Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 46150 articles
Browse latest View live

राष्ट्रीयीकृत बँकेत ग्राहकांचे हाल

$
0
0

भगूरला दुसरे काऊंटर सुरू करण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर शहरात एकमेव राष्ट्रीयीकृत बँक असून नोकरदार, पेन्शनधारक, व्यापारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिक या बँकेचे मोठ्या प्रमाणात ग्राहक असून पैसै स्वीकारण्यासाठी व पैसे देण्यासाठी एकमेव काऊंटर असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय व तासनतास सभासदांना रांगेत उभं राहावे लागत आहे. याबाबत युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकारी यांनी शाखेला तात्काळ दुसरे एक काऊंटर सुरू करण्याची मागणी, भगूर व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष शाम चांडक यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

भगूर शहरात सर्वच सहकारी बँका आहेत, मात्र नागरिकांचे व्यवहार हे युनियन बँकेत व्यवहार जास्त चालतात. या शाखेत लहवित, लोहशिंगवे, वंजारवाडी, शेणित, पांढुर्ली, विंचुरी दळवी, दोनवाडे, राहुरी परिसरातील नागरिकांचा याठिकाणी राबता असतो. सध्या जुन्या नोटा व्यवहारातून बाद झाल्याने त्या जमा करण्यासाठी नागरिक बँकेत मोठ्या प्रमाणावर येत आहेत. याठिकाणी ज्येष्ठ नागरिक पेन्शन घेण्यासाठी आले तर त्यांना साधे बसण्यासाठी बाक अथवा खुर्च्यांची सुविधा नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे होत असल्याचे ते सांगतात. बँक प्रशासनाने कुठलाही प्रकारची पार्किंग व्यवस्था केलेली नाही सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान या परिसरात वाहतूक सदैव जाम असते. यामुळे अनेकवेळा नागरिकांचे याठिकाणी छोटेमोठे वादही होतात. बँकेत ग्राहकांनी जर पासबूकवर एंट्री करून मागितली तर दुपारी ३ वाजेनंतर या असे सांगण्यात येते. त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांच्या दिवस खर्ची होतो तर शाखा व्यवस्थापकदेखील मनमानी कारभार करत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशी माहिती मिळत नसल्याने महिला ग्राहकांचे हाल होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घंटागाडींची ‌अनियमितता

$
0
0

जुने नाशिकमध्ये अारोग्य समस्या; नाशिकरोडला स्वच्छता अभियान

सिन्नर फाटा : नाशिकरोड प्रभागात सध्या २४ नवीन घंटागाड्या सुरू आहेत. त्याशिवाय जुने चार ट्रॅक्टर व छोट्या ३ गाड्याही कचरा संकलनासाठी कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात नवीन घंटागाड्या कार्यरत आहेत. या घंटागाड्यांची अनियमितता वाढली असल्याने काही भागात नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत आहेत.

स्वच्छता विभागाकडून मोहिमा

नाशिकरोड पालिका विभागीय स्वच्छता निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच प्रभागांत स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिमा राबवून स्वच्छता राखली जात आहे. मंगळवारी शहरातील धार्मिक स्थळांच्या परिसरात व बुधवारी (दि. २१) शासकीय कार्यालयांच्या परिसरात मोहिमा राबविण्यात आली.

जीपीएसमुळे अनियमितता

नाशिकरोड प्रभागात सध्या नवीन २४ घंटागाड्या कार्यरत आहेत. या गाड्यांना जीपीएस प्रणाली असून त्यानुसार निश्चित सर्व मार्गांवर या घंटागाड्यांना कचरा संकलनासाठी बंधनकारक केल्याने प्रभागात पोहचण्यासाठी उशीर होतो. त्यामुळे काही भागात रस्त्यांचा कडेला किंवा चौकात कचरा साचू लागला आहे.

कचरा व्यवस्थापन कोलमडले

जुने नाशिक : नवीन घंटागाड्यांची कमरता आणि जुन्या घंटागाडींचे अनियमता व दांडीमुळे जुने नाशिकसह पूर्व विभागात कचरा विल्हेवाट व्यवस्था कोलमडली आहे. पूर्वीच या विभागातील कचरा उचलण्यासाठी तीन ते चार दिवसांनी फिरकणाऱ्या घंटागाडीची सवय झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यांसह मिळेल त्या ठिकाणी कचरा फेकून देण्याची सवय झाली आहे. घंटागाडीच्या दांडीमुळे रस्त्यावर फेकलेला कचरा तसाच पडून राहत असल्याचेही चित्र पूर्व विभागाच्या सर्वच प्रभागात दिसून येते.

पूर्व विभागात एकूण ३३ जुन्या घंटागाड्या फिरून कचरा उचलतात. मात्र यातील अनेक जुन्या घंटागाड्या सेवेतून कमी झाल्याने त्याजागी आता नवीन घंटागाड्या येत आहेत. पुरेशा प्रमाणात ते लवकरच उपलब्ध होतील, असे पूर्व विभाग अधिकारी सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिंगळेंना अटक

$
0
0

बेहिशेबी रक्कम बाळगल्याचे प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील बडे प्रस्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली. दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर पिंगळे यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पिंगळे यांच्या विरोधात ठोस पुरावे हाती लागल्याचा दावा एसीबीने केला असून, त्यांच्या मालमत्तांची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील स्टेनो विजय सीताराम निकम, लेखापाल अरविंद हुकुमचंद जैन आणि लिपिक दिंगबर हिरामण चिखले या तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशेबी रक्कम बाळगल्याप्रकरणी २५ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. तब्बल ५७ लाख ७३ हजार ८०० रुपयांची बेहिशेबी रक्कम ते सायंकाळच्या वेळी वाहनातून घेऊन जात असल्याचे आढळून आले होते. म्हसरूळ पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. संशयित निकम हा पिंगळे यांचा स्वीय सहायक असल्याने सर्वांचेच या प्रकरणाकडे लक्ष लागले होते. तपास सुरू असताना पिंगळे साक्षीदारांना धमकावत होते, असा दावाही एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पिंगळे यांना बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हे पुरावे आले आढळून

