Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

काडीमोडानं जीव भांड्यात!

$
0
0

काडीमोडानं जीव भांड्यात!

प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा झाला... नाशकातही तिरंग्याला मानवंदना देण्यात आली... सकाळी देशभक्तीपर अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचा धडाका उडाला आणि सायंकाळी मुंबईत युतीचा बार उडाल्यानं इलेक्शनइच्छुकांचा दिवस तसा व्यस्ततेतच गेला... मुंबईत बाणवाल्या पक्षप्रमुखांनी युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर नाशकात अनेकांचा जीव भांड्यात पडला... गेल्या दोन आठवड्यांपासून घोंगावत असलेलं युतीचं सावट एकदाचं दूर झाल्यानं सगळ्याच पार्टीवाल्यांना हुरूप चढला... युतीचा संसार टिकला असता, तर रायबा-सायबाच्या बिझनेसवर पाणी फिरणार होतं... काडीमोडाची घोषणा ऐकल्यानंतरही दोघंही चांगलेच सुखावले होते... प्रश्न पोटापाण्याचा होता... प्रश्न बिझनेसचा होता...

रायबा : लई लोकांना शांत झोप लागली असंल राव... युतीचा घटस्फोट झाला एकदाचा... ३५-४० वर्षांचा संसार एका क्षणात विस्कटला... २६ जानेवारीच्या रात्रीला लई जल्लोष सुरू होता... माझे पण जाम लाइट लागले होते... दोन्ही पार्टीवाल्यांकडून अॅडव्हान्स घेऊन ठेवला होता... सुटलो एकदाचं!

सायबा : खरं आहे... पार्टीच्या भविष्याची नव्हे, तर आपापल्या तिकिटांची चिंता होती या मंडळींना... पार्टीचं काही होवो, पण आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, लढता आलं पाहिजे एवढीच इच्छा होती यांची... काही लोक तर देव पाण्यात बुडवून बसले होते म्हणे! आता सरकार पडतं की काय?

रायबा : अरे, युती तुटलीय फक्त... सरकारमधून त्ये बाहेर नाही पडलेत अजून... सरकार नाही पाडायचं त्यांना... अन् बाणवाले नसले तरी घड्याळावाले आहेच की! सरकार पडणार नाही असं दिसतंय... कमळावाल्यांकडे चांगली संख्या आहे आमदारांची...

सायबा : काय राव ते पवार सायेब... हसून म्हटले, युती तुटायचं दुःख झालं... मला तर त्यांचं काहीच कळत नाही राव... पण, आता त्यांच्या पार्टीचे बुरे दिन संपतील म्हणायचे...

रायबा : होय.. होय... अच्छे दिन येतील घड्याळवाल्यांना... तुरुंगातले पुढारीसुद्धा आता बाहेर येतील पटापट... म्हणूनच सायब काल माइकसमोर बोलताना जाम खूश दिसत होते... त्यांचंसुद्धा घोडं गंगेत न्हालं एकदाचं...

सायबा : (घोडं शब्द ऐकून सायबाला एकदम काही तरी आठवले.)

घोड्यावरून आठवलं रायबा... काल म्हणं पोलिसांच्या परेडमध्ये एक घोडं बिथरलं होतं... आपले पैलवान मेयर अशोकभाऊंनी धावत जाऊन ते आवरलं... आपल्याला लई अभिमान वाटला राव भाऊंचा... घोडं लोकांच्या अंगावर गेलं असतं तर काही खरं नव्हतं... जाता-जाता का होईना पण त्यांची तब्येत कामाला आली रावं... आपली तर जॅम कॉलर टाइट झाली राव... (रायबानंही होय होय म्हणत सायबाच्या सुरात सुरू मिसळला... दोघांनाही मेयरचा अभिमान वाटत होता... त्यांची छाती भाऊंसारखीच फुगली होती.)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाहीरनाम्यासाठी भाजप मागवणार जनतेच्या सूचना

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकींसाठी भाजप जनतेवर आपला जाहीरनामा लादणार नसून, जाहीरनामा तयार करताना थेट जनतेलाच सहभागी करून घेणार आहे. शहरातील जनतादेखील शहराच्या विकासाची भागीदार असावी, या संकल्पनेतून निवडणुकीसाठी पक्षाने ध्येयनामा करण्याचे ठरविले असून, शहराचा लोकाभिमुख विकास व पारदर्शी कारभारासाठी जनतेकडून जाहीरनाम्याबद्दलच्या अपेक्षा जाणून त्यानुसार पक्षाचा ध्येयनामा अंतिम केला जाणार आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात काय असावे, यासाठी जनतेकडूनच सूचना मागविण्यात येणार असून, त्यासाठी नाशिक भाजपने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, आठ दिवसांत नागरिकांना आपले मत नोंदवावे लागणार आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे. आगामी पाच वर्षांत शहराचा विकास कसा साधणार हे दर्शविणारे लोकोपयोगी योजनांच्या अभिवचनाची यादी म्हणजे जाहीरनामा. परंतु, हा जाहीरनामा जनतेवर लादलेला नसावा, तर तो जनतेच्या मनातील असावा, तसेच शहरातील जनतादेखील शहराच्या विकासाची भागीदार असावी, या संकल्पनेतून भाजप निवडणुकीसाठी पक्षाचा ध्येयनामा जनतेसमोर सादर करणार आहे. लोकाभिमुख विकास व पारदर्शी कारभारासाठी जनतेकडून जाहीरनाम्याबद्दलच्या अपेक्षा जाणून त्यानुसार पक्षाचा ध्येयनामा अंतिम केला जाईल, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत ऑनलाइन पोर्टलच्या प्रारंभावेळी सांगितले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे, तसेच लक्ष्मण सावजी, वसंत गिते, सुनील बागुल, महेश हिरे, आशिष नहार व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. याकरिता www.bjpnashik.org या संकेतस्थळावर अथवा http://www.bjpnashik.org/dheyanama या लिंकवर लॉगिन करून आपण आपले मत नोंदवावे, असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले आहे.


