत राव... नोटाबंदीचा तडाखा, चार जणांचं विचित्र पॅनल, तिकिटासाठी मारामारी, ऑनलाइन अर्ज, इलेक्शन कमिशनचा कडक वॉच, पोलिसांचा खडा पहारा असं सगळंच उमेदवारांना जड जाणार असंच दिसतंय... मी म्हणतोय लोकांनी इलेक्शन लढावं की नाही!... छोट्या पार्टीवाल्यांची तर पुरती पंचाईत झालीय...

रायबा : इच्छुकांचं बजेट आधीच कोलमडलंय... काल-परवा एका इच्छुकानं म्हणं पक्षाच्या एका नेत्यासमोर कोरा चेकच ठेवला. वाटेल तो आकडा टाका, पण तिकीट तेवढं द्या, असं तो सांगत होता...

सायबा : च्या मारी, एवढ्या मंदीतसुद्धा लोकांकडं पैसा आहे म्हणायचा...

रायबा : तिकीट आपल्यालाच मिळणार असं त्यानं साऱ्या प्रभागात सांगून ठेवलं होतं... म्हणून इभ्रतीचा प्रश्न असल्यानं काहीही करून तिकीट खेचून आणायचंच हा चंगच गड्यानं बांधला होता. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची तयारी होती त्याची...

सायबा : कुणी काय करेल त्याचा नेम नाही राव... आमच्या प्रभागातल्या चार स्ट्राँग अपक्ष उमेदवारांनी पॅनल बांधून घेतलं... चौघांच्याही उमेदवारीसाठी एका-एका पार्टीला ब्लॅकमेल केलं... शेवटी दोघा जणांच्या उमेदवारीवर तडजोड झाली... अरे आता आजच्या अन् उद्याच्या रात्रीत बघा काय काय घडतंय ते...

(सायबा बोलत असतानाच रायबालाही स्वतःच्या प्रभागाची आठवण झाली होती. तिथं एका उमेदवारानं तिकीट मिळालं नाही, तर पार्टीच्या सीनिअर मंडळींनाच धमकावलं होतं. दुसऱ्या एका उमेदवारानं विरोधकाचं तिकीट कापलं होतं... एकानं ताकदीचा वापर करून समोरच्याला रिंगणातून बाहेर घालवलं होतं...)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..पण नेतेहो, दारूचे व्यसन लावू नका!

0
0


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सध्या निवडणूकज्वर चांगलाच जोरात असून, त्यात सर्वसामान्यांसह तरुणाईदेखील राजकारण्यांसोबत सहभागी होताना दिसत आहे. मात्र, प्रचार आणि आनुषंगिक कामांपर्यंत सर्वकाही ठीकठाक होत असले, तरी रात्रीच्या वेळी रंगणाऱ्या दारू आणि मटणाच्या पार्ट्यांमुळे मात्र तरुणाईचे नुकसानच होत असल्याचे दिसून येत आहे. तरुणाईला गैरमार्गावर ढकलण्याच्या अशा प्रकारांवर सोशल मीडियाद्वारे सूज्ञ नागरिकांकडून टीकेची झोड उठविली जात आहे.

दारू पिण्याची मानसिकता सध्या आपणाला समाजात पाहायला मिळत आहे. त्यात आता महापालिका व जिल्हा परिषद यांच्या निवडणूक जाहीर झाल्या असून, जसजसा लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांना रंग चढत आहे, तसतसे कार्यकर्ते आपल्यासोबत राहावेत म्हणून काही राजकारण्यांकडून त्यांना विविध हॉटेल्स व ठरलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दारू आणि मटणाच्या पार्ट्या देण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अभिनेता नाना पाटेकर यांचे छायाचित्र वापरून ‘पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत. मात्र, पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही माणूस जगात नाही!’ या ओळींचा संदेश सध्या मोठ्या प्रमाणावर फिरताना दिसून येत आहे. अशा पार्ट्यांमुळे असंख्य गरीब कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी दारूचे व्यसन जडून त्यातून भविष्यात अनेक हिंसक घटना जन्म घेऊ शकतील. एकदा का दारूची सवय शरीराला लागली, की मग ती पिण्यासाठी माणूस कुठल्याही थराला जात असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी काही राजकारण्यांकडून केले जात असलेले असे प्रयोग थांबविण्याची गरज आहे. याबाबतचे आवाहनही सोशल मीडियाद्वारे करण्यात येत आहे.

सूज्ञांचे भावनिक आवाहन

निवडणुकांतील पार्ट्यांवर आता सोशल मीडियातून मोठी टीकेची झोड उठत असून, ‘विकास करा अथवा करू नका, पण नेतेहो, दारूचे व्यसन लावून गरिबांचे संसार उद््ध्वस्त करू नका...’ असे भावनिक आवाहन व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून सूज्ञ नागरिकाकडून केले जात असल्याचे सध्या दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राष्ट्रवादी वाढवायचीय, गट नाही