तीनही संशयितांची कसून चौकशी सुरू असताना काही धक्कादायक माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागली. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता किंवा तत्सम फरक मिळतो तेव्हा त्यांच्याकडून कोरे धनादेश घेऊन ती रक्कम त्यांच्या खात्यातून काढून घेतली जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाशिकरोड शाखेतून नऊ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यातून चार लाख ७८ हजार रुपये काढून ते पिंगळे यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वीकारल्याचा पुरावा आढळून आला आहे. मे २०१४ मध्ये कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करताना कर्मचाऱ्यांच्या अकाउंटवरून एकाच दिवशी रकमा लाच म्हणून काढल्याचे आढळून आले आहे. आरोपी आणि पिंगळे यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाचा शास्त्रीय पुरावा मिळून आला आहे. याखेरीज आरोपींकडे मिळून आलेली सुमारे ५८ लाखांची रक्कम ते पिंगळे यांना देण्यासाठी जात असल्याचे तपासात आढळून आल्याची माहिती एसीबीचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिली.

पिंगळेंवर झालेले आरोप

आमदार, खासदार, जिल्हा बॅँकेचे चेअरमन, नाशिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अशा किमान डझनभर सहकारी संस्थांवर पिंगळे यांचा प्रभाव आहे. याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळे विक्री, व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या अनामत रकमा यासंदर्भात पिंगळे यांच्यावर आरोप आहेत. पेठरोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमधील गाळे बांधणीसाठी घेतलेले कोट्यवधींचे कर्ज न फेडल्याने संभाव्य जप्तीची टांगती तलवारही पिंगळे यांच्यावर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला

$
0
0

३२ पैशांच्या चेकसाठी नांदगाव तालुक्यातील तरुणाला आला दोनशे रुपये खर्च

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मराठीत एक म्हण आहे ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ असाच काहीसा अनुभव नांदगाव तालुक्यातील सचिन खैरनार यांना आला. आपल्याला आलेले कुरिअर घेण्यासाठी ते न्यायडोंगरी येथून मालेगाव येथे तब्बल दोनशे रुपये खर्चून गेले खरे, पण मिळालेल्या पाकिटात होता अवघ्या ३२ पैशांचा व्होडाफोन कंपनीने पाठवलेला धनादेश. आता हा धनादेश घेऊन हसावं की रडावं हेच सचिन खैरनार यांना उमगत नाहीये. हा ३२ पैशांचा धनादेश मात्र सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

एखाद्या मोबाइल कंपनीचा प्रामाणिकपणासुद्धा कोणाची डोकेदुखी ठरू शकते याचा भन्नाट अनुभव सचिन खैरनार यांना आला आहे. अवघ्या ३२ पैशांचा धनादेश हातात पडल्यावर सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांच्या मनाची स्थिती झाली आहे. हा ३२ पैशांचा धनादेश सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. मालेगाव येथे कंपनीत कामास असलेले व न्यायडोंगरी (ता. नांदगाव) येथे राहत असलेले सचिन खैरनार यांच्याकडे व्होडाफोन कंपनीचे पोस्टपेड सिमकार्ड होते. ते कार्ड त्यांनी पोर्टबेल करून आयडियाचे सिमकार्ड घेतले. नंतर व्होडाफोन कंपनीने प्रामाणिकपणाने सचिन यांची जास्त भरली गेलेली अवघ्या ३२ पैशांची रक्कम त्यांना अॅक्सिस बँकेच्या चेकद्वारे कुरिअरने त्यांच्या पत्त्यावर पाठवली. पण पत्ता अपुरा असल्याने ते पाकीट मालेगाव कार्यालयात परत गेले.

न्यायडोंगरी येथे असलेल्या खैरनार यांना मालेगाव येथून कुरिअर घेऊन जाण्यास सांगितले आता कसले कुरिअर? याबाबत सचिन खैरनार पूर्णतः अनभिज्ञ होते. पण महत्त्वाचे काही असेल म्हणून तब्बल दोनशे रुपये खर्च करून ते मालेगावला गेले आणि हातात पडलेल्या पाकिटात असलेला त्यांच्या नावाचा ३२ पैशांचा धनादेश पाहून ते अचंबित झाले. त्यासाठी २०० रुपये खर्चावे लागले.

हसावं की रडावं

आता ३२ पैशांचा चेक घेऊन कंपनीच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक करावे, की चार आण्याची कोंबडी बारा आण्याचा मसाला हा अनुभव आला म्हणून कपाळावर हात मारून घ्यावा, असा प्रश्न त्यांना पडलाय. या गोष्टीमुळे हसावं की रडावं हेच त्यांना कळेनासे झाले आहे. मात्र ३२ पैशांच्या चेकची ही गोष्ट नोटाबंदीच्या तणावात मिस्किलता पेरणारी ठरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांदा कोसळला; शेतकरी संतापला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

केंद्र व राज्य सरकारने निर्यातीवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सटाणा बाजार समितीत कांद्याचे दर अचानक कोसळले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील कांदा लिलाव बंद पाडून विंचुर-शहादा-प्रकाशा राज्यमहामार्गावर रास्तारोको आंदोलन छेडले. यामुळे तब्बल तीन तासांहून अधिक काळ राज्य महामार्गा बंद होता.

दरम्यान, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व बाजार समिती सभापती यांनी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून लिलाव पूर्ववत सुरू करण्यास विनंती केल्याने कांदा लिलाव उशिरा सुरू करण्यात आले.

बुधवारी सकाळी बाजार समितीच्या देवळा रस्त्यावरील नव्या जागेत शेतकऱ्यांनी ८०० हून अधिक ट्रॅक्टर भरून कांदा विक्रीसाठी आणला होता. लिलावाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच राज्य व केंद्र सरकारने निर्यात कांद्यावरील सबसीडी ३१ डिसेंबर १६ पासून रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त धडकले. यामुळे कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडून थेट राज्य महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू केले.