लोकाभिमुख कारभारासाठी...

शहर अथवा प्रभागाच्या विकासासाठी विविध आवश्यक बाबी प्रश्नार्थक स्वरूपात पक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात शहरातील प्रत्येक व्यक्ती त्यास त्याच्या प्रभागासाठी अथवा शहराच्या विकासासाठी आवश्यक वाटणाऱ्या विशेष सूचनादेखील नमूद करू शकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकसहभाग व पारदर्शकता या बाबींचा आग्रह असल्याने अशाप्रकारचा अभिनव प्रयोग लोकाभिमुख कारभारासाठी भाजपने सुरू केला आहे. पक्षाच्या संकेतस्थळावर पुढील सात दिवस लॉगिन करून जाहीरनाम्याबद्दल नागरिकांनी आपले मत नोंदवावे, असे आवाहन यावेळी पालकमंत्री महाजन यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रध्वजाला मानवंदना...

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान येथे आयोजित राष्ट्रध्वज वंदन आणि संचलन समारंभात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असून, पालकमंत्र्यांनी भाषणाला आवर घालत नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव, पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त डॉ. अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, महापौर अशोक मुर्तडक आदी उपस्थित होते. आचारसंहिता असल्याने पालकमंत्र्यांनी भाषणादरम्यान होणाऱ्या विविध घोषणांना आळा घालत नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परेड कमांडर एसीपी विजय कुमार चव्हाण, सेकंड परेड कमांडर रामदास पालशेतकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनात पोलिस आयुक्तालय नाशिक ग्रामीण पोलिस दल, होमगार्ड, शहर वाहतूक शाखा, वनविभाग, अग्निशामक दल, भोसला मिलिटरी स्कूल, होरायझन स्कूल, वाघ गुरुजी शाळेचे स्काऊट-गाइड पथक, बँड पथक, भोसला मिलिटरी स्कूलचे घोडदळ, वन विभाग आदी पथकांनी सहभाग घेतला. भोसलाचे प्रथमच सहभाग घेणारे आर्मी विंग मुलींचे पथक संचलनाचे विशेष आकर्षण ठरले. संचलनावेळी चित्ररथांद्वारे सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छतेबाबत संदेश देणारा महापालिकेचा चित्ररथ, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा ‘लेक वाचवा’, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील १०८ क्रमांक रुग्णवाहिका, महिला बालविकासचे चाइल्ड लाइन १०९८, भारत विकास ग्रुपतर्फे लाइफ सपोर्ट १०८ क्रमांक रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म आणि वॉटर टेंडर वाहन संचलानाचे आकर्षण होते. आदिवासी विभागातर्फे नृत्य पथकाने संचलनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

सहा चित्ररथ माघारी

सरकारने आणलेल्या सहा योजनांची माहिती देणारे चित्ररथही या संचलनात सहभागी होणार होते. परंतु, अशा माहितीच्या प्रसारामुळे आचारसंहिताभंग होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे हे चित्ररथ संचलनात सहभागी न करण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला.


...अन् धावले अश्वप्रेमी महापौर

संचलन सुरू असताना भोसला मिलिटरी स्कूलचा एक अश्व उधळला. त्यावर बसलेल्या विद्यार्थ्याला त्यास आवर घालणे अवघड झाले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेले अश्वप्रेमी महापौर अशोक मुर्तडक यांनी लागलीच अश्वाकडे धाव घेतली. दोन मिनिटांत त्यांनी काही सहकाऱ्यांसमवेत उधळलेल्या अश्वाला लगाम घातला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गटागटांत ताकदीने लढा; विजयाचे शिलेदार बना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयाबाबत कोणी कितीही वल्गना केल्या, तरी यात भाजपच नंबर एकचा पक्ष ठरणार आहे. जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपचाच जि. प. अध्यक्ष होईल. त्यासाठी ताकदीने लढा, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

तालुकातील जि. प. व पं. स. निवडणुकीच्या निमित्ताने येथील चाळीसगाव फाटा येथे गायत्री मंगल कार्यालायात बुधवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सुरेश निकम, अद्वय हिरे, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक पवार, पवन ठाकरे, रत्नाकर पवार, संदीप पाटील, नितीन पोफळे, मदन गायकवाड, समाधान हिरे आदी उपस्थित होते.

महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडीच वर्षांत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य अग्रेसर होत आहे, असे सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत ते म्हणाले, दोन्ही पक्ष बाहेर आहेत की जेलमध्ये तेच समजत नाही. यावेळी तालुक्यातील विविध पक्षातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचा महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रेस कामगारांनाही आता सातवा आयोग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिकरोडसह देशभरातील प्रेस कामगारांना सातव्या आयोगाचे गिफ्ट मिळणार आहे. येत्या तीन महिन्यांत पगाराच्या स्लीपमध्ये या आयोगानुसार पगारवाढ झालेली दिसेल. गेल्या १ जानेवारी २०१६पासून हा आयोग लागू होणार असून, त्याचा फरकही लवकरच मिळेल.
प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सुनील आहिरे, नंदू पाळदे, संदीप बिश्वास, पद्मा जॅक्सन, शिवाजी कदम, जयराम कोठुळे, सिध्दार्थ पवार आदी उपस्थित होते. आयोग व अन्य मागण्यांसाठी खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र पवार यांचे मोठे सहकार्य लाभले.
प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यामुळे नियमाप्रमाणे प्रेस कर्मचाऱ्यांना आयोग मिळणार नव्हता. तथाप‌ि, देशातील नऊ प्रेसमधील कामगार संघटनांनी सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी गोडसे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला होता. प्रेस महामंडळ आणि कामगार यांच्यात दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती. नवी दिल्लीत नुकतीच बैठक झाली. त्यात आयोगासह विविध मुद्द्यांवर यशस्वी चर्चा झाली. त्यानुसार आयोग मिळण्याचा प्रस्ताव बोर्डापुढे आणि नंतर केंद्राच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक एंटरप्राइजकडे जाईल. मंजुरी मिळालेले विषय पुढीलप्रमाणे आहेत. मयत कामगारांच्या वारसांना कामावर घेण्याची पाच टक्क्यांची अट शिथ‌िल करण्यात येणार असून, बोर्डाकडे ही मागणी गेली आहे. मयतांच्या वारसांना नोकरीऐवजी पैसे घ्यायचे असतील तर त्यांना पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम देण्याबाबत व्यवस्थापनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रतिभूती मुद्रणालयात ई-पासपोर्टच्या कामाची गरज बघून अत्याधुनिक मशीन मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तबला चिल्ला’चा आजपासून नाद!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कुसुमाग्रज प्रतिष्ठान व आदिताल तबला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने तबला चिल्ला... अखंड नादसंकीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज, शनिवारी (दि. २८) व रविवारी (दि. २९) सकाळी ९ ते १ व सायंकाळी ५ ते ९ अशा चार सत्रांमध्ये कुसुमाग्रज स्मारकातील स्वगत हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल.