0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राजकारणात बेरीज-वजाबाकी असेल, पण मला राष्ट्रवादी वाढवायची आहे. मी माझा गट वाढवायला आलेलो नाही. पक्षाची पडझड झाली आहे, त्यामुळे नवीन झळाळी द्यावी लागेल, असे सांगत आता आपल्याला जिंकायचे आहे, असा निर्धार व्यक्त करून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. यावेळी त्यांनी नेत्यांना खडेबोल सुनावत कच्च्या कानाचे राहू नका, असे सांगत चांगल्या इच्छुकांना उमेदवारी देण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रवादीत पडझड सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बुधवारी सकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या आधीच कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी प्रमुखांच्या भेटी घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात बोलताना त्यांनी केंद्र सरकारपासून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महापालिकेत गेल्या वेळेस बहुमत नव्हते, त्यामुळे प्रमुखांना नीट कारभार करता आला नाही. वेगवेगळ्या लोकांना घेऊन कारभार करण्याची वेळ आली. त्यामुळे तो कसा होतो, हे सर्वांनी बघितले. ही महापालिका महत्त्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी काम करा. या निवडणुकीत मॅच फिक्सिंग होईल असे करू नका. जो उमेदवार इतरांना निवडून आणू शकतो, त्याला विचारून उमेदवारी द्या. नाही तर कच्चा-पक्का मध्ये संपूर्ण पॅनल पडतो, असेही त्यांनी सांगितले. जातपात घेऊन राजकारण करता येत नाही. अठरापगड जातींना बरोबर घेऊनच राजकारण करायचे आहे. त्यामुळे आरक्षण असलेल्या जागेत त्या प्रवर्गाच्याच माणसाला उमेदवारी द्यावी, शेवटी हा शाहू-फुलेंचा महाराष्ट्र आहे, हेही लक्षात ठेवा. राष्ट्रवादीकडे विकासाचे व्हिजन होते म्हणून जिल्ह्यात आघाडी सरकारच्या काळात मोठी कामे झाल्याचेही त्यांनी सांगितले.


अदानी, अंबानींचे सरकार

राज्याचे सरकार हे गोरगरिबांचे नाही, हे अदानी व अंबानींचे सरकार आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. शहरी भागातही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. कांदा, टोमॅटोसह पिकांना भाव नाही. विकासदरही घटता आहे, त्यामुळे भाजप सरकारने जनसामान्यांची निराशा केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

थेट फोन करा

चुकीचे काम होत असेल, तुमची काही तक्रार असेल, तर मला थेट फोन करा, असे सांगत अजित पवार यांनी आपला ९८५००५१२२२ हा नंबर कार्यकर्त्यांना लिहून घेण्यास सांगितले. यावेळी तीनदा हा नंबर सांगितला. त्याचप्रमाणे मी जर काही चुकत असेल, तर ते ज्येष्ठांना सांगण्यास सांगत त्यांनी श्रीराम शेटे व तुकाराम दिघोळे यांचे नाव घेतले.

पेहराव कसा असावा?

पवार यांनी राजकीय भाषण करताना कार्यकर्त्यांना पेहराव सुधारण्याच्यासुद्धा सूचना दिल्या. केशरचना कशी असावी, याच्या टिप्सही दिल्या. कंगवा नसेल तर मी देतो, असा चिमटा काढला. कपडे कसे असावेत याबद्दलही सूचना केल्या. महिलांना भीती वाटणार नाही असा पेहराव करा, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना पेहरावाचे महत्त्व सांगितले.

नगरसेवक रिपीटची गरज नाही

बारामती असो की इतर ठिकाणी, विद्यमान नगरसेवकांना पुन्हा रिपीट केलेले नाही. चांगले काम असेल तर त्यांना जरूर तिकीट द्या, पण केवळ तो विद्यमान आहे म्हणून त्याला उमेदवारी देऊ नका, असे सांगत त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचेही आवाहन केेले. महिलांची शक्ती राष्ट्रवादीत मोठी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप सातपूर विभाग अनुसूचित जाती महिला अध्यक्षा कुंदा अहिरे, सातपूरचे शिवसेना विद्यार्थी उपविभागप्रमुख आकाश पवार, सामाजिक कार्यकर्त्या वृषाली अहिरे व बांधकाम व्यावसायिक दत्तू वामन यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वच समाजघटक नोटाबंदीने उद््ध्वस्त

0
0


म. टा. विशेष प्रतिनिधी, त्र्यंबकेश्वर

मोदी सरकारचा कारभार हा तुघलकी प्रकारचा असून, नोटाबंदीने शेतकऱ्यांसह सर्वच समाजघटक उद््ध्वस्त झाले आहेत, अशी टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार अजित पवार यांनी त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना केली.

पवार म्हणाले, की सध्या विकसदर कमी झाला असून, शेतकरी, व्यापारी सर्व उद््ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण शेतकरी आणि शहरी व्यापारी दोन्हींना भाजप नकोसा झाला आहे. कॅशलेस व्यवहार करताना शेतातील मजुरांना कार्ड स्वॅप करून पैसे कसे देणार आणि जनावरांसाठी ढेप-पेंड घेताना शेतकरी कार्ड कसे स्वॅप करणार, अशी मार्मिक टिप्पणी करून हे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यांवरही त्यांनी खरपूस टीका केली.