अचानक झालेल्या या आंदोलनामुळे बाजार समिती प्रशासन व पोलिस प्रशासनाचे धाबे दणाणले. परिणामी राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. शहरापर्यंत त्याचे लोण पसरल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तहसीलदार आबासाहेब तांबे, पोलिस निरीक्षक बशीर शेख, बाजार समिती सभापती रमेश देवरे, जि. प. सदस्य शैलेश सूर्यवंशी, शेतकरी नेते जिभाऊ खंडू आदींनी आंदोलकांशी चर्चा केली.

कांदा उत्पादक जिभाऊ खंडू म्हणालेत की, सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांच्या मरणाला प्रोत्साहन देणारे आहे. शेतकरी देशोधडीला लावण्याचा सरकारचा कुटील डाव असल्याची भावना व्यक्त केली. या रास्ता रोको आंदोलनात कांदा उत्पादक अनंत शेवाळे, भरत पवार, शिवाजी शेवाळे, योगेश सोनवणे, शिवाजी ठोके, अशोक सोनवणे, विजय जाधव, केवळ सांळुखे, देविदास ठाकरे, विकी अहिरे, संतोष बिरारी, शाम पगार, रवींद्र गुंजाळ, सुनील दातरे, निंबा रौंदळ, नीलेश सूर्यवंशी, प्रवीण बोऱ्हाडे, लक्ष्मण देवरे, चेतन सोनवणे, सुरेश देवरे, राजेंद्र ठाकरे, सुनील दात्रे, आदी शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांच्याच दालनात धूर निघतो तेव्हा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात कुठेही आपत्ती उद्‍भवली की तत्काळ मदत मिळेल, या विश्वासाने संकटग्रस्त नागरिक जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधतात. परंतु, हीच आपत्ती या विभागाचे अध्यक्ष असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ओढावते तेव्हा प्रशासकीय यंत्रणेची कशी धांदल उडते याचा प्रत्यय बुधवारी आला. आगीवर मात करणारे फायर एक्स्ंटिग्युशर चालविण्याचे शास्त्रशुध्द ज्ञानच यंत्रणेला नसल्याचे उघड झाले. यानिमित्ताने आपत्ती व्यवस्थापनाच्या सज्जतेचा बुरखाही फाडला गेला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दगडी इमारतीमध्ये जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांचे प्रशस्त दालन आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांचा नेहमीच राबता असतो. राज्य सरकारच्या वतीने पुढील आठवड्यात नाशिकमध्ये महाआरोग्य शिबिर होणार असल्याने त्याबाबतची बैठक बुधवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली होती. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक आटोपून जिल्हाधिकारी त्यांच्या दालनात येणार त्याचवेळी या दालनात धूर निघत असल्याचे काही कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. एकाएकी निघू लागलेल्या या धुरामुळे अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. धूर नेमका कोठून निघतोय याची पाहणी कर्मचारी करू लागले. धूर निघणे सुरूच असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी दालनाबाहेरील फायर एक्स्ंटिग्युशर मशिन घेऊन कर्मचाऱ्यांनी दालनाकडे धाव घेतली. परंतु, त्याचा वापर कसा करावा हे कुणालाच माहीत नव्हते. येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारीही दालनात आले. मात्र त्यांनाही मशिन कसे हाताळावे याची माहिती नव्हती. त्यामुळे आग विझविण्याचे मशिन हातात असूनही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. याचवेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत त्यांच्या दालनात आले. फायर एक्स्ंटिग्युशर मशिन कसे वापरतात याची माहिती त्यांनी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात या मशिनचा वापर करण्यात आला. दालनाचे दोन्ही दरवाजे उघडून देण्यात आले. हाकेच्या अंतरावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कार्यालय असूनही या घटनेपासून ते अनभिज्ञ होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळे चौपाटी नियमात बसणे नाही!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे शहरातील पांझरा नदीकिनारी असलेल्या चौपाटीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे झालेल्या सुनावणीत शहराचे आमदार अनिल गोटे यांचा अर्ज नामंजूर करण्यात येऊन तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दिलेला स्थगिती आदेश रद्द करण्यात आला आहे.

पांझरा नदीकिनारी आमदार गोटे यांच्या संकल्पनेतून चौपाटी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी एकूण ६० स्टॉल आहेत. त्यासाठी शासनाच्या २० कोटी रुपये मूल्याच्या भूखंडावर गैरकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याची तक्रार योगेंद्र जुनागडे यांनी केली होती. महापालिका आरक्षण क्रमांक ५३ बगीचा, आरक्षण क्रमांक ५४ पार्किंग आणि आरक्षण क्रमांक ५५ कै. उत्तमराव पाटील यांचे स्मारक या प्रयोजनासाठी आहे. यातून शहराच्या पार्किंगचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असा युक्तिवाद करून स्टॉलधारकांचे अतिक्रमण निष्कासित करावे. ते नियमानुकूल करू नये, अशी मागणी करण्यात आली होती. आमदार अनिल गोटे यांनीही युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेत तक्रार असलेले काम नियमानुकूल करण्यास पात्र नाही. त्यासाठी अपील अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दिलेला स्थगिती आदेश रद्द केला आहे. हे आदेश सर्वांना बंधनकारक राहतील, असे मंत्री राठोड यांनी आदेशात म्हटले आहे, अशी माहिती मिळाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाडळदे शाखेला ठोकले टाळे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील पाडळदे येथील जिल्हा बँक शाखेला संतप्त नागरिकांनी गुरुवारी (दि २२) टाळे ठोकले. गेल्या चार दिवसापासून केंद्रीय शाखेकडे मागणी करुनही पैसे मिळत नसल्याने कर्मचारी रिकाम्या हाताने परतत आहेत. गुरुवारी नागरिकांनी सकाळपासून बँकेत पैशांसाठी गर्दी केली होती. मात्र बँकेत कॅश उपलब्ध नसल्याचे शाखा व्यवस्थापकांनी सांगितल्याने संतप्त नागरिकांनी बँकेला टाळे ठोकले. यावेळी आत एकूण ४ कर्मचारी होते. अचानक झालेल्या या प्रकाराने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शाखा व्यवस्थापक, उपसरपंच यांनी समजूत काढल्यानंतर कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली.