शनिवारी सकाळी ९ वाजता पं. शशिकांत मुळे, पं. बापूसाहेब पटवर्धन, पं. नारायण जोशी, पं. ओंकार गुलवाडी, पं. आनंद बदामीकर, तसेच पं. मुकुंद भाले यांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन होणार आहे.

तबला चिल्ला ही संकल्पना नाशिकमध्ये सर्वप्रथम सुरू झाली ती नोव्हेंबर २०१४ मध्ये. निमित्त होते नाशिकचे ज्येष्ठ तबलावादक पंडित कमलाकर वारे, जागतिक कीर्तीचे तबलावादक आणि आपल्या साथसंगतीने हजारो मैफली गाजवलेले नादसाधक पंडित नाना मुळ्ये, उस्ताद अहमदजान थिरकवा यांचे गंडाबंध शिष्य पंडित नारायण काका जोशी या तीन तबलावादकांच्या पंचाहत्तरीचे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य तबला साधनेत व्यतित केले त्या थोर तबलावादकांना त्यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त नाशिकच्या आदिताल तबला अकादमीने मानवंदना देण्याचे ठरवले आणि तबला चिल्ला या कार्यक्रमाचा उदय झाला. असंख्य तबलावादक स्वतःहून या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी आदिताल तबला अकादमीशी संपर्क करू लागले आहेत. आदिताल तबला अकादमी आणि या कार्यक्रमाला हातभार लावणाऱ्या नाशिककरांचे हे यश आहे.

तबला चिल्लाच्या प्रथम सत्रामध्ये आदिताल तबला अकादमीचे उगवते कलाकार संकेत फुलतानकर व सौरभ ठकार हे तबला सहवादन सादर करणार आहेत. त्यानंतर पं. सुरेश तळवलकर यांचे शिष्य कल्याण पांडे (पुणे) यांचे एकल तबला वादन, पं. जयंत नाईक यांचे शिष्य शौनक राजहंस व नितीन घोलप हे तबला सहवादन सादर करतील. या सत्राचा शेवट पुणे येथील बाल तबला वादक सोहम गोराणे याच्या एकल तबला वादनाने होणार आहे. ज्येष्ठ नादसाधक पंडित नाना मुळ्ये यांना महाराष्ट्र शासनाचा २०१६ कला पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यानिमित्त नाशिककरांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

द्वितीय सत्रात रसिक कुलकर्णी यांचे एकल तबला वादन, निसर्ग देहूकर यांचे तबला वादन, रामेंद्रसिंग सोलंकी यांचे एकल तबला वादन व मुकुंद भाले, खैरागड यांचे एकल तबला वादन होईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ज्येष्ठ गायक अविराज तायडे, प्राचार्य मकरंद हिंगणे व एस. डब्ल्यू. एस.चे रघुवीर अधिकारी यांनी केले आहे.


देशभरातून सहभाग

यावर्षी तबला चिल्ला या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष साजरे होत आहे. फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे, तर भारताच्या इतर राज्यांतूनही अनेक तबलावादक आपली कला सादर करणार आहेत. विशेष म्हणजे यावर्षी वय वर्ष १२-१३ ते वय वर्ष ७५-८० पर्यंतच्या तबला वादकांचा तबला चिल्ला २०१७ या कार्यक्रमात सहभाग आहे. यात नाशिक, मुंबई, पुणे, भोपाळ, खैरागड, सांगली, कोल्हापूर, हैदराबाद, सोलापूर, आणि कोलकाता आदी ठिकाणच्या वादकांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडनेर गटात ‘तिरंगी लढत’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यात सर्वत्र शिवसेनेचे वर्चस्व निर्माण झाल्याचे चित्र तयार होत असले तरी वडनेर गट यास अपवाद म्हणावा लागेल. गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ या गटात हिरे परिवाराचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे हिरेंचा बालेकिल्ला म्हटला जाणारा हा गट ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेकडून कसोशीने प्रयत्न केले जातील. तर तिकडे काँग्रेस व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष याच गटातील असल्याने आघाडीसाठी देखील हा गट जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या वडनेर गटात चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

वडनेर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. त्यामुळे इच्छुक मातब्बरांना गणातून आपले नशीब अजामाण्याची वेळ आली आहे. या गटात वडनेर गण सर्वसाधारण स्त्री तर करंजगव्हाण गण सर्वसाधारण राखीव असल्याने गटातील इच्छुकांची गणातून निवडणूक लढण्यासाठी गर्दी झाली आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हिरे समर्थक असलेले पवन ठाकरे यांच्या पत्नी स्वाती ठाकरे यांचा जनराज्य आघाडीचा उमेदवार म्हणून विजय झाला होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत अद्वय हिरे यांनी पवन ठाकरे यांना कौल दिल्याने त्यांनी भाजपतर्फे दादा भुसे यांच्याशी लढत दिली होती. या गटातील ठाकरे यांचे वर्चस्व व दांडगा जनसंपर्क भाजपसाठी जमेची बाजू आहे. गट आरक्षित झाल्याने त्यांच्या पत्नी स्वाती ठाकरे यांना हिरे घराण्याशी असलेली निष्ठा व मागील विजय लक्षात घेता गणातून भाजपकडून संधी मिळू शकते. गटातून भाजपकडून मांगुलाल सोनवणे, शिवसेनेकडून रवींद्र पवार यांच्यासह सुरेखा ठाकरे, भाऊसाहेब माळी, दावल सोनवणे, मंगलदास सोनवणे, दादा सोनावणे, भाऊराव सोनावणे, दावल माळी यांची नावे चर्चेत आहेत.