खासगी कमिट्यांचा घाट

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. सहकारी बँका व मार्केट कमेटी मोडीत काढून खासगी मार्केट कमिट्या निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. नाशिक जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेत ३०० कोटी रुपये जुने चलन असून, ते आरबीआय घेत नाही. हा शेतकऱ्यांचाच पैसा असून, अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांतही असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपवर टीका

पवार यांनी शिक्षण, आदिवासी विकास, पोलिस आदींसंदर्भातील निर्णयांवरही टीका केली. शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडताना शिवसेना म्हणते २५ वर्षे सडली, तर मुख्यमंत्री थेट औकात काढतात, हा सर्व घसरलेल्या राजकारणाचा नमुना आहे, असे त्यांनी सांगितले. हे शासन फक्त स्मारकांचे भूमिपूजन करत असून, केवळ टिकाव मारून मते मागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

टाळ्या व हशाने दाद

अजित पवार हे प्रथमच त्र्यंबकेश्वरला आले होते. जवळपास तासभर नेहमीच्या दादा स्टाइलने झालेल्या या भाषणाला उपस्थितांकडून टाळ्या व हशाची दाद मिळाली. व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा विजश्री चुंबळे, आमदार नरहरी झिरवाळ, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन परवेझ कोकणी, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, दिलीप बनकर, आमदार जयवंत जाधव, शोभा मगर, सचिन पिंगळे, अर्जुन टिळे आदी पदाधिकारी, तसेच हिरामण खोसकर, विनायक माळेकर, भारती भोये, रवीद्र भोये आदी स्थानिक उमेदवार उपस्थित होते. तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांनी प्रस्ताविक केले. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिवा महाले आणि अन्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. दिंडोरीतील काही जणांनीही प्रवेश केला आहे.

पुरोहितांनी घातली पगडी

अजित पवार यांचा त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाने सत्कार केला. यावेळी पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, डॉ. दिलीप जोशी आदींनी पुणेरी पगडी घालून आणि त्र्यंबकेश्वराची प्रतिमा देऊन त्यांचा सन्मान केला. राष्ट्रवादीने पुरोहितांवरील आयकर धाडीबाबत पाठराखण केली होती व शासनाचा निषेध केला हाता म्हणून हा ऋणनिर्देश असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..आता उरले अवघे आठ तास!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या रणसंग्रामासाठी अर्ज भरण्यास अखेरचे दोन दिवस उमेदवारांच्या हाती उरलेले असताना अद्याप अवघे शंभरच अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. अर्ज भरण्याच्या उद्याच्या (३ फेब्रुवारी) अखेरच्या दिवसापर्यंत अधिकृत अर्ज दाखल करण्यास उमेदवारांच्या हाती अवघे आठ तास शिल्लक आहेत. या कालावधीत उर्वरीत काही शे उमेदवारांचे अर्ज दाखल होणार असल्याने प्रशासनाची तर कसोटी लागणार आहेच, शिवाय सर्व कागदपत्रांसह उमेदवारांपुढेही निर्दोष अर्ज सादर करणे आव्हान ठरले आहे.

नाशिक महापालिकेसाठी निवडणूक अर्ज भरण्यास २७ जानेवारीपासून सुरुवात झाली होती. या मुदतीपासून ऑनलाइन अर्जांचा मारा असला, तरीही प्रत्यक्षात अधिकृतपणे सुरुवातीचे पाच दिवस अपवादानेच अर्ज दाखल झाले. गणेश जयंतीचा मुहूर्त साधत ३१ जानेवारीला २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ही संख्या ३० वर पोहचली होती. बुधवारी आणखी ७० अर्जांची भर यात पडल्याने आता महापालिकेसाठी एकूण १०० अर्ज दाखल झाले आहेत. शहरात एकूण १२२ जागांसाठी ही रणधुमाळी रंगणार आहे. यात अर्ज दाखल करण्यास उद्याची अंतिम मुदत आहे. हे अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ३ असे अवघे चारच तास उमेदवारांच्या हाती असतात. दोन दिवस मिळून केवळ ८ तासांचा कालावधी उमेदवारांना मिळणार आहे. यामुळे या दोन दिवसांमध्ये इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडणार आहे.

महापालिकेच्या मैदानात १२२ जागांसाठी प्रमुख चार पक्षांकडून उभे राहणारे उमेदवार गृहीत धरल्यास किमान साडेचारशे अधिकृत उमेदवार, उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करणारे, याशिवाय लहान पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष असे उर्वरित शेकडो इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी या दोनच दिवसांत गर्दी होणार आहे.


यंत्रणेची होणार धावपळ

महापालिकेची ही निवडणूक प्रत्येक इच्छुक उमेदवारासाठी प्रतिष्ठेची असल्याने यात बहुतांश उमेदवारांकडून सर्वस्व पणाला लावले जात आहे. यात काहींची राजकीय कारकीर्द नव्याने सुरू होणार आहे, तर काही प्रस्थापितांपुढे आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान आहे. यामुळे अतिशय सूक्ष्म गोष्टींचाही विचार उमेदवारांकडून केला जात असल्याचे चित्र आहे. याचाच परिणाम म्हणून अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी अमावास्या असल्याने अर्ज दाखल करण्यास उमेदवार धजावले नव्हते. गणेश जयंतीच्या दिवशी मात्र अवघ्या चार तासांत २७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. आता उर्वरित अर्ज भरण्याच्या दोन दिवसांमध्ये राजकीय डावपेच किंवा दबावतंत्र म्हणून अखेरपर्यंत रोखून ठेवलेले अर्ज दाखल होणार आहेत. उर्वरित शेकडो जणांचे अर्ज या कालावधीत दाखल होणार असल्याने यंत्रणेचा चांगलाच कस लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टवाळखोर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कवायतीचा तास सुरू असताना नववीतील दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद होऊन थेट खून होण्यापर्यंतचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ओझर टाऊनशिपमधील एचएएल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला. शाळेतील शिक्षकांचे दुर्लक्षच याप्रकरणी भोवले असल्याची तक्रार यावेळी पालकांनी केली. तर विद्यार्थ्यांची तपासणी करुन शस्त्र बाळगणाऱ्या व मारामारीसारखे प्रकार करणाऱ्या टवाळखोर विद्यार्थ्यांची लिस्ट बनवा व त्यांचे समुपदेशन करा, असे आदेश शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी यावेळी शाळेला दिले.

