Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

पूर्ववैमनस्य, टोळीयुद्ध, की राजकीय कट!

0
0

पूर्ववैमनस्य, टोळीयुद्ध, की राजकीय कट!


टीम मटा

जेलरोड येथे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सुरेंद्र शेजवळ याचा शुक्रवारी रात्री खून झाल्यानंतर शनिवारीदेखील जेलरोड भागात तणावाची परिस्थिती होती. पोलिस बंदोबस्त असूनही ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती परिसरात दिसून आली. दरम्यान, मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. या खुनामागे पूर्ववैमनस्य, टोळीयुद्ध किंवा राजकीय कट असावा का, अशी चर्चा असून, पूर्ववैमनस्याची प्रकरणे शहर पोलिसांनी रडारवर घेतली आहेत.


नाशिकरोड ः शिवसेनेतर्फे जेलरोडच्या प्रभाग १८ मधून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सुरेंद्र शेजवळ (वय ३२, रा. मगर चाळ, कॅनॉलरोड, जेलरोड) याचा शुक्रवारी रात्री खून झाल्यानंतर शनिवाराही परिसरात तणाव दिसून आला. पोलिसांसह जलद कृती पथकाचा कडेकोट बंदोबस्त असूनही परिसरातील व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान, शेजवळच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस पथके रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेजवळचा मित्र विक्रम पोरजे (२६, जेलरोड) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा आशय असा- पोरजेची आई जेलरोडच्या प्रभाग १८ (क) मधून निवडणुकीस इच्छुक आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेतून शिवसेनेत आलेला शेजवळही याच प्रभागातून पुरुष गटातून इच्छुक होता. हे दोघे शिवसेनेचे नगरसेवक अशोक सातभाई, माजी नगरसेवक सुनील बोराडे आदींसह जेलरोड परिसरात प्रचार करून रात्री साडेआठच्या सुमारास सातभाई यांच्या सैलानीबाबा चौकातील संपर्क कार्यालयात गेले. निवडणुकीबाबत चर्चा झाल्यानंतर शेजवळ आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून (एमएच १५, एफई ३२५२) पोरजेला त्याच्या जेलरोडच्या त्रिवेणी पार्कमधील घरी सोडण्यास गेला.

---

सर्वांसमक्ष हल्ला

त्रिवेणी पार्कच्या कॉलनी रस्त्यावर रात्री सव्वानऊच्या सुमारास हे दोघे आले असता पोरजेला आपल्या घराजवळ मित्र उभे असलेले दिसले. पोरजे गाडीवरून उतरत असतानाच एस्टिम गाडीने मागून येऊन अॅक्टिव्हाला धडक दिली. शेजवळ आणि पोरजे खाली पडले. कारमधून पाच-सहा हल्लेखोर कोयते, चापर घेऊन सुरेंद्रच्या दिशेने धावत आले. पोरजेने घाबरून पलायन केले. शेजवळ धावत असतानाच पडला. त्याच्यावर हल्लेखोरांनी सपासप वार करून त्याचा खून केला. नंतर कारसह ते फरार झाले. शेजवळला प्रथम बिटको आणि नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

---

पाळत ठेवून हत्या

पोरजेने फिर्यादीत म्हटले आहे, की शेजवळवर हल्लेखोरांनी पाळत ठेवली होती. पप्प्या डिग्रसकर व त्याच्यासोबत पिवळा शर्ट घातलेली एक व्यक्ती शेजवळ प्रचार करत असताना त्याच्या पाळतीवर होती. २००७ मध्ये सुरेंद्र शेजवळ व त्याच्या साथीदारांनी डिग्रसकरचा भाऊ पिंट्याचा खून केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या वादातूनच शेजवळचा खून झाला असावा, असा कयास आहे. या खुनातून शेजवळची निर्दोष मुक्तता झाली होती. दरम्यान, नऊ वर्षांपूर्वीच्या घटनेचा डिग्रसकर आता बदला घेईल, असे वाटत नसून यामागे दुसरेच काहीतरी कराण असावे, असे बोलले जात आहे.

---

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तळ

पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, अतुल झेंडे, निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, संजय देशमुख, अशोक भगत, नारायण न्याहळदे आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अंत्यसंस्कारावेळी जेलरोडच्या चौकांत आणि दसकच्या स्मशानभूमीजवळ बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

---

शेजवळवरही गुन्हे

खून झालेल्या सुरेंद्र शेजवळवरही उपनगर पोलिस ठाण्यात सहा-सात गुन्हे दाखल असल्याची माहिती उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, हाणामारी आदी गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. जेलरोडला सहा महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शेजवळची आई मनसेची उमेदवार होती. त्यावेळी प्रचाराच्या वादातून शेजवळने एकावर गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे. शेजवळच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

----

मटा भूमिका


सुरेंद्र शेजवळ या शिवसैनिकाच्या खुनामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीला रक्तरंजित सुरुवात झाली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असला, तरी यामागे राजकीय कट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. खून झालेला व तो करणारे हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याने ही घटना टोळीयुध्दाची म्हणूनही गणता येईल. यातील संशयिताचे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गुंड नगरसेवकाशी सख्य असून, तसे छायाचित्रच फेसबुकवर दिसत असल्याने हा प्रकार पूर्ववैमनस्याचा ठरवून तपासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होता कामा नये. अलीकडे सत्ताधारी पक्षात गुन्हेगारांसाठी पायघड्या टाकल्या जात असून, त्याचा किती भयावह परिणाम होऊ शकतो याचे भान या घटनेच्या निमित्ताने भाजप व शिवसेना यांना आले, तरी तो सुदिन म्हणावा लागेल. सत्तारूढ पक्षांमध्येच महापालिकेच्या सत्तेसाठी चाललेली साठमारी अशी दहशतीच्या अंगाने जाणार असेल, तर ती कठोरपणे मोडून काढायला हवी.

---

पूर्ववैमनस्याची प्रकरणे पोलिसांच्या रडारवर

नाशिकरोड येथे पूर्ववैमनस्यातून सुरेंद्र शेजवळ याचा खून झाल्यानंतर शहर पोलिसांनी अशी प्रकरणे रडारवर घेतली आहेत. अशा गुन्ह्यांमधील संशयित आणि फिर्यादींना पोलिस स्टेशनला आणून व्यवस्थित ‘समज’ देण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेजवळची हत्या झाली असली, तरी यात पूर्ववैमनस्याचा फॅक्टर असल्याचे धिवरे यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी संशयित आरोपी आणि मृत शेजवळ यांच्यात वाद झाला होता. या प्रकरणी दोन्ही पार्टींविरोधात कारवाई करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी शेजवळने संशयित आरोपींपैकी एकाच्या भावाची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यातूनच आता शेजवळची हत्या करण्यात आल्याचे समोर येते आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. याबाबत बोलताना उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सांगितले, की आम्ही प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. त्यात, राजकीय कार्यकर्त्यांचा, तसेच पदाधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. मात्र, आता आता पूर्ववैमनस्य असलेल्या सर्व संशयितांना आम्ही रडारवर घेतले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशननिहाय स्ट्रीट पोलिसिंग सुरू करण्यात येणार आहे. याची सुरुवात आज, शनिवारी सायंकाळी सात वाजता सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबरोबरच हॉटेल-बारची तपासणी, मोकळ्या मैदानांवर, तसेच इतर ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे धिवरे यांनी सांगितले.

प्रभाग १८ वादाचा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असलेल्या शेजवळच्या आईने २०१६ मध्ये महापालिकेची पोटनिवडणूक लढवली होती. त्यावेळी झालेल्या वादातून शेजवळने गोळीबार केल्याचा आरोप झाला होता. आता हा भाग प्रभाग १८ मध्ये समाविष्ट झाला असून, शेजवळने काही काळापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. येथे भाजपमध्ये प्रवेश केलेला पवन पवार हादेखील निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. आर्म्स अॅक्ट, दंगल यांसह इतर गंभीर आरोपांमुळे नाशिक सेंट्रल जेलमधून नुकताच जामिनावर सुटलेला पवन पवार या प्रभागातील विद्यमान नगरसेवक आहे. त्याच्याविरोधात यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

---

दहशत मोडावी लागणार

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहरात ही हत्या झाली आहे. या गुन्ह्याची पार्श्वभूमी पूर्ववैमनस्य असली, तरी लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंडागर्दीचा नवा अध्याय यामुळे लिहिला गेला असून, पोलिसांना हे दहशतीचे वातावरण मोडून काढावे लागणार आहे. शेजवळ खून प्रकरणात काही राजकीय सूत्रधार असतील, तर त्यांना शोधून पोलिसांना मतदारांना आश्वस्त करावे लागणार आहे.