नोटा बंदीच्या निर्णयाला चाळीस दिवस उलटले तरीही तालुक्यातील ग्रामीण भागातील चलन तुटवडा जैसे थे असल्याने येथे असलेल्या जिल्हा बँक शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

पाडळदे येथील शाखेवर परिसरातील सहा-सात गावांचे आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. शाखेत एकूण ८ हजार खातेधारक असून यात बहुसंख्य शेतकरी, पेन्शनर, शिक्षक आहेत. तालुक्यातील जिल्हा बँक शाखेला टाळे लावण्याची ही दुसरी घटना असून, लवकर कॅश उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सटाण्यात उद्यापासून रंगणार यात्रोत्सव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या १२९व्या जयंती उत्सवानिमित्त शनिवार (दि. २४) पासून यात्रोत्सवास सुरुवात होत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिराचा परिसर व मंदिराची सजावट करण्यात आली असून तब्बल १५ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहराचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी देव यशवंतराव महाराज यात्रोत्सवाला शनिवारी सुरुवात होत आहे. पहाटे चार वाजेच्या सुमारास बागलाणचे नायब तहसीलदार आबासाहेब तांबे व पल्लवी तांबे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनील मोरे व. योग‌िता मोरे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड व अरूणा बागड यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास संपूर्ण सटाणा शहरातून देवमामलेदार यांची रथ मिरवणूक निघणार आहे. यासाठी देवस्थान समिती सदस्यांनी जय्यत तयारी केली आहे. रात्री ११ ते १ दरम्यान कीर्तन व पुढे नामस्मरणाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (दि. २५) पासून ते बुधवार (दि. २८) पर्यंत अन्नदानाचे करण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी दोन वाजता कुस्त्यांची दंगल होणार आहे.

यात्रोत्सवात दुकाने, स्टॉल्स, व प्रदर्शने लावण्यासाठी आतापासून बाहेरगावाहून यात्रेकरू दाखल होऊ लागले आहेत. यात्रोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी अधिक पोलिस कुमक मागविली आहे. देवस्थानचे विश्वस्त दादाजी सोनवणे, धर्मा सोनवणे, गंगाधर येवला, सुनील मोरे, विजय पाटील, रमेश देवरे, कौतीक सोनवणे, राजेंद्र भांगडीया, रमेश सोनवणे, बाबुराव सोनवणे, हेमंत सोनवणे प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहात पुन्हा आढळले ८ मोबाइल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात मोबाइल फोन आढळून येण्याचे प्रकार अद्याप सुरूच असून, बुधवारी रात्री आणखी आठ मोबाइल आढळल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यातच आठ मोबाइल फोन आढळले होते. आठवडाभरात १६ मोबाइल आढळले असले तरी सिम कार्डे मात्र अद्याप आढळलेली नाहीत. कारागृहात बेकायदेशीररीत्या मोबाइल फोन आढळून येण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असल्याने कैद्यांना मोबाइल फोन पुरविण्याचे रॅकेट असल्याची शक्यता स्पष्ट होत आहे.

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात बुधवारी रात्री सात ते पावणेआठच्या दरम्यान कारागृहात सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दोन पथकांनी उपअधीक्षक प्रमोद वाघ व वरिष्ठ तुरुंगाधिकारी फड यांच्या उपस्थितीत झडती घेण्यात आली. या वेळी मंडल क्रमांक ७ मधील सर्कल क्रमांक ६ मधील बॅरेक क्रमांक ४ मधील बंदिवानांची अंगझडती व त्यांच्या खोलीची झडती घेण्यात आली. या वेळी या खोलीच्या दरवाजाजवळील भिंतीच्या टाइल्स काढून त्यामागे तीन मोबाइल फोन दडवून ठेवलेले आढळले, तर याच बॅरेकच्या छतावरील लाकडाच्यामागे प्लास्टिकच्या पिशवीत लपवून ठेवलेले दोन मोबाइल फोन बेवारस आढळून आले.

तुरुंगाधिकारी संतोष कोकणे, संजय मयेकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या दुसऱ्या पथकाने कारागृह मंडल क्रमांक ७ मधील सर्कल क्रमांक ७ मधील बॅरेक क्रमांक २ मधील बंदिवानांची व त्यांच्या राहत्या खोलीची झडती घेतली असता, त्यांच्या खोलीच्या शौचालयाच्या भांड्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दोन मोबाइल फोन दडवून ठेवलेले आढळले. याशिवाय याच बॅरेकच्या परिसरातील शौचालयाजवळ एक मोबाइल फोन आढळून आला. या प्रकरणी तुरुंगाधिकारी वामन तुकाराम निमजे यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिम कार्डांचा तपास नाहीच!