शाळेत घडलेल्या या प्रकाराची चौकशी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी शाळेत भेट दिली. शाळा प्रशासनाची कसून चौकशी त्यांनी यादरम्यान केली. शाळेत राबविले जाणारे उपक्रम, शाळेची गुणवत्ता आदी विषयांबाबत माहिती घेण्यात आली असून लवकरच शाळेचे इन्स्पेक्शन केले जाणार आहे. यावेळी उपस्थित पालकांनी शाळेला कोणत्याही प्रकारची शिस्त नसल्याची ओरड केल्याने वातावरण गंभीर झाले होते. विद्यार्थी शाळेत शस्त्र घेऊन फिरतात, याकडे लक्ष देणे शाळा प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


अचानक तपासणी करा!

विद्यार्थी शाळेत येताना सोबत काय काय आणतात, यावर लक्ष देण्यासाठी अचानक तपासणी करण्यावर भर द्या, असे आदेश शिक्षण उपसंचालक जाधव यांनी या शाळेला दिले आहेत. यापूर्वीही शाळेतील विद्यार्थ्यांकडून तब्बल ५० लोखंडी कडे जप्त करण्यात आले होते. असे असतानाही अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष का केले गेले, असा जाबही यावेळी विचारण्यात आला. तसेच शाळांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येणार असून त्यांना आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत.



मुख्याध्यापक, शाळा प्रशासन, शिक्षक यांनी शाळांमधील टवाळखोर विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशा विद्यार्थ्यांची लिस्ट बनवून त्यावर ताबडतोब उपाययोजना करणे आवश्यक आहे. या शाळेची चौकशी करण्यासाठी लवकरच आम्ही इन्स्पेक्शन करणार आहोत.

- रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सत्तेचा दुरुपयोग करतंय

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

निवडणूक ही लोकशाही पध्दतीने झाली पाहिजे. पण भाजपाने अडीच वर्षांत सत्तेचा दुरुपयोग केला असून, निवडणुकीतही त्याचा वापर केला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.

नाशिक महानगर पालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी भवन येथे पत्रकारांशी संवाद साधतांना अनेक गोष्टीवर मनमोकळेपणाने आपले मत मांडले. ते म्हणाले, मुख्यमंत्री मोक्का, खंडणी व विविध गुन्हे असलेल्यांचे स्वागत वर्षा बंगल्यावर करतात. कायद्याचा वापर चुकीच्या पध्दतीने अडकवण्यासाठी केला जातो आहे. केवळ विरोधी पक्षांसाठीच हे हत्यार वापरले जात नाही, तर स्वपक्षाच्या नेत्यांसाठी हाच वापर केला जात आहे. हेच हत्यार वापरुन खडसेंना हटवण्यात आले. आता मुख्यमंत्र्यांना मोकळे रान आहे. या सर्व प्रकारामुळेच त्यांचा मित्रपक्ष मुख्यमंत्र्यांना गुंडांचे मुख्यमंत्री म्हणतो. हे मी नाही बोलत, असा चिमटा काढत अजित पवार यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली.

यावेळी पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री अजूनही विरोधी पक्षासारखेच बोलतात. त्याचे हातवारे व त्यांची बोलण्याची पध्दत यामुळे संताप होतो. त्यांनी शांतपणे बोलावे. महाराष्ट्राने अनेक सत्ताधारी व विरोधी पक्षांचा संघर्ष बघितला आहे. पण त्याला संयमानेच उत्तर दिले गेले आहे. हे सरकार आरोप - प्रत्यारोप करुन मूळ प्रश्नाकडून समाजाचे लक्ष दुसरीकडे नेत आहे. आता तर एकत्रपणे सरकारमध्ये काम करणारे शिवसेना - भाजप टीकेसाठी महाभारतातील पात्रांचा वापर करतात. कोणी कौरव म्हणतात, कोणी पांडव तर काही ठिकाणी आम्ही युतीत २५ वर्ष सडलो, असे सांगितले जाते. एकमेकांची औकात काढली जाते. राज्याच्या जनतेला हे शब्द रुचत नाहीत. राज्याकडे बघण्याचा इतर राज्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. आमचे विरोधी पक्षाबरोबर मतभेद असतील, पण आम्ही त्यांचे दुश्मन नाही.


भूमिपूजन करणारे सरकार

निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून भूमिपूजन केले जाते. कोणत्याही परवानग्या नसताना केवळ निवडणुका आल्या की भूमिपूजन भाजप सरकार करते. त्यामुळे या सरकारवर जनतेचा विश्वास राह‌िला नाही. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले. पण काम सुरू केले नाही. शिवस्मारकाचे भूमिपूजन केले. पण एनओसी बाकी आहे. मेट्रोचाही प्रश्न असाच आहे, असे सांगत त्यांनी केवळ भूमिपूजन करणारे हे सरकार आहे अशी टीका केली.

विकासदर घटला

नोटांबदीनंतर विकासदर दोन टक्क्यांनी घसरला आहे. राज्यात शहरी व ग्रामीण भागात त्याचा परिणाम झाला आहे. खरेदी व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. केंद्र सरकारने तर रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवरही घाला घातला आहे.