००००

हिंसाचार नको, निवडणूक हवी

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथे सुरेंद्र शेजवळ याचा शुक्रवारी खून झाल्यानंतर नाशिकरोडसह शहरात तीव्र पडसाद उमटले आहेत. महापालिका निवडणुकीतील तीव्र चुरस पाहता हिंसाचार होण्याची भीती नागरिकांना वाटू लागली आहे. आम्हाला हिंसाचार नको तर शांततापूर्ण निवडणूक हवी आहे. सामाजिक शांतता, सलोखा बिघडणार असेल तर निवडणूकच नको, असा सूर उमटत आहे.

सुरेंद्र शेजवळ हा जेलरोडच्या प्रभाग १८ मधून शिवसेनेतर्फे इच्छुक होता. महापालिकेच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीत त्याची आई मनसेतर्फे उमेदवार होती. सुरेंद्रने मनसे सोडून नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रचाराचे काम आटोपून घरी परतत असतानाच जेलरोडवर त्याच्यावर वार करुन हत्या करण्यात आली. निवडणुकीची सुरुवातच हिंसाचाराने झाल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण

सुरेंद्र शेजवळवरदेखील खून, खुनाचा प्रयत्न, गोळीबार याच्यासह सहा गुन्हे उपनगर पोलिस ठाण्यात दाखल आहेत. जेलरोडच्या पोटनिवडणुकीत शेजवळने गोळीबार केला होता, तसेच दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. तो ज्या प्रभाग १८ मधून उभा राहणार होता, तेथील विद्यमान नगरसेवक पवन पवारविरुद्धही खुनासह गंभीर गुन्हे आहेत. नाशिकरोडसह नाशिकमधील अऩेक इच्छुक उमेदवारांवर विविध प्रकारचे आरोप व गुन्हे आहेत, तरी महापालिकेत एकहाती सत्ता मिळवण्याच्या संघर्षातून अशांना उमेदवार दिली जात आहे. त्याची परिणती हिंसाचारात होत असल्याचे जेलरोडच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.

---

हिंसाचाराची भीती का?

यंदाची निवडणूक वेगळी आहे. चार प्रभाग झाले आहेत. मतदारसंख्या चाळीस-पन्नास हजार झाली आहे. घरदार विकून उमेदवारांना लढावे लागणार आहे. त्यामुळे साम-दाम-दंड-भेद-नीतीचा अवलंब करून निवडणूक जिंकण्याची जिद्द त्यांनी ठेवली आहे. त्यातच युती, आघाडी, बंडखोरी आदींवरून सर्वच पक्षांमध्ये असंतोषाचा ज्वालामुखी फुटला आहे. त्याच्या नादात सामाजिक शांताता, सलोखा दावाला लावण्याची तयारी इच्छुकांनी ठेवल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग, पोलिस व प्रशासनाची कसोटी लागली आहे.

---

हिंसाचाराच्या वातावरणात निवडणूक होणार असेल, तर निवडणूक न झालेली बरी. एखाद्याच्या जिवापेक्षा, कुटुंब उघडण्यावर येण्यापेक्षा हार-जीत महत्त्वाची नाही. सर्वच पक्षांच्या उमेदवार, कार्यकर्त्यांनी लोकशाहीचे पावित्र्य पाळून शांततेत निवडणूक होण्याची ग्वाही द्यावी. अन्यथा आर्मी बोलावून निवडणूक घ्यावी.

-किशोर वाघ

---

निवडणुका भयमुक्त वातावरणात झाल्या, तर लोकशाहीचे पावित्र्य टिकेल. ते टिकवण्याची जबाबदारी फक्त पोलिस, प्रशासन आणि राजकीय पक्षांचीच नाही, तर ती उमेदवार आणि नागरिकांचीही आहे. एखाद्या प्रभागात हिंसाचार झाल्यास तेथील निवडणूक सहा महिने स्थगित ठेवून तेथे प्रशासक नेमावा.

-विनोद खरोटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदारयादी अखेर प्रसिद्ध

0
0

मतदारयादी अखेर प्रसिद्ध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी मतदारयादीचा घोळ अखेर मिटला असून, राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर अखेर मतदारयादी रात्री उशिरापर्यंत प्रसिद्ध करण्यात आली आहे. २१ तारखेची डेडलाइन पाळण्यासाठी प्रशासनाकडून सर्व ताकद लावत रात्री उशिरापर्यंत मतदारयाद्यांचे प्रिंटिंग करीत त्या प्रभागांमध्ये लावण्यासाठी धावपळ सुरू होती. दरम्यान, मतदारयादीवर आलेल्या ६८४ हरकतींपैकी ३६६ हरकती या प्रशासनाने फेटाळून लावल्या आहेत, तर २०० हरकती पूर्णतः आणि ९८ हरकती अंशतः मंजूर करण्यात आल्या आहेत. मतदारांच्या अॅड्रेस बदलण्याच्या बहुतांश तक्रारी या फेटाळण्यात आल्याने मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकांसाठी मतदारयाद्या अंतिम करण्यासाठी १२ जानेवारीला प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. १७ जानेवारीपर्यंत या यांद्यावर ६८४ हरकती प्राप्त झाल्या होत्या. यात सर्वाधिक हरकती या मतदारांचे एकगठ्ठा प्रभाग बदलण्यासंदर्भातील होत्या. त्यामुळे प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून त्यावर काम सुरू केले होते. जवळपास ६० हजार मतदारांच्या नावांचा गुंता होऊन, त्यांच्या नावांची अदलाबदल झाली आहे, तसेच काही ठिकाणी एका प्रभागातील एकगठ्ठा मतदार हे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हरकती आल्या होत्या. महापालिकेने या सर्व हरकतींवर अहवाल मागवत त्यांची तपासणी केली. त्यात आता ३६६ हरकती या मतदारांच्या अॅड्रेस बदलण्याच्या होत्या. मतदारांनी स्वतः दर वर्षी मतदारयादी प्रसिद्ध होताना बदललेल्या पत्त्यासाठी अर्ज करणे आवश्यक असते. परंतु, याद्या अंतिम जाहीर केल्यानंतर मतदारांचे अॅड्रेस बदलले जात नाहीत. त्यामुळे या सर्व हरकती फेटाळण्यात आल्या आहेत, तर २०० हरकती मंजूर करण्यात आल्या असून, ९८ हरकती अंशतः मंजूर करण्यात आल्या आहेत.


आयोगाने दिली मंजुरी

हरकतींचा निपटारा झाल्यानंतर दुपारी राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी अंतिम यादी पाठविण्यात आली. सायंकाळी सात वाजेला या यादीला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. त्यानतंतर रात्री उशिरापर्यंत ही यादी प्रसिद्ध करण्याची धावपळ प्रशासनाची सुरू होती. संबंधित यादी स्कॅन करून ती संकेतस्थळावर रात्री उशिरा प्रसिद्ध करण्यात आली आहे. विभागीय कार्यालयांसह प्रभागांमध्ये ही यादी लावण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रशासनाची धावपळ सुरू होती. त्यामुळे आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी भवन अखेर गजबजले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी शहरातील १६ प्रभागांसाठी १३० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या या मुलाखतींसाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यामुळे राष्ट्रवादीचाही आत्मविश्वास बळावला आहे.

गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थित मुलाखती घेतल्या जात होत्या. पण पहिल्यांदाच त्यांच्या अनुपस्थितीत या मुलाखती झाल्या. प्रदेश पातळीवरून कोणतेही मोठे नेते आलेले नव्हते. रविवारीसुद्धा या मुलाखती घेतल्या जाणार असून, त्यानंतर मुलाखती व आघाडीसाठी झालेल्या बोलणीचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे २५ जानेवारीला देण्यात येणार आहे. त्यानंतर यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे राष्ट्रवादीतर्फे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. आमदार जयवंत जाधव, प्रदेश चिटणीस नाना महाले, अर्जन टिळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, महिला आघाडीच्या अध्यक्ष सुनीता निमसे, मनपा विरोधी आघाडीच्या नेत्या कविता कर्डक, अंबादास खैरे, गौरव गोवर्धने, भारत जाधव यांच्या समितीने या मुलाखती घेतल्या.

गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे २० नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवकांनी पक्षातंर केल्यामुळे उर्वरीत नगरसेवक मुलाखती देतील का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पण शनिवारी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवकांनी मुलाखती देत निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली. या मुलाखतील महिला आघाडीच्या प्रमुख व नगरसेविका सुनीता निमसे यांनी मुलाखत दिली नाही. पण त्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होत्या. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळेस आपला बायोडाटा दाखवत मुलाखत देवून तिकीटाची मागणी केली.

सोप्या प्रश्नांवर भर

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या या मुलाखतीत भाजपासारखे कोणतेच खोचक प्रश्न विचारले गेले नाहीत. साध्या सोप्या पद्धतीने या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात निवडणुकीला प्रभागातून कोण बरोबर पाहिजे, पॅनल कसे स्ट्राँग असेल, निवडणुकीची कशी तयारी केली, यासारखे प्रश्न विचारले गेले. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते तुरुंगात असल्यामुळे राष्ट्रवादी कोमात गेली असे बोलले जात होते. पण शनिवारी तिक‌िटासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहादिवशीच ‘त्यांचा’मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय

0
0

कायदेशीर प्रक्रिया करून समाजापुढे ठेवला आदर्श

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील वेदांत मंगल भवनात एक विवाह समारंभ होता. परंतु, या समारंभात अतिशय अचंबित करणारा आगळावेगळा प्रकार घडल्याने त्याची चर्चा संपूर्ण धुळे शहरासह जिल्हाभरात झाली. हा प्रकार म्हणजे हुंडा मागणी, वऱ्हाडाचे रुसवे फुगवे, मानापमान नाट्य असे काहीही नव्हते. तर विवाह मंडपात नवदाम्पत्याने मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय जाहीर केला. तसेच त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तताही केली. नवदाम्पत्याने जाहीर केलेल्या या निर्णयाने सर्वजण अचंबित झाले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदाम्पत्याच्या या डोळस निर्णयाने समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.

सार्वजनिक क्षेत्रात काम करताना माणसाने सामाजिक दृष्टीकोन समोर ठेऊन इतके काम करावे की, ते किर्तीरूपाने सर्वांना परिचित राहावे, अशी अपेक्षा राहते. यामुळे व्यक्तिगत पातळीवर किर्तीरूपी काम करण्यासाठी काहीजण पुढे सरसावले आहेत. असेच सामाजिक काम शहरातील भाग्यश्री टाकणे या तरुणीने पतीसह नेत्रदानाचा संकल्प केला आहे. कारण भाग्यश्रीच्या वडिलांना गेल्या अनेक वर्षांपासून डोळ्यांची समस्या होती. आपले डोळे मरणानंतर कोणाच्यातरी कामात येऊन एखाद्याला दृष्टी मिळेल, असा विश्वास तिला असल्याने नेत्रदान करत असल्याची माहिती भाग्यश्रीने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला आरक्षणाने मातब्बरांचा हिरमोड

0
0

मालेगाव तालुक्यातील पंचायत समितीतील स्थिती

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

जिल्हा परिषद निवडणुकी इतकेच तालुक्यातील पंचायत समितीवर झेंडा कुणाचा फडकेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या १३ वर्षांपासून दादा भुसे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीवर भगवा फडकत आहे. गतवेळी भाजपनेते अद्वय हिरे यांच्या तत्कालीन जनराज्य आघाडीने कडवी झुंज दिली होती. यामुळे यंदा पंचायत समितीवर सत्ता कुणाची? याचीच जास्त चर्चा रंगली आहे.

तालुक्यात एकूण १४ गण आहेत. मागील पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेनेपुढे जनराज्य आघाडीच्या उमेदवारांनी कडवे आव्हान उभे केले होते. पाच जागी विजय मिळवित आश्चर्याचा धक्का दिला होता. मात्र स्पष्ट बहुमत कुणालाच न मिळाल्याने अपक्ष व मनसेच्या एक उमेदवारांची किंमत चांगलीच वाढली होती. मात्र यावेळी समीकरणे बदलली असून, अद्वय हिरेंची जनराज्य आघाडी भाजपात विलीन झाल्याने पक्षाला आयतीच ताकद मिळाली आहे. त्यामुळे जि.प. मधील सेना-भाजपचा सामना इथेदेखील रंगणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने सबुरीने घेत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रस्थापित विस्थापित

आरक्षण सोडतीने सर्वच मातब्बरांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले असून, प्रस्थापितांना आपल्या सौभाग्यवतींना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. महिला आरक्षणाने विद्यमान सभापती भरत पवार, माजी सभापती धर्मराज पवार, यशवंत मानकर यांना फटका बसला आहे. चौदापैकी सात गण महिला आरक्षित झाले आहेत. सभापतिपदाचे आरक्षणदेखील सर्वसाधारण स्त्री राखीव झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण स्त्री राखीव असलेल्या वडनेर, झोडगे, सौंदाणे या गणातील निवडणूक जिल्हा परिषद गटापेक्षा अधिक लक्षवेधी ठरणार आहे. करंजगव्हाण, पाटणे, निमगाव गण सर्वसाधारण आरक्षित असल्याने येथेदेखील चुरस वाढली आहे. रावळगाव, दाभाडी, कळवाडी गण अन्य संवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

सभापती भरत पवार हे शिवसेनेचा गड असलेल्या सौंदाणे गणातून आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात. झोडगे गणात माजी सभापती धर्मराज पवार यांनादेखील आरक्षणाचा फटका बसला असून, शिवसेना तालुकाउपप्रमुख नथू देसले यांच्या पत्नी रंजना देसले याच सेनेच्या उमेदवार असतील हे निश्चित आहे.

पक्षीय बलाबल

शिवसेना ७, जनराज्य आघाडी ५, मनसे १, अपक्ष १, एकूण १४

पंचायत समिती गण आरक्षण

वडनेर - सर्वसाधारण स्त्री, करंजगव्हाण - सर्वसाधारण, डोंगराळे - अनुसूचित जमाती स्त्री, झोडगे - सर्वसाधारण स्त्री, कळवाडी - अनुसूचित जाती, चिखलओहाळ - नामाप्र स्त्री, वडेल - नामाप्र, रावळगाव - अनुसूचित जमाती, दाभाडी - अनुसूचित जमाती स्त्री, पाटणे - सर्वसाधारण, चंदनपुरी - नामाप्र स्त्री, निमगाव - सर्वसाधारण, सौंदाणे - सर्वसाधारण स्त्री, जळगाव (नि) - नामाप्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला चांदवडचा गड भक्कम करण्याची संधी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवडमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक वातावरणाचा ज्वर सर्वदूर पोहोचला आहे. दोन्ही निवडणुका राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनला असून, निवडणूक जिंकण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांमध्ये कमालीची चुरस असल्याचे दिसून येत आहे. चांदवड जिल्हा परिषदेतील चार गट व पंचायत समितीतील आठ गण यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी असून, यंदाच्या निवडणुकीत प्रस्थापितांसह नव्या चेहऱ्याची ही रेलचेल असेल असे चित्र आहे. भाजप गट व गणातही बाजी मारणार का? याकडे लक्ष लागले आहे.

चांदवड पालिकेत भाजपचे भूषण कासलीवाल हे सध्या नगराध्यक्ष असून, आमदार राहुल आहेर व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यामुळे चांदवड शहर-ग्रामीण भागात भाजपचा बोलबाला असल्याचे बोलले जाते. मात्र नोटबंदी निर्णयाचा फटका तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असल्याची भावना आणि विरोधी पक्ष या गोष्टीचे भांडवल करणार आहे. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप बॅकफूटला जाईल असे विरोधक म्हणत असताना भाजपने मात्र शिवसेनेबरोबर युती करण्याची मानसिकता दाखवत चर्चा सुरू केली आहे. दुसरीकडे शिवसेनेनेदेखील वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू ढकलून पक्षश्रेष्ठी सांगतील तरच युती अन्यथा स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. युती झाल्यास सेना-भाजप दोघांनाही फायदा होईल. येत्या काही दिवसात सेना-भाजप यांच्यात चर्चेच्या फैरी झडणार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शक्य

गेली निवडणूक स्वतंत्र लढवून राष्ट्रवादीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. मात्र आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व्हावी, असे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडीची बोलणी सुरू आहे. आघाडी झाल्यास सेना-भाजपला शह बसेल, अशी मानसिकता आहे. गेली निवडणूक राष्ट्रवादीने स्वतंत्र लढून आपले आस्तित्व सिद्ध केले. मात्र सध्या राष्ट्रवादी व काँग्रेसने आघाडीचे प्रयत्न सुरू केले आहेत, असे काँग्रेस नेते माजी आमदार शिरीष कोतवाल व राष्ट्रवादीचे नेते प्रदीप गायकवाड यांचे म्हणणे आहे. चांदवड तालुक्यात मनसे, बसपसुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समदं ठीक, पण नेताच नाही भानावर!