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह जणू काही मोबाइल शॉपच बनले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाइल फोन या कारागृहात आढळून आले असले तरी सिम कार्डे आढळलेली नाहीत. एकूण १६ मोबाइल फोनपैकी केवळ एकाच मोबाइलमध्ये सिम कार्ड आढळले आहे. उर्वरित १५ मोबाइल फोन सिम कार्डाविना आढळले असल्याची नोंद पोलिस ठाण्यात आहे. सिम कार्डांचा तपास कारागृहाच्या प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्मोद्योग घोटाळ्याची होणार चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सामाजिक न्याय विभागाच्या चर्मोद्योग व अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या वतीने मागास वर्गातील गरजू लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याची बाब येथील छत्रपती सेनेने उजेडात आणली होती. याचा पाठपुरावा करत कार्यकर्त्यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे यांची भेट घेत व्यथा मांडली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे सामाजिक न्याय विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयात कोट्यवधींच्या घोटाळ्याची शक्यता कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घत समाज कल्याणच्या विविध पदाधिकाऱ्यांची बैठक सामाजिक न्याय राज्यमंत्री कांबळे यांनी बोलावली आहे. दरम्यान, त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समितीही स्थापन केली आहे.
या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे नाशिकच्या परिघापलिकडे पाठवली जाऊ नयेत, अशी सूचनाही कांबळे यांनी केली आहे. गंगापूर रोडवरील रहिवासी विठ्ठल रामदास कचरे यांना काही दिवसांपासून समाजकल्याण विभागाच्या कर्जवसुलीच्या नोट‌िसा वारंवार मिळाल्या. यावर या नोट‌िसांशी आपला संबंध नसल्याचा खुलासा करण्यासाठी कचरे समाजकल्याण विभागात गेले होते. मात्र, यावेळी त्यांना स्वत:लाच बनावट कागदपत्रांच्या आधारे एका कर्ज प्रकरणात जामीन दाखविण्यात आले होते. या जामिनासाठी कचरे यांची रेशनकार्ड व इतर कागदपत्रेही बनावट दाखविण्यात आली असल्याची बाब उघड करत छत्रपती सेनेच्या वतीने समाजकल्याणमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात काही स्थानिक एजंट आणि काही कर्मचारी सहभागी असल्याशिवाय हा बनावटगिरीचा प्रकार घडणेच शक्य नाही, असा दावा राज्यमंत्री कांबळे यांच्याशी झालेल्या भेटीत संघटनेच्या शिष्टमंडळाने केला आहे. या शिष्टमंडळात संघटनेचे नीलेश शेलार, तुषार गवळी, पंकज पवार, चेतन शेलार, संजय जाधव, नितीन काकुस्ते, युगांत निकम, शुभम पवार, सुरज जगताप, सुयोग हरदास, सागर पाटील आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्षतोडीस हिरवा कंदील

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-पुणे महामार्गाच्या विस्तारीकरणात अडथळा ठरणारे महापालिकेच्या हद्दीतील २३६ वृक्ष तोडण्यास गुरुवारी वृक्ष प्राधिकरण समितीने हिरवा कंदील दाखविला आहे. या २३६ पैकी शक्य असेल तेवढ्या वृक्षांचे पुनर्रोपण आणि उरलेल्या प्रतिवृक्षाच्या बदल्यात दहा वृक्ष लावण्याची अट घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुनर्रोपित वृक्ष व नवीन वृक्ष हे रस्त्याच्या एक किलोमीटर रस्त्यावरच लागवड करण्याचे बंधन ‘न्हाई’ या संस्थेला घालण्यात आले आहे. त्यामुळे समितीचा निर्णय हा उच्च न्यायालयात सादर केला जाणार असून, न्यायालयाच्या आदेशानंतरच रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे.

नाशिक-पुणे महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून, या कामात नाशिकरोड ते सिन्नर फाटा यादरम्यान २३६ वृक्ष येत आहेत. त्यामुळे या वृक्षतोडीला थेट हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते. हायकोर्टाने संबंधित विषय ‘न्हाई’ या संस्थेला महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीसमोर ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार हा विषय समितीसमोर ठेवण्यात आला होता. गेल्या बैठकीत उद्यान अधीक्षकांकडून अहवाल मागविण्यात आला होता. उद्यान अधीक्षक महेश तिवारी यांनी हा अहवाल आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत सादर केला. समितीच्या बैठकीत या अहवालावर विस्तृत चर्चा झाली.

या वृक्षांमुळे नाशिक-पुणे रस्त्याचे विस्तारीकरण रखडले आहे. त्यामुळे हे वृक्ष हटवणे आवश्यक असल्याने समितीने या २३६ वृक्षांच्या तोडीस हिरवा कंदील दाखवला आहे. ‘न्हाई’ला या वृक्षतोडीच्या बदल्यात शक्य तेवढ्या वृक्षांचे पुनर्रोपण करणे बंधनकारक करण्यात आले आहे, तसेच जे वृक्ष तोडावे लागतील त्या प्रत्येक वृक्षाच्या बदल्यात १० नवीन वृक्ष लावावे लागणार आहेत. या दहा नवीन वृक्षांसाठी १० फुटांची अट असणार आहे, तसेच पुनर्रोपण व नवीन वृक्ष हे या रस्त्याच्या एक किलोमीटर परिसरातच लावावे लागणार आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जाणार आहे. या सर्व वृक्षांची जबाबदारी ही ‘न्हाई’वर राहणार आहे. समितीचा निर्णय आता उच्च न्यायालयात सादर केला जाणार आहे. उच्च न्ययालयाच्या आदेशानंतर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे. समितीच्या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, सदस्य प्रा. कुणाल वाघ, संदीप भवर, मनोज घोडके, पुंडलिक गिते उपस्थित होते.


नाशिकरोडचे नाट्यगृहही अडचणीत

नाशिकरोडला नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य नाट्यगृहाच्या जागेवर ५३ मोठे वृक्ष आहेत. यात ४० वृक्ष हे बाभळीचे, तर अन्य वृक्ष हे कडुनिंब व इतर प्रजातींचे आहेत. त्याचप्रमाणे बोरगड येथील एअर फोर्सच्या हद्दीतील चार वृक्षांच्या तोडीचा विषयही समितीच्या समोर चर्चेला आला. समितीने या वृक्षांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीने पाहणी केल्यानंतरच या वृक्षांच्या तोडीला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. नाट्यगृहाच्या उद्घाटनाची तयारी सुरू असतानाच समितीने पाहणी करून निर्णय घेतल्याने उद्घाटनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच आर्यावर्त प्रकल्पाबाबतही पाहणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लॉन्ससह रस्त्यांची जबाबदारी घ्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
लग्नसराई दरम्यान लॉन्सची संख्या अधिक असलेल्या परिसरात वाहतूक कोंडी व त्या अनुषंगाने इतर समस्या निर्माण होतात. पार्किंगची जबाबदारी तर लॉन्स मालकाची असते. मात्र, वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लॉन्स मालकांनी रस्त्यावर कर्मचारी नेमण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत.
याबाबत नुकतेच वाहतूक पोलिसांनी बैठकीचे आयोजन केले होते. लग्नसराईदरम्यान वाहतुकीच्या समस्या उद्भवतात. लॉन्समालकांनी आलेल्या नागरिकांना पुरेशी पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र, अद्याप लॉन्सचालक याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. वाहने रस्त्यावर पार्क झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत बोलताना वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले की, लॉन्सचालकांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रस्त्यावर पार्क होणाऱ्या वाहनांना यापुढे थेट जॅमर लावून कारवाई केली जाणार असल्याचे बजबळे यांनी स्पष्ट केले. लॉन्स चालकांनी आलेल्या वाहनांना पुरेशी जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होणार नाही, याकडे लक्ष पुरवायला हवे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेंज रिपोर्टसाठी विशेष मोहीम