पोस्टर वादाला विराम

भुजबळांचे आम्ही समर्थक असलो तरी लोक वेगळा विचार करतात असे सांगत भुजबळांचे फोटो पोस्टरवरुन काढण्याचे समर्थन करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी फोटो वादाला पूर्ण विराम दिला. माझी व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची चौकशी सुरू असल्याचेही सांगत त्यांनी या विषयावर पांघरुन घातले. नाशिक जिल्ह्यात कोणाचे नेतृत्व, असा प्रश्न नेहमी कळीचा मुद्दा बनत आला आहे. त्यामुळे पवार यांनी आता नाशिकसह इतर ठिकाणीसुध्दा राष्ट्रवादीने सामुहिक जबाबादारी व नेतृत्व स्वीकारले असल्याचे सांगितले. नाशिक जिल्ह्यात श्रीराम शेटे व त्यांच्या समितीतर्फे कामे केली जातील, असे सांगत त्यांनी हा विषयही संपवला.


एक कोटीने मुलगी परत येईल का?

पुणे येथील इन्फोसिसमधील महिला कर्मचाऱ्याच्या खुनाच्या प्रकरणावरही पवार यांनी जोरदार टीका केली. या कंपनीने एक कोटी मदत देण्याची तयारी दाखवली आहे. पण त्याने मुलगी परत येईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. हे प्रकरण सरकारचे अपयश आहे. राज्यात सरकारचा नियोजनशून्य कारभार सुरू आहे. त्यामुळे पोलिसांवर वचक राहीलेला नाही, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासी विकास मंत्र्यांना जाब विचारा

0
0

आमदार निर्मला गावित यांचे मतदारांना आवाहन

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

नोटबंदी हा काँग्रेसचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरणार असे हरसूल भागात झालेल्या मेळाव्यात दिसून आले. ग्रामीण भागात नोटबंदीने घटलेला रोजगार आणि शेतकरी शेतमजूर याची चर्चा अधिक होत आहे. त्याचसोबत आदिवासींच्या कल्याणासाठी असलेल्या योजना बंद करण्यात येत आहेत, याचा जाब आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना विचारा, असे आवाहन आमदार निर्मला गावित यांनी हरसूल शिंदपाडा येथील मेळाव्यात केले.

केंद्रात व राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे आपलेच पैसे आपल्याला मिळत नसल्याची स्थिती सध्या सर्वत्र निर्माण झाली आहे. भाजपचे त्र्यंबकेश्वर तालुक्यात कुठल्याही प्रकारचे विकासकामे नसताना काही लोक निवडणुकीपुरते कामाला लागले आहेत.

त्र्यंबक, पेठ, सुरगाणा हे तालुके अजुनही मागासलेले आहेत. येथे पायाभात सुविधांची वाणवा आहे. आदिवासी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे या परिसरात निधी येतो आणि या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावते. आता तुमच्याकडे आदिवासी विकासमंत्री सावरा येतील. त्यांना आद‌िवासींच्या योजना बंद का केल्या तसेच गडदवणे, बोरीपाडा बंधाऱ्यासाठी पैसे का देत नाहीत? याबाबत विचारा असे गावित यांनी आवाहन केले. काँग्रेसच्या विजय-संकल्प मेळाव्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी हजेरी लावली.

या मेळाव्याप्रसंगी ठाणापाडा गटाचे उमेदवार हर्षल गावित, ठाणापाडा गणाचे उमेदवार ललिता माडी, मुलवड गणाचे उमेदवार पुंडलिक गीते यांच्यासह सभापती मंगळू निंबारे, माजी सभापती सुनंदा भोये, सुमन खरपडे, सुमन टोपले, हर्षल गावित, देविदास जाधव, रमेश भोये, पुंडलिक कनोजे, अर्जुन मौळे, भाऊराज राथड आदींसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

हर्षलसाठी भा‌वनिक साद

ठाणापडा गटात आमदारपुत्र हर्षल गावित रणांगणात उतरले आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनीही उमेदवारी जनतेच्या मागणीवरून असल्याचे सांग‌ितले. त्यामुळे आमदार निर्मला गावित यांनीदेखील हर्षलला पदरात घेऊन विजयी करावे, अशी भावनिक साद मेळाव्यात घातली आहे.

पक्षप्रवेश सुरू

मेळाव्यात माकप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे याबरोबरच इतरही पक्षातील शंभरावर कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसची ताकद ठाणापाडा गटात वाढली आहे. तर सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र येऊन सरकारच्या विरोधात निवडणूक लढवून काँग्रेस पक्षाला निवडणूक जिंकायची आहे, असे तालुकाध्यक्ष संपत सकाळे यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पुणे रेल्वे मार्ग अधांतरीच

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पहिल्यांदाच सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पामुळे नाशिककरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सुटणार की नाही हे समजू शकलेले नाही. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग होणार की नाही, अशी विचारणा नाशिककरांनी केली आहे. अनेक वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्ग पोतडीतच राहिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कृषी, पर्यटनासाठी विशेष गाड्या सोडणे, रेल्वेसुरक्षेसाठी एक लाख कोटीची तरतूद करणे, ऑनलाईन तिकिटावरील सेवाकर रद्द करणे, २०१९ पर्यंत सर्व कोचमध्ये बायोटॉयलेट, सौर ऊर्जेवर रेल्वेस्टेशनवर चालवणे आदी घोषणा नाशिककरांसाठी महत्त्वाच्या आहेत.