0
0

संदीप देशपांडे, मनमाड

पंचायत समितीची निवडणूक ग्रामीण भागात प्रतिष्ठेची आणि उत्सुकतेची बाब असते. बाजारात एकमेकांना भेटणारे तर निवडणुकीविषयी हमखास बोलणार हे ठरलेलेच. मनमाडच्या आठवडे बाजारात दोन शेतकरी एकमेकांना भेटले आणि हॉटेलमध्ये जाऊन चहा पिताना त्यांच्यात गरमागरम चर्चा रंगल्या.

एका शेतकऱ्याने दुसऱ्याला विचारले, की तुमच्या गणात काय आहे भाऊ परिस्थिती? त्यावर तो तत्काळ म्हणाला, दादा नेता सोडून समदं ठिकाणावर आहे. आपला नेताच भानावर नाही आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात. यावर पहिला शेतकरी म्हणाला, मागच्या निवडणुकीत आमचा नेता म्हणला होता, निवडून आलो की रस्ते बदलेल, तुमचं जीवनमान बदलेल, कांद्याचा भाव बदलेल, भावा त्याने आपले काहीच बदलले नाही स्वतः पक्ष मात्र बदलला. आता या टायमाला आम्हीच त्याला बदलणार आणि ही बदलाबदली ऐकून ऐकणाऱ्या लोकांनाही हसू फुटले.

...अन् मावशी भडकली

बाजारात भाजी विकायला आलेल्या एका महिलेला त्यांच्या गणातील एका इच्छुक उमेदवाराने गाठले. मावशी लक्ष असू द्या, अशी हात जोडून गळ घातली. त्याने हात जोडलेले पाहून ती मावशी एकदम भडकली ना राव... ताडकन त्याच्याजवळ जाऊन ती त्याला म्हणाली, आता आला व्हय. आमचे कांदे फेकून द्यायची वेळ आली तेव्हा तुम्ही हात बांधून फिदी फिदी हसत होता. पाच वर्षे आणि आता आला हात जोडून मत मागायला. आता या निवडणुकीत आमच्या गावचे लोक तुमचा कसा वांदा करता बघच. भडकलेल्या मावशीला पाहून तो बाजाराच्या गर्दीत दिसेनासा झाला.

तिकीट काढना भाऊ

मनमाड-नांदगाव बसमध्ये घडलेला हा किस्सा. बस मनमाडहून निघाली. या बसमध्ये पंचायत समिती निवडणूक लढवू इच्छिणारा एक इच्छुकपण होता. त तो दोन ते तीन गावकऱ्यांना म्हणाला, या टायमाला आपल्याला मत द्यायचं आणि तुमच्यासाठी काय करायचं ते सांगून टाकायचं. यावर एक गृहस्थ म्हणाले, उद्याच उद्या पाहू, आता आज आमचं एसटीचे तिकीट काढ भाऊ. आणि हे ऐकून त्याचा चेहरा गोरामोरा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनी मंत्रालयासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

0
0


भुजबळांच्या बालेकिल्ल्याकडे सर्वांचेच लक्ष

म. टा. वृत्तसेवा, येवला

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या बहुचर्चित मतदारसंघात आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठी इच्छुकांच्या भाऊगर्दीने गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. गतवेळेपर्यंत तालुक्याच्या गट अन् गणाच्या राजकारणाच्या नाड्या हातात ठेवणाऱ्या भुजबळांच्या अनुपस्थितीत या निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष आहे. आता उर्वरित नेत्यांच्या व्यूहरचना राजकारणाचे कुठली नवी समीकरणे मांडतात, हा चर्चेचा विषय बनला आहे.

येवला तालुक्यातील पाच गट आणि दहा गणांसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. यासाठी आगामी दहा दिवस महत्त्वाचे ठरणार असल्याने इच्छुकांच्या आकांक्षेला धुमारे फुटताहेत. उमेदवारीची माळ आपल्याच गळ्यात पडावी, यासाठी प्रत्येक पक्षातील इच्छुकांनी तिकीट वाटपाचे धागेदोरे हाती असलेल्या नेत्यांची दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे. इच्छुकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केल्याने तिकिटाच्या या भाऊगर्दीत तालुक्यातील नेते मंडळींसह पक्षश्रेष्ठींची देखील मोठी कसोटी लागणार आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागात १२३ गावे आहेत. या गावांचा समावेश असलेले जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समितीचे दहा गण अन् त्यांचे एकूण जवळपास दीड लाख मतदार यातून आगामी महिनाभरात रंगणाऱ्या निवडणूक राजकीय संग्रामाकडे उभ्या तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या फडात उडी घेण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. गट-गणातील इच्छुकांनी आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांनी आपल्या गट तसेच गणातील संपर्क वाढवितानाच उमेदवारी आपल्याला मिळावी, यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत.

चर्चांचे रंगताहेत फड

राजकीय नेतेमंडळी अन् इच्छुकांच्या बैठका एका बाजुला जमू लागतानाच, दुसऱ्या बाजुला गावोगावच्या पारांवरदेखील कुठल्या गणात कुठल्या पक्षाकडून नेमका कोण उमेदवार असणार आणि नेमका कुणात सामना होणार, या चर्चांचे फड रंगू लागले आहेत. तालुक्यातील पक्षीय वातावरणनिर्मिती लक्षात घेतली, तर मुख्य मुकाबला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणार आहे. त्यांच्याकडे इच्छुकांची उमेदवारीसाठी दारे ठोठावण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुठं नेऊन ठेवलंय नाशिक?

0
0

कुठं नेऊन ठेवलंय नाशिक?

इलेक्शन हळूहळू रंगात येऊ लागलं होतं... कमळवाल्यांच्या मुलाखती आटोपल्यानंतर आता इतर सगळ्याच पार्टीवाल्यांच्या मुलाखतींचा बार उडणार होता... पण, त्याआधीच पॅनलमधील उमेदवार जवळपास फिक्स झाल्यानं अनेकांची घालमेल वाढू लागली होती... मुलाखती निव्वळ सोपस्कार असल्याची जाणीव एव्हाना सगळ्यांनाच झाली होती... तिकिटासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी काहींनी केली होती... रायबा-सायबा दिवसागणिक वेगवेगळ्या उमेदवारांसोबत दिसू लागले होते... पण, शहरात झालेल्या इच्छुकाच्या मर्डरने ते चांगलेच हादरले होते...

रायबा : अरं, मी एवढं डेंजर इलेक्शन कधीच पाहिलं नव्हतं... अजून इलेक्शन सुरू कुठं झालं नाहीतर मुडदे पडायला लागलेत... लई वाईट घडतंय बघ... अरं कुठं नेऊन ठेवलंय नाशिक माझं?

सायबा : होय होय.. आता कुठं क्राइम कमी झाला होता राव... आता तो पुन्हा वाढणार... एकाचा मुडदा पडला म्हणजे दुसऱ्याचासुद्धा पडणार... टोळीयुद्ध रंगणार... अजून कुणाला तरी टार्गेट केलं जाणार!

रायबा : यंदाच्या इलेक्शनला लई मोठं गालबोट लागलंय राव... पुढाऱ्यांना त्याच्याशी काही घेणं-देणं नाही राव... त्यांना फक्त सत्तेशी मतलब... मग कुणाचा मुडदा पडो, नाहीतर आणखी काही होवो...

सायबा : प्रत्येक पार्टीत भांडण वाढलीत... आयाराम-गयाराम, निष्ठावंत अन् परका असा वाद प्रत्येक पार्टीत रंगू लागलाय... कुठं आयारामांच्या, तर कुठं निष्ठावंतांच्या बैठकांचा रतीब लागलाय... शिव्यांची लाखोलीही वाहिली जातेय... सत्तेसाठी कुणी काही बी करायला तयार आहे...

रायबा : इलेक्शन म्हणजे सज्जन माणसाचं काम राहिलंच नाही राव... तुमच्या दंडात अन् खिशातही बळ असंल तरंच निवडणूक लढवायची... नाहीतर गुपचूप घरात बसायचं, अशी अवस्था झालीय...

सायबा : त्ये राजकारणाचं पतन काय म्हणतात ना, त्ये झालंय... पैसे वाटण्यापर्यंत एकवेळ ठीक होतं... पण, आता एकदम खून, हाणामाऱ्या व्हायला लागल्यात... पुढच्या महिन्याभरात अजून काय काय पाहावं लागणार देव जाणे...