गट नाही, गण तर आहे…

गटातील चुरस आरक्षणाने कमी झाली असली तरी वडनेर व करंजगव्हाण गणातून मात्र प्रस्थापितांसह इच्छुकांची गर्दी झाली आहे. त्यामुळे उमेदवार निवड करतांना बंडखोरांना आवरण्याचे आव्हान सर्वच राजकीय पक्षांपुढे असणार आहे. पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने सभापत‌िपदासाठी देखील अनेकांनी वडनेर गटातून जोर लावायला सुरुवात केली आहे. भाजपकडून आशाताई कापडणीस, सेनेकडून कृष्णा ठाकरे यांच्या मातोश्री सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी दिली जावू शकते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुलाबराव चव्हाण हे याच गणातील असल्याने त्यांच्यासाठीदेखील ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यांच्या कुटुंबातील महिलांना संधी मिळू शकते. आघाडीकडून सुनंदा देवरे यांचे नाव चर्चेत आहे. करंजगव्हाण गण सर्वसाधारण आरक्षण असल्याने सोमनाथ वडगे, भगवान मालपुरे, समाधान पवार यांची नावे चर्चेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेसाठी दोन हजार इच्छुक!

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही प्रकारची शासकीय थकबाकी नसल्याचा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी सध्या इच्छुकांची धावपळ सुरू आहे. वेळेत ना हरकत दाखला मिळावा यासाठी इच्छुकांनी महापालिकेत गर्दी केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी ना हरकत दाखला मिळावा यासाठी आतापर्यंत २०१४ इच्छुकांनी महापालिककडे अर्ज केले आहेत. महापालिकेने या ना हरकत दाखल्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला असून, आतापर्यंत १२८० इच्छुकांना ना हरकत दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या जवळपास १४ परवानग्या यामध्ये दिल्या जात आहेत.

निवडणूक लढवण्यासाठी कोणत्याही उमेदवाराकडे शासकीय थकबाकी नसणे आवश्यक असते. शासकीय थकबाकी असताना अर्ज भरल्यास तो फेटाळला जातो. त्यामुळे निवडणुकांसाठी विविध प्रकारचे १४ दाखले आवश्यक असतात. त्यात घरपट्टी, पाणीपट्टी, स्वच्छता कर, अग्निशमन कर, शिक्षण कर या प्रकारच्या दाखल्यांचा समावेश असतो. हा ना हरकत दाखला महापालिकेकडून मिळत असल्याने सध्या महापालिकेला अच्छे दिन आले आहेत. ना हरकत दाखला मिळवण्यासाठी सर्व प्रकारची थकबाकी भरणे आवश्यक असते. त्यामुळे या परवानग्या मिळवण्यासाठी काही जणांकडून करांचा भरणा केला जात आहे. महापालिकेकडे अशा प्रकारचे ना हरकत दाखले मिळविण्यासाठी आतापर्यंत २०१४ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. महापालिकेने यासाठी स्थापलेल्या स्वतंत्र कक्षाद्वारे आतापर्यंत १२८० इच्छुकांना ना हरकत दाखले वितरित केले आहेत. उर्वरित दाखलेही २४ तासांत निकाली काढले जाणार आहेत. हा दाखला मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू असून, महापालिकेत सध्या अशा इच्छुकांचीच गर्दी दिसत आहे.


शौचालयाची डोकेदुखी

निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराला ना हरकत दाखल्यासोबतच घरात शौचालय असल्याचा दाखलाही द्यावा लागत आहे. त्यासाठी घरातील शौचालयासमोरचा फोटो महापालिकेकडे दाखल करून तसा दाखला प्राप्त करून घेण्यासाठीही इच्छुकांची धावपळ सुरू आहे. मात्र, ही अट त्रासदायक असल्याचा सूर विशेषतः महिला इच्छुकांत उमटत आहे. परंतु, निवडणूक लढवायची असेल, तर त्याशिवाय पर्याय नसल्याने महिलांनाही नाईलाजास्तव फोटो काढून दाखला मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मतांच्या मेव्यासाठी करा गोदेची सेवा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदावरीच्या स्वच्छतेसाठी, काँक्रिटीकरण काढून नदी पुनःप्रवाहित करण्यासाठी नाशिकच्या स्थानिक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीत उमेदवारांकडून गोदावरीच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन व्हिडीओ रेकॉर्डिंग करून, सेल्फीद्वारे घेतल्याशिवाय त्यांना मतदान करायचे नाही, असा निर्णय घेण्यात आला. रामकुंड येथे गोदावरी जन्मोत्सवात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘हवा असेल मतांचा मेवा, तर करा गोदावरीची सेवा’ असा नारा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला.

महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, गोदाप्रेमी देवांग जानी, राजेश पंडित, पल्लवी पटवर्धन, सुभाष दसककर, निशिकांत पगारे, हेमा जोशी, डॉ. हेमलता पाटील आदींच्या उपस्थितीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी पुनःप्रवाहित व अविरत निर्मल बनविण्यासाठी गोदा क्रांती घडविण्यासाठी एकत्र आलेल्या स्थानिक कलाकरांनी गोदावरीविषयी भावना व्यक्त केल्या.

चिन्मय उद््गीकर याने गोदावरी स्वच्छतेच्या आश्वासनाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करावे, नेते, अभिनेते आणि गोदाप्रेमींनी सेल्फी काढायची सूचना मांडली. धनश्री क्षीरसागर हिने आपल्या वैभवाचा नाश होऊ देऊ नका, असे आवाहन केले.