रेल्वेच्या ९२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुख्य अर्थसंकल्पासोबत रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेचे दहा हजार कोटी वाचल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रासाठी काय मिळाले, याचा तपशील उपलब्ध न झाल्यामुळे नागरिक संभ्रमातच राहिले.

कृषी, पर्यटनाला फायदा

नाशिक द्राक्ष, डाळींब, कांदा व अन्य पिकांची देशाची राजधानी आहे. येथून भाजीपाला गुलाब व अन्य फुलेही निर्यात होतात. अशा कृषी उत्पादनासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे जाहीर केल्याने नाशिकच्या कृषी क्षेत्राला फायदा होणार आहे. पर्यटन आणि तीर्थस्थळांसाठीही नाशिक प्रसिध्द आहे. देश-विदेशातून भाविक व पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे यंदाच्या अर्थसंकल्पात जाहीर झाले आहे.

सुरक्षा व्यवस्था वाढवा

रेल्वे सुरक्षेसाठी यंदाच्या अंदाजपत्रकात तब्बल एक लाख कोटींची तरतूद केलेली आहे. नाशिकरोडला कुंभमेळ्यात शंभरावर सीसीटीव्ही कंत्राटी पध्दतीने बसविण्यात आले. ते नंतर काढून घेण्यात आले. सीसीटीव्ही कॅमऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे. मुख्य प्रवेशद्वारावरच मेटल डिटेक्टर आहेत. अन्य प्रवेशद्वार सताड उघडे असतात. तेथेही मेटल डिटेक्टर आणि स्कॅनिंग मशिन बसविणे, फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा भिंत उभारणे आवश्यक आहे. ही कामे अर्थसंकल्पातून मर्गी लागावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रेल्वेचे इ-तिकीट काढतांना सेवाकर लागणार नसल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने २०१९ पर्यंत सर्व गाड्यांमध्ये बायो टॉयलेट लावले जाणार असल्याने याचेही स्वागत आहे. सर्व घोषणा प्रत्यक्षात उतराव्यात. हीच अपेक्षा!

- राजेश फोकणे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती

पूर्वी ज्या राज्याचे रेल्वेमंत्री असायचे त्याच राज्याकडे रेल्वेचा जास्त निधी जायचा. आता रेल्वे आणि केंद्रीय अर्थसंकल्प संयुक्तरित्या सादर झाल्यामुळे कोणत्याही राज्याशी भेदभाव होणार नाही. आवश्यकता आहे त्या ठिकाणी निधी मिळेल.

- बिपीन गांधी, अध्यक्ष, रेल परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पदवीधरसाठी आज मतदान

0
0

पदवीधरसाठी आज मतदान

जळगाव, धुळे, नंदुरबारला निवडणूक यंत्रणा सज्ज

टीम मटा

विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी आज (दि. ३) मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शाळांवर ३३ मतदान केंद्र आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी सतर्क राहत निवडणूक प्रक्रिया योग्य रितीने पार पाडावी, असे आवाहन नाशिक विभागीय महसूल आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ डवले यांनी केले आहे.

आयुक्त डवले जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाइन केंद्रास भेट दिली. त्यानंतर मतदान साहित्य पाहणी करून शहरातील मतदान केंद्रांची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पाढंरपट्टे, निवासी जिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी जे. आर. वळवी, अप्पर तहसीलदार ज्योती देवरे, तहसीलदार अमोल मोरे आदी उपस्थित होते. महसूल आयुक्त डवले यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीसाठी आढावा घेत जिल्ह्यातील एकूण मतदार, मतदान केंद्रांवरील सुविधांची माहिती घेतली.

जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मतदान अधिकारी, शिपाई, सुक्ष्मनिरीक्षक, पोलिस कर्मचारी असे एकूण १६५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा पोलिस दलाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जे. आर. वळवी यांनी दिली आहे.

००

पॉईंटर

धुळे जिल्ह्यातील मतदान केंद्र : ३३

एकूण मतदार : २५,४००

एकूण उमेदवार : १७

एकूण मतदार : २,५६,४७२

अधिकारी व कर्मचारी : १६५

००

मतदार ओळखपत्र आवश्यक

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान आज (दि. ३) सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत होणार आहे. यासाठी मतदारांनी मतदानाच्या वेळीस निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये ज्या मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसेल त्यांनी ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, छायाचित्र असलेले पदवी किंवा पदवीका प्रमाणपत्र, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम किंवा उद्योगसंस्थेने दिलेले ओळखपत्र, बँक किंवा पोस्टाचे पासबुक यासारख्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा सोबत असणे आवश्यक आहे. ओळखीचा पुरावा असल्याशिवाय मतदान करता येणार नाही. मतदारांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपाट, टीडीआर कोंडी फुटणार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कपाट प्रश्न व नव्या टीडीआर धोरणामुळे नाशिकच्या विकासाची झालेली कोंडी आता फुटण्याची शक्यता आहे. महापालिका हद्द‌ींमध्ये मोफत एफएसआयचे उल्लंघन होऊन अनधिकृत ठरणाऱ्या बांधकामांना नियमित करण्यासंदर्भातील अभिप्राय महापालिकेने शासनाला सादर केला आहे. त्यामध्ये अतिरिक्त बांधकामांवर प्रीमियम आकारून बांधकामे नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर एफएसआयचे उल्लंघन झालेल्या ठिकाणी टीडीआर लोड करण्याची परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामांसदर्भातील या शिफारशी शासनाने मान्य केल्यास गेल्या दीड वर्षापासून कपाटांच्या प्रश्‍नांवरून निर्माण झालेला तांत्रिक वाद निकाली निघण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने पिंपरी चिंचवड पालिकेच्या धर्तीवर राज्यातील महापालिका हद्दीतील अनाधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच महापालिकांमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्यसरकारने महापालिकांकडून अभिप्राय मागविला आहे. त्यानुसार महापालिकेने तज्ज्ञांच्या मदतीने शासनाला अनधिकृत बांधकामांसदर्भात काही पर्याय सुचविले आहेत. राज्य सरकारने महापालिकेच्या पर्यायांचा विचार केल्यास कपाटांच्या प्रश्‍नांवरून निर्माण झालेला तांत्रिक वाद मिटणार आहे. नव्या शिफारशींमध्ये साडेसात, नऊ मीटर रस्त्यावरील बांधकामांनी एफएसआयचे उल्लंघन केले असल्यास त्यावर टीडीआर लोड करून ती नियम‌ित करावी आणि ३० टक्के एफएसआय उल्लंघनाबाबत स्पष्टता करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे यातून शहराच्या बांधकाम व्यवसायाची झालेली बरीचशी कोंडी फुटणार आहे.