(सायबाची बडबड सुरू असताना रायबा काही तरी विचार करू लागला होता. सायबाचा पतन हा शब्द त्याच्या जिव्हारी लागला होता. कुठं नेऊन ठेवलंय नाशिक, या त्याच्याच शब्दांनी त्याच्या डोक्यात गारुड केलं होतं... आपण आता राजकारणात थांबायचाच नाही... एकदम संन्यास घेऊन टाकायचा... ह्ये आपलं काम नाही... वर्कर म्हणूनही काम करायचं नाही, हा विचार त्यानं पक्का केला होता.. दररोज राजकारणातल्या गमतीजमती बोलून दाखवणारा हा माणूस आज एकदम धीरगंभीर झाला होता...)

- संपत थेटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चॅनल बदलण्यावरून कैद्यांमध्ये हाणामारी

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या दोन न्यायबंद्यांमध्ये रेड‌िओ चॅनल बदलण्याच्या किरकोळ कारणावरुन झालेल्या शाब्दिक बाचाबाचीनंतर जोरदार हाणामारी झाल्याची घटना शनिवारी घडली. त्यांची हाणामारी सोडविण्यास गेलेल्या कारागृह सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही या न्यायबंद्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.

सुरक्षा कर्मचारी बिसमिल्ला शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीवरुन नाशिकरोड कारागृहात हाणामारी करणारे न्यायबंदी साकीर नासीर पठाण उर्फ मोठा पठाण, समीर नासीर पठाण व प्रणव तुकाराम बोरसे यांच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिसमिल्ला शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीनुसार खुल्या असलेल्या न्यायबंद्यांपैकी साकीर पठाण याने तेथे असलेल्या रेडिओचे चॅनल वारंवार बदलले. त्यानंतर प्रणव बोरसे या नायबंद्यानेही त्याला हवे असलेले रेडिओ चॅनलसाठी वारंवार रेड‌िओ चॅनल बदलले. याचा राग आल्याने साकिर पठाण याने प्रणव बोरसे यास मारहाण केली. यावेळी बिसमिल्ला शब्बीर तडवी व ड्युटीवर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही हाणामारी सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यानंतर समीर नासिर पठाण यानेही प्रणव बोरसे याच्यावर हल्ला केला. यावेळी ही हाणामारी सोडविण्यास गेलेले बिसमिल्ला शब्बीर तडवी व महेंद्र भीकन पगारे आदी सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही साकिर नासीर पठाण व समीर नासीर पठाण या दोघा न्यायबंद्यांनी हल्ला करुन त्यांना जखमी केले. यानंतर उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आपल्याकडील वॉकी-टॉकीवरुन वरिष्ठ तुरुंगअधिकाऱ्यांना या हल्ल्याची माहिती दिली. तुरुंगाधिकाऱ्यांनी या हाणामारीच्या ठिकाणी धाव घेत हाणामारी सोडवली व न्यायबंद्यांना त्यांच्या विभागात बंद करण्यात आले.

हल्ल्याची महिनाभरात दुसरी घटना

नाशिकरोड कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेची लक्तरे गेल्या महिन्यातच वेशीवर टांगली गेली होती. त्याचा फटका तीन तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबनाच्या स्वरुपात बसला होता. गेल्या २४ डिसेंबरलाही मोक्का प्रकरणातील कैदी वेन्स‌िल रॉय मिरिंडा उर्फ मॉण्टी याने मोबाइल फोनची झडती व चौकशी प्रकरणावरुन तुरुंगाधिकारी प्रदीपकुमार बाबर यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात थेट हल्ला करुन त्यांना जखमी केल्याची घटना घडली होती. या घटनेला अद्याप महिनाही पूर्ण होत नाही तोच पठाण टोळीने कारागृह सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करुन त्यांना धमकी दिल्याची दुसरी घटना घडली आहे. या घटनांवरुन नाशिकरोड कारागृहात कैद्यांच्या टोळीयुद्धाचा धोका असल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

​ प्रशासनाची हलगर्जी ‘जिवावर’

0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड, जेलरोड, उपनगर परिसरातील अनेक ठिकाणचे पथदीप बंद असल्याने टवाळखोर चांगलेच सोकावले आहेत. जेलरोडला सुरेंद्र शेजवळ या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवाराचा खून झाला त्या परिसरातील पथदीपदेखील बंद होते, असे नागरिकांनी सांगितले. बंद पथदीपांमुळे अंधाराचा फायदा चेन स्नॅचिंग व अन्य गुन्हे करण्यासह आता एखाद्याला जीवनातून संपवण्यासाठीदेखील घेतला जात असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. त्यामुळे बंद पथदीपांचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

जेलरोडच्या त्रिवेणी पार्क येथे शेजवळ याचा खून झाला, तेव्हा तेथील पथदीप बंद होते, तर काही पथदीप झाडांच्या फांद्यांनी झाकले गेले होते. त्याचाच फायदा हल्लेखोरांनी घेतला. येथील पथदीप सुरू असते, तर हल्लेखोरांना ओळखणे व प्रतिबंध करणे शक्य झाले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अशी दुर्घटना, अपघात होण्याआधी बंद पथदीप सुरू करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. महापालिकने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

पथदीपांची बंडखोरी

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात बंद पथदीपांबद्दल अनेकदा तक्रारी करूनही कार्यवाही होत नाही, असा नागरिकांचा अनुभव आहे. कारण, पथदीपांचे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसते, असे समजते. वेळेत दवापाणी मिळत नसल्याने मुख्य रस्त्यांबरोबरच गल्लीबोळ, कॉलनी रस्त्यांवरील पथदीपही इच्छुक उमेदवारांप्रमाणे बंडखोरी करू लागले आहेत. ते कधी बंद पडतात, तर कधी सुरू असतात. काही पथदीपांमध्ये पक्ष्यांनी घरटी केली आहेत. बंद पथदीपांचा गैरफायदा टवाळखोर, समाजकंटक उचलत आहेत.

घराबाहेर पडणे अवघड

जय भवानीरोड, जेलरोडचे कॉलनी रस्ते, उपनगर, टाकळीरोड येथील पथदीप अनेकदा बंद असतात. चेन स्नॅचर्स हे हेरून महिलांचे मंगळसूत्र, युवतींची सोन्याची चेन ओरबाडून पलायन करीत आहेत. जुन्या वैमनस्यातून हल्ले करणारे जेथे पथदीप बंद आहेत, तेथील जागा हल्ल्यासाठी निवडत आहेत. मुलींचे छेड काढणारेही अशाच जागांवर उभे असतात. त्यामुळे पहाटे व सायंकाळी क्लासला जाणाऱ्या विद्यार्थिनी आणि सायंकाळी भाजीपाला व फिरायला जाणाऱ्या महिलावर्गाला घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

येथील पथदीप बंद

जय भवानीरोडवरील औटे मळा व आर्टिलरी सेंटररोड येथे वर्षभरापासून असंख्य पथदीप बंद आहेत. लवटेनगर, वास्तू पार्क, भालेराव मळा भाग, रोकडोबावाडी, आनंदनगर, सिन्नर फाटा, स्टेशनवाडी परिसर, एकलहरेरोड, देवळालीगाव, विहितगाव, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल, बिटको ते फेम थिएटर, जेलरोड, पवारवाडी, उपनगर, टाकळीरोड, नेहरूनगर, देवी चौक, जत्रा परिसरातील असंख्य पथदीप अधूनमधून बंद असतात. वरील परिसरातील अनेक कॉलन्यांमधील पथदीप फांद्यांनी झाकले गेले आहेत. या फांद्यांची छाटणी करणेही गरजेचे आहे.

साईराज फ्रेंड सर्कलतर्फे महापालिकेकडे पथदीप सुरू करण्यासाठी अनेकदा निवेदने दिली. परंतु, आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही. आणखी गुन्हेगारीच्या घटना घडल्यानंतरच महापालिका जागी होणार का?

-प्रतीक आढाव

झाडे असल्याने पथदीप टाकता येत नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. नवीन पोल टाकू असे आश्वासन आम्हाला मिळते. मात्र, कोणतीच कृती होत नाही. बंद पथदीपांमुळे ज्येष्ठ नागरिक, महिलांना फिरायला जाण्याची भीती वाटते. महापालिकेने त्वरित कार्यवाही करावी.