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असलेले चेंज रिपोर्ट जलदगतीने निकाली काढण्यासाठी आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी १ ते ३१ जानेवारी २०१७ दरम्यान विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. नाशिकमध्ये ९० टक्क्यांहून अधिक चेंज रिपोर्ट पेंडिंग असल्याची बातमी ‘मटा’ने दिली होती. त्याची दखल घेण्यात आली असून, या अभियानामुळे बेकायदा कामकाज करणाऱ्यांना मोठा चाप बसणार आहे.

आतापर्यंत धर्मादाय संस्थांना पदाधिकारी बदल असो की इतर, त्यासाठी वर्षानुवर्षे चकरा माराव्या लागत होत्या. त्यानंतरही त्याला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या प्रकरणात तर अनेक संस्थांमध्ये मंजुरी न मिळाल्यामुळे बेकायदेशीपणे काम केले जात होते. त्यामुळे या चेंज रिपोर्टला त्वरित मान्यता मिळावी, अशी मागणी पुढे आली व त्याला धर्मादाय आयुक्तांनी मान्यता दिली. या अभिनानामुळे यापुढे अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली निघणार असून, त्यामुळे भविष्यात बेकायदेशीरपणे पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विश्वस्त संस्थांनी गेल्या पाच वर्षांत हिशेब आणि बदल अर्ज सादर केले नसतील त्यांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे नोंदणी असलेल्या पण निष्क्रिय असलेल्या संस्थांची संख्यासुद्धा कमी होणार आहे.

कोणत्याही संस्थेत पदाधिकारी बदल असेल किंवा नवीन कार्यकारिणीची निवड झाली असेल, तर त्यासाठी एका नमुन्यात सर्व कागदपत्रे दाखल करून अर्ज दाखल करावा लागतो. त्यानंतर त्यावर सुनावणी होते, नंतर त्यावर तारखा पडत असतात. पण, निर्णय होत नाही. जोपर्यंत चेंज रिपोर्टला मान्यता मिळत नाही, तोपर्यंत संस्थेचे पदाधिकारी बेकायदेशीर काम करत असतात. परिणामी एखादा निर्णय त्यांच्या अंगलट आल्यास कायदेशीर मुद्दा उपस्थित होतो. त्यामुळे या बदलला त्वरित मान्यता मिळाल्यास कायदेशीरपण काम करणे सोपे जाते. बहुतांश संस्थांचे पदाधिकारी हे स्वयंस्फूर्तीने काम करीत असतात त्यांना त्यातून काहीही लाभ नसतो. पण, अशा ट्रस्टींनासुद्धा धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या चकरा मारणे भाग पडत होते. त्यामुळे या अभियानाचा त्यांनाही फायदा होणार आहे.

संस्थांना फायदा

जिल्ह्यात धर्मादाय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या ९० टक्के चेंज रिपोर्टमध्ये कोणताही वाद नाही. त्यामुळे त्यांनी जर कागदपत्रांची पूर्तता केली असेल, तर त्याला त्वरित मान्यता मिळणार आहे. त्यानंतर १० टक्के चेंज रिपोर्टमध्ये दोन्ही बाजू एेकल्यानंतर निर्णय होणार आहे. पण एकूणच या मोहिमेचा संस्थांना मोठा फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचशेच्या नोटांची रेकार्ड ब्रेक छपाई

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील करन्सी नोट प्रेसने गुरुवारी विक्रमी कामगिरी करताना एकाच दिवसात पाचशेच्या रेकार्ड ब्रेक साडेसतरा दशलक्ष नोटांची छपाई करून त्या बेलापूरला पाठविल्या आहेत. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ही माहिती दिली. कालबाह्य झालेल्या आणि मेन्टेनन्सची आवश्यकता असलेल्या मशिनरीवर नाशिकरोड प्रेस कामगारांनी नोटबंदी झाल्यापासून आतापर्यंत तीनशे दशलक्ष नोटांची अविश्रांत छपाई केली आहे. आणखी तीन महिने युद्धपातळीवर हे काम सुरू राहणार आहे.