शहरात बांधकामातील कपाटांवरून वाद निर्माण झाला आहे. मोफत एफएसआयचा वापर चटईक्षेत्र वाढविण्यासाठी झाल्याचा दावा पालिकेच्या नगररचना विभागाने केला होता. त्यामुळे अशी बांधकामे अनधिकृत ठरविण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून हा वाद रखडला आहे. त्यामुळे बांधकाम परवानगीसाठी प्रकरणे दाखल होणे बंद झाले होते. सहा हजारांहून अधिक अशी प्रकरणे परवानगीअभावी प्रलंबित आहेत. शहर विकास आराखड्यातून प्रश्‍न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. परंतु, विकास नियंत्रण नियमावली जाहीर न झाल्याने तिढा कायम आहे. नियंत्रण नियमावलीतूनही प्रश्‍न सुटणार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे बांधकामे अधिकृत करण्याच्या योजनेत पालिकेच्या शिफारशी मान्य केल्यास बांधकामातील कपाटांचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.


महापालिकेच्या शिफारसी

- अनधिकृत बांधकामे अधिकृत करताना मोफत एफएसआयमध्ये तीस टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. परंतु, सदरची सूट एकूण बांधकामावर आहे की अतिरिक्त वाढीव बांधकामावर आहे याबाबत सरकारने स्पष्ट करावे.

-३१ डिसेंबरनंतर ज्या बांधकामांना भोगवटा प्रमाणपत्रे दिली आहेत, त्या बांधकामांचा समावेश बांधकामे नियम‌ित करण्याच्या योजनेत करू नये.

- नऊ मीटर रुंदीच्या खालील रस्त्यांवर एफएसआयचे उल्लंघन झाले असल्यास व त्यावर टीडीआर लोड केला असल्यास अशा बांधकामांनाही योजना लागू करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्दीने अडतेय ऑनलाइनचे घोडे!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इतके दिवस सुरळीत चालणाऱ्या ऑनलाइन प्रणालीने आता वाढत्या मागणीमुळे मान टाकण्यास सुरुवात केली आहे. वेबसाइट हँग होणे, पेज रिफ्रेश होणे किंवा डाटा सेव्ह न होणे असे प्रकार वाढले आहेत. उमेदवारी अर्जातील माहिती किचकट असून, गोंधळात यात काही चुका झाल्यास थेट उमेदवारी अर्जावरच संक्रात येण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरण्याची सुविधा सुरू केली. महापालिका निवडणुकीसाठी याच पहिल्यांदाच वापर होतो आहे. मात्र, अतिरिक्त ताण पडल्याने ऑनलाइन सुविधेचा फज्जा उडण्यास सुरुवात झाली आहे. आगामी दोन दिवस ही यंत्रणा कोलमडून पडणार नाही, याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. याबाबत बोलताना काही इच्छुक उमेदवारांनी सांगितले, की वेबसाइट हँग होणे ही महत्त्वाची समस्या समोर येत आहे. अनेकदा अर्ज भरण्याचे काम सुरू असताना अचानक पेज रिफ्रेश होते. उमेदवार थेट साइनआऊट होऊन होम पेजवर येतो. किमान तीन ते चार तास माहिती भरण्याची प्रक्रिया सुरू असताना असे प्रकार घडल्यास मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार इच्छुकांकडून केली जाते आहे. दरम्यान, काही तांत्रिक मुद्देही अर्ज भरताना समोर येत आहेत. समजा इच्छुक उमेदवाराने काही वर्षांपूर्वी एखादे घर खरेदी केलेले असेल, तर ते खरेदीची तारीख अर्जात नमूद करावी लागते. ती तारीख बिनचूक हवी अन्यथा भविष्यात याचा मोठा फटका इच्छुक उमेदवारास बसू शकतो. दुसरीकडे शौचालयाच्या येथे काढण्यात येणारा सेल्फी फोटो हादेखील चेष्टेचा विषय ठरतो आहे.