-अमोल नाकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेजवळ खूनप्रकरण गुन्हे शाखेकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
जेलरोड येथील सुरेंद्र शेजवळ याच्या खूनप्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडे वर्ग झाला आहे. एका संशयिताला चौकशीसाठी बोलावले असून त्याच्याकडे सखोल चौकशी केली जात असल्याचे नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पी. आ. ढोकणे यांनी सांगितले.
शिवसेनेतर्फे जेलरोडच्या प्रभाग १८ मधून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेला उमेदवार सुरेंद्र शेजवळचा दोन दिवसांपूर्वी जेलरोडला खून झाला होता. पाच-सहा जणांनी कोयते, चॉपरसारख्या शस्त्रांनी त्याची रात्री सव्वानऊच्या सुमारास सर्वांसमक्ष निघृण हत्या केली होती. राजकीय संदर्भ असल्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. नाशिकरोड पोलिसांनी हत्या झालेल्या त्रिवेणी पार्कमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, सीसीटीव्ही सायंकाळी ४ ते १० बंद असल्याचे दुकानदाराने सांगितल्याने पोलिसांची निराशा झाली. परंतु, या संगणकाची हार्ड डिस्क पोलिस ताब्यात घेणार आहेत. सीसीटीव्ही फूटेज मिळाले असते तर फार मोठा पुरावा पोलिसांना मिळाला असता आणि हल्लेखोरांची ओळख पटली असती. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. फिर्यादीने काही जणांनी शेजवळवर पाळत ठेवल्याचे सांगितल्याने पोलिसांनी एका संशयिताला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली. हा खून राजकीय वादातून झाला की जुन्या वैमनस्यातून झाला हे स्पष्ट झाल्यावर पोलिसांना तपासाची दिशा ठरविता येणार आहे. पोलिस सर्व शक्यता पडताळून तपास करत आहेत. पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. काही दिवसांतच ठोस पुरावा व माहिती हाती लागेल, असा विश्वास पोलिस सूत्रांनी व्यक्त केला.

तीन पथके रवाना

सिन्नर फाटा ः या खुनाच्या घटनेमुळे जेलरोड परिसरात रविवारी तिसऱ्या दिवशीही भयग्रस्त वातावरण होते. खुन्यास शोधण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके तपासाकामी रवाना झाली आहेत. यातील एक पथक अहमदनगर, दुसरे मालेगाव तर तिसरे नाशिक येथे तपास करीत आहे. मृत सुरेंद्र शेजवळ याच्यावरील खुनी हल्याची फिर्याद नाशिकरोड पोलिस स्टेशनला देणाऱ्या विक्रम पोरजेच्या फिर्यादीनुसार या खुनाच्या गुन्ह्यात पप्प्या डिग्रसकर हाच मुख्य संशयित असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक सिग्नल्सचे ‘अर्धशतक’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी लवकरच नवीन ११ सिग्नल्स कार्यान्व‌ित होतील. शहरातील ४२ सिग्नल्समध्ये नवीन ११ ट्रॅफिक सिग्नल्सची भर पडणार असून, सिग्नल्सचा आकडा ५३ च्या घरात पोहचणार आहे.
शहराच्या सर्वच भागांत वाहतूक कोंडी व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या समस्या आ वासून उभ्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शहर वाहतूक पोलिसांनी नवीन २१ ठिकाणी सिग्नल्स बसवण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाला सादर केला होता. २१ पैकी ११ ट्रॅफिक सिग्नल्स उभारण्यासाठी प्रशासनाने आचारसंहिता लागण्यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली. महापालिका निवडणूक संपल्यानंतर सदर सिग्नल्स बसवण्याच्या कामास सुरुवात होईल. याबाबत वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले की, शहरातील २१ ठिकाणांची निवड करण्यात आली होती. चौकांचा भाग, वाहनांची वर्दळ तसेच अपघातांची संख्या आदीचा विचार करून हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी ११ सिग्नल्स बसवण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हे सिग्नल्स कोठे बसवायाचे हे ठरवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल. २१ ठिकाणांपैकी अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी सिग्नल्स बसवण्यात येतील, असे बजबळे यांनी स्पष्ट केले. शहरात आजमितीस ४२ सिग्नल्स कार्यन्वित असून, नवीन सिग्नल्सची भर पडल्याने हा आकडा ५३ पर्यंत पोहचणार आहे. वाहतुकीच्या शिस्तीसाठी सिग्नल्स आवश्यक असल्याचे बजबळे यांनी सांगितले.

अतिक्रमणांचा फटका

दरम्यान, सिग्नल्स सुरू झाल्यानंतर त्या रस्त्यावरील अतिक्रमण कळीचा मुद्दा ठरतो आहे. उंटवाडी सिग्नलमुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागला. मात्र, संभाजी चौकातून सिडकोकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी सिग्नलला खेटूनच अतिक्रमणधारकांनी रस्त्यावर कब्जा केला आहे. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. अनेकदा गोविंदनगरकडे टर्न घेणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल सुटेपर्यंत लेफ्ट टर्न मोकळा मिळतच नाही. सिग्नलची संख्या वाढवताना प्रशासनाने याचीही काळजी घ्यावी.

यापैकी ११ ठिकाणी बसणार सिग्नल
हॉलमार्क चौक (बीवायके कॉलेजजवळ) कॉलेजरोड, हॉटेल सिबलजवळ (त्र्यंबकरोड), पवननगर सिडको, पाण्याची टाकी चौक (जेलरोड), जेहान सर्कल (गंगापूर रोड), बिग बाजार (कॉलेज रोड), महिंद्रा सर्कल (सातपूर), पाइपलाइन चौफुली (आनंदवली), निर्मला कॉन्व्हेंट (डिकेनगर), एचडीएफसी सर्कल, एबीबी सर्कल, मायको सर्कल, पपया नर्सरी (त्र्यंबकरोड), जयशंकर गार्डन (टाकळी रोड), मुंबई नाका (मुंबई-आग्रारोड), प्रसाद सर्कल (गंगापूररोड), पारिजातनगर, सारडा सर्कल, मॉडेल चौक, बिग बाजार चौक (नाशिकरोड), मॅरेथॉन चौक (गंगापूर रोड).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचआयव्ही’ हीच आमची जात!

0
0

‘एचआयव्ही’ हीच आमची जात!

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

वधू कुठल्याही जातिधर्माची असली तरी चालेल, फक्त ती समजूतदार असायला हवी. तिने मला व कुटुंबाला व्यवस्थित सांभाळावे. ‘एचआयव्ही’ हाच आमचा धर्म आणि जात बनल्याची भावना वधू-वर मेळाव्यासाठी आलेल्या विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी रविवारी व्यक्त केली. अन्य वधू-वर मेळाव्यांपेक्षा काहीसा वेगळा वधू-वर मेळावा नाशिकमध्ये भरला होता.

विवाह सोहळ्यांचा काळ जवळ येऊ लागतो तसे विविध समाजांच्या वतीने वधू-वर मेळाव्यांचे आयोजन केले जाते. परंतु, नाशकात गेल्या आठ वर्षांपासून ‘एचआयव्ही’ग्रस्तांसाठी अशा मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. यंदा या मेळाव्यात ३५० विवाहेच्छुकांनी हजेरी लावली. नंदुरबार, सोलापूर, बुलडाणा, जालन्यासह राज्यातील बहुतांश भागातून असे विवाहेच्छुक आले होते. प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला आयुष्याची वाट चालण्यासाठी हक्काचा जोडीदार हवा असतो. एचआयव्ही सहजीवन जगणारेही त्यास अपवाद नाहीत. म्हणूनच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लिमिटेड, यश फाउंडेशन, नेटवर्क ऑफ पॉझिटिव्ह पीपल आणि चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्या सयुंक्त विद्यमाने गंजमाळ येथील रोटरी क्लब सभागृहात मंगल मैत्री मेळावा घेण्यात आला. महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे उपाध्यक्ष हिरामण आहेर, कर्नल सी. एन. बॅनर्जी, जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक गांगुर्डे, जिल्हा प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी, संगीता पवार आणि यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात राज्यभरातील ३२१ वधू-वरांसह ५५० नागरिक व बालके उपस्थित होती. यावेळी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण मार्गदर्शन, सरकारी योजनांची माहिती, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. महिला व बालकांसाठी आनंद मेळावा घेण्यात आला. चंदा थेटे यांनी सूत्रसंचालन केले.


खचू नका, हिंमत ठेवा!