गुरुवारी एकूण २० दशलक्ष नोटा बेलापूरला रेल्वेद्वारे रवाना करण्यात आल्या. त्यामध्ये पाचशेच्या साडेसतरा आणि शंभराच्या अडीच दशलक्ष नोटांचा समावेश आहे. बुधवारी (दि. २१)देखील बेलापूरला १९ दशलक्ष नोटा रेल्वेने पाठविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये एक रुपयाच्या एक दशलक्ष, पाचशेच्या नऊ दशलक्ष, शंभराच्या सहा दशलक्ष आणि पन्नासच्या तीन दशलक्ष नोटांचा समावेश होता. नाशिकरोड प्रेस कामगारांनी जुनी मशिन्स असतानाही सलग पाच रविवार सुटी न घेता नोटांची छपाई सुरू ठेवली आहे. त्यातील दोन रविवार त्यांनी मोफत काम केले आहे. त्यामुळेच देशातील नोटांची टंचाई वेगाने कमी होण्यास मदत मिळत असल्याची माहिती गोडसे यांनी दिली. प्रेसमधील मशिनरींचे आधुनिकीकरण केल्यास आणि आणखी मशिनरी उपलब्ध झाल्यानंतर उत्पादन वाढणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निराधारांच्या मदतीसाठी ‘आधार फॅशन शो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फॅशन शो म्हंटलं, की छानसं ग्रूमिंग करून मखमली रॅम्पवर चालण्याचं कौशल्य. विशेष म्हणजे देखण्या तरुणाईला स्वतःला एक्स्पोज करण्याचं हक्काचं व्यासपीठ. मात्र, फॅशन शोची ही व्यावसायिक संकल्पना झुगारून निराधारांसाठी सोशल टच असलेला रॅम्प शो नाशिकमध्ये जानेवारीत होणार आहे. यात वय, उंची, रंगाचं बंधन नाहीच, शिवाय निराधार मुला-मुलींनाही यात सहभागी करून घेत महाराष्ट्रातील नवोदितांना संधी देणारा रॅम्प शो आयोजित करण्यात आला आहे. या रॅम्प शोमधून जमा होणारी रक्कम आधाराश्रमातील मुलांना देण्यात येणार आहे. ओम मंगलम् प्रॉडक्शनचे संचालक अमोल थोरात यांच्या संकल्पनेतील हा आधार फॅशन शो ‘आरक्षण दोन घासांचे’ या टॅगलाइनखाली साकारण्यात येणार आहे.

विविध ब्रँडसोबत रॅम्पवर चालण्याची संधी देणाऱ्या या फॅशन शोमधून आधाराश्रमातील मुलांना मदत मिळावी हा एकमेव उद्देश असल्याची माहिती ओम मंगलम् प्रॉडक्शनचे संचालक अमोल थोरात यांनी दिली. सोशल मीडियावर या उपक्रमाची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत या रॅम्प शोसाठी राज्यभरातील १८९ जणांनी नावनोंदणी केली आहे. ‘चूल आणि मूल’ एवढ्याच परिघात असलेल्या अनेक गृहिणींनीही या रॅम्प शोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असून, यात ७० वर्षांच्या ज्येष्ठांचाही समावेश आहे.

या फॅशन शोचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणतीही स्पर्धा नाही. नवोदितांना केवळ ओळख मिळावी, सुप्त गुणांना चालना मिळावी हा यामागचा उद्देश आहे. आधाराश्रमातील मुलांना दानशूरांच्या मदतीवर दोनवेळचे अन्न मिळते. त्यांच्या मदतीसाठीच हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आल्याने ‘आरक्षण दोन घासांचे’ ही टॅगलाइन दिल्याचे थोरात यांनी सांगितले.

निराधारांची व्हाइट फॅशन!

या फॅशन शोमध्ये आधाराश्रमातील विधवा महिलांसह पुरुष, मुले-मुलींचाही सहभाग असणार आहे. मात्र, त्यांची व्हाइट फॅशन असेल. विविध ब्रँडच्या पांढऱ्या कपड्यांची फॅशन ते सादर करणार आहेत. या फॅशन शोचे हे वेगळेपण असल्याची माहिती संचालकांनी दिली. इच्छुकांनी मनीषा, कल्याणी (९३७३१५१९०९) यांच्याकडे नावनोंदणी करून निराधारांच्या मदतीसाठी रॅम्पवर चालावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंजली फूड पार्क विंचूरला?

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विंचूर वाइन पार्कमध्ये विकसित करण्यात आलेल्या भूखंडावर पतंजलीचा संभाव्य फूड पार्क येण्याची दाट शक्यता आहे. सद्यःस्थितीत वाइन पार्कमध्ये तुरळक प्रमाणात वायनरी कार्यरत आहेत, तर उर्वरित विकसित भूखंड पडून आहेत. या जागेवर कृषी प्रक्रिया उद्योगाला यापूर्वीच मान्यता देण्यात आल्याने पतंजलीचा प्रकल्प तेथे होण्याची चिन्हे आहेत.

रामदेवबाबा यांच्या पतंजली उद्योगसमूहाचा फूड पार्क नाशिकला होणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. या पार्कसाठी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा केला होता. आता हा पार्क होणार असल्याच्या शक्यतेने नाशिकच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतींत सध्या भूखंड शिल्लक नाहीत. दिंडोरी येथे सध्या भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी तेथील भूखंड विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, औरंगाबाद हायवेवरील विंचूर वाइन पार्कमध्ये सध्या विकसित भूखंड आहेत. केवळ तुरळक वायनरी तेथे कार्यरत आहेत. याच ठिकाणी तिसऱ्या फेजमधील ५० हेक्टर (१२५ एकर) जागा औद्योगिक विकास महामंडळाने संपादित केली आहे. या जागेवर पायाभूत सोयी-सुविधा विकसित होऊ शकतात, तर याचलगत तब्बल १०० हेक्टर जागा संपादित होऊ शकते. वाइन उद्योग बहरत नसल्याने तेथील जागेवर कृषी प्रक्रिया उद्योग यावा यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले. त्यास मान्यताही देण्यात आली. त्यानुसार पतंजलीचा पार्क विंचूर येथे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विंचूर वाइन पार्कमधील तिसऱ्या फेजमधील ५० हेक्टर जागा सध्या पडिक आहे. ही जागा संपादित असून, त्यावर सोयी-सुविधा उपलब्ध होऊ शकतात. तेथे कृषी प्रक्रिया उद्योगाला यापूर्वीच हिरवा कंदील देण्यात आलेला आहे.

- जगदीश होळकर, वाइन उद्योजक

पतंजलीच्या पार्कसाठी अद्याप जमिनीची मागणी करण्यात आलेली नाही. येवला, दिंडोरी आणि विंचूर येथे जागा उपलब्ध आहेत. प्रस्ताव आला, तर तातडीने कार्यवाही करण्यात येईल.