देवांग जानी म्हणाले, की गोदावरीच्या काँक्रिटीकरणासंदर्भात न्यायालत याचिका दाखल केलेली आहे. महापालिकेने दोन महिन्यांत याविषयी निर्णय द्यावा, असे न्यायालयाने सांगितले आहे. गोदावरीचे नैसर्गिक स्रोत पुनरुज्जीवित करून गोदेला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे.

सदानंद जोशी म्हणाले, की गोदावरीसंदर्भात मत मांडताना स्थानिक कलाकारांनी कितीही ओरड केली, तरी त्यांची दखल घेतली जात नाही. कालिदास कलामंदिराबाबतही असेच होऊन अभिनेता प्रशांत दामले यांनी येथील समस्यांचे फोटो व्हायरल करताच महापालिकेने दखल घेतली. मतदारांची किंमत निवडणुकीपुरतीच असते. त्यानंतर ते विसरतात. त्यामुळे नुसते आश्वासन नको आश्वासक भूमिका असायला हवी.

..आणि महापौरांचा पारा चढला

सदानंद जोशी यांनी व्यक्त केलेल्या मतावर महापौर अशोक मुर्तडक यांचा पारा चढला. येथे कालिदासविषयी बोलण्याची काय गरज होती असे म्हणत, आम्हीदेखील कलाकार आहोत, हे विसरू नका. आमच्याकडेही प्रसंग बघून वक्तव्य करण्याची कला आहे. थोडे शिकून घेतले, तर तुमच्यासारखे आम्हालाही नाचता येईल. वीस-वीस हजार लोकांच्या पाया पडावे लागते, तेव्हा कुठे निवडणूक जिंकता येते. महापालिकेत ठराव करून कलाकारातून एखादा स्वीकृत नगरसेवक करता येईल का ते बघावे लागेल. गोदेबाबतचा अॅक्शन प्लॅन तयार असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनकेपीएल महाराष्ट्र स्तरावर घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केव्हीएन नाईक शिक्षण संस्था व जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे गेल्या महिन्यात झालेल्या नाशिक कबड्डी प्रीमिअर लीग (एनकेपीएल) स्पर्धा आता महाराष्ट्र स्तरावर घेणार असल्याची माहिती केव्हीएन नाईक संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी शनिवारी जाहीर केले. ही स्पर्धा दरवर्षी डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. एनकेपीएल स्पर्धेतील संघमालकांचा सत्कार सोहळा शनिवारी हॉटेल करी लीव्हमध्ये झाला. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्या संघांच्या मालकांचा सत्कार करण्यात आला. केव्हीएन नाईक संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सचिव हेमंत धात्रक, तानाजी जायभावे, जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आमदार जयंत जाधव, मोहन गायकवाड, प्रकाश बोराडे, भाऊसाहेब जाधव, क्रीडाधिकारी अविनाश टिळे प्रमुख पाहुणे होते. स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला.

एनकेपीएलचा पहिल्या सिझनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या स्पर्धेचा दुसरा सिझनही दिमाखात घेणार असून, त्याची तयारी आतापासूनच सुरू केल्याचे हेमंत धात्रक यांनी सांगितले. जिल्हा कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह प्रशांत भाबड यांनी एनकेपीएलचा प्रवास स्पष्ट केला. जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मोहन गायकवाड यांनी स्पर्धेमागची भूमिका स्पष्ट केली. एनकेपीएलचा समावेश महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या स्पर्धा कार्यक्रमात समाविष्ट झाला असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. आमदार जयंत जाधव यांनी केव्हीएन नाईक संस्थेचे कौतुक केले. संस्थेमुळे स्पर्धा दिमाखात झाल्याचे त्यांनी नमूद केले. केव्हीएन नाईक संस्थेच्या इंजिनीअरिंग कॉलेजच्या सुषमा पुंडे यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी जायभावे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ दिवसांत ८० अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, उत्पादन व वाहतूक टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात कारवाई सुरू केली आहे. भरारी पथकामार्फत छापे टाकण्यात येत असून, मागील १५ दिवसांत तब्बल आठ लाख रुपयांचा मद्य साठा हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी १४६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ८० संशयितांना जेरबंद करण्यात आले आहे.

शहरात महापालिका आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकीचा रंग चढला आहे. स्थानिक निवडणुकीत पैसा आणि मद्याचा महापूर वाहतो, असे चित्र नेहमीच दिसते. पैशांची ताकद वापरत सक्षम उमेदवार निवडून येऊ शकतात. उमेदवारांकडून पैशांप्रमाणेच मद्याचाही वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर अवैध मद्य विक्री, वाहतूक आणि उत्पादन टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक्ससाईज विभागाला सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर मागील १५ दिवसांपासून विभागाने कारवाई सुरू केली. जिल्ह्याभरात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. त्या मार्फत गावागावात छापा सत्र राबवत गावठी दारू अड्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच अवैध मद्यविक्रीस चाप लावला जात असून अन्य राज्यातून येणाऱ्या मद्यावर विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत.

चेकनाक्यावर बंदोबस्त

या काळात गुजरातमार्गे दमण येथून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची ने-आण होते. या प्रकाराला वेळीच पायबंद घालण्यासाठी गुजरातमार्गे राज्यात येणाऱ्या दमण येथील मद्यसाठा रोखण्यासाठी चेकनाक्यांवर २४ तास अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिका बाजाराला वाहनांचा वेढा

$
0
0

महात्मानगर येथील बाजाराची स्थिती; कारवाईची मागणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी उभारलेल्या पालिका बाजारांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली आहे. महात्मानगर पाणी टाकीशेजारील महापालिकेच्या पालिका बाजाराला मात्र नेहमी वाहनांचा वेढा घातलेला असतो. विशेष म्हणजे व्यावसायिक व ग्राहकांपेक्षा बाहेरील वाहनधारकांचीच वाहने येथे पार्क होत असतात. यामुळे महापालिका व पोलिस प्रशासनाने पालिकेबाहेरील वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.