गेल्या आठ वर्षांत अशा मेळाव्यांच्या मदतीने २७ जोडप्यांचे विवाह जुळविण्यात आल्याची माहिती यश फाउंडेशनचे रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. मागील वर्षाच्या मेळाव्यात सहभागी झालेल्या ज्या वधू-वरांचे विवाह झाले, अशा चार जोडप्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ‘एचआयव्ही’मूळे खचून न जाता हिमतीने आयुष्याचा स्वीकार करा, असा संदेश या जोडप्यांनी मनोगतातून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोंगे विक्रेत्याचा मुलगा बनला संशोधक सहाय्यक

0
0

लखन सावंत, कॉलेज क्लब रिपोर्टर

सटाणा तालुक्यातील नामपूरसारख्या ग्रामीण भागात कधी भटकंती करत वडिलांच्या पोंगे विक्री व्यवसायाला हातभार लावत तर कधी शिक्षणासोबत पार्ट टाइम नोकरी करत येथील एका तरुणाने जिद्दीने ध्येय गाठले आहे. नामपूर येथील एका पोंगे विक्रेत्याच्या मुलाची संशोधन सहाय्यकपदी निवड झाल्याने परिसरात तो कौतुकाचा विषय ठरला आहे.

मनोहर कारभारी नेरकर या विद्यार्थ्याने हे यश मिळविले. वडिलांचा पोंगे विक्रीचा व्यवसाय. दिवसभर खेडोपाडी पोंगे विकून घराचा उदरनिर्वाह भागवायचा. अशा आव्हानात्मक आर्थिक ही परिस्थितीशी दोन हात करत कारभारी नेरकर यांनी मुलाला शिक्षणासाठी नाशिकमध्ये पाठवले. शहरात आल्यावर आपल्या परिस्थितीला न परवडणारे शिक्षण लक्षात घेऊन मनोहरने मेडिकलमध्ये पार्टटाइम नोकरी केली. शिक्षण सुरू असतानाच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासदेखील सुरू ठेवला. दोन-तीन वेळा यशाने हुलकावणी दिली. मात्र, हार न मानता अभ्यास सुरूच ठेवला. अखेर प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर मार्च २०१६मध्ये आयबीपीएसतर्फे घेण्यात आलेल्या ‘संशोधन सहाय्यक’ वर्ग दोन अराजपत्र‌ित या पदासाठी मनोहर नेरकरची खुल्या प्रवर्गातून निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या विभागातील एक्कावन जागांपैकी केवळ पाच जागा ‘संशोधन सहाय्यक’ या पदासाठी होत्या. मनोहरने बारावीपर्यंतचे शिक्षण नामपूर येथील महात्मा गांधी विद्यामंदिर येथे व पुढे एमकॉमपर्यंतचे शिक्षण नाशिक येथील बीवायके कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्याच्या यशाचे श्रेय त्याने आपले वडील कारभारी नेरकर व आई वंदना यांना दिले आहे. मनोहरचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्याने त्याला अनेकांचे सहकार्य मिळत गेले. या सर्व व्यक्तींमुळेच मी हे यश प्राप्त करू शकलो असे मनोहर सांगतो. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

स्वतःच्या क्षमतांवर खरे उतरल्याचा मनस्वी आनंद आहे. परंतु, हे यश माझ्या एकट्याचे नसून सर्व मित्र व माझ्या कुटुंबाचे आहे. यापुढे राष्ट्रहितासाठी निःस्वार्थपणे काम करण्याची इच्छा असून, समाजातील तळागाळातील लोकांना मदत करायची आहे.

- मनोहर नेरकर

अगदी हालाखीच्या परिस्थितीतून मुलाने हे यश प्राप्त केले याचा खूप आनंद होत आहे. केलेल्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाल्यासारखे वाटत आहे. त्याची जिद्द आणि चिकाटी यामुळेच तो यशस्वी होऊ शकला.

- कारभारी नेरकर, वडील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एचआयव्हीबाधितांना निरोगी बाळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तो मूळचा सटाणा तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातला, तर ती अमरावतीची. आपला विवाह होईल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. कारण एचआयव्ही. परंतु, हा एचआयव्हीच त्यांची रेशीमगाठ बांधण्यास कारणीभूत ठरला. मंगलमैत्री मेळाव्यामुळे दोघांचा विवाह ठरला. आता त्यांच्या संसाररुपी वेलीवर एका निरोगी परीने जन्म घेतलाय.

विवाहाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात, असे म्हणतात. भूतलावर त्यासाठी कुणीतरी निमित्त ठरावं लागतं. एचआयव्ही बाधितांच्या जीवनात सुखाची पहाट घेऊन येण्यास निमित्त ठरलेय यश फाऊंडेशन!
एचआयव्हीबाधित व्यक्ती समाजात एकतर आपली ओळख लपविते किंवा तिरस्काराच्या नजरा घेऊन त्यांना जगावे लागते. अविवाहीत असतानाच एचआयव्हीची लागण झाल्याचे कळले तर मग विवाहाचे स्वप्नही भंगते. ते दोघेही याच अनुभवातून गेले. आपणास एचआयव्ही झाल्याचे तिला वयाच्या तेराव्या वर्षी समजले. दुर्दैवाने तिचे मातृपितृछत्रही हरपले. ती नाशिकमध्ये मामांकडे आली. त्यांनीही तिला जीव लावला. ती वयात आली. पण एचआयव्हीग्रस्त मुलीशी विवाह कोण करणार हा प्रश्न होताच. कुणाला फसवावे असे त्यांच्याही नीत‌िमत्तेत नव्हते. मग ते यश फाऊंडेशनच्या संपर्कात आले. ट्रान्सपोर्ट व्यवसायात वाहनचालक म्हणून काम करणारा ‘तो’ देखील त्याच्या मित्रामुळे या संस्थेच्या संपर्कात आला. फाऊंडेशनने भरविलेल्या एचआयव्ही बाधितांच्या वधु-वर परिचय मेळाव्यात त्यांची एकमेकांशी ओळख झाली. यश फाऊंडेशनने मध्यस्थाची भूमिका पार पाडली अन दोघांचा विवाह झाला.
इतरांसारखेच आपल्यालाही मूलबाळ असावे असे एचआयव्हीग्रस्त दाम्पत्याला वाटणेही स्वाभाविक आहे. परंतु, होणारे मूल निरोगी असणार की ते एचआयव्हीचा शाप घेऊनच जन्मास येणार, याची धास्ती असतेच. अशी धास्ती त्यांनाही होती. परंतु, औषधोपचारातील सातत्य आणि नियमित तपासण्यांमुळे या दाम्पत्याला मुलगी झाली. तीदेखील निरोगी. जन्मानंतर पहिल्याच महिन्यात केलेल्या तपासण्यांमध्ये ती एचआयव्ही निगेट‌िव्ह आढळून आल्याने या दाम्पत्याच्या आनंदाला पारावार राह‌िला नाही. एकेकाळी नैराश्याने ग्रासलेल्या या दाम्पत्याला आता जीवन जगण्यासाठी गोंडस निमित्त मिळाले आहे. मुलीच्या जन्मापूर्वीच त्यांनी स्वत:चे घरही घेतले. आता गुण्यागोविंदाने संसार करायचा आणि मुलीला शक्य तेवढे सुख द्यायचे हाच आमच्या जीवनाचा उद्देश असल्याचे या दाम्पत्याने सांगितले.

चार दाम्पत्यांच्या वेलींवर फुले

यश फाऊंडेशन, नेटवर्क ऑफ पॉझिट‌िव्ह पीपल अॅण्ड चिल्ड्रेन लिव्हिंग विथ एचआयव्ही, विहान प्रकल्प मालेगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरात मंगलमैत्री मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या मदतीने विवाह झालेल्या आणि निरोगी बालकांना जन्म दिलेल्या चार दाम्पत्यांचा या मेळाव्यात सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदूच्या कुटुंबाकडून भामरे यांचे आभार

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे तालुक्यातील बोरविहीर गावाचा भारतीय सैन्य दलात असलेला जवान चंदू बाबूलाल चव्हाण तब्बल चार महिन्यांनंतर मायदेशी परत आला आहे.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या मतदारसंघातीलच जवान चंदू असल्याने सरकारने सतत पाठपुरावा केल्याने तो मायदेशी परतला. त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी चंदूचा मोठा भाऊ भूषण आजोबा चिंधा पाटील यांच्यांसह बोरविहीर गावातील ग्रामस्थांनी डॉ. भामरे यांची त्यांच्या धुळ्यातील निवासस्थानी भेट घेऊन पेढे भरवून गृहविभाग आणि भारत सरकारचे आभार मानले. चार महिन्यांच्या कालावधीनंतर पाकच्या तावडीतून सुखरूप मायदेशी परतलेला चंदू चव्हाण आता भारतीय लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूकंपाच्या दहशतीचे उतरणार भूत!