- हेमांगी भामरे-पाटील, प्रादेशिक व्यवस्थापक, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता उरले आठ दिवस!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पाचशे व हजाराच्या नोटा रद्द केल्यानंतर त्या बँकेत भरण्यासाठी देण्यात आलेली ५० दिवसांची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार असून, आता अवघे आठ दिवस बाकी आहेत. त्यानंतरही देशभराबरोबर जिल्ह्यातील सर्व व्यवहार पूर्ववत होतील, असे कोणतेही चित्र नाही. नोटाबंदीनंतर बँकांचे व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले असून, कॅश शॉर्टेजचा प्रश्न सर्वांसमोर आजही कायम आहे. त्यामुळे पुढील काही महिने तरी व्यवहार सुरळीत होण्यासाठी वाट बघावी लागणार आहे. एकीकडे कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन दिले जात असले, तरी दुसरीकडे त्यासाठी असणारी व्यवस्था पूर्णपणे तोकडी असून, त्यामुळे ही घोषणाही प्रत्यक्षात कूचकामी असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात खासगी व राष्ट्र‌ियीकृत बँकांच्या ५२५ शाखा असून, ९०३ एटीएम आहेत. यातील स्टेट बँक सोडल्यास सर्वच बँकांत आजही कॅशचा प्रश्न कायम आहे. त्यात स्टेट बँकेलाही रिझर्व्ह बँकेने नवीन चलन गेल्या चार दिवसांपासून न दिल्यामुळे आठ दिवसांत ते न मिळाल्यास या बँकेतही कॅश शॉर्टेजचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाचशे व हजारांच्या नोटा ३० डिसेंबरनंतर बाद झाल्यानंतर नव्या नोटा बाजारात येणार असल्या, तरी त्यात दोन हजाराच्या नोटा जास्त असल्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था कधी सुरळीत होईल, याची सर्वांना प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्युनिअर इंजिनीअरला लाच घेताना पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालव्यातून घेतल्या जाणाऱ्या पाण्याबाबत पोलिस केस न करण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागून पैसे स्वीकारणाऱ्या पालखेड पाटबंधारे उपविभागातील ज्युनिअर इंजिनीअर राजू पुना रामोळे याला अँटिकरप्शन ब्यूरोने पकडले.

एसीबीकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराची लोणवाडी शिवारात वडिलोपार्जित शेती असून, शेतीजवळून पालखेड डावा कालवा गेलेला आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणे तक्रारदाराने पाइप टाकून कालव्यातील पाणी वापरले. १४ डिसेंबर रोजी राजू रामोळे यांनी या ठिकाणी येऊन तक्रारदारास बोलावून घेतले. अनधिकृतपणे कालव्यातून पाणी घेतल्यामुळे तुमच्यावर पोलिस केस करावी लागेल, असे रामोळेने सांगितले. केस करायची नसल्यास नऊ हजार रुपये देण्याची मागणी केली. तडजोडीअंती रामोळेने पाच हजार रुपये घेण्यास तयारी दर्शवली. त्यानुसार तक्रारदाराने दोन हजार रुपये दिले. मात्र, यानंतर रामोळे सातत्याने फोन करून उर्वरित पैशांची मागणी करू लागला. त्यामुळे तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने गुरुवारी दावचवाडी येथे सापळा रचला. लाच स्वीकारताना एसीबीने रामोळेला जेरबंद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाळकेंचा ऐतिहासिक ठेवा जपा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे नाशिकला लाभलेले वरदान असून, त्यांच्यामुळेच नाशिकचे नाव संपूर्ण चित्रपटसृष्टीत अभिमानाने घेतले जात आहे. त्यांचा जीवनप्रवास हा अभ्यासण्यासारखा अाहे. त्यांच्यातील चित्रपट निर्मितीची ओढ वाखाणण्यासारखी आहे. दुर्दैवाने फाळकेंच्या वस्तूंची जपणूक केली जात नाही ही खंत आहे. हा ऐतिहासिक ठेवा आपण जपायला हवा, असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक,चित्रपट निर्माते आणि राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार विजेते कमल स्वरूप यांनी व्यक्त केले. ते अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

अभिव्यक्ती मीड‌िया फॉर डेव्हलपमेंट आणि मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या ‘अंकुर फिल्म फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. रावसाहेब थोरात सभागृहात कमल स्वरूप यांच्या हस्ते फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन झाले. अगदी जुन्या काळातील चलचित्रफीत फिल्म बॉक्स अर्थात फिल्म बायोस्कोप उघडून फिल्म फेस्ट‌िव्हलचे उद्धाटन करण्यात आले. यातून ‘देखो, सोचो और बनाओ’ असा संदेश देण्यात आला. यावेळी अभिव्यक्तीचे बोर्ड मेंबर अनुराग केंगे आणि भिला ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.

एफटीआय येथे शिक्षण घेत असताना संशोधन विषयाअंतर्गत चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर कमल स्वरूप यांनी चित्रपट बनविण्याचे ठरविले होते. याची सुरुवात अर्थात नाशिक येथून झाली. मात्र ज्या मातीत फाळके जन्मले तेथे त्यांच्याविषयी फार तोकडी माहिती मिळाली. रे. टिळक यांचे नातू देवदत्त टिळक यांनी त्यांची खूप माहिती दिली. फाळके यांचा वाडा आता राहिला नसल्याची खंत कमल स्वरूप यांनी यावेळी व्यक्त केली. कमल स्वरूप यांनी ‘फाळके फॅक्टरी’ वेब साइटची निर्मिती आणि दादासाहेब फाळके यांच्या जीवनकार्यावर तयार केलेल्या ‘ट्रेसिंग फाळके’ या डॉक्युमेंटरीविषयी महिती दिली. ‘ट्रेसिंग फाळके’ हा फाळके आणि आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास सांगणार लघुपट आहे. हा संशोधन म्हणून तयार केला. मात्र, हे काम पाहून फिल्म डिव्हिजनने हा इतिहास जपून ठेवण्याचे ठरव‌िले आणि याचा एक शोधपर लघुपट तयार करायला सांगितला. तो आम्ही तयार केला, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 46150 articles
Browse latest View live




Latest Images