महापालिकेने उभारलेले अनेक पालिका बाजार आजही धूळ खात पडून आहेत. परंतु, महात्मानगरच्या पालिका बाजाराला अनेकांनी पसंती दिल्याने सर्वच गाळे व्यावसायिकांनी घेतले आहेत. त्यातच वेळेवर सर्वच गाळेधारक महापालिकेचा कर भरत असतात. मात्र, पालिका बाजारात गाळेधारकांना वाहन पार्किंगचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिका बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांसाठी पार्किंगची व्यवस्था असताना इतर वाहनधारकच येथे वाहने पार्क करतात.

महात्मानगर येथील एखा खासगी रुग्णालयातील अनेकांची वाहने पालिका बाजारासमोर लागत असल्याने इमारतीला वाहनांनी जणू वेढा घातल्याचे चित्र दररोज दिसते. वाहनांच्या गर्दीतून संबंधित व्यावसायिकांकडे जाण्यासाठी ग्राहकांना मार्ग शोधवा लागतो. पालिका बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांसाठी असलेल्या जागेवर बाहेरील वाहने पार्किंग करणाऱ्या महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. अनेकदा व्यावसायिक व वाहने पार्क करणाऱ्यांमध्ये किरकोळ वादही होत असतात.

महात्मानगरच्या पालिका बाजाराला वाहनांनी वेढा घाललेला रोज पहायला मिळतो. पालिका बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांपेक्षा बाहेरील नागरिकांकडून वाहने सर्रासपणे पार्क केली जात असल्याने मोठी अडचण निर्माण होते. यावर महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.

- राजेंद्र डोमसे, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना संपविण्याचे भाजपचे कारस्थान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

ज्या शिवसेनाप्रमुखांचे बोट धरून २५ वर्षांपूर्वी तुम्ही राज्याच्या राजकारणात आलात त्याच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला संपवण्याचे कटकारस्थान तुम्ही करत असाल, तर यापेक्षा दुसरी कुठलीही मोठी प्रतारणा असू शकत नाही, अशा बोचऱ्या शब्दात राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शनिवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

भाजप बरोबरची युती तोडत आगामी काळात राज्यातील प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि इच्छुक उमेदवारांचा शनिवारी येवल्यातील आसरा लॉन्सवर मेळावा झाला.

दादा भुसे यांनी नोटाबंदीच्या निर्णयासह विविध प्रश्नांना हात घातला. शिवसेनेने माझ्यासारख्या अनेक तळागाळातील माणसांना मोठे केले आहे. अगदी सामन्यातल्या सामान्य माणसाला घडविण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. हे फक्त शिवसेनेतच होऊ शकते. मात्र, शिवसेनेचे ‘प्रॉडक्शन’ असलेल्यांतील काहीजणांची भूक वाढल्याने ते अन्य पक्षात गेले. मात्र शिवसेनेप्रती निष्ठा असलेला शिवसैनिक आजही तळमळीने शिवसेनेत आहे.

२५ वर्षांपूर्वी शिवसेनेचे बोट धरून भाजप राज्याच्या राजकारणात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा लक्षात ठेऊन केंद्रात सत्ता यावी यासाठी कायमच भाजपला मोठेपण दिले. केंद्रात सत्ता आली आणि भाजपच्या डोक्यात हवा गेली. त्यांनी शिवसेनेलाच संपविण्याचा विडा उचलला आहे. यासारखी दुसरी कुठलीही प्रतारणा नाही, अशा शब्दात भुसे यांनी हल्लाबोल केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही उमेदवारीवरून वादविवाद न घालता शिवसेनेला निर्भेळ यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा, असे आवाहन सुहास सामंत यांनी केले. योग्य ठिकाणी योग्य माणसालाच उमेदवारी दिली जाईल. आपापसातील मतभेदाचे जोडे बाहेर काढून सेनेच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन सुहास कांदे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदवीधरचे आमदारच करताहेत जनजागृती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

नाशिक पदवीधर मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी, काँग्रेस-टीडीएफ व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी शनिवारी कळवण तालुक्यातील अभोणा येथील डांग सेवा मंडळाच्या पदवीधर शिक्षकांसह शहर पर‌िसरातील कार्यकर्ते यांची बैठक घेतली. यात त्यांनी पदवीधर मतदानासाठी राबविल्या जाणाऱ्या पसंती क्रमाची उपस्थितांना माह‌िती दिली.

डॉ. सुधीर तांबे यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘या मतदान प्रक्रियेतील उमेदवार सुशिक्षीत आहेत. तरीही मागील पदवीधर निवडणुकीचा अनुभव पाहता सुमारे १० हजार मतदान बाद झाले होते. आपले बहुमोल मत वाया जावू नये यासाठी प्रत्येकाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करायला हवे. मतदान अधिकारी यांनी दिलेल्या पेननेच पसंती क्रम इंग्रजीत टाकावेत. दिलेल्या पसंती क्रमापुढे कोणतेही चिन्ह, कंस करू नये व सर्वच पदवीधर मतदारांनी येत्या तीन फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपला हक्क बजवावा.

यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेले डांग सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आण्णासाहेब मराठे, प्राचार्य आर. बी. चौधरी, उपप्राचार्य प्रशांत कोष्टी, प्रा. किरण सूर्यवंशी, प्रा. जी. डी. रुपवते, प्रा. रोहिदास बोबडे, प्रा. किशोर पवार, प्रा. मीना पवार, प्रा. भास्कर बोरसे, प्रा. दिनेश नेरपगार उपस्थित होते. डॉ. सुधीर तांबे परिसरातील शैक्षणिक संस्थांना भेट दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकला चलो रे... सेना की मनसेचे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लक्ष आता मुंबईकडे लागले आहे. युती तुटल्यानंतर मनसे व शिवसेना एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईतील घडामोडींचा थेट परिणाम नाशिकला होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मनसैनिकांचे लक्ष राज ठाकरे यांच्याकडे लागले असून, महिनाअखेरीस प्रसिद्ध होणाऱ्या पक्षातील उमेदवारांच्या पहिल्या यादीचे स्वरूप नक्की कसे असेल, याविषयी तर्क लढवण्यात येत आहेत.