0
0

जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ५० गावांमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग करणार जनजागृती

नाशिक : पोर्णिमा आणि अमावस्या असेल तर भूकंप येतोच... अंगात येणारी व्यक्ती कधी खोटे बोलते होय...! ती म्हणतेय म्हणजे भूकंप आल्याशिवाय राहाणार नाही. भूकंपाच्या दहशतीचे हे भूत जिल्ह्यातील काही गावांमध्ये गावकऱ्यांच्या मानगुटावरच बसले आहे. अंधश्रध्दा आणि गैरसमजांचे हे भूत उतरविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने जनजागृतीचा मंत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन तालुक्यांमधील ५० गावांमध्ये प्रामुख्याने ही जनजागृती मोहीम राबवून अखेरच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जिल्ह्यातील कळवण, दिंडोरी आणि पेठ तालुक्यातील काही गावे भूकंप प्रवणक्षेत्र म्हणूनच परिचित आहेत. तेथील रहिवाशांमध्ये अशा नैसर्गिक आपत्तीची दहशत आहे. भूगर्भातून आवाज येत असल्याचे काही ग्रामस्थही सांगतही असतात. भूकंपाबाबतचे अनेक गैरसमज आणि अंधश्रध्दांनी रहिवाशांच्या मनात ठाण मांडले आहे. कळवण तालुक्यातील दळवट, ओतूर, कनाशी, अभोण्याच्या जवळपासची सात आठ गावे, दिंडोरी तालुक्यातील उमराळे तसेच पेठसह तालुक्यातील काही गावांमध्ये सौम्य स्वरुपाचे भूकंपाचे धक्के नेहमी बसतात. या तालुक्यांमधील ग्रामस्थांमध्ये भूकंपाबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रध्दा आहेत. पोर्णिमा, अमावस्येला हमखास भूकंपाचे धक्के बसतात. एखाद्या महिला किंवा पुरुषाच्या अंगात येते तेव्हा ती व्यक्तीही भूकंपाबाबत गैरसमज पसरविते.ग्रामस्थांच्या मनातील भूकंपाबाबतची भीती काढून टाकण्यासाठी आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सरसावला आहे. भूकंप म्हणजे काय, भूकंपाचे धक्के का बसतात, भूकंपाबाबतचे समज, गैरसमज आणि अंधश्रध्दांविषयी जनजागृती करण्याचा निर्णय आपत्ती व्यस्थापन विभागाने घेतला आहे. अशा नैसर्गिक आपत्तीला कसे सामोरे जावे याची माहिती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविता येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ५० गावांची निवड केली असून, आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सादर केलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी संमती दर्शवली आहे.

जनजागृतीचा पहिला टप्पा

ग्रामसेवक, पोलिसपाटील, सरपंच, तलाठी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, गावातील काही प्रतिष्ठीत ग्रामस्थ, आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे सदस्य अशा सर्वांना जनजागृतीच्या पहिल्या टप्प्यात भूकंपाबाबत माहिती दिली जाणार आहे. याच घटकांच्या माध्यमातून अशा गावांमधील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मणगाव गटाचा तिढा सुटता सुटेना

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

जिल्हा व परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागलाणमध्ये शिवसेना-भाजप युती संपुष्टात येण्याची चिन्हे असून, हे दोन्ही पक्ष आता स्वबळाची भाषा करू लागल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

बागलाण विधानसभा मतदार संघ भाजपकडे आहे. या ठिकाणी भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा दावा अधिक आहे. तर शिवसेना दुय्यम असल्याची भावना भाजप पदाधिकारी व्यक्त करतात. सद्यस्थितीत भाजपकडे नामपूर व शिवसेनाकडे ब्राह्मणगांव हे गट आहेत. भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा तालुक्यावर दबदबा आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चलती आहे. या अनुषंगाने भाजप या ठिकाणी स्वबळाची भाषा करत आहे.

बच्छाव कुटुंबीयांमध्ये होणार लढत?
ब्राह्मणगाव हा गट संवेदनशील असून, या गटावरूनच खरा वाद आहे. शिवसेनेचे विद्यमान सदस्य प्रशांत बच्छाव येथून त्यांच्या पत्नी सुरेखा बच्छाव यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नश‌ील आहे. तर याच गटातून भारतीय जनता पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष व मविप्रचे माजी उपसभापती डॉ. विलास बच्छाव यांनी त्याच्या पत्नी माजी जि. प. सभापती लता बच्छाव यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. यामुळे या गटात मैत्रीपूर्ण लढत होवून उर्वरित सहा गटाचे प्रत्येकी तीन तीन वाटप करण्याची शिवसेनेची मागणी आहे. मात्र या मागणीला भाजपकडून हरताळ फासण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेनेदेखील आपले अस्तित्व असल्याची जाणीव करून देण्यासाठी या सातही जिल्हा परिषद गटांत शिवसैनिक उभे करण्याचा निर्णय तालुका प्रमुख सुभाष नंदन यांनी घेतला आहे. या अनुषंगाने वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केला जाणार आहे.

उमेदवारांची शोधाशोध
तालुक्यातील नामपूर गट विद्यमान स्थितीत भाजपकडे असून तो सध्या राखीव झाला आहे. परिणामी नामपूर, ताराहाबाद, वीरगाव या गटांमध्ये भाजपला उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार असल्याची वस्तुस्थिती असली तरीही युतीच्या सकारात्मक प्रतिसादाला शिवसेना व भाजप पदाधिकारी मानसिकता दर्शवित नसल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

जायखेड्यात राष्ट्रवादीपुढे पेच

जायखेडा गटातील उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांपुढे मोठा मोठा पेच निर्माण झाला आहे. या गटामुळे सारी समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. बागलाण तालुक्यातील सात पैकी दोन गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले आहेत. त्यात जायखेडा व पठावे दिगर हे गट असल्याने या ठिकाणी आपसुकच उमेदवारीसाठी दावे प्रतिदावे केले जात आहेत. यामुळे या गटांवर सर्वांची नजर आहे. जायखेडा जिल्हा परिषद गट हा सद्यस्थितीत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. विद्यमान सदस्य यतीन पगार हे या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी त्या अनुषंगाने मतदारांशी संपर्क सुरू ठेवला आहे. तिकीट आपल्यालाच मिळेल अशी अपेक्षा त्यांना असतांनाच गत तीन महिन्यांपासून या गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र भामरे यांनी आपली उमेदवारी करण्याची प्रबळ इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनीदेखील गटांचे आरक्षण खुले झाल्यानंतर आपला संपर्क दौरा सुरू करून मोर्चेबांधणी केली आहे. यामुळे या दोघांपैकी तिकीट कुणाला द्यावे, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीला पडणार आहे. दोघेही प्रबळ दावेदार असतांना कुणाचीही उमेदवारी कापली तरी ती पक्षाच्या दृष्टीने घातक ठरणार आहे. यामुळे पक्षश्रेष्ठी हा प्रश्न कसा हाताळतात याकडे पक्षीय पातळीवर
लक्ष लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचराकुंडी खरेदीत लाखोंचा घोटाळा?

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नागरी विकास मंत्रालयाकडून अमृत योजनेअंतर्गत राज्यातील ४४ शहरांमध्ये मालेगाव शहराचीदेखील समावेश करण्यात आला आहे. या शहरांच्या स्वच्छतेचे मुल्यांकन करण्यासाठी २३ ते २५ जानेवारीदरम्यान स्वच्छ सर्वेक्षण राबविण्यात येते आहे. यासाठी मनपा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून शहरातील कचरा संकलनासाठी प्लास्टिकच्या कचराकुंड्या खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप येथील आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केला आहे. याची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

आयुक्त रवींद्र जगताप यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. १४ वा वित्त अयोग्य अनुदानातून घनकचरा व्यवस्थापन, शौचालय, हरितपट्टा विकसित करण्यासाठी वाहन व साहित्य खरेदी करण्याचा निर्णय मनपा महासभेत ३ डिसेंबर २०१६ रोजी घेण्यात आला. त्यात कचराकुंडी खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. ११ हजार ६६४ रुपयात नीलकमल कंपनीची २४० लिटर क्षमता असलेली १ कुंडी याप्रमाणे ५०० कुंड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. मात्र नीलकमल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर या कुंडीची किंमत सर्व कारांसहित ३ हजार ७८० रुपयात कंपनी देत असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images