तांत्रिक मुद्द्यांचे अडथळे

दरम्यान, एका उमेदवाराने याच वर्षीसाठी पहिल्यांदा इन्कम टॅक्स रिर्टन्स भरले. मात्र, अर्ज भरताना त्यात पाच वर्षांसाठी पर्याय देण्यात आलेले आहेत. यात, रिक्त जागा सोडल्यास अर्ज पुढे भरताच येत नाही. तर शून्य भरल्यास तो इनव्हॅलिड दाखवला जातो. हा मुद्दा फारच किचकट असून, यात सुधारणा होणार काय, असा प्रश्न इच्छुकांकडून उपस्थित होतो आहे. सध्या वेबसाइट यूजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसांत त्यात आणखी भर पडेल. एकाच वेळी अनेक यूजर्स वापर करतील त्यावेळी काही समस्या उद्भवतील, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेला दीड कोटीचा दणका

0
0

Gautam.Sancheti@timesgroup.com

निफाड तालुक्यातील काकासाहेबनगर (रानवड) येथील नाशिक जिल्हा बँकेच्या शाखेतील १७ महिन्यांपूर्वी लॉकर्स फोडून झालेल्या चोरीत लॉकर्सधारकांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक मंचाने दिले आहेत. या चोरीनंतर बँकेने जबाबदारी झटकली होती. त्यामुळे २९ लॉकर्सधारकांनी ग्राहक न्यायमंचात धाव घेतली. त्यानंतर न्यायमंचाने हा ऐतिहासिक निर्णय देत तब्बल २९ ग्राहकांचे ६ किलो ६६७ ग्रॅम सोन्याचे चोरी झालेल्या दिवसाच्या बाजारभावाप्रमाणे मूल्य देण्याचे आदेश दिले आहेत. याची अंदाज‌ित किंमत १ कोटी ६४ लाख ८२० रुपये आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक ग्राहकाला मानसिक त्रासापोटी २५ हजार व अर्ज खर्चापोटी १० हजार रुपये असा एकूण १० लाख १५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

रानवड येथे २४ ऑगस्ट २०१५ रोजी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत बँकेच्या पाठीमागची खिडकी तोडून दरोडेखोर आत शिरले. गॅस कटरच्या साह्याने त्यांनी स्ट्राँगरूमचा दरवाजा कापून या रूममधील लॉकर गॅस कटरच्या साह्याने कापले व त्यातील ऐवज लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच व्यवस्थापकांनी तातडीने पिंपळगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर आतापर्यंत या चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे लॉकर्सधारकांनी बँकेत नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली. पण बँकेने तीन महिन्यांनंतर लॉकर्समध्ये किती किंमतीच्या वस्तू ठेलेल्या आहेत, याबाबत बँक अनभिज्ञ असल्यामुळे ही जबाबदारी बँकेवर येऊ शकत नाही. पोलिस तपासातून मुद्देमाल प्राप्त होताच तूर्त कळविण्यात येईल असे कळवले. त्यानंतर या चोरीतील २९ लॉकर्सधारकांनी ग्राहक न्यायमंचात १ एप्रिल २०१६ रोजी तक्रार दाखल केली व त्यानंतर हा निर्णय देण्यात आला.

उगाव येथील शेतकरी गणपत गंगाधर पानगव्हाणे यांच्यासह २८ जणांनी ग्राहक न्ययामंचात स्वतंत्र तक्रार केली. पानगव्हाणे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, सेफ डिपॉझीट व्हॉल्टबाबत बँकेने केलेला करारनामा अहेतूक असून, त्यात चोरी, आग व इतर कारणांसाठी नुकसानीची कोणतीही जबाबदारी वा त्याचा उल्लेख केला नसल्याने तो त्रुटीयुक्त आहे. त्याचप्रमाणे बँकेच्या शाखेत सुरक्षा रक्षक अथवा सुरक्षा गजराची सुविधा पुरविण्यात आलेली नव्हती. सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नव्हते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात शाखा असल्यामुळे येथे विजेची शाश्वती नसूनही जनरेटरची अथवा बॅटरी बॅकअपची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. सर्व सुरक्षा देणे बंधनकारक असताना ते करण्यात कुचराई केलेली आहे. या तक्रारीवर बँकेने आपली बाजू मांडली. मात्र, न्यायमंचाने आपला निर्णय देताना नुकसान भरपाई देण्यास ग्राहक पात्र असल्याचे सांगत त्यांच्याकडून इंडेम्निटी बॉण्ड करुन घेण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे -कुलकर्णी व कारभारी जाधव यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला उमेदवारांची उडतेय तारांबळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक महानगर पालिकेच्या निवडणूकीत प्रथमच चार उमेदवारांचा एक प्रभाग करण्यात आला असून यापैकी दोन जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांकडे महिलांची संख्या एवढी नसल्याने अनेक पुरुष पदाधिकाऱ्यांच्या घरातील महिलांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र या महिलांची उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच होणारी तारांबळ एक चर्चेचा विषय ठरली आहे. सिडको भागात कार्यरत असलेल्या विविध राजकीय पक्षांकडून महिलांना उमेदवारी देण्यासाठी महिलांची संख्या कमी दिसून येत आहे. त्यातच अनेक पुरुष इच्छुक असल्याने पुरुष गटात नाही तर महिला गटातून घरातील महिलेला उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. यासाठी महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील एक महिन्यांपासून प्रभागात या महिला फिरून मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांचीच गरज असल्याने या महिला विभागीय कार्यालयात येतांना दिसत आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करतांना होणारी धावपळ पाहता या महिलांची चांगलीच तारांबळ होत आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या खटाटोपापेक्षा उमेदवारी न मिळाली तर बरे होईल, असेही हावभाव काही महिलांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images