महापालिका निवडणुकीसाठी आता काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे राजकीय घडामोडींनी वेग पकडला असून, सत्ताधारी मनसे याकडे बारीक लक्ष ठेवून आहे. स्वबळावर लढण्याइतपत पक्षाकडे ताकद नसून, सत्तेची चावी जवळ करण्यासाठी मनसेला दुसऱ्या प्रमुख पक्षासोबत जाण्याशिवाय पर्याय दिसून येत नाही. राज ठाकरे यांनी युती किंवा आघाडीबाबत जाहीर वक्तव्यसुद्धा केले होते. मात्र, शिवसेना व भाजपमध्येच जागावाटपावरून तिढा सुटला नाही. अखेरीस युती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी शिवसेना किंवा भाजपसोबत मनसे घरोबा करण्याची शक्यता आहे. मुंबईत मनसे उमेदवारांना सेना भाजपच्या लढाईचा थेट फायदा घेण्याची शक्यता नसली तरी मतांमध्ये विभागणी करण्याची ताकद मनसेकडे आहे. नाशिकमध्ये भाजपने युती अथवा आघाडीबाबत सुरुवातीपासून नकारघंटा वाजवली आहे. मनसेपुढे शिवसेनेचा पर्याय असला तरी स्थानिक नेते या युतीला तयारी दर्शवतील काय, असा प्रश्न आहे.

मनसेने दोन दिवसांत जवळपास पावणेपाचशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्याचा अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांना सादर झाला असून, ३० किंवा ३१ जानेवारीला पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. या यादीवर मुंबईतील घडामोडींचा नक्की काय परिणाम होतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. पाटील यांचा युवक, उद्योजकांशी संवाद

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांनी शनिवारी संदीप फाऊंडेशन येथील पदवीधर मतदारांशी डॉ. पाटील यांनी चर्चा केली. पाटील यांनी नाशिकमधील डॉक्टर व उद्योजकांच्या भेटींवर भर दिला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात असल्याने प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेसचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनीही गाठीभेठींवर भर दिला असताना डॉ. पाटील यांनी पदवीधर व तरुणांशी संपर्क वाढविला आहे. डॉ. पाटील यांनी संदीप फाऊंडेशनमध्ये विद्यार्थी, प्राध्यापकांशी चर्चा केली.

डॉ. पाटील म्हणाले, देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट आहे. सर्वसामान्यांसह तरुणांना परिवर्तन हवे आहे. युवक परिवर्तनासाठी सज्ज असून शतप्रतिशत भाजपसाठी मतदान करा, निवडून आल्यास पदवीधरांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू, बेरोजगारीचा प्रश्न सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

मतदार जागृत झाला आहे. सर्वसामान्यांसह तरुणांना विकास हवा आहे. प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘मेक इन इंड‌िया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’सारखे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. भाजपला देशात परिवर्तन घडवायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅनॉलरोड हागणदारीमुक्त!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

संपूर्ण हागणदारीमुक्त नाशिकसाठी झोपडपट्टीधारकांचे अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. मात्र नाशिकरोडचा कॅनॉलरोड हागणदारीमुक्तीसाठी प्रशासन आणि नगरसेविका सुनंदा मोरे प्रयत्न करीत असून, त्याला यश मिळत आहे. हा रोड हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

उपनगरनाका ते जेलरोडची पाणीटाकीदरम्यान कॅनॉलरोड आहे. साडेतीन किलोमीटरच्या या रस्त्यावर एका बाजूला आम्रपाली व अन्य झोपडपट्ट्या आहेत. त्यामध्ये सार्वजनिक शौचालयांची सुविधा असली तरी लहान मुले व काही नागरिक रस्त्याच्या कडेला शौचास बसतात. यामुळे दुर्गंधी वाढण्याबरोबरच आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्याचा वापर वाढला

जेलरोडहून नाशिकला जाण्यासाठी कॅनॉलरोड हा जवळचा मार्ग आहे. नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक त्याचा वापर करतात. वेळ व पैसा वाचत असल्याने या मार्गावरून उपनगर, नेहरूनगर, टाकळी आदी भागात जाता येते. उपनगरनाक्यावरून जेलरोडच्या पाण्याच्या टाकीकडे जाताना दिवसा आणि रात्री लहान मुले रस्त्याच्या कडेला शौचास बसलेले असतात. त्यामुळे दुर्गंधी असते.

आरोग्य धोक्यात

कॅनॉलरोडची जागा सरकारी असल्याचे समजते. पूर्वीपासून या जागेकडे दुर्लक्ष केल्याने झोपडपट्टीचे अतिक्रमण झाले आहे. कॅनॉलरोडच्या दुसऱ्या बाजूला मध्यमवर्गियांच्या इमारती झाल्या आहेत. लहान मुले व नागरिक उघड्यावर शौचास बसत असल्याने माशा नागरी वसाहतीत घोंगावतात. रोगराईची भीती वाढली आहे. झोपडपट्ट्यांचे सांडपाणी चर खोदून सोडून देण्यात आले आहे. वाहने जाताना त्यातील पाणी अंगावर उडते. नगरसेवकांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांनाही मर्यादा येत आहेत.

अपघाताची भीती

या मार्गावर झोपडपट्टीधारकांच्या शेळ्या, कोंबड्या मुक्तपणे वावरत असतात. त्यामुळे छोटे-मोठे अपघात होत असतात. एसटी महामंडळाने बस सुरू केली होती. मात्र, अपघात झाल्यानंतर बसचालकाला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे बसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. त्याचा त्रास आता विद्यार्थी आणि नागरिकांना होत आहे.

अभियानाची मदत

विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांनी सांगितले की, स्वच्छ भारत अभियानांतर्गत लाभार्थ्यांना शौचालय बांधणीसाठी एकूण बारा हजाराचे अनुदान दिले जाते. ज्यांच्याकडे स्वतःची जागा आहे, त्यांना शौचालय बांधणीसाठी अनुदान दिले जात आहे. कॅनॉलरोडच्या लाभार्थ्यांचे अर्ज आले असून, त्यांच्या जागेची पाहणी केली जात आहे. कॅनॉलरोडला महापालिकेतर्फे सुलभ शौचालये सुरू केले आहे.

कॅनॉलरोड हागणदारीमुक्तीसाठी प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. मुलांच्या पालकांकडेही आग्रह धरला जात आहे. संपूर्ण हागणदारीमुक्तीसाठी थोडा वेळ लागेल. नागरिकांनी सहकार्य केल्यास हा प्रश्न निकाली निघेल.

- सुनंदा मोरे, नगरसेविका

कॅनॉलरोडवरून नागरिक, नोकरदार, विद्यार्थी यांची ये-जा वाढली आहे. त्यांना व स्थानिकांना येथील अस्वच्छतेचा त्रास होतो. महापालिका प्रशासनाने कॅनालरोडकडे लक्ष देऊन नियमित स्वच्छता राहण्यासाठी काळजी घेतल्यास आरोग्याचा प्रश्न निकाली निघेल. - संजय शिंदे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रात्यक्षिक दाखविताना भरला गेला अर्ज

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची पद्धत आता प्रशासनाचीच डोकेदुखी ठरली आहे. महापालिका निवडणुकांसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देता, देता आता प्रशासनाच्याही नाकीनऊ आले आहे. कर्मचाऱ्यांना डेमो दाखवण्याचा नादात एका अधिकाऱ्यांने थेट अर्जच दाखल केल्याने आता प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

शुक्रवारी शहरातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसतांना प्रभाग क्रमांक २५ मधील हेमंत बिऱ्हाडे यांचा अर्ज बनावट असल्याचे समोर आले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये ऑनलाइनचा डेमो सुरू असतांना हा अर्ज दाखल झाला असून, आता तो सिस्टीम मधून बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुका शुक्रवारपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी अमावस्या असल्याने कोणाचाही अर्ज येणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु प्रभाग क्रमाक २५ मधून हेमंत बिऱ्हाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. परंतु हा अर्ज डेमो दाखवण्याच्या नादातून दाखल झाल्याचे समोर आले आहे.

संबधित अधिकारी हा कर्मचाऱ्यांना ऑनलाइनचे प्रशिक्षण देत असतांना हा अर्ज दाखल झाला. त्यामुळे हा अर्ज एकदा दाखल झाल्यानंतर त्याला सिस्टीम मधून बाहेर काढणे अवघड झाले. विशेष म्हणजे याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी व आयुक्त अभिषेक कृष्णा यांनाही दिली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचीच अडचण वाढली आहे. दरम्यान यात दुरुस्ती करण्याचे आश्वासन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले असून, अर्ज फेटाळण्याच्या दिवशी सिस्टीममधून बाद करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजच्या पाण्याने नागरिक त्रस्त

$
0
0

राणेनगर परिसरातील नागरिकांना त्रास

म. टा. वृत्तसेवा, सिडको

राणेनगर परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना आठ दिवसांपूर्वी ड्रेनेजची लाइन फुटल्याने येथे या परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आचारसंहिता सुरू असल्याने महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून वाहणाऱ्या या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, तातडीने ही समस्या दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

राणेनगर परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी रास्ता खोदत असताना ड्रेनेजची लाइन फुटल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहू लागले. स्थानिक रहिवाशांनी याची तक्रार सिडको विभागीय कार्यालयात केली होती.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न

मात्र, आठ दिवस उलटूनही हे काम करण्यासाठी एकही अधिकारी व कर्मचारी येथे फिरकला नसल्याने नागरिकांना आठवड्याभरापासून दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना अक्षरशः घराचे दरवाजे बंद करून घरातच बसावे लागत आहे. या पाण्यामुळे डासांचे प्रमाणही खूप वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील स्थानिक अबालवृद्धांना विविध आजारांची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष केव्हा जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

निवडणुकीच्या उमेदवारी मिळविण्यापासून विजयश्री मिळविण्याप्रयत्नंच्या गडबडीत असलेल्या एकाही राजकीय नेत्याचे या प्रश्नाकडे लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सामान्य नागरिकांना होणाऱ्या या त्रासाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हे पाणी काढून या ड्रेनेजची सुधारणा करावी, अशी मागणी प्रांजली सरोदे, विद्या जाधव, अर्चना देवरे, सारंग बागुल, अनिता वाघ, पौर्णिमा घोष, अमृता पाटील, मालती बोडके, महेश नेरकर, दत्तात्रय जाधव आदींसह नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतागृहाच्या कामाला मुहूर्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीत व्यापारी बांधव व पर्यटकांची गरज ओळखून देवळाली मर्चंट वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या कामाला अखेर सुरुवात करण्यात आली. यामुळे पर्यटक, व्यापारी व नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

देवळालीतील झेंडा चौकासमोरील नागझिरा नाल्यावर वर्षभरापूर्वी खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, उद्योजक महाराज बिरमानी, तत्कालीन कॅन्टोन्मेन्ट बोर्ड उपाध्यक्ष सचिन ठाकरे आदी मान्यवरांच्या हस्ते या सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा झाला होता. मात्र वर्ष उलटूनही कामास प्रारंभ झाला नव्हता. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने २९ डिसेंबरच्या अंकात स्वच्छतागृहासाठी वेटिंग या शिर्षकाखाली वृत्त प्रसिध्द केले होते. असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश कुसाळकर यांना कामासाठी आवश्यक तितके आर्थिक पाठबळ दानशुरांनी दिले नाही. त्यामुळे काम रखडून असून, येत्या काही दिवसात असोसिएशनची बैठक घेऊन स्व-खर्चातून स्वच्छतागृह उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याचा परिणाम म्हणून देवळाली मर्चंट वेल्फेअर असोसिएशनने हे काम सुरू केले आहे. शहरात येणारे पर्यटक, व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी आता लवकरच हे स्वच्छतागृह पूर्णत्वास जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images